मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता

शुभ दसरा

रातराणी ·
लेखनविषय:
विजयादशमीच्या सर्वांना अनेक शुभेच्छा =)) शुभशकुनांच्या पावलांनी किरण सोनेरी येती घरा अवगुण अंतरीचे मिटवूनी करू सत्याचा विजय साजरा दारी सजवू मांगल्याचे तोरण दुःखक्लेशास न मिळो थारा विवेकबुद्धीने करून आचरण लाभो शक्ती दुष्टमतीच्या संहारा नवविचारांचे जमवूनी सखेसोबती पेटवुया जुनाट रीतींच्या अंधारा जन्मू दे नवी उमा दुर्गा सरस्वती स्वप्न यशाचे तरच येईल आकारा

मैत्रीण ....... !!!!

फिझा ·
लेखनविषय:
मैत्रीण ....... !!!! माझ्याकडे दिवस डोक्यावर असताना तु चांदणे पाहत असतेस कदाचित , तुझ्या नि माझ्या देशातले ऋतूही सारखेच आहेत म्हणे .... ऋतूंबरोबर मैत्री बदलत नाही .... ती तिचा ओलावा कायम ठेवते, हे किती बरंय नाही ? कुठलातरी ढग कधीतरी गच्च भरलेला इथे माझ्या अंगणात येऊन बरसतो रापलेल्या इथल्या तृणांमधून तो, वाट काढत काढत दिशाहीन वाहत राहतो ....... 'तो 'ढग तुझा होता; ते मला कळत नाही, हे किती बरंय नाही ?

मोल...

राजेंद्र देवी ·
लेखनविषय:
मोल... या दुनियेत कोणी कोणाचा नाही जो तो पैशात तोलुनी पाही नव्हता मजकडे पैसा जो आजपण नाही म्हणून तर आजपण कोणी मला ओळखत नाही सारी नाती गोती बेताची ठेवून अंतरे वितांची गळाभेट तर नाहीच नाही साधी विचारपूस पण नाही या दुनियेत कोणी कोणाचा नाही मी पैशाचा वा पैसा माझा नाही राहतील फक्त शब्द माझे त्याला काही मोल नाही राजेंद्र देवी

!! स्त्री !!

कवि मानव ·
लेखनविषय:
काव्यरस
केली कल्पना स्त्री विना जगताची, आदराने शिष झुके. निसर्गाची मोठी किमया, ती नसती तर संसार मुके, घेउनी बीज तिज पोटाशी, नेण्या मानवतेचे वेल पुढे, स्त्री न असती या पृथ्वीवर, सकल अस्तित्वाचा प्रश्न पडे ?

सहजच

रातराणी ·
लेखनविषय:
आळसावलेल्या एका सकाळी तू म्हणाव चल फिरून येऊ कुठे कस काही न सांगता घेऊन यावस मग समुद्रकिनारी मी विचाराव, "का रे, आज एवढ्या लांब?" तू म्हणाव, "सहजच, गंमत आपली" सूर्य पाण्यात पोहू लागेपर्यंत पडून राहाव गरम वाळुत सूर्यास्ताला जाव गार पाण्यात हलकेच उलगडावी तू माझी वेणी मी म्हणाव, "काय रे? केस विस्कटतील" तू म्हणाव, "असू देत असेच सहजच " बोचर्या थंडीची पर्वा न करता ओल्या वाळुत उमटवाव्यात पाउलखुणा अंधार पांघरुन मग मोजत बसाव्या आकाशभर चमचमणाऱ्या चांदण्या मी हळूच ओठ टेकवावे तुझ्या गालांवर तू विचाराव, "अरे वा, आज काय विशेष?" मी म्हणाव, "काही नाही, सहजच"

मी स्त्रीशक्ती

माहीराज ·
लेखनविषय:
काव्यरस
बरोबरीने तुझीया आले, तुझ्याहून ही नाव जाहले, काय कमी रे माझ्या ठायी जे मी लढण्या आधीच हरले ... नऊ मास मी त्रास सोसुनी जन्म जरी हा तुजला देते, तरी पुन्हा हे भ्रुणहत्येचे पाप माझ्याच माथी येते. ... तुच अपुरा माझ्यावाचुन साथ तुला शतजन्मी देते, मान्य तुला ना सत्य हे सारे म्हणून भोग हे निमित्त ठरते ...   जाणुन घे रे किंमत माझी तुला न ठावे हिम्मत माझी  शांत ज्योतीसम ही जळणारी आग अंतरी शतजन्माची ...

ती माझी होती

दिनु गवळी ·
लेखनविषय:
ती मला खुप आवडायची कधी कधी खुप रडवायची तिचा हसरा चेहरा आणि डोळ्यातील काजळ मला नेहमी वेड करायचे ती खरचं एक परी होती, की आकाशातील पहाटेची शुक्राची चांदणी, काय होती ती , की अस म्हणु काय नव्हती ती शब्दच नाहीत...!! पण कधीकधी आपोआप या मनातुन शब्द ओठांवर येतात... ती माझी होती... माझी आहे... माझीच राहिल... स्वप्नांच्या ही पलिकडे तिच्यासाठी एक जादुचा बगीचा मी बनविला होता.... ती खुश रहावी म्हणुन त्या बगीच्यात पारिजातक वृक्ष लावला होता.... ती दिसायची जणु मत्स्यकन्याच.. म्हणुन बगीच्यात होता सोनेरी चंदेरी तलाव ... सोनेरी राजहंस तर होतेच तिथे.. सुंदर जलपऱ्या पण रहायच्या.. स्वर्गात पण नसेल अस अमृतकमळ

बासरी....

राजेंद्र देवी ·
लेखनविषय:
बासरी.... मनमंदिरी वाजू लागली बासरी मनमोहना लागली तुझीच आस रत्नजडितं मुगुट त्यावर खोचलेले मोरपिसं घननीळा लागला तुझाच ध्यास कुंजवनी घुमू लागला पावा कृष्णा करिते तुझाच रे धावा हंबरती धेनू ऐकून तुझी वेणू वेड लावलेस या राधेला जणू शामल मूर्ती कमरेस खोचली मुरली पाहून आता ना जीवनाची आस उरली राजेंद्र देवी

नवलाई...

राजेंद्र देवी ·
लेखनविषय:
नवलाई... ही सवय तुझी का मला माहीत नाही? उशीरा येऊन लवकर जाण्याची घाई अंमळ थांब जराशी मन अजून भरले नाही नभी चंद्रमा झुलतो, अजून रात सरली नाही गाली फुलतो गुलाब त्यावर चंद्रकिरणांची झिलई तुझ्या लडिवाळं बोलण्याची रोज वाटते अपूर्वाई आपण दोघे जागे जग शांत झोपले पांघरून स्वप्नांची दुलई जागेपणी पाहतो आहे आपण उद्याच्या स्वप्नांची नवलाई राजेंद्र देवी

निरोप

परिधी ·
लेखनविषय:
बसल्या बसल्या सहज डोळे भरून येतात तुझ्या माझ्या आठवणी पिंगा घालु लागतात तस सांगण्यासारख फारस काही नव्हतंच एकदा फ़क्त "तू बोल" एवढं तरी म्हणायच इंजेक्षनच्या आधी गार गार अल्कहॉलने पुसाव मग सुईने शांतपणे आरपार टोचत टोचत जाव चंद्राच्या शीतल सहवासात तशीच बेसावध चांदणी विरहाची अबोल वेदना हळूहळू होत जाते जीवघेणी खंत याची नाही की वेगळ्या झाल्या वाटा कधी न कधी हात हातातुन सुटनार च होता एकच टोचनी लागून राहिली आहे तरी मनाला डोळ्यात डोळे घालून एकदा निरोपही नाही घेतला