Skip to main content

कविता

मैत्रीण ....... !!!!

लेखक फिझा यांनी सोमवार, 10/10/2016 10:38 या दिवशी प्रकाशित केले.
मैत्रीण ....... !!!! माझ्याकडे दिवस डोक्यावर असताना तु चांदणे पाहत असतेस कदाचित , तुझ्या नि माझ्या देशातले ऋतूही सारखेच आहेत म्हणे .... ऋतूंबरोबर मैत्री बदलत नाही .... ती तिचा ओलावा कायम ठेवते, हे किती बरंय नाही ? कुठलातरी ढग कधीतरी गच्च भरलेला इथे माझ्या अंगणात येऊन बरसतो रापलेल्या इथल्या तृणांमधून तो, वाट काढत काढत दिशाहीन वाहत राहतो ....... 'तो 'ढग तुझा होता; ते मला कळत नाही, हे किती बरंय नाही ?

मोल...

लेखक राजेंद्र देवी यांनी सोमवार, 10/10/2016 09:00 या दिवशी प्रकाशित केले.
मोल... या दुनियेत कोणी कोणाचा नाही जो तो पैशात तोलुनी पाही नव्हता मजकडे पैसा जो आजपण नाही म्हणून तर आजपण कोणी मला ओळखत नाही सारी नाती गोती बेताची ठेवून अंतरे वितांची गळाभेट तर नाहीच नाही साधी विचारपूस पण नाही या दुनियेत कोणी कोणाचा नाही मी पैशाचा वा पैसा माझा नाही राहतील फक्त शब्द माझे त्याला काही मोल नाही राजेंद्र देवी

!! स्त्री !!

लेखक कवि मानव यांनी रविवार, 09/10/2016 23:00 या दिवशी प्रकाशित केले.
केली कल्पना स्त्री विना जगताची, आदराने शिष झुके. निसर्गाची मोठी किमया, ती नसती तर संसार मुके, घेउनी बीज तिज पोटाशी, नेण्या मानवतेचे वेल पुढे, स्त्री न असती या पृथ्वीवर, सकल अस्तित्वाचा प्रश्न पडे ?
काव्यरस

सहजच

लेखक रातराणी यांनी रविवार, 09/10/2016 18:29 या दिवशी प्रकाशित केले.
आळसावलेल्या एका सकाळी तू म्हणाव चल फिरून येऊ कुठे कस काही न सांगता घेऊन यावस मग समुद्रकिनारी मी विचाराव, "का रे, आज एवढ्या लांब?" तू म्हणाव, "सहजच, गंमत आपली" सूर्य पाण्यात पोहू लागेपर्यंत पडून राहाव गरम वाळुत सूर्यास्ताला जाव गार पाण्यात हलकेच उलगडावी तू माझी वेणी मी म्हणाव, "काय रे? केस विस्कटतील" तू म्हणाव, "असू देत असेच सहजच " बोचर्या थंडीची पर्वा न करता ओल्या वाळुत उमटवाव्यात पाउलखुणा अंधार पांघरुन मग मोजत बसाव्या आकाशभर चमचमणाऱ्या चांदण्या मी हळूच ओठ टेकवावे तुझ्या गालांवर तू विचाराव, "अरे वा, आज काय विशेष?" मी म्हणाव, "काही नाही, सहजच"

मी स्त्रीशक्ती

लेखक माहीराज यांनी शुक्रवार, 07/10/2016 21:55 या दिवशी प्रकाशित केले.
बरोबरीने तुझीया आले, तुझ्याहून ही नाव जाहले, काय कमी रे माझ्या ठायी जे मी लढण्या आधीच हरले ... नऊ मास मी त्रास सोसुनी जन्म जरी हा तुजला देते, तरी पुन्हा हे भ्रुणहत्येचे पाप माझ्याच माथी येते. ... तुच अपुरा माझ्यावाचुन साथ तुला शतजन्मी देते, मान्य तुला ना सत्य हे सारे म्हणून भोग हे निमित्त ठरते ...   जाणुन घे रे किंमत माझी तुला न ठावे हिम्मत माझी  शांत ज्योतीसम ही जळणारी आग अंतरी शतजन्माची ...
काव्यरस

ती माझी होती

लेखक दिनु गवळी यांनी शुक्रवार, 07/10/2016 20:35 या दिवशी प्रकाशित केले.
ती मला खुप आवडायची कधी कधी खुप रडवायची तिचा हसरा चेहरा आणि डोळ्यातील काजळ मला नेहमी वेड करायचे ती खरचं एक परी होती, की आकाशातील पहाटेची शुक्राची चांदणी, काय होती ती , की अस म्हणु काय नव्हती ती शब्दच नाहीत...!! पण कधीकधी आपोआप या मनातुन शब्द ओठांवर येतात... ती माझी होती... माझी आहे... माझीच राहिल... स्वप्नांच्या ही पलिकडे तिच्यासाठी एक जादुचा बगीचा मी बनविला होता.... ती खुश रहावी म्हणुन त्या बगीच्यात पारिजातक वृक्ष लावला होता.... ती दिसायची जणु मत्स्यकन्याच.. म्हणुन बगीच्यात होता सोनेरी चंदेरी तलाव ... सोनेरी राजहंस तर होतेच तिथे.. सुंदर जलपऱ्या पण रहायच्या.. स्वर्गात पण नसेल अस अमृतकमळ

बासरी....

लेखक राजेंद्र देवी यांनी शुक्रवार, 07/10/2016 08:31 या दिवशी प्रकाशित केले.
बासरी.... मनमंदिरी वाजू लागली बासरी मनमोहना लागली तुझीच आस रत्नजडितं मुगुट त्यावर खोचलेले मोरपिसं घननीळा लागला तुझाच ध्यास कुंजवनी घुमू लागला पावा कृष्णा करिते तुझाच रे धावा हंबरती धेनू ऐकून तुझी वेणू वेड लावलेस या राधेला जणू शामल मूर्ती कमरेस खोचली मुरली पाहून आता ना जीवनाची आस उरली राजेंद्र देवी

नवलाई...

लेखक राजेंद्र देवी यांनी गुरुवार, 06/10/2016 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
नवलाई... ही सवय तुझी का मला माहीत नाही? उशीरा येऊन लवकर जाण्याची घाई अंमळ थांब जराशी मन अजून भरले नाही नभी चंद्रमा झुलतो, अजून रात सरली नाही गाली फुलतो गुलाब त्यावर चंद्रकिरणांची झिलई तुझ्या लडिवाळं बोलण्याची रोज वाटते अपूर्वाई आपण दोघे जागे जग शांत झोपले पांघरून स्वप्नांची दुलई जागेपणी पाहतो आहे आपण उद्याच्या स्वप्नांची नवलाई राजेंद्र देवी

निरोप

लेखक परिधी यांनी गुरुवार, 06/10/2016 07:07 या दिवशी प्रकाशित केले.
बसल्या बसल्या सहज डोळे भरून येतात तुझ्या माझ्या आठवणी पिंगा घालु लागतात तस सांगण्यासारख फारस काही नव्हतंच एकदा फ़क्त "तू बोल" एवढं तरी म्हणायच इंजेक्षनच्या आधी गार गार अल्कहॉलने पुसाव मग सुईने शांतपणे आरपार टोचत टोचत जाव चंद्राच्या शीतल सहवासात तशीच बेसावध चांदणी विरहाची अबोल वेदना हळूहळू होत जाते जीवघेणी खंत याची नाही की वेगळ्या झाल्या वाटा कधी न कधी हात हातातुन सुटनार च होता एकच टोचनी लागून राहिली आहे तरी मनाला डोळ्यात डोळे घालून एकदा निरोपही नाही घेतला

!! यश !!

लेखक कवि मानव यांनी बुधवार, 05/10/2016 14:04 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येकाला जीवनात यशाची घाई असते, यशाचीही चव भलतीच न्यारी असते, ज्याने ती चाखली ती धन्य होतो, जो वंचित राहिला बिचारा तो "अन्य" होतो !! पण यशाच्या अंगी कुठलाही भेद नाही, धर्म, पंत, जात, लहान, थोर नाही, मनगटात बळ आणि मनात जिद्द असेल तर, जगाला काबीज करणेही अशक्य नाही !! तशीच यशाची एक दुसरीही बाजू असते, ती तुम्हाला दुस्य्रांच्या ईर्षेच्या यादीत जोडते, तुम्ही लाख स्वता बरोबर स्पर्धा करत असला तरी, बाकी जग नेहमीच तुम्हाला प्रतियोगी म्हणून ओळखते !! मित्रानो यशाचा असं कुठलंच सूत्र नाही, मेहनत, बुद्धिमत्ता, निष्ठा यांना कुठलाही विकल्प नाही, यश नाही मिळणार म्हणून जो प्रयत्न करणे सोडतो, तो कधीच यशाच्य