Skip to main content

कविता

वॅलेंटाईन भेट प्रवास

लेखक गणेशा यांनी मंगळवार, 01/02/2011 या दिवशी प्रकाशित केले.
खरे तर हा वॅलेंटाईन भेट प्रवास गद्य म्हणुन लिहायला घ्यायचा असे ठरवले होते तेंव्हा, पण संपुर्ण गद्य आपोआप च पद्य म्हणुनच लिहिले गेले, त्या प्रवासातील एक कविता छान वाटली म्हणुन येथे देत आहे, बाकीचे गद्य विभागातच लिहित आहे.
काव्यरस

राख होऊन मेला : नागपुरी तडका

लेखक गंगाधर मुटे यांनी सोमवार, 31/01/2011 या दिवशी प्रकाशित केले.
राख होऊन मेला : नागपुरी तडका हप्ता थकला म्हूनशान, वसुलीले गेला हप्ता गेला भाडमंधी, राख होऊन मेला ....॥१॥ पंचीस पेट्या महिनेवारी, सेटींग जमून व्हते तारखेवार भेटेस्तोवर, काईबी प्राब्लेम नोते कायच्यातबी काईबी मिसळा, देल्ली व्हती हमी साधेसिधे समिकरन; अर्धे तुमी, अर्धे आमी हप्त्यापायी जीव जाईन, माहित नोयतं त्येला ....॥२॥ महिना उलटून गेला बैन, हप्ता नाई आला मंग जीव सायबाचा, कालवाकालव झाला सायेब म्हने श्याम्या तुह्या, मनात बद्दी आली? हप्ता नाय तं धंदा नाय, कायढीन तुह्या साली हप्त्यासाठी सांग तुनं, उशीर काहून केला?

माझा देश ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी रविवार, 30/01/2011 या दिवशी प्रकाशित केले.
माझा देश मला प्रिय आहे येथे कोठेही हागता मुतता नि थुंकता येते येथे स्वातंत्र्याची रेलचेल आहे जिसकी काठी उसकी भैस आहे पकडला नि पुरावा नसला तर त्याचा सन्मान आहे असा माझा देश आहे माझा देश मला प्रिय आहे येथे पक्ष बदलता येतो कधी..
काव्यरस

दु:ख आता फार झाले

लेखक गंगाधर मुटे यांनी रविवार, 30/01/2011 या दिवशी प्रकाशित केले.
दु:ख आता फार झाले स्वप्नही लाचार झाले दु:ख आता फार झाले झोपलेले ते निखारे जाग येता गार झाले झुंजण्याची वेळ येता शौर्य-धैर्य बिमार झाले झुंजणारे वीर खंदे आरशांचे हार झाले खेळ येथे माकडांचे या भुईला भार झाले पान कोरे अक्षरांना सांगते आचार झाले बांधलेली भोवताली भिंत होती दार झाले उत्तरांना पेलताना प्रश्नही बेजार झाले “अभय”तेच्या ’त्या’ नशेचे बंद आता बार झाले ...............गंगाधर मुटे...........

कसा घट्ट आपलेपणा ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी शनिवार, 29/01/2011 या दिवशी प्रकाशित केले.
कसा घट्ट आपलेपणा निर्माण होत असतो ह्या शब्दातून ह्या पत्रातून काही घेणेदेणे नसते काही मागणे नसते निव्वळ आनंद वाहत असतो झुळझुळ शब्दाशब्दातून कसे तारुण्य असते निळ्या निळ्या आभाळासारखे मन पाखरू नि मस्त उडत असते गोजिरवाणे पंख उभारून मी कोण कुठला काय करतोय ..? खूप उत्सुकता असते ना..? जाणून घेण्याची आंबा कापला तर मस्त वाटते तोंडाला चळकण पाणी सुटते पण कोंबडी..? मी तर दूर उभां राहून आभाळ बघत बसतो पण मी नाही विचारणार तुम्ही कोठल्या ... काय करता..,,?
काव्यरस

बायका

लेखक नाहिद नालबंद यांनी शनिवार, 29/01/2011 या दिवशी प्रकाशित केले.
नसत्या चौकशा कशाला, लागतात या बायकांना ? एकमेकींना येता - जाता, शिकवत असतात शहाणपणा "पहिल्यापासूनंच शांताबाई वचक ठेवा सुनेवर नाहीतर एक दिवस,मिर्‍या वाटील डोक्यावर" दिवसभर तोंडाची अखंड चालू असते टकळी हिची सून गोरी अन् तिची सून काळी हिच्या मुलीला गेलेत 'दिवस' तिच्या मुलीला संपलाय 'आठवा' हिचा जावई काळा अन् तिचा नवरा बावळा "सांगू नका कुणाला बरं!" असं बजावून चारचारदा बातम्या देतात एकमेकींना, काय म्हणावे आता या बायकांना नसत्या चौकशा कशाला, लागतात या बायकांना ? एकमेकींना येता - जाता, शिकवत असतात शहाणपणा -नाहिद नालबंद
काव्यरस

शाळेतले झुरळ

लेखक अमित करकरे यांनी शनिवार, 29/01/2011 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा एका झुरळाने घेतला, शाळेमध्ये प्रवेश; सर्वात पुढच्या बाकावर बसले, घालून कोरा गणवेश. बाई येताच उडी मारुन, ते चाळू लागले मस्टर; घाबरुन जाऊन, फेकून मारले, बाईंनी त्याला डस्टर. झुरळाच्या पाठीत धपकन बसला, भलताच जोरात दणका; तुटला बहुदा कमरेचा त्याच्या, दुसरा – तिसरा मणका. सुसाट त्याने गाठली, समोरच्या भिंतीमधली भेग; शिक्षण राहू दे बाजूला, आपली लांबूनच बरी भेट!!
काव्यरस

ढेकणांचा अड्डा

लेखक अमित करकरे यांनी शनिवार, 29/01/2011 या दिवशी प्रकाशित केले.
ढब्बूनानांच्या बिछान्यातले, एकूण एक ढेकूण भरल्या पोटी, जरा पहुडले, सतरंजीला टेकून पडल्या पडल्या ढेकूण करती, सुखदु:खाच्या गप्पा फारच वाईट रात्री आल्या, आपल्यावरती यंदा झोपत नाहीत पूर्वीसारखे, ढब्बूनाना सध्या अर्ध्या-सोंडी उठती ढेकूण, भलताच झाला वांदा आधीच घोरणे, ऎकुन त्यांचे, दडपून जाई छाती त्यातून हर्बल पेस्ट-कंट्रोलची, सदैव राही भीती तरिही नाना बरे, कितीही आली संकटे जरी दिवसागणती त्यांची वाढे, जाडी-ढब्बी ढेरी भरल्या वजनी कुशी बदलणे, नाही राहिले सोपे नानांना मुळी कळतच नाही, आम्ही चावलो कोठे पुरेत गप्पा, झोपा आता, ढेकणोबा भरती रागे गोंधळ तुमचा ऎकून नाना, खाडकन झाले जागे
काव्यरस

डासाचे गाणे

लेखक अमित करकरे यांनी शनिवार, 29/01/2011 या दिवशी प्रकाशित केले.
डासाची आई काळजीने विचारी, का रे माझ्या बाळा? माणसांच्या कानाशी गुणगुणण्याचा, तुला का बरं कंटाळा? डास म्हणाला, मी जेव्हा-जेव्हा, कानाशी गुणगुणतो जो-तो फटके मारुन मला लांब लांब घालवतो फुकट असूनही ऎकत नाही कोणीच माझं गाणं लागेल ना अशाने माझ्या करियरला कायमचंच टाळं ठरलं आता, डायरेक्ट गाठायचा सारेगमप चा सेट सादर करायचं गाणं घेऊन मान्यवरांची भेट भेट वगैरे ठीक आहे, पण जपायला सांगे आई पल्लवीमुळे प्रेक्षक वाजवती सदानकदा टाळी
काव्यरस

कारण लग्न करुन तु सासरी गेली आहेस ...

लेखक गणेशा यांनी शुक्रवार, 28/01/2011 या दिवशी प्रकाशित केले.
दोन कविता देत आहे, एक आईच्या भुमीकेमधुन आणि दुसरी मुळ कविता अविनाश काकांनी लिहिलेली बाबांच्या भुमिकेतुन ... अविनाश काकांची कविता वाचताना अजुनही मन भरुन येते.. ... (कविता पुन:प्रकाशित) ----------- १. मी.. तू अन तुझा पपा आपल छोटस नटलेल जग.. सासरी तू गेल्या पासुन बैचेन झाले आहे अगदी, हे घरट .. तुझी ती रुम, तुझी पुस्तके , तुझा कॉम्प, सारं तसच अगदी शांत ... आता तुझ्या बाबांची लुडबुड नाही की तुझा किलबिलाट तेथे अगदी निरस वाटते आहे ग पोरी आठवतं मला अता ते तुझा पसारा पाहुन माझं ओरडणं जास्त काम पडयचं मला पण ह्यानी तुझी बाजू घेतली तरी रागारागातच सारं आवरणं रोज सकाळची तुमची ती मस्ती आणि ते भांडन ..