Skip to main content

कविता

फक्त तुझ्यासाठी...(परत कविताच!)

लेखक प्रभो यांनी रविवार, 11/10/2009 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
काल तीला भेटणार होतो...पण ऑफिसमधे काम आल्याने बाईसाहेब काही भेटायला येउ शकल्या नाहीत...बसल्या बसल्या खालील कविता सुचली.. त्या दिवशी होती सकाळ कुंद ढगांनी भरलेली | ओले केस घेऊन न्हालेली तू बस साठी थांबलेली || वाटलं तुझ्या ओल्या केसातून फिरावं वारा बनून | काळजाची धकधक वाढली तुझ्या गालावरची खळी पाहून || तुझ्या त्या डोळ्यांच्या समुद्रात मारावी वाटतेय डुबकी | काढलेल्या तुझ्या आठवणींनी लागते का गं रोज उचकी || आजकाल तुझं दिसणं झालय आमवस्या पौर्णिमा | वेडा करतो गं तुझ्या गालावरचा तो कातील रक्तीमा || तू नसलीस जवळ की मन भटकतं माझं रानी-वनी | विश्वास ठेव माझ्यावर तूच बसलीय गं माझ्या मनी ||
काव्यरस

अमावस्या..

लेखक प्राजु यांनी रविवार, 11/10/2009 18:47 या दिवशी प्रकाशित केले.
काळोख भयाण किरकिर रानात रंगला आगळा खेळ चंद्राला शोधून चांदण्या थकल्या आलीया आवसेची वेळ सळसळ दाटली झाडांच्या पानांत वाराही बेभान झाला घुमघुमं घुमघुमं कडेकपारीत गारवा भरून गेला चुरचुरं पाऊल रानांत चाहूल रातीचा नूर हा न्यारा भिरभिरं पाकोळी होऊन गोंधळी काळोख जागवी सारा चमचमं चमचमं चुकार काजवा क्षणिक ठिगळ लावी लखलख प्रकाश रेखूनी उगाच रातीला भय तो दावी फ़ुंकूनी तांबडं क्षितिज रंगलं पहाट मंगल झाली दिसेल चांदवा आजच्या रातीला अवनी निवांत झाली - प्राजु
काव्यरस

व्याकरण

लेखक श्रावण मोडक यांनी रविवार, 11/10/2009 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
तू सांगितलंस म्हणून नात्यांचं व्याकरण समजून घेताना संबंधांच्या जाती लिहू लागले तेव्हा... तेव्हा म्हणालास, ‘’नाम, सर्वनाम, विशेषण आणि अव्ययाच्या या खेळात पडतेसच कशाला? नातं दोघांसाठी असतं, अन् व्याकरण नातं जोखणाऱ्यांसाठी. नात्याची जात एकच - नातं हीच" प्राधान्य ठरवण्याची वेळ आली तेव्हा हेच शब्द तुझा आधार ठरले कारण त्या प्राधान्यात नातं दोघांचंच होतं माझा आधारच काढून घेणारं! *** गेल्या अवकाळी पावसात आपण सावरलो होतो पुन्हा अवकाळी पाऊस आलाय... आता आवरून घ्यायचं आहे वाहून गेलेली स्वप्नं विसरण्याचा खटाटोप तरी करावाच लागेल, कारण पावसात भिजण्याचं एक स्वप्न त्यातलंच! तू भिजला असशील!
काव्यरस

दिवाळीचा आशावाद...

लेखक निमिष सोनार यांनी रविवार, 11/10/2009 10:17 या दिवशी प्रकाशित केले.
आली पुन्हा प्रकाशमान दिवाळी जशी अस्सल सोन्याची झळाळी दूर होवू दे संकटांची छाया काळी नष्ट होवू दे समस्यांची दाट जाळी पसरु दे ज्ञानाचा प्रकाश आभाळी खुलू दे दु:खी मनांची कळी भरू दे आनंदाने प्रत्येकाची झोळी आली प्रकाशमान दिवाळी आली प्रकाशमान दिवाळी
काव्यरस

बुधवारच्या कविता

लेखक llपुण्याचे पेशवेll यांनी गुरुवार, 08/10/2009 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी. काल बुधवार असल्याने प्रतिभेला बहर आला होता. त्यात आम्ही गूढ कविता मोड मधे जाऊन काही ओळी आमच्या मित्रांबद्दल त्यांच्या संमतीने खरडल्या आहेत. त्या खाली देत आहे. प्रत्येक कडवे अथवा कडव्यांचा समूह एका व्यक्तीस उद्देशून लिहीला आहे.
काव्यरस

(भैरवी)

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 07/10/2009 09:32 या दिवशी प्रकाशित केले.
फारा दिवसानी थोडा निवांतपणा मिळाला आणि समोर क्रांतीताईंची सुरेख 'भैरवी' दिसली, मग काय विचारावे?!..;) एक एक बोट जाड, चाखण्याची वेळ नाही 'भरती'चा प्रवास हा, थांबण्याची वेळ नाही आली पहा भजी गोल, घाल पुरणास पोटी, 'कट' कसा चुकला हे सांगण्याची वेळ नाही मनी असलेले सारे बेत इथे सिद्ध झाले, वेड्या मना, तुझी काजू 'सांडण्याची' वेळ नाही वारुणीचे टेबलाशी उभे ग्लास मांडलेले, रात्र चाखण्याची आहे, झिंगण्याची वेळ नाही 'बेड'पेच दिसे आता, आवरून घे सुरेला, घोरण्यावाचून काही 'रंग'ण्याची वेळ नाही! चतुरंग
काव्यरस

येडा टिंब

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी मंगळवार, 06/10/2009 15:27 या दिवशी प्रकाशित केले.
एक अनुस्वार नाकातुन गाणारा एक स्वल्पविराम मधेच थांबणारा एक अर्धविराम अर्ध्यात थकलेला अन पुर्णविराम रस्त्यात झोपलेला अन मी एक येडा टिंब बरेच काही सांगणारा कधी मी अनुस्वार तर कधी पुर्णविराम, तुम्ही द्याल तो अर्थ कागदावर सांडणारा ...

पैंजण...!

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 06/10/2009 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
भीती वाटु लागलेय आजकाल.., माझ्याच पायातल्या पैंजणांची ! सदोदीत पाठलाग करणार्‍या.., त्यांच्या त्या किणकिणाटाची. खुप हौसेने घातलं होतं आईनं..., तिच्या फिकुटलेल्या कृश हातांनी ! वय वाढलं...., समज आली....., पण पैंजणांचा मोह सुटला नाही ! बालपणी ते छमछम वाजवीत मिरवणं..., तारुण्यात आल्यावर त्यांचं... स्पोर्टशुजवरही रुबाब गाजवणं ! त्यांच्या मधुर किणकिणाटानं... मान वळवुन बघणारी धुंद तरुणाई..., आणि मोहरुन जाणारं माझं वेडं मन ! पैंजण अजुनही आहे... पण आता मन मोहरत नाही..., आता थबकत नाहीत नजरादेखील...... राहुन राहुन वळते माझीच नजर...., पायातल्या उदास पैंजणांकडे..., परिस्थितीने त्यांच्यावर... उधळलेल्या उन्म
काव्यरस