जी ए कुलकर्णी ह्यांच्या 'स्वामी' कथेतील एका प्रसंगाचे कवितेत रुपांतर.
काळकोठडी मध्ये टाकला एक बंदिवान
काळ्या दगडात विसरला काळाचे भान
आहे ठाऊक पक्के त्याला, नशीब ह्या जन्मीचे
सुटण्यासाठी सहाय्य, केवळ मिळेल मरणाचे
किती खोल अन् कुणास ठाऊक, खोली तुरूंगाची
तसूभरही ना दुसरे जीवन, न चाहुल कोणाची
भिंतीमधली झडप उघडुनी, ताट येतसे आत
तोच एक आवाज जगाचा, बाकी सारी मयत
आंधाराहून कृष्ण छाया, स्वतःचीच पाहतो
नीरव अश्रू विना हुंदके, अंतरीच दाबतो
बाह्यजगाशी एकच नाते, नलीका हवेसाठी
तिच्याच योगे जगते आहे, शरीराची काठी
क्षीण कवडसा कधी उतरतो, नलीकेतून खाली
मित्रची जणू येई भेटाया, दुर्गम बंदीश