Skip to main content

कविता

तिला काट्यात घर सापडले

लेखक सिध्दार्थ यांनी रविवार, 27/09/2015 14:09 या दिवशी प्रकाशित केले.
तिला काट्यात घर सापडले बाभळ तिथे गवसतो म्हणे... गिधाडांची काळी ज्वाला सतत असतो लचक्याचा घाला.... तिचा आत्मा गुहेत अडकून राहिला काळ सरून देऊळ पडून गेला... तिने हाती मग फुल उजळले त्यात आत्मीक अत्तर गवसले… सोडविना तो गंध नेई चंद्रापलीकडे तेथे असतो राणा सांगती सगळे…. ती निघाली लाटेच्या हाकेवरती जो घेऊन गेला कमळ डोईवरती… तिच्यात आला निघून काळ आडोश्याला पाझर फुटला चंद्र माखला आज वसुंधरेला…
काव्यरस

नका घेऊ गळफास

लेखक गंगाधर मुटे यांनी शनिवार, 26/09/2015 18:32 या दिवशी प्रकाशित केले.

नका घेऊ गळफास



किसानाची पोरं आम्ही धरू नवा ध्यास
बाबाजींना सांगू आम्ही
काकाजींना सांगू आम्ही
दादाजींना सांगू आम्ही
मामाजींना सांगू आम्ही
नका घेऊ देवा तुम्ही, गळ्यामध्ये फास ....!

जुने गेले, नवे आले, नुसते वेषांतर केले
नितिधोरण तेच आहे, रोज जरी तुम्ही मेले
डावे-उजवे, धर्म-पंथ, खुर्चीचेच दास ....!

छाती काढून म्होरं येऊ, हातामध्ये लाठी घेऊ
कोणाच्या ना बापा भिऊ, लुटारूंच्या पाठी ठेवू
काव्यरस

प्रीत धुंदी

लेखक ज्योति अळवणी यांनी शनिवार, 26/09/2015 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
कैफ होता धुंदीचा... अन् धुंद होती रात ही हवा-हवासा स्पर्श होता... अतृप्त प्रीत बहरली कमनिय तू कामिनी ग अन्.. पुरुरवा मी तुझा चुंबिता ती नयनपुष्पे चंद्रही नाभिचा लाजला ये प्रिये.. नच दूर लोटु मी चकोर तू चांदणी गगन भरल्या चांद राति विरघळू दे तुझ्यात मी
काव्यरस

ll गंगास्मरण ll

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 26/09/2015 01:11 या दिवशी प्रकाशित केले.
सप्टेंबर महिन्यातला शेवटचा शनिवार हा जगभरात 'सरिता दिन' म्हणून साजरा केला जातो. (जगभरातील नद्यांचे प्रदूषण हा चिंतेचा विषय आहेच.) पण आजच्या दिवशी, परमपावन मानल्या गेलेल्या गंगेचे, तिच्या नितळ स्वरूपात केलेले स्मरण समयोचित ठरावे! तू कावेरी तूच नर्मदा, गोदा भद्रा सरस्वती तुझीच सारी अनंत रूपे, कृष्णा पद्मा शरावती तू कल्याणी, नीरदायिनी तुलाच नमितो सांबसदाशिव, हरहर गंगे तुलाच स्मरती भगिरथाचे पुत्र चिरंजीव प्रकटयोगिनी बिकटगामिनी तुझ्या तटाचे कडे निसरडे…. कितीक आले गेले भुलले तुझ्या किनारी शांत निमाले प्रयागसंगम अलख निरंजन तुझ्यात फिरते चक्र चिरंतन विशालसुंदर तरल निरंतर तुझ्यात विरते माझे अ

एक गोष्ट........

लेखक एक एकटा एकटाच यांनी गुरुवार, 24/09/2015 23:45 या दिवशी प्रकाशित केले.
एक गोष्ट तुझी एक गोष्ट माझी आहे एक गोष्ट तुझ्यामाझ्या गोष्टीची एक प्रीत तुझी एक प्रीत माझी जुळली एक प्रीत तुझ्यामाझ्या मनीची एक आभाळ तुझे एक आभाळ माझे भेटले एक आभाळ तुझ्यामाझ्या प्रेमाचे एक रात्र तुझी एक रात्र माझी सजली एक रात्र तुझ्यामाझ्या स्वप्नांची एक चंद्र तुझा एक चंद्र माझा साक्षी एक चंद्र तुझ्यामाझ्या मीलनाचा एक साथ तुझी एक साथ माझी सुटली एक साथ तुझ्यामाझ्या सोबतीची एक कारण तुझे एक कारण माझे छोटेसे एक कारण तुझ्यामाझ्या दुराव्याचे एक हट्ट तुझा एक हट्ट माझा जिंकला एक हट्ट तुझ्यामाझ्या अबोल्याचा एक सांज तुझी एक सांज माझी उगवली एक सांज तुझ्यामाझ्या निरोपाची एक वाट तुझी एक वाट म

विखुरलेलं चांदणं

लेखक रातराणी यांनी गुरुवार, 24/09/2015 13:23 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली कमीच झालंय तस तुझी आठवण येणं, ओसरत आहे हळू हळू हळव्या समुद्राच उधाण हल्ली कमीच झालंय तस रात्र रात्र तळमळणं, मला बघून अंधारानेही कमी केलंय उसासे सोडणं. हल्ली कमीच झालंय आता मला मोग-याने खुणावणं, त्यालाही झालंय सवयीचं झुरत झुरत गळून जाणं. हल्ली कमीच झालंय स्वप्नांनी डोळ्यात गर्दी करणं, मलाच कसं नाही जमलं असं वेळीच शहाणं होणं. हल्ली कमीच केलंय मी माझ्याच मनाच ऐकणं, तुझ्याकडे तरी आलंय का रे माझं टिपूर चांदणं? (नाव सुचलंच नाही कवितेला.)
काव्यरस

नेता

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 23/09/2015 21:54 या दिवशी प्रकाशित केले.
बिहारच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याच्या एका हातात खंजीर आहे दुसर्या हातात नागाचा विषारी दंश आहे एका क्षणी शिव्या देतो दुसर्या क्षणी मधाळ बोलतो. धृतराष्ट्री पुतळा तो नेहमीच समोर ठेवतो. तो मित्र आहे कि शत्रू काहीच कळत नाही. एक मात्र खरं तो सीजर नक्कीच नाही ब्रुटस असू शकतो कदाचित् किंवा नेताहि असू शकतो.

तुकारामा-

लेखक शशीभूषण_देशपाण्डे यांनी बुधवार, 23/09/2015 21:15 या दिवशी प्रकाशित केले.
तुकारामा, तुझ्यावाचून जगाचे काय अडले होते? -तरी इंद्रायणी काठी प्राण तुझे भिडले होते? नसतास तरी सुखेनैव आम्ही गजर केला असता तुझ्यावाचून विठूराया बेवारस मेला नसता कशासाठी आकांताचा एवढा धरला होता सोस? पंढरीचा वाडा काही अगदीच पडला नव्हता ओस टाळ वाजत होते, पखवाज नित्य दंगा करीत होता.. कशासाठी वाळवंटात तूच उर भरत होता? माहित नाही? ज्ञानोबाला आळंदीत गाडले होते! नामा फिरून आला देश, तरी पायरीत चिणले होते! चोखोबाच्या अंगावरती वेस पडली, हाडे उरली... एका जनार्दनी काया गोदावरीत होती बुडली... कुणी परागंदा झाले अंगावरती विजा झेलून खरे वाटले?.....

|| सांगा आता आम्ही काय करायचं? ||

लेखक नितिन५८८ यांनी बुधवार, 23/09/2015 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
कॉलेजला जाण्यासाठी बस stop वर तीन बस ची वाट बघत थांबायचं, थोड्याच अंतरावर आम्ही नुस्त तिच्याकड बघत थांबायचं. बस आल्यावर तीन पटकन बस मधी चढायच, तिच्याकड बघण्याच्या नादात आम्ही आपल सगळ्यात शेवटी बस मधी चढायच. आता मुलगी असल्या मुळ तिला बसायला जागा कुणीपण द्यायचं, आम्हाला आपल उभच रहाव लागायचं. सांगा आता आम्ही काय करायचं? बस स्टोपवर उतरल्यावर मैत्रिणींसोबत तीन कॉलेज कड निघायचं, आम्हीपण उगाचच आपल तिच्या मग मग जायचं. जाताना वळून तीन आमच्याकड बघायचं, हळूच मैत्रिणींच्या कानात आमच्याविषयी काहीतरी सांगायचं, त्या मैत्रिणीनीसुधा आमच्याकड बघून हसायचं, हासत हासत त्यांनी वर्गात सुद्धा निघून जायचं. सांगा आता
काव्यरस

पापड कर वा पोळ्या लाट (विडंबन)

लेखक दमामि यांनी मंगळवार, 22/09/2015 18:50 या दिवशी प्रकाशित केले.
आमची पेर्ना रस्सा तिखट पुरी सपाट तरी न माझे भरले ताट... जिलबीमागून भजी वाढली बासुंदीचा भलता थाट.. वरणभाताच्या शिखरांमध्ये तुपाचा हा अवघड घाट.. जरा किनारा दिसला पानी मठ्ठ्याची मग आली लाट... आयुष्याच्या पंगतीस मी .. पापड कर वा पोळ्या लाट.. !!!!!