आली फिरून उत्कंठा जगण्याची
लेखनविषय:
(अनुवादीत. कवी-शैलेंद्रसिंग)
पदर ओढिला काट्यानी
चाळ तोडिला पायानी
उडत्या माझ्या मनाला
कुणि आता नका आवरूं
चालले होऊन माझे मन
जणू वाऱ्या वरचे पाखरूं
आली फिरून उत्कंठा जगण्याची
आला फिरून ईरादा मरण्याचा
गत रात्रीच्या कभिन्न अंधारातून
देखिले चोहिकडे नयन मिचकावून
बहरले जीवन फुला फुलातून
निश्चय झाला मग हे देखून
आली फिरून उत्कंठा जगण्याची
आला फिरून ईरादा मरण्याचा
का भारावलेले असे माझे जीवन
का मोकाट सुट्लेले मी असे तुफान
मन होई साशंक करीता जीवन प्रवास
वाटे जाईन हरवून मी तुझा सहवास
आली फिरून उत्कंठा जगण्याची
आला फिरून ईरादा मरण्याचा
श्रीकृष्ण सामंत
वाचने
1956
वाचनखूण
प्रतिक्रिया
2
आज फिर जीनेकी..
खरं आहे