मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बातमी

अवकाशातले पाहुणे

जिवाणू ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नुकतेच ISRO ने एक प्रयोग हाती घेतला होता ,तो यशस्वी झाला आहे. अवकाशात तीन नविन प्रजातितले जिवाणु आढळले आहेत.त्यान्ची नावे शास्त्रज्ञान्च्या नावावरुन ठेवण्यात आली आहेत, नावे पुढिल प्रमाणे, Janibacter hoylei, Bacillus isronensis , Bacillus aryabhata,. बर्याच मिपाकराना या प्रयोगाबद्द्ल माहिती असेल /नसेल , म्हणुन कालच्या दै.सकाळ मधील डॉ. योगेश शोचे ह्यान्च्या ह्या लेखाची हि लिन्क द्याविशी वाटली. http://beta.esakal.com/2009/03/26114257/editorial-earth-and-environmen.html

"अर्थ अवर"

संताजी धनाजी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी, एक आवाहन! २८ मार्चला जगातील ८५ देशातील नागरीक रात्री ८:३० ते ९:३० ह्या वेळात जागतिक तापमानवाढीविरुद्ध जनजाग्रुतीसाठी दिवे बंद ठेवणार आहेत. अधिक माहीती येथे वाचा... http://www.earthhour.in - संताजी धनाजी

एन डी पाटिल - महाराष्ट्रातील एक लोकनेते - मुलाखत

बिपिन कार्यकर्ते ·
सध्या घरच्या डिशटिव्हीच्या कनेक्शनचे काहीतरी लफडे झाले आहे. वृत्त वाहिन्यांमधे फक्त झी२४तास आणि आयबीएन-लोकमत या दोनच वाहिन्या उपलब्ध आहेत. 'समथिंग इज बेटर दॅन अज्जिबात नथिंग' या न्यायाने सध्या आयबीएन-लोकमतच बघत असतो. नाविलाज आहे. पण परवा अचानक एक चांगला कार्यक्रम बघायला मिळाला. 'ग्रेट भेट' नावाचा एक कार्यक्रम असतो. त्यात आयबीएन-लोकमतचे सर्वेसर्वा निखिल वागळे हे प्रसिद्ध आणि महत्वाच्या व्यक्तींच्या मुलाखती घेतात. परवाच्या कार्यक्रमात अतिशय जुने आणि वरिष्ठ राजकारणी डॉ. एन. डी. पाटिल यांची मुलाखत घेतली गेली.

आणखी एक निवांत, मोकळा वीकांत

बेसनलाडू ·
सुनीलरावांचा एक निवांत, मोकळा वीकांत वाचून आम्हांला - म्हणजे नाटक्या, अस्मादिक आणि बबलु हे मिपाकर - आमचा गेला वीकांत आठवला - अशीच निवांत, मोकळी शनिवारची संध्याकाळ. "वीकेन्डला काय करतो आहेस?" आठवड्याच्या मध्यावर नाटक्याचा फोन आलेला. "हापिसात नसलो तर मोकळा असेन; पण शक्यता अंधुक आहे" मी. "बबलुच्या घरी कॉक् टेल् पार्टी करायचा बेत आहे. बरेच दिवसात आपली भेटही झालेली नाही. ब्याचलर् पार्टी करू ;)" नाटक्या (सौ.

किशोरी आमोणकरांच्या नव्या ग्रंथाविषयी

लिखाळ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी, आताच लोकसत्तामध्ये किशोरी आमोणकर यांनी लिहिलेल्या 'स्वरार्थरमणी' ग्रंथाबद्दल वाचले. किशोरीताईंनी त्या ग्रंथात रागसंगीताबद्दलचे त्यांचे विचार आणि संगीताच्या रसग्रहण प्रक्रियेबद्दल विचार मांडले आहेत असे समजले. लोकसत्तातील बातमीमधून ....... रागसंगीतात रसनिर्मिती होते म्हणजे नेमके काय होते, त्यामागे कोणती मानसिक आणि बौद्धिक प्रक्रिया घडते, याचा अभ्यास गेली पन्नास वर्षे किशोरीताई करीत आहेत.

चौदशपुत्रा ...? ...? ...?...?

आनंद घारे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
चौदा मुलांची आई कुमारिका तर खचित नसेल, पण आजकाल कांही सांगता येत नाही. अमेरिकेत अशी एक आई आहे, पण ती स्त्री सौभाग्यवती आहे, की अविवाहिता, की विधवा , की घटस्फोटिता याबद्दल गूढ आहे. पण तो मुद्दा या लेखाचा विषय नाही. एका विलक्षण घटनेबद्दल ज्या क्रमाने जशा प्रकारच्या बातम्या येत गेल्या त्या खूपच रोचक होत्या. त्याबद्दल या ठिकाणी मी लिहिणार आहे. "अष्टपुत्रा सौभाग्यवती भव।" असा आशीर्वाद आपल्याकडे पूर्वीच्या काळी सगळ्या मुलींना देत असत. आजकालचे 'कुटुंबनियोजन' किंवा त्यापूर्वी होत असलेले 'संततीनियमन' सुरू होण्यापूर्वीच्या काळात एकदा घरातला पाळणा हलायला लागला की तो सारखा हलतच रहायचा.

धक्कादायक पाकिस्तानात श्रीलंकन क्रिकेट टिमवर फायरिंग

दिपक ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
धक्कादायक पाकिस्तानात श्रीलंकन क्रिकेट टिमवर फायरिंग... पाच पोलीस ठार... दोन खेळाडु जखमी.. http://www.zeenews.com/archives/2009-03-03/512050news.html

सन्मान! एका रानातल्या कवीचा..!

विसोबा खेचर ·
लेखनविषय:
एक अतिशय आनंदाची बातमी..! शेतकरी कवी, रानकवी, ना धो महानोर यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानातर्फे दिला जाणारा जनस्थान हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे असे समजते.. महानोरांसारख्या अस्सल मराठी मातीतल्या एका कवीचा साक्षात कुसुमाग्रजांनीच केलेला हा गौरव आहे असेच म्हणावेसे वाटते..! कवीवर्य ना धो महानोरांचे मिसळपाव परिवारातर्फे मन:पूर्वक अभिनंदन..! -- तात्या अभ्यंकर.

श्रद्धांजली - व्हराडकार डॉ लक्ष्मणराव देशपांडे..

विसोबा खेचर ·
लेखनप्रकार
ज्येष्ठ रंगकर्मी, नाट्यशास्त्राचे गाढे अभ्यासक, 'व्हराड निघालंय लंडनला' ही अफलातून कलाकृती रंगभूमीवर आणणारे आणि गाजवणारे प्रा डॉ लक्ष्मणराव देशपांडे आज आपल्यात नाहीत. मिसळपाव परिवाराची लक्ष्मणरावांना भावपूर्ण आदरांजली...! -- तात्या अभ्यंकर.

तालिबानीस्तान !

भोचक ·
भारताची राजधानी दिल्लापासून दीडशे किलोमीटर पलीकडच्या प्रांतात भारतीय कायदे चालू शकणार नाहीत, असे सरकारनेच जाहीर केले तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? चकीत होऊन पहायची गरज नाही. भारतात असे कधी होणार नाही. पण भारताचे कधी भले न पाहिलेल्या पाकिस्तानमध्ये मात्र असे होतेय. राजधानी इस्लामाबादपासून दीडशे किलोमीटरवर असलेल्या 'स्वात' प्रांतात आता पाकिस्तानी कायदे चालणार नाहीत. पाकिस्तानी सरकार आणि या भागात वर्चस्व असलेल्या तालिबान्यांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता या भागात न्यायदानाच्या प्रक्रियेसाठी 'शरीया' कायदे लागू होतील.