Skip to main content

फार्म हाऊस की नुसतीच हौस???????

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 04/07/2016 20:40 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : खालील लेख हा संपूर्ण काल्पनिक आहे.केवळ माझा वेळ जात नाही म्हणून लिहिला आहे.तुमचा वेळ जर अमुल्य असेल तर, खालील लेख नाही वाचलात तर फार उत्तम. ============================================ शेती करण्यापुर्वी बर्‍याच जणांचा सल्ला घेतला.त्यापैकी ज्यांनी खूप विरोध व्यक्त केला, ते सगळेच शहरातील.त्यातही बर्‍याच जणांचे मत असे पडले की, शेतीत पैसे घालवण्यापेक्षा , एखादे टूमदार फार्म हाऊस विकत घेतलेले परवडते.पुढे मग "फार्म हाऊस." ह्या संकल्पनेतील धोका लक्षांत यायला लागला आणि मी फार्म-हाऊस ही माझी नुसतीच हौस ह्या सदरांत मोडेल म्हणून तो विचार बाजूला सारला. पण गेल्याच आठ्वड्यांत आमच्या एका हितचिंतकाने, हा विचार परत मला ऐकवला म्हणून हा धागा प्रपंच. आमचा थोडक्यात संवाद असा. तो : तुम्ही शेत विकत घेताय म्हणे? मी : हो. तो : काय भावात पडले? मी : साधारणे सर्व खर्च वजा जाता एकरी २,५०,०००/- ला पडेल. तो : अरे.मग शेत घेण्यापेक्षा फार्म हाऊस विकत घ्यायचे.मी मागच्याच वर्षी एक विकत घेतले. मी : कितीला? तो : साधारण पणे ३०,००,०००/- खर्च झाले.जवळपास अर्धा एकर जागा आहे.शिवाय त्यात आंबा,नारळ इत्यादी झाडे पण आहेत. मी : अरे व्वा!!! मस्तच. तो : आता ६-७ वर्षांनी आम्ही तिथेच रहायला जावू. मी : मस्त. तो : सध्या आम्ही तिथेच एक कुटुंब ठेवले आहे.ते सध्या देखभाल करत आहेतच. मी : छान. तो : आता अजिबात शक्यच नाही झाले तर, ज्याने विकले आहे तो परत विकत घ्यायला किंवा विकायला मदत पण करणार आहे. मी : ओके. हे तर फारच उत्तम. तो : तुमच्या शेती पेक्षा, आमचे फार्म हाऊस फायदेशीर ठरणार बघ. मी : असे झाले तर फार उत्तम. तो : तू पण फार्म-हाऊसच विकत घ्यायला हवे होतेस. मी : हो ना.पण काय आहे, माझी जागे बाबतची संकल्पना फार वेगळी आहे.मी सामान्य माणूस असल्याने, अन्न-वस्त्र-निवारा, अशीच माझी चढती भाजणी आहे.शेतात जर अन्नच पिकत नसेल तर शेताचा उपयोग काय? तो : अरे, तू एकदा माझे फार्म हाऊस बघायला हवेस. मी : अरे हो.नक्कीच येईन.पण हे आहे कुठेशी? तो : अरे ते ढिकणेवाडीला आहे.म्हणजे फलाणेवाडी पासून साधारण १०-१२ किमी अंतरावर. मी : अरे व्वा!!!! मग कधी जावू या. तो : आता इतक्यात तरी काही शक्य नाही.ह्या डिसेंबरला त्या टलाण्या हॉटेल स्कीम मध्ये पैसे गुंतवले आहेत ना.ते थोडे वसूल करायला गोव्याला जाणार आहे.त्यामुळे उन्हाळ्यात नक्की जावू. मी : उन्हाळ्यात मला जमेल असे वाटत नाही.कारण ह्या उन्हाळ्यात शेतात बरेच खड्डे खणायचे आहेत. तो : बघ. ही शेती म्हटली की असे अडकायला होते.म्हणूनच फार्म हाऊस घ्यायचे.आपण मनांत आले की, लगेच निघू शकतो. मी : हो ना.पण ते जावू दे.मग उन्हाळ्यात तू नक्की जाणार ना? कारण वहिनी म्हणत होत्या की, इथला उन्हळा त्यांना झेपत नसल्याने तुम्ही ह्यावर्षी युरोपला किंवा कूलु-मनालीला जाणर म्हणुन. तो : हं.ते पण आहेच म्हणा.सध्या उकाडा इतका वाढला आहे की, एक स्वयंपाकघर सोडले तर प्रत्येक खोलीत ए.सी. मी : (मनांत.आता बाथरूम आणि संडासात पण ए.सी. लावतो की काय? असेल ही.) आता आजकाल उन्हाळा जरा जास्त्च वाढला आहे. तो : अरे ह्यावर्षी आम्ही नेमके उन्हाळ्यातच फार्म-हाऊस वर गेलो होतो.आमच्या फार्म हाऊसच्या इथे रेंज मिळत नाही.खूप प्रयत्न केला पण त्या आमच्या घरगड्याशी काही संपर्क होइना.घरी पोहोचलो तर घरी कुणीच नाही.आणि शेजारचे सगळेच बंगले रिकामे.मग काय? परत फलाणेवाडीला आलो आणि तिथल्याच एका हॉटेलमध्ये जेवलो आणि तिथेच राहिलो. मी : गूड.हे मस्त.शहर जवळ असल्याचा हा एक फायदाच की. तो : हो ना.मग दुसर्‍या दिवशी आम्ही तिथे गेलो तर काय.घरात बरीच घाण.दारे आणि खिडक्या बंद असल्याने घरात कोंदट हवा.शिवाय सध्या तिथे आसपास कुणीच नसल्याने, मुख्य टाकीत पाणीच न्हवते.रखवालदार पण नेमका उशीरा आला.तेंव्हा समजले की पंप जळालेला आहे आणि सोसायटीला अद्याप सेक्रेटरी नसल्याने, तो पंप काही दुरुस्त झालेला नाही.मग त्याच्या मदतीने कसे तरी संध्याकाळी वायरमनला गाठले.वायरमन म्हणाला आधी मागच्या कामाचे पैसे द्या.मगच हात लावतो.मग काय? वायरमनला पटवून त्या दिवसापुरता पंप चालू करून घेतला.चांगले ५००/-रु दिले. अर्थात सुरुवातीला ह्या अडचणी येणारच. पाणी सुरु होता-होता रात्र उजाडली तेंव्हा समजले की, घरातील काही ट्युब लाईट चालत नाही आहेत.खरे तर मागच्या वेळीच त्या बदलल्या होत्या पण आता परत बिघडल्या.रखवालदार म्हणाला की, तिथे लाईटचे फ्लक्च्युएशन जास्त असल्याने सगळ्याच घरातील ट्यूब लाईट जातात. कसे-बसे जेवण घेतले आणि झोपायची तयारी केली...तर काय? सगळ्या चादरींना कुबट वास आणि उंदरांनी पाडलेली भोके. आता घरी झोपायचा नाद सोडला आणि परत मुक्काम पोस्ट फलाणेवाडी. आता तिसर्‍या दिवशी माझी परत एक चक्कर फार्म हाऊसवर करायचा विचार होता.पण तो दिवस समुद्र किनार्‍यासाठी राखीव असल्याने मग सरळ समूद्र किनार्‍यावर गेलो.मुले तिथेच जास्त रमल्याने मग तिथेच २ दिवस राहिलो आणि मग परत मुंबईला आलो. आता परत एकदा फार्महाऊसवर जावे म्हणतो. मी : का रे? तो : अरे मागच्या वेळी, तो पंप दुरुस्त करण्याच्या वेळी, तो रखवालदार बोलता बोलता म्हणाला की, इथल्या एका सभासदाला त्याचे फार्म हाऊस विकायचे आहे.साधारण २-३ वर्षांपुर्वी त्याने २५ लाखाला विकत घेतले पण सध्या त्याला फारच आर्थिक अडचण असल्याने, तो २२ लाखाला पण द्यायला तयार आहे.बघ तुझी इच्छा असेल तर, आपण लगेच बोलणी करू. मी : बरे मला एक सांग.हे जर ३०,००,०००/- तू बँकेत ठेवले असतेस तर तुला ह्या वर्षी किती मिळाले असते. तो : आता फिक्स मध्ये ठेवले असते तर ह्या वर्षी २,५०,०००/- नक्की.पण का रे? मी : काही नाही.इतक्या व्याजाच्या पैशांत माझी आणि माझ्या बायकोची, एक १५-२० दिवसांची कंबोडिया ट्रिप नक्कीच झाली असती. तो : अरे कंबोडिया काय बघतोस? त्यापेक्षा आमचे फार्म हाऊस बघ. आता पुढे मला काही बोलवेना.

वाचने 63844
प्रतिक्रिया 135

प्रतिक्रिया

In reply to by टवाळ कार्टा

टका, लेका नीट मोज. चार धागे झाले की. "कट्टा मानवला." नाही रे बाबा, आज खूप दिवसांनी शेतीच्या भानगडी तून सुटका झाली. अजून थोडा वेळ थांबलास तर, एका धाग्याला उत्तर पण द्यायचे होते, तेच लिहीत आहे. ते पण वाचता येईल.

फार्म हाउससारखेच "वीकेंड होम" यावर पण लिहा...माझ्या घरच्यांच्या डोक्यात खूळ शिरले आहे...आयुष्यात पहिल्यांदाच ढीगभर पैसे नसल्याचा आनंद झाला

In reply to by टवाळ कार्टा

म्हणजे साधारण ४५ लाखाच्या आसपास. तितकेच पैसे बँकेत टाका आणि त्या व्याजावर दरवर्षी एक महिना सहकुटुंब परदेशी सहल काढा.

In reply to by टवाळ कार्टा

कॄपा करुन असं नका करू हे सांग घरच्यांना... त्यापेक्षा आसनगाव वैगरेंकडे एखादं घर घ्या. इन्वेस्टमेंट उत्तम होईल. सेकंड होम हे लोन काढून घ्यायची गोष्ट नव्हे. तो ब्लॅकमनी लपवण्याची व्हाईट कॉलर मखलाशी आहे.

In reply to by मुक्त विहारि

थोड्या दिवसांनी मुविकाकांच्या लेखनाला अशा टिपा असतील. . बाया खुरपायल्यात, तवर टाकला एक लेख. पावसानं काय ओढ दिली नाही, तवर टाकला एक काकू. ट्रॅक्टर काय आला नाय अजून, टाकतो एक भटकंती. बागवान येतो म्हणाला बघायला, टाकतो एक कथामाला. डीसीसी ला आलेलो पीक विमा न्यायला, टाकतो एक क्रमश:. . मुविकाका शेती सिरियसली करा पण माझा प्रतिसाद हलका घ्या बरका. ;)

Farm / farm house and second home are 3 distinct catagories

फार्म हाऊस घेणाऱ्या लोकांना एकरी २-३ लाख रुपये महिना "करमुक्त" उत्पन्न येते. म्हणून लोक ते घेतात. मग त्या जागेत गवत किंवा तण माजलेले असेना का? सगळ्या सिने नटांची पनवेल कर्जत जवळ फार्म हाऊसेस आहेत. आणि तेथे उत्तम शेती होत असते आणि भरघोस उत्पन्न निघते असे आयकर विभागाच्या कागदपत्रांवरून समजते.

In reply to by सुबोध खरे

असेच लोक सर्वसामान्यपणे फार्म हाऊस वर पैसे खर्च करतांना मला दिसले. किंबहूना, कोकणातील जमिनींचे भाव वाढवायला आणि ज्याला मनापासून शेती करायची इच्छा आहे, त्याला अनावश्यक भांडवली खर्च करायला हे फार्म हाऊस वाले भाग पाडतात. मध्यंतरी एका जागेची टेलीफोन वरून चौकशी केली. त्याने पहिल्याच फटक्यात सांगीतले, की, ते फक्त डॉक्टर, सी.ए., किंवा बिझनेसमन ह्यांनाच जमिन देतात. कारण एकरी भावच ८० लाख (होय गुंठ्याला २ लाख) रुपये आहे.कारण जागेत भरपूर झाडे आहेत आणि तुम्ही हवे तितके उत्पन्न दाखवू शकता. असो, मी आपला ८० लाख कधी मिळालेच तर सरळ बँकेत ठेवीन आणि त्या व्याजावर जगीन.

In reply to by मुक्त विहारि

मी आपला ८० लाख कधी मिळालेच तर सरळ बँकेत ठेवीन आणि त्या व्याजावर जगीन.
आता बँकांचीही शाश्वती नाही राहीली हो काका!

In reply to by मुक्त विहारि

हे तर गुंतवणूकीचे तत्वच आहे. वय, पिंड, कौटुंबिक जबाबदार्‍या यानुसार परत बदल होतात. वय वाढत गेल की रिस्की गुंतवणुक नको वाटते. सुरक्षित गुंतवणूकीकडे कल असतो.

In reply to by प्रकाश घाटपांडे

हे साहजिक आहे .... त्यात चुकीचे काहीही नाही.... मुली असतील तर, अजिबात रिस्क घेऊ नये... मुले असतील तर, शेती तील गुंतवणूक उत्तम...

In reply to by मुक्त विहारि

कोकणात कोणत्या गावात आहे ह्यांची जरा माहिती देता का. हायवे किंवा शहराजवळ ची ठिकाण सोडून. जिथे फक्त शेती होवू शकते अशी जमीन दोन लाख गुंठा आहे हे काही पटत नाही. तुमच्या कडे सर्व ऐकीव माहिती असते.असे मला वाटत.

In reply to by गवि

अद्याप तरी तयारी परिपुर्ण नाही. पण निदान फार तोटा होणार नाही, इतपतच (कागदोपत्री) तयारी झाली आहे. किंबहूना शेती ही फार विविध प्रकारे केली जात असल्याने, प्रत्येक वर्ष हे प्रयोगाचे आणि देवाचे.

तीस लाखाला घर आणि अर्धा एकर जागा? फारच आतबट्ट्याचा व्यवहार आहे. मात्र वर चंपाबाई लिहितात त्याप्रमाणे शेती, फार्महाऊस आणि गुंतवणूक म्हणून दुसरे घर घेणे हे तीन वेगवेगळे प्रकार आहेत नक्कीच.

In reply to by पैसा

पैसा ताई सरकारी वरकड उत्पन्न असते त्यात अशी फार्म हाऊस विकत घेतली जातात सुरुवातीचा व्यवहार आतबट्टयाचा वाटतो( मध्यम वर्गीयाला) पण हेच फार्म हाऊस नंतरचे वरकड उत्पन्न पांढरे करायला उपयोगी पडते. आमच्या शेजारील इमारतीतील फ्लॅट २.५ कोटी रुपयाला आहेत तेथे राहणारे "महापालिके"तील सर्व लोक पगार ६०-७०,०००/- वाले आहेत. आयुष्यभराचा पगार टाकला तरी ते घर त्यांना विकत घेणे परवडणार नाही. पण घर जाऊन पाहिले तर इटालियन मार्बलची फरशी दिसते. तुम्ही आपले ग्राहक पेठेतून स्वस्त धान्य कुठे मिळेल याची चिंता करता. असेच आहे.

तो : साधारण पणे ३०,००,०००/- खर्च झाले.जवळपास अर्धा एकर जागा आहे.शिवाय त्यात आंबा,नारळ इत्यादी झाडे पण आहेत.
लेख जरी काल्पनिक असाला तरी, निदान महाराष्ट्रात कायदेशीरपणे अर्धा एकर जागेत फार्महाऊस बांधता येत नाही. कमीतकमी १ एकर शेतजमिनीची अट आहे व त्यावर जास्तीतजास्त १००० स्क्वे.फू. बांधकाम करता येते, शेतकरी असण्याची अट आहेच. शेतकरी नसलेंल्यांसाठी गुंठेवारी प्लॉट पाडून तेथे बंगले बांधून 'फार्महाऊस' म्हणून विकणारे व घेणारे भरपूर आहे. अशा जमिनीतून घेतलेले कोणतेही उत्पन्न हे करमुक्त नसते.

In reply to by मार्मिक गोडसे

परंतु, फुकटच्या पैशांनी सूज चढलेल्यांना या तथ्याशी काही घेणेदेणे नसते. सिस्टिम कुठे कशी किती वाकवता येते, याच्या स्वानुभवाने अशी मंडळी तरबेज झालेली असतात.

नुकतच पुंजी पणाला लावून फार्म हाउस घेण्याच्या बायकोच्या प्रयत्नाला अपयश आणण्यात यशस्वी झालो. तिला लेख वाचायला दिला. आम्ही आमच्या वडिलोपार्जित शेत्या विकल्या व गावकी आणि भावकी पासून दूर झालो. पुनर्वसनाच्या बोजा मुळे अजून ही नाव माझेच आहे शेतीवर. म्हणजे मी अजूनही शेतकरीच आहे.

या लेखाची लिंक मी अनेकांना फॉर्वर्ड केली. एकदा का हौसेला मोल नसते हे मान्य केले की उत्साहापोटी त्यात किती पैसे घालावे याचे तारतम्य रहात नाही. इतरांनी फॉर्म हाउस बांधावीत व आपण त्यात चार दिवस जाउन एंजॉय करावे. ज्यांच्याकडे अतिरिक्त पैसा आहे त्यांनी जरुर ती घ्यावीत. म्हणजे इतरांचाही फायदा. एकदम विन विन सिच्युएशन. मग कधी घेताय फॉर्महाउस? :)

फार्म हाउसच नव्हे तर सगळ्या मालमत्तांबाबत हीच तर्‍हा आहे. पहीले कर्ज काढुन मालमत्ता घ्यायची, मग अजुन पैसे घालत राहुन कधी विहिर, कधी कुंपण, कधी वीज्,रखवालदाराचा पगार, वावर नसल्याने अधेमधे होणार्‍या चोर्‍या किवा अतिक्रमणे,झाडे तोडणे हे नुकसान सहन करायचे आणि परतावा काय? तर वर्षात कधीतरी ४ दिवस तेथे जाउन राहायचे.फ्लॅट जरी घेतला तरी सोसायटीच्या कटकटी, मेन्टेनन्स, भाडेकरुच्या कटकटी, एजंट्चे ताप हे आहेच. थोडक्यात तुन्ही स्वतः रहाणार असाल तर कुठलीही मालमत्ता खरेदी करावी नपेक्षा मुविकाकांनी वर म्हटल्याप्रमाणे एफडीत नाहीतर म्युचुअल फंडात पैसे टाकुन सुखी असावे आणि वर्षाला एक परदेश दौरा करुन हौस भागवावी.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

तो किडा असतो. उत्साहाच्या भरात सर्वसामान्य लोक तिथे आकर्षित होतात. नंतर तोटा लक्षात आला तरी कॉग्निटिव्ह डिझोनन्स असतोच स्वतःची समजूत घालायला. शिवाय हौसेला मोल नसते याचा अर्थ हौस ही अमूल्य गोष्ट आहे तिची किंमत फायदा तोटा मधे करता येत नाही.

In reply to by प्रकाश घाटपांडे

अर्थात, कुणी किती मोल त्यासाठी खर्च करावेत, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्र्न आहे, माझ्या ओळखीतील एकाने, 60-70 लाख, एके ठिकाणी गुंतवले आहेत. बंगला आणि 2-4 गुंठे जागा आहे ... गेल्या 7-8 वर्षांत, तो जेमतेम 15-20 वेळाच तिथे जाऊ शकला ... बंगला अशा ठिकाणी आहे की, तो भाडेकरू पण ठेऊ शकत नाही आणि देखभालीचा खर्च, दरमहा करावा लागतो, तो वेगळाच... मोठ्या लोकांच्या मोठया गोष्टी. सर्व सामान्य माणसाने, हे पांढरे हत्ती पोसू नयेत.... हे माझे वैयक्तिक मत आहे...

In reply to by मुक्त विहारि

वेल्हे तालुक्यात कमलिनी कुटीर च्या जवळ एक शेतजमीन आपण दोन तीन जणात घ्यायची अस म्हणतीये. २० लाख तरी घालावे लागतील त्यासाठी पीपीएफ काढू, सोन काढू, एफडी मोडू, नातेवाईकांकडून व्याजाने/उसने घेउ असे बायको म्हणू लागली आहे. एकच मुलगी आहे व जावई आर्मीत आहे. ते त्यांच्या त्यांच्या कामात व्यस्त असतात. एक रो हाउस आहे . त्याचे भाडे येते. माझी पेन्शन आहे.माझे मते आता आयुष्याच्या उत्तरार्थात कोणती रिस्क न घेता. आवरते घ्यावे. पुंजी वा संचिताचा लाभ घ्यावा. स्थैर्य महत्वाचे आहे. माझे अल्पसंतुष्टत्व हे तिला आता डिप्रेशन वाटू लागले आहे. मरायची वाट बघत जगायचे याला काय अर्थ आहे ? असे ती म्हणू लागली आहे. मी हे गांभीर्याने लिहितो आहे. मला खरच चिंता वाटू लागली आहे. कृपया उपाय सुचवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

सध्या माझ्यावर कुठलेही कर्ज नाही.देणे नाही, सरकार वेळेवर पेन्शन देत आहे. वाचन, लिखाण, व्याखान , करमणूकीचे कार्यक्रम, वादसंवाद, संगीत, पुस्तके,नेट मुशाफिरी यात मला आनंद वाटतो. ते मी करतोच आहे. विनाश काले विपरित बुद्धी या सुभाषिताचे मला भय वाटते. या टप्प्यात कमी ताण घेउन आयुष्य आनंदात जगावे या मताचा मी आहे. ये जीना भी कोई जीना है लल्लू असे कुणीतरी अतिउत्साही मला म्हणतोय अस वाटतोय. असो विस्कळीत वाटल तसच मिपा आपल वाटल म्हणून लिहिल

In reply to by प्रकाश घाटपांडे

माझ्या जालीय प्रवासाचे इथे अनेक साक्षीदार आहेत. काही ठिकाणी मतभिन्नता असली तरी मिपाकर माझे हितचिंतक आहेत यावर माझा ठाम विश्वास आहे. म्हणून मी इथे हे लिहितो आहे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

भाड्याने शेती करायची.... पण, इथेही फसवणूक खूप होते... शिवाय, भाड्याने शेती करायची असेल तर, 5 महत्वाच्या गोष्टी आहेत. 1. किमान 30 ते 40 वर्षांसाठी हवी 2. एकरी 1-2 लाख रूपये खर्च करायची तयारी हवी 3. एकलकोंडे पणाची सवय हवी, गावकरी जवळ करत नाहीत 4. मजूर वर्ग लुबाडतोच 5. स्वतःकडे चारचाकी हवी, मेडिकल, शेतीचे सामान आणि इतर गोष्टींसाठी

In reply to by प्रकाश घाटपांडे

१. निवृत्तीनंतर शेतजमीन घेऊन त्यातून उत्पन्न कसे मिळवणार हे नक्की केले आहे का? जमीन कसण्याबाबत कोणा इतरावर पूर्ण अवलंबून रहण्यात अर्थ नसतो. २. केवळ गुंतवणूक म्हणून जमीन घेऊन ठेवायची असेल तर दोघातिघांत मिळून घेण्याने पुढे अनेक पातळ्यांवर अडचणी येऊ शकतात. विक्री करुन आपला वाटा घेऊन एक्झिट करणे गुंतागुन्तीचे ठरू शकते. न होवोत, पण वाद होऊ शकतात (मी प्रत्यक्ष कष्ट केले, तुम्ही फक्त वाटा घेतला इ इ ). तुमचे मतभेद जरी झाले नाहीत तरी पुढच्या पिढ्यांचे काय? पुढे पिढ्या वाढल्या की वाटेकरी वाढतात. ते जगभर विखुरले जाऊ शकतात. विक्रीसाठी पुढाकार घेणारा मिळणे अवघड़ होते. असंख्य वाटे निर्माण झाल्याने प्रत्येकाला येणारा वाटा लहान होत होत कुणालाच पुरेसा इंटरेस्टिंग न वाटल्याने देश विदेशातून सर्वांना एकत्र आणणे दुरापास्त होऊ शकते. जमीन भिजत घोंगडे प्रकरण होऊ शकते.

In reply to by गवि

मुळांत, प्रत्येक जमिनीची प्रतवारी वेगळी असते, हवामान वेगळे असते, एकच गोष्ट काॅमन असते आणि ती म्हणजे फसवणूक....

In reply to by गवि

१) उत्पन्न हा हेतुच नाही. केवळ हौस म्हणून घ्यायची असे बायकोचे म्हणणे आहे. मला त्यात काहीही रस नाही हे वर लिहिले आहेच २) हौसे परी हौस हाच मुद्दा. जमीनेचे भाव वाढतच असतात. त्यामुळे गुंतवणूक म्हणूनही त्याचा उपयोग होईल हा बायकोचा मुद्दा

In reply to by प्रकाश घाटपांडे

माझे फार्म हाऊस नाही, पण माझी शेती आहे. त्यातील माझा अनुभव असा: पश्चिम महाराष्ट्रात चांगल्या जमिनीला उत्तम किंमत येते. कितीही उत्तम उत्पन्न आले तरी (ऊसासारख्या पिकाची शेती करणार्‍या आमच्यासारख्या आळशी शेतकर्‍यांसाठी) वर्षाकाठी पाच टक्के देखील परतावा येत नाही. हे सगळे वंशपरंपरागत चालत आलेली शेती असताना. नवीन शेती विकत घेतली तर हे सगळेच हिशेब बदलतील. लहानपणापासून शेतीची माहिती असूनही माझी शेती अजिबात फायद्यात नाही. त्यावर माझे पोट अवलंबून नाही म्हणून ती मी आजवर विकली नाही, इतकेच. आनि शेवटी, पन्नाशीनंतर, साठी जवळ येऊ लागलेली असताना, मानसिक शांततेइतके दुसरे काहीच महत्त्वाचे नाही असे मला वाटते. फार्म हाऊसची उदाहरणे वर दिलेली आहेतच. शेवटी हे सगळे ज्याच्या त्याच्या 'कंफर्ट झोन' वर अवलंबून आहे. आपल्याला ज्यात आनंद वाटतो ते आपण करावे. या वयात सगळी पुंजी मोडून असे काही करावे असे मला अजिबात वाटत नाही, मग भले त्याला कुणी डिप्रेशन का म्हणो. पण हे माझे मत आणि प्रकाशराव, मीही तुमच्याच गोत्राचा माणूस. आपले विचार कुणाला अजिबात पटले नाहीत, तर मला नवल वाटणार नाही. असो.

In reply to by सन्जोप राव

मग पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी सधन कसे काय गणले जातात मला शेतीचा वैयक्तिक 6 वर्षे अनुभव आहे. ( लहानपणीपासून मोजला नाही कारण तेव्हा निर्णय मी घेत नव्हतो , फक्त काम करत होतो) आजवर माझी ऊस शेती कधीही तोट्यात नाही. पावसाने एक लागण गेली पण नंतर खोडव्यात लेव्हल झालीच. सांगलीत आमच्या पंचक्रोशीत कोणीही शेती विकत नाही. योग्य पद्धतीने केली तर शेतीत फायदा नक्कीच आहे. लागण, लागवड , भांगलन , 3 -5 वर्षामागे ड्रीप चा खर्च, स्वतःची मजुरी पकडून सांगत आहे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

घाटपाडें साहेब तुमचा विचार बरोबर आहे. आता स्वताःसाठी जगा. आजच सुचलीय बघा पटतय का? मी तर सगळी खाती बंद केली आहेत. सल्ला विचारला म्हणून देतोय....... पुरूष एक वाल्या कोळी आयुष्यभर विणतो जाळी पापाचा घडा मात्र शेवटी त्याच्याच भाळी जाळ्यात शिकार फसेल म्हणून वाट बघत बसतो कर्तव्य पुर्तीचा भ्रम उगाच जपत आसतो पुरूष एक वाल्या कोळी..... तहान नाही भूक नही. बसला होता नाक्यावर डोक आलं जाग्यावर आप्तानी जेव्हा मारलं फाट्यावर पुरूष एक वाल्या कोळी...... नारायण नारायण जाप करी नारदाची आली स्वारी ऐकुन विनंती वाल्याची म्हणती,त्रेता मधे एकच होता पुरूष एक वाल्या कोळी...... कलीयुगी सारेच वाल्या एवढे राम कोठून आणू नाही केवट नाही राम ज्याचे ओझे त्यालाच घाम कलियुग आहे बाबा, खुळ्या भ्रमात नको राहू दुसऱ्याच ओझं नको वाहू पुरूष एक वाल्या कोळी...... नारायण नारायण म्हणत गेले वाल्याचे डोके ठिकाणावर आले पण आता काय उपयोग जेव्हां सारे पोपट गेले उडुन

In reply to by प्रकाश घाटपांडे

कविवर्य बा भ बोरकर यांच्या कवीतेप्रमाणे. आता विसाव्याच्या क्षणी मस्त जगायचं कुणी कुणासाठी थाबंत नाही कुणी कुणाच्या आयुष्याला पुरत नाही आस म्हणाल तर काही अर्थच उरत नाही असेल तोवर मस्त रहायचं नंतर फक्त आठवणींत जगायचं

In reply to by कर्नलतपस्वी

आर्थिक, शारीरिक, मानसिक ताकद असेल आणि कौटुंबिक मान्यता असेल तर, सामाजिक कामे पण करू शकतो... सामाजिक कार्य करण्यासाठी, ह्या चारही गोष्टी हव्यातच...

In reply to by कर्नलतपस्वी

'यावज्जीवेत् सुखं जीवेत् ऋणं कृत्वा घृतं पिबेत्। भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः।।" असा अर्थ बोरकरांना अभिप्रेत आहे का?

In reply to by प्रकाश घाटपांडे

रोजचा खर्च चालण्यासाठी तुमच्या कडे पेन्शन आहे,औषध किंवा बाकी extra खर्च निघाला तर रो हाऊसेस चे भाडे आहे . म्हणजे खर्च कसा चालणार,आजारी पडलो तर उपचार साठी पैसे कोठून येणारं ही समस्या तुम्हाला नाही. एक महत्वाची समस्या वर कायम स्वरुपी उपाय तुमच्या कडे. आता काही तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी पैसे कमवायचे नाहीत. तुम्हाला तुमचे छंद जपता आले पाहिजेत कोणत्यातरी कामात गुंतून राहिले तर विरंगुळा सुद्धा मिळतो आणि समाधान सुद्धा मिळते. शेती तुम्ही छंद म्हणून घ्या गुंतवणूक म्हणून नाही. पण कर्ज काढून नको आणि जास्त पण नको. तुमच्या राहण्याच्या ठिकाणापासून जवळ ,कोणतीच समस्या नसलेली आणि पाणी उपलब्ध असलेली १० गुंठे जमीन पण खूप झाली. त्या जमिनीत तुम्ही विविध प्रयोग करू शकता. कोणतेही रासायनिक खत न वापरता भाज्या,फळे पिकवू शकता आणि उत्तम दर्जा चे अन्न निर्माण करू शकता. झाडांच्या सानिध्यात दिवस कसा छान जातो. त्यांना वाढताना बघून खूप आनंद आणि समाधान मिळते. पण तुम्हाला त्या ची आवडा असेल तरच. आता फक्त आपले छंद जपायचे आणि त्या मधून पैसे मिळाले तर बोनस.

In reply to by प्रकाश घाटपांडे

रोजचा खर्च चालण्यासाठी तुमच्या कडे पेन्शन आहे,औषध किंवा बाकी extra खर्च निघाला तर रो हाऊसेस चे भाडे आहे . म्हणजे खर्च कसा चालणार,आजारी पडलो तर उपचार साठी पैसे कोठून येणारं ही समस्या तुम्हाला नाही. एक महत्वाची समस्या वर कायम स्वरुपी उपाय तुमच्या कडे. आता काही तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी पैसे कमवायचे नाहीत. तुम्हाला तुमचे छंद जपता आले पाहिजेत कोणत्यातरी कामात गुंतून राहिले तर विरंगुळा सुद्धा मिळतो आणि समाधान सुद्धा मिळते. शेती तुम्ही छंद म्हणून घ्या गुंतवणूक म्हणून नाही. पण कर्ज काढून नको आणि जास्त पण नको. तुमच्या राहण्याच्या ठिकाणापासून जवळ ,कोणतीच समस्या नसलेली आणि पाणी उपलब्ध असलेली १० गुंठे जमीन पण खूप झाली. त्या जमिनीत तुम्ही विविध प्रयोग करू शकता. कोणतेही रासायनिक खत न वापरता भाज्या,फळे पिकवू शकता आणि उत्तम दर्जा चे अन्न निर्माण करू शकता. झाडांच्या सानिध्यात दिवस कसा छान जातो. त्यांना वाढताना बघून खूप आनंद आणि समाधान मिळते. पण तुम्हाला त्या ची आवडा असेल तरच. आता फक्त आपले छंद जपायचे आणि त्या मधून पैसे मिळाले तर बोनस.

In reply to by Rajesh188

२० लाख ही काही छोटी रक्कम नाही.त्यात मातीशिवाय शेती करता येऊ शकेल काय? म्हणजे एखाद्याकडे रिकामा प्लॅट असेल तर त्यात अशी शेती २० लाखात करता येऊ शकेल काय? त्यात निरनिराळ्या प्रकारच्या भाज्या पिकवणे वगैरे उद्योग करता येऊ शकतील काय?

In reply to by शाम भागवत

या पर्यायाचाही विचार झाला आहे.तिला हवे ते करायचे स्वातंत्र्य आहेच. मी लिजवर शेती ची हौस भागवण्याचा पर्याय सुचवला तरी तसा तो मिळत नाही. व मिळाला तरी स्वत:चे अशी भावना तिथे राहत नाही. माझ्या तीन पिढ्या शेतात व गावी गेल्या. माझे शिक्शण लहानपण गावी व शेतीततच गेले. शहरात आल्यावर शेत्या झेपेना म्हणुन विकल्या.. मला त्याचे नावीन्य नाही. पण बायको पुण्यात आयुष्य गेलेली. तिचे आईवडिल प्राथमिक शिक्षक होते.

In reply to by प्रकाश घाटपांडे

लीज वर जमीन देणारा, योग्य तो माणूस शोधतो... नो प्राॅफीट, नो लाॅस, हे मिनिमम बघायला लागेल...

In reply to by शाम भागवत

फक्त शेतजमीन घेउन त्यावर हौसेपोटी फार्महाउस बांधणे एवढेच अपेक्षित. त्यापासून कुठलेही उत्पन्न अपेक्षित नाही. हौसेला मोल नसतेचा मुद्दा सध्या १) मी18 लाख गुंतवणुक करुन मी 2003 मधे कर्वेनगर मधे एक रो हाउस घेतले . त्याची आज 2021 मधे त्याची बाजारभावाने किंमत 1.5 कोटी आहे. त्याचेच भाड्याचे उत्पन्न 23 हजार मिळते. एरिया डेव्हलपिंग आहे. ज्या बिल्डर कडून घेतले त्याचेच समोर 14 मजली कॉम्प्लेक्स होतो आहे. राहत्या घरापासुन २ किमी वर स्वतंत्र रो हाउस असे लिगल स्टेटस असलेले रो हाउस आहे. एरिया डेव्हलपिंग स्टेजला आहे. सोसायटीमधे नसल्याने कमर्शियल वापरासाठी उपयुक्त व लिगल असे स्टेटस आहे.. सध्या मुलांचे डे केअर नर्सरी तिथे आहे. छोट्या कंपनीसाठी, आयुर्वेदिक पंचकर्म, खाली दुकान वरती राहणे अशी गरज असलेल्या दुकानदारांसाठी वगैरे अत्यंत उपयुक्त आहे. डीपी रोड अजून झालेला नाही. मी अल्पसंतुष्टी आहे.शिवाय आळशी आहे. रिस्क कमीत कमी घ्यावी असा कल. शारिरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असणे हे महत्वाच मानणारा. माझी मानसिकता खाली लिंकवर दिलेल्या मठ या लेखात आहे. शिवाय जुन्या मिपाकरांना माहित आहे. बायको मात्र धडपडी workholic, Multitasker, उत्साही व भरपुर क्षमता असलेली आहे. तिचा जनसंपर्कही मोठा आहे. एक मिनिट शांत बसणे तिच्या स्वभावात नाही. घरांची खरेदी विक्रि भाड्याने देणे हा व्यवसाय. विशेषत: एनाराय लोकांसाठी तिचे उपयुक्तता मूल्य फार मोठे असल्याने सतत बिझी असते. आमच्या घरात कुटुंबप्रमुख तीच आहे. http://www.misalpav.com/node/46420 २) रिअल इस्टेटच्या किमती भविष्यात किती वाढतील याचा अंदाज अनेकांचा चुकतो.अगदी बिल्डर लोकांचा देखील चुकतो. अन्यथा आमच्या गृहसंकुलात बिल्डरने स्वत:साठी अनेक फ्लॅट ठेवले असते. 2005 मधे बिल्डर कडे 25 लाखला 3 बीचके होते ते आज 2021 मधे 1.8 सीआर ला रिसेल मधे जातात. दुसरा चर्चेत मुद्दा आला तो चांगला फायनान्शियल प्लॅनरचा जो ठरवायला अवघड आहे. इथे प्रश्न विश्वासार्हतेचा येतो. माझा एक सीएफए मित्र आहे त्याच्या कडे गुंतवणूक करत होतो पण नंतर त्याच्या धनदा इन्हेस्टमेंट प्रा लि. ची दिवाळे वाजले. त्यात अडकलेले पैसे गेलेच. मिळण्याची शक्यता फारच कमी. वेळोवेळी त्याने चांगले रिटन्स दिले होते. आता सरासरीमधे शून्य किंवा ऋण म्ह्णावे लागतील. त्यामुळे सुरक्षित गुंतवणुकीकडेच कल आहे. एक फटका खाल्लाय आता नको. पुढच्या वीस पंचवीस वर्षांचे प्लॅनिंग हे देशाच्या आर्थिक धोरणावरच अवलंबून राहणार. माझा अर्थशास्त्राचा फार संबंध येत नाही. इन्कमटॅक्स पेयर असे लेबल लावून घ्यायची इच्छाही अपुरी राहीली. तिथपर्यंत पोचलोच नाही. बायको भरते टॅक्स. अल्पसंतुष्टत्वात मला आनंद व समाधान आहे. जो देगा उसका भला जो नही देगा उसकाभी भला! पेन्शन देतय मायबाप सरकार बिनचूक.तशी चिंता नाही.

In reply to by प्रकाश घाटपांडे

https://goo.gl/maps/dKGHQorYA7CvRmvY7 म्हणजे डेव्हलपिंग स्टेजचा अंदाज येईल.

In reply to by प्रकाश घाटपांडे

जर तुम्ही कधी वापरणारच नसाल, तर १.५ क्रोर चे रो हाऊस विकून बावधन वगैरे सारख्या एरिया मधे ३ बीएच के घ्या. ( उदा. https://www.magicbricks.com/propertyDetails/3-BHK-1255-Sq-ft-Multistore…) त्याचे भाडे येत राहिल - सेम अमाऊंट जी तुम्हाला आता मिळतेय. वर जे पैसे येतील त्यातून काकुंच्या इच्छेनुसार फार्म हाऊस घ्या. ९० +२० = ११०. तरीही ४० लाख राहतील - ते डिविडंट येईल अशा एमेफ, डीबेंचर्स मधे टाकलेत तर महिना ३०-३५ हजार असेच मिळू शकतील. जर २ बेडरूम चे घर घेतलेत तरी २० एक हजार भाडे येऊन, अजून पैसे एमेफ, डीबेंचर्स मधून मिळवू शकाल. रहात्या घराकरता हा पर्याय नाही. पण पडून राहिलेल्या घराला १.५ कोटी ला २४ हजार रिटर्न्स हा घाट्याचा व्यवहार आहे.

In reply to by nanaba

पडून राहिलेल्या घराला १.५ कोटी ला २४ हजार रिटर्न्स हा घाट्याचा व्यवहार आहे. यात आपण फक्त व्याजाचा/ भाड्याचा हिशेब धरला आहे. जर हीच जागा ७ वर्षांनी ३ कोटी रुपयाची झाली तर तो भांडवली नफा सुद्धा व्यवहारात धरावा लागतो. केवळ एकच भाग गृहीत धरणे चूक ठरेल

In reply to by सुबोध खरे

त्यांची दुसरी " रियल ईस्टेट" प्रोपर्टी रहाणार आहे, जीच्यात समांतर वाढ होईल. + फार्म हाऊसही आहे. (+ रहाते घर) + जर डिविडंट नको असेल तर एमएफ अधिक परतावा देऊ शकतात. ते ५८ वर्षांचे आहेत. पेंशन आहे, जबाबदारी नाही.. १५ वर्षाने काय होईल ह्याची चिंता करण्यापेक्षा आहे तो दिवस त्यांना मनाप्रमाणे जगता येईल ह्या पद्धतीन!

In reply to by प्रकाश घाटपांडे

उतार वयात हातचे सोडून पळत्याच्या मागे लागू नये. (मला तुमचे निश्चित वय माहीत नाही) तुमच्याकडे असलेले २० लाख गेल्यामुळे किंवा त्यावर मिळणार्‍या उत्पनावर पाणी सोडल्यामुळे तुमच्या राहणीमानात कोणतीही उलथापालथ होणार नसेल तर गुंतवणूक करायला हरकत नाही. निवृत्तीवेतनाशिवाय मिळणार्‍या उत्पनातून कर्जहप्ता सहज फेडता येईल इतकेच कर्ज घ्यावे. कारण आपण किती जगणार के आपल्यालाच माहित नसते. अन्यथा आपल्या पश्चात आपल्या जोडीदाराला त्रास होऊ शकतो.

In reply to by शाम भागवत

मी आता निवृत्ती तथा ५८ वयाचा आहे. पण मी २००७ मधेच स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. मुख्य मुद्दा हा आहे की आता हे २० लाख सोने, एफडी , नातेवाईकांकडून घेउन अशा प्रकारे उभे करावेत का? मला यात शुन्य रस साहे. किंवा मग ज्या घरापासून भाड्याचे उत्पन्न मिळते ते घर विकणे हा पर्याय राहतो

In reply to by प्रकाश घाटपांडे

मुख्य मुद्दा हा आहे की आता हे २० लाख सोने, एफडी , नातेवाईकांकडून घेउन अशा प्रकारे उभे करावेत का?
असे अजीबात करू नका असे माझे वैयक्तीक मत! परंतु हाती उपलब्ध असलेल्या रकमेतुन वर राजेश भाऊंनी म्हंटल्याप्रमाणे १० कींवा ५ गुंठे जमीन घेता येणे शक्य असल्यास तसा विचार नक्की करा. स्थावर मालमत्ताही होईल आणी हौस (काकुंची) पण पुर्ण होईल!