कला
अजि ये प्रोभाते - आज पहाटे रविकर आला
कवी मग तो कुठलाही असो, त्याच्यात ऋषि बनण्याची संभाव्यता असते. कारण मनाच्या एका विशिष्ट अवस्थेत त्याला जे झप्पकन दिसून जातं ते तेवढ्याच झगझगीतपणे व्यक्त होणार्या शब्दांत बांधण्याचे कसब कवीकडे असते. ऋषिलाही ते दिसत असते; पण त्याला कविता करण्याची गरज पडत नाही कारण ऋषिने पाहिलेले आणि समोर मांडलेले 'सत्य' असते. म्हणून ऋषिच्या वाणीला धर्मग्रंथांत स्थान मिळते. कवीची अवस्था मात्र जाणीवेच्या दृष्टीने काहीशी खालची मानली जाते कारण कवी सत्य आणि सामान्यत: जग जसे असते त्यातील सीमारेषेचे सतत अतिक्रमण करीत असतो.
याद्या
5986
चुकवू नये अशी - कहानी
नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळावर एका दमट दुपारी ती दारातून बाहेर पडते - विद्या वेंकटेशन-बाग्ची; सहा-सात महिन्यांची पोटुशी, चालताना दम लागणारी. टॅक्सीचालकांचा गराडा तिच्याभोवती पडतो. त्यातला एक जण चलाखीने तिच्या बॅगचा ताबा घेतो आणि तिला आपल्या टॅक्सीत बसवतो. बहुतेक लोक घराचा किंवा हॉटेलचा पत्ता सांगतात, पण चालकाला आश्चर्य वाटते कारण तिला जायचं असतं कालीघाट पोलीसचौकीत.
पोलीसचौकीत ती तक्रार नोंदवते. तिचा नवरा - अर्णब बाग्ची - लंडनहून दोन महिन्यांपुर्वी नॅशनल डेटा सेंटरमध्ये असाईंनमेंटवर आलेला असताना अचानक गायब झालेला आहे; तिच्याकडे त्यांच्या लग्नात काढलेला त्याचा एकमेव फोटो आहे.
याद्या
12008
मिठी...
अधीर तो .. किंचित बावरलेली ती .. हात्तात हात..नयनात चाले रुजवात..अस्फुट अधर ते थरथरतात .. शब्द परी न सुचतात. .. सोनसळी तिची कांती झळाळे जसा मावळतीचा रवी .. उषेचा रक्तिमा गाली पसरला.. बघता हा नजारा तो देहभान हरवला.. क्षणात सावरला... हळूच घेतले कवेत तिजला.. मोहोरली ती .. अंगावर अंगावर फुले शहारा ..विसावला पळभर रवी क्षितिजावरी अनुभवण्या तो अद्बुत देखावा .. दोन देह परी एकची आत्मा..स्पंदने सांगती स्पंदनाना ..भारावली सृष्टी .. स्तब्ध दश-दिशा..जडावले श्वास ..मिठी किंचित सैलावली .. विश्वासाची वचने नयनातून समजली..नाजूक वेल ती जणू वृक्षाला बिलगली.. .
याद्या
2033
काव्यरस
बाटली
फोडली आहे बाटली .. बाटली तोडली का कधी.. नसेल तोडली तर तोडून बघा.. फोडून बघा .. बाटली तेलाची.. हो हो तेलाची.. .. एक बाटली कळकटलेली, मळकटलेली .. किंचित राकट त्या हातात घट्ट धरलेली.. जणू काही स्वप्ने गाठीशी बांधलेली.. फोडलीस तू म्हणून रागानी ती पाही .. मटकन बसून खाली.. तुकडे गोळा करी.. अर्ध्या तुकड्यात त्या वाचले होते तेल काही.. उरलेले ती बोटांनी गोळा करी.. विखुरलेली स्वप्ने वाकुल्या दाखवी.. मुक्या त्या डोळ्यात होता कल्लोळ..लागली काच रक्त वाहे भळभळ .. तमा न कशाची तिला.. हात तसाच पदरास पुसला.. परत सुरु खेळ तिचा.. भू पण स्त्री.. ती पण हट्टी .. तेल सारे सोडेल कशी.. तिचा हिस्सा तिने घेतलाच..
याद्या
3027
बार बार देखो हजार बार देखो !
ज्या काळात हेमंत कुमार, नौशाद, सचिन देव बर्मन, रोशन, शंकर जयकिशन हे लोक
प्रसिद्धिच्या शिखरावर होते त्या काळातही प्रसिद्धिपासून दूर राहून काम करणारी काही माणसे होती
कलाकारापेक्षा त्याची कला अधिक प्रसिद्ध व्हावी
असं भाग्य फ़ार थोड्यांच्या वाट्याला येतं.
संगीतकार रवी, जयदेव हे त्यापैकीच
रवी यांचे काल मुंबईत निधन झालं.
पण ते रसिकांसाठी अनेक सुरेल आठवणी मागे ठेवून गेले आहेत.
हिंदीमधे राहुलदा, लक्ष्मी प्यारे असे अनेक संगीतकार आहेत ज्यांचं काम प्रचंड आहे पण
त्यातलं श्रवणीय काम मात्र कष्टाने शोधून काढावे लागेल
याउलट आहे रवी यांचे
जरा त्यांच्या कलाकृतीवर नजर टाकूया
दिल की थी आरजू की कोइ
ये
याद्या
4076
‘प्रेमाला’ जाऊन भांडे लपविणे...
पुरुषानं कसं सडेतोड असावं. मुळूमुळू करणं हा इतरांचा प्रांत. धडाकेबाजपणा हा पुरुषाचा मूळ गुणधर्म. तो त्यानं जपला पाहिजे अन् योग्यवेळी व्यक्त केलाही पाहिजे. मनात कुढत बसणे त्याचा पिंड नाहीच. जे वाटते, जे आवडते, जे पटते ते बोलून मोकळे होणे हाच खरा पुरुषार्थ. तसेच जे मनाविरुद्ध घडते, जे आवडले नाही अन् ज्यात आपले इप्सित साध्य होत नाही त्याचा प्रतिकार करणे, बिनतोडपणे त्याचा जाहीर लिलाव करणे व त्या विरुध्द आवाज उठविणे हाच पुरुषाचा धर्म असतो.
असो. इतकं सगळं लिहिण्याचं कारण म्हणजे काही पुरुष ताकाला जातात खरे पण भांडं लपविण्याचा प्रयत्न करतात. परंतु समोरची पार्टी महाचाणाक्ष असते.
याद्या
12621
मिसळपाव
" alt="" />
" width="480" height="360" alt="" />