Skip to main content

मांडणी

डिप्रेशन

लेखक nishapari यांनी शनिवार, 10/08/2019 19:43 या दिवशी प्रकाशित केले.
डिप्रेशनची कारणं असंख्य आहेत . आयुष्याच्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या क्षेत्रात म्हणजे - शिक्षण , नोकरी , अर्थार्जन , विवाह / संसार यात आलेलं अपयश हे कारण तर सर्वज्ञात आहे . पण डिप्रेशनचं दुसरंही एक तितकंच प्रभावी कारण म्हणजे अपराधीपणाची भावना , गिल्ट हेही असतं हे कदाचित कमी लोकांना माहीत असेल .. म्हणजे जे त्या अनुभवातून गेलेले नाहीयेत असे इतर डिप्रेशन फ्री हेल्दी लोक ... काहीवेळा वरच्या कारणाशी ते निगडीत असतं तर काहीवेळा स्वतंत्र ...

निवेदन

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 04/08/2019 06:49 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मित्रो गेल्या काही धाग्याना मिळेलेला अत्यल्प प्रतिसाद बघता मी मी पा वर धागे गुंफणे थांबत आहे आता पयंत आपण प्रतिसादाच्या रूपानं माझ्यावर प्रेम केले त्या बद्दल धन्यवाद माझे लेखन वर गेलो असताना मी ३५०च्या वर धागे गुंफल्याचे मला आढळले -मला वाटते इतक्या संख्येने सातत्याने लिहिणारा मी एकमेव सदस्य असावा वास्तविक कारखानदारी फ्याक्टरी सारख्या रुक्ष वातावरणात वावरत असताना हि मी पा मुळे मी लिहायला शिकलो शृंगार काव्य लेख कथा असे अनेक प्रकार हाताळले मी पा माझे आवडते संकेत स्थळ आहे मी पा च्या वाटचालीस आमच्या शुभेछया ज्याकालीन चित्रे एक अधोविश्वातली तरल प्रेमकथा च अर्धवट लेखन झाले

दिव्यांची कहाणी

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 02/08/2019 14:51 या दिवशी प्रकाशित केले.
(परवा दिव्यांची अवस झाली. खरंतर त्याच दिवशी इथे ही कथा पोस्ट करायची होती, पण जमले नाही. नवी पारंपरिक कथा रचण्याचे धाडस केले आहे. :) ) ऐका दीपांनो तुमची कहाणी. कैलासावर सदाशिव बसले होते. तिकडून पार्वती आली. ती नाराज दिसत होती. शंकराने कारण विचारले. तशी ती म्हणाली, ‘माझी मुले खेळणार कशी? वाढणार कशी?’ ‘काय झाले?’ ‘उजेड नाही. प्रकाश नाही. बघेन तिकडे अंधुक अंधुक. चेंडू कुठे गेला दिसत नाही. माझी मुले खेळणार कशी? वाढणार कशी? या कैलासावर सगळा कसा अंधार अंधार!’ सदाशिवाने सूर्याला बोलावले. सूर्य आला. कैलासाच्या आडच थांबला. कैलासपतीने विचारले, ‘उजेड नाही. प्रकाश नाही.

एक राजकीय सूड : बँकांच्या राष्ट्रीयकरणाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष : दूरगामी वाताहत

लेखक सुधीर मुतालीक यांनी गुरुवार, 01/08/2019 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
Nationalisation Of banks 29 जुलै 1969 रोजी केलेल्या लोकसभेतल्या आपल्या भाषणात इंदिरा गांधी यांनी बँकांच्या राष्ट्रीयीकरणाची भलामण करताना सांगितले की शेती, निर्यात आणि लघु उद्योगांना चालना देण्याच्या भव्य उद्देशाने हे पाऊल त्यांनी उचलले आहे. स्वातंत्र्यानंतर चौदा बँकांचे राष्ट्रीयकरण हा आजवर घेतलेला सर्वात मोठा क्रांतिकारी निर्णय असावा किंवा कदाचित सर्वात मोठा आर्थिक आघात. प्रत्यक्षात या तीनही क्षेत्रात कितना तीर मारा ?

बनपाव की करवंट्या.......?

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 23/07/2019 18:27 या दिवशी प्रकाशित केले.
(पुरुषोत्तम बोरकर, तुम्ही 'परकारातील मल्ल' या तुमच्या आगामी पुस्तकात काय लिहिले असते, त्याची मी कल्पनाही करू शकत नाही. पण तुम्ही गेलात आणि विचारवंतांचे एक छद्मरूप डोळ्यांसमोर तरळून गेले. श्रद्धांजली.) बनपाव की करवंट्या.......? त्यांचा ‘भूमिका’ या शब्दावर जीव. अतोनात. मग ती घ्यायची असो, करायची असो वा वठवायची असो. पण ते पडले पुरुष, बाईच्या भूमिकेची त्यांना दांडगी हौस. बरं, आता भूमिका घ्यायला, वठवायला किंवा करायला बायका आहेत हे सांगूनही त्यांना पटत नसे. भूमिकेचा प्रसंग आला रे आला की ते बनपाव वापरत. मेकअपमन सांगे, ‘करवंटी वापरा.’ तर ते म्हणत, ‘तिला वजन नसते. भूमिका म्हणजे वजन पाहिजे.

देवाघरचे देणे आणि ग्रहणवेळा

लेखक शिव कन्या यांनी बुधवार, 17/07/2019 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
#टिचभर_गोष्ट देवाघरचे देणे आणि ग्रहणवेळा ती दर शनिवार रविवारी पार्कातल्या एका कोपऱ्यात बसे. हाताशी ए फोर साईझचे कागद, दोनचार पेन्सिली, शार्पनर आणि इरेझर. (इरेझर लागत नसेच.) हौशी जोडपी येत, एकमेकांचे स्केच करून घेत. आईबाप मोठ्या कौतुकाने आपल्या लेकराबाळांची छबी रेखाटून घेत. आरशात पाहून कंटाळलेले कुणी स्वत:ला कागदावर उतरवून घेत. दहा ते पंधरा मिनिटात कोऱ्या कागदावर ती समोरच्याचा नाकनक्शा तंतोतंत रेखाटे. आजूबाजूला बघ्यांची गर्दी जमे. त्यांच्या डोळ्यांत आश्चर्य असे, कौतुक असे. घेणारा स्वत:च्याच रूपावर खुश असे. अंधार पडू लागला की ती पैसे मोजी.

डार्क फॅन्टसी - सुपरनॅचरल - भाग 4

लेखक nishapari यांनी सोमवार, 15/07/2019 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
भाग 1 - https://www.misalpav.com/node/44619 भाग 2 - https://www.misalpav.com/node/44807 भाग 3 - https://www.misalpav.com/node/44821 सुपरनॅचरल मालिकेचे काही एपिसोड खूप विनोदीसुद्धा आहेत.... आणि खरं म्हणजे भीती वाटण्यासारखी नाहीये मालिका ... पात्रांचे आपापसातले संबंध ह्या गोष्टीवर जास्त जोर दिला आहे .. दोन भावांना एकमेकांबद्दल वाटणारी काळजी , प्रेम हे जास्त हायलाईट केलं आहे ...

तुझे शहर

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 02/07/2019 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या नकळत तुझे शहर फिरून आलेय – डोळे न उघडता तुला पाहून आलेय रस्ते ओलांडताना तुझा हात धरला आहे – तुझा हात घामेजला आहे मंदिरातले कासव ओलांडले आहे – तुझ्या हातावर तीर्थ ठेवले आहे दर्ग्यातल्या जाळीतून डोकावले आहे – लोबानचा गंध दरवळत आहे मिठाईच्या दुकानात इमरती घेतली आहे – हात चिकट, तोंड गोड झाले आहे भर बाजारात चिक्कीच्या बांगड्या घेतल्या आहेत – तुझे डोळे चमकत आहेत रसवंतीत पांढऱ्या मिशीचा रस प्याले आहे – तुझा रुमाल पुढे, हसू मागे आहे त्या झाडाखाली क्षणभर थांबलो आहोत – तू सावली, मी नि:श्वास झालो आहोत लाचा घेताना मी गोंधळले आहे – तू म्हणतोस, रंग जाऊ दे, आठवणी राहू देत

बिल देऊन आलो..

लेखक गवि यांनी सोमवार, 01/07/2019 10:38 या दिवशी प्रकाशित केले.
सांगावयास गेलो, ऐकून काय आलो? सुनावलेस तू, मी बिल देऊन आलो.. सैराट पावसाने पुरता.. भिजून आलो. त्या गोठल्या दुपारी बिल देऊन आलो.. हात होता तुझा अन कानशील माझे लोकां उमजण्याआधी बिल देऊन आलो. चालते होणे त्वरे सोपे गेले तुला वेटराने हटकले, मी बिल देऊन आलो. डोळे भरून आले.. पावसाच्या भरवशावर ना रोखले तयांना, अन बिल देऊन आलो.

मी तुझा विचार करते

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 14/06/2019 00:36 या दिवशी प्रकाशित केले.
मी तुझा विचार करते, मी तुझ्या वयात रमते.... माझे खळाळणारे हसू अनुभवांच्या भोवऱ्यांतून तरून सुशांत जलाशयातल्या शांत स्मितासारखे तुझ्या ओठांशी येऊन थांबेल...... मी तुझा विचार करते, मी तुझ्या वयात रमते......