Skip to main content

कविता

भान

लेखक आतिवास यांनी सोमवार, 01/04/2013 या दिवशी प्रकाशित केले.
गोधूळ लेऊन देह मनावर अक्षरांची तरली आण. आकाशाने उचलून घेता तरारले मग अवघे रान. पंचम पंचम मध्यावरती सुरेल, हळवी नाजूक तान. जपले आहे मुठीत इवल्या अव्यक्ताचे अफाट भान.

गाय आणि वासरु

लेखक राजा सोव्नी यांनी रविवार, 31/03/2013 या दिवशी प्रकाशित केले.
मन गाय प्रेम तिचे वासरू, मन गाय दुख: तिचे वासरू, मन गाय वासना तिचे वासरू, मन गाय दंभ तिचे वासरू, मन गाय क्षमा तिचे वासरू, मन शांत तुम्ही फुलपाखरू.

नजर

लेखक राजा सोव्नी यांनी शनिवार, 30/03/2013 या दिवशी प्रकाशित केले.
नजरेत कुणा भक्ती ,नजरेत कुणा विरक्ती , नजरेत कुणा धोका,नजरेत कुणा मोका, नजरेत कुणा वासना,नजरेत कुणा कामना, नजरेत कुणा युक्ती,नजरेत कुणा सक्ती. नजरेत कुणा संस्कार,नजरेत कुणा दुत्कार, नजरेत कुणा जरब,नजर कुणाची खराब, नजरेत कुणा लगट ,नजरेत प्रेम प्रगट , नजरेत कुणा व्यथा,नजरेत कुणा कथा, नजरेत प्रगटे ज्ञान ,नजर मनाची शान.
काव्यरस

तुझ्यासह.. तुझ्याविना ...

लेखक विदेश यांनी शुक्रवार, 29/03/2013 या दिवशी प्रकाशित केले.
तू असताना चंद्रचांदणे तू नसताना खिन्न स्फुंदणे तू असताना श्वास हवेसे तू नसताना फक्त उसासे तू असताना मधुर कहाणी तू नसताना फक्त विराणी तू असताना मंगल प्रभात तू नसताना काजळ रात तू असताना सुरेल सनई तू नसताना फक्त जांभई तू असताना जग हे हसते तू नसताना सगळे फसते ! .
काव्यरस

वना चे श्लोक

लेखक राजा सोव्नी यांनी गुरुवार, 28/03/2013 या दिवशी प्रकाशित केले.
।। सदा सर्वदा वनी विचरावे ।। ।। वना जोपासण्या सदा सिद्ध व्हावे ।। ।। वना राखण्या संकल्प जीवी ।।।। ।।वना तोडण्या संकल्प सोडूनी द्यावा ।। ।।वनी वृक्ष वल्ली सदा वाढू द्याव्या ।। ।।मनी वृक्ष वल्ली सदा पुज्य व्हाव्या ।। ।।वनी वनचरे सदा वाढू द्यावी ।। ।।मनी वनचरे सदा आदरावी ।। ।।तना जाळण्या वृक्ष तोडू नकोरे ।। ।।तना जाणण्या देह दान करारे ।। ।।वना सारखा मित्र कोणीही नाही ।। ।। वना वाचुनी दुखः ठाई ठ
काव्यरस

रात्रीच्या पावसाने

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी गुरुवार, 28/03/2013 या दिवशी प्रकाशित केले.
काल रात्रीच्या पावसाने खूपच गोंधळ केला . तुझ्या घरातील काही गळक्या कौलांना वाहून घेऊन आला वाहत वाहत त्या कौलांनी माझ्या घराशी आधार घेतला त्यांनी माझ्या मनाचा नकळत ठाव घेतला . . पाणी वाहते असले तर किती गोष्टी धुतल्या जातात नाही? . काल रात्रीच्या पावसाने खूपच गोंधळ केला . सारे अंगण मनासारखेच भिजवून गेला भिजल्या मनाने भिजल्या अंगणात जीव कासावीस झाला अंगणातून कुंपणाजवळ धावाधाव करत राहिला . . घरांना कुंपण असणे किती आवश्यक असते नाही? . काल रात्रीच्या पावसाने खूपच गोंधळ केला . येतांना बरोबर वाऱ्याला घेऊन आला विझणाऱ्या निखाऱ्यांना धग देऊन गेला अन् वरची राख तेवढी उडवून गेला . . वारा तरी कसा
काव्यरस

ग्रेस ...

लेखक शतदाप्रेमकरावे यांनी गुरुवार, 28/03/2013 या दिवशी प्रकाशित केले.
तू देउन गेला जाता दु:खाचा निळासा भार स्वप्नांच्या वाटेवर दाटला गडद अंधार हे जगणे अडले येथे तू जेथे सोडली साथ ... चाचपडत शोधतो आहे सुखाचा मोडका हात ! -अनिल बिहाणी. कवि ग्रेस यांना भावपूर्ण श्रद्धांजली !!!

रंगुनी रंगात मधुर.....

लेखक निरन्जन वहालेकर यांनी बुधवार, 27/03/2013 या दिवशी प्रकाशित केले.
रंगुनी रंगात मधुर............ दिन रंगांचा आजला कल्लोळ भावनांचा उरी, रुसलीस तू, खुलवींन मी आज उधळूनी रंग तुजवरी !. विरतिल गडद रंगांत ह्या राग रुसव्याच्या खुणा, उरतील मागे पुन्हा प्रेम स्नेहाच्या पाऊलखुणा ! विविध रंग घेउन सवें पोहोचलो द्वारी तुझ्या, बावरली तू गोड अईसी फुलले गुलाब गालीं तुझ्या ! ढळला पदर, आरक्त मुखचन्द्रम़ा, स्मितबरसात इन्द्रधनुसम भासली,
काव्यरस

अर्धा पूल…..

लेखक फिझा यांनी मंगळवार, 26/03/2013 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यात सगळं मिळवूनही प्रत्येक जण संपूर्ण समाधानी नसतोच ....शेवटी शेवटी मोक्ष मिळावा असे वाटते ........तो मिळाला तरी .....समाधान कुठे असते ............. अर्धा पूल….. धुसर होत जाणारा एक मोठा पूल … अत: पासून इति पर्यंत .... या जगापासून त्या जगाला जोडणारा असेल कदाचित ..... इकडून अर्धाच दिसतो ....पुढे फक्त धुके .... ......