भय इथले संपत नाही.. रसग्रहण

लेखनविषय:
काव्यरस
ग्रेससारख्या श्रेष्ठ कविच्या कवितेचा अर्थ आपण आपल्या सामान्य सीमित जीवनाच्या अनुभवांच्या चौकटीतच शोधायला निघतो..... तिथे अर्थ अपुरा राहू शकतो कारण कदाचित अशा कविच्या अनुभवाचे, कल्पनेचे आणि प्रतिभेचे क्षितिज नक्कीच आपल्यापेक्षा अधिक विस्तृत असतं.... !!!

मी वळूनी हासले - चुकले जरासे

लेखनविषय:
मी वळूनी हासले - चुकले जरासे प्रश्न त्याचे टाळले, चुकले जरासे उत्तराशी थांबले, चुकले जरासे शीळ त्याची ओळखीची रानभूली मी वळूनी हासले - चुकले जरासे पाळले ना भान तू मज छेडतांना लाजले मी लाजले, चुकले जरासे भावनांना बांधले त्या, धुंद राती आज का सैलावले चुकले जरासे बंद होते द्वार माझे तव सुरांना का कशी नादावले - चुकले जरासे रोखले मी आसवांच्या आठवांना शेवटी रागावले - चुकले जरासे सोडतांना गांव जे मन घट्ट केले त्या तिथे रेंगाळले चुकले जरासे सांजछाया दाटल्या या अंगणाशी मी पुन्हा भांबावले, चुकले जरासे संध्या २६.११.२०१० रद्दीफ : एक शेर कुणीतरी एसेमेस केला होता. त्यातला चुकलो का ...

अलखपैंजणी परखडमोती

सुशिरनभाले चरित्रक्रांता लखलख दर्जा झुरतो दर्द शिरशिरी बाधा व्याकूळ साहित्याला लुचतो नवगेयाच्या शिंकाळ्यावर तीर्थ दुपारी झडतो झळझळ जिव्हा हरित भुसनळे सम्यकधावन करतो सुकल्या ओष्ठी निबंधतस्कर मारे वारे स्त्रवतो रुधिर धाबळी साजणलपलप आस्वादातून डुबतो विझल्या पणतीवरी धुराच्या नक्षीलाही गिळतो त्या वातीवर त्या गंधावर शतखंडाने जळतो चिवित्रसंध्या गरळगोजिरे मलम विषारी खलतो अलखपैंजणी परखडमोती निरोप दुर्लभ सलतो शरदिनी.... पुणे २६ मार्च २०१२

ग्रेस!!

लेखनविषय:
काव्यरस
टीचली काच बिलोरी, दुखा:चा हलला पारा, अस्फुट वेदना जाते, मग वाहे उदास वारा.. एकाकी होता कोणी, रिचवित विषाचे प्याले, हळुवार तरल जखमांचे, गुंफीत मोती ओले.. शब्दांतुन द्यावे त्याने, चरचरीत तलम हुळहुळते, अन जग शोधित बसते, त्याच्याशी आपुले नाते.. रक्तातील गहरी त्याने, काजळी लपवली नाही , नक्षीत कवडश्यांच्या, कधी प्रकाश चोरला नाही.. कोंडले आतुन काही, विष्षण्ण नाद निनादे, झुंबर दचकुन हलले, अन लोलक एक उनावे.. -- शैलेंद्र

सांजवात..

लेखनविषय:
काव्यरस
सांजवात.. शीळ तुझी दरीतली खूण तुझी सरीतली.. ओढ तुझी अंतरात रोज मुकी चांदरात.. ओल तुझी काळजात बोल तिचे आसवात साद तुझी वादळात याद तुझी काजळात आजही तू आठवात तेवते मी सांजवात.. - संध्या

प्रतिशोध

लेखनविषय:
काव्यरस
काय कायदा काय वायदा कसले पोलिस ठाणे ओलिस आहे मुके रांगणे गुंडच इथे शहाणे डोंबाच्या हाती सत्तेचे उजवे चलनी नाणे डावे पाठी री ओढे गुणगुणे पोरके अन गाणे सारे गनिमी व्याध; अमीषे त्यांची मिठास वाणी माया भरते दारी त्यांच्या अथक कृपेचे पाणी कळसावर लखलखते सोने वार सोसते कोणी आटपाटची नगरी ही तर; ताक चोरते लोणी सांग विठू तू बद्ध करांनी का अजुनी रे मौनी पायाखालिल वीट क्रयास्तव कलली पाहुन चैनी रेत जाळते पाणी रानी चौखुर आणीबाणी आक्रंदे प्रतिशोध; संयमी जनता केविलवाणी ..............................अज्ञात

रे मना ..

लेखनविषय:
काव्यरस
रे मना .. रे मना मोती पुन्हा निखळून गेले थेंब डोळ्य़ांतील हे निथळून गेले आस होती आठवांना आसवांची मेघ तेव्हां गांव हे वगळून गेले श्वास होते रोखलेले मी कधीचे भास होते खास आज कळून गेले जीव घेणे घाव देही सोसले मी शीतवारे ना कधी जवळून गेले खेळ जेव्हां जीवनाचे साहवेना शोधते वैरी कुठे वितळून गेले - संध्या (२३.२०.२०१०) गझलसम्राट कै सुरेश भट यांच्या एका गझलेतून प्रेरणा घेऊन

बळी राजाच देण ह्याजन्मि तरी फीटणार नाही.

लेखनविषय:
काव्यरस
(मराठवाडा, कोकण व इतर जागीही शेतकरी जीव देत आहेत. म्हणुन ही कविता.) आक्री त अस घडल, शेत करपुन गेल सावकारी कर्ज, डोंगरा एव्हढ झाल. वाट अशी खडतर, देव झाला गायब देव भेटला तरी , राक्षस सरकारी साहेब. पेरण्या आणल बी, सरकारवानी बोगस होत. सरकारतरी कस, मा़झ नशिब फुटक होत. विहिरीने घात केला , पाण्याने एकदम तळ गाठला. त्रासामुळे मग संसारही भार वाटला. पाणी आणायच कस? चिंतेत मन विटल जीव संपवायच वादळ, डोक्यात पुन्हा उठल. जीव दिला तरी , उत्तर मिळणार नाही. बळी राजाच देण ह्याजन्मि तरी फीटणार नाही. बळी राजाच देण ह्याजन्मी तरी फीटणार नाही.

<गोवरी>

खोपडीच्या मुळाशी किती जोर देशी उगाच्या उगाची किती कुंथीशी मानवाची नसे कोणतीही स्थिती चूर्णे खा जराशी ठेवी ती उशीशी जात जातीत भेदे अशी ती कशी जळेना कळेना मढी जाळीशी बाबारे कोरडे तरी तेच आहे लिहिशी कविता तू ती कशाने अशी यात ना काही तरी तू तोच आहे पिसारा कशाला उगा दाविशी करावे भरावे उणे तूच पाहे खपावे मरावे गोवरी जाळताहे (कविवर्यांशी ओळख नसल्याने धार मुद्दाम थोडीशी कमी केली आहे. ओळख असती तर लोकशिक्षण, मुक्त अभिव्यक्ती आणि लोकरंजन वगैरै वगैरै वगैरे सर्वव्यापी फालतूपणासाठी काही शब्द बदलता आले असते )

आज कुणी का राम व्हावे

लेखनविषय:
काव्यरस
कलियुगाचे वायदे नि, कायदे ही फोल सारे गीता वचने खरी इथे ना, शपथांना दे, मोल ना रे ........||धृ|| मृगासवे परिमाळीत गेले, गंधित क्षण या कस्तुरीचे मैफिलीभर उधळित गेले, संचितगाणे जगण्याचे दोन थेंब परि मुखी ना द्यावे, नीर कुणी का प्रेमाचे उडूनी गेली चिमणपाखरे, पानगळीचे ऋतू इथे रे .........|१| शापित जरी त्या आणाभाका, जपले बंधही सरणाने करार नामे अती जाहले, पाळले ना मरणाने शिळा बनावे, कसे कुणी ..ना, राम स्पर्शितो चरणाने आज कुणी का राम व्हावे, भरत इथे निर्मळ ना रे......... |२| - संध्या
Subscribe to करुण