बगीच्यात फेरफटका मारताना निरनिराळ्या लोकांशी भेट होत असते. आजकाल ‘वोट चोरी’चा मुद्दा चांगलाच तापलेला आहे. असाच एक तरुण मुलगा भेटला—आयटी क्षेत्रात काम करणारा, अमेरिकन कंपनीत नोकरी करणारा. साहजिकच, स्वतःला महाज्ञानी समजणारा.
गप्पा मारताना तो सहज म्हणाला, “ईव्हीएमच्या मदतीने वोट चोरी सहज शक्य आहे.”
मी विचारलं, “कसं शक्य आहे? ईव्हीएमला इंटरनेट कनेक्शन नसतं. शिवाय एकदा मतदान झालं की ती मशीन बंद केली जाते—वीजही नसते.”
तो म्हणाला, “आज टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली आहे. इंटरनेट नसतानाही आकाशीय तरंगांच्या माध्यमातून ईव्हीएममध्ये फेरफार करता येतो.”
त्याची गूढ भाषा मला काही समजली नाही. शेवटी मी त्याला म्हटलं, “मला तुझं सगळं पटतंय. ईव्हीएममध्ये वोट चोरी होऊ शकते.”
तो खुश झाला. म्हणाला, “म्हणजे राहुल गांधींचे आरोप बरोबर आहेत!”
तेवढ्यात मला पार्कमधल्या एका बाकावर एक गृहस्थ टाइम्स ऑफ इंडिया वाचताना दिसले. मी त्याला विचारलं, “आकाशीय तरंगांच्या माध्यमातून या वर्तमानपत्राचं नाव बदलून हिंदुस्तान टाइम्स करता येईल का?”
ते माझ्याकडे पाहून म्हणाले, “काका, हे शक्य नाही. कागदावर छापलेले शब्द बदलता येत नाहीत.”
मी म्हणालो, “ईव्हीएमचा डेटा जर बदलला, आणि त्यानुसार छापील कागदी स्लिप्स बदलल्या नाहीत, तर चोरी सहज उघडकीस येईल. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार काही निवडणूक क्षेत्रांमध्ये ईव्हीएमसोबत छापील स्लिप्सची मोजणी केली जाते. त्यामुळे वोट चोरी शक्य नाही.”
त्याचं तोंड अगदी लहान झालं. म्हणाला, “मला हे माहीत नव्हतं.”
बहुतेक त्याने कधीच मतदान केलेलं नसावं.
प्रतिक्रिया
6 Sep 2025 - 6:40 am | चित्रगुप्त
-- यावरून त्या तरूणाला काय म्हणायचे होते ते समजते.
18 Sep 2025 - 12:01 pm | विवेकपटाईत
राहुल बाबचे आरोप चुकीचे आहेत. हे तरुणाला व्यवस्थित कळले. बाकी त्याने कधीच मतदान त्यामुळे ईव्हीएम मध्ये कागदी स्लिप ही असतात हे माहीत नव्हते.
6 Sep 2025 - 9:45 am | अमरेंद्र बाहुबली
तरुणांमध्ये वोटचोरीबद्दल जागरूकता निर्माण होते आहे हे लोकशाहीच्या दृष्टीने चांगले लक्षण आहे! ह्यामुळे वोटचोरी करून सत्ता हडपणाऱ्या पक्षांना आणी काही अशिक्षित नेत्याना चाप बसेल अशी अपेक्षा!
18 Sep 2025 - 12:04 pm | विवेकपटाईत
तुमचे म्हणणे सत्य अशिक्षित नेते त्यांची नावे मी घेत नाही. एका अशिक्षित नेत्याची जो सर्वांना अशिक्षित समजतो प्रेस कांफेरेन्स करत राहतो. बाकी ईव्हीएम मध्ये हेराफेरी होऊ शकत नाही. हे कधी मत न देणार्यांना ही कळू लागले आहे.
10 Sep 2025 - 2:34 pm | निपा
कुठलेही इलेक्ट्रॉनिक device हॅक होऊ शकते . ओव्हर the एअर ऍक्सेस वर वायर्ड ऍक्सेस नसेल तरीही . ट्रान्स्पोर्टशन , हँडलिंग , मेकिंग इ. ला ऍक्सेस मिळू शकतो . सॉफ्टवेअर ओपन नाही आहे , म्हणजे सॉफ्टवेअर चे बग्स संभवतात . क्रिप्टोग्राफी पण ओपन नाही . क्लोज्ड सॉफ्टवेअर ला हॅकिंग चा धोका जास्त असतो. VVPAT पण १००% नाही, आणि सॅम्पलिंग मध्ये errors येतात. कदाचित १००% matching केलं कि समजेल किती विसंगती येते.
त्या पेक्षा खोटे मतदार उभे करणं सोपं असेल. जिथे पाहिजे तिथेच आणि जेवढा पाहिजे तेवढाच केलं कि manage होऊ शकतं . EC ने transparency ने व्हेरिफाय केलं पाहिजे .
10 Sep 2025 - 8:04 pm | सुक्या
खिक्क !!
17 Sep 2025 - 5:08 pm | संजय खांडेकर
आपण यातील तज्ज्ञ दिसत, कृपया काही शंकांचे निरसन विस्ताराने कराल का? म्हणजे आमच्या सारख्या अज्ञान सामान्य जनांना काही खरी माहिती मिळेल.
ईव्हीएम नक्की कोणत्या टप्प्यात हॅक केले जाते? मतदान सुरु असताना / मतदान सुरु होण्यापूर्वीच / मतदान संपल्यावर सीलबंद केले गेल्यावर?
कोणतेही इलेक्ट्रॉनिक डिवाइस पॉवर अप नसताना कसे हॅक केले जाते?
इव्हीएमची सॉफ्टवेअर सुरक्षा खरंच इतकी तकलादू आहे कि कोणीही कधीही कुठूनही ते हॅक करू शकतो , आणि जर असे असेल तर देशातील कोणत्याही विरोधी पक्षाला असे हॅकर का मिळत नाहीत जे सत्ताधाऱ्यांऐवजी विरोधकांची हॅकिंग करतील कि असा काही कायदा केला गेला आहे हॅकरनी फक्त सत्ताधाऱ्यांसाठीच हॅकिंग करावे ?
17 Sep 2025 - 11:01 pm | अमरेंद्र बाहुबली
सेट केले असतील तर? कारण इव्हीएम बनवणाऱ्या कंपनीत चार गुजराती भाजपेयी डायरेक्टर आहेत म्हणतात! ईव्हीएम मशीन गुजरात मध्ये बनतात!
18 Sep 2025 - 2:08 am | चित्रगुप्त
बापरे. गुजरात मधे बनणारे खाकरे, ढोकळे, फरसाण वगैरे खाणे आता बंद केले पाहिजे म्हणायचे. गुजराती भाजपेयी फरसाणवाल्यांनी त्यात काय काय सेट केलेले असेल कुणास ठऊक. लईच डेंजरस मामला हाय ह्यो.
परम.पूज्य. राजदुलारे साहेबांनी अजून याचा विरोध कसा केलेला नाही, याचे अश्चर्य वाटते.
18 Sep 2025 - 4:57 am | अमरेंद्र बाहुबली
खाकरे, ढोकळे, फरसाण
नाय वो, नाक्यावरचा मारवाडी देखील बनवतो,महाराष्ट्रात बरका! :)18 Sep 2025 - 12:35 pm | कर्नलतपस्वी
कुछ भी,
गुजरात मधला मारवाडी गुजराती मग तामिळनाडूतील मारवाडी तामिळ का...
18 Sep 2025 - 3:54 pm | संजय खांडेकर
माझ्या वरीलएकाही प्रश्नाचे समाधानकारक / विस्तारपूर्वक उत्तर मिळाले तर बऱ्याच शंकांचे समाधान होईल, नुसत्या शक्यतांनी आरोप सिद्ध होत नाहीत ना?
18 Sep 2025 - 9:12 am | युयुत्सु
१००१% सहमत!
कुठलेही इलेक्ट्रॉनिक device हॅक होऊ शकते .
१००१% सहमत!
18 Sep 2025 - 4:21 pm | विजुभाऊ
असहमत.
जे डिव्हाईस सॉफ्ट्वेअर प्रोग्राम वापरून चालतात / कंट्रोल करता येतात अशीच उपकरणे हॅक करता येतील.
( उद्या म्हणाल की भिंतीवरचे इलेक्ट्रॉनिक घड्याळ हॅक करा)
त्यातही ज्या उपकराणात डाटा इंटरॅक्ट्इव्ह पद्धतीने प्रोसेस होते अशी उपकरणे हॅक होऊ शकतात.
याचे कारण असते की उपकरणातील रॅम वापरली जात असताना त्यात डाटा किंवा इन्स्ट्रक्षनची सरमिसळ करता येते.
18 Sep 2025 - 12:09 pm | विवेकपटाईत
आकाशीय तरंग घेण्याची सुविधा नसेल तर कोणत्याही डिवाईस मध्ये बदल करता येत नाही. ईव्हीएम मध्ये मत नोंद होण्याची काळ आणि वेळ असते. बाकी प्रत्येक ईव्हीएम मत देण्याआधी अजेंट किमान 50-60 स्लीप्स चेक करतात. ईव्हीएम ठीक आहे याची खात्री करतात. त्यामुळे प्रत्येक विधान सभा क्षेत्रात 5 ईव्हीएम मोजले तरी भरपूर आहे. बाकी जे कधी मतदान करत नाही त्यांचा मनात फालतू शंका येतात.
10 Sep 2025 - 4:30 pm | कंजूस
एका calculator ला चालवून दाखवा कोणत्यातरी तरंगांनी.
10 Sep 2025 - 8:04 pm | सुक्या
तेच म्हणतो मी. कॅलक्युलेटर २ फुट लांब ठेउन, २ + २ = ५ करुन दाखवा.
18 Sep 2025 - 12:22 pm | विवेकपटाईत
बिना निवडणूक जिंकता रस्त्यावर क्रांति घडवून सत्तेत येण्याचे ज्यांचे मनसुबे आहे, ते नेता वोट चोरी इत्यादि आरोप लावतात आहे. निवडणूक पूर्वी महिना दोन महीने आधी प्रत्येक बूथ वर प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांजवळ मतदाता सूची असते. निवडणूकीच्या 15 दिवस आधी ही नाव टाकले जाऊ शकतात. त्यानंतर ही तीन महीने आक्षेप घेण्यासाठी असतात. ते न करता वर्षभरांनी मीडियात बोंब मारायची. दुसरी कडे SIR चा विरोध करायचा. बोगस नावे, मृतांची नावे, डुप्लीकेट मतदारांची नावे कापण्याचा विरोध करायचा. असाच मूर्खपणा सुरू राहिला तर बहुतेक 2029 मध्ये ही मजबूरी में मोदींना लोकांना मतदान करावे लागेल. राहुल विसरून जातात भारत बंगला देश आणि नेपाळ नाही.
18 Sep 2025 - 1:38 pm | आग्या१९९०
आज राहुल गांधींनी टाकलेली " एस " निवडणूक आयोग कशी परतवते ह्याची उत्सुकता आहे.
18 Sep 2025 - 2:41 pm | चौथा कोनाडा
वाचत आहे ....
रागा म्हणताहेत ते रोचक आहे :
" मी विरोधी पक्षनेता असून 100 टक्के पुराव्यांसह बोलत आहे "
18 Sep 2025 - 4:22 pm | विजुभाऊ
पुरावे कोर्टासमोर कधीच आणत नाहीत. इतके गुप्त असतात.