घराच्या उंब-याला सांग फिरुनी
घराच्या उंब-याला सांग फिरुनी
घराच्या उंब-याशी थांब फिरुनी
पुन्हा ती ओळखीची रात येता
तिला सोडून येते लांब फिरुनी
किती चालून गेले वाट वेडी
खुणेचा येतसे का खांब फिरुनी
मनी गर्दी कशाला आठवांनो
इथे ना हासरी ती रांग फिरुनी
थवे गं दाटले या आसवांचे
जराशी काजळा तू पांग फिरुनी
(*पांगणे)
- संध्या
१९ मार्च २०१३
मिसळपाव
) खुलासा---सदर काव्य/गीत हे आंम्हाला पुण्यातील नामातच-शेष राहिलेल्या ''वाडा'' या संस्कृतिच्या नाश्टेलजियातून सुचलेले आहे. पाणी प्रश्न सध्या बिकट असला,तरी मुबलक पाणी असलेल्या काळातही काव्यात वर्णिलेले भांडण पाहाता तो किती चिकट होता,याचा वाचकांस प्रचिती यावी.