Skip to main content

कविता

शेरनीच्या जबड्यात ससा (हझल)

लेखक गंगाधर मुटे यांनी सोमवार, 14/01/2013 या दिवशी प्रकाशित केले.

शेरनीच्या जबड्यात ससा (हझल)


मी तुझा साथ सोडून गाऊ कसा?
तूच माझा गळा, कंठ, नरडी, घसा

वाटले मोगर्‍याला तुला पाहुनी
पालखीला मिळालाय भोई जसा

मारली मी मिठी त्या क्षणी वाटले
शेरनीच्याच जबड्यात गेला ससा

झोप पाण्यात घेतोय मासा कसा?
प्रश्न हा फ़ालतू;  फ़क्त खावा रसा

कार्य बाकी किती ते उद्याला बघू
मंडळींनो चला भोजनाला बसा

भोजनाचा लुटा स्वाद पंक्तीमध्ये
अक्षता टाकण्याला असा वा नसा

खोल खोल मनामध्ये...

लेखक वेणू यांनी रविवार, 13/01/2013 या दिवशी प्रकाशित केले.
धुंद आठवांची रात, जेव्हा डोळ्यात निजेल खोल खोल मनामध्ये तूच तूच दाटशील एक एक पान माझे, सुटे सुटे रे होईल हर एक अक्षराला, गंध तुझाच असेल चंद्र खिडकीशी पुन्हा, रेंगाळेल, खोळंबेल गळालेले रितेपण मुठी भरून घेईल तुझ्या सयी सार्‍या स्निग्ध, सभोताली फुलतील तुझ्या गालातले हसू, माझ्या ओठी उमलेल हूरहूर, रूखरूख, चित्त बेभान करेल जरा शहाणे झालेले, मन पुन्हा वेडावेल तेच रूप ह्या जगाचं, पण नवीन भासेल तेच काजळ डोळ्याचं, पण नव्याने हसेल खुळ्या मनाच्या भ्रमांची, भूल मलाही पडेल तुझ्या असण्याचे भास, नसण्याला असतील कंच बहर फुलांचा, जरी उद्या ओसरेल ताजा आठव तुझाच, माझ्या ओंजळी असेल - बागेश्री ब्लॉगवरही प्र

पुरुषार्थ

लेखक विदेश यांनी रविवार, 13/01/2013 या दिवशी प्रकाशित केले.
किती जणांचा धावा केला कुणी न तेव्हां धावत आला किती दमले मी टाहो फोडुन रडले कुढत अपुल्याच मनातुन जपण्याचा मी प्रयत्न केला शीलाच्या माझ्या ठेव्याला दुर्दैवाचा घाला पडला नशिबी दुर्योधन धडपडला जगास फुटला नाही पान्हा धावत नाही आला कान्हा सुन्न-खिन्न टाकून मी मान पुरुषार्थाचा बघत अपमान ! . . .

आता तरी मानवा सावध होशील का ?

लेखक शिवप्रसाद यांनी गुरुवार, 10/01/2013 या दिवशी प्रकाशित केले.
आता तरी मानवा सावध होशील का? मानवतेच्या धर्माला जागशील का? चराचर नि जीव ईश्वरे निर्मिले । त्यामध्ये बुद्धिमान कोणी न दिसले । ईश्वराने मग ध्यान लाविले । मानव रूप आकारासी आले । तुझ्या रूप-गुणांसी भुललास का? आता तरी मानवा सावध होशील का? विश्वामध्ये सर्व जीव अज्ञानी । म्हणुनी तुजला केले बुद्धीमानी । परी चाले तुझीच मनमानी । तुझ्या निर्मात्यास तूच न मानी । जन्मदात्यास तरी तू मानशील का? आता तरी मानवा सावध होशील का?

प्रांतिक किंवा भाषीय वाद

लेखक पंकज रुगे यांनी गुरुवार, 10/01/2013 या दिवशी प्रकाशित केले.
बिहारींना होतोय बिहारचा भास सरदारांनी घेतलाय पंजाबचा ध्यास मराठ्यांनी धरलीय महाराष्ट्राची कास कोंडतोय यात एका भारतीयाचा श्वास ... आजोबांनी लढली स्वातंत्र्याची लढाई बाबांनी लढली धर्माची लढाई आपण लढतोय प्रांताची लढाई मुले लढतील त्यांच्या भागाची लढाई... शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही केल्या थांबेना महागाईचा फुगा आटोक्यात येईना अन्यायाविरुद्ध कोणी संघर्षही करेना प्रांताच्या नावाखाली एकमेकांचा जीव काही सोडेना... दहशतीचा काळ काही केल्या थांबेना सीमाही आता सुरक्षित वाटेना विदेशी कंपन्यांची मक्तेदारी मोडेना तरीसुद्धा आपण प्रांत काही सोडेना... सगळ आता कळतया पण मन मात्र वळेना विचार आपला बदलतोया पण कृत

"माझ्या सर्व विध्यार्थी मित्रांसाठी"

लेखक शिवप्रसाद यांनी मंगळवार, 08/01/2013 या दिवशी प्रकाशित केले.
"माझ्या सर्व विध्यार्थी मित्रांसाठी" (माझी पहिलीच कविता ) ऊठ मुला झडकरी आळस टाक झटकून | परिक्षा येता जवळी वेळ जाईल निघुन || करायचे आहे आईवडिलांचे स्वप्न साकार | तुझ्या शिवाय त्यांना नाही कोणाचा आधार | अभ्यास करि चांगला लाउनी मन | परिक्षा जवळी येता वेळ जाईल निघुन || आईवडीलांनी तुझ्यासाठी कष्ट केले अपार | प्रसंगी फक्त तुझ्याचसाठी सोसली उपासमार | शिक्षणाकडे लक्ष दे देऊनी ध्यान | परीक्षा जवळी येता वेळ जाईल निघुन || ठेच लागता तुझ, जीव त्यांचा तळमळे | आता तरी सोडुन दे तुझे ऊनाड चाळे | तुला करायला हवे अभ्यासात एकाग्र मन | परिक्षा जवळी येता वेळ जाईल निघुन || जिवनात असंख्य परिक्षा द्याव्या लागतात

मी बिभीषण एकटा

लेखक चाणक्य यांनी मंगळवार, 08/01/2013 या दिवशी प्रकाशित केले.
बेमुवर्त पणे येथे, मद्याचे प्याले वागती यांना न कसली नीती, यांना न कसली भिती तो जो ऊभा राहिला, अन्याय बोलण्या काही तो ही म्हणे आताशा, मद्यात धुंद राही कोणीच आज येथे, शिरसावंद्य नाही हात जोडूनी तिष्ठलो, देव राऊळी नाही होती काल परवा, हिरवी डौल शेते केव्हा लिलावले त्यांना, आम्हा कळलेच नाही पाऊस अजुनही पडतो, न पडतो ऐसे नाही झाडांचे वॄक्ष व्हाया, आकाश मात्र नाही तो तुका थोर, त्याने अभंगही तरवले आम्ही करंटे आम्हाला,आमुचाच तोल नाही वाटे जरी निराशा, माझ्या स्वरांतुनी तुम्हाला मी बिभीषण एकटा, धनुष्य पेलवत नाही झटलो बांधावया सेतू,तरले दगड नाही लिहिणा-याच्या अहो आज, हातात राम नाही...
काव्यरस

येशील?

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी मंगळवार, 08/01/2013 या दिवशी प्रकाशित केले.
अजुनही आठवतंय... सुंदर पुरीया रंगलेला असतांना कटकन सतारीची एकचं तार तुटावी असे काहीतरी झाले होते ----- तू गेलीस त्या दिवसापासून हे असचं होतयं मग माझ्या सगळ्या कवितांचा पसारा मांडुन बसतो घरभर पानचं पानं आणि मध्ये मी ---- अमावस्येच्या रात्री हट्ट धरून बसली होतीस मला चंद्रचं हवाय त्या रात्री कागदाचा एक चंद्र करुन खिडकीच्या काळ्या काचेवर चिकटवला होता तेव्हा कुठे समाधान झाले तुझे ती बघ तिकडे त्या कोपर्‍यात त्या कागदाच्या चंद्रावरची कविता ती माझ्याकडे कशी रागाने बघतेय... ----- दोन आठवड्यांसाठी मी परगावी जातांना डोळ्यात दोनच टप्पोरे थेंब होते तुझ्या एकाने मला बांधून टाकले आणि दुसरा तुझ्या
काव्यरस

वेदना

लेखक kanchanbari यांनी रविवार, 06/01/2013 या दिवशी प्रकाशित केले.
इवलस तूझ बाळ वेदनांनी झाल लाचार म्हणे काय केल त्याने पाप सर्वांना सांग तु आज मखमलीची असतात स्वप्नांची पिसं अत्याचारी या दुनियेत हिरमुसली तुझी कुस ओढवली आहे सर्वांनी अंधाराची चादर तुझ्या या संसाराला लागली कुणाची नजर डोळ्यांच्या या पापण्या बघतांनाही लुकलुकतात अश्रुंच्या या सागरात थेंब रक्ताचे मिसळ्तात अरे जगाच्या माय बापा तुच आहेस ना सर्वांचा भाग्य विधाता मग दुर कर नशिबातला काटा तेव्हा करेल वंदन तुला दाता
काव्यरस

चुप्प!

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी शुक्रवार, 04/01/2013 या दिवशी प्रकाशित केले.
सखे मला सांग, तू कधी विचार केलायसं? जेव्हा शरीरं थकलेली असतील, डोक्यावर चांदी अन् डोळ्यात मोती असतील, पायांना भराभर चला सांगितले तरी ते ऐकतीलच असं काही होणार नाही सग्गळं बोलून-सांगून झाले असेल, रुसून-फुगून झाले असेल भांडून-बिंडून झाले असेल, कष्ट वगैरेही करुन झाले असतील, शब्दांशिवायच काय नजरेशिवायही तुला माझे अन् मला तुझे म्हणणे नीट समजायला लागले असेल, अश्या त्या वेळेला जेव्हा मी तुला तुझ्या सुरकुतलेल्या गालांवरून हलकेच माझे थरथरणारे ओठ ठेवून तुझ्या सैल पडलेल्या कानात हळूच कुजबुजीन 'तु मला खुप आवडतेस' तेव्हाही तु अश्शीच लाजून, डोळे मोठ्ठे करुन 'चुप्प!' म्हणशील?
काव्यरस