ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजे.. !

सुहास झेले's picture
सुहास झेले in दिवाळी अंक
31 Oct 2015 - 7:03 am

.
.
हे वर्ष छत्रपती संभाजी महाराज यांचे ३२६वे पुण्यस्मरण वर्ष. इसवी सन १६८०मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या महानिर्वाणानंतर स्वराज्याची धुरा छत्रपती संभाजी महाराजांकडे आली. त्या वेळी स्वराज्यावर अनेक संकटे चालून आलेली होती. साक्षात दिल्लीपती औरंगजेब आपले सर्व सैन्य, युद्धसाहित्य घेऊन स्वराज्यावर चालून आला होता. त्यासोबतच पोर्तुगीज, सिद्दी आणि इंग्रज राजवटी आपापल्या परीने जमिनीवर आणि समुद्रात आपला प्रभाव वाढवायचा प्रयत्न करू पाहत होत्या. ह्या सगळ्या संकटांना सामोरे जाण्याची कर्मकठीण जबाबदारी कोवळ्या वयात शंभूराजांवर येऊन ठेपली होती. स्वराज्याची चहूबाजूंनी होणारी कोंडी फोडणे, स्वराज्य अबाधित राखणे, स्वराज्याचा विस्तार करणे आणि हे कार्य कोणत्याही तडजोडीशिवाय तडीस नेणे हा संभाजी महाराजांचा ध्यास होता आणि आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत तो ध्यास त्यांनी सोडला नाही. अनेक इतिहासकार (?) शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची तुलना करतात. शिवाजी महाराज निर्विवाद श्रेष्ठ राज्यकर्ते होते, त्यांच्यासारखा दुसरा होणे शक्य नाही; पण अशी तुलना करून संभाजी महाराजांचे महत्त्व कमी करणे निश्चितच अन्यायकारक आहे.

महाराजांची एकूणच कारकिर्द संघर्षपूर्ण होती. बघायला गेले, तर शंभूराजांची कारकिर्द जेमतेम नऊ वर्षाची. तीसुद्धा सदैव युद्धभूमीत किंवा युद्धाच्या विविध योजना आखण्यात गेली. त्यांना राजकारणाचा अनुभव इतका नव्हता, पण थोरल्या छत्रपतींची विचारसरणी, स्वराज्यासाठी केलेली राजनीती आणि युद्धनीती त्यांनी अगदी जवळून बघितलेली. त्याचा प्रभाव त्यांच्यावर झाला असणारच, पण फारच कोवळ्या वयात त्यांच्यावर स्वराज्याची जबाबदारी आल्याने राजकीय अनुभव पदरी नव्हताच. त्यांच्या नऊ वर्षांच्या कालावधीची फार कमी कागदपत्रे उपलब्ध असल्याने अनेक गोष्टी कायमच्या काळाच्या पडद्याआड गेल्या. जी कागदपत्रे-नोंदी उपलब्ध आहेत, त्यात शत्रूंच्या गोटातील पत्रव्यवहार, नोंदी किंवा आपल्याकडील काही बखरी ज्यात शंभूराजांविरुद्ध एकदम टोकाची भूमिका घेतल्याची दिसते. संभाजीराजे व्यसनी होते, बाईलवेडे होते, त्यांच्यात योग्य निर्णयक्षमता नाही असे विविध आरोप त्यांच्यावर केले गेले. गेल्या पन्नास वर्षात मोठ्या प्रमाणावर महान व्यक्तींचे चरित्रलेखन झाले, ज्यात चरित्रकाराने चांगल्या आणि वाईट दोन्ही घटनांचा समावेश करून ते चरित्र पूर्णत्वास नेलेले आहे. परंतु संभाजी महाराज त्यास अपवाद असावेत. पूर्णपणे एकांगी वाटणार्‍या ह्या नोंदी आणि त्यावरून लिहिल्या गेलेल्या बखरी किती शास्त्रोक्त असाव्यात, हा संभ्रम निर्माण होतोच. अर्थात ह्यालाही निवडक अपवाद आहेतच.

महाराजांचा जन्म किल्ले पुरंदरवर १४ मे १६५७ रोजी झाला. त्यांच्या लहानपणीच आईचे कृपाछत्र हरपले. त्यांच्या सावत्र आईंंना - म्हणजेच सोयराबाईंना, स्वतःच्या मुलाला स्वराज्याचा वारस म्हणून पुढे करण्याची तीव्र महत्त्वाकांक्षा होती आणि त्यात शंभूराजे मोठा अडथळा होते. सोयराबाईंच्या अशा ह्या महत्त्वाकांक्षी स्वभावामुळे, संभाजी महाराजांचे नकारात्मक चित्र थोरल्या महाराजांसमोर उभे केले, ह्यासोबतच पुढे अष्टप्रधान मंडळ वैचारिक विरोधक म्हणून सहभागी होत गेले. ह्या सततच्या अंतर्गत तक्रारी, कुरबुरी शंभूराजांच्या जिव्हारी लागल्या नसत्या तर नवलच. तरी हे सर्व होत असताना शिवाजी महाराजांनी एक पिता म्हणून, आपल्या भावी उत्तराधिकारी असलेल्या शंभूराजांची जडणघडण करण्यात बारकाईने लक्ष घातले. त्यांना लहानपणापासूनच संस्कृत भाषा पारंगत केले गेले. त्याच संस्कृतमध्ये संभाजीराजांनी पुढे अनेक रचना केल्या, ग्रंथलेखन केले.

1
वयाच्या आठव्या वर्षी शंभूराजांवर एक प्रसंग ओढवला. मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेरखानाने स्वराज्यावर मोठ्या संख्येने आक्रमण केले आणि भविष्याचा विचार करता महाराजांनी युद्धातून माघार घेत मुघलांशी तह केला, तो तह म्हणजे 'पुरंदरचा तह'!! ह्या तहान्वये इतर अटींसोबत शिवाजी महाराजांनी मुघलांची मनसब स्वीकारावी, अशी आग्रही भूमिका घेण्यात आली. महाराजांनी पुढील विचार करता ती मनसब स्वतः न स्वीकारता, आपल्या आठ वर्षाच्या मुलाच्या - म्हणजेच संभाजीराजांच्या नावे स्वीकारण्याचे मान्य केले. संभाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत दोन वेळा मुघलांची मनसबदारी स्वीकारली. पुरंदरच्या तहाची अंमलबजावणी होईपर्यंत, संभाजीराजांना मुघल सैन्यात ओलीस ठेवण्याची अटदेखील महाराजांनी मान्य केली. पुढे एका वर्षांने थोरल्या छत्रपतींना मुघलांकडून आग्रा भेटीचे निमंत्रण दिले गेले. सोबत संभाजीराजे होतेच आणि तिथेच महाराजांनी नजरकैदेतून सुटण्यासाठी पेटार्‍यातून पलायन केले, हे आपल्याला माहीत आहेच. आग्र्यात असलेल्या राजस्थानी कवींनी संभाजीराजांचे वर्णन काहीसे असे केलेले होते - “शिवाजीका एक नौ बरस का छोरा थो, वो रंगीला गोरागोरा स्वयंसुरत बहलीबहली थो”. आग्रा-महाराष्ट्र प्रवासात मुघलांना संशय येऊ नये म्हणून, संभाजीराजांना काही काळ मथुरेत ठेवण्यात आले. पुढे काही दिवस मुघलांनी संभाजी महाराजांचा शोध घेऊ नये म्हणून, शिवाजी महाराजांनी आपल्या पोटच्या मुलाच्या मृत्यूची अफवा उडवून त्यांचे जिवंतपणी उत्तरकार्यही करून टाकले. ह्या घटनांचा दूरगामी परिणाम झाला नसेल तर विरळाच आणि इथूनच त्यांच्या बंडखोरी स्वभावाला एक पार्श्वभूमी मिळाली.

स्वतःच्या अस्तित्वासाठी बळसामर्थ्य वापरणे हा त्यांनी निवडलेला पर्याय होता. महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याचे कारभारी अष्टप्रधान मंडळ राजारामांना छत्रपतींच्या गादीवर बसवून स्वराज्याचा कारभार नियंत्रित करण्याचा विचार करू लागले. शेवटच्या काही महिन्यात झालेल्या पारिवारिक आणि राजकीय मतभेदांमुळे संभाजी महाराजांचे नेतृत्व पूर्णपणे अकार्यक्षम आहे, असे एकमत झाले. ही बातमी कळताच संभाजी महाराज पेटून उठले. आपल्या हक्कावर गदा येऊ द्यायची नाही, असे ठरवून रायगडावर पोहोचून सर्व कारभार आपल्या नियंत्रणाखाली आणला. त्यांना त्यातून बडतर्फ करण्याचा कट केला गेला, पण तो त्यांनी अकबराच्या साहाय्याने उधळून लावला. दोषी प्रधान मंडळींना - म्हणजेच अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस, आवजी बल्लाळ आणि हिरोजी फर्जंद ह्यांना सुधागडाच्या पायथ्याशी हत्तीच्या पायाखाली देण्यात आले.

2
स्वराज्याची धुरा हाती आल्यावर आपल्या वडिलांचे धोरण पुढे नेत दक्षिणी पातशाह्या एकत्रच राहिल्या पाहिजेत हा विचार त्यांनी दृढ केला. चहूबाजूंनी होणार्‍या मुघली आक्रमणावर त्यांनी निरनिराळ्या ठिकाणी आघाड्या उघडल्या. ह्या आघाड्यांमध्ये औरंगजेबाला महाराष्ट्रात अक्षरशः खिळवून ठेवले आणि त्याच वेळी मुघलांची मुख्य बाजारपेठ असलेल्या ठिकाणांवर - म्हणजेच खानदेश, औरंगाबाद, सोलापूर, अहमदनगर, पेडगाव, वर्‍हाड येथे मोठ्या प्रमाणावर लुटालूट केली. इथे दक्षिणेत लढत असताना उत्तरेत औरंगजेबाच्या राजधानीवर परस्पर हल्ला करण्याचीसुद्धा योजना शंभूराजांनी बनवली होती आणि ती त्यांनी रामसिंग कछवा ह्यांना संस्कृत पत्राद्वारे कळवली होती. ती योजना काही कारणास्तव पूर्णत्वास गेली नाही, पण संस्कृत भाषेतील पत्रामुळे ती गोपनीय राहिली. बंडखोर शहजादा अकबरला त्याच वेळी संभाजीराजांनी आश्रय दिल्याने औरंगजेबाचा अजून भडका उडाला आणि त्याला आपली पगडी उतरवून संभाजीराजांना पकडण्याची किंवा ठार मारण्याची प्रतिज्ञा करावी लागली.

हसन अलीसारखा मातब्बर सरदार कोकणातून पळवून लावणे, रामसेज किल्ला तब्बल ५ वर्ष लढवणे, मुघलांचे आक्रमण अंगावर घेऊन सिद्दी आणि इंग्रज यांच्या नाकावर टिच्चून उत्तर फिरंगणावर हल्ला करणे, पोर्तुगीजांनी गोव्यातील फोंड्यावर हल्ला करण्याचा केलेला प्रयत्न साफ हाणून पाडणे, सिद्दीच्या जंजिर्‍यावर धडक देऊन, सरतेशेवटी किल्ला पाडण्यासाठी समुद्रात सेतू बांधणे, कुतुबशाही आणि आदिलशाही पडल्यावरही, विजापूरकरांच्या मदतीसाठी स्वराज्याचे सैन्य पाठवणे, कासिमखान, बहादूरखान यासारख्या मातब्बर सेनापतींना युद्धातून सपशेल माघार घ्यायला लावणे, कल्याण-भिवंडीकडे आलेला हसनअली खान, रणमस्तखान, बहादूरखान यांना दिलेला लढा... अशा अनेक प्रसंगांतून आपल्याला शंभूराजांच्या धैर्याची, जिद्दीची आणि गौरवशाली परंपरेची चुणूक दिसून येते. महाराष्ट्रभर पसरलेल्या मुघल सैन्याशी सतत नऊ वर्षे टक्कर देणार्‍या सैन्याला कायम कार्यप्रवृत्त ठेवणे हा अव्वल राजनीतीचा भाग होता.

स्वराज्याच्या संरक्षणासाठी भक्कम आरमार असण्याच्या शिवाजी महाराजांच्या स्वप्नालासुद्धा संभाजी महाराजांनी योग्य आकार दिला. मुंबईकर इंग्रजांनी सुरतकर इंग्रजांना १६ मे १६८२ला पाठवलेल्या पत्रानुसार स्वराज्याच्या आरमारात त्या वेळी ६६ युद्धनौका, ३०-१५० टनांची ८५ गलबते, ३ शिडांची गुराबे ह्यांचा समावेश होता.

संभाजी महाराजांच्या ह्या धडक मोहिमेचा धसका घेतलेल्या औरंगजेबाने सरतेशेवटी फितुरीचे अस्त्र वापरले. महाराजांच्या एकूणच राजकीय कारकिर्दीत कवी कलशांचे सतत वाढते महत्त्व लक्षात घेता, काही लोकांना भडकावण्यात आले आणि फितुरी झाली. अशाच एका मोहिमेवरून परतताना संगमेश्वर येथील सरदेसाईंंच्या वाड्यात संभाजीराजे आणि त्यांचे सहकारी पकडले गेले. ह्या अटकेनंतर आपले काय होणार हे महाराजांनी ओळखले होते. त्यांचा आणि कवी कलशांचा अमानुष छळ आणि त्यानंतर त्यांची केलेली हत्या याच्या विस्तृत वर्णने आपण अनेक कादंबर्‍यांतून वाचली आहेतच. मरणाला धीरोदात्तपणे सामोरे जाणे सामान्य माणसाच्या हातून घडणे शक्य नाही. मरणाला मिठीत घेऊन ते मोक्षाला गेले. स्वराज्याचे रक्षण करता करता आपल्या प्राणांची आहुती देण्याचे महाभाग्य संभाजीराजांना लाभले. संभाजी महाराजांच्या हत्येनंतरच खर्‍या अर्थाने दिल्लीशी महाराष्ट्राची झुंज सुरू झाली आणि मुघल सत्ता विलयाला गेली.

3
तुळापूर - संभाजी महाराजांचे स्मारक

केशव पंडितांनी लिहिलेल्या 'राजारामचरितम्' ग्रंथात संभाजीराजांचे एका शब्दात सार्थ वर्णन केले, ते असे -

महाराजेन पिश्रास्य घातुकेन महीभृताम् |
श्रीशिवछत्रपतिना सिंहासन निषेदुष्णा ||५||
संभाजीकेन च भ्राता ‘ज्वलज्ज्वलनतेजसा’ |
विलुंठितेषु सर्वेषु पौरजानपदेषुच ||६||

अर्थ : सिंहासन स्थापनेच्या तीव्र इच्छेने महिपालांचा पाडाव करणारा त्याचा पिता श्रीशिवछत्रपती व ज्वलज्ज्वलनतेजाप्रमाणे चमकणारा भाऊ संभाजी विरहित असलेला राजाराम..
-----------------------------------------
लेखाचे संदर्भ:
ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा – लेखक सदाशिव शिवदे (उपलब्ध प्रत्येक बारीकसारीक पुराव्यांसह एक परिपूर्ण शंभूचरित्र)
जनसेवा समिती विले-पारले अभ्यासवर्ग : ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजे (५ ऑक्टोबर, २०१४)
अभ्यासवर्गाचे मान्यवर वक्ते : निनादराव बेडेकर, पांडुरंगजी बलकवडे आणि डॉ. सदाशिव शिवदे
प्रचि १ आणि ३ साभार विकिपीडिया आणि प्रचि २ साभार कौस्तुभ कस्तुरे (http://www.kaustubhkasture.in/)

-----------------------------------------
मला कल्पना आहे, हा लेख प्रमाणाबाहेर मोठा झालेला आहे, पण हात आखडता घेणे जमले नाही. मला प्रत्यक्षात इतिहासाची गोडी लावणारे निनादराव यांचा आमच्यासाठी घेतलेला हा शेवटचा अभ्यासवर्ग. शिव इतिहासाला वाहून घेतलेल्या त्या इतिहासकाराच्या जाण्याने एक भलीमोठी पोकळी आज निर्माण झाली आहे. त्यांनी शिवाजी महाराजांवर बोलत राहावे आणि आम्ही सर्वांंनी तासनतास ते ऐकत बसावे, अशी मैफल आता होणे नाही. त्या इतिहासकाराला माझी भावपूर्ण श्रद्धांजली _/|\_
त्यांची एक आठवण :

~ सुझे !!
.

दिवाळी अंक २०१५

प्रतिक्रिया

देवा, यांच्या आत्म्याला शांती मिळू दे.

कपिलमुनी's picture

17 Nov 2015 - 6:19 pm | कपिलमुनी

आमच्या प्रतिसादांनी ( ईतर धाग्यावर) असा काय पाप केला होता ?
हे असे प्रतिसाद टिकतात याचेच आश्चर्य वाटते ?

नया है वह's picture

18 Nov 2015 - 8:39 pm | नया है वह

.

मुक्ती's picture

18 Nov 2015 - 10:12 pm | मुक्ती

तुमच्या म्हणण्याला पुरावे द्या, नाहीतर आपलं चुकलं म्हणून कबूल करा.

llपुण्याचे पेशवेll's picture

4 Dec 2015 - 1:17 pm | llपुण्याचे पेशवेll

संभाजीराजे मंत्रतंत्राच्या नादी लागले होते यात काही दुमत नाहीये. त्यांचे गणेश जांभेकर नावाचे गुरु शृंगारपूर येथे रहात आणि राजे त्यांना भेटायला जात हे अगदी सत्यच. परंतु त्यामुळे त्यांच्या सामरीक कर्तृत्वास बाध येते असे मला काही वाटत नाही.
आणि गुप्तहेरी पेक्षा फितुरी ही जास्त मारक ठरली. कारण ती गणोजी शिर्क्यासारख्या स्वकीयाकडून झाली होती. राहीला प्रश्न रयतप्रिय राज्याचा तर त्याला वेळ मिळाला असेल असे वाटत नाही. एका वेळेला ४ आघ्याड्यांवर लढताना ससेहोलपट झाली असेलच.
मग म्हणाल की छंद शौक करायला वेळ कुठून मिळाला? तर त्यांच्या शारीरीक, लैंगिक, बौद्धीक गरजा भागवायला त्यांनी तथाकथित व्यभिचार केला असेल तर त्या काळात तो व्यभिचार असेल आजच्या काळात मुक्त वातावरणात असे मानायचं कारण काय? त्यांनी बलात्कार केला असेत तर तो अयोग्य पण माझ्या वाचनात अजून तरी असे आलेले नाही. बाकी जिथे औरंग्या दक्षिणेत उतरल्यावर जिथे भले भले सरदार स्वजातीचे, गोत्राचे; भितीपोटी लोभापोटी औरंग्यालाजाऊन मिळाले तिथे ग्राऊंड लेव्हलवरच्या लोकांनी काम केले नसेल तर दोष कशाला द्यायचा.
ताराबाई पराक्रमी वगैरे असेल पण शिवाजी महाराजांचे जे तत्व होते जहागिरी इनाम न देण्याचे त्याला हरताळ फासून त्यांनी लोक जमवले. ते योग्य/अयोग्य/ही दुसरी गोष्ट.
बाकी असो. लिहीण्यासारखे बरेच आहे पण सध्या कमी वेळामुळे लेखनसीमा.

मोगा's picture

4 Dec 2015 - 10:59 pm | मोगा

महाराजानी वतनदारी बंद केली हाच एक मोठ्ठा विनोद आहे! इतरांची वतनदारी बंद केली आणि आपले पद मात्र घराण्यात कायम ठेवले. बाकींच्याच्या वतनदा र्‍या आणि परंपरा मात्र बंद !

का कुणास ठावुक , पण हे जेंव्हा जेंव्हा वाचतो , तेंव्हा , इतरांची दुकाने बंद करून स्वतःचे महादुकान मात्र सुरु ठेवणारा तो मोहरा सिनेमाचा नस्रुद्दीन शहा आठवतो !

होबासराव's picture

4 Dec 2015 - 11:07 pm | होबासराव

अन्न खात जा रे बाटग्या...म्हणजे असले बध्दकोष्ट होणार नाहि. तुझि लायकि काय बावळटा तु बोलतोयस कोणाविषयि. स्वतःचे बापजाद्याचा पत्ता नाही आणि तु महाराजांच्या वारसां विषयि काय बरळतोयस.

मोगा's picture

4 Dec 2015 - 11:30 pm | मोगा

मला काय आठवतं ते मी स्पष्टपणे लिहिलं ..

माझं चुकत असेल तर नीट समजावून सांग !

विनोद१८'s picture

6 Dec 2015 - 8:12 am | विनोद१८

....ह्या मूर्खाच्या नादी न लागलेलेच बरे, त्याच्या रक्तात भेसळ असावी म्हणुनच असली मुक्ताफळे उधळतोय तो.

भोसले घराण्याच्या दोन्ही गाद्या दत्तक वारसातून सुरु आहेत.

पेशव्यांतही दुसर्‍या बाजीरावानंतर मूळचा वंश संपला. नंतर एक दत्तकपुत्र .. नानासाहेब.

बाजीरावाचा ओरिजिनल वारस आजही आहे तो म्हणजे मस्तानीपुत्र समशेरबहाद्दरचा मुसलमान वंश . तो आजही अबाधितपणे सुरु आहे.
इन्शा अल्ला !

काळा पहाड's picture

5 Dec 2015 - 12:40 am | काळा पहाड

याबाबतीत काही माहिती नाही पण संभाजी कसाही असू दे, धर्मासाठी प्राण देवून तो आमचा हीरो बनला आहे. असा निर्धार इतिहासात फारच कमी राजांनी दाखवला आहे (दुसरं झळझळीत उदाहरण पृथ्वीराज चौहानाचं). बलीदान होतेवेळी तो महाराष्ट्राचा राजा होता. आणि त्या पदाची गरिमा त्यानं राखली. औरंगजेबाच्या औलादींबद्दल महाराष्ट्राची जी भावना आहे (ते महाराष्ट्र पुरोगामी आहे वगैरे पोपटपंची सोडा), तिचं एक कारण संभाजीचं बलिदान सुद्धा आहे.

समजा ही धर्मांतराला नकार दिला म्हणून औरंगजेबानी संभाजीराजांना मारलं ही घटना खरी आहे.
तर धर्मांतराला नकार न देता मुस्लिम झाले असते राजे तर त्यांच्या रयतेचा फायदा झाला असता की तोटा? म्हणजे त्यांच्यासारखा चांगला राजा राज्यावर राहिला असता आणि प्रजेचं कल्याण झालं असतं राइट? नंतरचा गोंधळ कोल्हापूर गादी सातारा गादी वगैरे वाद उद्भवले नसतेच की!

खरंच की. हे आमच्या डोस्क्यातच आलं नै. दुष्ट संभाजी प्रतिगामी, बुरसट आणि असहिष्णू विचारांचा असल्यामुळे त्यानं महाराष्ट्राचं हे नुकसान होवू दिलं हे वाईटच म्हणायला हवं. इतकंच नव्हे तर त्याच्यानंतर हे वाद वगैरे उद्भवणार आहेत हे त्याला आधीच ठावूक असायला हवं होतं. मराठेशाही बुडणार आहे हे सुद्धा त्याला माहीत असायला हवं होतं. आणि त्यानं मुस्लिम धर्म स्वीकारून जनतेला पण मुस्लीम करायला हवं होतं. इन्शाअल्ला, चुकलाच तो.

अनुप ढेरे's picture

5 Dec 2015 - 6:57 pm | अनुप ढेरे

चला.. चूक तर उमगली तुम्हाला. हे रग्गड झालं.

आदिजोशी's picture

17 Nov 2015 - 5:55 pm | आदिजोशी

फार लहान लिहिला लेख. एक मोठी लेखमाला होऊन जाउ दे ह्या विषयावर.

खटपट्या's picture

17 Nov 2015 - 6:55 pm | खटपट्या

आवो तुडतुडीताय! तुमी आदी मालोजीराव आनी झेले सायबांकडं शिकवनी लावा बरं !!

Half knowledge is always dangerous.

संदीप डांगे's picture

18 Nov 2015 - 2:11 am | संदीप डांगे

खटपट्या भाऊ, त्येंनी म्हटले ना तेच सत्य आस्तंया. साक्षात स्वर्गातून आता शंभूराजे उतरले तरी....

नया है वह's picture

18 Nov 2015 - 8:40 pm | नया है वह

.

सुहास झेले,

लेखाबद्दल आभार. शंभूराजांस ज्वलज्ज्वलनतेजस हे विशेषण अगदी चपखलपणे शोभते. भले त्यांच्या हातून चुका झाल्या असतील, पण प्रत्येक चुकीतून त्यांनी बोध घेतला असावा असे दिसते.

लेखातला एक उल्लेख दुरुस्त करावासा वाटतो. बाळाजी आवजी व त्यांच्या काही कुटुंबियांना जिवे मारल्याच्या उपरांत सोयाराबाईनी शंभूराजांची कानउघाडणी केली. तेव्हा बाळाजी आवजींचा दोष नव्हता हे शंभूराजांनी स्वत:च कबूल केले. याचा संदर्भ इथे आहे : http://prabodhankar.org/node/263/page/0/23

केतकरांचा ज्ञानकोशही वरील उल्लेखास पुष्टी देतो : http://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-44-50/10893-2013-03-0...

अण्णाजी दत्तो यांबद्दल माहीत नाही. परंतु बाळाजी कधीच उच्छेदनकटांत सामील नव्हते, हे नक्की.

आ.न.,
-गा.पै.

एस's picture

5 Dec 2015 - 12:05 am | एस

बाळाजी आवजी हे अण्णाजी दत्तोंच्या कटात सामील नव्हते, हे संभाजी महाराजांपर्यंत फार उशिरा समजलं. पण जेव्हा समजलं तेव्हा संभाजींनी स्वतः बाळाजींची समाधी बांधवून घेतली.

हेमंत लाटकर's picture

4 Dec 2015 - 10:57 pm | हेमंत लाटकर

मला नेहमी एक प्रश्न पडतो. संभाजी महाराज संगमेश्वरला गेले तेव्हा सोबत फक्त 200 सैन्य होते. शत्रू त्यांना कैद करण्यासाठी निघाले होते. असे असतांना संभाजी महाराजांनी सोबत 5000 सैन्य तरी घ्यायला पाहिजे होते.

संदीप डांगे's picture

5 Dec 2015 - 12:03 am | संदीप डांगे

लाटकर साहेब,

दॅट वाज अ प्लान. कधी कधी लपून छपून प्रवास करण्याचा फायदा घेण्यासाठी राजासोबत कमी सैन्य असतं जेणेकरून कुणाला संशय येऊ नये. इथे तर दगाफटक्याच्या हेतूने त्यांना आधीपासून गैरसल्ला देण्यात आलेला असू शकतो.

हेमंत लाटकर's picture

5 Dec 2015 - 9:45 am | हेमंत लाटकर

शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीच्या वेळी जयसिंग दगा होणार असा शब्द दिला होता, तरी महाराजांनी आग्र्याचा मार्गावर ठिकठिकाणी आपली माणसे पेरली होती. आग्रा येथे पोलादखानाच्या पहार्यातून सुटण्यासाठी मुत्सदीपणा करून आपली सुटका करून घेतली होती.
शिवाजी महाराजांच्या मराठेशाही बुडविण्यासाठी आैरंगजेब स्वत: 50,000 सैन्यानिशी दक्षिणेत आला होता. अशा वेळेस संगमेश्वरच्या आजूबाजूला बदोबस्त न करता केवळ 200 सैन्य घेऊन जाणे म्हणजे वेडेपणा होता.