लेखकविदेशयांनी शुक्रवार, 29/03/2013 या दिवशी प्रकाशित केले.
तू असताना चंद्रचांदणे
तू नसताना खिन्न स्फुंदणे
तू असताना श्वास हवेसे
तू नसताना फक्त उसासे
तू असताना मधुर कहाणी
तू नसताना फक्त विराणी
तू असताना मंगल प्रभात
तू नसताना काजळ रात
तू असताना सुरेल सनई
तू नसताना फक्त जांभई
तू असताना जग हे हसते
तू नसताना सगळे फसते !
.
काल रात्रीच्या पावसाने
खूपच गोंधळ केला
.
तुझ्या घरातील काही
गळक्या कौलांना वाहून
घेऊन आला
वाहत वाहत त्या कौलांनी
माझ्या घराशी आधार घेतला
त्यांनी माझ्या मनाचा
नकळत ठाव घेतला
.
.
पाणी वाहते असले तर किती गोष्टी धुतल्या जातात नाही?
.
काल रात्रीच्या पावसाने
खूपच गोंधळ केला
.
सारे अंगण मनासारखेच
भिजवून गेला
भिजल्या मनाने भिजल्या अंगणात
जीव कासावीस झाला
अंगणातून कुंपणाजवळ
धावाधाव करत राहिला
.
.
घरांना कुंपण असणे किती आवश्यक असते नाही?
.
काल रात्रीच्या पावसाने
खूपच गोंधळ केला
.
येतांना बरोबर वाऱ्याला घेऊन आला
विझणाऱ्या निखाऱ्यांना
धग देऊन गेला
अन् वरची राख तेवढी उडवून गेला
.
.
वारा तरी कसा
लेखकशतदाप्रेमकरावेयांनी गुरुवार, 28/03/2013 या दिवशी प्रकाशित केले.
तू देउन गेला जाता
दु:खाचा निळासा भार
स्वप्नांच्या वाटेवर
दाटला गडद अंधार
हे जगणे अडले येथे
तू जेथे सोडली साथ
... चाचपडत शोधतो आहे
सुखाचा मोडका हात !
-अनिल बिहाणी.
कवि ग्रेस यांना भावपूर्ण श्रद्धांजली !!!
लेखकनिरन्जन वहालेकरयांनी बुधवार, 27/03/2013 या दिवशी प्रकाशित केले.
रंगुनी रंगात मधुर............
दिन रंगांचा आजला
कल्लोळ भावनांचा उरी,
रुसलीस तू, खुलवींन मी
आज उधळूनी रंग तुजवरी !.
विरतिल गडद रंगांत ह्या
राग रुसव्याच्या खुणा,
उरतील मागे पुन्हा
प्रेम स्नेहाच्या पाऊलखुणा !
विविध रंग घेउन सवें
पोहोचलो द्वारी तुझ्या,
बावरली तू गोड अईसी
फुलले गुलाब गालीं तुझ्या !
ढळला पदर, आरक्त मुखचन्द्रम़ा,
स्मितबरसात इन्द्रधनुसम भासली,
लेखकफिझायांनी मंगळवार, 26/03/2013 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यात सगळं मिळवूनही प्रत्येक जण संपूर्ण समाधानी नसतोच ....शेवटी शेवटी मोक्ष मिळावा असे
वाटते ........तो मिळाला तरी .....समाधान कुठे असते .............अर्धा पूल…..
धुसर होत जाणारा एक मोठा पूल …
अत: पासून इति पर्यंत ....
या जगापासून त्या जगाला
जोडणारा असेल कदाचित .....
इकडून अर्धाच दिसतो ....पुढे फक्त धुके ....
......