मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता

सवाल...

राजेंद्र देवी ·
लेखनविषय:
सवाल लालचुटुक ओठ तिचे मऊसूत गाल पापण्यांआड दडलेले डोळे तिचे कमाल नजरेत तिच्या तलवार अन नजरेतच ढाल तिरपा एक कटाक्ष होतो मी हलाल गाली गुलाब फुलतो उधळीत सुगंधी गुलाल कुरळ्या केसात फिरतो कर करी शांतता बहाल रोज झोपतो मी हि ओढून स्वप्नाची शाल सत्यात कधी उतरेल हाच नशिबाला सवाल राजेंद्र देवी

माहेर

प्रास ·
लेखनविषय:
काव्यरस
असे माहेराचे घर नसे कसली कसर नुरे कसलाही भार डोक्यावर माहेराचे गणगोत भला नात्यांचा हा पोत प्रेम बहर भरात ओतप्रोत माहेराचे हे सदन माझे स्वीकारे वंदन असे माझाही राखून एक-कोन अरे माझिया माहेरा राहो कितीही मी दूरा फिटे दुःखाचाही भारा मोदसारा

जन्मभर

शार्दुल_हातोळकर ·
लेखनविषय:
काव्यरस
नेसत्या वस्त्रानिशी मी हा असा आता निघालो ना कळे जन्मामध्ये या काय मी कमवुन गेलो? झाकण्या लाखो उणिवा केवढी केली शिकस्त दाटले आभाळ होते मी दिखाव्यात व्यस्त ल्यायलो रेशीम वस्त्रे घ्यावया सन्मान खोटा भाळलो का मी कळेणा पाहता त्या चोरवाटा जे मुळी नव्हतेच माझे वाहिले आयुष्य त्यांना वंदिले समजुन सूर्य त्या भ्रमाच्या काजव्यांना जाहला सूर्यास्त जेव्हा पांगले सारे घरोघर मग जणू मिटताच डोळे जाणिला गुंता खरोखर जन्मभर केला दिखावा मानुनी आयुष्य त्याला खेळ सारा जीवनाचा तो चितेवर ज्ञात झाला - शार्दुल हातोळकर

कातर वेळ

मिसळलेला काव्यप्रेमी ·
लेखनविषय:
कातर वेळी आभाळ भरुन येणं फार वाईट असतं ---- संध्याकाळची ती वेळ एकटाच खिडकीत उभा राहून नुकत्याच अवतरलेल्या चंद्राकडे पहात उभा होतो कशी कोण जाणे पण तुझी आठवण त्या भरून आलेल्या ढगांबरोबर वाहत आली --- कातर वेळी आभाळ भरुन येणं फार वाईट असतं ---- आभाळ इतकं भरलं ढगांनी इतकी दाटीवाटी केली की त्यांना आभाळ पुरेना कोणता ढग कोणत्या ढगात विलीन होतोय तेच कळेनास झालं आणि मग गडगडाटाने सारा आसमंत भरुन गेला या सगळ्या गोंधळात तो चंद्र दिसेनासा झाला अन् उगाच जीव कासाविस झाला ---- कातर वेळी आभाळ भरुन येणं फार वाईट असतं ---- पाहता पाहता त्या ढगांना ओझं असह्य होऊन त्यांनी शरणागती पत्करली जश्या समुद्राच्या लाटां वर ल

सल...

राजेंद्र देवी ·
लेखनविषय:
सल लाव धार माझ्या खंजिरी घेईन म्हणतो जरा ऊरी नाही सहन होत आता तुझ्या आठवणीची मुजोरी तुझी आठवण आहे काचरी दिवस रात्र मला जाचरी नको आता आयुष्याची शंभरी नको तुझ्या आठवणींची शिदोरी सांग तुला पण हेच का वाटते माझी आठवण डोळा दाटते बुडवून टाक अश्रूच्या सागरी आयुष्यातील एक सल बोचरी राजेंद्र देवी

प्रेम म्हणजे काय

सोहम कामत ·
लेखनविषय:
प्रेम प्रेम म्हणता तुम्ही प्रेम म्हणजे काय?? साखरेचा गोडवा की दुधावरली साय?? प्रेमाला ना कसले बंधन म्हणता तुम्ही कसे.. जाती गोती विणूनी माणूस कुंडलीच अभ्यासे.. कुंडलीतले शनी नि मंगळ पैदा करती दोष.. ३६ गुण जुळता तुम्हा मिळतो तो संतोष.. गोंधळात या विसरून जाता मुलांचा तो अभिप्राय.. प्रेम प्रेम करता तुम्ही अहो प्रेम म्हणजे काय?? साखरेचा गोडवा की दुधावरली साय?? प्रेम असते सुंदर निर्मळ म्हणता तुम्ही कसे.. आकर्षणाच्या व्यसनामध्ये शिक्षण मुलांचे फसे.. घरातली ती लक्ष्मी फक्त सांभाळे चुल नि मुल.. नवरा घरचा कर्ता धर्ता बनवी विचित्र रुल.. संसारात प्रेमाची त्या बनते गरीब गाय.. प्रेम प्रेम म्हणता तुम्ही प

वेग...

राजेंद्र देवी ·
लेखनविषय:
वेग मरण एवढे सोपे झाले जगणे अवघड झाले आहे आता यम एकटा नाही जागोजागी त्याचे चेले आहे म्हातारे कोतारे मरती तरुण मरती रस्त्यावरती मृत्यू म्हणजे काय ज्यांना न कळते लहानपणीच आयुष्य संपले आहे सारे ओढवून धेतलेस तू मानवा वेगाने तुला भारले आहे आपल्याच भाऊबंदास तू स्वतः मारले आहे राजेंद्र देवी

जगलो आहे

राजेंद्र देवी ·
लेखनविषय:
जगलो आहे मनसोक्त डुंबावेसे वाटले पण काठावरतीच जगलो आहे आख्खी भाकर तर सोडाच चतकोर वाट्यातच जगलो आहे नुसतेच पाहणे, वास कसला घेतो गुलाबाच्या काट्यातच जगलो आहे गुरू त्यांचे प्रबळ होते राहू केतूच्या कचाट्यात जगलो आहे सुख एवढेच निखारे नव्हते गरम फुफाट्यात जगलो आहे राजेंद्र देवी

समेट....

राजेंद्र देवी ·
लेखनविषय:
समेट.... रम्य ती पहाट, शांत तो घाट, चंद्रभागेचा हलकासा खळखळाट गळा तुळसीमाळा, मुखी विलसतसे हास्य रम्य तो आरतीचा थाट गजबजला बघ हा चंद्रभागेचा घाट कीर्तनी दंग पाहा ते भाट युगानुयुगे उभा विठू माझा ताठ धन्य ती पाउलिची वीट आता कोठली वारी धरिली खाट बोलाव माउली कर आता समेट राजेंद्र देवी