वाचता वाचता वाढे.....

भारत विश्वनेता बनला आहे
२०१४ साली मा. मोदीजी यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून पहिल्यांदा शपथ घेतली. त्यावेळी सर्व भारतीयांचे मन अगदी भरून आले. भारताची वाटचाल आता सुखसमृद्धीच्या वाटेने सुरू झालेली होती.
भारतात त्यापुर्वी अनेक समस्या होत्या. लोकसंख्या, वाढती बेरोजगारी, अतिरेकी, भ्रष्टाचार अशा अनेक समस्या याआधीच्या सरकारांकडून सोडविल्या गेल्या नव्हत्या. मोदीसरकारच्या आगमनापासून या अशा समस्या सुटण्यास प्रारंभ झाला.
जतिन साधा माणूस आहे. खूप शांत माणूस आहे. कुणाच्या अध्यात ना मध्यात.
असं सागरदर्शन हाऊसिंग सोसायटीत राहणारे बरेच लोक म्हणायचे.
शांततेचा तळ किती खोल असतो याची जाणीव किंवा पर्वा वर वर पोहणाऱ्यांना नसते. त्याला एकटा मात्र कोणी म्हणत नव्हते. एकटे असण्यात एक काहीतरी अस्वस्थता, दुःख वगैरे असतं. गेलाबाजार उदास खिन्न चेहरा तरी असतो.
पण जतिनच्या आतमध्ये आता काहीच उरलं नव्हतं. त्यामुळे खिन्नताही दिसत नव्हती. त्याला एकटा तरी कसं म्हणायचं?