निरोप

लेखनविषय:
काव्यरस
थरथरणारे ओठ लपविती व्यथा मनीची दुखरी आवाजातून शब्द सांगती कथा तुझी ग दुसरी निरोप देण्या आलीस तू जरी स्मितकळ्या लेवूनी कशा खुलाव्या तव वदनी त्या कळा खोल दाबूनी बळे रोखीले अश्रु पुसती राहू तुजविण कशी मी कांता ओठातील आवाज बोलती मुळी करू नको माझी चिंता लटिके ऐसे का बोलावे गुलाब पंखी ओष्टकळ्यानी वाटे हळूच उकलावे का गुपित त्यांचे मम अधरांनी पर्ंतू आहे ठावूक मजला आत साचले प्रच्ंड वादळ स्पर्श जरासा होता माझा, लाटांचे उफळतील सागर मुठीत ओला रुमाल लपवुनी वळलो तुजला सोडुनी जाता, पाठीचे मग मिटले डोळे, चिंब नेत्रवती तुजशी बघता

मी रडण्यासाठी नाही जन्माला आलो...!!

लेखनविषय:
काव्यरस
मी सूर लावूनी मस्त जगत गेलो मी रडण्यासाठी नाही जन्माला आलो मी दुख पाहिले तरीही नाही खचलो मी शांतपणे दुखही भोगित गेलो मी होतो कोठे..?

!!...'मानवी भूकंप'...!!

लेखनविषय:
!!...'मानवी भूकंप'...!! गोष्ट आहे ही एक ग्रासलेल्या मुलीची दरड कोसळली एके दिवशी तिच्यावर कृत्रिम आपत्तीची... असा काही झाला होता तिच्या मनावर आघात 'मानवी भूकंपा'चा घडला होता कृत्रिम अपघात... भूकंपाचे केंद्र होते जवळचेच एक घर राहात होता तिथेच तिचा तो 'प्रियकर'... प्रेमात असा काही दिला होता त्याने धोका एकाच फोन कॉल ने बसला होता तिला मोठा धक्का.. त्याच्या दूर जाण्याने तिच्या पायाखालची जमीनच हादरली होती मनाच्या भूकंपाची ती तीव्रता रिश्टर स्केलवर देखील मोजण्याजोगी नव्हती.. मनाचे तुकडे दिसत होते सर्वत्र विखुरलेले.. अन, आठवत होते जुने दिवस जेव्हा गीत नवे स्फुरलेले.. मानवी भूकंपामुळे जरी झाली हो

सरळ रस्ता

लेखनविषय:
काव्यरस
जीवन म्हणजे एक सरळ रस्ता किती तरी होतात मनाला खस्ता | आनंदाला हि नाही कुठं कट्टा दुःखांनी सुधा मांडला सर्वी कडे सट्टा | रात्र व दिवस ह्यांचा नुसता पोर खेळ ह्यामध्ये सावलीचा ही कुठं नाही बसत मेळ | नाला, नद्यांनी बदलला मार्ग पण रस्ता मात्र सरळ| -- मयुर (नवकवी)

<<< यक्षावाणी शापीत जगायचे ..!! >>>

लेखनविषय:
काव्यरस
प्रेरणा : http://www.misalpav.com/node/20497 आंजाच्या खफवर मी फ्लर्ट करीत बसायचो तिच्यावर गेम साधण्यासाठी काही 'चाल' शोधीत असायचो मला हवे ते काव्य मिळत नव्हते काय करावे कळत नव्हते..? कधीतरी ती भांडली होती भटोर्‍यासारखी फुलली होती काहीतरी बोलायचे होते व्यनी-मनी पुढ्यात होते पण थापा पटल्याच नाही धाग्यातले धाग्यात मरुन गेले हे कसे झाले ,,? हे कधी झाले ..?? तिच्या डोळ्यात दबंग सले ,!! कसे स्वप्न बघत होतो रोजच पिवुन झुलत होतो मग जागा झालो नि हे काय झाले ,? नातेच मुळी हरवून गेले शब्दच कसे मुखावरी आले ..? शब्द बंबाळ ... नि माझे शब्द ठसवुन गेले 'जिव्हा ताबा कर' विसमृतीत गेले हे शप्पत खरे आहे हल्ल

प्रचंड गारठा

------ भाग १: ------ प्रचंड गारठा...... चक्क शून्यावर घसरलाय पारा......! बर्फ़च घेऊन जणु बाहेर वाहतोय सुसाट वारा ! सूर्यकिरणांनी चकाकतोय दवबिंदू... की पारा? निसर्गाने उघडलाय बघ! सौंदर्याचा गाभारा.... माझ्या हातात तुझा हात उबदार जरा... तुझ्यासवे चालत चालत सरावा जन्म सारा.... प्रचंड गारठा...... चक्क शून्यावर घसरलाय पारा......! तुझ्यासह घालवलेला क्षण क्षण न्यारा....! ------ भाग २: ------ प्रचंड गारठा...... चक्क शून्यावर घसरलाय पारा......! झोपावे जरा, अजून कामाचा शीण नाही गेला सारा.... पहाटे पहाटे पेपरवाल्याने बेल वाजवली कराकरा.. सकाळी सकाळी "ही" का आवरतेय आज घरातला पसारा? आज रविवार!

गुरफटलेली आसवे

लेखनविषय:
काव्यरस
गुरफटलेली आसवे
काळोखात आसवे आपली दिली-घेतली, गुरफटलेली. कोणती तुझी? कळलेच नाही. माझी ओळखलीस का, तूही?
(हुआन रामोन हिमेनेथ याच्या एका स्पॅनिश कवितेवरून)

"आई"

लेखनविषय:
काव्यरस
दहावी ला असताना आंम्हाला फकीरराव शिंदे यांची 'आई' ही कविता होती. शाळेत असताना आमच्या सर्वात जास्त आवडत्या कवितांमधीलच ही एक कविता! फ.मु. शिंदेंनी आपल्या प्रभावि अन् नेमक्या शब्दांत आई या शब्दाचा व्यापक अर्थ पटवुन दिला होता. तो खरोखरच हृदयाला स्पर्श करणारा होता. अशीच एक 'आई' या शिर्षकाची कविता याअगोदरच्या शालेय अभ्यासक्रमामध्ये होती, काळाच्या ओघाने ती विस्मरणात गेली होती, पण फ.मु. च्या कवितेने- त्या कवितेची आठवण पुन्हा ताजी केली. 'यशवंत' यांची होती ती कविता! फ.मु.ची कविता जेथे हृदयस्पर्शी होती तिथेच यशवंत यांची कविता मनाच्या खोल गर्तेत सलणारी, हृदयाला चटका देणारी होती.

(जीव गुंतला)

लेखनविषय:
काव्यरस
मुळ गीत : खेळ मांडला (नटरंग) प्रिय पाचोळ्या तुझ्या आठवांची मनी पानं उभी र्‍हाई साद सुन्या आभाळाची तुझे गीत गाई तरी मेघ दाटला हा पाचोळ्याच्या ठायी हरवल देह भान मावळल्या नभी झाकोळुनी हरवतो श्वास वेडापिसा वनवा ह्यो उरी पेटला...

(सुटलेल्या पोटाची कहाणी)

प्रेरणा: दमलेल्या बाबाची कहाणी घामेजून ताणलेला एक पट्टा कुणी काचलेला लालेलाल वळ उठे झणी रोजचेच झाले आता नवे काही नाही इन कशी करु आता मला सांगा कुणी झोपेतच हात जातो ढेरी वरी जरी निजेतच स्वप्नी भासे स्लीम झाली ढेरी सांगायचे आहे काही माझ्‍या मनातले मला सुटलेल्या पोटाची ही कहाणी तुला ना ना ना ना ना..
Subscribe to करुण