ठकीशी संवाद : नाटकाचा अनुभव

लेखनविषय:
लेखनप्रकार
अलीकडेच (खरं तर काही महिन्यांपूर्वी) ठकीशी संवाद बघण्यात आलं. नाटक बघणे, कळणे ह्यामध्ये आपण पुष्कळच कमी पडत असल्याची जाणीव झाली. त्यास कारण पुढील गोष्टी: 1 नाटकातले सुटे सुटे शब्द कळले. वाक्ये कळली नाहीत. अर्थ नीटसा लागला नाही. 2 दोन चार वर्षे ललित कला केंद्र अन काही वर्षे NSD Delhi अन सोबतीला FTII मधले कोर्सेस केले तर कदाचित नाटक समजलं असतं 3 समांतर नाटकाची अशी एक धाटणी, शैली असते. त्यातली काही लक्षणे ह्यात होती. अगदी ठळक होती. (Luck by chance सिनेमात नायकाचा स्पर्धक, द्वेष्टा ज्या शैलीत वावरतो, ती. किंवा "तुघलक" , "अंधा युग" ही हिंदी नाटके ज्या प्रकारे सादर केली जाणं अपेक्षित आहे ती.

पुस्तकं..

आपण सगळेच पुस्तकाला पवित्र मानतो. समग्र जगाचं ज्ञान देणारी खिडकी मानतो. "न हि ज्ञानेनसदृशं पवित्रं इह विद्यते", म्हणजे ज्ञानाइतकं पवित्र या जगात दुसरं काही नाही. असं वचन आहे. हे ज्ञान आपल्याला पुस्तकं देतात. जेव्हा माणसाला छपाईचं तंत्र अवगत नव्हतं तेव्हा मौखिक परंपरेने ज्ञान मिळवले जात होते. आपले ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, उपनिषदे,ही मौखिक परंपरेने चालत आलेली आहेत. नंतर त्यांची पुस्तकं प्रकाशित झाली. या ग्रंथांचे लेखक अज्ञात आहेत, म्हणून त्यांना अपौरुषेय असं म्हटलं जातं.

आव्वाज आव्वाज..

आमच्या सोसायटीत सगळे बंगलेच आहेत. आपापली घरं फक्त कामवाल्यांसाठी उघडून आणि त्या कामं करून गेल्यावर ती पुन्हा बंद करून सगळ्या गृहिणी टीव्हीवर, आणि आताशा ओटीटीवर सिनेमे किंवा हिंदी भाषेतल्या कौटुंबिक मालिका बघत बसतात. पण त्या अधुनमधून बंगल्याबाहेरही पडतात. भिशी,किटी पार्टी, हळदीकुंकू,बारशी, वाढदिवस,भजन, सत्यनारायणाची पूजा, इत्यादी त्या थाटामाटात आणि एकत्र येऊन साजरे करतात. यात थोडा बदल म्हणून मी त्यांना घरपोच लायब्ररी चालू करणे, रीडर्स क्लब, साहित्य कट्टा, चांगल्या वक्त्यांची भाषणे, चांगल्या गायकांच्या गाण्याचे कार्यक्रम असे अनेक कार्यक्रम सुचवून पाहिले पण त्याला शून्य प्रतिसाद मिळाला.

राहून गेलं !

लेखनविषय:
मध्यंतरी एका मैत्रिणीकडे गेले होते. म्हणजे आम्ही तिघी शाळेतल्या मैत्रीणी एका मैत्रिणीच्या घरात एकत्र जमलो होतो. दुपारी चार ते सहा वाजेपर्यंत गप्पा मारायच्या असा बेत होता. मी त्या मैत्रीणीकडे कुसुमकडे वेळेवर पोहोचले. माझी दुसरी मैत्रीण विजू तीही वेळेवर आली. व्हॉट्सॲप ग्रुप बनून दोन तीन वर्षे झाली असली तरी विजू मला समोरासमोर मात्र शाळेच्या शेवटच्या दिवसानंतर आजच भेटत होती. सुरुवातीलाच आम्ही गळाभेट घेतली. विजूबरोबर तिचा नवरा होता. कुसुमचा नवराही घरात होताच. आम्ही सगळे स्थानापन्न झालो. माझ्या लक्षात आलं की कुसुमच्या फ्लॅटच्या खिडकीबाहेरून बांधकामाच्या ड्रिलिंग मशीनचा कर्कश्श आवाज येतोय.

काही चुका, काही विसंगती..

लेखनविषय:
आपणां सर्वांनाच सुसंगत आयुष्य जगायला आवडतं. पण अनेक वेळा आपल्याला विसंगतीला सामोरं जावंच लागतं. विसंगत म्हणजे चुकीचं, योग्य नसणारं असं,खटकणारं! काही वेळा दस्तुरखुद्द आपणच विसंगत वागत असतो. विसंगतीचं किंवा चुकांचं सर्वांत मोठं आगार म्हणजे सिनेमा आणि टी व्ही सृष्टी. यात कथेतील कंटीनुईटीच्या चुका, लेखकापासून, संवाद लेखकापासून, गीतकारापासून ते अगदी एडिटरपर्यंतच्या अनेकांच्या डुलक्या हे सर्व येतं. प्रचंड गाजलेल्या, जुन्या लोकप्रिय "रामायण" टीव्ही सिरियल मध्ये अनेक पात्रांच्या उघड्या दंडावर देवीची लस टोचल्याच्या गोल खुणा दिसत होत्या.

सहज सुचलं म्हणून

सहज सुचलं म्हणून ( राजकारणसोडून छोट्या चर्चांसाठी) इतिहास, पुस्तकं, पाककला आणि इतर विषयांची चर्चा खरडफळ्यावर होते आणि मोठमोठे माहितीपर प्रतिसाद खरडफळा साफ झाल्यावर गायब होतात. तर तसे होऊ नये म्हणून हा धागा सुरू करत आहे. * आमच्या इथे एक पेपर आणि मासिके वाचनाचा एक मिनी ज्येष्ठ नागरिक कट्टा ( म्हणजे दोन बाकडी , कडाप्पा फरशी टाकून) सुरू झाला होता. परवा तिकडे एक पाटी वाचली आणि पुण्यात असल्यासारखं वाटलं. 'ज्येष्ठ नागरिक कट्टा' पाटीखाली 'राजकारण चर्चेसाठी नाही' असं लिहिलं होतं. हसू आलं. तर हा आपला धागाही राजकारण चर्चेसाठी नकोच असं ठरवलं. बघू असा चालतो.

पाकिस्तान -१३

लेखनविषय:
लेखनप्रकार
इतिहासाच्या अभ्यासकांची किंवा विद्यार्थ्यांची भूमिका नेहमी खेळातल्या पंचाप्रमाणे असावी. जेव्हा पंच मैदानात असतात, तेव्हा आपल्या देशाच्या खेळाडूने षटकार मारला तरी ते आनंद व्यक्त करत नाहीत आणि आउट झाल्यावर दु:खही व्यक्त करत नाहीत. तरीही, जेव्हा सामना भारत-पाकिस्तान दरम्यान असतो, तेव्हा दोन्ही देशांचे पंचही तटस्थ राहू शकत नाहीत. बिशन सिंह बेदी आपल्या संघाला पाकिस्तानमधून परत घेऊन आले होते कारण पाकिस्तानी पंच अन्याय करत होते. तसेच, भारतीय पंच दारा धोतीवाला भारताच्या बाजूने कायम उभे दिसले. 1965 चे युद्ध तीन आठवड्यांपेक्षा थोडे अधिक काळ चालले. पण ते का झाले? कोणाला काय मिळाले? उद्दिष्ट काय होते?

पं वसंतराव देशपांडे

मी वसंतराव मित्रहो यांनी एक सुंदर लेख लिहिल्याबद्दल अभिनंदन.त्याला प्रतिसाद द्यावा म्हणून लिहीत असताना शब्द भरकटत गेले व खुप मोठा प्रतिसाद झाला. तसेही आज तीस जुलै, कलर्स वर दिवसभरात दोन वेळेस पं वसंतराव हा चित्रपट दाखवला गेला. इतरत्र सुद्धां पं वसंतराव यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या रसीकांनी कार्यक्रम केले असतील. वाटले वेगळा धागा डकवावा. पं वसंतराव यांना जवळून बघण्याचा,बोलण्याचा योग आला होता. काही मखमली आठवणीं पैकी एक.

पुणे मिपाकट्टा सप्टेंबर २०२२ वृत्तांत: मिपाकट्टा संपन्न झाला

आज दिनांक : १७ सप्टेंबर, शनिवार रोजी सकाळी १० ते दु. २ च्या दरम्यान ठिकाण पाताळेश्वर लेणी, जंगली महाराज मंदिराशेजारी, जंगली महाराज रोड, शिवाजी नगर, पुणे - 411005 येथे अत्यंत उत्साहात साजरा झाला. एकूण सतरा (१७) मिपाकर, मिपा मालकांसहीत उपस्थित होते. त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत.

गडकरींनी पुण्यात केले 'हे' वक्तव्य... खड्ड्यात वाहन गेले की...

पुणे वार्ताहर: दि. १४ सप्टेंबर. रस्त्यातील असलेले खड्डे दुरुस्ती करणे किंवा त्या जागी नवे रस्ते करणे सरकारला लगेचच अशक्य आहे. भारतावर चीन ने राज्य केले तरच ते शक्य आहे. अशा परिस्थितीत रस्त्यांत असलेले खड्डेच वाहनचालकांच्या मदतीस येतील, कारण असल्या खड्ड्यांतूनच वीजनिर्मिती भविष्यात करू अशी घोषणा रस्ते वाहतूक मंत्री श्री. गडकरी यांनी काल पुण्यात केली. गणपती विसर्जन झाल्यानंतर आलेल्या पावसाच्या पुराची पाहणी पुण्यात केल्यानंतरच्या पत्रकार परिषदेत बोलत होते. ही परिषद रात्री ११ वाजता शासकीय विश्रामगृहात झाली. गडकरी पुढे म्हणाले की, रस्त्यांवरील खड्डे हे आपले मित्रच आहेत. त्यांना वैरी संबोधू नका.
Subscribe to प्रतिसाद