Skip to main content

कविता

मानाचा मुजरा!

लेखक चतुरंग यांनी गुरुवार, 24/04/2008 23:17 या दिवशी प्रकाशित केले.
अठरावर्षांपूर्वी घडले एक पहा नवल चेंडु-फळीचा खेळ खेळण्या पडे एक पाऊल वामनमूर्ती बघता, त्याला भलेभले हासले तलवारीसम बॅट तळपता डोळेही दिपले एकामागुन एक मोडितो विक्रमही सगळे टीकाकरण्या जाती तेही ठरती की बावळे असा घडविती शिष्यच तेची गुरु 'रमाकांत' स्वर्गीय पित्याचा पुत्र असे हा खरा मातृभक्त 'अजित' राहुनी निभवी तोही धाकलीच पाती खेळामधला 'डॉन'ही त्याला देई यशोपावती जगात सगळ्या जरी वाजतो डंका खेळाचा पाऊल त्याचे असे भूवरी नम्र भाव त्याचा अजून खिळती त्यावर सार्‍या अभिमानी नजरा मराठमोळ्या 'सचिन' तुला रे मानाचा मुजरा! चतुरंग
Taxonomy upgrade extras

(गजल)

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 22/04/2008 02:14 या दिवशी प्रकाशित केले.
डबल बॅरल बिरुटे सायबांची सुरेख 'गजल' मि.पा.वर आली आणि आमच्या ओठांना पुन्हा स्फुरण चढले! तेव्हा मुकेच होतो अजुनी मुकेच आहे हल्लीच चुंबनांचा झाला सराव आहे प्रेमात चुंबनांच्या तव चिंब चिंब झालो त्यांच्या धगीत अमुचे उद्ध्वस्त नाव आहे बोलणेच नसते अमुच्या व्यथा कुणाला जिंकून सर्व देणे अमुचा स्वभाव आहे आम्ही इथे विकलही तेही तिथे उदास प्रत्येक प्रेमिकाला आमुचाच ठाव आहे हरलोच बाजि आम्ही प्रेमातली पुन्हाही दुसरेच नाव घेणे ऐसा ठराव आहे हरुनी मिटू अखेर प्रेमात त्या तशाही फिरुनि आम्हावरीही तिचेच नाव आहे चतुरंग
Taxonomy upgrade extras

गझल

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी सोमवार, 21/04/2008 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
तेव्हा मुकीच होते आता मुकीच आहे आता मुकेपणाचा झाला सराव आहे जातीच्या प्रेमानं मी चिंब चिंब झाले आता धगीत माझे उद्ध्वस्त गाव आहे बोललेच नाही माझ्या व्यथा कुणाला सोसून सर्व घेणे माझा स्वभाव आहे आम्ही येथे भुकेले तेही तिथे उपाशी प्रत्येक माणसाला आमचीच हाव आहे गावात आम्ही हरलोच बाजी सजा न द्यावी त्यांना ऐसा ठराव आहे पाचोळाच जीवनाचा झाला अखेर माझ्या सांगा मित्रहो, माझा दोष काय आहे
Taxonomy upgrade extras

घोडा आणि ओझे

लेखक विसुनाना यांनी सोमवार, 21/04/2008 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
दूर कुठेशी धूळ उडवतो घोडा माळावरती टापांखाली स्वप्न उद्याचे, नाकपुड्या फुरफुरती नवीन जीवन, नवीन मानव, सृष्टीही नवनवती नवीन आतुन मनही - सारे नवीन अवतीभवती सोमरसाचे करून प्राशन चढे कुणाला मस्ती देवेंद्राचे सूक्त गाऊनी वज्रच होई छाती करित पाठ ऋग्वेदऋचांचा कुणी आहुती देती मनामनातुन गुंजन करते 'ॐ शांती शांती ' आले कोठुन अंतरिक्ष, जल, - वायु, तेज अन धरती ? - मग्न चिंतनी कुणी शोधतो विश्वाची उत्पत्ती ईश एकला आहे त्यांचा, एकच आहे पाती कुणी जाणतो पूर्णब्रह्म अन कुणी पिकवतो शेती *** *** जिथे वाहिली सिंधुसरिता अगाध पिकवित मोती आमच्या पेशींमधली जनुके तिथे पोसली होती आजमितीला गंजुन गेल

.....बळ दे !

लेखक उदय सप्रे यांनी सोमवार, 21/04/2008 09:37 या दिवशी प्रकाशित केले.
.....बळ दे ! दोन हांत जोडून माझं एकंच मागणं देवा , दु:ख दूर करु नकोस , पण ते सोसायचं बळ दे ! कोण तसा जीवनांत सुखासीन असतो? स्वदु:खात आणि परसुखात हसायचं बळ दे ! जीवनाच्या जुगारांत हार्-जीत असणारच , एकदा तरी "सुंदर" शी खेळी "फसायचं" बळ दे ! दिवसा ढवळ्या भले कितीही पापं लपू देत , अंधारातही स्वतःच्या चुका दिसायचं बळ दे ! कुणीतरी जीव लावेलंच ना या वेड्याला? थकून कधी ते अश्रू ढाळील , तर ते पुसायचं बळ दे ! स्वप्नं ऊरी कवटाळून रमी खेळत रहाणारा मी , सरते "शेवटी" "प्लस्" व्हावं , इतकं पिसायचं बळ दे

(भूक ही खरी किती)

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 21/04/2008 07:37 या दिवशी प्रकाशित केले.
केसुंनी त्यांचे विडंबन टाकताच आमच्याच्याने राहवलेच नाही! त्यांचे (वाटले बरे किती) आणि चित्तची मूळ गजल दोन्हीही आमचे प्रेरणास्थान. (गजलेत अत्यंत योग्य दुरुस्त्या सुचविल्याबद्दल केसुंचे आभार.
Taxonomy upgrade extras

हे क्रांतिकारकांनो!

लेखक अजय जोशी यांनी रविवार, 20/04/2008 10:27 या दिवशी प्रकाशित केले.
हे क्रांतिकारकांनो, बरं झालं तुम्हीच क्रांतिकारक झाला देशासाठी आता वेळ आहे कुणाला? बरं झालं तुम्हीच देशासाठी लढला खाणं, पिणं, मौजमजेला वेळ आम्हाला दिला बरं झालं तुम्ही रक्त, मांस सांडलं प्रत्येकानं आपापलं घर त्यावर बांधलं बरं झालं तुम्ही चलेजाव म्हटलं संस्कार नि संस्कृतीला सहज आम्ही सोडलं बरं झालं तुम्ही तिरंगा फडकाविला प्रत्येकानं आपापला रंग वेगळा निवडला बरं झालं तुम्ही वेळीच शहीद झाला खुर्चीसाठी भांडायला चान्स आम्हाला दिला चू.भू.दे.घे.

उरून राहता येतं !

लेखक उदय सप्रे यांनी शनिवार, 19/04/2008 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
उरून राहता येतं ! हातात काठी आली म्हणून कुणी वृ ध्द होत नाही वय लहान असूनही सर्वांना कुठे तरुण राहता येतं? चांदणं आधी मनांत फुलावं लागतं अलगद् मगच पौर्णिमेच्या चंद्राचं सौख्य पाहता येतं ! मनाचा गाभारा बुलंद असेल तरच दृष्टीचा फायदा उगीचच का रवींद्र जैनच्या संगीतात सुरांना नाहता येतं? कुंचला फिरवता आला नाही तरी बेहत्तर रसिकता असेल, तर शिंतोड्यातही नहाता येतं ! तुमचं प्रेमंच इतकं उत्तुंग हवं कुणाहीवरचं मग्.....ते "परकं" झालं तरी तुम्हाला चाहता येतं ! येणार्‍या हर अनुभवांत काव्य दडलेलं असतं हे समजणार्‍यालाच काव्य सराहता येतं ! कैफ दु:खाचाही असा बेधुंद असावा , की चुकून आलंच

प्लॅन्चेट

लेखक उदय सप्रे यांनी शुक्रवार, 18/04/2008 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
कुछ निवेदन : यह कविता हिंदोस्ताँ के हर उस शख्स को मैं समर्पित करता हूं जिसके दिलमें इस देश के लिए बेतहाशा इज्जत है , की यह देश दुनिया का एक ही देश है , जिसने इस देशपर आक्रमण करनेवाले हर देश के नागरीक को यहाँ पनाह दी है ! यह कविता मैं हिंदोस्ताँ के मशहूर वैज्ञानिक श्री.ए.पी.जे.अब्दुल कलाम और भूतपूर्व प्रधानमंत्री आदरणीय अटल बिहारी वाजपेयी जी को समर्पित करता हूं ! और्.....यह कविता हर उस शख्स को समर्पित है जिस की रूह में अब तक शहीदों की कुर्बानी जिंदा है !

मौनखेळ

लेखक पल्लवी यांनी गुरुवार, 17/04/2008 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
ह्रुदयी तव ठेवुनी माथा,हलकेच मी विसावता भिनली ही नीज नयनी,शांत झाली आर्तता ! अवचित मग जाग येता,तुझ्या ह्रुदय्-स्पन्दनी मिटले नेत्र जाणती रे,व्यथा ज्या तुझ्या मनी ! मिठी तुझी का घट्ट झाली,हालता मी उगा जरी जाईन मी कुठे कशाला,स्वर्गसुख हे तुझ्या उरी ! वाटे साद घाली, मज रातराणीचा सुगंध की सुवास हा तव तनुचा,नशीला अन मंद-धुंद ! बघ कसे बिलगुनी जाती,मोरपंखी लुब्ध वारे की श्वास हे तुझेच सखया,केसांतुन मम सळसळणारे ! राहु दे एकांत आपुला,शांत सुंदर अन स्तब्ध मौन हे राहु दे उशाशी,नको बोलबाला अन शब्द ! चांद बघ डोकावला, घ्याया निरोप आपुला पहाटराणी अल्लड आली,मौनखेळ हा संपला ! ~ पल्लवी ~