कातर वेळी आभाळ भरुन
येणं फार वाईट असतं
----
संध्याकाळची ती वेळ
एकटाच खिडकीत उभा राहून
नुकत्याच अवतरलेल्या चंद्राकडे
पहात उभा होतो
कशी कोण जाणे पण
तुझी आठवण
त्या भरून आलेल्या
ढगांबरोबर वाहत आली
---
कातर वेळी आभाळ भरुन
येणं फार वाईट असतं
----
आभाळ इतकं भरलं
ढगांनी इतकी दाटीवाटी केली की
त्यांना आभाळ पुरेना
कोणता ढग कोणत्या ढगात
विलीन होतोय तेच कळेनास झालं
आणि मग गडगडाटाने सारा
आसमंत भरुन गेला
या सगळ्या गोंधळात
तो चंद्र दिसेनासा झाला
अन्
उगाच जीव कासाविस झाला
----
कातर वेळी आभाळ भरुन
येणं फार वाईट असतं
----
पाहता पाहता
त्या ढगांना ओझं असह्य होऊन
त्यांनी शरणागती पत्करली
जश्या समुद्राच्या लाटां वर ल