Skip to main content

कविता

भुकेल वासरू

लेखक माहीराज यांनी बुधवार, 14/10/2015 या दिवशी प्रकाशित केले.
माळरानी चालुन पुरतं थकुन गेलं होतं.. चुकलेलं वासरू आता जिवनाला मुकुन गेलं होतं, लहानपणीच नशिबानं ज्याला औताला जुंपल होतं घाम फुटण्याआधीच  मात्र त्याच काळीज तुटलं होतं.. मुक्या बिचार्या जिवाला कधी रडताही आलं नाही दमलोय,थकलोय असं काही बोलताही आलं नाही.. नांगराचा फाळ त्याला कधी ओढताच आला नाही, गळ्यावरचा फास देखिल कधी सोडताच आला नाही.. थकलं होतं, दमलं होतं, जन्माला ञासुनं गेलं होतं, पायातलं ञान हरपुन भुकेनं व्याकुळ झालं होतं.. डोळ्यामधलं पाणी सारं सारं सुकुन गेलं होतं चुकलेलं वासरू आता जिवनाला मुकुन गेलं होतं, ..
काव्यरस

क्रूड ऑईल...

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 13/10/2015 या दिवशी प्रकाशित केले.
झाले पाठ सप्त शती चे थकूनं गेला जीव आता जाई चरावयासी mess वरं हा जीव रोज रोजची सोयाबीन भाजी खाऊन झाली गोSSSड जुनाSSssट शेवगा बीजटणकी टाळू वरला फोड चपात्यांचे रुमाल येती मूळचे पापड भाऊ मेसवाले फेसं आणिती?तरी किती ते खाऊ!!!? https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif ( दुत्त दुत्त!

..अळणी..

लेखक कानडाऊ योगेशु यांनी मंगळवार, 13/10/2015 या दिवशी प्रकाशित केले.
..अळणी.. तसं माझं आयुष्य असं काही खास नाही.. घेतलेल्यांपैकी अनेकात चुकलेला एकही श्वास नाही.. दिवस येतो दिवस जाते..रेंगाळणारी रात नाही.. किती बोललो तरी देखील..आठवणारी बात नाही... ओळखीचे तसे बरेच जण..कुणाशी दोस्ती ..वैर नाही.. कधी देतो कधी घेतो..पण वागणे मुळीच स्वैर नाही... आभाळ तसं निरभ्रच कधी जमतात काही ढग.. उगा उगा हळवं वाटत तेव्हा मात्र सारं जग.. अगदीच भुरभुर बरसतो...कुठे कोसळणारा मेघ नाही.. संथ वाहणारं पाणी सारं..त्याला कुठे आवेग नाही... कधी कधी आयुष्य हे फार फार अळणी वाटतं. थुंकता न येणारी धरलेली..तोंडात मीठाची गुळणी वाटतं.. तेवढ्यापुरतेच..पुन्हा त्यापाण्यानेच मी गुळण्या टाकतो.. आईस्क

ठिकऱ्या

लेखक जव्हेरगंज यांनी मंगळवार, 13/10/2015 या दिवशी प्रकाशित केले.
रात्री रस्त्यावर चालताना समुद्र माझ्या ओंजळीत लपला. उथळ पाण्यात चंद्र ढगाआडून खोल हसला. काळवंडलेली विवरं अनंतात रुतत गेली. आकर्षकणाची साखळी सहस्त्रकांत गोल फिरली. हलकेच तरंग उठले आणि चांदण्या बेभान झाल्या. ऊधानलेल्या समुद्रात सहर्ष हेलकावत खिदळत राहिल्या. कुठुनसा एक किरण लाजत लाजत चालुन आला अविरक्त अवकाशात फाटत फरफटत पुढे गेला नकळत माझ्या मुठीतून, विश्वातला एक थेंब रस्ताभर पाझरु लागला काळोखातला सुर्य अंधार चिरडत पेटत गेला कित्येक चकोर चांदण्या ऊधानून चमकत निसटुन गेल्या अवकाशाच्या निर्वातात एका ठिणगीच्या ठिकऱ्या झाल्या.
काव्यरस

एकाकी

लेखक सुमित_सौन्देकर यांनी मंगळवार, 13/10/2015 या दिवशी प्रकाशित केले.
तिथे थांबतोय जिथे थांबायचं न्हवत ठरवलं होत मागे वळून पहायचं न्हवत ती अंधार खोली पुन्हा उघडतोय मोडलेल्या फडताळात स्वताला शोधतोय सोफ्यावरली धूळ झटकून बसून क्षणभर डोळे मिटलेयत क्षणभरातच त्यांनीसुद्धा चुकांची चलचित्र पाहिलेयत जगाच्या वेगासोबत धावताना मागे खूप काही राहून गेलय कृत्रिम आनंदाच्या हट्टापाई निरागस हसण विसरून गेलोय चव यशाची मिळवायला आजवर फक्त स्पर्धा केलीय दिखाउपणाच्या गर्दीसाठी आपल्यांची आहुती दिलीय आशा आहे तिरीप येईल उजेडाची अंधारात खांद्यावरती हात ठेऊन कुणी दावील त्यातून वाट अजूनही त्या अंधारात एकाकी पडलोय राहायचं आत्ता पुन्हा तिथे जिथे मी घडलोय
काव्यरस

माझे आकाश...

लेखक बन्या बापु यांनी सोमवार, 12/10/2015 या दिवशी प्रकाशित केले.
(गुलझार यांच्या एका मुक्ताकावरून भारावून काहीबाही सुचलेले..) शाळेतून येताना चिंचोक्या सोबत लपवला होता आकाशाचा एक तुकडा.. निळा शुभ्र तुकडा एक.. ज्यात स्वप्नं लपवली होती माझी... लाल हिरव्या तांबड्या लोलंकात हरावयाचा तो कधी.. कधी चोरकप्यात लपून बसायचा.. अंधारात चांदण्याचा प्रकाश शोधून देत असे मला.. माझा आकाशाचा तुकडा.. निळा शुभ्र तुकडा एक.. ज्यात स्वप्नं लपवली होती माझी... सोबत जगत आलो आम्ही दोघे.. लोलकांच्या प्रकाशात ... सोबत स्वप्नं बघत आलो आम्ही... परीची.. तार्याची.. आकाशाची.. निळा शुभ्र तुकडा एक.. ज्यात स्वप्नं लपवली होती माझी... भरून यायचा आभाळ.. भिजायची पुस्तके माझी..
काव्यरस

कविता

लेखक समीर_happy go lucky यांनी रविवार, 11/10/2015 या दिवशी प्रकाशित केले.
कविता कविता लिहिणे अन कविता बनवणे यात काय फरक असावा??
काव्यरस

उशीर फार झाला. .

लेखक माहीराज यांनी रविवार, 11/10/2015 या दिवशी प्रकाशित केले.
तुटली नाती या मनाने जोडलेली जे सार्या नसानसांत भिनलेली क्षणात विझुन गेली सारी स्वप्ने तुझ्यासवे मी एकांतात पाहीलेली... तुटल्याने या मनाचा विश्वास विझुन गेला आता प्रेम करण्याचा आस्वाद निधुन गेला... मोठ्या मुश्किलीने स्वप्नाला छान रंग आलेला बघता बघता त्या प्रेमातला गंध निघुन गेला वेड्या मनाने जगण्याचा सुर नवा धरलेला जगता जगता गाण्यातला आनंद निघुन गेला... तुटल्याने या मनाचा विश्वास विझुन गेला आता प्रेम करण्याचा आस्वाद निधुन गेला... प्रेमज्योत पेटवायला उशिर फार झाला वात जळण्याआधीच अंधकार फार झाला पेटलेली ठिणगी हातीच विझुऩ गेली पुन्हा पुन्हा विझण्याचा प्रकार फार झाला तुटल्याने या मनाचा विश्वास व

देवाचा 'सुपर कंप्युटर'

लेखक समीर_happy go lucky यांनी शनिवार, 10/10/2015 या दिवशी प्रकाशित केले.
सहज अस वाटल,कि देवा जवळ समजा सुपर कॉम्प्यूटर असला तर तो किती बिझी असेल,म्हणजे पहा ना प्रत्येकाच्या पाप अन पुण्यांचे हिशेब ठेवण प्रत्यक्ष देव जरी असला तरी लोकसंख्या इतकी आहे कि त्याला जिकिरीच जात असेल.एक तरी सुपर कोम्पूटर असेलच .e.g.
काव्यरस

माझ्या कविता

लेखक माहीराज यांनी शनिवार, 10/10/2015 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या कविता. .    काही शब्दांनी सजलेल्या . .    काही स्वप्नांनी भिजलेल्या. .    कधी भासांमधे अडकून    काही क्षणांमधे रुजलेल्या. . माझ्या कविता. .     कळत नकळत मनामध्ये विरलेल्या..     कधी कधी तर भावनाच विखुरलेल्या ..     कधी ओझरत्या आशेने खुललेल्या ..     तर कधी विखुरत्या रंगात फुललेल्या.. माझ्या कविता.
काव्यरस