Skip to main content

महाराष्ट्र भूषण पुरस्कार वाद

लेखक डायवर यांनी मंगळवार, 18/08/2015 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
प्रसिध्द शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला अन लगेच वादाला तोंड फुटले. वृत्तवाहिन्या अन वृत्तपत्रांमधून बरीच मत मतांतरे बघावयास अन वाचावयास मिळत आहेत. बराच काळ वाट पाहून इथे शेवटी या विषयावर काथ्याकुट टाकतो आहे. बाबासाहेबांनी त्यांचे अख्खे आयुष्य शिवरायांच्या जीवनपटावर लोकउद्बोधक कार्यक्रम व शाहिरी करण्यात व्यतीत केले. "जाणता राजा " या लोकप्रिय कार्यक्रमामुळे शिवराय लहान मोठ्यांना अधिक सुलभतेने समजण्यास मदत झाली. पण पुरस्कार विरोधकांचा मुख्य आक्षेप हा आहे कि बाबासाहेबांनी चुकीचा इतिहास कथन केला. शिवरायांच्या जन्म तिथिबद्दल वाद, त्यांच्या जीवनात रामदास स्वामी यांना गुरु म्हणून चिकटवण्याचा प्रमाद, जीजाउंच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यात जेम्स लेनला केलेली कथित मदत व इतर अनेक आक्षेप त्यांच्यावर या अनुषंगाने आहेतच. या आक्षेपांमुळे त्यांच्या आयुष्यभराच्या कार्याला बट्टा तर लागला नाही ना? पुरस्कार ज्या कार्यासाठी मिळतोय ते कार्य वादविवादरहित असावे या मताचा मी असल्याने बाबासाहेबांनीच हा पुरस्कार नाकारावा असे मला वाटते. मिपाकरांना याबद्दल काय वाटते, हे जाणण्यास उत्सुक.

वाचने 25487
प्रतिक्रिया 135

प्रतिक्रिया

In reply to by प्यारे१

बऱ्याच जणांना नेमकं काय चुकीचं लिहिलंय तेही समजणार नाही.
खरंच अजुनही कळत नाहीये की ह्यात काय चुकीचे लिहिले आहे ते ? जितेंद्रजी आव्हाड ह्यांन्ना ह्या विधानात काय अर्थ लागला कोणी समजावुन सांगेल का इथे ?

फेसबुक फॉरवर्ड,हे खरे आहे काय,? मिपाकरांना काय वाटते?? पुरंदरे आणी ब्राह्मणांना विरोध कशासाठी ,माझे विश्लेषण १९९१ साली मंडल आयोग लागू झाल्यानंतर, ओबिसिंना सत्तेत मोठा वाटा मिळाला ओबिसिंना मोठा वाटा मिळाल्याने शिक्षण,रोजगार,राजकारण यातला मराठ्यांचा दबदबा खूप कमी झाला अमर्याद सत्ता उपभोगायची सवय लागलेल्या मराठा समाजाला ओबिसिंची प्रगती आणि घौडदौड बघून पोटात दुखायला लागले ओबिसि आरक्षण काढणे बाप जन्मात शक्य नसल्याने थेट आरक्षणात घुसण्याची तयारी मराठा समाजाने सुरु केली यासाठी मराठा हा मागासवर्गिय दाखवला पाहीजे,दलित, ओबिसिंनी भूतकाळात मराठ्यांनवर अत्याचार केले असा प्रचार केला तर् तो शतकातला मोठा विनोद ठरला असता मग मराठ्यांपेक्षा उच्चवर्णीय ब्राह्मण समाजाला यात ओढले गेले ,व ब्राह्मणांनी भूतकाळात मराठ्यांवर अत्याचार केल्याच्या खोट्या बाता मारणे सुरु झाले,यासाठी पगारी इतिहासतज्ञ नेमले गेले,ब्रिगेड सारख्या संघटना स्थापण केल्या गेल्या. मराठा हा दलित ओबिसिंप्रमाणेच मागासवर्गीय आहे हा खोटा दावा वारंवार लोकांच्या माथि मारुन पार्श्वभुमी तयार केलि गेली,यासाठी ब्राह्मणांना बदनाम केले गेले,प्रसंगी स्त्रीयांची बदनामी केली गेली २००५ पर्यंत पार्श्वभुमी निर्माण केल्यानंतर मराठा आरक्शनाची मागणी हळुच पुढे करण्यात आली मराठा हे मागासवर्गीय आहेत या खोट्या प्रचाराला दलित,ओबिसींच्या संघटना भुलल्यामुळे मराठा आरक्षणाला त्यांचा विरोध कमी झाला राष्ट्रवादी हा मराठ्यांचा पक्ष असल्याने २०१४ साली मराठा आरक्षण जाहीर झाले आरक्षणाची लबाडी हायकोर्टाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर हायकोर्टाने यावर बंदी घातली त्यामुळे पुन्हा ब्राह्मणविरोध सुरु झाला आहे,पण या संघटनांचं अंतीम लक्ष हे ओबिसी आरक्षणात घुसघोरी करुन त्यांच्या ताटातला चतकोर तुकडा हिसकावून घेणे हे आहे. परंतू या सर्वांमध्ये ब्राह्मण समाजाचा नाहक बळी जात आहे हे खेदजनक आहे.

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

उत्तम प्रतिसाद! याची सुरुवात केतकरांच्या घरावर हल्ला करण्यापासून झाली होती बहुतेक. तेव्हापासूनच मराठ्यांनी शिवाजी महाराजांना आपल्यात ओढायला सुरुवात केली.

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

ज्याला आपण ओबीसी समाज म्हणतो तो ना कधि राजकारणात बळकट होता ना अर्थकारणात. आपली बलुतेदारी सांभाळावी, सगळी कष्टाची कामे करावी, राजसत्तेला कर द्यावा, व जे पानात पडेल त्यात सुख मानुन नशीबाच्या हावाल्याने जगावं असं त्यांचं आयुष्य होतं. स्वातंत्र्यानंतर त्यांचं थोडंफार राजकीय भान जागृत झालं आणि लगेच पारंपारीक सत्ताधीशांना मिर्च्या झोंबल्या. त्याचाच परिणाम आहे हा सगळा.

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

प्रतिसाद वाचल्यानंतर पुन्हा पुन्हा आयडी चेक केला, स्वतःला एक चीमटा सुद्धा घेतला.

फेसबुक वरची पोस्ट कॉपी-पेस्टवतोय, माझेहि मत हेच आहे...
समग्र पुरंदरे प्रकरण हे फडणवीस आणि थोरले पवारसाहेब यांनी मिळून टाकलेला डाव आहे .. आपापल्या पक्षातले भ्रष्टाचारी सहकारी वाचवण्यासाठी या लोकांनी ही जातीय विद्वेषाची होळी पेटवली आहे .. तिनदा पुरंदरेंचा सत्कार केला तेव्हा पवारसाहेबांना त्यांची करनी माहीत नव्हती का ? पुण्यात निवडणुका आहेत म्हणून राज ठाकरे पण निघाले फुकटच्या आगिवर भाकऱ्या भाजायला .. त्यांच्या आजोबाने या पुरंदरेंना काय म्हणून संबोधलंय हे त्यांनी वाचलं नसेल का ?? खेडेकरांबद्दल जितकं बोलाल तितकं कमीच .. सतत “त्यांची पोरं स्टडित अन आमची कस्टडित” असं म्हणतात ब्रिगेड वाले .. आज बस जाळायला कुठून कोणत्या जातीचे पोरं आणले ?? ते कस्टडित जाणार की नाही ? विखे पाटलांना आज जाग आली अन पवारांचं तोंड कुठल्या दिशेला आहे ती दिशा बघुन ते बोलले .. असला पक्षनेता असल्यापेक्षा नसलेला बरा .. शरद पवारांना भुजबळ / रमेश कदम वाचवायचेत .. नाना फडणविसांना चिक्कीत अडकलेल्या पंकजाला वाचवायचं आहे .. तावडेला अन खडसेला दाखवून द्यायचंय की तेच असला सेवेन्टी एमएम ड्रामा राज्यात उभा करू शकतात .. च्यामायला आमच्या बुलडाणा जिल्ह्यात मागच्या वर्षीच्या पिकविम्याचे पैसे शेतकऱ्याला नाही मिळालेले अजुन .. तुरदाळ 150 रूपये किलो झाली म्हणतात .. कृषीकर्जाची पुनर्रचना गेली का चुलीत ? एका गुगलीत या दोघांनी सारे मुद्दे मागे पाडले .. अन गावोगावचे टूकार YZ पोरं निघाले महाराष्ट्र भूषण रद्द करा/दिलाच पाहिजे म्हणत .. हे राजकारण आहे रे गाढ़वांनो .. टिप - हे वैयक्तिक स्टेटस आहे .. वाटलंय ते लिहिलंय .. स्पष्टीकरण द्यायला मी काही कोणाच्या बापाचा मिंधा नाही. कळावे, लोभ असावा.

In reply to by मालोजीराव

बाकी प्रतिसादाशी १००% सहमत. फक्त ... नाना फडणविसांना चिक्कीत अडकलेल्या पंकजाला वाचवायचं आहे याबाबत दुमत आहे किंबहुना हे प्रकरण जाणीवपूर्वक उकरलं गेलंय असं वाटतं. कोणी उकरलं म्हणून विचारताय???? ह्या ह्या ह्या!

In reply to by मालोजीराव

वयाच्या ९४ व्या वर्षी पुरंदर्‍यांना असले काही बघायला मिळावे याचा फार फार खेद वाटतो. राजकारण करायचे ते करतातच पण नाहक अशा लोकांना वेठीला धरले गेलेले पाहिले की त्यासारखे वाईट दुसरे काही नाही. आता या लोकांनी बाबासाहेबांच्या पाठोपाठ मेहेंदळे सरांच्या मागे लागू नये म्हणजे झाले. :(

In reply to by बॅटमॅन

पुढचा नंबर त्यांचा. श्रीशिवजयंती उत्सव लोकमान्य टिळकांनी सुरू केला याला राजवाड्यांच्या लेखात पुरावे असताना ते नाकारणारे आणि स्त्रीशिक्षणात आगरकरांचं कार्य काही नाही म्हणणार्‍यांना काय अशक्य आहे?

In reply to by बॅटमॅन

मेहेंदळे सर ऋषीतुल्य आहेत,सरांचं साहित्य वाचलेलं आहे आणि त्याचं काम इतकी वर्ष पाहिलेलं सुद्धा आहे, सरांवर अशी वेळ आली तर सरांसाठी आम्ही पुन्हा तलवार उचलू …

In reply to by मालोजीराव

मालोजीराव, ब. मो. पुरंदर्‍यांसाठी आपली तलवार म्यानातून बाहेर का पडत नाही याचे कारण वाचण्यास आवडेल. मी दोघांचीही सर्व पुस्तके अभ्यासली आहेत म्हणून उत्सुकता...

In reply to by जयंत कुलकर्णी

दुर्दैवाने जाणता राजा नाटक पाहता आले नाही अजून, बाबासाहेबांची पुस्तके अजून वाचली नाहीत आणि अभ्यासलीहि नाहीत , थेट भेट कधीच झाली नाही, आम्ही म्हणजे ट्रस्ट ने त्यांचा 'शिवकल्याण राजा' हा कार्यक्रम गणेश कला क्रीडा ला ठेवला होता तेव्हा हि पुण्यात नव्हतो…पुरेसा अभ्यास आणि माहिती नसल्याने या वादात पडलो नाही. बाबासाहेबांच्या अचाट आणि अफाट निष्ठेबद्दल आणि कार्याबद्दल त्यांना पुरस्कार नक्कीच देण्यात यावा, असे वैयक्तिक मत आहे

In reply to by बॅटमॅन

आता या लोकांनी बाबासाहेबांच्या पाठोपाठ मेहेंदळे सरांच्या मागे लागू नये म्हणजे झाले.
ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ... लिस्ट्वर तुमचे आणि वल्ली सरांचे ही नाव असु शकते बरं का !!

In reply to by प्रसाद गोडबोले

खी खी खी, वल्ली सरांना काय टेन्शन नाय. अजून सातवाहन राजांच्या अत्याचारांपर्यंत हे लोक पोचलेले नसल्याने वल्ली सर सेफ आहेत एकदम. जोपर्यंत ब्रिगेडवाले देऊळ पाडापाडीचा कार्यक्रम आरंभत नाहीत तोपर्यंत तरी वल्ली सरांना काही टेन्शनच नाय.

In reply to by प्यारे१

सातवाहन.>>> हे नाव कानावर पडू देऊ नका. नाहीतर.... अमुक तमुक ... 'आठवाहन' (फॉरचुनर) वाले असं नाव लावतील. नाद करायचा नाय ! ४१४१

In reply to by प्रचेतस

तुमास्नी माहिईत न्हाई ? लै झेंगाट माणूस ! सुंदर्‍यांवर डोळा ठिवून आसतोय :)

In reply to by कपिलमुनी

दर्पणसुंदर्‍या काय ओ? कुठलीही दर्पणसुंदरी दिसली रे दिसली की, "सुंद्राबाई, फटूत या" (वाड्यावर या च्या चालीत वाचावे =)) ) म्हणताना ऐकलेय तोच झेंगाट माणूस काय हो हा?

In reply to by बॅटमॅन

ते ही आता लवकरच करणार ब्रीगेडवाले. भटांनी मिर्झाराजे जयसींगला देवीच्या अनुष्ठानात मदत केली. त्याचा परिणाम म्हणुन शिवाजीराजे जयसींगापुढे पराजीत झाले. भटांची मानगुट तर पकडलीच आहे ब्रीगेडींनी. पण आता मिर्झाराजांच्या देवीचं काहि खरं नाहि. तिने का म्हणुन ऐकावं भटांचं ? त्या देवीचा शोध सुरु आहे. तिच्या मंदीराची खैर नाहि. पण तो ही मुद्दा नंतर येईल. सर्वप्रथम नंबर लागणार तुळजाभवानीचा. तिथे तर भट नसतात पूजेला. तरिही तिने शिवाजीला मिर्झाराजेंविरुद्ध यश देऊ नये?? जयसींगाची देवी जर पॉवरफुल्ल होती तर तुळजेने आपला मराठी.. नाइ नाइ.. मराठा बाणा दाखवायला नको होता तिला?? तुळजेची खैर नाहि आता. मराठा छावा घाव घालायला सज्ज होतोय. जय ब्रीगेड.

In reply to by मालोजीराव

पुण्यात निवडणुका आहेत म्हणून राज ठाकरे पण निघाले फुकटच्या आगिवर भाकऱ्या भाजायला .. त्यांच्या आजोबाने या पुरंदरेंना काय म्हणून संबोधलंय हे त्यांनी वाचलं नसेल का ??
राज ठाकरे आणि बाबासाहेबांचा स्नेह फार जुना आहे. ही पूर्वी राज ठाकरेंनी बाबासाहेबांची रायगडावर घेतलेली मुलाखतः https://www.youtube.com/watch?v=UX6PqD1AdBk

ह्यांनी काहिही म्हंटले किंवा काहिही अपप्रचार केला तरीही छ्त्रपती आणि शिवशाहीर दोघांबद्दल महाराष्ट्रातील जनतेला असलेला आदर जराही कमी होणार नाही.शिवराय हे सर्व मराठी जनतेचे आदरणीय आहेत. ह्या लबाड कोल्ह्यांना सर्वजण ओळखून आहेत.

या आक्षेपांमुळे त्यांच्या आयुष्यभराच्या कार्याला बट्टा तर लागला नाही ना?
असल्या आक्षेपांमुळे आयुष्याच्या कार्याला बट्टा लागत नसतो. कावळ्याच्या शापानं गाय मरत नाही.
पुरस्कार ज्या कार्यासाठी मिळतोय ते कार्य वादविवादरहित असावे या मताचा मी असल्याने बाबासाहेबांनीच हा पुरस्कार नाकारावा असे मला वाटते.
त्यापेक्षा जे लोक वाद घालतायत त्यांना नाकारा की. कित्ती कित्ती तो सहिष्णुतेचा आव आणायचा तो.

मा उच्च न्यायालयाने श्री ब मो पुरन्दरे यान्च्या विरोधातील याचिका फेटाळली आणि याचीका कर्त्यांवर दहा हजार रुपये दंड हि लावला.

In reply to by सुबोध खरे

http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4824324917673676974&S… आणि ब्राह्मण समाजाच्या सुदैवाने न्यायाधीशांची आडनावे पाटील आणि शुक्रे अशी आहेत ... हेच जर कुळकर्णी किंव्वा देशपांडे असते तर महाराष्ट्रात १९४८ ची पुनरावृत्ती झाली असती ह्यात शंका नाही ! आता "न्यायालय सरकारच्या द्बावाखाली काम करते" असा युक्तीवाद कधी येतोय ह्याची वाट पहात आहे :)

आज कोर्टाने याचिकेत काही अर्थ नाही हे स्पष्ट केलेच आहे. सरकारने कोर्टाला विनंती करावी, १. याचिका करणाऱ्यांनी कोर्टाचा वेळ वाया घालवला. २.यानिमीत्ताने समाजात तेढ निर्माणं करायचा प्रयत्नं केला. ३. एका ऋषीतूल्य माणसाचा अपमान केला म्हणून त्यांच्याकडुन प्रत्येकी ११लाख तसेच त्यांच्या पक्षा कडुन ११कोटी दंड वसूल करण्यात यावा. कोर्टाने तसा आदेश द्यावा अशी विनंती सरकारने करावी. शिवाय पक्षाची मान्यता रद्द करण्याची सिफारस निवडणूक आसिगाला करावी.

प्रश्न पैश्याचा नसून याचिकाकर्त्यांना न्यायालयाने मारलेल्या चपराकेचा आहे. असे असूनही हे निर्लज्ज लोक हा प्रश्न भावनेचा असून न्यायालयाच्या अखत्यारीत येत नाही असेही म्हणतील. ( हेच जर न्यायालयाने स्थगिती दिली असती तर मात्र तोंड वर करून नाचले असते)

श्री मोरोपंत पिंगळे हे जातींनी ब्राम्हण आहेत. आणि सरनौबत श्री हंबीरराव मोहिते किंवा सरनौबत श्री प्रतापराव गुजर हे जातींनी मराठा आहेत असा भेदभाव मुळातच महाराजांच्या स्वराज्याला माहित नाही . त्या स्वराज्याला माहित होत माणसाची गुणवत्ता त्याचं कौशल्य, धाडस ,निष्ठा. आपण जर त्याच स्वराज्याचं आधुनिक रूप आहोत तर आपल्याला याचा विसर पडावा हेच दुर्दैव आहे. थोड्या वेळासाठी जर आपण देशपातळीवर आपला विचार केला की आपली काय ओळख आहे आपल्या देशात, तर उत्तर आपल्याला सगळी कडे मिळेल (जे बाहेर राज्यात राहतात किंवा जाऊन आलेत ते) ते उत्तर आपल्या राष्ट्रगीतामध्ये ही आहे. II पंजाब सिंध गुजरात मराठा II याचा अर्थ सगळ्या देशाच्या दृष्टीनी आपण मराठा आहोत आणि महाराष्ट्र राहणारे सगळे मराठा थोडा पुढा जावून म्हणावसं वाटत कि छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा पाईक तो मराठा. मला वाटत की हाच अर्थ श्री महाराजांना ही अभिप्रेत असावा. आता राहिला प्रश्न श्री बाबासाहेबांना पुरस्कार देण्याचा तर मला असे वाटते की भावनेचा किंवा ते कोणाचे आहेत हा भाग बाजूला ठेवून विचार केला तर असे समजेल की आपल्यामधल्या बहुतांशी लोकांचं जेवढा वय आहे तेवढा श्री बाबासाहेबांचा अभ्यास आहे. निदान त्याच तरी आदर करून त्यांच्यावर चाललेली चिखल फेक थांबवावी. उगीच धुडगूस घालाण्यांनी काहीच सिद्ध होत नाही. ज्यांना काहीच माहित नाही आणि ज्यांना एखाद्या गोष्टीचा अर्थ सुद्धा निट लावता येत नाही त्यांनी काहीच बोलू नये.

In reply to by शिलेदार

मराठा तितुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा हे लिहिणारे समर्थ रामदास स्वामी तर ब्राम्हण होते.( इतक्या वर्षात रामदास स्वामींची जात विचारात घ्यायचे "पुण्य" लाभलेले नव्हते ते आता या लोकांमुळे लाभले आता डोळे मिटले तरी चालतील.) मग त्यांनी "मराठा" मेळवावा कसे लिहिले? साधे उत्तर आहे मराठा म्हणजे महाराष्ट्रात राहणारा मराठी बोलणारा माणूस. हे जातीवाचक विशेषण नाही. पण पिवळ चष्मा लावला कि सगळे जग कावीळ झाल्यासारखे भासते. त्याला कोण काय करणार?

चवथीच्या पुस्तकात पहिल्यांदा शिवाजीमहाराज भेटले. ते इतिहासाचे पुस्तक आजही मनात कोरलेलं आहेच. दलालांची चित्रे असावीत ती. ते अश्वारूढ शिवाजी दैवत म्हणजे नेमकं काय ते समजायच्या आधी त्या पदावर आरूढ झाले त्यात चवथीच्या त्या पुस्तकाचा वाटा होताच मात्र पुढे जाऊन राजाशिवछत्रपती चे त्याकाळी असणारे छोटे छोटे पुस्तकामुळे सुध्दा झाले. शाळेत असताना शाळेच्या वाचनालयातून पुढे परत एकदा मोठ्या ठोकळावजा पुस्तकातून आणि आता अगदी मागच्याच वर्षी दोन मोठ्या ठळक फॉन्तमधून दोन खंडात हे राजाशिवछत्रपती हे पुस्तक वारंवार भेटतंय. माझा मराठी पींड पोसण्यात ह्या पुस्तकाचा मोठा वाटा. बाबासाहेब पुरंदर्‍यांनी लिहीलेल्या आणि मी वाचलेल्या प्रत्येक पानापानाने माझ्या मनात शिवाजी महाराजांबाबतचा आदर वाढतच गेलाय. त्यांनी लिहीलेल्या राजाशिवछत्रपती नंतर मी अनेक वेगवेगळ्या मांडणीतील शिवाजी वाचलेत. सेतु माधव पगडी पासून ते नरहर कुरूंदकर आणि पानसरेंपर्यंत वाचलेत. जाणीवेच्या प्रत्येक पातळीवर आपल्याला नवनवीन काहीतरी मिळत जातं. शिवाजी अधीक खोलात समजतात. मात्र तरी सुध्दा माझ्या दैवताचे जे चरीत्र बाबासाहेबांनी मांडलंय त्याला तोड नाही. ते अधीक भावतं. ते अधीक पोहोचतं. कारण ते मनापासून निघालं आहे असं वाटतं. इतिहास आणि संशोधन हे करण्यासाठी त्याच्या शास्त्र शाखा आहेत त्यांना काय करायचे ते त्यांनी करावे. मला माझ्या राज्याचं कौतूक शिवशाहीर बाबासाहेबांच्या तोंडून ऐकायला किंवा वाचायला आवडतं. त्यांनी लिहीलेली पुस्तके आमच्यासाठी राजांची पोवाडेच आहेत. त्यामुळे ते महाराष्ट्र भूषण आहेतच. आमचे सरकार आज त्याला अधिकृत मान्यता देतेय एवढंच. त्याचेही स्वागत आहेच. बाबासाहेबांनी काय लिहीलंय आणि त्यातून कार्य अर्थ निघतो याचा अन्वय लावताना किंवा त्याच्या आधीच बाबासाहेबांच्या आयुष्याचा पट उलगडून बघावा. शिवाजीमहाराजांशिवाय त्यांच्या आयुष्यात उरतं तरी काय याचा शोध घ्यावा. उठता बसता... जळी काष्ठी पाषाणी फक्त आणि फक्त शिवाजी महाराज हेच त्यांचं दैवत आहे. माझे मत असे आहे की माझ्यासारख्या सामान्य मराठी मानसासाठी बाबासाहेब महाराष्ट्र भूषण आहेतच. - नीलकांत

In reply to by नीलकांत

माझ्यासारख्या सामान्य मराठी मानसासाठी बाबासाहेब महाराष्ट्र भूषण आहेतच
अगदी मनातले बोललात मालक. थोड्या वर्षापूर्वीची गोष्ट आहे. बाबासाहेब महाराष्ट्रभर शिवव्याख्यानासाठी दौरे करायचे. बार्शीसारख्या लहान गावात एका बॅंकेने त्यांचे तीन दिवसांचे व्या़ख्यान आयोजित केले होते. पहिल्यादिवशी 'पन्हाळगडावरुन सुटका' हा विषय होता. त्यावेळी बाबासाहेबांनी असे आवाहन केले होते की शिवचरित्रातला प्रत्येक प्रसंग शाहिरांना, चित्रकारांना आव्हान आहे. एकेका प्रसंगावर चित्र काढले तरी आयुष्य पणाला लागेल. एवढा संपन्न वारसा आपल्याला लाभलाय तर का कुणी चित्रकार त्यासाठी आयुष्य वेचत नाही. त्यासाठी त्यांनी स्व. दिनानाथ दलालांचेच उदाहरण दिले होते. व्याख्यानाला आलेल्या एका शाळकरी मुलाने त्या दिवशीच्या व्याख्यानावर एक चित्र काढले. मुलाच्या वडिलानी ते चित्र बाबासाहेबांना दिले. बाबासाहेबांनी दुसर्‍या दिवशी त्या मुलाला बोलावून स्वहस्ते त्याचा सत्कार केला. स्वतःची शाल त्याला देऊन वार्ताहरांना व्याख्यानाच्या फोटोएवजी त्या चित्राचे फोटो पेपरमध्ये टाकायला सांगितले. त्यांच्या बार्शीतल्या तात्पुरत्या निवासस्थानी बोलावून दलालांचा वारसा चालवायचा आशिर्वाद दिला. . आजही अभिमानाने सांगतो, ती शाल अन वर्तमानपत्र माझ्याकडे आहे. त्यांच्या आशिर्वादावरच माझी लहानशी का असेना पण चित्रकारकिर्द उभी आहे. म्हणूनच
माझ्यासारख्या सामान्य मराठी मानसासाठी बाबासाहेब महाराष्ट्र भूषण आहेतच

In reply to by अभ्या..

अरे क्या बात है अभ्या, लेका भाग्यवान हायेस लैच. प्रत्यक्ष शिवशाहीरांनी गौरवलेले टॅलेंट खासमखास असणार हे तर नक्कीच!!!! निव्वळ थोर _/\_

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

पशा, पैकाताय, सृजा, ब्याटया, श्रीरंगा, श्री. एक्काकाका, पम्या आणि कोमल याना धन्यवाद. मिपामुळे अशा क्षणाना उजाळा मिळाला. जिन्दगीत काहीतरी केल्यासारखे वाटते. धन्यवाद

In reply to by अभ्या..

अभ्या, या निमित्ताने त्या चित्राचा व शालीचा फटू टाक की मर्दा. पायजे तर येक छोटासा लेखच टाक त्यावर. तेवढेच बघून बरे वाटेल.

In reply to by बॅटमॅन

होय ब्याट्या. ते आपल्या बार्शीच्या घरी अल्बम मध्ये हाय. नेक्स्ट ट्रिपला फोटो घेऊनच येतो. डीट्टेल स्टोरीसहीत टाकतो. :)

In reply to by अभ्या..

आजही अभिमानाने सांगतो, ती शाल अन वर्तमानपत्र माझ्याकडे आहे. त्यांच्या आशिर्वादावरच माझी लहानशी का असेना पण चित्रकारकिर्द उभी आहे. हया वाक्याने मात्र अंगावर सरसरीत काटा आला. वरती जस मालकांनी म्हंटलय "माझ्यासारख्या सामान्य मराठी मानसासाठी बाबासाहेब महाराष्ट्र भूषण आहेतच" हे एकदम खर आहे, आमच्या सारख्या वाचकांसाठी बाबासाहेब आम्हि जेव्हा पासुन इतिहास वाचायला शिकलो तेव्हापासुनच महाराष्ट्र भुषण आहेत.

नीलकांत, महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील बोललात. त्यासाठी तुम्हाला मिपाभुषण द्यावे काय असा प्रस्ताव समितीकडे पाठवत आहे.... :-)

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचा महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कारासाठी निवड समितीने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची निवड योग्य विचार करून आणि कायदेशीर प्रक्रिया अवलंबून केल्याचे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाने पुरस्कारविरोधी याचिका सफशेल फेटाळून लावली. केवळ 'पब्लिसिटी स्टंट'साठी याचिका दाखल करून न्यायालयाचा वेळ वाया घालवल्याबद्दल याचिकाकर्त्यांना १० हजार रुपयांचा दंडही ठोठावला. आज संध्याकाळी राजभवनात 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार सोहळा होणार आहे. .... ज्यांना पुरस्कार दिला जात आहे त्यांनी इतकी वर्षे काहीच काम केले नाही का?, लिखानाविषयी किंवा विचारांविषयी समाजात नेहमीच मतभेद असतात, त्यावर टीकाही होत असते. पण त्या व्यक्तीने ४० ते ५० वर्षे काही तरी केले आहे, हे तरी तुम्ही मान्य कराल ना?, शिवाय जो काही विवाद असेल तो या 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार प्रदान केल्यानंतर पुसला जाईल किंवा संपुष्ठात येईल असे तुम्हाला वाटते का? असे थेट प्रश्न न्या.पाटील आणि न्या. शुक्रे यांनी याचिकाकर्त्यांच्या वकिलाला विचारले.

जातीच्या आणि पैशाच्या भ्रष्टाचारात रुतलेल्या किड्यांनो, बाबासाहेबांनी त्यांना पुरस्कार मिळालेली रक्कम, त्यांत स्वतःची भर घालून कर्कग्रस्त लोकांसाठी देणगी दिली आहे. यावरुन तरी तुम्हाला खरे सुसंस्कृत म्हणजे काय, ते कळावे.

"पुरस्काराच्या स्वरुपात आपण मला १० लक्ष रुपये दिले. हे पैसे महाराष्ट्राचे आहेत, शाहीरांचे आहेत, कवींचे आहेत, लेखकांचे आहेत, इतिहासकारांचे आहेत, कलाकारांचे आहेत! ह्या पैश्यांवर माझा जरादेखील अधिकार नाही. मा. मुख्यमंत्री, मा. राज्यपाल यांचा आणि समस्त महाराष्ट्राचा मान राखायचा म्हणून, मी यांतले १० पैसे तेवढे घेतो. आणि त्या १० लक्ष रुपयांत माझ्याकडचे १५ लक्ष रुपये घालून, पैश्यांअभावी कॅन्सरवर उपचार करवू न शकणाऱ्या गरीब रुग्णांसाठी एकूण २५ लक्ष रुपये देऊन टाकतो!" — 'महाराष्ट्रभूषण' शिवशाहीर श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे.

मी आता बिग्रेड आणि मंडळींच्या खालील वक्तव्याची वाट पहातोय " आरक्षणामुळे काही जातींच्या लोकांची प्रगती झाली. परंतु ब्राम्हणांना आरक्षण नाही म्हणून ते हल्ली गरीब होत आहेत. आणि याच गरिबांना मदत म्हणून बाबासाहेबांनी २५ लक्ष दान केले. १५ लक्ष सोडा पण नऊ लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव रुपये आणि नव्वद पैसे या पुरस्कारातून मिळालेले होते. शिवाय वरचे १० पैसे स्वतःसाठी ठेऊन घेतले म्हणजे पुरस्काराची १००% रक्कम स्वजातीच्या कल्याणासाठी वापरायचा कुटील डाव बाबासाहेब आणि फडणविसांनी खेळला आहे" (बोलायला काय जाते म्हणून बिन्डोकांकडून अशी अनेक विधाने आलेली आहेत येत रहातील) बिग्रेडी अकलेचे तारे तोडणारा कहर

In reply to by कहर

मंगेशकरांच्या हॉस्पिटललाच दिले ना पैसे???? असं म्हणून झालंय ऑलरेडी. (मेसेज फिरतोय) बाकी फर्स्ट हॅण्ड अनुभव म्हणून सांगतो, मंगेशकर हॉस्पिटलला 'शून्य रुपये खर्चात सुद्धा' उपचार होतात हे पाहिलं आहे.

In reply to by प्यारे१

मंगेशकरांच्या हॉस्पिटललाच दिले ना पैसे???? असं म्हणून झालंय ऑलरेडी. (मेसेज फिरतोय)
अवघड आहे !

काही गोष्टी अशा आहेत की जिथे साक्षात शब्द आणि भाव नतमस्तक होतात. ..शिवछत्रपती आणि बाबासाहेब ही अशीच कवतिके आहेत महाराष्ट्राची !! ..अन मिपाकरांची !!!

तुम्हा सर्वांचे प्रतिसाद वाचून मी थोडा वेळ स्वस्थ बसलो व एक दीर्घ श्वास घेतला. श्री. बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्रभुषण हा पुरस्कार म्हणजे त्यांनी शिवाजी महाराजांविषयी केलेल्या कार्याची पोहचपावती, ती त्यांना मिळालीच पाहिजे. ती मिळाली त्याबद्दल फडणवीसांचे अभिनंदन. राष्ट्रवादीवाले दिल्लीच्या सरदाराची थप्पड लवकर विसरले.