Skip to main content

कविता

शब्द !!!

लेखक शीतल जोशी यांनी गुरुवार, 10/09/2015 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द !!! शब्द कळतात मला, आणि म्हणूनच छळतात मला म्हणजे, त्रास नाही हा देत, मनात घोटाळत राहतात कधी एकदाचे, मनाच्या कोऱ्या पाटीवरून, अलगद उतरून एक अर्थपूर्ण गोफ गुंफतात , असे होवून जाते कधी ,कधी अगदीच निरर्थक पणे बाहेर पडायला धडपडत असतात सांगितले तरी ऐकतच नाहीत मग काय, वायफळ गप्पा होतात त्यांचाशी माझ्या, अगदी शिळोप्याच्या कधी कधी, हवे असतात न चपखल बसणारे शब्द, तेव्हा मात्र दडी मारून बसतात, जणू लपाछपिचा खेळ खेळतात कधी कधी न असे वाटते कि रुसून बसलेत काही काही शब्द, काय करणार बिचारे, आपण सतत दुसऱ्या भाषेच्या प्रेमात, आणि ते जणू पोटमाळ्यावर अडगळीत किंवा वृद्धाश्रमात, जर्जर आणि

ताज़ी जिल्बी:- स्कार्फ आणि डोळे! ;-)

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 10/09/2015 10:10 या दिवशी प्रकाशित केले.
स्कार्फ आडून चमकती डोळे खुणवून काही बोलताती मनी आमुच्या काही पक्षी हलकेच हळूच उडताती तरंग येतात मनी मग जोवर ती असते पुढे स्वप्न-रंजनाचा पारवा ऊंsssच आकाशी उडे ओढणि ती सँक ती ही डोकावे वॉटर बॉटली सुंदर किती रूप हे भावना मनात साठली हॉर्न मागून वाजताही किल killले तो आरसा निबरल्या आमुच्या मनी फरक न पडे फारसा!

माणूस

लेखक सुमित_सौन्देकर यांनी गुरुवार, 10/09/2015 05:52 या दिवशी प्रकाशित केले.
बराच अवधि गेल्यावर्ती हर्ष मनी दाटला हरवलेला माणूस पुन्हा रस्त्यावरती भेटला कसलीही ना चाहुल देता पाठलाग त्याचा केला थोड़े अंतर राखून तेव्हा नवा प्रवास झाला भुकेलेल्या जिवास पाहून पानी डोळ्यात दाटल होत न्हवत शिदोरितल सार त्याने वाटल हतबल उभ्या रस्त्यालगत अंधाकड़े पाहता पळत जाऊन पुसल त्याने सांग कुठे राहता? दमून भागून शेवटी बसता रोजच्या गाडीत जाऊन वृद्ध दिसले उभे कुणी उठला जागा देऊन पाहून सार ओशाळल्याने मनी विचार आला कधी काळचा आपल्यातला तो माणुस कुठे गेला
काव्यरस

तू ग

लेखक ज्योति अळवणी यांनी गुरुवार, 10/09/2015 00:16 या दिवशी प्रकाशित केले.
समर्थ असूनही अबला तू सबल मनाची कोमला तू नभोवनीचा शीतल चंद्र अन्... तप्त सूर्याची आभा तू मनमोकळा निर्झर तू ग हृदयस्थ गंभीर डोह ही तू स्वर गंगेचे आरोह कधी तू कधी दबलेली आर्तता तू सर्वात असूनही.. एकटीच तू ग तुझ्या मनीचा आधार तू
काव्यरस

प्रणयपंचमी

लेखक शैलेन्द्र यांनी गुरुवार, 10/09/2015 00:05 या दिवशी प्रकाशित केले.
हळूच मंद मालवे, कालचा नवा शशी, हळूच धुंद पैंजणे, वाजती मनी कशी... विरत रात्र विझतसे, विरत ना तरी स्मृती, फिरत फिरत नेतसे, स्मरत तुज तवप्रती, तरल धुंद मोहकसे, अननुभुत मधुपिशी.. प्रहर शुक्र चढतसे, बहर प्रणय पंचमी , झरत झरत येतसे, मदन कैफ लोचनी , धुसर कुंद मधुरसे, सहजतृप्त भावनिशी निवांत सौख्य रमतसे, सुगंध रक्त चंदनी, परत परत जातसे, भ्रमित गात्र कोंदणी, सुखद मंद शारिरसे, अमृतमय यौनरशी.. (या कवितेचे धृवपद व पहिले कडवे वेगळ्या नावाने व वेगळ्या अर्थाने पूर्वप्रकाशित )
काव्यरस

चूक नाही

लेखक वेल्लाभट यांनी मंगळवार, 08/09/2015 14:15 या दिवशी प्रकाशित केले.
जरी सुखाची आस असणे चूक नाही हाव आहे ही आता, ही भूक नाही ओरडूनी सांग अथवा बस कुढत तेच आहे सत्य की जे मूक नाही बुद्धीची तलवार तू चालव स्वतःवर जातीची तुझियाकडे बंदूक नाही आमुचे ते वेगळेपण प्रिय आम्हा एक बिक होणे मुळी ठाऊक नाही कारणाविण काही येथे होत नाही अचानक हसणे कुणी हा फ्लूक नाही वाटते ते हो करूनी मोकळा तू धाकधूक नाही आणि रुखरुख नाही शेवटी पैसाच देतो चार घास भावनांनी भागणारी भूक नाही आरशाला दोष देणे चूक आहे आरशावर प्रेम करणे चूक नाही एक माझे वेगळेपण वर्ज्य त्यांना यापरी माझी अपूर्व चूक नाही - अपूर्व ओक ब्लॉग दुव
काव्यरस

या पाच गोष्टी कायम कराव्यात

लेखक श्रीगुरुजी यांनी मंगळवार, 08/09/2015 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
1. आपले वाहन नेहमी रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवावे. उजव्या बाजूने चालविल्यास डाव्या-उजव्यातला फरक आपल्याला कळत नाही अशी लोकांची समजूत होऊन आपले हसे होईल. 2. चौकात आल्यावर लाल रंगाचा वाहतूक दिशादर्शक दिवा दिसल्यास तो विझेपर्यंत आणि हिरवा दिवा लागेपर्यंत थांबावे. न थांबता पुढे गेल्यास आपल्याला लाल-हिरव्या रंगातला फरक कळत नाही अशी लोकांची समजूत होऊन लोक आपली टर उडवतील. 3. नियमांचा उल्लंघन करून वाहन चालविण्यामुळे पोलिसमामाने दंड केल्यास आपली फजिती कोणाला सांगू नये कारण सगळे आपली चेष्टा करून आपल्यावर हसतील. 4.

कुठे भटकशी वरुणराजा!

लेखक Hrushikesh Marathe यांनी सोमवार, 07/09/2015 00:19 या दिवशी प्रकाशित केले.
आकाश झाले कोरडे, सुकले त्याचेही नरडे, कुठे भटकशी वरूणराजा, पाऊस इथे का न पडे. धरतीची दशा ही सुन्न, दाही दिशाही खिन्न, कुठे भटकशी वरूणराजा, कधी होशील तु प्रसन्न. तुझ्या आगमनाची आस, शेते पडली ही ओस, कुठे भटकशी वरूणराजा, घेऊदे मोकळा श्वास. भिजवुन टाक ही अवनी, आनंद पसरी या भवनी, दया करा हो वरूणराजा, भिक मागतो तुझ्या मी चरणी. ---- हृषीकेश ----

सच्चे वरण

लेखक श्रीगुरुजी यांनी रविवार, 06/09/2015 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
सच्चे वरण ह्याचा अर्थ ’mageireména fakés / kalós fakés’ (ग्रीक शब्द) ", "gut Linsen (जर्मन शब्द)", "bien lentilles (फ्रेंच शब्द)" म्हणजेच "चांगले शिजलेले एकजीव झालेले वरण" असा होतो. प्रत्येक व्यक्तीला जेवणाची सुरवात चांगल्या वरणभाताने आणि शेवट चांगल्या ताकभाताने व्हावा असे वाटते. परंतु ते आपल्या हातात नसते. ’सच्चे वरण हवे’ असे अंथरूणाला खिळलेल्या आजारी व्यक्तीने सांगितले तरी घरातल्यांना ते पटत नाही. अंथरूणाला खिळलेल्या वृद्ध व रूग्णांना सच्चे वरण देणे अवघड असते. नवरा किंवा बायको असली तर त्यातल्या त्यात चांगले.