सय संद्याकाय

लेखनविषय:
झाली सय संद्याकाय दिवे लाव्याचा वखतं वाट पायता राघुची तोंड चाललं सोकतं डोये फाळूनं फाळूनं काय वाटी नं पायतं धंदा पळला घरात जीव काहाले जायतं? चिळ्या रायल्या भऱ्याच्या झाला किती वारखोळं राघू साठी मैना तूहं कुठी अळलं व घोळं? अशी तिसऱ्या पायरी बस्तं धरूनं ऊंबठा तोही झिंजते घासूनं तूह्या पायाचा आंगठा

जुन्या मराठी कविता

लेखनविषय:
साधारणतः १९४० च्या दरम्यान लहान मुलांच्या कवितांपैकी एक कविता हवी आहे. पहिल्या काही ओळी वा वा चेंडू हा, सुंदर कितीतरी खचित हा चल तो आपण घेऊनिया, सगळे मिळून खेळू या! ही कविता पुर्ण हवी आहे.

माणुसकी

लेखनविषय:
काव्यरस
ब्लॉग दुवा आज एका अंध माणसाचा हात धरून त्याला बस स्टॉपपर्यंत जायला मदत केली, बसमधे बसवून दिलं. हे सांगणं खरंच आवडलं नाही पण सांगितल्याशिवाय राहवलं नाही तोच तो प्रवाह तोच तो जमाव आयुष्य नावाचा धावता बनाव त्यात एक काठी माझ्या बाजूने वाट शोधत चालत होती वाटेवरची अवघी गर्दी काठीला त्या टाळत होती 'टक टक' काठीच्या त्या आवाजाची राखण होती 'काय मंदासारखे चालतात लोक' ही अनेकांची अडचण होती 'कुठे जायचंय काका?' आपसुक प्रश्न केला मी 'प्लाझा' म्हणाले आणि त्यांचा लगेच हात धरला मी गेलेही असते आपले आपण, त्यांना नव्हती भीड त्याची

अंतरे

लेखनविषय:
काव्यरस
कधी उमलत्या फुलांची उडून गेली अत्तरे, सोबतीच्या क्षणांची कशी झाली एवढी अंतरे? प्रश्न करून पोरके का निघून गेली उत्तरे, घेतला निरोप ज्या ठिकाणी, का सुन्न तिथले सारे? तू जाता सांग का आठवणींचे मृगजळ पाझरे वेचले जिथे मोती, का उद्विग्न आज ते किनारे? तुझ्या येण्याने कधीकाळी बहरली जी शहरे, परतून तू जाता घरी,का अनोळखी वाटते मला सारे?

भिकारी

लेखनविषय:
असे एक वेडा तिथे तो भिकारी भुकेच्या आकांती जगाला पुकारी तमा न तयाला उन्हा-पावसाची दिसे भुक डोळी किती त्या दिसाची नसे आप्त कोणी तया पामराला जीवा साथ द्याया कुणी न घराला थकुनी कधीचा फिरे तो अभागी कुठे श्वान वेडे तयापाठी लागी अधु पाय त्याचा अधु लोचनेही नसे त्राण त्याच्या जराजीर्ण देही करुणा जगाची कुठे आज गेली दशा मानवाची खुलेआम झाली दिले हाकलोनी जया अन्न मागी अखेरी उपाशी बसे एक जागी आगीने भुकेच्या जणु अर्धमेला म्हणे तुच देवा पाहा लेकराला किती लोक आले किती लोक गेले तया पाहताही किती थेट गेले कुणी एक आला दिली त्यास नाणी दुवा देई त्याला अधु त्या हातानी असे वंचिताचे कि ते संचिताचे जिणे हे नश

वास्तव

लेखनविषय:
काव्यरस
पोचले कोणी तिथे स्पर्शून ते चंद्रास आले उंबऱ्याने बांधलेले शेकडोंनी 'चंद्र' येथे ... झुंजले काळासवे ते मृत्यूसही जिंकून गेले 'मी'पणाने जिंकलेले शेकडोंनी 'इंद्र' येथे ... जोखडाचे हार आम्ही माळलेले मस्तकावर कस्पटासम देह तरीही वाटते भीती जराशी आरश्याची मृगजळेही पाडती मोहात जिवा ना इथे पर्वा जगाची, झुंज माझी 'आतल्याशी' माणसा रे माणसा, जाणून घे नियती स्वतःची जात-धर्म, प्रांत-भाषा हीच परिमाणे जगाची माणसाची जात कोणा ओळखू ना ये कधीही मान टेकावी जिथे ती असे पोळी सुळाची विशाल...

!! रात्र जिवलग सखी जाहली !!

लेखनविषय:
काव्यरस
शांत गूढ रात्र उशाशी, नील व्याप्त गगन छताशी, नेत्र टिपत असे नक्षत्रे तेव्हा, झुळूक देत असे त्रास जराशी !! रातराणीचा स्वैर विहार, सुगंध दरवळे मज श्वासाशी, मोहक वारे बिलगून अंगी, खळी पडत असे मज गालाशी !! राहिले बरेच तसेच तिथेच, येऊन थांबले बहू ओठांशी, माझ्या मनातले अबोल गाणे, थेट भिडत असे उंच नभाशी !! रात्र जिवलग सखी जाहली, दडून बसली माझ्या उराशी, उजेड मारी सुरुंग प्रभाती, ------(सकाळचा प्रहार) पण त्यासही मिळे ना ती तळाशी !! ---- ( ती म्हणजे रात्र , मनाच्या तळाशी)

पहाट धुके

लेखनविषय:
नमस्कार , माझं मिपावरील हे पहिलच लिखान आहे. आज पर्यंत फक्त एक मुकवाचक होतो. तर प्रथम थोडं कवितेबद्दल सांगतो. खरतर माझी ही चौथी कविता आहे. पहिल्या तीन कविता लिहलेले कागद हरवल्या नंतर मी एका वहीत कविता लिहायला सुरवात केली. काही दिवसाने ही वहीदेखील हरवली. पण मागच्या दोन महीण्याखाली जुनी पुस्तके चाळताना त्या गठ्ठ्या मधे ही वही सापडली. आणि खजिना सापडल्यासारखा आनंद झाला. आणि त्या कविता पोस्ट करू करू म्हणत आज मुहुर्त आला. हि कविता मी दहावीच्या वर्षाला असताना लिहली होती म्हणजे सहा वर्षापुर्वी. त्यावेळी कविता हा आमच्यासाठी नवीनच प्रांत होता. यमक जुळली की कविता तयार होते असाच आमचा समज होता.

कळले नाही

काव्यरस
कळले नाही कोठे चाललो मी.. तुझ्याच दारी जणु भुललो मी.. प्रेमात तुझ्या जरी पडलो परि.. अंतरी तुझ्या पार हरलो मी.. संपले दुवे सारे संपली आशा.. आभाळी कोठे धुंद विरलो मी.. आकांक्षा सार्या गेल्या उडूनी माझ्या.. स्वप्नात फक्त आता उरलो मी.. होतीस तेंव्हा तूच मनाची आस.. अजूनी का तुझ्यात अडलो मी?...

अंकुर

लेखनविषय:
सप्तसरुच्या काट्यामधुनी झरझर लागे पाझरु कृष्णवनीच्या खोडामागे चाले रे पाखरु घनान वारा भनान होई सप्तसुरांचे तरु सृष्टीचे हे सारमिलन रे अवचित अंबर झरु चकोर चांदणी नभात दिसता आम्ही रे बावरु टपटप चाले सावज ऐसे टपटप रे पाखरु उनाड गाई खळ्यात येत्या लागती हंबरु उत्थानाची सांजकृपाळी मोत्यांनी पांघरु अवखळ येती गंगामाई उधळे रे वासरु कृष्णकळ्यांच्या वेलीवरती जिंकू किंवा मरु
Subscribe to कविता