मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

छोटाच होता,काही कळायचं वय नव्हते.

कर्नलतपस्वी ·

खूपच खतरनाक लिहिला आहे कर्नल साहेब. श्राद्धाचा स्वयंपाक ही एक स्वतंत्र पाककलेतील कला आहे. पण दुर्दैवाने या सर्व पदार्थांना श्राद्धाचे लेबल चिकटल्यामुळे अन्यवेळीस कधीच केल्या जात नाही त्या गोष्टी. मला स्वतःला तांदळाची खीर, डाळीचे वडे हे दोन्हीही फार आवडते पण शेवटचे कधी खाल्लेले ते आठवतही नाही आता. कथा छान आहे. मात्र पालकांनी मुलाला मारल हे वाचून वाटले. मृत्यू अंत्येष्टी श्राद्ध इत्यादी सर्व धार्मिक संकल्पनातून तत्वज्ञान पूर्णपणे विस्मरणात गेले असल्यामुळे लोकांना ह्यातील गमक कळतच नाही असो. विषयांतर नको. लिहित रहा

विवेकपटाईत 15/09/2025 - 17:36
उत्तर भारतात तांदूळाची खीर केंव्हाही करतात. आम्ही श्राद्ध पक्षात आणि तिथी असेल त्या दिवशी ही म्हणजे वर्षातून चार पाच वेळा तरी खीर होतेच.

कथेचं वर्तुळ चांगलं पूर्ण झालंय, पण जे आईने केलं तेच मुलाने तरी नव्हतं करायला पाहिजे, पण राग आणि दुःखाच्या भरात कशीही वागतात माणसे.

धाड धाड वाचत शेवटपर्यंत आलो आणि शेवटच्या वाक्याला घशात आवंढा दाटला. बरेचदा बाहेरचा किवा दुसरा कुठला राग घरात मुलांवर निघतो पण पुढे काही वर्षांनी ते आठवले तरी नकोसे होते. असो. कथा आवडली.

तोच आता मोठा झालायं. आजही मला भेटतो. त्याच्या डोळ्यात एक प्रश्न चिन्ह आजही मला दिसते. त्याची आई लहानपणीच न कळत्या वयात गेली. कशी गेली,केव्हां गेली या बद्दल कुणीच काही सांगत नाही. त्याला जाणून घ्यायची खुप इच्छा आहे. लहानपणी मनावर विपरित परिणाम होईल म्हणून सांगीतले नाही,आता त्याच्याच मनाने आईची निर्माण केलेल्या प्रतिमेला धक्का लागू नये म्हणून कुणी सांगत नाही. प्रश्नाची पुनरावृत्ती एवढाच कथेचा गाभा आहे. सत्य अनुभव,मलाही बरेच दिवस सतावत होता. आज बाहेर पडला. सर्व वाचक ,प्रतिसादकांचे मनापासून आभार.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

प्रतिसादात लिहिलंय. दुर्दैवाने त्या गोष्टीचा साक्षीदार असल्याने तो माझ्या कडे आशेने बघतो पण न तो स्पष्ट विचारू शकतो न मी बोलू शकतो.

श्वेता२४ 16/09/2025 - 18:30
हळवी करणारी कथा.मी जेमतेम ८ वर्षाची होते. मलाही तांदळाची खीर व उडदाचे वडे खूप आवडतात. लहानपणी भर पंक्तीत मीहि मस्त झालेत ग आजी म्हणताच आई, आजी व मोठी बहीण खाउ की गिळु नजरेनं पाहत होत्या. मला काहीच कळेना. आजोबा शांतपणे म्हणाले...श्राद्धाच्या जेवणाला छान म्हणायचं नसतं. दु:खाचे जेवण असतं ते. माझी आई व तुझी पणजी देवाघरी गेली होती आज. मग काय झाले ते कळलं. ....असो. तुमचे लेखन वाचून वाटले...मी नशीबवान निघीले.. कुणी बदडलं नाही...काळ आला होता पण...

In reply to by श्वेता२४

खरे आहे. काही चांगल्या जुन्या परंपरा माणूस विसरत चाललाय. दुखवटा काढणे एक पद्धत आहे. चौदाव्याला ज्याने अंतिम संस्कार केला त्याला नवीन कपडे,पंचा,उपरणे देत आम्ही तुझ्या दुखात सहभागी आहोत अशी भावना व्यक्त केली जायची. लहान मुलांना कळत नसते. निरागस अबोध असतात. काहीही विचारतात. कालच माझी छोटी नात विचारत होती सावत्र म्हणजे काय?

In reply to by कर्नलतपस्वी

गवि 24/09/2025 - 09:21
नवीन कपडे,पंचा,उपरणे देत आम्ही तुझ्या दुखात सहभागी आहोत अशी भावना व्यक्त केली जायची.
हे सर्व, आणि भोजन बेत वगैरे या सर्वांचा उद्देश "आम्ही तुझ्या दुःखात सहभागी आहोत" याहीपेक्षा "आता नेहमीचे आयुष्य सुरू करा. कायम दुखवटा पाळत राहण्यात अर्थ नाही.." असा अधिक आहे. दुःखात सहभागी आहोत हे तर आहेच. पण पुढचे अधिक महत्वाचे.

कथा छान आहे, मला श्राद्ध वगैरेच्या ठिकाणी जेवायला आवडत नाही. दुखी वातावरन असते त्यात जेवायचे? पण लोक तिथेही आग्रह करतात, पळूनही जाता येत नाही आणी नकारही देता येत नाही. :(

In reply to by अमरेंद्र बाहुबली

इतर कुठल्याही वेळी गेला नाहीत तरी चालेल पण मरणदारी आणी तोरणदारी जरूर जावे.या पाठिमागे मोठा उद्देश आहे. दोन्ही ठिकाणी मानसिक, शारिरीक, भावनिक मदतीची गरज असते व समाजाचा एक घटक म्हणून व्यक्तीचे कर्तव्य समजले जायचे. आता आशी वेळ आली आहे की स्वताचे कलेवर स्वताच खांद्यावर अंत्यसंस्कारासाठी घेऊन जावे लागेल की काय वाटते...... इतका माणूस एकटा होत चाललाय. पटलं तर बघा. नऊशे लोकांच्या सोसायटीत जवळचे नातेवाईक सोडून नऊ लोक सुद्धा जमा होत नाहीत.

निनाद 17/09/2025 - 16:24
या जेवणाला दु:खाचे वातावरण असू नये असे आमच्या गुरूजींनी एकदा मला व्यवस्थित पणे समजावून दिले. त्या नंतर माझे गैरसमज दूर झाले. श्राद्धाच्या वेळी पितरे येतात आणि जेवणार्‍यांच्या रुपाने (अन्न) ग्रहण करतात आणि वासनेतून सुटतात यावेळी पितरे आपल्याला आशिर्वाद देतात. जसे देव महत्त्वाचे तशी पितरे पण महत्त्वाची आहेत. कोणत्याही वडिलांना आणि आजोबांना आपल्या मुला नातवाचे वाईट व्हावे असे वाटत नाही. आपल्या वंशाचा विस्तार व्हावा प्रगती व्हावी हीच भावना असते. त्यामुळे श्राद्धाच्या जेवणास नि:संकोचपणे आणि अगत्याने जावे. पितरां विषयी सुयोग्य भाव मनात आणावा त्यांना योग्य ती गति मिळावी यासाठी प्रार्थना करावी. त्यांचे आशिर्वाद मागावेत. आणि मनापासून जेवण करावे. त्यातच आपले आणि पितरांचे कल्याण आहे. आपल्या रुपाने कोण जेऊन जाईल हे आपल्याला माहित नसते. आपापल्या पूर्वजन्मीच्या कर्माच्या फलानुसार ते घडते. असे नसते ते तर आपल्या पुर्वाजांनी या परंपरा, विधी आणलेच नसते.

In reply to by निनाद

गामा पैलवान 20/09/2025 - 20:00
निनाद, तुमच्या या संदेशाशी शंभर टक्के सहमत आहे. माणूस मेला तरी तो पुढल्या लोकात जिवंतच असतो. पोराबाळांना बडवायचा फुकट राडा केला की पितर दु:खी होतात. पितर तृप्त होणारेत यांतच आनंद मानून श्राद्धाचे जेवण आनंदानेच करावे. आ.न., -गा.पै.

अतिशय संतुलित आणी व्यवहार्य प्रतिसाद. संस्कार,श्राद्ध इत्यादी समाज व्यवस्था होती काही प्रमाणात आजही आहे. संगणकाचे उद्योग, प्रशिक्षण वर्ग काढताना सुद्धा पुजा पाठ करूनच सुरुवात करतात. अनेक संतानी ,माउली,तुकोबाराय, एकनाथ, कबीरदास इत्यादींनी कर्मकांडावर ताशेरे ओढले असले तरी ते या पाठमागची मुळ भावनेचा आदरच करताना दिसले आहेत. उदाहरणार्थ, बाईल सवासिण आई । आपण पितरांचे ठायीं ॥१॥ थोर वेच जाला नष्टा । अवघ्या अपसव्य चेष्टा ॥ध्रु.॥ विषयांचे चरवणीं । केली आयुष्याची गाळणी ॥२॥ तुका म्हणे लंडा । नाहीं दया देव धोंडा ॥३॥ जित्या माय बापा न घालिती अन्न | मेल्या प्रेतावर करिती पिंडदान || पहा पहा संसाराचा कैसा आचारु | जिता अबोला मा मेल्या उच्चारू || जित्या मायबापा न करिती नमन | मेल्या मागे करिती मस्तक वपन || जित्या मायबापा धड गोड नाही | श्राद्धी तळण-मळण परवडी पाही || जिंदा बाप ना पुजे,मरे बाद पुजवाय मुठ्ठीभर चावल दे के कौवे को बाप बनवाय वरील संत वचने आजच्या समाज व्यवहारावर टिका केली आहे . काही विद्वान लोकांनी याचा वेगळाच अर्थ काढला. असो,कालाय तस्मै नमा:

In reply to by कर्नलतपस्वी

गामा पैलवान 20/09/2025 - 22:23
कर्नलतपस्वी,
काही विद्वान लोकांनी याचा वेगळाच अर्थ काढला.
सहमत आहे. यांतला काही म्हणजे कम्युनिस्ट. त्यांना श्राद्धविधी बंद पाडायचे आहेत. देवांच्या मूर्तींवरील मर्यादांचा उफराटा अर्थ सिख विकी वर आढळून येतो. संत नामदेव विठ्ठलाच्या मूर्तीस भावपूर्ण आळवायचे. त्यांच्या तोंडी बघा मूर्तीनिषिद्ध संवाद टाकलेत ( इंग्रजी दुवा ) : https://www.sikhiwiki.org/index.php/Bhagat_Namdev_and_Idol_Worship लगेच खाली गुरु ग्रंथसाहिब मधील अवतरण दिलं आहे. त्यात मूर्तीपूजेचा धिक्कार आजीबात केलेला दिसंत नाही. दैवी वचनांचा विपरीत अर्थ काढणे हा घोर अधर्म आहे. आ.न., -गा.पै.

सुबोध खरे 23/09/2025 - 11:33
श्राद्ध म्हणजे ज्या व्यक्ती बद्दल आपल्याला प्रेम होतं त्या व्यक्तीची श्रद्धेने आठवण काढणे. हा समारंभ दुःखाचा का समजतात हे समजले नाही. उलट दहाव्याला किंवा तेराव्याला गोडाचे जेवण केले जाते याचा मूळ हेतू आता दुःख बाजूला ठेवून व्यवहाराला सुरवात करा आयुष्य हा एक सण आहे आणि आता तोंड गोड करून हा सण साजरा करा असे धर्मशास्त्र सांगते. मृत्यू हे अटळ सत्य आहे. दोन दिवसापूर्वी माझा मामा (वय वर्षे ८७) निवर्तला. पण गेले वर्षभर तो अन्थरुणावर बेशुद्धावस्थेत खिळून होता. आता केवळ अस्तित्व संपले म्हणून तुम्हाला दुःख होणे हे साहजिक आहे परंतु हे दुःख किती कुरवाळत बसायचे ? तो गेला म्हणजे त्याचा प्राण मुक्त झाला म्हणून आनंद का करू नये? बहुसंख्य वेळेस लोक काय म्हणतील याचा विचार करून दुःखाचा बाजार मांडला जातो. पंजाबात "चौथ"करतात म्हणजे चौथ्या दिवशी सर्व जण गोडाचे जेवण करून व्यवहाराला लागतात. त्यात काही चूक आहे असे मला वाटत नाही. माझे वडील ८६ व्या वर्षी मेंदूत रक्तस्त्रावाने गेले. उत्तम स्थितीत असलेला मेंदू एक तासात निकामी झाला नि सहा दिवसात सर्व उपचार करूनही सर्व संपले. लोकांच्या दृष्टीने ८६ वय होते म्हणजे गेले ते ठीक आहे. आपण आमच्या दृष्टीने आयुष्यभराचा आधार गेला पोरके झाल्याची भावना आली. हे लोकांना कसे आणि काय समजणार? अकाली निधन झाले तर अत्यंत जवळच्या माणसांना होणारे दुःख सुद्धा त्यांचे स्वतःचे असते. जरा लांबची माणसे सुद्धा हळहळ व्यक्त करून काम सुरु करतात मग दुःख कुरवाळत बसून राहणे हे कशासाठी?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

आबा, अंतिम संस्कार हा प्रत्येक धर्मात प्रतिपादन केलेला आहे. प्रत्येक जण आपापल्या धर्मशास्त्रानुसार हे कार्य करतात. हिन्दू धर्मशास्त्रानुसार गरूड पुराण व इतर धर्मग्रंथात याचे सविस्तर वर्णन लिहून ठेवले आहे. कर्मकांडावर शास्त्रीय आधार कदाचित नसेल पण भावनिक नक्कीच आहे.

चित्रगुप्त 24/09/2025 - 08:09
मी अनेकांचे मृत्यू बघितलेले आहेत. त्यापैकी अगदी सगळ्यात दोन-तीन दिवसातच बायको/नवरा/ मुले/ नातेवाईक/ मित्र वगैरे अगदी 'नॉर्मल' झालेले आहेत. कुणी भेटायला आले की तेवढ्यापुरता उमाळा येतो. आतल्या खोलीत गेल्यावर तो लगेच ओसरतो, आणि हे सगळे अगदी नैसर्गिक आणि आवश्यकच आहे. वर्षश्राद्ध वगैरे तर खूप काळानंतर होत असते. हिंदु संस्कृतीत प्रत्येक घटनेला 'उत्सव' म्हणून साजरा करण्याची परंपरा खूपच चांगली आहे. प्रसंग कोणताही असो, 'आग्रहाने' जेवायला घालणे, यात जो जिव्हाळा असतो, तो बुफे मधे गर्दीत घुसून आपले आपणच डिशमधे घ्यायचे, गर्दीत कुठेतरी उभ्या उभ्या जेवायचे आणि निघून जायचे, यात मला तरी अजिबात अनुभवाला येत नाही.

वेळ आणी विस्मरण हे बहुतेक दुखांवरचे रामबाण उपाय आहे. मृत्यूनंतर आयुष्य पूर्वपदावर येणे ही जगरहाटी. परंतू असामायीक मृत्यू हा सर्वात जास्त दु:खद व बराच काळ स्मरणात रहाते. विशाल प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

रामकृष्ण ही आले गेले त्याविना जग काय ओसची पडले? कुणी सदोदीत सूतक धरीले ? मग काय अटकले मज शिवाय? जन पळभर म्हणतील हायहाय मी जाता राहील कार्य काय?

खूपच खतरनाक लिहिला आहे कर्नल साहेब. श्राद्धाचा स्वयंपाक ही एक स्वतंत्र पाककलेतील कला आहे. पण दुर्दैवाने या सर्व पदार्थांना श्राद्धाचे लेबल चिकटल्यामुळे अन्यवेळीस कधीच केल्या जात नाही त्या गोष्टी. मला स्वतःला तांदळाची खीर, डाळीचे वडे हे दोन्हीही फार आवडते पण शेवटचे कधी खाल्लेले ते आठवतही नाही आता. कथा छान आहे. मात्र पालकांनी मुलाला मारल हे वाचून वाटले. मृत्यू अंत्येष्टी श्राद्ध इत्यादी सर्व धार्मिक संकल्पनातून तत्वज्ञान पूर्णपणे विस्मरणात गेले असल्यामुळे लोकांना ह्यातील गमक कळतच नाही असो. विषयांतर नको. लिहित रहा

विवेकपटाईत 15/09/2025 - 17:36
उत्तर भारतात तांदूळाची खीर केंव्हाही करतात. आम्ही श्राद्ध पक्षात आणि तिथी असेल त्या दिवशी ही म्हणजे वर्षातून चार पाच वेळा तरी खीर होतेच.

कथेचं वर्तुळ चांगलं पूर्ण झालंय, पण जे आईने केलं तेच मुलाने तरी नव्हतं करायला पाहिजे, पण राग आणि दुःखाच्या भरात कशीही वागतात माणसे.

धाड धाड वाचत शेवटपर्यंत आलो आणि शेवटच्या वाक्याला घशात आवंढा दाटला. बरेचदा बाहेरचा किवा दुसरा कुठला राग घरात मुलांवर निघतो पण पुढे काही वर्षांनी ते आठवले तरी नकोसे होते. असो. कथा आवडली.

तोच आता मोठा झालायं. आजही मला भेटतो. त्याच्या डोळ्यात एक प्रश्न चिन्ह आजही मला दिसते. त्याची आई लहानपणीच न कळत्या वयात गेली. कशी गेली,केव्हां गेली या बद्दल कुणीच काही सांगत नाही. त्याला जाणून घ्यायची खुप इच्छा आहे. लहानपणी मनावर विपरित परिणाम होईल म्हणून सांगीतले नाही,आता त्याच्याच मनाने आईची निर्माण केलेल्या प्रतिमेला धक्का लागू नये म्हणून कुणी सांगत नाही. प्रश्नाची पुनरावृत्ती एवढाच कथेचा गाभा आहे. सत्य अनुभव,मलाही बरेच दिवस सतावत होता. आज बाहेर पडला. सर्व वाचक ,प्रतिसादकांचे मनापासून आभार.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

प्रतिसादात लिहिलंय. दुर्दैवाने त्या गोष्टीचा साक्षीदार असल्याने तो माझ्या कडे आशेने बघतो पण न तो स्पष्ट विचारू शकतो न मी बोलू शकतो.

श्वेता२४ 16/09/2025 - 18:30
हळवी करणारी कथा.मी जेमतेम ८ वर्षाची होते. मलाही तांदळाची खीर व उडदाचे वडे खूप आवडतात. लहानपणी भर पंक्तीत मीहि मस्त झालेत ग आजी म्हणताच आई, आजी व मोठी बहीण खाउ की गिळु नजरेनं पाहत होत्या. मला काहीच कळेना. आजोबा शांतपणे म्हणाले...श्राद्धाच्या जेवणाला छान म्हणायचं नसतं. दु:खाचे जेवण असतं ते. माझी आई व तुझी पणजी देवाघरी गेली होती आज. मग काय झाले ते कळलं. ....असो. तुमचे लेखन वाचून वाटले...मी नशीबवान निघीले.. कुणी बदडलं नाही...काळ आला होता पण...

In reply to by श्वेता२४

खरे आहे. काही चांगल्या जुन्या परंपरा माणूस विसरत चाललाय. दुखवटा काढणे एक पद्धत आहे. चौदाव्याला ज्याने अंतिम संस्कार केला त्याला नवीन कपडे,पंचा,उपरणे देत आम्ही तुझ्या दुखात सहभागी आहोत अशी भावना व्यक्त केली जायची. लहान मुलांना कळत नसते. निरागस अबोध असतात. काहीही विचारतात. कालच माझी छोटी नात विचारत होती सावत्र म्हणजे काय?

In reply to by कर्नलतपस्वी

गवि 24/09/2025 - 09:21
नवीन कपडे,पंचा,उपरणे देत आम्ही तुझ्या दुखात सहभागी आहोत अशी भावना व्यक्त केली जायची.
हे सर्व, आणि भोजन बेत वगैरे या सर्वांचा उद्देश "आम्ही तुझ्या दुःखात सहभागी आहोत" याहीपेक्षा "आता नेहमीचे आयुष्य सुरू करा. कायम दुखवटा पाळत राहण्यात अर्थ नाही.." असा अधिक आहे. दुःखात सहभागी आहोत हे तर आहेच. पण पुढचे अधिक महत्वाचे.

कथा छान आहे, मला श्राद्ध वगैरेच्या ठिकाणी जेवायला आवडत नाही. दुखी वातावरन असते त्यात जेवायचे? पण लोक तिथेही आग्रह करतात, पळूनही जाता येत नाही आणी नकारही देता येत नाही. :(

In reply to by अमरेंद्र बाहुबली

इतर कुठल्याही वेळी गेला नाहीत तरी चालेल पण मरणदारी आणी तोरणदारी जरूर जावे.या पाठिमागे मोठा उद्देश आहे. दोन्ही ठिकाणी मानसिक, शारिरीक, भावनिक मदतीची गरज असते व समाजाचा एक घटक म्हणून व्यक्तीचे कर्तव्य समजले जायचे. आता आशी वेळ आली आहे की स्वताचे कलेवर स्वताच खांद्यावर अंत्यसंस्कारासाठी घेऊन जावे लागेल की काय वाटते...... इतका माणूस एकटा होत चाललाय. पटलं तर बघा. नऊशे लोकांच्या सोसायटीत जवळचे नातेवाईक सोडून नऊ लोक सुद्धा जमा होत नाहीत.

निनाद 17/09/2025 - 16:24
या जेवणाला दु:खाचे वातावरण असू नये असे आमच्या गुरूजींनी एकदा मला व्यवस्थित पणे समजावून दिले. त्या नंतर माझे गैरसमज दूर झाले. श्राद्धाच्या वेळी पितरे येतात आणि जेवणार्‍यांच्या रुपाने (अन्न) ग्रहण करतात आणि वासनेतून सुटतात यावेळी पितरे आपल्याला आशिर्वाद देतात. जसे देव महत्त्वाचे तशी पितरे पण महत्त्वाची आहेत. कोणत्याही वडिलांना आणि आजोबांना आपल्या मुला नातवाचे वाईट व्हावे असे वाटत नाही. आपल्या वंशाचा विस्तार व्हावा प्रगती व्हावी हीच भावना असते. त्यामुळे श्राद्धाच्या जेवणास नि:संकोचपणे आणि अगत्याने जावे. पितरां विषयी सुयोग्य भाव मनात आणावा त्यांना योग्य ती गति मिळावी यासाठी प्रार्थना करावी. त्यांचे आशिर्वाद मागावेत. आणि मनापासून जेवण करावे. त्यातच आपले आणि पितरांचे कल्याण आहे. आपल्या रुपाने कोण जेऊन जाईल हे आपल्याला माहित नसते. आपापल्या पूर्वजन्मीच्या कर्माच्या फलानुसार ते घडते. असे नसते ते तर आपल्या पुर्वाजांनी या परंपरा, विधी आणलेच नसते.

In reply to by निनाद

गामा पैलवान 20/09/2025 - 20:00
निनाद, तुमच्या या संदेशाशी शंभर टक्के सहमत आहे. माणूस मेला तरी तो पुढल्या लोकात जिवंतच असतो. पोराबाळांना बडवायचा फुकट राडा केला की पितर दु:खी होतात. पितर तृप्त होणारेत यांतच आनंद मानून श्राद्धाचे जेवण आनंदानेच करावे. आ.न., -गा.पै.

अतिशय संतुलित आणी व्यवहार्य प्रतिसाद. संस्कार,श्राद्ध इत्यादी समाज व्यवस्था होती काही प्रमाणात आजही आहे. संगणकाचे उद्योग, प्रशिक्षण वर्ग काढताना सुद्धा पुजा पाठ करूनच सुरुवात करतात. अनेक संतानी ,माउली,तुकोबाराय, एकनाथ, कबीरदास इत्यादींनी कर्मकांडावर ताशेरे ओढले असले तरी ते या पाठमागची मुळ भावनेचा आदरच करताना दिसले आहेत. उदाहरणार्थ, बाईल सवासिण आई । आपण पितरांचे ठायीं ॥१॥ थोर वेच जाला नष्टा । अवघ्या अपसव्य चेष्टा ॥ध्रु.॥ विषयांचे चरवणीं । केली आयुष्याची गाळणी ॥२॥ तुका म्हणे लंडा । नाहीं दया देव धोंडा ॥३॥ जित्या माय बापा न घालिती अन्न | मेल्या प्रेतावर करिती पिंडदान || पहा पहा संसाराचा कैसा आचारु | जिता अबोला मा मेल्या उच्चारू || जित्या मायबापा न करिती नमन | मेल्या मागे करिती मस्तक वपन || जित्या मायबापा धड गोड नाही | श्राद्धी तळण-मळण परवडी पाही || जिंदा बाप ना पुजे,मरे बाद पुजवाय मुठ्ठीभर चावल दे के कौवे को बाप बनवाय वरील संत वचने आजच्या समाज व्यवहारावर टिका केली आहे . काही विद्वान लोकांनी याचा वेगळाच अर्थ काढला. असो,कालाय तस्मै नमा:

In reply to by कर्नलतपस्वी

गामा पैलवान 20/09/2025 - 22:23
कर्नलतपस्वी,
काही विद्वान लोकांनी याचा वेगळाच अर्थ काढला.
सहमत आहे. यांतला काही म्हणजे कम्युनिस्ट. त्यांना श्राद्धविधी बंद पाडायचे आहेत. देवांच्या मूर्तींवरील मर्यादांचा उफराटा अर्थ सिख विकी वर आढळून येतो. संत नामदेव विठ्ठलाच्या मूर्तीस भावपूर्ण आळवायचे. त्यांच्या तोंडी बघा मूर्तीनिषिद्ध संवाद टाकलेत ( इंग्रजी दुवा ) : https://www.sikhiwiki.org/index.php/Bhagat_Namdev_and_Idol_Worship लगेच खाली गुरु ग्रंथसाहिब मधील अवतरण दिलं आहे. त्यात मूर्तीपूजेचा धिक्कार आजीबात केलेला दिसंत नाही. दैवी वचनांचा विपरीत अर्थ काढणे हा घोर अधर्म आहे. आ.न., -गा.पै.

सुबोध खरे 23/09/2025 - 11:33
श्राद्ध म्हणजे ज्या व्यक्ती बद्दल आपल्याला प्रेम होतं त्या व्यक्तीची श्रद्धेने आठवण काढणे. हा समारंभ दुःखाचा का समजतात हे समजले नाही. उलट दहाव्याला किंवा तेराव्याला गोडाचे जेवण केले जाते याचा मूळ हेतू आता दुःख बाजूला ठेवून व्यवहाराला सुरवात करा आयुष्य हा एक सण आहे आणि आता तोंड गोड करून हा सण साजरा करा असे धर्मशास्त्र सांगते. मृत्यू हे अटळ सत्य आहे. दोन दिवसापूर्वी माझा मामा (वय वर्षे ८७) निवर्तला. पण गेले वर्षभर तो अन्थरुणावर बेशुद्धावस्थेत खिळून होता. आता केवळ अस्तित्व संपले म्हणून तुम्हाला दुःख होणे हे साहजिक आहे परंतु हे दुःख किती कुरवाळत बसायचे ? तो गेला म्हणजे त्याचा प्राण मुक्त झाला म्हणून आनंद का करू नये? बहुसंख्य वेळेस लोक काय म्हणतील याचा विचार करून दुःखाचा बाजार मांडला जातो. पंजाबात "चौथ"करतात म्हणजे चौथ्या दिवशी सर्व जण गोडाचे जेवण करून व्यवहाराला लागतात. त्यात काही चूक आहे असे मला वाटत नाही. माझे वडील ८६ व्या वर्षी मेंदूत रक्तस्त्रावाने गेले. उत्तम स्थितीत असलेला मेंदू एक तासात निकामी झाला नि सहा दिवसात सर्व उपचार करूनही सर्व संपले. लोकांच्या दृष्टीने ८६ वय होते म्हणजे गेले ते ठीक आहे. आपण आमच्या दृष्टीने आयुष्यभराचा आधार गेला पोरके झाल्याची भावना आली. हे लोकांना कसे आणि काय समजणार? अकाली निधन झाले तर अत्यंत जवळच्या माणसांना होणारे दुःख सुद्धा त्यांचे स्वतःचे असते. जरा लांबची माणसे सुद्धा हळहळ व्यक्त करून काम सुरु करतात मग दुःख कुरवाळत बसून राहणे हे कशासाठी?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

आबा, अंतिम संस्कार हा प्रत्येक धर्मात प्रतिपादन केलेला आहे. प्रत्येक जण आपापल्या धर्मशास्त्रानुसार हे कार्य करतात. हिन्दू धर्मशास्त्रानुसार गरूड पुराण व इतर धर्मग्रंथात याचे सविस्तर वर्णन लिहून ठेवले आहे. कर्मकांडावर शास्त्रीय आधार कदाचित नसेल पण भावनिक नक्कीच आहे.

चित्रगुप्त 24/09/2025 - 08:09
मी अनेकांचे मृत्यू बघितलेले आहेत. त्यापैकी अगदी सगळ्यात दोन-तीन दिवसातच बायको/नवरा/ मुले/ नातेवाईक/ मित्र वगैरे अगदी 'नॉर्मल' झालेले आहेत. कुणी भेटायला आले की तेवढ्यापुरता उमाळा येतो. आतल्या खोलीत गेल्यावर तो लगेच ओसरतो, आणि हे सगळे अगदी नैसर्गिक आणि आवश्यकच आहे. वर्षश्राद्ध वगैरे तर खूप काळानंतर होत असते. हिंदु संस्कृतीत प्रत्येक घटनेला 'उत्सव' म्हणून साजरा करण्याची परंपरा खूपच चांगली आहे. प्रसंग कोणताही असो, 'आग्रहाने' जेवायला घालणे, यात जो जिव्हाळा असतो, तो बुफे मधे गर्दीत घुसून आपले आपणच डिशमधे घ्यायचे, गर्दीत कुठेतरी उभ्या उभ्या जेवायचे आणि निघून जायचे, यात मला तरी अजिबात अनुभवाला येत नाही.

वेळ आणी विस्मरण हे बहुतेक दुखांवरचे रामबाण उपाय आहे. मृत्यूनंतर आयुष्य पूर्वपदावर येणे ही जगरहाटी. परंतू असामायीक मृत्यू हा सर्वात जास्त दु:खद व बराच काळ स्मरणात रहाते. विशाल प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

रामकृष्ण ही आले गेले त्याविना जग काय ओसची पडले? कुणी सदोदीत सूतक धरीले ? मग काय अटकले मज शिवाय? जन पळभर म्हणतील हायहाय मी जाता राहील कार्य काय?
लेखनविषय:
लेखनप्रकार
छोटाच होता,काही कळायचं वय नव्हते. तो-आई,तांदळाची खीर कर ना! "हात मेल्या दळभद्री कुठला!" वडील दुसर्‍या गावी नोकरीवर होते.सुट्टीवर येताना रातराणीचा अपघात झाला. मोठा मुलगा म्हणून जे काही सांगितलं ते करत गेला. "बाई,आज आमच्या घरी चौदावा आहे,मी शाळेत येवू शकणार नाही". न सांगता घरी राहीला असता तरी कुणी काही म्हणले नसते. तांदळाची खीर वाढताना आईचा बांध फुटला. भर पंक्तीत त्याला बदडला. लहान होता तरी मोठे व्हावे लागले. उद्ध्वस्त घडी बसवायला अर्धे आयुष्य गेले. अचानक,म्हातारी आई गेली. तेरावा झाला,कोपर्‍यात बसून होता.

शिक्षा.....

विजुभाऊ ·

आवडली. आमचं लहानपण आठवले, लहानपण कशाला; अजूनही तसंच आहे. आईकडून कप फुटला की इथे कोणी ठेवला आणि आईने ठेवलेला कप इतरांकडून फुटला की नीट बघता येत नाही का तुम्हाला. :D

अभ्या.. 11/09/2025 - 18:49
विजूभाऊ सारख्या कसलेल्या लेखकाकडून इतकी प्रायमरी प्रतिलिपी स्टाइल भाबडी कथा अपेक्षित नाही. असो...

In reply to by अभ्या..

नाहितर काय? अतिशय दवनिय कथा आहे. वाचून सगळा मूड गेला आता एखादी मचाक वाचल्याशिवाय किंवा नग्नता- सवस्त्र आणि विवस्त्र धागा वाचल्याशिवाय मूड बनणार नाही. ;)

In reply to by अभ्या..

विजुभाऊ 12/09/2025 - 10:31
अरे बापरे.... अभ्या भाउ.... मनावर घेतो तुमचे म्हणणे. नक्की. एखादी झ्याक प्रेमकथा तळायला घेतो.

ही गोष्ट आमच्या काळातली होती. आजच्या काळात अशी पनिशमेंट द्यायला हवी. तू मला" डबल टाॅपिंग पिझ्झा,फ्रेंच फ्राईड आणी दोन तास एक्स्ट्रा स्क्रिन टाईम दे ", बादवे,हाताचे आंगठे का पायाचे?

पर्णिका 15/09/2025 - 08:41
छोटीशी गोष्ट आवडली. आपल्या मुलांकडून येणारे असे टँजेन्ट्स आपले अनुभवविश्व समृद्ध करतातच पण माणूस म्हणून घडवतातदेखील. मी लिहिन माझे काही अनुभव, इतरांचेही वाचायला आवडतील. :)

आवडली. आमचं लहानपण आठवले, लहानपण कशाला; अजूनही तसंच आहे. आईकडून कप फुटला की इथे कोणी ठेवला आणि आईने ठेवलेला कप इतरांकडून फुटला की नीट बघता येत नाही का तुम्हाला. :D

अभ्या.. 11/09/2025 - 18:49
विजूभाऊ सारख्या कसलेल्या लेखकाकडून इतकी प्रायमरी प्रतिलिपी स्टाइल भाबडी कथा अपेक्षित नाही. असो...

In reply to by अभ्या..

नाहितर काय? अतिशय दवनिय कथा आहे. वाचून सगळा मूड गेला आता एखादी मचाक वाचल्याशिवाय किंवा नग्नता- सवस्त्र आणि विवस्त्र धागा वाचल्याशिवाय मूड बनणार नाही. ;)

In reply to by अभ्या..

विजुभाऊ 12/09/2025 - 10:31
अरे बापरे.... अभ्या भाउ.... मनावर घेतो तुमचे म्हणणे. नक्की. एखादी झ्याक प्रेमकथा तळायला घेतो.

ही गोष्ट आमच्या काळातली होती. आजच्या काळात अशी पनिशमेंट द्यायला हवी. तू मला" डबल टाॅपिंग पिझ्झा,फ्रेंच फ्राईड आणी दोन तास एक्स्ट्रा स्क्रिन टाईम दे ", बादवे,हाताचे आंगठे का पायाचे?

पर्णिका 15/09/2025 - 08:41
छोटीशी गोष्ट आवडली. आपल्या मुलांकडून येणारे असे टँजेन्ट्स आपले अनुभवविश्व समृद्ध करतातच पण माणूस म्हणून घडवतातदेखील. मी लिहिन माझे काही अनुभव, इतरांचेही वाचायला आवडतील. :)
लेखनविषय:
लेखनप्रकार
टप्पी टप्पी टप्पी.... छोटा मन चेंडू खेळण्यात मग्न होता. खेळता खेळता त्याच्या हातून चेंडू निसटला आणि आईने कट्ट्यावर मांडून ठेवलेल्या काचेच्या कपला धडकला. कप खाली पडला आणि फुटला. सुमित्रा हे डोळ्याच्या कोपर्‍यातून पहात होती. तीला पहायचे होते की आता मन काय करतो. एक समजूतदार पालक म्हणून तीने यावर लगेच व्यक्त व्हायचे मुद्दामुनच टाळले. "मम्मा माझ्या कडून कप फुटला. मला शिक्षा सांग" . मनच्या वाक्याची सुमित्राला गम्मत वाटली. आणि मन खोटे बोलला नाही याचे बरेही वाटले. " कप फुटला ना मग शिक्षा ही हवीच.

संकेत

शेखर काळे ·

अभ्या.. 07/09/2025 - 12:29
वावावा, छत्रपती शिवाजी महाराज देवतुल्य होते, छत्रपती शिवाजी महाराज प्रत्यक्ष भगवान शिवाचा अवतार होते, छत्रपती शिवाजी महाराज स्वतःच शिव भगवान होते, आता, छत्रपती शिवाजी महाराज महादेवाचा अंश तर होतेच, पण एका टिनपाट फॅन्टसीमधल्या प्रोजेक्टमधले एक थर्ड (क्लास) पार्टीकडून रन होणारे ज्याचे सिम्युलेशन पण होते असे प्रोग्राम होते. बस्स करा यार. तुमच्या फॅन्टस्याना नका ना जोडू इतिहासाशी. त्या भरजरी महावस्त्रांना तुमच्या चिरकुटांची ठिगळे नका ना लाऊ. इतकीच कल्पनाशक्तीची भरारी आहे तर विशुध्द फॅन्टस्या लिहा.

अभ्या.. 07/09/2025 - 12:29
वावावा, छत्रपती शिवाजी महाराज देवतुल्य होते, छत्रपती शिवाजी महाराज प्रत्यक्ष भगवान शिवाचा अवतार होते, छत्रपती शिवाजी महाराज स्वतःच शिव भगवान होते, आता, छत्रपती शिवाजी महाराज महादेवाचा अंश तर होतेच, पण एका टिनपाट फॅन्टसीमधल्या प्रोजेक्टमधले एक थर्ड (क्लास) पार्टीकडून रन होणारे ज्याचे सिम्युलेशन पण होते असे प्रोग्राम होते. बस्स करा यार. तुमच्या फॅन्टस्याना नका ना जोडू इतिहासाशी. त्या भरजरी महावस्त्रांना तुमच्या चिरकुटांची ठिगळे नका ना लाऊ. इतकीच कल्पनाशक्तीची भरारी आहे तर विशुध्द फॅन्टस्या लिहा.
लेखनविषय:
लेखनप्रकार
सुकेतूचा हात मध्येच थांबला. त्याच्या स्क्रीनवर उजवीकडे खाली कोपऱ्या एक निळा गोलाकार ठिपका हळूहळू रंग बदलत होता. निळा रंगाचा ठिपका हळूहळू लाल होत होता सुकेतुचे डोळे मोठे झाले. त्याने आपल्या माऊसचा फोकस त्या लाल होणाऱ्या ठिपक्यावर केला. त्याबरोबर एक विंडो उघडली. त्या विंडोत वाक्य होते - मित्र संख्या २८ , वेळ उद्या सकाळी पहिली घटिका. सुकेतूने भराभर विंडो मधल्या इतर ओळी वाचायला सुरुवात केली. त्याचा श्वास वाढू लागला. त्याने कपाळावरचा घाम पुसला आणि म्हणाला, “ अरे या प्रोजेक्टची वेळ झालेली आहे”. बाजूलाच अंबुज बसला होता. तो म्हणाला, “ कसली वेळ?

इतिहास्यास्पद (३) स्वातंत्र्यदिनाचा व्याप (की ताप?)

कुमार जावडेकर ·

या काल्पनिक कथा आहेत, केवळ विनोदासाठी लिहिलेल्या. कुणाचाही अपमान करण्याचा हेतू नाही. दीर्घ खुलासा पहिल्या भागाखाली लिहिला आहे (त्याचा दुवा खाली देत आहे). काही चूक आढळल्यास कृपया क्षमस्व. - कुमार विनंती

या काल्पनिक कथा आहेत, केवळ विनोदासाठी लिहिलेल्या. कुणाचाही अपमान करण्याचा हेतू नाही. दीर्घ खुलासा पहिल्या भागाखाली लिहिला आहे (त्याचा दुवा खाली देत आहे). काही चूक आढळल्यास कृपया क्षमस्व. - कुमार विनंती
लेखनविषय:
लेखनप्रकार
भाग १: इतिहास्यास्पद (१) स्वातंत्र्यदिनाची कल्पना भाग २: इतिहास्यास्पद (२) स्वातंत्र्यदिनाची तयारी भाग ३: इतिहास्यास्पद (३) स्वातंत्र्यदिनाचा व्याप (की ताप?) पुरेसे प्रतिनिधी मिळाल्यावर कार्यक्रमाच्या तयारीसाठी गांधीजींनी सगळ्या व्याख्यात्यांची 'गोलमेज' परिषद आयोजित केली. मात्र यमसभेत मेज नसल्यामुळे ती नुसतीच 'गोल' परिषद झाली. त्यातून ‘परिषद’ ह्या शब्दाचा ज्या पक्षाशी संबंध असतो त्या पक्षाशी गांधीजींचा संबंध नसल्यामुळे त्यातून त्यांना मिळाला तो फक्त ‘गोल’! गांधीजींचा ‘ओन गोल’...

इतिहास्यास्पद (२) स्वातंत्र्यदिनाची तयारी

कुमार जावडेकर ·

या काल्पनिक कथा आहेत, केवळ विनोदासाठी लिहिलेल्या. कुणाचाही अपमान करण्याचा हेतू नाही. दीर्घ खुलासा पहिल्या भागाखाली लिहिला आहे (त्याचा दुवा खाली देत आहे). काही चूक आढळल्यास कृपया क्षमस्व. - कुमार विनंती / खुलासा

विजुभाऊ 14/08/2025 - 12:44
या काल्पनिक कथा आहेत, केवळ विनोदासाठी लिहिलेल्या.
पहिली गोष्ट मान्य आहे. पण दुसरी गोष्ट अमान्य. लिखाणात विनोद आढळला नाही.( सरकाष्टीक म्हणजे कुजकट पुणेरी की कसा म्हणतात तो देखील नाही) ही चूक कशी दुरूस्त करणार ते सांगा.

या काल्पनिक कथा आहेत, केवळ विनोदासाठी लिहिलेल्या. कुणाचाही अपमान करण्याचा हेतू नाही. दीर्घ खुलासा पहिल्या भागाखाली लिहिला आहे (त्याचा दुवा खाली देत आहे). काही चूक आढळल्यास कृपया क्षमस्व. - कुमार विनंती / खुलासा

विजुभाऊ 14/08/2025 - 12:44
या काल्पनिक कथा आहेत, केवळ विनोदासाठी लिहिलेल्या.
पहिली गोष्ट मान्य आहे. पण दुसरी गोष्ट अमान्य. लिखाणात विनोद आढळला नाही.( सरकाष्टीक म्हणजे कुजकट पुणेरी की कसा म्हणतात तो देखील नाही) ही चूक कशी दुरूस्त करणार ते सांगा.
लेखनविषय:
लेखनप्रकार
भाग १: स्वातंत्र्यदिनाची कल्पना इतिहास्यास्पद (१) स्वातंत्र्यदिनाची कल्पना भाग २: स्वातंत्र्यदिनाची तयारी स्वातंत्र्यदिन म्हणजे काय हे समजावण्यापासून जिथे तयारी आहे तिथे हे खायचं काम नव्हतं. पण यमदेवांना त्यावरही उपाय सुचला. त्यांनी गांधीजींवर ही जबाबदारी सोपवली.

एक मिशन असेही.

भागो ·
लेखनविषय:
त्याने प्रियाला कडेवर घेतले. क्वारंटाईन मध्ये जाण्यापूर्वी त्याने एकदा प्रियाला जवळ घेतले. “बाबा, परत केव्हा येणार?” “प्रिया, जाणाऱ्याला केव्हा येणार असं नाही विचारायचं”. कौमुदी म्हणजे प्रियाची आई आणि राबर्टोची पत्नी. हो ती अगदी मराठी होती. “बरं प्रिया, सांग तुला काय आणू?” “मी मागितलं तर आणाल? तर मग चाँदवा, मुठभर चांदणे घेऊन या. गिव मी माय मूनशाईन.” “डन!.” तो मिशन वरून परत आला तेव्हा त्याला हे सगळे आठवत होते. “प्रिया आहा.

कंट्या - मराठी कादंबरी अभिप्राय

राघवेंद्र ·

कंट्या ? मी बाबा भांड यांची "तंट्या" कादंबरी वाचलेली आहे. कंट्या पहिल्यांदाच ऐकतो आहे. अर्थात माझे मर्यादित वाचन हे देखील एक कारण असू शकेल. कोण जाणो उद्या मंट्या, फंट्या, झांट्या नावाच्या पण कादंबर्‍या यायच्या. असो. ओळख आवडली. (झांटे आडनाव बहुधा गोवा/ कोकणात ऐकले आहे.)

कंट्या ? मी बाबा भांड यांची "तंट्या" कादंबरी वाचलेली आहे. कंट्या पहिल्यांदाच ऐकतो आहे. अर्थात माझे मर्यादित वाचन हे देखील एक कारण असू शकेल. कोण जाणो उद्या मंट्या, फंट्या, झांट्या नावाच्या पण कादंबर्‍या यायच्या. असो. ओळख आवडली. (झांटे आडनाव बहुधा गोवा/ कोकणात ऐकले आहे.)
लेखनविषय:
लेखनप्रकार
नेहमीप्रमाणे ग्रंथालयात फिरत होतो आणि सहज पुस्तकं चाळत होतो. दरवेळी २-४ मराठी पुस्तकं घरी येतात, पण पूर्ण फार कमी वेळा होतं. यावेळी एक वेगळंच पुस्तक नजरेस पडलं – ‘कंट्या’ लेखक गणेश बर्गे. कथाही तितकीच साधी, पण हृदयाला भिडणारी – एका गावात आजी-आजोबांसोबत राहणारा एक मुलगा, ज्याने कधीच आपल्या आईला पाहिलेला नाही आणि वडिलांनी कधीच सांभाळलेलं नाही. सुरुवात होते आनंदी स्वभावाच्या ‘कंट्या’पासून.

साहित्य, ललिता आणि पुरचुंडीभर राख !

kvponkshe ·

याच तत्वावर सर्व आयुष्य घालवले. विसाव्याच्या क्षणी मागे वळून पहाताना आश्चर्य वाटते की कसे आयुष्य गेले. "छडा लंX गिरधारी ना लोटा ना थाली". का कुणास ठाऊक, एक विश्वास होता. परमेश्वराने द्रौपदीची थाळी घेऊन जन्माला घातले आहे. सर्वच सांगत बसत नाही. सन दोनहजार सात मधे पुण्यात बदलून आलो. ललिता म्हणाली रिटायर व्हायची वेळ आली,काहीतरी हातपाय हलवा. वाटले एक घर घेऊन टाकावे. या गोष्टीचा कधीच विचार न केल्याने, सतत नातेवाईक म्हणत असताना सुद्धा दुर्लक्ष केले. आता रिटायर व्हायची वेळ आली. "काळ देहासी आला खाऊ", म्हणत नामदेव महाराज नाचले. रिटायरमेंट जवळ आली व घर नाही म्हणता मात्र आमचे पाय फुलले. सरकारी नोकरास रिटायरमेंट मृत्यूसमानच ना.... एक संध्याकाळ, सहकारनगर मधे बरीच नवी बांधकाम चालू होती. एरीयात चांगला वगैरे वगैरे... बिल्डरच्या ऑफिसात एक जोडपे बसले होते. मिठाई, फुललेले चेहरे,बिल्डर चावी देत म्हणाला चला वास्तूशांतीची तयारी करा. आम्हांला आमचे भविष्य दिसले. नंतर बिल्डर आमच्या कडे वळाले ,काॅफी, गुणगान वगैरे झाले . किंमत ऐकून पायाखालची नसलेली वाळू सरकली. परत येतो कागदपत्र घेऊन..... पण ,सर्व काही पूर्वनियोजित असल्याप्रमाणे , कर्ज न काढता आहे त्या पैशातून वन बि ऐच के घेतला. भाड्याने दिला. पुढे तोच मुलीच्या उच्च शिक्षणाच्या कामी आला. पुढे दोन ही झाला आता तीनही झाला. सांगायचा उद्देश प्रवाहाबरोबर चालायचे. दुसर्‍यांच्याकडे पहायचे नाही. जेव्हां होणार तेव्हाच पहाट होईल. "मामेकं शरणं व्रज", का काय म्हणतात त्या प्रमाणे.....बाकी चिंता नको. नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी | अंती जाशील एकाला प्राण्या, माझे माझे म्हणोनी ॥ एकनाथ महाराजांचे भारूड.... पोटा पुरता पसा असला की बाकी, इदंम न मम म्हणायचे की चित्त शांत रहाते.

अमर विश्वास 23/06/2025 - 11:43
एकेकाळी हे असे बोधप्रद साहित्य आवडत असे .. कधीतरी मरायचे म्हणून आज जगायचे थांबवावे काय ? साहिरचे शब्द आठवतात मरना तो सबको है जी के भी देख ले चाहत का एक जाम पी के भी देख ले

In reply to by अमर विश्वास

गवि 23/06/2025 - 13:23
कधीतरी मरायचे म्हणून आज जगायचे थांबवावे काय ?
मुद्दा अगदी रास्त आणि रोचक आहे. म्हणूनच चार शब्द लिहायचा मोह होतोय. त्या मोठ्या आलिशान मध्यवर्ती फ्लॅटसाठी जी शर्यत पळावी लागेल त्यालाच कदाचित "जगायचे थांबणे" असे म्हणता येईल. त्या घरात जे जे काही करण्याची स्वप्ने (भविष्यातील जगणे) ते कुटुंब बघत आहे, ते जगण्याची फुरसत आणि मुख्य म्हणजे "सुकून" त्यांच्याकडे उरेल का? हा प्रश्नच आहे. अर्थात हे सर्व सापेक्ष आहे. अमर्याद धावणे यातच एखाद्याला जगणे सापडत असू शकेल . आपापला चॉईस. लेखकाने एक बाजू चांगल्या फॉरमॅटमधे मांडली आहे. आपल्या स्वतःसाठी जगणे म्हणजे नेमके काय हे क्षणभर थांबून, दीर्घ श्वास घेऊन स्वतःशी ठरवावेसे वाटेल इतपत ध्येय लेखकाने साध्य केले आहे असे वैयक्तिक मत.

In reply to by अमर विश्वास

प्रत्येक क्षणाचा उत्सव करा. अशा गोष्टीना बोधप्रद का म्हणतात माहीत नाही पण जगण्याची खरी प्रेरणा यातूनच मिळते. कसे जगायचे हे ज्याने त्याने ठरवायचंय. बरेच लोक पाडगावकरांची कवीतेचा संदर्भ देतात. आत्मपरीक्षण करा कसे जगायचे कळते.

कंजूस 23/06/2025 - 15:25
१. धाडस करून पाहायचे. २. परिस्थिती पुढची पायरी दाखवेल तर पाय पुढे टाकायचा. ३. सर्वांच्याच दारावर नशीब ठोठावत नाही. ४. काहीच झाले नाही तर आम्ही तुकाराम.

माझ्याही मनात असेच काहीसे विचार घोळत आहेत. जवळचाच एक २बी एच के विकायला निघालाय. ५०% कर्ज आणि बाकी पैसे स्वतःचे असा विचार चालु आहे. पण.... १. सेकंड होम साठी निवृत्तीचे प्लॅनिंग आणि थोडेफार मुलांच्या शिक्षणाचे पैसे खर्चावेत का? २.ऐनवेळी मोठा खर्च आल्यास रोख तरलता कशी येणार? ३.खाजगी नोकरीची अशाश्वता, मध्येच मनात घोळणारे लवकर निवृतीचे विचार ४. भोवतालची अस्थिर परीस्थिती व वाढत जाणारी महागाई यामुळे पाय पुढेमागे होताहेत. तेव्हा पोंक्षेसाहेब आणि मिपाकरांचा सल्ला काय असेल?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

३० पर्यंत - १ BHK / ४० पर्यंत - २ BHK /५० - ५५ पर्यंत - ३-४ BHK आणि ६० नंतर - १ RK ( शौचकूप नि उदवाहिकेची सोयीसकट ) असे चक्र पांढरपेशा वर्गात पाहिले आहे. १. सेकंड होम - लोन काढून घेऊ नये . ती गुंतवणूक नाही हौस आहे ज्याप्रमाणे सोन्याचे दागिने मिरवायला चांगले मोडीत काढायला कोणी धजावत नाही. आता सोने उच्चवर होते कोणी घरचे सोने मोडीत काढून मार्केट मध्ये गुंतवले असल्यास त्याला माझा सलाम २. टर्म प्लॅन / health इन्शुरन्स - टर्म प्लॅन चे कव्हर वाढवावे पगाराच्या हिशेबाने / असिसिडेंटल/ डिसॅबिलिटी अँड क्रिटिकल इलनेस रायडर घ्यावे . जितके लवकर घ्याल तितके चांगले. Annuity बिलकुल नको ३. आजकाल नोकरीतील तणावामुळे असे विचार साहजिक आहे अशावेळेस घर कर्ज असल्यास लवकर फेडावे उद्या वेळ आली तरी कर्जाचा भार नसेल. माझ्याच केसमध्ये मी EMI वाढवून कर्जकाळ कमी केला कारण सध्या व्याजदर सोयीचे आहेत, कमी व्याजात जादा पैसे फेडा ४. आता चा काळ बघता सरकारच जुनी कर व्यवस्था मोडीत काढणार आहे त्यामुळे घर कर्ज नि व्याजावर असणारी वजावट पुढे पूर्णतः नाहीशी होईल त्यामुळे करबचतीसाठी घर बिलकुल घेऊ नये. मार्केटची भीती असेल तर सरळ RBI बॉण्ड मध्ये पैसे गुंतवा ५. मुलांच्या शिक्षणासाठी खर्च - माझ्या केसमध्ये मी माझ्या मुलास फी न बघता ( याची फी फार वाजवी आहे , आजकाल महाग म्हणजे उत्तम असा परिपाठ आहे ) एका उत्तम दर्जाच्या शाळेत घातले. शिक्षणासाठी सोय करतोय पण पौंगडावस्थेत गेल्याशिवाय पोरातील विद्वत्ता कळत नाही , त्यामुळे आता लोड घ्यायचे नाही , आणि शैक्षणिक कर्ज हा पर्याय असतोच कि. त्यामुळे उगाच प्राथमिक शिक्षणासाठी वर्षाला १-१.५ लाख खर्च न करता तेच पैसे पुढे उपयोगाला येतील, त्यामुळे १० वीपर्यंत शिक्षणासाठी वाचलेले पैसे पुढे कामास येतील आणि नाहीच काही झाले तर पुढे त्याच्या उद्योगधंदयासाठी सीड कॅपिटल होईल ६ फायर / योलो असल्या अनेक संकल्पना आहेत . घरी बसून आपल्या घरच्यांना त्रास देण्यापेक्षा कार्यालयात जाणे कधीही चांगले :) ७ आजकाल मेंटॉरशिप / कोचिंग / इंडिपेन्डन्ट डायरेक्टर असे बरेच पर्याय ४५ + लोकांसाठी उपलब्ध आहेत . मी पण या पर्यायांची चाचपणी करतोय कारण शेती वा समाजसेवा हे पर्याय माझ्यासारख्या शहरी नि व्यवहारी माणसाला पचतील असे वाटत नाही. त्यामुळे अभ्यास चालू आहे कारण आजकाल कंपनी ४५+ लोकांना ओझे समजतात त्यामुळे तयारी करणे केव्हाही चांगले.

कबीरदास म्हणतात, फकिरा फकिरी दूर है जितनी लंबी खजूर चढे तो चाखे प्रेमरस गिरे तो चकनाचूर धाडस करताना या गोष्टीवर जरूर विचार करायला हवा. स्मशान वैराग्य क्षणात संपते. कुठलेही अर्थिक निर्णय घेताना स्वताची अर्थिक क्षमता, इतर जबाबदाऱ्या पण लक्षात घेणे व खरोखरच एव्हढ्या मोठ्या घराची ,SUV ची गरज आहे का ?,केवळ आवडले किंवा माझे स्वप्न म्हणून सर्वस्व पणाला लावणे चुकीचे आहे. असे मला वाटते. साईं इतना दीजिए, जामे कुटुंब समाए | मैं भी भूखा न रहूं, साधु न भूखा जाए||

सुबोध खरे 23/06/2025 - 19:54
luxury becomes necessity when neighbour buys it चैनीची वस्तू गरजेची केंव्हा होते? आपल्या शेजाऱ्याने विकत घेतली कि. शेजारणीने हिऱ्याचा हार घेतला कि मला घ्यायलाच पाहिजे. कारण माझ्या नवऱ्याला शेजाऱ्यापेक्षा पगार थोडा जास्तच आहे. आणि शेजाऱ्याने मुलाला आयफोन घेतला कि माझ्या मुलाला पण हवाच कि. हव्यास किती वाढत जातो याला अंत नसतो. सेकंड होमची स्थिती बहुतांशी हीच असते. केवळ मित्रांकडे आहे म्हणू आपण हि घ्यावे हि भावना बळावत जाते. मुंबईतील माझ्या माहितीच्या कित्येक लोकांचे/ नातेवाईकांचे तळेगाव येथील "सेकंड होम" हा आतबट्ट्याचा व्यवहार ठरलेला मी पाहिला आहे. उरापोटावर कर्ज घेऊन तर सेकंड होम कधीही करू नये. कारण त्या पैशाच्या व्याजात तुम्ही त्याच ठिकाणी पंचतारांकित हॉटेलात राहू शकता असे अनेक ठिकाणी दिसून येते. What Is Lifestyle Creep? Lifestyle creep is when your standard of living rises alongside your discretionary income—and soon enough, former luxuries become new necessities. It happens little by little, without you really realizing it: it sneaks ("creeps") up on you. https://www.investopedia.com/terms/l/lifestyle-creep.asp#:~:text=By-,What%20Is%20Lifestyle%20Creep%3F,creeps%22)%20up%20on%20you. हे हि जरूर वाचून घ्या बाकी "बस आज कि रात है जिंदगी" असे म्हणू जगणारे किती तरी लोक आनंदात हि जगलेले आहेत असेही दिसते. तेंव्हा सगळ्यांना हि गोष्ट झेपणार नाही असे माझे म्हणणे अजिबात नाही. ज्याने त्याने हा मुद्दा तारतम्य बाळगून करावा इतके च म्हणणे आहे.

अमर विश्वास 23/06/2025 - 22:35
वेगवेगळे दृष्टिकोन वाचून बरे वाटले आजचा दिवस आनंदात जगणे बेजबाबदारपणा नाही ... भविष्याची पूर्ण काळजी घेऊनही आजचा दिवस आनंदात जगता येत नाही का? आणि चैनीचे म्हणाल तर पुरेसा disposable income असेल (भाविषयाची तरतूद केल्यावर ) तर चैन का करू नये ? (भविष्याची तरतूद / investment ये विषयावर मी पुरेसे लिहिलेले आहे ) ते शाळेत हट्टीकट्टी गरिबी आणि लुळीपांगळी श्रीमंती असे जे काही शिकवलंय ना .. तिथेच सगळी गडबड आहे

मारवा 24/06/2025 - 15:58
मुकेश अंबानी यांचे उजवे हात मानले जाणारे प्रकाश शहा ज्यांची सॅलरी 75 करोड होती त्यांनी नुकताच सर्वसंग परित्याग करून जैन मुनी बनले अशी बातमी नुकतीच वाचली. जैन मुनी यांचे जीवन इतर धर्मातील संन्यस्त पेक्षा कमालीचे खडतर असे असते. केशलोचंन ,वगैरे masochistic प्रकार बरेच असतात. तर मुद्दा असा की दोन प्रकारची माणसे एक लौकिक जीवनात अत्युच्च शिखर गाठणारी तसेच पारलौकिक जगातही अत्युच्च प्रयत्नांची पराकाष्ठा करणारी. दोन्हीकडे झोकून दिली जिन्दगी. सर्वकाही स्टेक वर लावून दिलं आता यात अजून एक spiritual paradox आहे तो बाजूला ठेवू. मग दुसरा प्रकार आपला साहित्य वरणभात भाजीपोळी मधला मी असा.कसा मधला वाला तिसरे बिचारे survival च्या मारामारीत ते जाऊ द्या. असो मग

श्वेता२४ 24/06/2025 - 16:25
शब्दन शब्द खरा. तुमची ही लेखमाला मला अतीशय आवडते... असेच अजून लेख येत राहोत. बाकी या लेखाबद्दल म्हणाल तर कोणतीही वस्तू घेताना मला याची खरंच गरज आहे काय़ याचा विचार करुन पैसा खर्च करणे योग्य. घर/गाडी या दोन्ही गोष्टी समाजात उगाचच व्यक्तीच्या कर्तृत्वाशी/स्टेटस शी जोडल्या गेल्या आहेत. पूर्वीच्या काळी एका घरात दोन-तीन पिढ्या राहायच्या पण आताच्या काळात एकच पिढी ते घर वपरते व पुढची पिढी दुसरीकडे. शिवाय त्या पिढीला आधीच्या घराची किंमत नसते. लोक काय वास्तुशांतीला किंवा लेखाप्रमाणे "बसण्याचे" कार्यक्रमावेळी (खोटे़-खोटे)कोतुक करतीलही, पण किती वेळा? आजकालच्या जीवनात कुणाला कुणाकडे जायला वेळ नसतो. राहायला येणे तर खूप लांबची गोष्ट... प्रत्येकावे वर्षभरात आपल्या घरी किती माणसे किती वेळा आली व राहिली याचे मोजमाप करायला घेतले तर सहज गणना करु शकु एवढा आकडा कमी असेल. अशावेळी केवळ स्वताचा भरपूर वापर होणार असेल तर आणि तरच अशा मोठ्या गोष्टी खरेेदी करणे योग्य आहे. केवळ काही फालतू लोकांशी स्पर्धा करुन किंवा मोठेपणा म्हणूल असा पांढरा हत्ती पोसावा का याचा प्रत्येकाने विचार करावा असे माझे वैयक्तीक मत.

स्वधर्म 24/06/2025 - 20:00
विचार करायला लावणारा लेख आहे. खरे तर हे विषय प्रत्येकजणच मित्रपरिवारांत बोलत असतो. अतिशय रोचक प्रकारे कथेच्या रूपात पण रोकडं सत्य सांगितलंत तुंम्ही.

लेख आवडला असे तरी कसे म्हणणार ??? मृत्यू हे अंतिम सत्य आहे . आपल्या आप्तेष्टांचे १-२ मृत्यू पाहिल्यावर हि भावना जरूर उचंबळून येते.

Bhakti 26/06/2025 - 08:14
हो ना जसं जसा काळ जातो,तसं तसे आपलं म्हातारपणात कसं होणार असं वाटतं,नकोच ते ६०-६५ मृत्यू आला तर बरं होईल.बाकी काही कितीही उपाययोजना केल्या तरी काही इन सिक्युरिटीज दूर केल्या की दुसऱ्या तोपर्यंत मनात आलेल्या असतात,हे चक्रच आहे.तेव्हा शांतपणे,सर्व बाजूंनी विचारांती योग्य निर्णयापर्यंत पोहचत राहणे हाच उत्तम मार्ग!

In reply to by Bhakti

सुबोध खरे 26/06/2025 - 09:54
तरुणपणी मृत्यू हे एक सुंदर काव्य असतं म्हातारपणी तेच एक रुक्ष गद्य होऊन जातं तेंव्हा तरुण माणसं जेंव्हा मृत्यू याबद्दल भाष्य करतात तेंव्हा आश्चर्य वाटत नाही. परंतु मृत्यू आपल्या हातात नाही. तेंव्हा म्हातारपणी आपण आपल्या जोडीदारावर आणि मुलाबाळांवर ओझं बनून राहायला नको( निदान आर्थिक भार तरी नको) इतपत तरी स्वतःची आर्थिक तरतूद नक्की असावी.

वय वाढलयं पण म्हातारा झालोय का सांगता येणार नाही. तरुणपणी मृत्यू हे एक सुंदर काव्य असतं म्हातारपणी तेच एक रुक्ष गद्य होऊन जातं दु:ख,कष्ट तरूणपणी असतात पण अंगात रग असते. म्हातारपणातली दु:ख, कष्ट वेगळे,मी म्हातारा झालोय, वय वाढलयं ही भावना जर त्या दु:ख किंवा कष्टाबरोबर जुडली तर ते असहनिय होतात. जोवर हातीपायी धडधाकट आहे तोपर्यंत आहे त्या परिस्थितीत आनंद शोधायचा. बाकी ,खाटेवर आडवे पडल्यावर मात्र नैराश्य येणे स्वाभाविक आहे. इश्वरेच्छा बलियसी म्हणत उर्वरित दिवस काढायचे. त्याला इलाज नाही.

साहित्य-ललिता मालिकेतील सर्वच लेख आवडले, विचारप्रवर्तक आहेत. सध्या आपल्याकडे जे आहे ते कोणालाच पुरे वाटत नसते, फक्त कुठे थांबायचं हे पण कळलं पाहिजे.

याच तत्वावर सर्व आयुष्य घालवले. विसाव्याच्या क्षणी मागे वळून पहाताना आश्चर्य वाटते की कसे आयुष्य गेले. "छडा लंX गिरधारी ना लोटा ना थाली". का कुणास ठाऊक, एक विश्वास होता. परमेश्वराने द्रौपदीची थाळी घेऊन जन्माला घातले आहे. सर्वच सांगत बसत नाही. सन दोनहजार सात मधे पुण्यात बदलून आलो. ललिता म्हणाली रिटायर व्हायची वेळ आली,काहीतरी हातपाय हलवा. वाटले एक घर घेऊन टाकावे. या गोष्टीचा कधीच विचार न केल्याने, सतत नातेवाईक म्हणत असताना सुद्धा दुर्लक्ष केले. आता रिटायर व्हायची वेळ आली. "काळ देहासी आला खाऊ", म्हणत नामदेव महाराज नाचले. रिटायरमेंट जवळ आली व घर नाही म्हणता मात्र आमचे पाय फुलले. सरकारी नोकरास रिटायरमेंट मृत्यूसमानच ना.... एक संध्याकाळ, सहकारनगर मधे बरीच नवी बांधकाम चालू होती. एरीयात चांगला वगैरे वगैरे... बिल्डरच्या ऑफिसात एक जोडपे बसले होते. मिठाई, फुललेले चेहरे,बिल्डर चावी देत म्हणाला चला वास्तूशांतीची तयारी करा. आम्हांला आमचे भविष्य दिसले. नंतर बिल्डर आमच्या कडे वळाले ,काॅफी, गुणगान वगैरे झाले . किंमत ऐकून पायाखालची नसलेली वाळू सरकली. परत येतो कागदपत्र घेऊन..... पण ,सर्व काही पूर्वनियोजित असल्याप्रमाणे , कर्ज न काढता आहे त्या पैशातून वन बि ऐच के घेतला. भाड्याने दिला. पुढे तोच मुलीच्या उच्च शिक्षणाच्या कामी आला. पुढे दोन ही झाला आता तीनही झाला. सांगायचा उद्देश प्रवाहाबरोबर चालायचे. दुसर्‍यांच्याकडे पहायचे नाही. जेव्हां होणार तेव्हाच पहाट होईल. "मामेकं शरणं व्रज", का काय म्हणतात त्या प्रमाणे.....बाकी चिंता नको. नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी | अंती जाशील एकाला प्राण्या, माझे माझे म्हणोनी ॥ एकनाथ महाराजांचे भारूड.... पोटा पुरता पसा असला की बाकी, इदंम न मम म्हणायचे की चित्त शांत रहाते.

अमर विश्वास 23/06/2025 - 11:43
एकेकाळी हे असे बोधप्रद साहित्य आवडत असे .. कधीतरी मरायचे म्हणून आज जगायचे थांबवावे काय ? साहिरचे शब्द आठवतात मरना तो सबको है जी के भी देख ले चाहत का एक जाम पी के भी देख ले

In reply to by अमर विश्वास

गवि 23/06/2025 - 13:23
कधीतरी मरायचे म्हणून आज जगायचे थांबवावे काय ?
मुद्दा अगदी रास्त आणि रोचक आहे. म्हणूनच चार शब्द लिहायचा मोह होतोय. त्या मोठ्या आलिशान मध्यवर्ती फ्लॅटसाठी जी शर्यत पळावी लागेल त्यालाच कदाचित "जगायचे थांबणे" असे म्हणता येईल. त्या घरात जे जे काही करण्याची स्वप्ने (भविष्यातील जगणे) ते कुटुंब बघत आहे, ते जगण्याची फुरसत आणि मुख्य म्हणजे "सुकून" त्यांच्याकडे उरेल का? हा प्रश्नच आहे. अर्थात हे सर्व सापेक्ष आहे. अमर्याद धावणे यातच एखाद्याला जगणे सापडत असू शकेल . आपापला चॉईस. लेखकाने एक बाजू चांगल्या फॉरमॅटमधे मांडली आहे. आपल्या स्वतःसाठी जगणे म्हणजे नेमके काय हे क्षणभर थांबून, दीर्घ श्वास घेऊन स्वतःशी ठरवावेसे वाटेल इतपत ध्येय लेखकाने साध्य केले आहे असे वैयक्तिक मत.

In reply to by अमर विश्वास

प्रत्येक क्षणाचा उत्सव करा. अशा गोष्टीना बोधप्रद का म्हणतात माहीत नाही पण जगण्याची खरी प्रेरणा यातूनच मिळते. कसे जगायचे हे ज्याने त्याने ठरवायचंय. बरेच लोक पाडगावकरांची कवीतेचा संदर्भ देतात. आत्मपरीक्षण करा कसे जगायचे कळते.

कंजूस 23/06/2025 - 15:25
१. धाडस करून पाहायचे. २. परिस्थिती पुढची पायरी दाखवेल तर पाय पुढे टाकायचा. ३. सर्वांच्याच दारावर नशीब ठोठावत नाही. ४. काहीच झाले नाही तर आम्ही तुकाराम.

माझ्याही मनात असेच काहीसे विचार घोळत आहेत. जवळचाच एक २बी एच के विकायला निघालाय. ५०% कर्ज आणि बाकी पैसे स्वतःचे असा विचार चालु आहे. पण.... १. सेकंड होम साठी निवृत्तीचे प्लॅनिंग आणि थोडेफार मुलांच्या शिक्षणाचे पैसे खर्चावेत का? २.ऐनवेळी मोठा खर्च आल्यास रोख तरलता कशी येणार? ३.खाजगी नोकरीची अशाश्वता, मध्येच मनात घोळणारे लवकर निवृतीचे विचार ४. भोवतालची अस्थिर परीस्थिती व वाढत जाणारी महागाई यामुळे पाय पुढेमागे होताहेत. तेव्हा पोंक्षेसाहेब आणि मिपाकरांचा सल्ला काय असेल?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

३० पर्यंत - १ BHK / ४० पर्यंत - २ BHK /५० - ५५ पर्यंत - ३-४ BHK आणि ६० नंतर - १ RK ( शौचकूप नि उदवाहिकेची सोयीसकट ) असे चक्र पांढरपेशा वर्गात पाहिले आहे. १. सेकंड होम - लोन काढून घेऊ नये . ती गुंतवणूक नाही हौस आहे ज्याप्रमाणे सोन्याचे दागिने मिरवायला चांगले मोडीत काढायला कोणी धजावत नाही. आता सोने उच्चवर होते कोणी घरचे सोने मोडीत काढून मार्केट मध्ये गुंतवले असल्यास त्याला माझा सलाम २. टर्म प्लॅन / health इन्शुरन्स - टर्म प्लॅन चे कव्हर वाढवावे पगाराच्या हिशेबाने / असिसिडेंटल/ डिसॅबिलिटी अँड क्रिटिकल इलनेस रायडर घ्यावे . जितके लवकर घ्याल तितके चांगले. Annuity बिलकुल नको ३. आजकाल नोकरीतील तणावामुळे असे विचार साहजिक आहे अशावेळेस घर कर्ज असल्यास लवकर फेडावे उद्या वेळ आली तरी कर्जाचा भार नसेल. माझ्याच केसमध्ये मी EMI वाढवून कर्जकाळ कमी केला कारण सध्या व्याजदर सोयीचे आहेत, कमी व्याजात जादा पैसे फेडा ४. आता चा काळ बघता सरकारच जुनी कर व्यवस्था मोडीत काढणार आहे त्यामुळे घर कर्ज नि व्याजावर असणारी वजावट पुढे पूर्णतः नाहीशी होईल त्यामुळे करबचतीसाठी घर बिलकुल घेऊ नये. मार्केटची भीती असेल तर सरळ RBI बॉण्ड मध्ये पैसे गुंतवा ५. मुलांच्या शिक्षणासाठी खर्च - माझ्या केसमध्ये मी माझ्या मुलास फी न बघता ( याची फी फार वाजवी आहे , आजकाल महाग म्हणजे उत्तम असा परिपाठ आहे ) एका उत्तम दर्जाच्या शाळेत घातले. शिक्षणासाठी सोय करतोय पण पौंगडावस्थेत गेल्याशिवाय पोरातील विद्वत्ता कळत नाही , त्यामुळे आता लोड घ्यायचे नाही , आणि शैक्षणिक कर्ज हा पर्याय असतोच कि. त्यामुळे उगाच प्राथमिक शिक्षणासाठी वर्षाला १-१.५ लाख खर्च न करता तेच पैसे पुढे उपयोगाला येतील, त्यामुळे १० वीपर्यंत शिक्षणासाठी वाचलेले पैसे पुढे कामास येतील आणि नाहीच काही झाले तर पुढे त्याच्या उद्योगधंदयासाठी सीड कॅपिटल होईल ६ फायर / योलो असल्या अनेक संकल्पना आहेत . घरी बसून आपल्या घरच्यांना त्रास देण्यापेक्षा कार्यालयात जाणे कधीही चांगले :) ७ आजकाल मेंटॉरशिप / कोचिंग / इंडिपेन्डन्ट डायरेक्टर असे बरेच पर्याय ४५ + लोकांसाठी उपलब्ध आहेत . मी पण या पर्यायांची चाचपणी करतोय कारण शेती वा समाजसेवा हे पर्याय माझ्यासारख्या शहरी नि व्यवहारी माणसाला पचतील असे वाटत नाही. त्यामुळे अभ्यास चालू आहे कारण आजकाल कंपनी ४५+ लोकांना ओझे समजतात त्यामुळे तयारी करणे केव्हाही चांगले.

कबीरदास म्हणतात, फकिरा फकिरी दूर है जितनी लंबी खजूर चढे तो चाखे प्रेमरस गिरे तो चकनाचूर धाडस करताना या गोष्टीवर जरूर विचार करायला हवा. स्मशान वैराग्य क्षणात संपते. कुठलेही अर्थिक निर्णय घेताना स्वताची अर्थिक क्षमता, इतर जबाबदाऱ्या पण लक्षात घेणे व खरोखरच एव्हढ्या मोठ्या घराची ,SUV ची गरज आहे का ?,केवळ आवडले किंवा माझे स्वप्न म्हणून सर्वस्व पणाला लावणे चुकीचे आहे. असे मला वाटते. साईं इतना दीजिए, जामे कुटुंब समाए | मैं भी भूखा न रहूं, साधु न भूखा जाए||

सुबोध खरे 23/06/2025 - 19:54
luxury becomes necessity when neighbour buys it चैनीची वस्तू गरजेची केंव्हा होते? आपल्या शेजाऱ्याने विकत घेतली कि. शेजारणीने हिऱ्याचा हार घेतला कि मला घ्यायलाच पाहिजे. कारण माझ्या नवऱ्याला शेजाऱ्यापेक्षा पगार थोडा जास्तच आहे. आणि शेजाऱ्याने मुलाला आयफोन घेतला कि माझ्या मुलाला पण हवाच कि. हव्यास किती वाढत जातो याला अंत नसतो. सेकंड होमची स्थिती बहुतांशी हीच असते. केवळ मित्रांकडे आहे म्हणू आपण हि घ्यावे हि भावना बळावत जाते. मुंबईतील माझ्या माहितीच्या कित्येक लोकांचे/ नातेवाईकांचे तळेगाव येथील "सेकंड होम" हा आतबट्ट्याचा व्यवहार ठरलेला मी पाहिला आहे. उरापोटावर कर्ज घेऊन तर सेकंड होम कधीही करू नये. कारण त्या पैशाच्या व्याजात तुम्ही त्याच ठिकाणी पंचतारांकित हॉटेलात राहू शकता असे अनेक ठिकाणी दिसून येते. What Is Lifestyle Creep? Lifestyle creep is when your standard of living rises alongside your discretionary income—and soon enough, former luxuries become new necessities. It happens little by little, without you really realizing it: it sneaks ("creeps") up on you. https://www.investopedia.com/terms/l/lifestyle-creep.asp#:~:text=By-,What%20Is%20Lifestyle%20Creep%3F,creeps%22)%20up%20on%20you. हे हि जरूर वाचून घ्या बाकी "बस आज कि रात है जिंदगी" असे म्हणू जगणारे किती तरी लोक आनंदात हि जगलेले आहेत असेही दिसते. तेंव्हा सगळ्यांना हि गोष्ट झेपणार नाही असे माझे म्हणणे अजिबात नाही. ज्याने त्याने हा मुद्दा तारतम्य बाळगून करावा इतके च म्हणणे आहे.

अमर विश्वास 23/06/2025 - 22:35
वेगवेगळे दृष्टिकोन वाचून बरे वाटले आजचा दिवस आनंदात जगणे बेजबाबदारपणा नाही ... भविष्याची पूर्ण काळजी घेऊनही आजचा दिवस आनंदात जगता येत नाही का? आणि चैनीचे म्हणाल तर पुरेसा disposable income असेल (भाविषयाची तरतूद केल्यावर ) तर चैन का करू नये ? (भविष्याची तरतूद / investment ये विषयावर मी पुरेसे लिहिलेले आहे ) ते शाळेत हट्टीकट्टी गरिबी आणि लुळीपांगळी श्रीमंती असे जे काही शिकवलंय ना .. तिथेच सगळी गडबड आहे

मारवा 24/06/2025 - 15:58
मुकेश अंबानी यांचे उजवे हात मानले जाणारे प्रकाश शहा ज्यांची सॅलरी 75 करोड होती त्यांनी नुकताच सर्वसंग परित्याग करून जैन मुनी बनले अशी बातमी नुकतीच वाचली. जैन मुनी यांचे जीवन इतर धर्मातील संन्यस्त पेक्षा कमालीचे खडतर असे असते. केशलोचंन ,वगैरे masochistic प्रकार बरेच असतात. तर मुद्दा असा की दोन प्रकारची माणसे एक लौकिक जीवनात अत्युच्च शिखर गाठणारी तसेच पारलौकिक जगातही अत्युच्च प्रयत्नांची पराकाष्ठा करणारी. दोन्हीकडे झोकून दिली जिन्दगी. सर्वकाही स्टेक वर लावून दिलं आता यात अजून एक spiritual paradox आहे तो बाजूला ठेवू. मग दुसरा प्रकार आपला साहित्य वरणभात भाजीपोळी मधला मी असा.कसा मधला वाला तिसरे बिचारे survival च्या मारामारीत ते जाऊ द्या. असो मग

श्वेता२४ 24/06/2025 - 16:25
शब्दन शब्द खरा. तुमची ही लेखमाला मला अतीशय आवडते... असेच अजून लेख येत राहोत. बाकी या लेखाबद्दल म्हणाल तर कोणतीही वस्तू घेताना मला याची खरंच गरज आहे काय़ याचा विचार करुन पैसा खर्च करणे योग्य. घर/गाडी या दोन्ही गोष्टी समाजात उगाचच व्यक्तीच्या कर्तृत्वाशी/स्टेटस शी जोडल्या गेल्या आहेत. पूर्वीच्या काळी एका घरात दोन-तीन पिढ्या राहायच्या पण आताच्या काळात एकच पिढी ते घर वपरते व पुढची पिढी दुसरीकडे. शिवाय त्या पिढीला आधीच्या घराची किंमत नसते. लोक काय वास्तुशांतीला किंवा लेखाप्रमाणे "बसण्याचे" कार्यक्रमावेळी (खोटे़-खोटे)कोतुक करतीलही, पण किती वेळा? आजकालच्या जीवनात कुणाला कुणाकडे जायला वेळ नसतो. राहायला येणे तर खूप लांबची गोष्ट... प्रत्येकावे वर्षभरात आपल्या घरी किती माणसे किती वेळा आली व राहिली याचे मोजमाप करायला घेतले तर सहज गणना करु शकु एवढा आकडा कमी असेल. अशावेळी केवळ स्वताचा भरपूर वापर होणार असेल तर आणि तरच अशा मोठ्या गोष्टी खरेेदी करणे योग्य आहे. केवळ काही फालतू लोकांशी स्पर्धा करुन किंवा मोठेपणा म्हणूल असा पांढरा हत्ती पोसावा का याचा प्रत्येकाने विचार करावा असे माझे वैयक्तीक मत.

स्वधर्म 24/06/2025 - 20:00
विचार करायला लावणारा लेख आहे. खरे तर हे विषय प्रत्येकजणच मित्रपरिवारांत बोलत असतो. अतिशय रोचक प्रकारे कथेच्या रूपात पण रोकडं सत्य सांगितलंत तुंम्ही.

लेख आवडला असे तरी कसे म्हणणार ??? मृत्यू हे अंतिम सत्य आहे . आपल्या आप्तेष्टांचे १-२ मृत्यू पाहिल्यावर हि भावना जरूर उचंबळून येते.

Bhakti 26/06/2025 - 08:14
हो ना जसं जसा काळ जातो,तसं तसे आपलं म्हातारपणात कसं होणार असं वाटतं,नकोच ते ६०-६५ मृत्यू आला तर बरं होईल.बाकी काही कितीही उपाययोजना केल्या तरी काही इन सिक्युरिटीज दूर केल्या की दुसऱ्या तोपर्यंत मनात आलेल्या असतात,हे चक्रच आहे.तेव्हा शांतपणे,सर्व बाजूंनी विचारांती योग्य निर्णयापर्यंत पोहचत राहणे हाच उत्तम मार्ग!

In reply to by Bhakti

सुबोध खरे 26/06/2025 - 09:54
तरुणपणी मृत्यू हे एक सुंदर काव्य असतं म्हातारपणी तेच एक रुक्ष गद्य होऊन जातं तेंव्हा तरुण माणसं जेंव्हा मृत्यू याबद्दल भाष्य करतात तेंव्हा आश्चर्य वाटत नाही. परंतु मृत्यू आपल्या हातात नाही. तेंव्हा म्हातारपणी आपण आपल्या जोडीदारावर आणि मुलाबाळांवर ओझं बनून राहायला नको( निदान आर्थिक भार तरी नको) इतपत तरी स्वतःची आर्थिक तरतूद नक्की असावी.

वय वाढलयं पण म्हातारा झालोय का सांगता येणार नाही. तरुणपणी मृत्यू हे एक सुंदर काव्य असतं म्हातारपणी तेच एक रुक्ष गद्य होऊन जातं दु:ख,कष्ट तरूणपणी असतात पण अंगात रग असते. म्हातारपणातली दु:ख, कष्ट वेगळे,मी म्हातारा झालोय, वय वाढलयं ही भावना जर त्या दु:ख किंवा कष्टाबरोबर जुडली तर ते असहनिय होतात. जोवर हातीपायी धडधाकट आहे तोपर्यंत आहे त्या परिस्थितीत आनंद शोधायचा. बाकी ,खाटेवर आडवे पडल्यावर मात्र नैराश्य येणे स्वाभाविक आहे. इश्वरेच्छा बलियसी म्हणत उर्वरित दिवस काढायचे. त्याला इलाज नाही.

साहित्य-ललिता मालिकेतील सर्वच लेख आवडले, विचारप्रवर्तक आहेत. सध्या आपल्याकडे जे आहे ते कोणालाच पुरे वाटत नसते, फक्त कुठे थांबायचं हे पण कळलं पाहिजे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
साहित्य असाच एका रविवारी फेसबुकवर चाळवाचाळव करत असताना त्याला त्या ३.५ बीएचके फ्लॅटची जाहिरात दिसली. एका बंगल्याच्या पुनर्विकासानंतर सहकारनगर सारख्या सभ्य आणि सुसंस्कृत भागात असलेला फ्लॅट "निदान बघून तरी येऊ" असे म्हणून तो, ललिता आणि लेखना तो फ्लॅट बघायला गेले. चकाचक इमारत, २ कार पार्किंग्स.. आणि तेही अगदी लांब लचक कार सहज आत बाहेर येऊ जाऊ शकेल अशा.. प्रशस्त हॉल ... सॉरी सॉरी - लिविंग रूम... मोठाल्या बेडरूमस .... वॉशिंग मशीन आणि डिश वॉशर सहज बसेल आणि तरीही जागा उरेल असे स्वयंपाकघर ... सॉरी सॉरी - मॉड्युलर किचन ... प्रत्येक बेडरूमला मध्यम बाल्कनी .. लिविंग ला मोठ्ठी गॅलरी ...

साहित्य, ललिता आणि "समोरच्या फ्लॅट मधल्या dog feeder बाई"

kvponkshe ·

सौंदाळा 10/06/2025 - 13:01
लेखाशी सहमत आहे. जवळजवळ सर्वच मोठ्या सोसायट्यांमधे हे प्रकार चालू आहेत. नसबंदी करुन पण कुत्र्यांची संख्या बेसुमार वाढली आहे. कुत्रेप्रेमी पेटाचा धाक दाखवतात लगेच कोणातरी वकीलाचा, पेटाचा शहरप्रमुख यांचे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्यांचे फोन येतात त्यामुळे कोणीच यांच्या नादी लागत नाही. काही महिन्यापुर्वी पिंपरी मधील एका मोठ्या सोसायटीत १० भटकी कुत्री विषप्रयोग करुन मारली याचा पोलीसतपास चालू आहे. कुत्रे मारण्यासाठी ५ लाखांची सुपारी दिली होती असा कुत्रेपेमींचा आरोप आहे. भटक्या कुत्र्यांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी कठोर कायदा केलाच पाहिजे.

कपिलमुनी 10/06/2025 - 14:43
आमच्या सोसायटीत डॉग फीडर होता ..नंतर कुत्रे सोसायटीत आणून फीड करत होता . पार्किंग मध्य कारण बाहेर पाउस असतो ... विरोध केला तेव्हा सगळि पेटा कम्युनिटी घेउन आला . मोर्चे वगैरे पोलीस केस .. मग काही दिवसांनी राणी शोना माझ्या ४ वर्षाच्या मुलावर धावून आली .. मग त्या माणसाला आधी रट्टे घातले आणि शोना ला पण ! वर सांगितले , असा पण पोलिस स्टेशन वारी आहे तशी पण आहे ..पैसे देउन सुटेनच ! पुढे प्रकरण मिटले ..पुढे बिचार्‍या शोनाला पण गाडीने उडवले म्हणे !

प्रत्येक सोसायटीत असेच चालू आहे. कुत्राप्रेमींचा दांभिकपणा. यांना कुत्र्याचे कान कापले तर चालतात. नसबंदी केलीतर चालते. नवल वाटते, अजून कुणी कुत्रा प्रेमीने पालिकेला विचारले नाही की नसबंदी करण्या आगोदर कुत्र्याचे संमतिपत्र घेतले का नाही? सोसायटितील एक असेच प्रेमी, इथेही तोच त्रास. काय करणार, पोलीस झाले,चौकी झाली शेवटी लोकांनी नाद सोडला. प्रेमी काही दिवसांकरता गावाला गेला.कुत्री उकिरडे शोधू लागली. तरुणाईने भन्नाट आयडिया लढवली. खाण्याच्या गोष्टी घेऊन समोरच्या टेकडीवर गेले. मागोमाग सारी कुत्री. तिथेच खायला घातले. देखा देखी इतर सोसायटितील लोकही तिकडेच टेकडीवर कुत्र्यांना खायला देऊ लागले. कुत्र्यांनी सोसायटी सोडली. आता प्रेमी टेकडीवर जातात. गुडघे दुखीचा त्रास सुरू झालाय म्हणे. असेच कबुतरांचे, पाळीव प्राण्यांचा सुद्धा कमी त्रास नसतो. दोन बेडरूम फ्लॅट ,कुत्रा बाल्कनीत, रात्रभर केकाटत असतो. सकाळी पुप करता सोसायटितील आवारात फिरवतात घाण करतात सगळी कडे..... साहित्य दांपतीला आमच्या संवेदना.

स्वधर्म 10/06/2025 - 17:06
आमच्या सोसायटीतील लोक तर कुत्र्याला फॅमिली मेंबर म्हणतात. कालच एका मित्राला काय चाललेय असे विचारले तर घरी सिनियर सिटीझन आहे, त्याच्यात खूप वेळ जातो म्हणाला. कोण म्हणाल्यावर कुत्रीचे नांव घेतले. १०-१२ वर्षात ते पिल्लू सिनियर सिटीझन झाले असून या मित्राचा वेळ तिची काळजी घेण्यात जातो.

In reply to by स्वधर्म

फार बडदास्त ठेवावी लागते. अंतकाळी आगदी माणसासारखे. जीवंत असताना वाढदिवस वगैरे करतात. आमची एक मेव्हणी तीच्या कुत्र्याला फाईव्ह स्टार चाॅकलेट खायला द्यायची.परत कुत्र्याला कुत्रे नाही म्हणायचे,सनी म्हणायचे. एका पेक्षा एक वरचढ किस्से. आहो,अम्रीकेत तर आमचा कुत्रा हरवला आहे आमची मुलगी तीन दिवसापासून जेवत नाहीये सापडल्यास अमुक पत्यावर पोहचला अशी जागोजागी हॅण्डबिले लावतात. एक मजेशीर लेख पाडता येईल. बाकी सर्व ठिक पण मला नवल वाटते ते त्यांना बिना कॅलेंडर भाद्रपद महीना कसा आला ते कसे कळते.

In reply to by स्वधर्म

फार बडदास्त ठेवावी लागते. अंतकाळी आगदी माणसासारखे. जीवंत असताना वाढदिवस वगैरे करतात. आमची एक मेव्हणी तीच्या कुत्र्याला फाईव्ह स्टार चाॅकलेट खायला द्यायची.परत कुत्र्याला कुत्रे नाही म्हणायचे,सनी म्हणायचे. एका पेक्षा एक वरचढ किस्से. आहो,अम्रीकेत तर आमचा कुत्रा हरवला आहे आमची मुलगी तीन दिवसापासून जेवत नाहीये सापडल्यास अमुक पत्यावर पोहचला अशी जागोजागी हॅण्डबिले लावतात. एक मजेशीर लेख पाडता येईल. बाकी सर्व ठिक पण मला नवल वाटते ते त्यांना बिना कॅलेंडर भाद्रपद महीना कसा आला ते कसे कळते.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 10/06/2025 - 21:26
कुत्र्यांचा स्वैराचार,जस्ट ज्ञानेश्वरीतील एक दृष्टांत वाचण्यात आला.. विषयासक्त, स्रैण पुरुषाच्या निर्लज्ज व्यवहारास माऊली ग्रामसिंहाचा म्हणजे कुत्र्याचा दृष्टांत देतात. 'इया ग्रामसिंहाचिया ठायी । जैसा मिळणी ठावो अठावो नाही । तैसा स्रीविषयी काही। विचारीना ।।' (ज्ञा. १३/६८१). जसे कुत्रे कामक्रिडेस चव्हाटा किंवा आडबाजू असा कुठलाही भेद पाहत नाही. तद्वत विषयासक्त मनुष्य विधीनिषेध डावलून स्वैराचाराने वागतो. एकंदरीत ग्रामसिंह आणि भाद्रपद पुरातन कनेक्शन आहे !

In reply to by Bhakti

वैकुंठवासी ह भ प सोनोपंत उर्फ मामा दांडेकर यानी विशद केलेली ज्ञानदेवी वाचत आहे. एक एक पाट उघडत आहे. आता नामदेवांचे म्हणणे समजत आहे,"एक तरी ओवी अनुभवावी".

मूकवाचक 10/06/2025 - 18:52
Every dog deserves a home, but every home does not deserve a dog. तळटीपः अमर्याद संख्या झाल्याने मानवी जीवनालाच जिथे किंमत उरलेली नाही, तिथे श्वानांना कोण विचारणार? असो.

Bhakti 10/06/2025 - 20:12
आमच्या निम शहरी भागात,कॉलनी आहे पण नियम असे नाही. सदा न कदा श्वानांची फौजच फिरते.अजून तरी काही घडलं नाही.पण रात्री खुप भुंकतात,त्याचा त्रास होतो.आणि शीट.. खुपच घाण करतात :( लहानपणी आमच्याकडे पामेरियन डॉली होती.त्यामुळे जरा लळा आहे.पण वेळेच्या अभावामुळे आता श्वान पाळणे शक्य नाही. पण आमच्या इथे भटकी भू भू आहे ट्रेसी (हे नाव मीच दिले.)ती पूर्ण कॉलनीची आहे.सगळे जण तिला खाऊ घालतात.तिने दोनदा पिल्ले दिली माझ्या लेकीला त्या पिल्लांचा खुप लळा लागायचा.काही वाहत्या रस्त्यावर गाडीखाली गेली.काही कोणी कोणी नेली.त्यामुळे मी नेहमी श्वान आवडतात की नाही याबाबत संभ्रमात असते! बाकी या कथेतील समोरच्या घरातील बाई सारख्या व्यक्ती मोठ्या शहरात खुप असतात त्यामुळे असे किस्से घडतच राहणार यात शंका नाही.

कंजूस 11/06/2025 - 09:41
सोसायटीच्या बाहेरचे लोक आत येऊन कुत्र्यांना खायला कसे देऊ शकतात? ........ कुत्रा हा प्राणी कोल्हा,लांडगा, तरस वगैरे जमातीत आहे असे म्हणतात पण मोठा फरक म्हणजे ते प्राणी आपली पिले एकत्र वाढवतात. आईबाप मिळून पिले सांभाळतात. तसे कुत्रा करत नाही उलट दुसऱ्या कुत्रीच्या पिलांना चावून मारून टाकतो. मांजरी कुळात( वाघ, सिंह वगैरे) माझी एकटीच पिलांना वाढवते. पिलांना बोक्यांपासून वाचवावे लागते. समजा असं नसतं तर कुत्रा आणि मांजर मानवाचे मित्र झालेच नसते

In reply to by कंजूस

कपिलमुनी 11/06/2025 - 12:13
कुत्रा करत नाही उलट दुसऱ्या कुत्रीच्या पिलांना चावून मारून टाकतो ?? हे मी पाहिले नाहि . बोके मारतात .. कुत्र्यांनी मारलेले बघण्यात नाही

In reply to by कंजूस

विवेकपटाईत 11/06/2025 - 15:37
न्याय पालिकेने निर्णय दिला आहे. बाहेरचे लोक येऊन तुमच्या हाऊसिंग कॉम्प्लेक्स मध्ये आवारा कुत्र्यांना खाऊ घालू शकतात.

विवेकपटाईत 11/06/2025 - 15:36
गेल्या वर्षी ग्रेटर नोयेडात बिल्डर सोसाइटीत रहायला आलो. वाटले होते इथे कुत्र्यांच्या त्रास नसेल. पण इथे तर बेसमेंट पार्किंग मध्येच अनेक कुत्रे आहेत. इथे ही कुत्र्यांना खायला घालणारे आहेत. पण जे खाऊ घालतात ते कुत्रे पाळत नाही. (त्या जेवणावर कुत्र्यांचे पोट भरणे शक्य नाही) किमान 20-25 कुत्रे या हाऊसिंग कॉम्प्लेक्स मध्ये असतील. दर महिन्यात किमान एक दोन लोकांना कुत्री चावतात. कुत्र्यांना मारणे शक्य नाही. बाहेर हाकलू शकत नाही. कुत्रे समर्थक पोलिसांना बोलवायला क्षणाचा ही उशीर करत नाही. या घटकेला रात्र पाळीचे सर्वच गार्ड दंडुका घेऊन बसतात. कुत्र्यांना फक्त दुरून घाबरविण्यासाठी. त्यांना दंडुका मारू शकत नाही. अनेक गार्ड कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेले आहे. मी ही सकाळी फिरायला जाताना हातात छडी घेऊनच जातो. कुत्र्यांची संख्या देशात कमी नाही. त्यांना संरक्षणाची गरज नाही. दरवर्षी 25000 हून जास्त लोकांचे प्राण घेतात. त्यात कुत्र्यांच्या हल्ल्यात किमान हजारहून जास्त लोक ठार होता. कुत्रे फॅमिली प्लॅनिंग करू शकत नाही. त्यांची संख्या नियंत्रित करणे गरजेचे आहे.

अतिरिकी प्रेम व अतिरेकी द्वेष यातून अशा गोष्टी घडतात. साहित्यात मात्र अतिशयोक्ति हा अलंकार असतो. तो अतिरेक रसग्रहणीय असतो

कपिलमुनी 11/06/2025 - 20:22
प्राण्यांचे अधिकार सर्व प्राण्यांना सेम असतील तर साप पाळा, नाग , फुरसे जिथून मिळतील. तिथून सर्व मित्रांना सांगून सोसायटी आवारात सोडायला सांगा..

In reply to by कपिलमुनी

सौंदाळा 12/06/2025 - 19:52
नारायणगाव, जुन्नर, ओतुर वगैरे भागात आडगावात भटकी कुत्री एकदम गायब झालेली आहेत. बिबट्याचे आवडते खाद्य आहे. त्यामुळे नाग, साप, फुरसे यांपेक्षा प्रत्येक सोसायटीत एक दोन बिबटे सोडले पाहिजेत, काय म्हणता :)

सौंदाळा 10/06/2025 - 13:01
लेखाशी सहमत आहे. जवळजवळ सर्वच मोठ्या सोसायट्यांमधे हे प्रकार चालू आहेत. नसबंदी करुन पण कुत्र्यांची संख्या बेसुमार वाढली आहे. कुत्रेप्रेमी पेटाचा धाक दाखवतात लगेच कोणातरी वकीलाचा, पेटाचा शहरप्रमुख यांचे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्यांचे फोन येतात त्यामुळे कोणीच यांच्या नादी लागत नाही. काही महिन्यापुर्वी पिंपरी मधील एका मोठ्या सोसायटीत १० भटकी कुत्री विषप्रयोग करुन मारली याचा पोलीसतपास चालू आहे. कुत्रे मारण्यासाठी ५ लाखांची सुपारी दिली होती असा कुत्रेपेमींचा आरोप आहे. भटक्या कुत्र्यांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी कठोर कायदा केलाच पाहिजे.

कपिलमुनी 10/06/2025 - 14:43
आमच्या सोसायटीत डॉग फीडर होता ..नंतर कुत्रे सोसायटीत आणून फीड करत होता . पार्किंग मध्य कारण बाहेर पाउस असतो ... विरोध केला तेव्हा सगळि पेटा कम्युनिटी घेउन आला . मोर्चे वगैरे पोलीस केस .. मग काही दिवसांनी राणी शोना माझ्या ४ वर्षाच्या मुलावर धावून आली .. मग त्या माणसाला आधी रट्टे घातले आणि शोना ला पण ! वर सांगितले , असा पण पोलिस स्टेशन वारी आहे तशी पण आहे ..पैसे देउन सुटेनच ! पुढे प्रकरण मिटले ..पुढे बिचार्‍या शोनाला पण गाडीने उडवले म्हणे !

प्रत्येक सोसायटीत असेच चालू आहे. कुत्राप्रेमींचा दांभिकपणा. यांना कुत्र्याचे कान कापले तर चालतात. नसबंदी केलीतर चालते. नवल वाटते, अजून कुणी कुत्रा प्रेमीने पालिकेला विचारले नाही की नसबंदी करण्या आगोदर कुत्र्याचे संमतिपत्र घेतले का नाही? सोसायटितील एक असेच प्रेमी, इथेही तोच त्रास. काय करणार, पोलीस झाले,चौकी झाली शेवटी लोकांनी नाद सोडला. प्रेमी काही दिवसांकरता गावाला गेला.कुत्री उकिरडे शोधू लागली. तरुणाईने भन्नाट आयडिया लढवली. खाण्याच्या गोष्टी घेऊन समोरच्या टेकडीवर गेले. मागोमाग सारी कुत्री. तिथेच खायला घातले. देखा देखी इतर सोसायटितील लोकही तिकडेच टेकडीवर कुत्र्यांना खायला देऊ लागले. कुत्र्यांनी सोसायटी सोडली. आता प्रेमी टेकडीवर जातात. गुडघे दुखीचा त्रास सुरू झालाय म्हणे. असेच कबुतरांचे, पाळीव प्राण्यांचा सुद्धा कमी त्रास नसतो. दोन बेडरूम फ्लॅट ,कुत्रा बाल्कनीत, रात्रभर केकाटत असतो. सकाळी पुप करता सोसायटितील आवारात फिरवतात घाण करतात सगळी कडे..... साहित्य दांपतीला आमच्या संवेदना.

स्वधर्म 10/06/2025 - 17:06
आमच्या सोसायटीतील लोक तर कुत्र्याला फॅमिली मेंबर म्हणतात. कालच एका मित्राला काय चाललेय असे विचारले तर घरी सिनियर सिटीझन आहे, त्याच्यात खूप वेळ जातो म्हणाला. कोण म्हणाल्यावर कुत्रीचे नांव घेतले. १०-१२ वर्षात ते पिल्लू सिनियर सिटीझन झाले असून या मित्राचा वेळ तिची काळजी घेण्यात जातो.

In reply to by स्वधर्म

फार बडदास्त ठेवावी लागते. अंतकाळी आगदी माणसासारखे. जीवंत असताना वाढदिवस वगैरे करतात. आमची एक मेव्हणी तीच्या कुत्र्याला फाईव्ह स्टार चाॅकलेट खायला द्यायची.परत कुत्र्याला कुत्रे नाही म्हणायचे,सनी म्हणायचे. एका पेक्षा एक वरचढ किस्से. आहो,अम्रीकेत तर आमचा कुत्रा हरवला आहे आमची मुलगी तीन दिवसापासून जेवत नाहीये सापडल्यास अमुक पत्यावर पोहचला अशी जागोजागी हॅण्डबिले लावतात. एक मजेशीर लेख पाडता येईल. बाकी सर्व ठिक पण मला नवल वाटते ते त्यांना बिना कॅलेंडर भाद्रपद महीना कसा आला ते कसे कळते.

In reply to by स्वधर्म

फार बडदास्त ठेवावी लागते. अंतकाळी आगदी माणसासारखे. जीवंत असताना वाढदिवस वगैरे करतात. आमची एक मेव्हणी तीच्या कुत्र्याला फाईव्ह स्टार चाॅकलेट खायला द्यायची.परत कुत्र्याला कुत्रे नाही म्हणायचे,सनी म्हणायचे. एका पेक्षा एक वरचढ किस्से. आहो,अम्रीकेत तर आमचा कुत्रा हरवला आहे आमची मुलगी तीन दिवसापासून जेवत नाहीये सापडल्यास अमुक पत्यावर पोहचला अशी जागोजागी हॅण्डबिले लावतात. एक मजेशीर लेख पाडता येईल. बाकी सर्व ठिक पण मला नवल वाटते ते त्यांना बिना कॅलेंडर भाद्रपद महीना कसा आला ते कसे कळते.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 10/06/2025 - 21:26
कुत्र्यांचा स्वैराचार,जस्ट ज्ञानेश्वरीतील एक दृष्टांत वाचण्यात आला.. विषयासक्त, स्रैण पुरुषाच्या निर्लज्ज व्यवहारास माऊली ग्रामसिंहाचा म्हणजे कुत्र्याचा दृष्टांत देतात. 'इया ग्रामसिंहाचिया ठायी । जैसा मिळणी ठावो अठावो नाही । तैसा स्रीविषयी काही। विचारीना ।।' (ज्ञा. १३/६८१). जसे कुत्रे कामक्रिडेस चव्हाटा किंवा आडबाजू असा कुठलाही भेद पाहत नाही. तद्वत विषयासक्त मनुष्य विधीनिषेध डावलून स्वैराचाराने वागतो. एकंदरीत ग्रामसिंह आणि भाद्रपद पुरातन कनेक्शन आहे !

In reply to by Bhakti

वैकुंठवासी ह भ प सोनोपंत उर्फ मामा दांडेकर यानी विशद केलेली ज्ञानदेवी वाचत आहे. एक एक पाट उघडत आहे. आता नामदेवांचे म्हणणे समजत आहे,"एक तरी ओवी अनुभवावी".

मूकवाचक 10/06/2025 - 18:52
Every dog deserves a home, but every home does not deserve a dog. तळटीपः अमर्याद संख्या झाल्याने मानवी जीवनालाच जिथे किंमत उरलेली नाही, तिथे श्वानांना कोण विचारणार? असो.

Bhakti 10/06/2025 - 20:12
आमच्या निम शहरी भागात,कॉलनी आहे पण नियम असे नाही. सदा न कदा श्वानांची फौजच फिरते.अजून तरी काही घडलं नाही.पण रात्री खुप भुंकतात,त्याचा त्रास होतो.आणि शीट.. खुपच घाण करतात :( लहानपणी आमच्याकडे पामेरियन डॉली होती.त्यामुळे जरा लळा आहे.पण वेळेच्या अभावामुळे आता श्वान पाळणे शक्य नाही. पण आमच्या इथे भटकी भू भू आहे ट्रेसी (हे नाव मीच दिले.)ती पूर्ण कॉलनीची आहे.सगळे जण तिला खाऊ घालतात.तिने दोनदा पिल्ले दिली माझ्या लेकीला त्या पिल्लांचा खुप लळा लागायचा.काही वाहत्या रस्त्यावर गाडीखाली गेली.काही कोणी कोणी नेली.त्यामुळे मी नेहमी श्वान आवडतात की नाही याबाबत संभ्रमात असते! बाकी या कथेतील समोरच्या घरातील बाई सारख्या व्यक्ती मोठ्या शहरात खुप असतात त्यामुळे असे किस्से घडतच राहणार यात शंका नाही.

कंजूस 11/06/2025 - 09:41
सोसायटीच्या बाहेरचे लोक आत येऊन कुत्र्यांना खायला कसे देऊ शकतात? ........ कुत्रा हा प्राणी कोल्हा,लांडगा, तरस वगैरे जमातीत आहे असे म्हणतात पण मोठा फरक म्हणजे ते प्राणी आपली पिले एकत्र वाढवतात. आईबाप मिळून पिले सांभाळतात. तसे कुत्रा करत नाही उलट दुसऱ्या कुत्रीच्या पिलांना चावून मारून टाकतो. मांजरी कुळात( वाघ, सिंह वगैरे) माझी एकटीच पिलांना वाढवते. पिलांना बोक्यांपासून वाचवावे लागते. समजा असं नसतं तर कुत्रा आणि मांजर मानवाचे मित्र झालेच नसते

In reply to by कंजूस

कपिलमुनी 11/06/2025 - 12:13
कुत्रा करत नाही उलट दुसऱ्या कुत्रीच्या पिलांना चावून मारून टाकतो ?? हे मी पाहिले नाहि . बोके मारतात .. कुत्र्यांनी मारलेले बघण्यात नाही

In reply to by कंजूस

विवेकपटाईत 11/06/2025 - 15:37
न्याय पालिकेने निर्णय दिला आहे. बाहेरचे लोक येऊन तुमच्या हाऊसिंग कॉम्प्लेक्स मध्ये आवारा कुत्र्यांना खाऊ घालू शकतात.

विवेकपटाईत 11/06/2025 - 15:36
गेल्या वर्षी ग्रेटर नोयेडात बिल्डर सोसाइटीत रहायला आलो. वाटले होते इथे कुत्र्यांच्या त्रास नसेल. पण इथे तर बेसमेंट पार्किंग मध्येच अनेक कुत्रे आहेत. इथे ही कुत्र्यांना खायला घालणारे आहेत. पण जे खाऊ घालतात ते कुत्रे पाळत नाही. (त्या जेवणावर कुत्र्यांचे पोट भरणे शक्य नाही) किमान 20-25 कुत्रे या हाऊसिंग कॉम्प्लेक्स मध्ये असतील. दर महिन्यात किमान एक दोन लोकांना कुत्री चावतात. कुत्र्यांना मारणे शक्य नाही. बाहेर हाकलू शकत नाही. कुत्रे समर्थक पोलिसांना बोलवायला क्षणाचा ही उशीर करत नाही. या घटकेला रात्र पाळीचे सर्वच गार्ड दंडुका घेऊन बसतात. कुत्र्यांना फक्त दुरून घाबरविण्यासाठी. त्यांना दंडुका मारू शकत नाही. अनेक गार्ड कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेले आहे. मी ही सकाळी फिरायला जाताना हातात छडी घेऊनच जातो. कुत्र्यांची संख्या देशात कमी नाही. त्यांना संरक्षणाची गरज नाही. दरवर्षी 25000 हून जास्त लोकांचे प्राण घेतात. त्यात कुत्र्यांच्या हल्ल्यात किमान हजारहून जास्त लोक ठार होता. कुत्रे फॅमिली प्लॅनिंग करू शकत नाही. त्यांची संख्या नियंत्रित करणे गरजेचे आहे.

अतिरिकी प्रेम व अतिरेकी द्वेष यातून अशा गोष्टी घडतात. साहित्यात मात्र अतिशयोक्ति हा अलंकार असतो. तो अतिरेक रसग्रहणीय असतो

कपिलमुनी 11/06/2025 - 20:22
प्राण्यांचे अधिकार सर्व प्राण्यांना सेम असतील तर साप पाळा, नाग , फुरसे जिथून मिळतील. तिथून सर्व मित्रांना सांगून सोसायटी आवारात सोडायला सांगा..

In reply to by कपिलमुनी

सौंदाळा 12/06/2025 - 19:52
नारायणगाव, जुन्नर, ओतुर वगैरे भागात आडगावात भटकी कुत्री एकदम गायब झालेली आहेत. बिबट्याचे आवडते खाद्य आहे. त्यामुळे नाग, साप, फुरसे यांपेक्षा प्रत्येक सोसायटीत एक दोन बिबटे सोडले पाहिजेत, काय म्हणता :)
लेखनविषय:
लेखनप्रकार
साहित्य तेव्हा जॉब करत होता, आणि ललिता सध्या फ्री लान्सिंग. त्यांची मुलगी लेखना आता ५ वर्षांची झाली होती. सध्या ती एका शाळेत सिनियर के जी मध्ये होती. एका उच्चभ्रू सोसायटीतील स्वतःच्या फ्लॅट मध्ये ते राहत होते. त्यांच्या फ्लॅटच्या लॉबीच्या समोरचा फ्लॅट नुकताच विकला गेला होता. पण अजून कोणी तेथे राहायला आले नव्हते. त्या फ्लॅटच्या जुन्या मालकांचे आणि साहित्य ललिता यांचे चांगले संबंध होते. आता कोण तिथे नवीन येणार याची साहित्य आणि ललिताला उत्सुकता होती. त्यांच्या सोसायटीच्या एंट्रन्स गेट च्या बाहेर बरीचशी कुत्री होती.

कोकणातील तुमच्या स्वप्नातील एक फार्म हाऊस !

kvponkshe ·

अंजर्ले येथे एका होम स्टे मधील भूतपूर्व मालक बनाम मॅनेजर ,वरिष्ठ नागरीक यांनी शिळोप्याच्या गप्पा मारताना आपल्या वेदना व्यक्त केल्या. ही संपत्ती वाडवडिलार्जीत होती. मुलग्ये पुणे मुंबई कडे जाऊन चाकरमानी झाले. परतायला तयार नाही. संपत्ती वृद्धापकाळामुळे ठिकठाक ठेवणे कठीण. मनुष्यबळ नाही. वृद्धापकाळ वाडवडिलार्जीत मातीत जावा व शहरातील खुराड्यात रहायचे नव्हते म्हणून मालकाचे नोकर होणे पसंत केले.

सुबोध खरे 04/06/2025 - 19:10
शहरात राहणाऱ्या माणसाने गावी आपले घर असावे म्हणून गुंतवणूक अजिबात करू नये या निर्णयापर्यंत आम्ही १० वर्षांपूर्वीच आलो आहोत. गावची (कोकणची) माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी हे वाक्य टाळ्या मिळ्वण्यापुरतेच ठीक आहे. शहाण्या माणसाने असे अतिरिक्त पैसे कुठेतरी ( बाजारात, म्युच्युअल फंडात किंवा तत्सम गुंतवणुकीत गुंतवावेत) आणि त्याच्या व्याजावर आयुष्यभर कोकणात वेगवेगळ्या ठिकाणी पंचतारांकित सोयीचं लाभ घ्यावा. या निष्कर्षाप्रत आम्ही सर्व भाऊ आलेलो आहोत. आमचे वाडवडिलोपार्जित उत्तम देखभाल केलेले घर कोकणातील श्री क्षेत्र परशुराम येथे असूनहि वर्ष वर्ष तेथे जाणे होत नाही. परंतु सात चुलत भावांमध्ये कोणीतरी जात येत असल्यामुळे घर उत्तम स्थितीत आहे. ते मध्यवर्ती ठेवून आजूबाजूला सर्वत्र पर्यटन करणे सोयीचे होते. त्यातून कोकणचा जाण्यायेण्याचा प्रवासखर्च वजा जाता मुंबईत उत्तम हापूस आंबे स्वस्त मिळतात हि वस्तुस्थिती. एकंदर कोकणात माणसांच्या उपलब्धतेबद्दलची स्थिती चिंताजनकच आहे. एकंदर माणसांना काम नाही हि रड असली तरी वेळेवर कामाला माणसे मिळत नाहीत आणि मिळणारी माणसे कामाची नाहीत. हि वस्तुस्थिती आहे.

कंजूस 04/06/2025 - 20:18
वस्तुस्थिती आहे तरी स्वप्ने पाहणाऱ्यांची कमतरता नाही. हिंदी सिनेमात पैका मिळवणाऱ्या कलाकार, निर्मात्यांनी आलेला पैसा गुंतवला, त्यांचे विश्वासू गडी कायमचे ठेवलेत. पैसे खर्च करतात. त्यांचे पाहून इतर काही जण हा उद्योग करतात आणि कंटाळतात किंवा फसतात.

कपिलमुनी 05/06/2025 - 11:22
रग्गड पैसा आणि वेळ असल्याशिवाय असाल्या भानगडीत पडूच नये . फार्म हाउस , हिल स्टेशन बंगला , रीसोर्ट मध्ये व्हिला असल्या भानगडीत पडू नये . सामान्य माणसाला तरूणपणी वेळ मिळत नाही आणी म्हातारपणी तिथे सोयी नसतात.. हवे तेव्हा भाड्याने घेउन राहावे .. अगदि महिनाभर भाड्याने घेतले तरी परवडते आणि हौस पण होते .

कपिलमुनी 05/06/2025 - 11:31
एका मित्राने मुळशी मध्ये बांधलेल्या घराचे खिडक्या दरवाजे नेले होते . वॉचमन परवडत नव्हता . मग शेजारच्या वाडीतील एका बाईल स्वछतेला सांगितले , पावसाळ्यात तीची भिंत पडली म्हणून तीच सहकुतुंब राहायला आली .. ते पण ह्याला महिन्याने कळले :) माझे बालपण तळेगावला गेले तिथे बर्याच मुंबैकरांची सेकंड होम आहेत .. सगळीकडे सेम स्टोरी

कथानायकाचे नाव मस्त आहे. आणि शेवटी घेतलेला निर्णय सुद्धा बरोबर आहे. जिथे आपण स्थायिक नाही तिथे घर घेउ नये. उगाच २-३ वर्षे बॅंगलोर किवा हैद्राबादला नोकरी होती म्हणुन तिकडे फ्लॅट घेणारे आणि आता पस्तावणारे खुप पाहिलेत. काहीनी तर नुकसानीत सुद्धा विकुन टाकले आहेत. काही वर्षांपुर्वी असेच नाशिकला घरे/बंगले घ्यायचे फॅड आले होते. अगदी मार्केटिंग म्हणुन विकांताला बिल्डरचे लोक जीपने जायची/यायची सोयही करायचे मुंबईतुन. आता ते चालु आहे की नाही माहीत नाही.

फार्म हाऊस की नुसतीच हौस??????? हा मुवि यांचा लेख आठवला. माझ्या सविस्तर प्रतिक्रिया त्यात आहेत. माझ्या वैवाहिक आयुष्याची दिशाच बदलली या प्रकरणाने

शेती पहावी करुन- श्रीनिवास पंडित शहरी माणसांना खेड्याबद्दल, शेतीबद्दल एक अनामिक आकर्षण असतं. मोकळी हवा, मोकळा ढाकळा निसर्ग, संथ जीवनशैली, डोलणारी शेतं, शेतावरचं चंद्रमौळी घर, रात्रीचं पिठूर चांदणं अशा अनेक आकर्षणामुळे अनेकांना खेड्यात जाऊन राहावं, शेती करावी, शहरातील चाकोरी मोडून जगावं असं वाटत असतं. नोकरी-धंदा करून हाताशी जादा पैसा आला की, तीव्र होत जाते. पण शेती करणं हे काय दिव्य असतं हे बहुतेकांना माहीत नसतं. एक शहरी माणूस आपल्या सर्व रोमँटिक कल्पनांसह शेती करू लागल्यानंतर काय काय घडतं, शहरी समज, कल्पना यांची कशी वासलात लागते? शेती करण्याच्या विचाराने हुरळून गेलेला माणूस नंतर कसा हबकून जातो ? या साऱ्या अनुभवाने त्यात काय बदल होतो? … लेखकाने संवेदनशीलतेने मांडलेला स्वतःचा अनुभव! संगीत, साउंड डिझाईन: अक्षय वैद्य, रेकॉर्डिंग स्टुडिओ: युफोनी स्टुडीओ, पुणे https://snovel.in/product-details/26/sheti-pahavi-karun

कंजूस 06/06/2025 - 17:59
यावरून आठवलं - गोसेवा करण्याची कुणाला हुक्की येते. एकाचं घर आणि आंगण होतंच तर गाय ठेवावी विचार आला. त्याला सल्ला मिळाला की कुणाकडे आजारी गाय असेल तर त्यांच्याकडे जाऊन सेवा कर आणि अनुभव घे. मग गाय विकत आणून अंगणात बांध. आजारी गायीचं जमलं की मग पुढे काही झालं तुमच्या गायीचं तर डगमगायला होणार नाही. तसं जिथे घर बांधायचं आहे तिथे कुठे भाड्याने राहून बघा की काय अडचणी येतात आणि मग रुळलात की विचार पक्के होतील किंवा बदलतील किंवा हौस फिटलेली असेल.

अंजर्ले येथे एका होम स्टे मधील भूतपूर्व मालक बनाम मॅनेजर ,वरिष्ठ नागरीक यांनी शिळोप्याच्या गप्पा मारताना आपल्या वेदना व्यक्त केल्या. ही संपत्ती वाडवडिलार्जीत होती. मुलग्ये पुणे मुंबई कडे जाऊन चाकरमानी झाले. परतायला तयार नाही. संपत्ती वृद्धापकाळामुळे ठिकठाक ठेवणे कठीण. मनुष्यबळ नाही. वृद्धापकाळ वाडवडिलार्जीत मातीत जावा व शहरातील खुराड्यात रहायचे नव्हते म्हणून मालकाचे नोकर होणे पसंत केले.

सुबोध खरे 04/06/2025 - 19:10
शहरात राहणाऱ्या माणसाने गावी आपले घर असावे म्हणून गुंतवणूक अजिबात करू नये या निर्णयापर्यंत आम्ही १० वर्षांपूर्वीच आलो आहोत. गावची (कोकणची) माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी हे वाक्य टाळ्या मिळ्वण्यापुरतेच ठीक आहे. शहाण्या माणसाने असे अतिरिक्त पैसे कुठेतरी ( बाजारात, म्युच्युअल फंडात किंवा तत्सम गुंतवणुकीत गुंतवावेत) आणि त्याच्या व्याजावर आयुष्यभर कोकणात वेगवेगळ्या ठिकाणी पंचतारांकित सोयीचं लाभ घ्यावा. या निष्कर्षाप्रत आम्ही सर्व भाऊ आलेलो आहोत. आमचे वाडवडिलोपार्जित उत्तम देखभाल केलेले घर कोकणातील श्री क्षेत्र परशुराम येथे असूनहि वर्ष वर्ष तेथे जाणे होत नाही. परंतु सात चुलत भावांमध्ये कोणीतरी जात येत असल्यामुळे घर उत्तम स्थितीत आहे. ते मध्यवर्ती ठेवून आजूबाजूला सर्वत्र पर्यटन करणे सोयीचे होते. त्यातून कोकणचा जाण्यायेण्याचा प्रवासखर्च वजा जाता मुंबईत उत्तम हापूस आंबे स्वस्त मिळतात हि वस्तुस्थिती. एकंदर कोकणात माणसांच्या उपलब्धतेबद्दलची स्थिती चिंताजनकच आहे. एकंदर माणसांना काम नाही हि रड असली तरी वेळेवर कामाला माणसे मिळत नाहीत आणि मिळणारी माणसे कामाची नाहीत. हि वस्तुस्थिती आहे.

कंजूस 04/06/2025 - 20:18
वस्तुस्थिती आहे तरी स्वप्ने पाहणाऱ्यांची कमतरता नाही. हिंदी सिनेमात पैका मिळवणाऱ्या कलाकार, निर्मात्यांनी आलेला पैसा गुंतवला, त्यांचे विश्वासू गडी कायमचे ठेवलेत. पैसे खर्च करतात. त्यांचे पाहून इतर काही जण हा उद्योग करतात आणि कंटाळतात किंवा फसतात.

कपिलमुनी 05/06/2025 - 11:22
रग्गड पैसा आणि वेळ असल्याशिवाय असाल्या भानगडीत पडूच नये . फार्म हाउस , हिल स्टेशन बंगला , रीसोर्ट मध्ये व्हिला असल्या भानगडीत पडू नये . सामान्य माणसाला तरूणपणी वेळ मिळत नाही आणी म्हातारपणी तिथे सोयी नसतात.. हवे तेव्हा भाड्याने घेउन राहावे .. अगदि महिनाभर भाड्याने घेतले तरी परवडते आणि हौस पण होते .

कपिलमुनी 05/06/2025 - 11:31
एका मित्राने मुळशी मध्ये बांधलेल्या घराचे खिडक्या दरवाजे नेले होते . वॉचमन परवडत नव्हता . मग शेजारच्या वाडीतील एका बाईल स्वछतेला सांगितले , पावसाळ्यात तीची भिंत पडली म्हणून तीच सहकुतुंब राहायला आली .. ते पण ह्याला महिन्याने कळले :) माझे बालपण तळेगावला गेले तिथे बर्याच मुंबैकरांची सेकंड होम आहेत .. सगळीकडे सेम स्टोरी

कथानायकाचे नाव मस्त आहे. आणि शेवटी घेतलेला निर्णय सुद्धा बरोबर आहे. जिथे आपण स्थायिक नाही तिथे घर घेउ नये. उगाच २-३ वर्षे बॅंगलोर किवा हैद्राबादला नोकरी होती म्हणुन तिकडे फ्लॅट घेणारे आणि आता पस्तावणारे खुप पाहिलेत. काहीनी तर नुकसानीत सुद्धा विकुन टाकले आहेत. काही वर्षांपुर्वी असेच नाशिकला घरे/बंगले घ्यायचे फॅड आले होते. अगदी मार्केटिंग म्हणुन विकांताला बिल्डरचे लोक जीपने जायची/यायची सोयही करायचे मुंबईतुन. आता ते चालु आहे की नाही माहीत नाही.

फार्म हाऊस की नुसतीच हौस??????? हा मुवि यांचा लेख आठवला. माझ्या सविस्तर प्रतिक्रिया त्यात आहेत. माझ्या वैवाहिक आयुष्याची दिशाच बदलली या प्रकरणाने

शेती पहावी करुन- श्रीनिवास पंडित शहरी माणसांना खेड्याबद्दल, शेतीबद्दल एक अनामिक आकर्षण असतं. मोकळी हवा, मोकळा ढाकळा निसर्ग, संथ जीवनशैली, डोलणारी शेतं, शेतावरचं चंद्रमौळी घर, रात्रीचं पिठूर चांदणं अशा अनेक आकर्षणामुळे अनेकांना खेड्यात जाऊन राहावं, शेती करावी, शहरातील चाकोरी मोडून जगावं असं वाटत असतं. नोकरी-धंदा करून हाताशी जादा पैसा आला की, तीव्र होत जाते. पण शेती करणं हे काय दिव्य असतं हे बहुतेकांना माहीत नसतं. एक शहरी माणूस आपल्या सर्व रोमँटिक कल्पनांसह शेती करू लागल्यानंतर काय काय घडतं, शहरी समज, कल्पना यांची कशी वासलात लागते? शेती करण्याच्या विचाराने हुरळून गेलेला माणूस नंतर कसा हबकून जातो ? या साऱ्या अनुभवाने त्यात काय बदल होतो? … लेखकाने संवेदनशीलतेने मांडलेला स्वतःचा अनुभव! संगीत, साउंड डिझाईन: अक्षय वैद्य, रेकॉर्डिंग स्टुडिओ: युफोनी स्टुडीओ, पुणे https://snovel.in/product-details/26/sheti-pahavi-karun

कंजूस 06/06/2025 - 17:59
यावरून आठवलं - गोसेवा करण्याची कुणाला हुक्की येते. एकाचं घर आणि आंगण होतंच तर गाय ठेवावी विचार आला. त्याला सल्ला मिळाला की कुणाकडे आजारी गाय असेल तर त्यांच्याकडे जाऊन सेवा कर आणि अनुभव घे. मग गाय विकत आणून अंगणात बांध. आजारी गायीचं जमलं की मग पुढे काही झालं तुमच्या गायीचं तर डगमगायला होणार नाही. तसं जिथे घर बांधायचं आहे तिथे कुठे भाड्याने राहून बघा की काय अडचणी येतात आणि मग रुळलात की विचार पक्के होतील किंवा बदलतील किंवा हौस फिटलेली असेल.
लेखनविषय:
लेखनप्रकार
साहित्य आणि ललिता यांचे नुकतेच लग्न झालेले. दोघंही आयटी मध्ये बऱ्यापैकी पगारावर होते. पुण्यात साहित्यला त्याच्या आईबाबांनी एक फ्लॅट घेऊन दिलेला होता, हां थोडे कर्ज होते त्यावर, पण साहित्य आणि ललिता ते फेडत होते . साहित्यचे आईबाबा वेगळे राहणार होते, त्यामुळे ललिताला घरातील खरे खुरे डस्टबिन कुठे ठेवायचे हा प्रॉब्लेम नव्हता. साहित्य आणि ललिता याचे एक स्वप्न होते. कोकणात थोडी शेती आणि कौलारू घर असावे. घराला अंगण असावे. त्यात छान वेगवेगळी फुलझाडे असावीत. पडवीत झोपाळा असावा.