सरकारी इतमामात मरण.

लेखनविषय:
लेखनप्रकार
त्या काळरात्रीची ही काही प्रकाश(?)चित्रे. आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांचे सकारी इतमामात दहन होणार नाही पण मरण मात्र सहज मिळेल सरकारी इतमामात. हे सर्व फोटो मिपा सदस्य आणि एक पत्रकार श्री उदय तानपाठक यांच्या मदतीने. (मा.

नव्या दिशा (???) !!!

लेखनविषय:
लेखनप्रकार
हल्ल्याच्या नंतरचा दिवस काही नव्या दिशा घेवुन आला आहे. या दोन बातम्या पहा - यावेळच्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत ६०% मतदान झाले आहे. जी आतापर्यंतची मतदानची सर्वोत्तम आकडेवारी आहे. यात प्रथमच मतदान करणार्‍यांचा समावेश होता. मतदारांच्या प्रतिक्रिया पुरेशा बोलक्या आहेत.

बल "सागर" भारत

लेखनविषय:
लेखनप्रकार
आत्ताच "बलसागर भारत होवो" हे यशोधरा यांचे छानसे संपादकीय आले होते. त्याचा संदर्भ या चर्चेशी अप्रत्यक्ष आहे. पण या चर्चेचे शिर्षक जे आहे त्यात "भारताचे बल आंतर्राष्ट्रीय सागरात" वाढत आहे ह्या बातमी कडे वेधण्यासाठी आहे! निमित्त आहे हिंदी महासागरात विविध ठिकाणी सागरीचाचेगिरी चालते. त्यावर देखरेख करायचे काम प्रामुख्याने (या भागाकरता) भारतावर येते. हाँककाँगच्या "डिलाईट" नामक जहाजाला सोमालीयाच्या सागरीचाच्यांनी वेठीस धरले.

राजकुमार (?) साठ वर्षांचा झाला!

लेखनविषय:
लेखनप्रकार
"परीकथेतिल राजकुमारा स्वप्नी माझ्या येशिल कां ? भाव दाटले मनी अनामिक साद तयांना देशिल कां ?" अशी अस्फुट लकेर नवयौवनांत प्रवेश केलेल्या मुलींच्या मनात उठत असते. बालपणी वाचलेल्या परीकथांमधले राजकुमार झगमगते चिलखत अंगावर चढवून, रत्नजडित मुकुट डोक्यावर धारण करून, अबलख घोड्यांवर स्वार होऊन दौडत येतात, हातातल्या समशेरीने दुष्ट चेटकिणीला मारून तिच्या तावडीत सापडलेल्या राजकुमारीची मुक्तता करतात आणि तिला आपल्यासोबत घेऊन जातात. हे झाले परीकथेतले राजकुमार. आजच्या जगातला एक प्रत्यक्षातला राजकुमार जन्माला आला तेंव्हा त्याचे आजोबा जगातल्या सर्वात मोठ्या साम्राज्याचे सम्राट होते.

बेंगलोरमध्ये राहूल देशपांडेंचा नाट्यसंगीत्,भावगीतांचा कार्यक्रम

लेखनविषय:
लेखनप्रकार
बेंगलोरमध्ये राहूल देशपांडेंचा शास्त्रिय, नाट्यसंगीत्,भावगीतांचा कार्यक्रम.. (राहूल देशपांडे हे वसंतराव देशपांडेंचे नातू होत..) स्थळ :रवीन्द्र कलाक्षेत्रा तारीखः ३० नोव्हेंबर सकाळी १० ते १.३० तिकिट दरः ३००,२००,१५०,१००,७५ तिकिट संपर्क:shripad.k.ghate@intel.com (मला ही ढकललेल्या मेल मधुन माहीती मिळालेली आहे)

"झुंजुमुंजु" चा दिवाळी अंक.

लेखनविषय:
लेखनप्रकार
आपले मिपा सदस्य श्री.उदय तानपाठक यांचा दिवाळी अंक "झुंजुमुंजु" प्रकाशीत झाला आहे.श्री. तानपाठक केवळ हौशीपोटी आणि मराठीच्या प्रेमापोटी दरवर्षी हा अंक प्रकाशीत करतात.(दिवाळी अंकाचे अर्थशास्त्र सर्वसाधारणपणे तूटीच्या अंदाजपत्रकाचे असते). आपली नोकरी सांभाळून वेळच्यावेळी ,चुका टाळून,(मराठीतील एका लोकप्रिय दिवाळी अंकात प्रकाशक एक पान घालायचे विसरले आहेत.),रास्त किमतीत हा दिवाळी अंक त्यांनी आणला आहे. आता या अंकाच्या खास गोष्टी.

रांगोळी प्रदर्शन - वर्तमानाचे प्रतिबिंब

रांगोळी! मराठी माणसाच्या दिवाळीमध्ये नवे कपडे, फराळ, अभ्यंगस्नान, उटणे व दिवाळीअंक यांच्या इतकेच महत्वाचे स्थान रांगोळी व रांगोळी प्रदर्शनाला आहे. सध्या ठाणे येथे न्यु गर्ल्स स्कूल येथे रांगोळी प्रदर्शन सुरू आहे. गेली अनेक वर्षे मी हे 'बलवंत मित्रमंडळ' आयोजित प्रदर्शन महापालिका शाळा क्र. १९ येथे पाहत आलो आहे. यंदा शाळेचे पुनर्निर्माण कार्य सुरू असल्यामुळे प्रदर्शनाचे स्थळ बदलले आहे इतकेच, मात्र त्यातल्या कलाकारांचा सामाजिक दृष्टिकोन मात्र तसाच आहे.

राजला मारायला आलेल्या बिहारीचे एन्काउंटर

लेखनविषय:
लेखनप्रकार
बातमी इथे वाचा. या घटनेनंतर सर्व बिहारी नेत्यांनी एकत्र येऊन पोलिसांचा निषेध केला आहे. लालूप्रसाद यादव यांनी पंतप्रधांनांची भेट घेउन या घटनेची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. बिहारी नेते 'राहूल चांगला मुलगा होता,तो कोणी अतिरेकी नव्हता व त्याला पोलिसांनी विनाकारण मारले' असा कांगावा करीत आहेत. झी चोवीस तास या वाहीनीवर राहूल राज च्या पराक्रमाचा विडीओ दाखवला जात आहे. या विडिओमधे हा तरुण बसच्या खिडकीतून बाहेर गोळ्या झाडताना स्पष्ट दिसतो आहे तरीही लालूप्रसाद हा मुलगा निर्दोष असल्याचे सांगत आहेत.
Subscribe to बातमी