Skip to main content

कविता

रात्र चांदणी

शनिवार, 08/12/2012 या दिवशी प्रकाशित केले.
रात्र चांदणी ही रात्र चांदणी वाटे कधी संपूच नाही कोडे मिठीतले वाटे कधी सुटूच नाही शब्द तुझे ऐकण्यास अधीर कान झाले बोलण्याचे शब्द मात्र मुके कसे झाले? मुक्या शब्दांचे गीत कधी झाले ऐकतांना कळले नाही आकाशी चंद्र असूनी चांदण्याही आहे सागरास भेटण्या सरीता अतूर वाहे वेगळी नव्हेत दोघे एकरूप झाली कुठे ते कळले नाही प्रीतीच्या फुलांनी आसमंत धूंद झाला वार्‍यासही आवडूनी तो वाहवत गेला तुझ्या असण्यात माझी मी तूझी झाले कधी कळले नाही - पाषाणभेद
काव्यरस

मित्र :)

लेखक रसायन
गुरुवार, 06/12/2012 या दिवशी प्रकाशित केले.
अकस्मितपणे त्याची तिच्याबरोबर भेट झाली पहिल्या भेटीतचं जणू ती त्याला आपली वाटू लागली वरचेवर होऊ लागल्या त्यांच्या भेटीगाठी वाटले त्याला ती, फक्त बनलीय त्याच्यासाठीचं मनातं त्याच्या आलं सालं एक्दाचं धाडसं करावं आपल्या मनातलं प्रेम तिच्यापुढं व्यक्त करावं धाडसं करूनं तो म्हणाला, "स्विकारशीलं का माझ्या प्रेमा?" पण मित्र बनवून तिने त्याचा पुरता केला मामा ठाऊक नव्हतं बिचार्‍याला प्रेम करायचं सूत्र आयुष्यभरं बनूनं राहीला तो तिचा "मित्रं" :):):);) (कविता- स्वरचित)
काव्यरस

गाणे गात रहा

मंगळवार, 04/12/2012 या दिवशी प्रकाशित केले.
लागणार नाही सूर केंव्हा, वेड्यापरी गाशील हवे एक वचन तरी, गात तू रहाशील प्रवास होईल वाळवंटी उन्हातून उष्ण रुक्ष होतील ओठ तुझे,गळा होईल तृष्ण भेगाळल्या वाटेवर रक्ताळल्या पायी जडावल्या पावलांनी चालत तू राही अंती येशी किनार्याशी सुखावेल मन पायांखाली सायीपरी वाळूचे अंगण क्षितिजावर जमून येईल मेघांची नक्षी साद घालतील प्रेमाची आकाशातले पक्षी सोन्याच्या होडीसारखा सूर्य समुद्रावर खुणावेल येण्या तुला नव्या प्रवासावर पुसतील तुझ्या पाऊलखुणा लाटा अलगद गोंजारेल गाल वारा करुनिया नाद शीळ हवी ओठांवर तुझ्याही त्यावेळी सुरांमध्ये ओल हवी कोमल कोवळी खंत नको परतीच्या वाटेवर वेडी शेवटचे स्वप

"शिवराय"

शनिवार, 01/12/2012 या दिवशी प्रकाशित केले.
त्रासली गांजली जनता, नाही कोणी वाली | तारावा हिंदुधर्म, साकडे देवास घाली | दाही दिशा माजले दैत्य,गिळती महाराष्ट्रासी | झाली मंदिरे जमीनदोस्त,भग्न केले देवांसी | लेकी सुनांच्या अब्रूला,नाही राहिले रक्षण | वतनदारांना तर प्रिय आपलेच वतन | संत महात्म्यांनी केला देवाचा धावा | या धरतीला ताराया अवतार घ्यावा | संतांची गरीब रयतेची, देवास आली दया | म्हणूनच देवांनी पाठविला शिवराया | शिवरायांनी ऐसे अघटीत केले | शून्यातून स्वराज्य उभे राहिले | अफझलचा कोथळा बाहेर काढीला | औरंग्याचा तर माजच जिरवला | आदिलशहा निजामासी जागीच रोखले | इंग्रजांसी मुंबईच्या वखारीतच कोंडले | संतांचे देवालयांचे केले रक्षण | खळ, नि दु
काव्यरस

पंख

गुरुवार, 29/11/2012 या दिवशी प्रकाशित केले.
मि पसरून पंख माझे , देईन सखे उबारा.. हा पावसाचा इशारा..अन धुंद जरी वारा.. तु असताच सोबत , नाही तमा ग कसली.. बेभान बरसूदे ह्याला , तुझ भिती कसली ग असली.. क्षण क्षण होऊदे चिंब , अन गात्रात मुरुदे थेंब. भिजल्या पंखात माझ्या , जरा मिटवून घे ते अंग.. थांबेल हा वेडा , तू धिर जरासा घे ग. सर ओसरेल आता , चोचीत थेंब घे ग. ना येइल कधी हा क्षण , परतून पुन्हा आयुष्यात, बघ थांबेल पाऊस आता , मग परतूया घरट्यात..
काव्यरस

धागा का गोठविता ... ??? (वि.अ.टु.प्र.)

लेखक मोदक
गुरुवार, 29/11/2012 या दिवशी प्रकाशित केले.
(अवांतराला वैतागून) धागा का गोठविता ...??? प्रेरणा--- गरज हाय का..??? :-D र ला ट जोडले कसेतरी यमक जुळले बसल्या बसल्या कविता पडली हे मलाच कसे नाही कळले??? अर्थहीन शब्दांची तोडफोड, लीलया जमत आहे.. कोणत्याही विषयावर कविता पडते, हीच तर खरी गंम्मत आहे. ताकाला पण उ-कळ्या फुटतील, पूर्वार्धातले प्रतिसाद पाहून, पण उत्तरार्धात बसेल, धागा वाचनमात्र होवून... यदाकदाचित माझ्या काव्यप्रसवक्षमतेला, प्रथम प्रथम तु म्हणशील ईऽऽ ईऽऽ ईऽऽ... पण मी प्रतिसादांचा पा-ऊस बघून, असा हसेन---''ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!'' *(वि.अ.टु.प्र. = विडंबनाचा एक अतिटुकार प्रयत्न!! हलके घ्या आणि जमल्यास भर घाला)

राजे संभाजी

गुरुवार, 29/11/2012 या दिवशी प्रकाशित केले.
धगधगता अंगार होता अतुलनीय वीर होता वाघासारखा शूर होता *****संभाजीराजा जेवढा हळवा कवी होता तेवढाच कणखर बाणा होता रणांगणी धधडणारा वणवा होता ***** संभाजीराजा धर्माचा अभिमानी होता मराठा असण्याचा गर्व होता शूर सिंहाचा छावा होता ***** संभाजीराजा मातृपितृ भक्त होता भवानीमातेचा दास होता स्वराज्याचा प्राण होता ***** संभाजीराजा राजे तुमचा आम्हाला अभिमान वाटतो अनिल तापकीर

पाऊस क्षण- प्रणय क्षण!

मंगळवार, 27/11/2012 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊस बरसला, सुगंध पसरला! श्वास मोहरला, सहवास बहरला! मंद तारा, धुंद वारा! प्रेमात ओला, आसमंत सारा! मन फुलले, तन उमलले! प्रणय पाहूनी, क्षण थांबले!
काव्यरस

नाटकांवरुन कविता

लेखक रसायन
शुक्रवार, 23/11/2012 या दिवशी प्रकाशित केले.
"नकळत सारे घडले" माझे मन तुझ्यावर जडले तु माझी "ती फुलराणी" कधी झालीस? हे माझे मलाच न कळले प्रेमामध्ये रुसवा-फुगवी अन् "हसवा फसवी"नेच जम्मत आहे प्रेम एकदा करुन तर बघ "हिच तर प्रेमाची गम्मत आहे" प्रेमाचा पुर्वार्ध वाटेल "कुर्यात् सदा टिंगलम्" प्रेमाचा उत्तरार्ध असेल साक्षात् "लग्नम् गोंधळम्" "यदाकदाचित" माझ्या प्रेमाला प्रथम म्हणशील तु नाही रे नाही प्रेम माझ्याशी करुन तर बघ ,नक्की म्हणशील " सही रे सही"