नव्या दिशा (???) !!!
लेखनप्रकार
हल्ल्याच्या नंतरचा दिवस काही नव्या दिशा घेवुन आला आहे.
या दोन बातम्या पहा -
यावेळच्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत ६०% मतदान झाले आहे. जी आतापर्यंतची मतदानची सर्वोत्तम आकडेवारी आहे.
यात प्रथमच मतदान करणार्यांचा समावेश होता.
मतदारांच्या प्रतिक्रिया पुरेशा बोलक्या आहेत.
http://timesofindia.indiatimes.com/Cities/Delhi_polls_Terror_draws_GenX_to_vote/articleshow/3774068.cms
दहशतावादाचा सामना करण्याची प्राथमिक जबाबदारी असणार्या केंद्रिय पातळीवर राजकीय नेतॄत्व कमकुवत आहे याची जाणिव
भारतातच नव्हे तर बाहेरही झाली आहे. सध्या कोणीही राजिनाम्याची वगैरे मागणी अजुन(ही!) केलेली नाही.
कदाचित सध्याच्या परिस्थितीचा राजकीय फायदा मिळवण्याचे पितळ उघडे पडेल म्हणून राजकीय पक्षानी आणि
अपेक्षा करणंच चुक म्हणून जनतेने ..
तरीही केंद्रिय गृहमंत्री आपला राजिनामा देतील अशी ही बातमी -
http://timesofindia.indiatimes.com/Shivraj_Patil_may_quit_before_all-party_meet_Sources/articleshow/3775429.cms?TOI_latestnews
मतदानाचा निकाल मतपेटीतून जो लागेल तो (सत्ताधारी पक्षाच्या बाजुने अथवा विरोधी) लागेल पण राजकीय नेतृत्वाबद्दल
भ्रमनिरास झाला तरीही मतदान प्रक्रियेवरचा वाढलेला विश्वास एक आश्वासक घटना आहे असे मला वाटते.
तसेच, गृहमंत्र्यांनी राजिनामा अजून दिलेला नाही .. पण जरी राजकीय-प्रशासकीय अपरिहार्यता म्हणून दिला तरीही
पदासाठी 'जबाबदारी' ची 'जोखिम' तरी कळेल. यासाठी या बातमीचं महत्व ..
यातून ज्या राजकीय बदलाच्या दिशा जाणवत आहेत आत्ता खूपच धुसर आहेत, प्रतिकात्मक आहेत.
पण त्या पुढच्या वाटचाली साठी आश्वासक ठरु शकतात असे वाटते.
वाचने
1307
वाचनखूण
प्रतिक्रिया
1
योग्य