Skip to main content

कविता

स्वप्न

Published on बुधवार, 21/10/2009
स्वप्न
(चाल: एखादी शालेय कविता)
स्वप्नामध्ये आज पाहीले सुंदर खासे तळे
बदक पांढरे, हिरवी झाडे, सुंदर पाणी निळे        || ध्रू ||

(चॅनेल खूप आले, आता बघेन म्हणतो)

Published on मंगळवार, 20/10/2009
स्रोत- नेस्टेड चॅनेल खूप आले, आता बघेन म्हणतो रिमोटच्या कळा ह्या थोडा दाबेन म्हणतो दूर दर्शनाला हा मी बघणार नाही फारच आम्हास सर्वांना बोअर केले म्हणतो बावन्न भाग नाही मी चुकविले बरे का ठोक्याला घड्याळ्याच्या तयार असे मी म्हणतो कार्यालयी आज असा मी उगीच का बसलो? "समुद्र किनारे" ते "पाहिन" खास म्हणतो घरात कुणी नसले, की जल्लोश आनंदाचा फॅशनचा बाजार हा आज बघेन म्हणतो ती चॅनले तेव्हाची चालत रात्रभर होती पाहण्यासाठी ते प्रोग्रॅम झोप टाळेल म्हणतो शुद्ध मनाची माझ्या आता वाट लागली आहे वाया गेलेल्या वेळेची किंमत मोजेन म्हणतो
काव्यरस

निरोप

Published on मंगळवार, 20/10/2009
पुन्हा सख्या नववधू होऊनी आली दिवाळी दाराशी इंद्रधनूचे रंग वेचुनी रेखिली रांगोळी मी खाशी इवल्या इवल्या पणतीतून स्पर्धा नभीच्या तार्‍यांशी गंध खमंग फराळातला.... प्रीत तोलतो हाताशी उल्हासाची पखरण भवती, आतिशबाजी आकाशी तुझी लक्ष्मी तुझ्या स्वागता उभी बावरी उंबर्‍याशी ..... ......... तुझ्याएवजी निरोप आला....... काळोखाच्या घनराशी मोरपिशी पदराने रोखते... जळता हुंदका ओठाशी विखुरलेल्या रंगावली या, कुणी मिळवले अभिरासी ? तव नामाची इवली पणती... ज्योत उडाली आकाशी अर्ध्यावरती डाव मोडता... प्रीत एकली उपवासी मिटले कुंकु.. फुटले कंकण...
काव्यरस

(सुज रंग)

Published on मंगळवार, 20/10/2009
ह्या काव्याचे हे एक मुक्त स्वरुप- लालसर झाल्या त्या जागा जेथे डासा रे तू मला चावला उडत ये तसाच गुणगुणूनी आजच तू या संध्याकाळी... टायर, डबे, घाण अंगणी त्यात पाणी थोडे ठेवूनी तुझिया स्वागताची तयारी जय्यत करोनी ठेविली... डोक्यावर तेल लावून, बसले मी ओट्यावरी गुणगुण तुझी ऐकूनी कांती माझी आसुसली... टचकन तुझी सोंड खूपसुनी पी हे माझे रक्त लवकरी, सांग मित्र-सग्या-सोयऱ्यांना... अधीर ही तनू बावरी.. खाजवू ती चाव्यजागा, मजाच त्याची निराळी तुझ्या चाव्यांच्या खूणा घेऊनी सुज्जित बाला दिसे निराळी... तुझ्या असंख्य डोळ्यातूनी ऊडून पहा खालती लाललालती सुजगर्विता स
काव्यरस

'गिरी' वाद

Published on सोमवार, 19/10/2009
त्यांनी आयुष्यभर गांधीवाद जोपासला.... ....असं ते म्हणतात. त्यांना 'गांधीगिरी' भावली नाही. आम्ही म्ह्टल, " तुमचा विरोध नक्की कशाला ? " तुम्ही उभं आयुष्य 'गांधीं'च्या मागे 'वाद' लावून जगलात. पण वादाने प्रश्न सुटत नाहीत...... .. ... आम्ही त्यांच्या मागे 'गिरी' उभा करतोय. आधी लोकांना हिमालयाची भव्यता दिसू दे... मग गंगेचे फायदे हळू हळु कळतीलच...............
काव्यरस

दीप रंग..

लेखक प्राजु
Published on सोमवार, 19/10/2009
धूसर झाल्या नभी तारका आसमंती बेहोष हिवाळी, मेहंदी रंगल्या सोनपाऊली पहाट घेऊन येई दिवाळी.. मंद तेवते दीप अंगणी जणू नक्षत्रे उतरून आली, रंग माखूनी अंगावरती, जमीन सारी भरून गेली.. मंद सुगंधी अभ्यंगातून, धुंद काया होत सकाळी चंदन गंधी मुग्ध न्हाऊनी यौवनास या नवी झळाळी.. रूणझुण पैजण कर्णफ़ुले अन् सुवर्णमाला गळा ल्यायली, निळ्या जांभळ्या गर्भ रेशमी वस्त्रांकित ही तनू बावरी.. बिंदी रेखूनी भाळावरती, काजळरेखा नयनी आली साज सोवळा लेऊन दर्पणी लज्जित बाला रूप न्याहाळी.. क्षणैक नजरानजर होऊनी शृंगाराची मिळे पावती, लाजलाजली रूपगर्विता दिपोत्सवाचे रंग हासती.. - प्राजु
काव्यरस

पाळणाघरात

लेखक मनोज
Published on शनीवार, 17/10/2009
नको आई नको आज पाळणाघरात नको जाऊ कामाला तू राहुया घारात छान खाऊ मिळे तिथे चॉकलेट गोळी जेवायला असते तूप साखर पोळी चव तुझ्या हताची पण नसते कशात डोळ्या मध्ये पाणी आणी हूंदका घाशात खेळायला खेळन्या काऊ आन चिऊ निजायला असते उशी मऊ मऊ ऊब तुझ्या कुशीची पण नसते कशात डोळ्या मध्ये पाणी आणी हूंदका घाशात गोष्टी राजा-राणीच्या असतात छान पावसाच्या गान्यात हारवते भान गोडी त तुझ्या अंगाईची पण नसते कशात डोळ्या मध्ये पाणी आणी हूंदका घाशात नाही आई तुला मी त्रास देनार सांगशील ते सारे ऐकनार दंगा केला तर रागव तू मला खोडी केली तर सांग बाबाला नको आई नको आज पाळणाघरात नको जाऊ कामाला तू राहुया घारात
काव्यरस

आपण शब्दांचे दिवे तेवते ठेवूया!

Published on शुक्रवार, 16/10/2009
सर्व मिपाकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! आपण शब्दांचे दिवे तेवते ठेवूया! आपण बोलूया एकमेकांशी शब्दानं शब्द वाढू दे. आपण लिहूया एकमेकाला आपण वाचूया एकमेकाला शिष्ठ शांततेच्या कोषातून आपण बाहेर येऊया... आपण शब्दांचे दिवे तेवते ठेवूया! आपण ओळख दाखवत नाही एकमेकाला आपल्याला विश्वास नाही एकमेकांबद्दल आपल्याला भीती वाटते एकमेकांची एका प्रचंड ताणाखाली वावरत असतो आपण आणि मग अंधारच अंधार दाटत राहतो सभोवताली... सहज आपुलकीनं बोललो दोन शब्द एकमेकांशी तर विरुन जाईल अंधार लख्ख उजाडेल सारीकडं... `स्नेहा'च्या प्रकाशात आपण आनंदानं राहूया... आपण शब्दांचे दिवे तेवते ठेवूया! -अविनाश ओगले