काही किस्सेमय वाक्प्रचार !
मला नेहेमी वाटायचे कि प्रत्येक म्हणीमागे किंवा वाक्प्रचारामागे काहीतरी संदर्भ, कोणती तरी गोष्ट असणार नक्की.
अशी काय घटना घडली कि "काखेत कळसा…" किंवा "वासरात लंगडी गाय…" जन्माला आले?
तर अशाच दोन घटना माझ्या समोर घडल्या व ज्यावर तिथल्या तिथे काही वाक्प्रचार जन्माला आले.
(खरेतर या आधी मी हे दोन्ही वाक्प्रचार ऐकले नसल्याने मला तरी विशेष त्या घडीलाच जन्मले असे वाटते.तसे नसल्यास भरचूक नो)
गावात एकाने तिसरा टेम्पो विकत घेतला व त्यावर (तो नसताना)चर्चा चाललेली.
पहिला :- आयला मस्त कमावतोय गडी.
दुसरा :- मग न्हाय तर काय? आधीचीच देणी दिली न्हाईत आन तिसरा बी कर्ज काढूनच घ्येत्लाय.
पहिला :- म्हंजी 'घरची लाकडं जाळून कोळश्याचा धंदा करतोय' म्हणायचं तर?
तर एका पंक्तीला एकाने खूप ढकलले व यजमानाने आणखीचा आग्रह करता आपली आधीच्या क्वाण्टीटी ची लाज वाटून बिचारा नाही नको म्हणत होता इतक्यात शेजारचा बोलला "घ्या राव,हेल्यावर पाचुंदा काय जड न्हाय."
इथे
पाचुंदा :- पाच ओंब्या किंवा पाच पेंढ्याचा बांधलेली मोळी.
हेला :- बैल गाडी(आता ट्रक किंवा टेंपो) वर रचलेली पाचुन्द्यांची रास.
तुमच्याकडे हि असले वाक्प्रचारमय किस्से असल्यास सांगा. बघू रंग जमतोय का.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिक्रिया
आमच्या ऑफीसमध्ये एकजण
इंटरेस्टिंग धागा आहे :-)
करून गेला गाव आणि क्षक्षक्ष वर नाव...
"घ्या राव,हेल्यावर पाचुंदा