Skip to main content

कविता

ते गाणे ...!!

लेखक प्रकाश१११ यांनी शुक्रवार, 21/01/2011 08:25 या दिवशी प्रकाशित केले.
ते गाणे तिन्हीसांजेला मन माझे फुलवून गेले दूर मला माझ्या गावी मज अलगद घेऊन गेले त्या नदी किनारी झाडांची हिरवी गर्दी वळणारी पाउलवाट किती वाटत होती आपुली ती हवा मस्त होती होती गाभुळलेली मज आठवूनी गेले ती तिन्हीसांजेची गाणी तिन्हीसांजेच्या डोंगर रांगा तो नाद अनामिक येई घंटीचा किणकिणनारा....!!
काव्यरस

अशीच एक राधा ....

लेखक गणेशा यांनी गुरुवार, 20/01/2011 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
मी एक राधा.. ओळखलत ? नाही ना ? महाभारत ऽऽ... आठवतय काही ? राधा ऽऽ.. हो.. पण त्या कृष्णाची नाही मी सूतपत्नी, सूर्यपुत्राची माता.. राधा... अधोरेखीत होत आयुष्य माझ.. झाकोळलेल.. मान्य मी नाही कृष्णाची राधा अन नाही त्याचीच यशोधा माता पण मी आहे दानशूर कर्णाची माता... राधा.. अथांग मातृत्व माझ ..विस्मरणात गेलेल.. महाभारत म्हंटल की आठवतो.. आठवतो तो कृष्ण, अर्जुन आठवतो तो गंधारीपुत्र दुर्योधन आठवते यशोदा आणि पांडव माता कुंती आणि आठवतो माझा शापित सूर्यपुत्र ..कर्ण नाही आठवत पण .. ही राधा व्याकुळलेली काढली कवच कुंडले कर्णाची तेंव्हा हीच माता होती अश्रुंसहीत..

तारुण्य ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी गुरुवार, 20/01/2011 13:17 या दिवशी प्रकाशित केले.
तारुण्य किती मस्त असते एक छान कविता असते तारुण्य म्हणजे सळसळनारा कल्लोळ असतो बेदम असा उत्साह असतो मस्तीचा एक डंख असतो डंख मारण्याची डंख घेण्याची हीमत म्हणजे तारुण्याचा कैफ असतो तारुण्याला नसतो भविष्यकाळ नसतो भूतकाळ त्याला असतो फक्त वर्तमानकाळ भूतकाळाने तो नाही मन रिझवत तो जगत असतो आजची स्वप्ने आणि ठाऊक असतात उद्याची बहाणे तारुण्य पाखराच्या मस्तिसारखे असते फुलपाखरासारखे झुलत असते काय करू नि काय नको त्यांचे मस्त एक गाणे असते तारुण्यात असते आभाळावर मुठ उगारण्याची हिम्मत कोठल्यातरी ध्यासाने त्यांचे मन जाते झिंगत काविता सुद्धा जमून जातात अस्सल मस्त टिकून राहतात जन
काव्यरस

नार देखणी..(लावणी)

लेखक प्राजु यांनी बुधवार, 19/01/2011 22:22 या दिवशी प्रकाशित केले.
नार देखणी, जणू मोरनी, थिरके हिरव्या रानी नजर कट्यारी, टंच उभारी, मुसमुसलेली ज्वानी अहो राजसा, जवळी बसा, ऐकून घ्या मागणी माझी... ऐकून घ्या मागणी.. मान वळविते, जरा झटकते, डौल हंसापरी असा शिणगार, नव रत्नहार, गोर्‍या कांतीवरी विशाल भाळी, आणा बिंदली, लखलख चंद्रावाणी माझी... ऐकून घ्या मागणी.. गर्भ रेशमी, रंग कांचनी, शालू हा भरजरी मखमल चोळी, निळी जांभळी, नक्षी काठावरी कमर साजिरी, बंद चंदेरी, घाला मज आणुनी माझी... ऐकून घ्या मागणी.. धुंद गारवा, मनी काजवा, लुकलुक करतो भारी विडा केशरी, रंगतो परी, मैफ़िल सजते न्यारी बसा पळभरी, देह कस्तुरी, लुटेल दुजा कुणी माझी... ऐकून घ्या मागणी.. - प्राजु
काव्यरस

आपले शब्द छान मित्र झाले आहेत ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी बुधवार, 19/01/2011 08:02 या दिवशी प्रकाशित केले.
मी तुमचे नाव ऐकून आहे तुम्हीपण मला नुकत्या नुकत्या नावाने ओळखू लागला आहात आपले शब्द मात्र एकमेकाचे छान मित्र झाले आहेत कोण हो तुम्ही.? कोण हो मी ..? हा आपण प्रश्न नाही विचारायचा कधीसुद्धा ..!! कारण आपले शब्द छान मित्र झाले आहेत आपले शब्द म्हणजे आभाळातील चांदण्या मुठभर उधळलेल्या .... आपापल्या परीनं चमकत राहतील चांगले मित्र होऊन मस्ती करतील करुद्या...! खेळूद्या ...!! आपण त्यांची मैत्री बघू कधीतरी मनात येते माझ्या: शब्दाचा मित्र जो आहे , जी आहे किती छान आहेत ....! मित्र जर ईतका छान तर त्याचे आई बाबा किती असतील .छान ...?
काव्यरस

नाकाची उचकी

लेखक अरुण मनोहर यांनी बुधवार, 19/01/2011 06:47 या दिवशी प्रकाशित केले.
आई आज काय आहे ते सांग तरी, कोणासाठी बनवली ही बासुंदी पुरी? तुझे प्रश्न ऐकून, मी त्रासलेय पुरी बाहेर जाउन खेळ, बसू नकोस घरी आणतील का मोठे, खाउ छान छान? का सांगतील खोटे, बंद होते दुकान! परवा पाहुण्यांनी उचलून घेतले थेट गाल पिळून हा्ती दिले छोटे चॉकलेट अवलक्षणी कार्टा लाज माझी काढतो नसते प्रश्न विचारून भंडावून सोडतो आजच्या काकांचे नाक जरा वाकडे सारे सोडून कार्टे हसेल बघून तिकडे आज गप्प बस, पचकू नको, नको तिथे नाकाविषयी बोलू नको काही उलटेतिलथे काकांना बघता आईलाच आले टेन्शन मनात करी वाकड्या नाकाचे निरीक्षण नाक जणू एकीकडे चिमट्याने खेचले की ठोशाच्या धपाट्याने ठसकन ठेचले!

मोबाईल फोन

लेखक दत्ता काळे यांनी मंगळवार, 18/01/2011 20:10 या दिवशी प्रकाशित केले.
त्या गावांत चौघेजण चौघांकडेही मोबाईल फोन वेगवेगळे हॅण्डसेट, अन् वेगवेगळे रिंगटोन कायम कामात असतात ते त्यात फारसा 'चेंज' नाही एकाच गावात असूनसुध्दा भेटण्यासाठी 'रेंज' नाही बोलतात, भेटतात फोनवरच एसेमेसमधून पडते गाठ "हाय.. हॅलो .. कसं काय" (हे फोनलादेखील झालंय पाठ) एके दिवशी एकजण वैतागूनच गेला फार गप्पा मारु, भेटू तरी काहीतरी करु यार त्याने मग सगळ्यांना एके दिवशी एसेमेस केले दिवस ठरवला, रानात गेले फोनसुध्दा फेकून दिले गप्पा झाल्या, खूप हिंडले, हसले, खेळले, खूप रडले, वेळाचेही नव्हते भान मजा केली त्यांनी छान. . . . . . . . . . . . . . . . . .

आवर्तन.....

लेखक स्पंदना यांनी मंगळवार, 18/01/2011 10:32 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी नमस्कार. राधेची व्यक्तीरेखा मला नेहमीच भुरळ घालत आलेली आहे. जरी काव्य समजल तरी या व्यक्तीरेखेला त्या काव्यातही कुठेच पुर्णत्व वा 'न्याय' म्हणता येइल तो नाही मिळालेला अस मला मनापासुन वाटत. इतक जीव ओवाळुन टाकुन , सर्वस्वाला विसरुन केलेल्या प्रेमाला, पुढे कृष्णाच्या वाढत्या सामाजिक,राजकिय महत्वात अगदी नामोनिशाणी न राखता अनुल्लेखात विलीन व्हाव लागण हे एक दुर्दैवच नाही का? नुकताच प्राजुचा 'वनराणी....' वाचला. या शबरीच्या भोळ्या भक्तीवर भाळुन तिला पुढील जन्मी पुन्हा भेटण्याच आश्वासन श्रीरामानी दिले, तीच ही राधा! या वचनावर आधारित ही कविता.
काव्यरस

माझ्या शेतावरचे काळे ढग...!!

लेखक प्रकाश१११ यांनी मंगळवार, 18/01/2011 08:28 या दिवशी प्रकाशित केले.
कठीण होत चाललेय सगळे हे शेताचे बहरणे आता गायब झालीय विहिरीतील मोटेचे पाणी बैलाच्या गळ्यातील घुन्गारांचा लडिवाळ आवाज शेती नापीक दाखवून न.अ करीत चाललेत खूपशे शेतात बंगले बांधून दिवाळी साजरी करू लागलेत आपली माणसे हिरवळीचा स्वर्ग होत चाललाय नर्क बैलगाडीच्या पायवाटा पुसून गेल्यात कधीच नि फटफटीचा चाक्राळलेला रस्ता तयार झालाय संपन्नता आलीय डोक्यावर ह्या छोट्याशा खेड्यात फड लागतोय एखाद्या नारायणगावच्या तमाशाचा बहकून गेलेत श्रीमंत शेतकर्याचे ही पोरे स्टार हॉटेल शेतात काढण्याच्या विचारात जातात ही पोरे स्वप्नात हरवून शेतकर्यांच्या पासोड्या हरवून गेल्यात पैश्याच्या थैल्या घेऊन उडवल्या जा
काव्यरस

वैशाख छाया

लेखक अरुण मनोहर यांनी मंगळवार, 18/01/2011 06:39 या दिवशी प्रकाशित केले.
कोण्या सुस्त दुपारी असता भानू धरा जाळीत कोणी अर्ध जागृत पहुडले कोणी सुरा ऐकीत रस्ते एकले झळा झेलीता पसरुनी सुस्तावले छाया किंचीत कुठे तरी तिच्या उष्म्याने ताडीयले झिजल्या पायतणाला ओढीत महिला फ़ळे घेउनी भिजल्या पदराशी घट्ट धरुनी शिरभार सांभाळुनी संत्री घ्या संत्री वदे अविरत आवाजही चिरकला घर्मे अंग पाणी ते निथळता शुष्कावला कि गळा नसे मुळीच जाणीव तिजला नव्हती भूक तहान विकतील का फ़ळे थोडी, घरी निजले बाळ लहान संत्री संत्री स्वरांमुळे उघडले गृहद्वार कोणी तरी निद्रा नष्ट झाली यास्तव तो वदिला क्रोधित स्वरी भाव काय बोल गे झडकरी का झोप तू मोडिली संत्री स्वस्त चांगलीही नसता घेणार नाही मु
काव्यरस