मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर सरकारने भारतीय नागरिकांना अतिशय सक्षम अशा सुरक्षाव्यवस्थेची हमी दिलेली होती. सर्व राजकारणी लोकांनी अगदी जीव तोडून सांगितले की भारताच्या सर्व तपास यंत्रणा, पोलिस,सी.बी.आय, लष्कर इत्यादींना हाय अलर्ट वर ठेवण्यात आले आहे. पण ह्या सर्व यंत्रणा खरंच कार्यरत आहेत?
बहुधा नसाव्यात अशी दाट शंका यावी अशा दोन बातम्या गेल्या काही दिवसात वाचनात आल्या. आज या दोन घटना घडून सुद्धा अनेक दिवस उलटून गेले आहेत पण सरकार किंवा सुरक्षा यंत्रणा यापैकी कुणाकडूनही काही खुलासा केला गेला नाहीय.