Skip to main content

कविता

मिसळाख्यान

लेखक शैलेश यांनी बुधवार, 02/04/2008 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
जय जय मिसळपावा । तूझी किर्ती अमर्यादा । गुणानुक्रम तुझे वर्णीता । विद्वज्जनही थकती ।। १ ।। टोपीकरांचा* प्रभाव पडूनी । कैसे कैसे जन वर्तती । चिंताक्रांतले थोर ज्ञानी । अंतराळी सभेसी ।। २ ।। इतालियन चायनीज भक्षती । नटमोग-या मालिका बघती । आणिक मिरवती फ्याशनी । तयांसी शहाणे करावे ।। ३ ।। मजसी तेथ पाचारण करोनी । मिसळीचे गुण वर्णुनी । वेवस्थित काव्य रचोनी । मिसळपावी प्रकाशना सांगितले ।। ४ ।। त्यांची आज्ञा शिरोधर । मी तो केवळ आज्ञाकार । कवितेचा गंधही ना ठाव । परि प्रयत्न करीतो ।। ५ ।। अहो ही मिसळ अलौकिक । तेणे साधली ओवी मज । आणि श्रोते आपण विद्वान । म्हणूनी धारिष्ट्य करीतो ।। ६ ।। अंतःकरण करावे कुशाग
Taxonomy upgrade extras

पाऊस माझ्यासाठी काय आहे?

लेखक उदय सप्रे यांनी मंगळवार, 01/04/2008 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
तिच्या मोकळ्या केसांत अलगद झिरपतो माझी इच्छा कशी तो आपसुक पुरवतो? तिच्या ओठांवर थांबलेला त्याचा एक थेंब पाऊस.....प्रेमाचं दव नाही तर काय आहे? हिरव्यागार पनांवर टपोरं मोगर्‍याचं फूल फुलत असतं घेवून तिच्याच वेणीची चाहूल अड्खळतं अवचित माझं प्रत्येक पाऊल पाऊस्.....तारुण्य आणि रसिकतेची माय आहे ! कोसळणार्‍या सरी तिला चिंब भिजवतात अबोली साडीला अंगाशी घट्ट सजवतात मनात आपसुक प्रेमाचे अंकूर रुजवतात पाऊस....हुरहुरणार्‍या मनावरची साय आहे ! चहाचा शेवटचा कप शिल्लक आहे थरथरणार्‍या तिला पण तो हवा आहे अर्धा घेवून ती उष्टावलेला अर्धा मला देते हा असा "अमृताचा" क्षण प्रत्येकाला हवा आहे ! पावसामुळेच तर हे सगळं

आयुष्य

लेखक जयवी यांनी मंगळवार, 01/04/2008 10:10 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्य म्हणजे काय असतं देवाने जन्माला घातलं म्हणून काय जगायचं असतं....? खरं तर....

ईश्वर, सगुणातला आणि निर्गुणातला...!

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 31/03/2008 15:20 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे, ष्टोरीच म्हणा ना! :) कथा तशी जुनी आणि पारंपारिकच, १९९५/९६ साली ऐकलेली. खैरागढ विद्यापिठाच्या संगीत विभागात ख्याल गायकीची सौंदर्यस्थळे असं काहीसं शीर्षक असलेल्या कार्यशाळेत मला डॉ जंगम यांनी रसिक श्रोत्याची भूमिका मांडण्याकरता मुद्दाम बोलावलं होतं (येण्याजाण्याचा आणि राहण्याचा खर्च देऊन बरं का!), तेव्हा गप्पांच्या ओघात जंगम साहेबांनी ही कथा मला सांगितली होती. डॉ जंगम तेव्हा त्या विद्यापिठाच्या संगीत विभागाशी निगडित होते, परंतु बर्‍याच वेळेला मुंबईला यायचे व मुंबईतील गाण्याच्या मैफलींमधूनच त्यांची माझी ओळख झाली होती.

मुलीनेच का नेहमी सासरी जायचं ? - कविता

लेखक यशोदेचा घनश्याम यांनी सोमवार, 31/03/2008 14:43 या दिवशी प्रकाशित केले.
एका ई-मेल मधून आलेली कविता - कवी / कवयित्री माहित नाहित. ती एकदा आजीला म्हणाली... मुलीनेच का गं नेहमी सासरी जायचं ? आपली माणसं सोडून तीनेच का परकं घर आपलं मानायचं? तिच्याकडूनच का अपेक्षा जूनं अस्तित्व विसरायची? तिच्यावरच का जबरदस्ती नवीन नाव वापरायची? आजी म्हणाली अगं वेडे हा तर सॄष्टीचा नियम आहे नदी नाही का जात सागराकडे आपलं घर सोडून! तो येतो का कधीतरी तिच्याकडे आपली वाट मोडून! तीचं पाणी किती गोड...

जे घुसळे रवी

लेखक अजय जोशी यांनी शनिवार, 29/03/2008 20:40 या दिवशी प्रकाशित केले.
कवी म्हणजे कवी म्हणजे कवी असतो दही घुसळून लोणी काढणारी रवी असतो कवीला माहीत घुसळणे फक्त स्निग्धता लोण्यात मिसळणे फक्त स्वत: मात्र फिरुन फिरुन बुडत असतो कवी म्हणजे कवी म्हणजे कवी असतो स्निग्धतेच्या अंशासाठी जग सारं धावतंय रवीचं चाक गरागरा फिरतंय तरंगणा-या गोळ्यापासून अलिप्त जो असतो कवी म्हणजे कवी म्हणजे कवी असतो

चेहरा

लेखक सुवर्णमयी यांनी शुक्रवार, 28/03/2008 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
आभास फक्त होता, मी थांबले कितीदा माझ्याच सावलीने धास्तावले कितीदा पाने झडून गेली,पक्षी उडून गेले मातीस घट्ट धरूनी मी ठेवले कितीदा गर्दीत माणसांच्या का ओळखू न आला? मी चेहऱ्यास माझ्या धुंडाळले कितीदा पत्ता जुनाच होता, रस्ता तसाच होता मुद्दाम आठवांना सांभाळले कितीदा जाई होऊन वाघ फिरणे होते तसे नफ्याचे ( गाढव मनात त्याच्या ओशाळले कितीदा)

आयुष्य....."सप्टेंबर २००५" ला लिहिलेली एक कविता

लेखक उदय सप्रे यांनी शुक्रवार, 28/03/2008 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्य तेंव्हा "सायरा बानो" सारखं असतं इकडून तिकडे हिंडण्याचं चकाट्या पिटत फिरण्याचं .....जेंव्हा आपलं वय "एक ते चार" असतं ! आयुष्य मग "गीता बाली" सारखं होतं पुष्कळ वेळ बागडण्याचं, मग पुस्तकांशी झगडण्याचं .....जेंव्हा आपलं वय "पाच ते आठ" असतं ! आयुष्य डोलणार्‍या "वहिदा" सारखं होतं क्षणात गिरकी घेण्याचं , बर्‍याचदां फिरकी घेण्याचं .....जेंव्हा आपलं वय " नऊ ते बारा " असतं ! आयुष्य आता "नूतन" सारखं होतं प्रसंग कित्येक हसण्याचे, अपुर्‍या प्रयत्ना

मन आंब्याचा मोहोर....!

लेखक प्राजु यांनी शुक्रवार, 28/03/2008 02:01 या दिवशी प्रकाशित केले.
मन बगळ्यांची माळ,निळ्या नभाच्या प्रांगणी.. मन प्रतिबिंब वेडे, वेड्या तळ्याच्या दर्पणी.. मन इवलेसे फूल,नटे प्राजक्ताची फांदी.. मन मातीचा तो गंध, चढे नभालाही धुंदी.. मन आंब्याचा मोहोर, सुवर्णाचे जणू दान.. मन बसंत बहार,मधुर कोकीळ गान.. मन मोत्याचा तो थेंब, उठे पाण्यात तरंग.. मन पावसाची धार, भिजवील अंग अंग.. मन भूपाळीचा सूर, पहाटेच्या समयीचा.. मन तेवता प्रकाश, गाभार्‍यातल्या समईचा... मन विद्युल्ल्ता पात,धरेवर कोपणारा.. मन बरसता मेघ,जलामृत सांडणारा.. मन कुंकवाची रेघ, भांगामध्ये रेखलेली.. मन मायेची ती काठी, कमरेत वाकलेली.. मन सवाष्ण शृंगार, सुवासिनिचं ते लेणं... मन चांदणं टिपूर, जणू नक्षत्रां
Taxonomy upgrade extras