Skip to main content

कविता

तिची एक आठवण.......

लेखक एक एकटा एकटाच यांनी गुरुवार, 22/10/2015 या दिवशी प्रकाशित केले.
तिची एक आठवण..अगदी तिच्यासारखी एका अबोल सांजवेळेत रमणारी आयुष्यातले रंग मुक्त उधळीत मनाच्या क्षितिजावर मालवत जाणारी......तिची एक आठवण तिची एक आठवण..अगदी तिच्यासारखी अवचित मला एकाकी गाठणारी आवेगाच्या धुक्यात मला लपेटून भुतकाळाच्या दरीत खोल उतरणारी.........तिची एक आठवण तिची एक आठवण..अगदी तिच्यासारखी अवखळ अल्लड सरींनी सजणारी सारा आसमंत भिजवून जाताना पाऊलखुणा नजरेत साठवून जाणारी........तिची एक आठवण तिची एक आठवण..अगदी तिच्यासारखी बंद मुठीतल्या चंचल वाळुपरी लाख अडवून धरले तरी निर्विकारपणे अलगद निसटत जाणारी........तिची एक आठवण

श्रद्धाळु

लेखक आनंद कांबीकर यांनी गुरुवार, 22/10/2015 या दिवशी प्रकाशित केले.
जे दिसतं, खरं असतं ते पटत नाही. जे अस्तित्वात नसतं नुसतं भासतं त्याच्यासाठी तंडायचं. इतिहासातल्या कथेपायी एक मेकायला तोडायचं. भाकर दुसरेच भाजतात आपण पेटुन राख व्हायचं. कोपर्यातल्या म्हतारीला कधी उठून तांब्याभर पानी नाही द्यायचं अण् झेंडे घेऊन रानोरानभटकायचं. 'तो' सर्वत्र आहे म्हणायचं वरतुन दगडापुढं रात्रंदिस रांग धरायचं. 'त्याला' ही हे पटत नसल पोट धरून 'तो' ही हसत असल. उपासातापासाने 'तेव' पावला असता तर रसत्यावरचा भिकारी रास्त्यात मावला नसता. आपण रक्ता-घामाच्ं टाकून पेटी भरतो आणि पुजारी गाड्यात फिरतो

शब्दात नाही गुंतायचं!

लेखक ज्योति अळवणी यांनी बुधवार, 21/10/2015 या दिवशी प्रकाशित केले.
कशाला कुणाला दुखवायच? शब्दांच्या जाळ्यात अड़कायच? थोड़ स्वतःत राहायच... जगण सुंदर करायच! निसर्ग... प्राणी... पक्षी असतात; ते कुठे आपल्या भाषेत बोलतात? स्वतःत ते मग्न असतात.. त्याचं जगण सुंदर करतात! त्यांच्याकडून थोड़ शिकायच. जगण्याला जीवन बनवायचं... मात्र शब्दात न गुंतता... आयुष्याला हिरवं बनवायचं!
काव्यरस

कुणाच्यापुढे कोण झुकले बघा रे

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 21/10/2015 या दिवशी प्रकाशित केले.
कुणाच्यापुढे कोण झुकले बघा रे कुणा बोलुनी कोण चुकले बघा रे कुणी होत वाचाळ थयथय उगाच कुणी शांत राहून ठेवीत जाच कसे सिद्ध होईल श्रेष्ठत्व त्याचे असे सैन्य नाठाळ ज्या राजियाचे कृतीतून ठरते इथे कोण वाघ मुखे बोंबलोनी करी काय सांग एकीत असते रहस्य यशाचे तुम्हाला महत्व न पटले अशाचे तुम्ही स्वाभिमानात धन्य जहाला तिथे एक चेहरा भुलवतो जगाला असे वेळ हाती न वागा असे रे कशाला करावे स्वतःचे हसे रे इथे संधी सर्वांस आहे समान भूतापरी हो जपा वर्तमान जसा जन्मतः वाघ ना वाघ झाला करोनीच हो दाखवा या जगाला -अपूर्व ओक ब्लॉग दुवा हा

मायें...

लेखक आनंद कांबीकर यांनी मंगळवार, 20/10/2015 या दिवशी प्रकाशित केले.
तुझी आठवण मनाला कुरताड़ते, तुझं आणवाणी पायाणं रानं धुंडाळनं तापत्या उन्हात, अड़मुठ्या पावसात अन् गारठ्यात मिळलं ते काम करणं आज ही जेव्हां ऑफिसला निघतो, अरशात दिसतेस तु तळपत्या ढेकाळात, ललाटावरच्या कुंकवासगट घामाच्या धारांत लतफत उभी. तुझ्या हातातलं खुरपं माझं काळीज कापतं. तु ढेकळं फोडायचीस मला चारान्याची पेन्सिल देण्यासाठी. दिवाळी ला ठिगळं लाउन नाटी नवी करायचीस खाकी चड्डी मात्र कोरी शिवायाचीस. लई भोगलस तू माझ्यासाठी अता तुला गावांत ठिवनार नई बस्ं झालं तुरःट्या म्होरं सारुण धुर फुंकनं ती फुंकनि चुलीत घालून, येणार आहे मी आज तुला हिकडं घेऊन.

चालत राहू......

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 20/10/2015 या दिवशी प्रकाशित केले.
रेषांसंगे चालत आलो, रेषांसोबत चालत राहू, गति नाही, स्थिती नाही, केवळ लय, चालत राहू. उठल्यावरती सूर्य नाही, थकल्यावरती चंद्र नाही कुठला देश, कुठले घरटे, आपली कुडी, चालत राहू. जंजाळाशी रडणे नाही, गुंत्यापाशी थटणे नाही, कोण आले, कोण गेले, कुणी न उरले, चालत राहू. दार लोटले अंधार नाही, दार उघडले प्रकाश नाही, आला दिवस, गेला दिवस, आत्ताचा क्षण, चालत राहू. नाव उलटली आक्रोश नाही, नाव तरली जल्लोष नाही, कुठली लाट, कुठली वाट, आपला किनारा, चालत राहू.

तेव्हा तुम्ही कुठे होता?

लेखक बाप्पू यांनी रविवार, 18/10/2015 या दिवशी प्रकाशित केले.
डॉक्टर कुल्बर्गी यांच्या हत्ये नंतर कर्नाटकातील बऱ्याच साहित्यिकांनी आपल्याला मिळालेले पुरस्कार सरकारला परत केले. सुरवातीला हि गोष्ट कर्नाटक पुरतीच मर्यादित होती. पण हे लोन आता बऱ्याच राज्यांमध्ये पसरलेय. आणि याला कारण म्हणजे दादरी येथे झालेली घटना. नेमके आज च तुम्हाला भारतात असहिष्णुता वाढत असल्याचा साक्षात्कार झाला काय? हि घटना खरच दुर्दैवी होती. पण या घटनेचे भांडवल करून खूप राजकारण पेटले आहे. आणि या वाहत्या गंगेत हाथ धुवून घेण्याचे काम साहित्यिक करत आहेत. मला कोणत्याही प्रकारे दादरी येथील घटनेचे समर्थन करायचे नाहीये. फक्त एकच प्रश्न या सर्व साहित्यिकांना विचारायचा आहे.

माझा गांव..

लेखक आनंद कांबीकर यांनी रविवार, 18/10/2015 या दिवशी प्रकाशित केले.
माझा गांव, अता गांव नाही राहिला. नदीचा ओढा अन ओढ्याचा नाला झालाय. तुंबलाय, बरबटलाय, आणि सडलाय पण. पुर्वी दाट वडांच्या सावलीत गार निजायचा आज रखरखत्या इमारतींत तगमगतोय. सुटू शकत नाही. निसटु ही शकत नाही. नाही, तसा प्रयत्नच होत नाही. रानं काळवंडलित पूर्वी ती फुलायची अता त्यांचे लिलाव होतायत. आजु-बाजुने, आडवा-तिडवा नुसता फुगत चाललाय. डाम्बरी नांग्या फुटताय त्याला इखान् डबडबलेल्या. भुलवतोय मला, तेवढेच आतून छळतोय मला माझा गांवअता माझा राहिला नाही.

चारचा चहा

लेखक शिव कन्या यांनी बुधवार, 14/10/2015 या दिवशी प्रकाशित केले.
चारचा चहा touch screen असतो! कपाच्या कानाला गुदगुल्या केल्या कि आतल्याआत मस्तसे हसतो, How's the day? म्हणून मिश्कीलपणे विचारतो! चारचा चहा screen saver असतो! शरीराचा tab refresh करतो मनाचे software update करतो, What's on your mind? म्हणून खोडीलपणे विचारतो! चारचा चहा google map असतो ! मनाचा cursor global होतो पण हातातला mouse local च राहतो ...... ............. ............ ....... ............ हळूहळू चारचा चहा धूसर होतो अरबी समुद्रापार दिसेनासा होतो......... !

ती

लेखक शीतल जोशी यांनी बुधवार, 14/10/2015 या दिवशी प्रकाशित केले.
ती धरित्री ती जीवन दायिनी ती शक्ती ती भक्ती ती विद्या ती प्रज्ञा ती अर्धागिनी, ती कन्या ती वीज , ती नीज ती काळजी , ती प्रीत ती प्रेरणा , ती ज्योत ती ममता, मायेच स्त्रोत ती हळवी, अन तरी ती खंबीर हि ती मृदू , तरी प्रसंगी ती कठोर हि तीची ओंजळ नेहमी रिक्त, तीचे जगणे कधी मनमुक्त ती पावसची रिमझिम बरसणारी धारा अन ती , कृष्णाची प्रेमवेडी राधा ती सर्व नात्या मध्ये गुंतलेली तरी स्वत्व स्वताचे जपलेली ती स्वतंत्र अन ती कणखर ती स्वताला सावरणारी , सांभाळणारी स्वतची काळजी स्वताच घेणारी मला, अभिमान आहे मी "ती" असल्याचा प्रत्येक दिवस माझ्या साठी स्व-सन्मानाचा अपेक्षा तर काहीच