श्रद्धांजली!
कविराज वसंत बापट गेले तेव्हा या ओळी लिहिल्या होत्या.
Taxonomy upgrade extras
घाटातील वाट,
काय तिचा थाट,
मुरकते गिरकते,
लवते पाठोपाठ ।।
निळी निळी परडी,
कोणी केली पालथी,
पान फुलं सांडली,
वर आणि खालती ।।
खाली खोल दरी,
वर उंच कडा,
भला मोठा नाग,
जणू वर काढून फणा ।।
भिऊ नका कोणी,
पाखरांची गाणी,
सोबतीला गात गात,
खळाळतं पाणी ।।
- बालभारती इ. ३ री (१९८४)