Skip to main content

कविता

पापड कर वा पोळ्या लाट (विडंबन)

लेखक दमामि यांनी मंगळवार, 22/09/2015 या दिवशी प्रकाशित केले.
आमची पेर्ना रस्सा तिखट पुरी सपाट तरी न माझे भरले ताट... जिलबीमागून भजी वाढली बासुंदीचा भलता थाट.. वरणभाताच्या शिखरांमध्ये तुपाचा हा अवघड घाट.. जरा किनारा दिसला पानी मठ्ठ्याची मग आली लाट... आयुष्याच्या पंगतीस मी .. पापड कर वा पोळ्या लाट.. !!!!!

..पापड कर वा पोळ्या लाट..

लेखक कानडाऊ योगेशु यांनी मंगळवार, 22/09/2015 या दिवशी प्रकाशित केले.
रस्ता सरळ भुमी सपाट तरीही माझी चुकते वाट... पंगतीमागुन पंगत उठली.. मेल्यानंतर भलता थाट.. दो मृत्युंच्या शिखरांमध्ये आयुष्याचा अवघड घाट.. जरा किनारा दिसला आणि लाटेमागुन आली लाट... आयुष्याचे पीठ मळवले.. पापड कर वा पोळ्या लाट.. !!!!! - योगेश

चुलीमध्ये घाल

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 22/09/2015 या दिवशी प्रकाशित केले.
चुलीमध्ये घाल

मेघ भरजरी आठवणींचे, दाटून आले काल
नयनामधे आली त्सुनामी, वाहून गेले गाल

जाता जाता हळू घातली भुवई उचलून साद
या चिमणीच्या चोचीसाठी दाणा घेऊन याल?

बोल बोबडे मर्दुमकीचे बोलून झाले फार
असेल जर का तुझ्यात हिंमत, हाती घे तू मशाल

कर्ज काढुनी कशास शेती कसतोस मित्रा सांग
येडपटांचा येडा धंदा कुत्रं खाईना हाल

साहित्याचा खेळ गारुडी तेजीत आला फार
पराजितांचे अश्रू विकुनी झालेत मालामाल
काव्यरस

अंबाडा

लेखक चांदणे संदीप यांनी सोमवार, 21/09/2015 या दिवशी प्रकाशित केले.
अंधाराचा अन पहाटेचा तो बंध हळवा सोडला पैलतीरावर त्या घाटावर कुणी अंबाडा सोडला? प्रतिमा मोहक ती अर्पण पाण्याचे त्या होई दर्पण स्पर्शाविना शिरशिरीचा कुणी तरंग लहरता सोडला? दवांसोबत हलके निजेतून बाग पाहते डोकावून दहादिशांना बहकवणारा कुणी गंध नाशिला सोडला? ना अजून भैरवी निजली ना अजून भूपाळी उठली क्षितीजावर सकवार सुरांचा कुणी राग मारवा सोडला? अंधाराचा अन पहाटेचा तो बंध हळवा सोडला पैलतीरावर त्या घाटावर कुणी अंबाडा सोडला? - संदीप चांदणे

तुला मी आठवतो का गं?

लेखक एक एकटा एकटाच यांनी शनिवार, 19/09/2015 या दिवशी प्रकाशित केले.
आजही जेव्हा स्वप्नांत तुझ्या.... रात्र रंगुनी जाते, एकएकट्या नभात तुझ्या अनोळखी रंग भरुनी जाते, दूर लुकलुकणाऱ्या चांदण्यात मग स्वत:ला हरवताना तू खरं खरं सांग तुला मी आठवतो का गं? आजही जेव्हा येण्याने तुझ्या.... आसमंत मोहरून येतो, नुसत्या चाहुलीने तुझ्या अलवार गंधाळुन जातो, धुंद मदहोशणाऱ्या निशिगंधात मग स्वत:ला विरघळवताना तू खरं खरं सांग तुला मी आठवतो का गं? आजही जेव्हा ओढीने तुझ्या.... बेलगाम वहावत येतो, हरएक अदेवर तुझ्या बावरा खुळ्यागत होतो, त्याच्या आसुसलेल्या आवेगात मग स्वत:ला भिरकावताना तू खरं खरं सांग तुला मी आठवतो का गं? आजही जेव्हा इशाऱ्यावर तुझ्या.... बेधुंद बरसत जातो, नाजुक स्पर्शा

..... तो कृष्ण 'एकटा' होता !

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 18/09/2015 या दिवशी प्रकाशित केले.
कालिंदीच्या तटी नाचते राधा, गोपरास सावळा वेडावुन गेल्या गोपी, अंबरात श्यामरंग उधळला गोकुळ झाले मग्न, दंग, हर...; नामात हरीच्या गुंग हर मिठीत सांवळकान्हा , तृप्त शृंगार प्रितीचा रंग पण वृन्दावनचा राणा ..... तो कृष्ण 'एकटा' होता ! चाणूर, मुष्टिक, कंसही वधिला, उद्धरली मथुरा चन्दन गंधीत झाली कुब्जा कृष्ण एक तो उरला ब्रज, वृन्दावन, गोकुळ, मथुरा अन द्वारकामैय्या अद्वैताला उजळून गेली, केशवा तव सावळमाया विश्व डोलते ज्या मुरलीवर.. ......
काव्यरस

< नैराश्याकडे फाऊले>

लेखक जव्हेरगंज यांनी गुरुवार, 17/09/2015 या दिवशी प्रकाशित केले.
पहिलेच विडंबन आहे : घ्या सांभाळुन (मुळ कविता : www.misalpav.com/node/32809 ) उत्साह आला, संचारला संचारला, लेख टंकला, इवढुकला, पिंटुकला, कमेंट आले, हाणले, तोडले, जिंकले. सर्वां जसे नवपाखरु मिळाले. पण आता … भटकंत्या, पाकृ, सगळेच फसले, छटाकभर पिंक मिळेनासे झाले. आज जरी धाग्यांना पंख लागले. अखेरची जिलबी प्रसवुन झाले, तरी डुआय पण न फिरकले, हीच का नैराश्याकडे फाऊले?

हे काय कमी काय?

लेखक शिव कन्या यांनी बुधवार, 16/09/2015 या दिवशी प्रकाशित केले.
उठून जातात तेव्हा, आपलीच असतात माणसं परतून येतात तेव्हाही, आपलीच असतात माणसं! वादळात भोवंडून, अनोळखी जग पाहून घरी परततात माणसं, हे काय कमी काय? सापडत नाही एखाद्याला हवा तो किनारा नाव परतते मुक्कामाला, हे काय कमी काय? सुटत नाहीत कोडी, वाढत जातो गुंता पाय वळतात दाराशी, हे काय कमी काय? भरल्या घरात एकेकाचा रमत नाही जीव! मरत नाहीत बेवारस, हे काय कमी काय? उठून जातात तेव्हा, आपलीच असतात माणसं परतून येतात तेव्हाही, आपलीच असतात माणसं!

बाय

लेखक जव्हेरगंज यांनी बुधवार, 16/09/2015 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी लगबगं भाकऱ्या चुलीवरं धुराड्यात खोकते ही कैदाशिनं. सडा सारवनं धारोष्ण दुध न्हावुन झाली ही अवदसा. धनी शेतावरं हंबरते वासरु भारा ऊचलाया ही सटवायी. पाखरु आभाळी झळुनिया ऊनं फिरे रानोमाळी ही जोगतीनं. आवसं पुनवं संसार सुखाचा माहेरची ओढ रूते काळजातं.

३८-बँकॉक-स्ट्रीट-घोडबंदर रोड ठाणे कट्टा----वृत्तांत.......

लेखक मुक्त विहारि यांनी बुधवार, 16/09/2015 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : मला फोटो काढता येत नसल्याने मी फोटो काढत नाही. परवा ठरल्याप्रमाणे, कालचा "३८-बँकॉक-स्ट्रीट-घोडबंदर रोड ठाणे कट्टा" सुरळित पार पडला. मी आणि सौ.मुवि, कळव्याला, मि.ट्का, ह्याच्या कडे गेलो. टका आणि मोदक, मुंबईच्या वाहतूकीमुळे थोडे उशीराच आले. मग टकाच्या गाडीतून कट्ट्याच्या ठिकाणी रवाना झालो. कळवा ते घोडबंदर हा प्रवास मजल-दरमजल करत गाठला.सुदैवाने टकाच्या मातोश्रींनी वाटेत खायला म्हणून काजू दिले होते.आनच्या सौ.ने आणि मि.मोदक ह्यांनी काजू खात-खातच प्रवास पुर्ण केला. मी आणि टका मात्र गप्पा-गोष्टी करण्यात दंग होतो. मोदक नुकतेच पुण्याहून आले असल्याने, उगाच पुणे विरुद