शोभिवंत होळी
निरव शांततेच्या मिट्ट रात्र वेळी,
आली झोपडीत माझ्या 'लाघवी' लुटारुंची टोळी
वदले नकोत चिंता आता तुझ्या कपाळी,
खाऊन भाजलेली माझीच गोड पोळी
पाहुन तारका ते भलतेच तृप्त झाले,
श्रीमंत पामराची झोपडी चंद्रमोळी
करुनी दानधर्म ते पुण्यवंत झाले,
परी पापसमुच्चयाने फाटली दीन झोळी
जखमा करुन ताज्या ते दाविती जगाला,
चितेचीही माझ्या केली शोभिवंत होळी
विझले जसे 'निखारे' झाले पसार सारे,
तीच तीच दुःखे कोणी कशा ऊगाळी
भोगले जे ही होते लिहीले माझ्याच भाळी,
सावध असा गड्यांनो येता आपुली पाळी...
आशिष
प्रतिक्रिया
23 Jul 2016 - 6:51 pm | एस
काव्य आवडले.
24 Jul 2016 - 11:45 am | शब्दबम्बाळ
धन्यवाद!!
23 Jul 2016 - 8:11 pm | ज्योति अळवणी
नाही समजले
24 Jul 2016 - 11:46 am | शब्दबम्बाळ
परिस्थितीने पिचलेल्या गरीबाच्या दुःखाचे आपल्या स्वार्थासाठी भांडवल करणार्या राजकारणी, वार्ताहर ई. लोकांवर भाष्य करण्याचा प्रयत्न केला आहे.
24 Jul 2016 - 2:43 pm | जव्हेरगंज
कडक!!
25 Jul 2016 - 12:53 pm | शब्दबम्बाळ
मोठ्या लोकांकडून तारीफ!! धन्यवाद! :)