मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जिलबी

(फेंदारलेल्या मिशा....)

नाखु ·
लेखनविषय:
अत्यंत सुंदर अर्थवाही रचनेचे विंडंबन करणे जीवावर आले होते,पण नंतर लक्ष्यात आले ही कलाकृती विडंबन नसून चाल तिथून घेऊन केलेली स्वतंत्र वाट्चाल आहे. दसरा मेळावा होऊन गेल्याने ही कवीता येणे आवश्यक होते. मूळ कवींनी (राजेंद्र देवी) मोठ्या मनाने माफ करणे. पाहून स्वप्ने सत्तेची बोकाळली आहे संराशा आता कोठे होऊ लागल्यात पाठवणी जराश्या का करीशी भणभण या वखवखलेल्या सत्ताबाजारात आता कोठे मिळविल्यात खुर्द्यात चवल्या जराश्या आजूबाजूला बोंबाबोंब किती कोण ऐकेल माझे घायाळ झाली आता कोठे माझी दमाची भाषा ना रुजते मन माझे या झाकोळल्या विजनात राहतं नाही माझ्या कृष्ण्कर्मे आडोश्या फरपटत जात

(हूं)

रातराणी ·
लेखनविषय:
आमची प्रेरणा आशा मनात तुझी धुसर धुसर, मागताना आवाज कातर कातर, स्मरता जुन्या त्या आठवणींना, दरवळलो मी अत्तर अत्तर !!१!! क्लायंट कायम करतो काशी, म्हणतो पगार कसा छापाल छापाल मुहूर्त काढता सणासुदीचा रिलीजला शिव्या अपुर्या पडतील पडतील !!२!! डिजाइन टीमची असते बोंब रिक्वायरमेंट नाही क्लियर क्लियर, क्यूएची आहे नसती कटकट मागे , बग सापडलेत बघा शंभर शंभर!!३!! जरी प्रोजेक्टची अवस्था दीनवाणी हवीच आहे मला सुट्टी सुट्टी असेल जरी क्रिटिकल एरर आता काम दिवाळी नंतर नंतर !!४!!

होऊंदे खर्च

सुरवंट ·
लेखनविषय:
तांब्याधिपतींना अर्पण.. *|| फक्त तू खचू नकोस ||* रडू नकोस चिडू नकोस टमरेल घेऊन फिरु नकोस गुर्जीनं सांगितलंय म्हणून... बाकी खर्च करु नकोस संधी मिळेल तुलाही, लगेच हिरमसु नकोस, बिंधास दरवाजा खटकव फक्त तू खचु नकोस... रोज नव्याने लागते (रांग) रोज नव्या तेजाने रांगेतच ऊभा राहा रोज नव्या जोमाने येणे जाणे रितच इथली, हे तू विसरु नकोस ... बिंधास दरवाजा खटकव फक्त तू खचु नकोस... तुझ्या टमरेलकडे वळणारे कितीतरी हात आहेत अरे तेही तुझ्यासारखेच पाणी त्यांना देऊ नकोस उठ आणि डोळे उघड उगाच कुढत तू बसु नकोस सामर्थ्य आहे हातात जर, विजय तुझाच असेल (फक्त मागे वळून बघु नकोस )

(*गणे कसेच होते)

स्पा ·
लेखनविषय:
पेर्रणा -लाडका बुव्या *गणे कसेच होते? येथे बघून गेलो पाणी जराच होते, थोडा *गून गेलो टमरेल टांगलेले, मी घेतले हातात परसाकडील दारी, मी लगबगून गेलो लागून आली तेव्हा,कळ कालच्या कटाची अतिशुभ्र धोतराला, पीतांबरुन गेलो तो रोग जन्मपंथी, भिती मनात दाटे अन भोगता तयाला, मी सरबरुन गेलो ह्या सांगतो जुलाबा, जा होऊनि अता तू आटोपलेच होते, पुन्हा *गून गेलो *गणे कसेच होते. .

मी बी बियर बार काढीन म्हणतो : सामान्य मानव

मुक्त विहारि ·
लेखनविषय:
हजारांच्या नोटेची चमक पाहीन म्हणतो मी बी बियर बार काढीन म्हणतो...!! बियरला रास्त भाव भेटला काय, न भेटला काय पिणार्‍यांच्या मनांत असल्या भूक्कड गोष्टी येतच नाय मी पण थोडे फार कमवीन म्हणतो मी बी बियर बार काढीन म्हणतो...!! पिणार्‍यांना नशा चढली काय, न चढली काय पिणार्‍यांना भरपुर रिचवायची सवयच हाय मी पण थोडे फार कमवीन म्हणतो मी बी बियर बार काढीन म्हणतो...!! अन्नाचे भाव आणि दूधाचे भाव वाढले काय, अन चकण्याचे भाव पण वाढले काय या पिणार्‍यांना उपजत अक्कलच नाय बियरच्या साथीने वाईन पण विकीन म्हणतो मी बी बियर बार काढीन म्हणतो...!! बियर विकून सत्तेत येता येते बियर पिणार्‍यांना उधार देणारा ख

त्याची आठवण,

ज्ञानोबाचे पैजार ·
त्याची केव्हाही आठवण आली तरी, सर्वांगावर सरकन् काटा येतो, डोक्यावरचा केस न केस उभा रहातो, आणि थंडीच्या दिवसातही दरदरुन घाम फुटतो, अंधारलेल्या डोळ्या समोर, नाचतात आकृत्या भेसुर, जिभेला पडते कोरड आणि काना मधून निघतो धुर, कित्येकांना याने लाचार बनवले, भिकारी बनवले, याच्या दहशती मूळे कित्येक पापभिरु दूराचारी झाले, तो आहेच असा भितीदायक, आता पर्यंत भेटलेला सर्वात मोठा खलनायक, मी मी म्हणणा-यांची त्याच्या पुढे टरकायची, नुसत्या आठवणीने कित्येकांची बोलती बंद व्हायची, वर्ष सहा महिन्यातुन तो एकदा कधीतरी यायचा, पण त्याचा बोलबाला मात्र वर्षभर असायचा, किती उपाय झाले, नवस झाले सायास झाले, पण याच्या समोर

वाट!

जव्हेरगंज ·
लेखनविषय:
काव्यरस
कालच्या पावसात एक फांदी तुटली आपटलीच मग झाडंच कोसळलं धप्पदिशी अजस्त्र सांगाडा जमीनीवर पसरला. कधीकाळी त्यावर किलबिल पक्षी बसायचे आजकाल फक्त कावळेच शतकानुशतके झाड उभं होतं गुण्यागोविंदाने जगत होतं संसार करावा तर झाडासारखा पण एकाएकी खंगूनच गेलं उन्मळून पडावं असं काही राहीलंच नव्हतं तरीही पडलं दु:ख त्याचं नाहीच पण खाली एक कुत्रं बसलं होतं गेलं बिचारं :(

बंद पडलं..

अत्रुप्त आत्मा ·
बंद पडलं गुह्राळ आणि बंद पडला तांब्या प्रतिभेच्या वासराचा नुसताच झालाय ठोंब्या! गवत खाई पाणी पिई हलत जागचं नाही डिवचलं गुदगुल्या केल्या, तर हसतं नुस्तच "ह्ही ह्ही!" सोडून दिलं माळरानावर, तर येतं फिरून परत. "काय लागलं हाती? ", तर म्हणे-" बसलो असाच चरत. " येऊन पुन्हा गोठ्यात शिरतं, नि रहातं निपचित पडून. लिहायला काढलं की दाव्याला बसतं अडून. कस्सं अस्सं वासरू ह्ये, मी काय याला करू? कैसा यावा पुन्हा, माज्या लेखणीला बहरू??? (दुत्त दुत्त!

आळस

जव्हेरगंज ·
लेखनविषय:
कधी कधी मन भरून येतं काठोकाठ जावंसं वाटतं दूर दऱ्या डोंगरात डुंबावं वाटतं भल्याथोरल्या समुद्रात पण अशावेळी मला आळसंच येतो मग झोप झोपतो मी गपगार पांघरुनात कधी वाटतं चमकाव्या विजा कडाडून आकाशात बरसाव्या धारा मुसळधार अंगणात पण रखरखीत उनंच पडतं दिवसभर मग बसावं लागतं सावलीत आडवं व्हावं लागतं काटकोनातलं जग दिसतं राहतं स्वप्नात आळसंच दाटलेला असतो म्हणा जगण्यात आळसाचे असतात प्रमुख तीन प्रकार ऑय य्यॉय याय ... उद्या सागेनॉय य्यॉय जरा आळसंच आलॉय य्यॉय यियॉय्य . . हम्म..