Skip to main content

शिफारस

बासूदांचे 'अनुभव'

लेखक भोचक यांनी सोमवार, 28/04/2008 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
बासू भट्टाचार्य एक बिनधास्त व्यक्तिमत्व होऊन गेलं. मानवी नातेसंबंध विशेषतः स्त्री-पुरूष संबंध हा त्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय. त्यावरच अनुभव, अविष्कार आणि गृहप्रवेश ही चित्रत्रयी त्यांनी दिली. काही वर्षांपूर्वी आलेला आस्था हा चित्रपटही त्याच साखळीतला होता, असे म्हणायला हरकत नाही. नुकतंच बासूदांचं 'अनुभव' हे आत्मकथनपर पुस्तक वाचलं. 'सकाळ'मध्ये काही वर्षांपूर्वी हे आत्मकथन सदरातून प्रसिद्ध होत होतं. पण एकत्रितरित्या पुस्तकातून वाचताना त्याचा आनंद काही औरच. फिल्मी मंडळींच्या आत्मचरित्रातून अनेक गोष्टी समजतात. याच वर्तुळात रहाणारी मंडळी कशी कचकड्याची असतात, हेही त्यातून दिसून येत असते.

शौर्य : नितांतसुंदर चित्रपट

लेखक छोटा डॉन यांनी रविवार, 27/04/2008 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
परवाच एक "इंडियन आर्मी" हा बेस असलेला नितांतसुंदर चित्रपट पाहण्याचा योग आला. सर्वसाधारणपणे हे असे चित्रपट म्हणजे रक्तरंजित, बटबटीत, टाळ्या घेणारे डायलॉग, प्रखर देशभक्तीचे सिन्स याने भरलेले म्हणजे थोडक्यात पैसावसूल असतात. पण "शौर्य" हा हटके आहे, हा कुठला युद्धपट नाही तर तो आहे बॉर्डर वर लढणार्‍या सर्वासामन्य सैनीकाची मानसिकता टिपणारा एक मस्त चित्रपट आणि तरीही पैसावसूल आणि हमखास पहावा असा .... पिक्चरची सुरवात होते साधारणता मध्यरात्री चालू असलेल्या आर्मीच्या दहशतवाद्यांना हुडकन्यासाठी चालू असणार्‍या कोंबिंग ऑपरेशनपासून.

"वळू":- मराठी महासिनेमा ...

लेखक छोटा डॉन यांनी गुरुवार, 03/04/2008 10:30 या दिवशी प्रकाशित केले.
परवाच्या अतिशय छोट्या पुणे ट्रीप मध्ये "वळू" नावाचा अतिशय मोठा [ महान या अर्थी] सिनेमा बघण्याचा योग आला. त्याआधी "नेटवर" व वॄत्तपत्रातून याविषयी बरेच वाचले होते त्यामुळे सिनेमाबद्दल बर्‍याच अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. यामुळेच कदाचित सिनेमाला जाताना तो एकदम तद्दन बकवास निघण्याची शक्यता वाढली होती कारण पुर्वानुभव ... पण नाही "वळू" खरच झकास आहे.

शिळा सप्तमी

लेखक सृष्टीलावण्या यांनी बुधवार, 20/02/2008 06:08 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्याकडे एकत्र मोठ्या कुटुंबामुळे सुरुवातीला शिळं उरणे हा प्रश्न नव्हता तसेच अ-तिथी (तिथी न ठरवून अचानक येणार्‍या पाहुण्यांची) कमी नव्हती पण कालौघात कुटुंबाचे विघटन झाले आणि शिळ्याचा प्रश्न उभा राहिला. शिळ्या भाताचा शक्यतो लसणाच्या फोडणीचा किंवा कांद्याच्या फोडणीचा भात व्हायचा पण सर्वांत जास्त वेळा व्हायचा तेल, तिखट, मीठ भात. कृति - भातात सढळ हाताने तेल घालावे. त्यात लाल तिखट भुकटी / उसळी मिरची (ताजी, ठसका लावणारी असेल तर प्राधान्य), मीठ, पावभाजीसाठी करतो तसा बारीक चिरलेला कांदा आणि दाण्याचे कुट आवडीनुसार घालून भात नीट मिसळून घ्यावा आणि वेळ न घालवता खावा.

आमचे पण फोटू....

लेखक अनिकेत यांनी शुक्रवार, 15/02/2008 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वपुण्याईमुळे आम्ही केरळासारख्या निसर्गरम्य जागी शिकतो. केरळात अनेक लोक जातात, पण बहुतेक सर्व कोची च्या दक्षिणेकडचेच प्रदेश पहातात. उत्तर केरळातील जिल्हे... कन्नूर, वायनाड, कोळिकोड, माही, पल्लक्कड बहुदा पहात नाहीत.... त्यामुळे तिथे छान निसर्ग पहायला मिळतो. मी असेही म्हणायचे धाडस करीन की केरळासमोर कोकण काहीच नाही. नुकतेच आम्ही पुन्हा एकदा वायनाड ला गेलो होतो... त्याचे फोटू पिकासा वर टाकले आहेत.

तूच आहेस तुझ्या र्‍हासाचा शिल्पकार

लेखक इनोबा म्हणे यांनी बुधवार, 06/02/2008 11:31 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, कृपया ही बातमी वाचा. आपल्याला काय वाटते? इच्छुकांनी या संदर्भात कृपया येथे चर्चा करावी असा मानस आहे..

पुस्तक परिचय!

लेखक पिवळा डांबिस यांनी गुरुवार, 31/01/2008 07:03 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, आज एका मराठी कादंबरीच्या विषयी लिहिणार आहे. कादंबरी तशी जुनी आहे पण त्याविषयी कुठे फारसे लिहुन आलेले वाचले नाही. माझ्या एका साहित्यिक मित्राने मला भेट म्हणून दिली होती. "वेगळी आहे, वाच", म्हणाला. म्हटले तर ही एक प्रेमकथा आहे, म्हटले तर एक शोकांतिका! प्रेमकथा म्हटली तरी प्रचलित विवाहसंस्थेत न बसणारी!! विशेष म्हणजे भारताच्या पूर्णपणे बाहेर घडलेली, किंबहुना जगाच्या सगळ्याच किनारयांपासून दूर घडणारी ही कथा. एक विलक्षण पार्श्वभूमी लाभलेली! एका निराळ्याच विश्वात घेऊन जाणारी!! लेखकाची प्रतिभा ज्वलंत आहे आणि शब्दांची निवड अचूक.

मद्यमैफलीस प्रारंभ करण्यापूर्वी म्हणायचा श्लोक.

लेखक अविनाश ओगले यांनी बुधवार, 30/01/2008 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
मद्यमैफलीस प्रारंभ करण्यापूर्वी म्हणायचा श्लोक. वदनी चषक लावा, जाम प्या परीपरीचे सहज कवन होते, जाम पिता फुकाचे पावन करी जीवा त्वा, मद्य हे पूर्ण ब्रह्म समय हरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म. -अविनाश ओगले