हा दोष ना कुणाचा (कविता)
गर्वास झोडपावे, हा दोष ना कुणाचा
प्रशंसुनी स्वत:ला, घ्या रोष का कुणाचा
जे काम ज्यास येते, त्यानेच ते करावे
स्नायू फुगून मेले, हा जोश का कुणाचा
माझ्याच उल्लेखाने, भरल्यात या कविता
दिसते छबी स्वत:ची , आक्रोश हा कुणाचा
सांगून ना कळाले, शब्दांतले इशारे
नादान पोर आहे, बेहोश हा कुणाचा
शब्दांत शांत माझ्या, काव्यात ली झळाळी
सहजी उठून आली, हा दोष का कुणाचा
तरवार धार ज्यांची, स्नेह्यांसही दिसावी
घायाळ तेच व्हावे, हा दोष का कुणाचा
- संध्या
(एका ठिकाणचा वृत्तभंग चालवून घ्याल ही आशा )
मिसळपाव
) खुलासा---सदर काव्य/गीत हे आंम्हाला पुण्यातील नामातच-शेष राहिलेल्या ''वाडा'' या संस्कृतिच्या नाश्टेलजियातून सुचलेले आहे. पाणी प्रश्न सध्या बिकट असला,तरी मुबलक पाणी असलेल्या काळातही काव्यात वर्णिलेले भांडण पाहाता तो किती चिकट होता,याचा वाचकांस प्रचिती यावी.
“सगळं होतंय ना मनासारखं
मग झालंय काय चेहेरा पाडायला ?”
प्रश्न तेच पुन्हा पुन्हा...
“सुख बोचतंय..... दुसरं काय...”
उत्तरंही तीच.... त्यांचीच
पण बोलणार नाही मी...!!
का सगळं बोलून दाखवायचं...
का सगळं उघडून दाखवायचं...
मीच माझं कुलूप उघडायचं,
आणि वेदनांचं प्रदर्शन करायचं.
मग प्रत्येकाची सहानुभूती ओसंडून वाहणार
मीच ती गोळा करायची
माझ्यासाठी.......