मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रकटन

लिसा लिसा - प्रेमाचा निरागस गुंता

सिरुसेरि ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
लिसा लिसा - प्रेमाचा निरागस गुंता प्रियदर्शनचे दिग्दर्शन असलेल्या अनेक चित्रपटांतील कथा हि एखाद्या शांत , निवांत , निसर्ग रमणीय गावामधे घडते . उदाहरणार्थ हिंदीतील मुस्कुराहट , खट्टा मिठा . लिसा लिसा या २००३ मधे प्रदर्शीत झालेल्या तामीळ चित्रपटामधीलही वातावरण असेच रम्य , शहरी धकाधकीपासुन दुर आहे . कथा नायक राकेश ( शाम ) हा तरुण येथे आपले वाडवडीलोपार्जीत घर , शेती एकट्याने सांभाळतो आहे . पुढे मागे पैसे कमावण्यासाठी परदेशात जाण्यासाठीही त्याचे प्रयत्न चालु आहेत . चंद्रु हा त्याचा मित्र ( विवेक ) अनेक उद्योगांत आपले पैसे गमावुन बसला आहे .

प्रेमअगन..!

पाटिल ·
प्रेमअगन. इसवी सन १९९८. फरदीन खान- सूरज, मेघना कोठारी- सपना. राज बब्बर- सूरजचा बाप+ आर्मीमध्ये कॅप्टन. स्मिता जयकर- सूरजची आई. अनुपम खेर- सपनाचा बाप+ अब्जाधीश उद्योगपती वगैरे. बीना बॅनर्जी- सपनाची आई. समीर मल्होत्रा- विशाल (सपनाचा भाऊ). पहिल्याच सीनमध्ये भर रस्त्यात झोका बांधून त्यावर झुलत जीवन आणि मृत्यूसंबंधी जांभईदार चिवचिवाट करणारी सपना दिसते आणि आपल्याला कळतं की आपली कशाशी गाठ पडलेली आहे..! विशालभैय्या आणि सपना रोज वेगवेगळ्या स्पोर्ट्सकारमधून कॉलेजला जातात. कारण अनुपमपापा अब्जाधीश आहेत. कॉलेजात एअरोबिक्सची ट्रेनर किरकोळ रजेवर असल्याने सपनावर ट्रेनिंगची जबाबदारी पडतेय..

आप मुझे अच्छे लगने लगे-२

पाटिल ·
लेखनविषय:
भाग-१: https://www.misalpav.com/node/49462 (पुढे चालू)... 'भाभी,असं कसं विसरून जाऊ सपनाला? माझा दिल दुखतो. मला आत्ताच सपनाला जाऊन भेटलं पाहिजे' रोहित-निशिगंधाभाभीचा होस्टेलच्या गेटवर संवाद चाललाय. ह्यावर भाभीचं म्हणणं असं पडतं की, 'तू सुरक्षित रहावास ह्या भूमिकेतूनच सपनाने हे नातं संपवण्याचा निर्णय घेतला आहे..! ह्यामध्ये माझा काही विशेष रोल नाही. मी फक्त हा निरोप सांगण्याचं कर्तव्य करत आहे..! याउप्परही तुला तुझ्या प्रेमाची अभिव्यक्ती करायची असेल तर तू स्वतंत्र आहेस..!

रस्ते

अनुस्वार ·
पहिल्यांदा कधी तुडवला आपण हा रस्ता? 'तुडवणारे' आपण कोण म्हणा? रस्ता तुडवायला मोठ्ठं काळीज आणि पाऊल लागत असणार. अखंड पसरलेल्या जमिनीवर नेमक्या जागी पाऊल ठेवून रस्ता रुजवायला हत्तीचं बळ लागतं. तर आता सोपा प्रश्न. पहिल्यांदा कधी वापरलात हा रस्ता? नसेल आठवत. कुणीतरी (किंवा गुगलने) दिशा दाखवली आणि तेव्हापासून अगदी सवयीचा असल्याप्रमाणे यावरून चालणं झालं असेल आजवर. किती जणांच ... कुणास ठाऊक? गंमत तर बघा. रस्त्याच्या दुसऱ्या टोकाला कोणीही उभं नाहीये. हे सांगायला की हा रस्ता आम्हाला किती मदत करतो. तो रस्ता संपला की सगळेजण आपापली दुसरी वाट पकडतात. वळून मागे सुद्धा पाहत नाहीत.

माणूस आणि पुस्तक

अनुस्वार ·
लेखनप्रकार
माणसं पुस्तकांसारखी असतात. कितीही वेळा भेटा, जवळ ठेवा, परंतु एकदा त्यांच्याशी संवाद सुरू झाला की कुणाचं कोणतं नवं रुप उलगडेल हे नाही सांगता येत. पुस्तके अशीच तर असतात. एक पुस्तक दुसऱ्यांदा हातात घेणे ही तशी दुर्मिळ गोष्ट. पण ज्यांनी असं केलंय त्यांना हे भावेल की, कधी कधी आधी वाचलेलं पुस्तक 'ते' हे नव्हतंच की काय असं वाटावं इथपर्यंत त्या नवेपणाची प्रचिती जाऊन पोहोचते. उरलेल्यांनी माणसांच्या बाबतीत मात्र हे शंभर टक्के अनुभवलं असेल. अगदी जवळचं उदाहरण घेऊ- आई. तुमच्यापैकी किती जण 'मला माझी आई पूर्ण कळाली' असा छातीठोकपणे दावा करु शकतील? अगदी बोटावर मोजण्याइतके.

भारतीय संदर्भ चौकटीची आवश्यकता

हर्षल वैद्य ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
भारतीय समाजातील वाढते घटस्फोटांचे प्रमाण आणि भाकड जनावरांच्या पालनपोषणाच्या जबाबदारीचे प्रश्न यांत काही परस्परसंबंध आहे काय असे विचारले तर साहजिकच नकारात्मक उत्तर येईल. पहिला विषय हा मुख्यतः कौटुंबिक व सामाजिक व्यवहारांविषयीचा आहे. तर दुसरा जरी काही प्रमाणात भावनिक आणि सांस्कृतिक असला तरी त्यात प्रमुख अंग हे आर्थिक स्वरूपाचे आहे. या दोन विषयांत सकृतदर्शनी तरी काहीही सामायिक दिसत नाही. त्यामुळे हे दोन्ही विषय, त्यांचे आनुषंगिक प्रश्न, ते सोडवण्याच्या पद्धती आणि त्यातून मिळणारी उत्तरे हे परस्परांपासून अत्यंत भिन्न असतील असा कोणी निष्कर्ष काढल्यास ते चूक म्हणता येणार नाही.

[लघुलेख] सोबत

तर्कवादी ·
लेखनप्रकार
स्माजात वावरताना आपल्या डोळ्यासमोर रोज अनेक गोष्टी घडत असतात. काही महत्वाचे किंवा विशेष प्रसंग दीर्घकाळ लक्षात राहतात पण कधीकधी एखादा छोटासा प्रसंगही लक्ष वेधून घेतो आणि आपला त्या प्रसंगाशी काहीही संबंध नसतानाही मनात घर करून जातो. असाच एक गेल्या काही दिवसापूर्वीचा आमच्या सोसायटीतला एक प्रसंग. सायंकाळच्या वेळी मी सोसायटीमध्ये फिरत असताना माझ्यापासून थोड्या अंतरावर एक कार मोकळ्या जागेतील पार्किंगमध्ये येऊन थांबली. कारमधून पति, पत्नी आणि दहा-बारा वर्षे वयाचा मुलगा असे कुटुंब खाली उतरले ( मी त्यातल्या कुणालाही ओळखत नसलो तरी ते पती-पत्नी व मुलगा असे कुटुंब असावे असे मानायला हरकत नव्हती ).

९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक, ३/४/५ डिसेंबर २०२१, आणि १५ वे विद्रोही साहित्य संमेलन, नाशिक, ४/५ डिसेंबर २०२१ मधील छायाचित्रे

पाषाणभेद ·
९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक, ३/४/५ डिसेंबर २०२१, आणि १५ वे विद्रोही साहित्य संमेलन, नाशिक, ४/५ डिसेंबर २०२१ मधील छायाचित्रे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक, ३/४/५ डिसेंबर २०२१ ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक,  ३ डिसेंबर २०२१, म

‘विक्रांत’

पराग१२२६३ ·
लेखनप्रकार
आज नौदल दिन. 50 वर्षांपूर्वी 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात म्हणजेच बांगलादेश मुक्तिसंग्रामात 4 डिसेंबर रोजी भारतीय नौदलाने गाजवलेल्या पराक्रमाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी 4 डिसेंबरला भारतात नौदल दिन साजरा केला जातो. त्या युद्धात पराक्रम गाजवलेल्या आणि सेवानिवृत्तीनंतर संग्रहालय म्हणून नावारुपाला आलेल्या, अल्पावधीतच मुंबईतील एक आकर्षण ठरलेल्या, पण आता इतिहासजमा झालेल्या ‘विक्रांत’वरील त्याच संग्रहालयाविषयी... ‘विक्रांत’ने गाजवलेल्या पराक्रमाची भावी पिढीला ओळख व्हावी या हेतूने त्यावर नौदलाने एक तात्पुरते पण आकर्षक संग्रहालय उभारले होते.

युवर बाॅस इज नॉट ऑलवेज राईट..

आजी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मी एका रेडिओ स्टेशन वर काम करत होते. तिथं माझे नियरेस्ट बाॅस-म्हणजे माझ्या पोस्टच्या फक्त एकच स्तर वरचा असलेले बाॅस होते. त्यांना आपण क्ष म्हणू. आमच्या दिल्ली ऑफिस मधून एकदा एक ७/८पानी बाड आलं. इंग्रजी भाषेत. त्यात भारताच्या प्रगतीचा आढावा घेणारा मजकूर होता. ते 'क्ष'नी मला दिलं. म्हणाले,"बाई याचं भाषांतर करा. अर्जंट आहे. एअरवर घालवायचंय." माझं एक वैशिष्ट्य आहे. माझ्या इतक्या वर्षांच्या नोकरीत ,अगदी मी तरुण आणि लहान वयाची असताना आणि अगदी रिटायर होईपर्यंत माझ्या ऑफिसातल्या एकाही पुरुष किंवा स्त्री कलीगने मला नावाने कधीही हाक मारली नाही. प्रत्येक जण "अहो बाई"च म्हणायचे.