Skip to main content

शिफारस

अक्षयभाषा सादर करत आहे- त्रिवेणी! (फीनीक्स/मेसा)

लेखक Nile यांनी रविवार, 22/11/2009 04:35 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतंच फीनीक्स जवळील मेसा येथे सादर होत असलेल्या या कार्यक्रमाची माहिती मिळाली. अरिझोनातील मिपा सदस्यांना कळावी हाच उद्देश.

उचललेस तू मीठ मुठभर

लेखक भोचक यांनी गुरुवार, 12/11/2009 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
यंदाच्या 'मौज'च्या दिवाळी अंकात महात्मा गांधींनी केलेल्या मिठाच्या सत्याग्रहाविषयी पत्रकार अंबरिश मिश्र यांचा एक छान लेख आहे. एरवी गांधीजींनी केलेले हे एक आंदोलन या पलीकडे त्याची आपल्याला फारशी माहिती नसते. 'उचललेस तू मीठ मुठभर, साम्राज्याचा खचला पाया' या वाक्याच्या उत्तरार्धाविषयी मनात का कुणास ठाऊक खिल्लीच दाटून येते. पण या लेखातून या सत्याग्रहामागची गांधीजींची व्यापक भूमिका समजायला मदत होते. आणि खरोखरच या साध्याशा वाटणार्‍या सत्याग्रहातून ब्रिटिश साम्राज्याचा पाया गांधींनी कसा हादरवला हेही कळते.

टेराकोटा पॉटरी प्रदर्शन

लेखक अजुन कच्चाच आहे यांनी मंगळवार, 10/11/2009 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
टेराकोटा पॉटरी प्रदर्शन आमंत्रण पुण्यात येऊ शकणाऱ्या मिपाकरांसाठी खास रायगड जिल्ह्यातील इंदापूर येथील “आकार पॉट आर्ट”तर्फे भाजलेल्या मातीच्या (टेराकोटा) कलाकृतींचे प्रदर्शन दि. १२ नोव्हें. ते १५ नोव्हें. २००९ च्या दरम्यान पुण्यात कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या कलादालनात आयोजीत करण्यात आले आहे. सदर प्रदर्शनाचे उद्ग्घाटन डॉ. अभिजीत वैद्य, एम.डी.

द लायन किंग

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी सोमवार, 09/11/2009 14:04 या दिवशी प्रकाशित केले.
काल डिस्नेचा 'लायन किंग स्पेशल एडीशन' चित्रपट मिळाला आणी मी अक्षरश: हातातले काम सोडुन त्यावर तुटुन पडलो. लहानपणी बघितलेला तो सिंबा, नाला, टिमॉन, पुंबा, रफिकी सारे पुन्हा एकदा आजुबाजुला फेर धरुन नाचु लागले. आता काही वेळ का होईना लहानपण परत येणार ह्याचा मला जास्ती आनंद होता. खरतर ह्या अ‍ॅनीमेशनपटाची कथा आपल्या बॉलीवुड स्टाईलचीच म्हणता येईल. पण सादरीकरण मात्र अतिशय प्रभावी, उच्च आणी खिळवुन ठेवणारे. दिग्दर्शक रॉजर एलरला ह्या बद्दल अगदी पैकीच्या पैकी मार्कस.

विकांत - मालवण (तारकर्ली).....

लेखक नाम्या झंगाट यांनी गुरुवार, 05/11/2009 15:30 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरहो, येणा-या विकांतासाठी हापिसच्या गँग सोबत मालवण (तारकर्ली) येथे जाण्याचे प्रयोजन केले आहे. फिरस्त्यांना मालवण (तारकर्ली) बाबतचे (मार्ग, रहण्याची व जेवणाची सोय, कुठे-कुठे आणी कोणते ठिकाणी भेट दिली पाहिजे इत्यादि... )आपले अनूभव, सुचना, शिफारस "शेअर" करण्याची नम्र विनंती..... कळावे, लोभ असावा नाम्या झंगाट

फोलपटरावांची मुलाखत

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी सोमवार, 02/11/2009 21:13 या दिवशी प्रकाशित केले.
वर्तमानपत्राच्या रामरगाड्यातील वेळ काढुन मराठी ब्लॉगविश्वात स्वत:चे एक स्थान बनवणार्‍या देवीदास देशपांडे तथा डीडी यांच्या दुनियेत फोलपटराव भेटले. चित्रपट निर्माते दिग्दर्शक फोलपटराव यांची मुलाखत आहे तशी राजकारणी फोलपटराव यांची देखील मुलाखत दोन भागात आहे आपण जरुर डीडीच्या दुनियेत फेरफटका मारा.

एक ताईचा सल्ला: जो खरच फायदेशीर आहे.

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 28/10/2009 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
एक ताईचा सल्ला: जो खरच फायदेशीर आहे. आज पराशेठ चा ताईचा सल्ला वाचला अन मला माझी ताई लिहीत असणार्‍या 'साप्ताहीक सदर- ताईचा सल्ला' याची आठवण झाली. हा सल्ला जरी हलकाफूलका, खेळकर वातावरणात लिहीला गेला तरी त्यात माझ्या मते एक अतिशय चांगला सल्ला दिला गेला आहे. आजकाल सगळीकडे विज, पाणी यांच्या भविष्यातील टंचाईबद्दल बोलले जाते. तस पाहिले तर या दोन्ही गोष्टी आपण फारच हलक्या घेतो.

गार्गी अजून जिवंत आहे...

लेखक ऋषिकेश यांनी रविवार, 25/10/2009 01:23 या दिवशी प्रकाशित केले.
आज अचानक मंगला आठलेकर यांचं "गार्गी अजून जिवंत आहे" हे पुस्तक हातात पडलं. जन्मतारीख वगैरे नसणार्‍या काळात साधारण १९१४-१५ च्या सुमारास उत्तरप्रदेशात इलाहाबादला जन्मलेल्या गुलाबबाईची ही कहाणी. सातव्या वर्षी लग्न होऊन दहाव्या वर्षी मुलाला जन्म दिलेल्या ह्या गुलाबबाईने इतक्या जुन्या काळात इलाहाबाद-प्रयागसारख्या कट्टर धार्मिक परंपरा असलेल्या शहरात अंत्यसंस्काराच्या कामाला वयाच्या अकराव्या वर्षी सुरवात करून तिने "स्त्रियांनी स्मशानपौरोहित्य का करू नये?" असा प्रश्न तत्कालीन धर्ममार्तंडांना केला होता. ह्या स्त्रीबाबत लेखिका एक दोन पानी लेख वाचते आणि त्या स्त्रीला भेटायचंच या विचाराने तिचा शोध घेते.

गोष्ट छोटी डोंगरा एवढी

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शनिवार, 24/10/2009 13:14 या दिवशी प्रकाशित केले.
"अहो मरणार्‍या शेतकर्‍याला एक लाख देता, त्यापेक्षा शेतकर्‍याला जगण्यासाठी पंधरा - विस हजार द्या". कसे वाटले वाक्य ? खरेतर हा आहे संवाद (डायलॉग) तो पण निळु फुलेंच्या तोंडी. चित्रपटाचे नाव 'गोष्ट छोटी डोंगरा एवढी'. ह्या आणी अशा अनेक शेतकर्‍याची सत्य परिस्थीती विशद करुन सांगणार्‍या संवादांनी आणी प्रसंगांनी भरलेला हा चित्रपट. शेतकर्‍याच्या खर्‍या अडचणी काय आहेत ? शेतकर्‍यावर आत्महत्या करायची वेळ का येते ?

सहस्रचंद्रदर्शन

लेखक प्रशांत उदय मनोहर यांनी रविवार, 11/10/2009 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
खरडवहीतल्या देवाणघेवाणीतून हा विषय निघाला. पूर्वी माझ्या ब्लॉगवर याबद्दल माहिती दिली होती. त्यामुळे नवीन काही न टाकता तीच माहिती इथे सर्वांच्या सोयीसाठी देत आहे - हिंदू संस्कृतीत जन्मदिवस साजरा करण्याची प्रथा फार जुनी आहे. सांस्कृतिक देवाणघेवाणीमुळे जन्मदिवस साजरा करण्याची पाश्चात्य पद्धतही भारतात आता चांगलीच रूढ झाली आहे. तरी, निदान काही जन्मदिवस आपल्या संस्कृतीप्रमाणे साजरे करावेत अशी विचारधाराही अस्तित्वात आहे व त्यातून एकसष्ठी, पंचाहत्तरी, सहस्रचंद्रदर्शन, इत्यादि सोहळे लोकप्रिय झालेत. संस्कृतीचं जतन करणे ही बाब निश्चितच स्तुत्य आहे.