Skip to main content

कविता

'च'

लेखक नाहिद नालबंद यांनी शनिवार, 12/02/2011 16:41 या दिवशी प्रकाशित केले.
'च॒' हिच्या॒त च, तिच्या॒त च ह्याच्या॒त च, त्याच्या॒त च 'च' अक्षर देशाच्या खूप उपयोगी पडते ॥१॥ च॒ळवळीत च मोर्च्या॒त च वच॒ननाम्यात च प्रचा॒रात च खुर्ची॒त च बाचा॒बाची॒त च राजकारण्यांशी 'च' चे बरेच सख्य दिसते 'च' अक्षर देशाच्या खूप उपयोगी पडते ॥२॥ भ्रष्टाचा॒रात च लाच॒खोरात च चा॒रा घोट्याळ्यात च जकातीच्या च॒लनात च बच॒त गटात च ब्यांकेच्या चे॒कात च चा॒लू खात्यात च पैशांशीही 'च' चे खूप छान जमते 'च' अक्षर देशाच्या खूप उपयोगी पडते ॥३॥ च॒कलीत च च॒टणीत च चि॒वड्यात च चा॒ट मसाल्यात च चिं॒चेत च चि॒कण्या सुपारीत च जीभेच्या चो॒चल्यात च च॒टपटीत च॒मच॒मीत सर्वांनाच आवडते 'च' अक्षर देशा
काव्यरस

कवी, रसिक वाचक आणि काव्यानुभव

लेखक शरद यांनी शनिवार, 12/02/2011 11:00 या दिवशी प्रकाशित केले.
कवी, रसिक वाचक आणि काव्यानुभव कवी म्हणजे साहित्य निर्माण कराणारा; मग तो कवी ,कथाकार, कादंबरीकार वा नाटककार असेल. वाचक हा रसिक पाहिजे कारण हिशोबाच्या चोपड्या तपासणारा वा वर्तमानपत्र चाळणारा वाचक इथे अभिप्रेत नाही. त्याला साहित्यात रस पाहिजे. ही आवड नसेल तर मग वाचक मेघदूतही दुकानदार किराण्याची यादी जा पद्धतीने वाचतो तसे वाचेल. तर असा रसिक वाचक काव्यानुभव कसा घेतो वा त्याने कसा घ्यावा याचा विचार या चर्चासत्रात व्हावा हा प्रयत्न. अनुभव तुम्ही आम्ही सर्वच घेत असतो, प्रत्येक क्षणाक्षणाला. हा अनुभव घेतांना त्यात "रस" घेतलात तर तुमचे जीवन संमृद्ध होईल. अचानक आलेल्या पावसात कोण भिजले नाही?

प्रतिक्रीया.. की अवांतर??

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शुक्रवार, 11/02/2011 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा. माझा हा मिपा वरील नेहमीचा प्रयत्न ...सर्वांची मते,सूचना ऐकवण्याची आवश्यकता नाही.. तुम्हा टूकार लोकांकडून मार्गदर्शन मिळावे अशी तर अज्जीबात ईच्छा नाही.

आठवण...( की विसर??)

लेखक हरिप्रिया_ यांनी शुक्रवार, 11/02/2011 13:17 या दिवशी प्रकाशित केले.
माझा हा मिपा वरील पहिलाच प्रयत्न ...सर्वांची मते,सूचना ऐकण्यास उत्सुक आहे.. तुम्हा दिगज्ज लोकांकडून मार्गदर्शन मिळावे ही विनंती निशब्द रात्री जेव्हा जागून निघतात, आणि आपण पाहिलेलीच स्वप्न जेव्हा आजूबाजूला पिंगा घालू लागतात, कस सांगू तुला तेव्हा तुझीच आठवण अनावर असते... जुनेच message जेव्हा नव्याने वाचते, जुनेच क्षण आठवून जेव्हा एकटीच हरवते, कस सांगू तुला तेव्हा तुझीच आठवण अनावर असते... डोळ्यांच्या कडा जेव्हा ओल्याच राहतात, अर्धवट स्वप्नातही तुलाच पहिल्याचा दावा करतात, कस सांगू तुला तेव्हा तुझीच आठवण अनावर असते... आता मीही शिकणार आहे माझ्या मनाला दगड बनवायचं, तुझ्या सारखाच न बोलता

मुलीची आई

लेखक शुचि यांनी शुक्रवार, 11/02/2011 06:53 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या सासूबाईंनी केलेली कविता खाली देत आहे - मुलगी जन्मली सगळे म्हणाले लक्ष्मी आली घरी खूप बरं वाटलं, कारण आईच ना मी ||१|| अंगणातल्या चिमण्या घरीदारी नाचतात तरी घरट्याकडे वळतात, सांजेच्या वेळात ||२|| झगे परकरपोलके झाले साड्याचोळ्या ल्याल्या पहातापहाता जरा मोठ्याच दिसू लागल्या ||३|| शिकल्या सवरल्या स्वावलंबी झाल्या आणि मन पोखरू लागल्या, उदासी सावल्या ||४|| आईचं काळीज धडधडू लागलं पण कर्तव्याची जाण मन खाऊ लागलं ||५|| मुलीची जात नाही रहाणार घरात जाईल परक्यात, पण नांदेल सुखात ||६|| तेव्हा वाटलं आत्या व्हावं मावशी व्हावं भावाबहीणींची व्हावं ताई,पण कठीण होणं मुलीची आई
काव्यरस

स्वप्न बघायला हरकत काय ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी गुरुवार, 10/02/2011 07:10 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम ..!!. प्रेम अगदी मस्त असते प्रेमाचे एक गाणे असते बाईकवर बसले की ते छान फुलून येते कळीचे फुल होते सुरवटाचे फुलपाखरू होते प्रेम अगदी मस्त असते कसे होते ..? कधी होते ...? ते कळते कोठे ..? हे सगळे नकळत होते म्हणून ते प्रेम असते शांत रस्ता छान ढग आता प्रवास छान होईल छान हवा गाणे गाईल गळ्यात असतात लडिवाळ हात गालावर रेंगाळतात अलगद श्वास ....!! हे खूप छान असते हे खूप छान वाटते मस्त मस्त हवा नि हवे तेवढे सुख मन तृप्त....
काव्यरस

गंध मायेचे..

लेखक मेघवेडा यांनी गुरुवार, 10/02/2011 04:46 या दिवशी प्रकाशित केले.
रामप्रहरी माय न्हाणी चेतवी, हो धूम्रसंधी मायमायेनेच होई धूरही इतका सुगंधी! गाय गोठ्यातून घाली साद, सत्वर माय धावे वासरा गोंजारूनी मग कौतुकाने सोडी दावे गोमयाने नटविते जमिनीस माय प्रेमभावे स्पर्श तो मांगल्यदायी भूमिलाही ओढ लावे देवचाफ़ा, मोगरा, जास्वंद, प्राजक्ता; अनंता वाही सादर रोज माय, घे सुगंधा भाग्यवंता माय घाली नित्य फ़ेरे अंगणी वॄंदावनाला गंध मायेच्याच मायेचाच येतो मंजिरीला परसदारी बांव निर्मळ, माय म्हणते माय तीतें थेंबही त्या पाझराचा तृप्त करितो लेकरांतें एक क्षणही माय नसता, पोरक्या त्या चार भिंती गंध मायेचे, घराच्या घरपणाचे बंध होती बोरकरांच्या ’खूप या वाड्यास दारे’ या कवितेने
काव्यरस

दैव आज हरवले!

लेखक स्वैर परी यांनी बुधवार, 09/02/2011 13:29 या दिवशी प्रकाशित केले.
लोपले ते सूर माझे, संपली ती स्वप्ने कळवळले आकाश सारे, सोबत मूकपणे होते मनी काय आणि काय घडले आज मीच माझ्या अंतरीचा घेत आहे ठाव कालच्या त्या आठवणी आज जाग्या जाहल्या वेळ गेली रे निघुनी खुणा मात्र राहिल्या धूर्त होती हृदये सारी प्रेम कोठे सांडले का पशुसम वागणे अन खेळ असे हे मांडले त्रिवार पाहून घेत आहे आज तुझ्या या मंदिरा या तुझ्या दरबारी होतो सेवक तुझा मी खरा पाखरे आज झाली वैरी पंख त्यांस गवसले लागली गोडी तुझी, परी दैव आज हरवले - परी
काव्यरस

हे कवितेचे झाड....!!

लेखक प्रकाश१११ यांनी बुधवार, 09/02/2011 08:21 या दिवशी प्रकाशित केले.
हे कवितेचे झाड माझे आहे तुमचे आहे ह्याचे आहे त्याचे आहे सर्वांचे आहे सर्वत्र आपले- पणाची भावना आहे ..!! या ..!! मनसोक्त बसा चिवचिव करा चिवचीवेचे सूर होतील काही सूर बेसूर असतील हरकत नाही ...!! पण शेवटी सुरांचे एक गाणे होईल गाण्याची गझल होईल मग छान मैफल जमेल सगळेच काही गाणारे नसतात सगळेच कोणी कवी नसतात ते नसतात नि तुम्ही असता [?] त्यांच्या सुरांना साथ नसते नि तुमचे सूर गगन भेदते त्यांच्या मुळे तुम्ही मोठे एवढेच फक्त लक्षात ठेवा ..!! हे चंद्र , सूर्य , तारे ही फुले झाडे ह्या नद्या नाले आम्ही आहोत म्हणून ते आहेत त्यांचा आम्हाला आधार आहे म्हणून त्यांनी गर्व करा
काव्यरस

फुलपाखरु

लेखक गणेशा यांनी मंगळवार, 08/02/2011 13:43 या दिवशी प्रकाशित केले.
आठवांचे फुलपाखरु: फुलपाखरु - गणपा भाऊ ने विशेष मदत करुनही मला येथे मीपा वर text format मध्ये हे फुलपाखरु व्यवस्थीत देता आले नाही, खाली मुळ text देतो आहे, माझ्या येथे जेंव्हा मी हे पोस्ट करतो तेंव्हा मराठी शब्द चौकोन म्हणुन दिसतात , बाकीच्यांकडे मधील स्पेस विस्कळीत होते. असो येथे देतो आहे, नीट नाही दिसले तर वरील इमेज नक्की दिसेन म्हणुन इमेज दिली आहे. text format:
मी                                       मी