Skip to main content

कविता

द गडू शेट द गडू शेट ......:)

लेखक दमामि यांनी मंगळवार, 27/10/2015 08:17 या दिवशी प्रकाशित केले.
द गडू शेट द गडू शेट भरले का हो तुमचे पेट? तुम्ही म्हणे उडवून लावता भल्या भल्यांचे जम्बो जेट? इकडून सूड तिकडून अभ्या बॅट्या टक्या किसन प्यारे उचकायाचा मामिला उगा का रे लावता नेट? व्यासपीठ हे विरंगुळ्याचे मामू , मामे, फरक काय? पदर खोचून उभा/भी आहे तुमच्या समोर मामि थेट.:) काय सांगू कस्सं सांगू खरं काय खोटं काय कधी तरी कुठेतरी कट्ट्यामध्ये होइल भेट. ( ट ला ट लावून पाडलेली कविता:))
काव्यरस

बालपण

लेखक एकप्रवासी यांनी सोमवार, 26/10/2015 23:59 या दिवशी प्रकाशित केले.
कधीतरी जाऊया आपल्या गावी, आठवणींनी भिजलेल्या वाटा धुंडाळत लपंडाव, विटी दांडू, सागरगोटीचे खेळ खेळत, आंबा फणसाच्या, चिंच आवळ्याच्या झाडात आपलं बालपण शोधत, कधीतरी जाऊया आपल्या गावी………… हिरवळीत जीर्ण झाडात लपलेली आपली शाळा शोधत, खेळाचे मैदान, शाळेची घंटा, फळ्यावरचे सुविचार वाचत, आपला वर्ग, आपली जागा, रंग उडालेला फळा अंधुक झालेल्या आठवणीत आपले सवंगडी शोधत, कधीतरी जाऊया आपल्या गावी…………

माळी पुनेव

लेखक ऊध्दव गावंडे यांनी सोमवार, 26/10/2015 22:44 या दिवशी प्रकाशित केले.
माळी पुनेव! माळी पुनेवचा चंद्र जशी पन्हावली गाय धारा लागल्या दुधाच्या भिजते धरनी माय चांदन्याचं वावरातं डोले पीक हिर्वं गारं पाना पानाऊनं झरे गोळं अमृताची धारं कन्सा कन्सा वरं झाली चांदन्याची आबादानी कन्सातला दाना कसा हासे तान्ह्या पोरा वानी नयतुर्न्या पोरी वानी चंद्र हरखूनं जाये वायत्या पान्यातं नदीच्या रूपं निरखूनं पाये धुंद झाली चांदन्यानं मैना फूगळी धरते धरनीच्या मळक्यातं रई गर्गरं फिरते

पाण्याचे जगने

लेखक आनंद कांबीकर यांनी सोमवार, 26/10/2015 18:26 या दिवशी प्रकाशित केले.
आवडत नाही त्यास तुंबायला गुरफटुन सडायला जरी गटारात, आवडते वहायला जळमट सोडून पुढे पळायला छंदच त्याचा पळायचा झाडाच्या बुंध्याशि खेळायचा खेळहि त्याचे न्यारे अडमुठ ढेकळांना घुसळायाचे खडकांना पाझर फोडायाचे ताकत तेच्यात कोमा ला झाड तर ताड़ा माडाला मातीमोल करायची ते मुक्त आहे, मोफत आहे पर आपण त्यास बांध घालतो अन बाटलित भरतो तरी ते कुणावर ही रुसत नाही या खिशातून त्या खिशात घुसत नाही

जिंदगी ना मिलेगी दोबारा - जावेद अख्तर भावानुवाद

लेखक अजब यांनी रविवार, 25/10/2015 10:57 या दिवशी प्रकाशित केले.
१. एक बात होठों तक है जो आयी नहीं बस आँखों से है झांकती तुमसे कभी मुझसे कभी कुछ लब्ज है वो मांगती आवाज़ की बाहों में बाहे ड़ाल के इठलाये वो लेकिन ये जो एक बात है एहसास ही एहसास है खुशबू सी है जैसे हवा में तैरती खुशबू जो बेआवाज़ है जिसका पता तुमको भी है जिसकी खबर मुझको भी है दुनिया से भी छुपता नहीं ये जाने कैसा राज़ है भावानुवाद एक कहाणी जी ओठांवर न येताही डोकावे डोळ्यांच्या मधुनी शब्दच काही मागत राही तुझ्याजवळ अन माझ्याकडुनी... कधी कहाणी आवाजाच्या बाहूंमध्ये मिरवत असते कधी कहाणी नुसती केवळ जाणिव होउन भासत असते... गंध जसा फिरतो वाऱ्यावर मूकपणे दरवळतो घरभर मूक कहाणी तुला समजते , मला

तू कुणाचा...

लेखक आनंदमयी यांनी शनिवार, 24/10/2015 13:16 या दिवशी प्रकाशित केले.
फाटली भलत्या अवेळी जीर्ण झोळी थेंब शब्दांचे तुझ्या झेलीत होते राहिला साचून तेथे षड्ज वेडा आर्त वेणूचे जिथे संगीत होते थिरकते ही एकटी जेथे अबोली त्या तिथे शून्यात होती रासलीला हळहळे अजुनी घडा फुटका, रिकामा खोड माझी काढण्या तू फोडलेला नादती येथे वृथा का पैंजणे ही छेडता दूरात तू मंजूळ पावा रे मुकुंदा श्वास माझे जहर व्हावे एवढा सलतो जिवाला हा दुरावा मान्य हे कळले जरा मजला उशीरा की तुझ्या असण्यातही नसणेच होते भाळले ज्याच्यावरी गोकूळ सारे सावळे ते हास्यही उसनेच होते संपला सहवास सरल्या गोड भेटी प्रश्न केवळ राहिला वेड्या मनाचा मी तुझी, यमुना तुझी, अन् गोपिकाही! सांग पण मधुसूदना रे तू
काव्यरस

चापण्याचा हव्यास

लेखक अरुण मनोहर यांनी शुक्रवार, 23/10/2015 15:22 या दिवशी प्रकाशित केले.
जिभे~स ह्या वेळोवेळी चा~पण्याचा हव्यास होता जिभे~स ह्या वेळोवेळी चा~पण्याचा हव्यास होता कळले मग~ मजला~ की, तो गळ्याचा फास होता जिभे~स ह्या वेळोवेळी चा~पण्याचा हव्यास होता बा~यको अन् माझे~ होते, प~क्ष वे~गवेगळे बा~यको अन् माझे~ होते, प~क्ष वे~गवेगळे ती~ उपाशी ठेवू पाही, खाणे~ मज, जल्लोष होता जिभे~स ह्या वेळोवेळी चा~पण्याचा हव्यास होता वा~टला जो स्वाद मजला, अजीर्णाचा नाद होता वा~टला जो स्वाद मजला, अजीर्णाचा नाद होता पो~कळितल्या खर्जातुनी, तक्रारीचा आवाज होता जिभे~स ह्या वेळोवेळी चा~पण्याचा हव्यास होता सुगंधावर त्यां पक्वानांच्या, भाळूनी मी आनंदलो सुगंधावर त्यां पक्वानांच्या, भाळूनी
काव्यरस

नात्याला अर्थ पुरेसा.....

लेखक चुकलामाकला यांनी शुक्रवार, 23/10/2015 08:40 या दिवशी प्रकाशित केले.
नात्याला अर्थ पुरेसा, कशास द्यावे नाव? संपेल कधितरी रस्ता, गवसेल तिथेही गाव… … गाठावा तीर कसा हा , जणू अथांग सागर; नाते तू जिथे सोडली तेथे थांबली अजूनही नाव… जगण्याच्या सायंकाळी , मज तुझी आठवण आली दूरदेशी तू सखये ,तुज कसे कळावे भाव…. तू मूक ढाळशी अश्रू, पण चरे काळजा पडती मी वाट पहातो कुठल्या , शब्दांनी भरतिल घाव… ही खंत कशाला वेडे की उठून गेले सारे? ठाऊक तुलाही होता, हा सारिपटाचा डाव…
काव्यरस

तुझ्या आठवणीत. ..

लेखक माहीराज यांनी गुरुवार, 22/10/2015 21:20 या दिवशी प्रकाशित केले.
सजलेेली लाट.. नटलेले पाणी... तुझ्या आठवणीत गातो पुन्हा सुचलेली गाणी.. दुर उठलेल्या लाटेचे किनार्याशी गोड नाते.. ते पाणी खारट थोडे अमृताहुन ही गोड वाटे.. ओल्या सांजवेळी किरणे वाळुत शिंपडावी.. ध्यानी मनी नसताना तु किंचीत जवळ यावी... मी बावरताना..
काव्यरस

“रावणदहनाच्या” हार्दिक शुभेच्छा...!

लेखक गंगाधर मुटे यांनी गुरुवार, 22/10/2015 14:37 या दिवशी प्रकाशित केले.

“रावणदहनाच्या” हार्दिक शुभेच्छा...!


शेतमालाचे भाव वाढले की
आपला जळफळाट होतो...कारण
आपल्या मनात दडी मारून
बसला आहे एक रावण

आपल्या मनातल्या रावणाला
सीता पळवून न्यायची असते
भूमीतून निपजलेल्या वस्तूंची
किंमत मोजायचीच नसते

आमची मानसिकता रावणीच
संधी मिळताच जागी होणारी
पोशिंद्याला सदैव अशोकवनात
बंदिस्त ठेवू पाहणारी

कधी मरेल हा रावण
तुमच्या आमच्या मनातला?
आणि कधी होईल मुक्त
बळीराजा रानातला?
काव्यरस