Skip to main content

कविता

घराच्या उंब-याला सांग फिरुनी

लेखक सांजसंध्या यांनी मंगळवार, 19/03/2013 या दिवशी प्रकाशित केले.
घराच्या उंब-याला सांग फिरुनी घराच्या उंब-याशी थांब फिरुनी पुन्हा ती ओळखीची रात येता तिला सोडून येते लांब फिरुनी किती चालून गेले वाट वेडी खुणेचा येतसे का खांब फिरुनी मनी गर्दी कशाला आठवांनो इथे ना हासरी ती रांग फिरुनी थवे गं दाटले या आसवांचे जराशी काजळा तू पांग फिरुनी (*पांगणे) - संध्या १९ मार्च २०१३

आई..बाबा

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 17/03/2013 या दिवशी प्रकाशित केले.
बाबा ......... काल आवरताना बाबांचे जुने रोलेक्स घड्याळ सापडले. एकदम आठवल....म्हणायचे आमच्याशी बोलण्या साठी तुला कधी वेळ मिळणार देव जाणे ... ............................. आई शनिवार ची सकाळची शाळा.. डोळ्यावर झोपेची झापड पटकन उरकलेली आंघोळ. खाकी चड्डी व पांढरा शर्ट पोळीचा लाडु..कडीचा डबा.. एकदम लहान पण आठवते.. व आता हयात नसलेली आई पण..

आई शप्पथ सांगतो...

लेखक यसवायजी यांनी रविवार, 17/03/2013 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेमात धड-पडायचंय म्हणता म्हणता पडलो एकदाचा.. नव्हे, चांगला आपटलोच. हाडं खिळखिळी झाली.. पार चेंदा-मेंदा झाला.. बरं झालं म्हणा.. यातुनच शिकायला मिळतं.. पण अशी का वागली ती??? A ---------------------------------------------- तीचं लग्न होऊन, आता २ महिने उलटून गेले.. रडून-रडून अश्रू संपले.. आता डोळे सुद्धा सुकून गेले.. :( तीनं अस का केलं ? उत्तर काही मिळणार नाही.. आई शप्पथ सांगतो.. परत प्रेमात पडणार नाही..

दिवे देत नाही

लेखक सांजसंध्या यांनी शनिवार, 16/03/2013 या दिवशी प्रकाशित केले.
काल एका कवीच्या, गाली होत्या खळ्या चष्मा उचलून म्हटले "ते", अल्सर आहे खुळ्या पुन्हा होती कवितेत, काळजामधे चिता पुस्तक काढून म्हटले ते, पोर्शन कुठे होता जास्वंदीच्या ओठांना, भुंगा दंशून गेला स्केच काढून म्हणाले, ओठ कुठे गेला मी ही आता ठरवलंय, हुश्शार जरा होऊ लपून छपून झाडीमधे, टोचा मारत जाऊ.. कविता आता शिकणारै, मेडीकलला जावून कथा लिहून देईन बाई, टॅलीक्लास लावून तरीदेखील म्हणेल कुणी , हद्द झाली बाई म्हणेना का लगेच आम्ही, दिवे देत नाही - संध्या अवांतर :कवितेत काही शास्त्रीय चुका असतील तर कळवाव्यात ही नम्र विनंती. अतिअवांतर :दिवा घेणे हा शब्दप्रयोग अन्यत्र हलकेच घ्यावेसाठी रूढ आहे.

हा दोष ना कुणाचा (कविता)

लेखक सांजसंध्या यांनी शुक्रवार, 15/03/2013 या दिवशी प्रकाशित केले.
गर्वास झोडपावे, हा दोष ना कुणाचा प्रशंसुनी स्वत:ला, घ्या रोष का कुणाचा जे काम ज्यास येते, त्यानेच ते करावे स्नायू फुगून मेले, हा जोश का कुणाचा माझ्याच उल्लेखाने, भरल्यात या कविता दिसते छबी स्वत:ची , आक्रोश हा कुणाचा सांगून ना कळाले, शब्दांतले इशारे नादान पोर आहे, बेहोश हा कुणाचा शब्दांत शांत माझ्या, काव्यात ली झळाळी सहजी उठून आली, हा दोष का कुणाचा तरवार धार ज्यांची, स्नेह्यांसही दिसावी घायाळ तेच व्हावे, हा दोष का कुणाचा - संध्या (एका ठिकाणचा वृत्तभंग चालवून घ्याल ही आशा )

वाड्यातील भांडणे-भाग १

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 14/03/2013 या दिवशी प्रकाशित केले.
वाचक आणी (विशेषतः महिलांसाठी http://mimarathi.net/smile/vroam.gif) खुलासा---सदर काव्य/गीत हे आंम्हाला पुण्यातील नामातच-शेष राहिलेल्या ''वाडा'' या संस्कृतिच्या नाश्टेलजियातून सुचलेले आहे. पाणी प्रश्न सध्या बिकट असला,तरी मुबलक पाणी असलेल्या काळातही काव्यात वर्णिलेले भांडण पाहाता तो किती चिकट होता,याचा वाचकांस प्रचिती यावी.
काव्यरस

शाळा

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 12/03/2013 या दिवशी प्रकाशित केले.
कधि कधि मी असतो A कधि कधि मी असतो B ॥ कधि कधि मी असतो पुस्तक,कधि कधि मी असतो फी॥धृ॥ नुस्ताच वर्ग,नुस्तिच बाकडी नुस्त्या फळ्याला चौकट लाकडी... मग मी होऊ पाहातो डस्टर,ऑफ तासांचा ब्लॉकबस्टर सांगा कसा हा नवधर्म?आणी त्याचे धर्म विधी?॥१॥ शाळेत शिक्षक इकडे तिकडे, यांचे विषय त्यांना वाकडे,घालती सारे देवाला साकडे का झाले हे शिक्षक सारे?आधी ग्रह,नंतर तारे! बि.ए.
काव्यरस

लघु वाल्गुदभारत-भाग ३.

लेखक बॅटमॅन यांनी सोमवार, 11/03/2013 या दिवशी प्रकाशित केले.
जो वेळ या वाल्गुदवर्णनाते| लागे, क्षमावे परि या कवीते| कामे जशी येति तैं मूड जाई| तैं दीस-दीशीं लिहवीत नाही || गुहायामपतत्ब्रूसः सपद्येवाचिरात् खलु | तत्रैव हि गृहं तेषां वाल्गुदानां पुरातनम् ||१|| ब्रूसाघातध्वनिना ते सर्वे भयभीता: भृशं खलु | उड्डयन्ति आक्रोशन्ति वारंवारं इतस्तत:||२|| तद् दृष्ट्वा चकितो ब्रूसः भयेन स्तिमितस्त्वहो | पश्चात्पितृप्रयत्नेन गुहाया: उद्धृतः खलु ||३|| स्वप्नेष्वपि खलु त्रस्तः महद्भिर्वाल्गुदै: सदा | भयभीतः सदा ब्रूसः प्राणिभिस्तु निषेवित: ||४|| निजचित्तभयं यावत् अकथत् भीतिमान् बटु: | "भयं सर्वेषु सामान्यं" तातस्तमकथत्तदा ||५|| तया ऐकितां शांत जैं ब्रूस होई | अकस्म

कुठेतरी दुरवर

लेखक यश पालकर यांनी सोमवार, 11/03/2013 या दिवशी प्रकाशित केले.
कुठेतरी दुरवर जायचं आहे सावलीची सुद्धा आशा नाही पाय नेतील तिथवर चालायचं थांबतील तिथे थांबायचं......... वाटेत अनोळखी भेटतील जे जीवलग बनुन जातील पण जीवलग भेटून सुद्धा कधी अनोळखी बनुन राहतील......... रस्त्याच्या कडेला कधी विसावा म्हणून पडायचं पुन्हा ऊन वारा सोसत मात्र एकट्यान घडायचं.......... कुठेतरी दुरवर जाऊन एखाद्या वळणावर माग वळून पाहायचं कितीही दुरवर आलो तरीही तुझ्या मनात मात्र कायम राहायचं..... यशवंत

दुष्काळ

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी सोमवार, 11/03/2013 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊस अडतो, माती काळी कातर वेळी, रिक्त झोळी थोडीशी जमीन, थोडेसे आभाळ मोठ्या चेहर्‍यावर, छोटे कपाळ वितभर पोटास, पेरभर अन्न मुठभर काळीज, सुन्न सुन्न झकपक विज, शहरी वेग गाव आंधळे, भुईला भेग राऊळाशी रांग, लांबच लांब विठू न राखे, त्याचाच आब कां रे असे, जगणे विटाळ? रात्र काळ, दिवस दुष्काळ! |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (०५/०३/२०१३) टिपः माननीय स्पाराज टाकरे यांनी व्यक्त केलेल्या जाहीर अपेक्षाभंगाला उत्तर म्हणून हि रचना देण्यात येत आहे. कवावे.माननीय स्पाराज टाकर्‍यांनी यावर आपले मत कळवावे, अशी मी विनंती करत आहे.
काव्यरस