सध्या महाराष्ट्रात महाराष्ट्रभुषण पुरस्कारावरुन वाद सुरु आहे.शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना इतिहासकार व इतिहासाचे गाढे अभ्यासक ठरवून हा पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातील अनेक संघटनांचा याला विरोध आहे.संभाजी ब्रिगेडने या विरोधात 'शिवसन्मान जागर परिषद' स्थापन करुन विरोध सुरु केला आहे. विरोधकांचे म्हणणे असे आहे की पुरंदरे इतिहासकार नाहीत ,तर ते एक नाटककार व शाहीर आहेत, त्यांना इतिहासतज्ञ म्हणुन पुरस्कार देणे चूक आहे. पुरंदरेंनीही स्वतःला कधीही इतिहासकार म्हणवून घेतलेले नाही ते स्वतःला शाहीर म्हणवतात, पण भाजपप्रणीत सरकारने जनतेची दिशाभूल करत त्यांना शिवचरीत्राचे गाढे अभ्यासक ही पदवी दिली आहे असा विरोधकांचा आक्षेप आहे. तर प्रश्न असे आहेत
1.हा आक्षेप योग्य आहे का ?
2.कादंबरीकार नाटककाराला इतिहासतज्ञ ठरवल्याने ,त्याने त्याच्या कलाकृतीत केलेले कल्पनाविलास 'इतिहास' म्हणुन पुढच्या पीढीने स्विकारण्याचा धोका आहे का?
3.जेम्स लेनच्या पुस्तकात पुरंदरेंचा उल्लेख असताना त्यांनी त्यावर योग्य स्पष्टीकरण दिले नाही हा विरोधकांचा आरोप योग्य वाटतो का?
प्रतिक्रिया
24 Jun 2015 - 1:51 pm | सौंदाळा
तुम्ही अजुन आहे होय
मला वाटले हितेशबरोबर तुमच्या आयडीला पण देवाज्ञा झाली.
तेंडुलकरसुध्दा म्हणायचा मी अजुन फलंदाजी शिकतोय, त्यालापण उगीच भारतरत्न दिले.
24 Jun 2015 - 2:17 pm | ग्रेटथिंकर
तेंडुलकरचे उदाहरण इथे योग्य ठरत नाही.
24 Jun 2015 - 2:25 pm | खेडूत
मला या धाग्यावर एकच बोलण्यासारखे आहे:
तो महाराष्ट्रभुषण नसून महाराष्ट्रभूषण पुरस्कार आहे !
24 Jun 2015 - 2:39 pm | आदिजोशी
हा विषय सद्ध्या संपला आहे. ब्रिगेडी बेडकांनी रान उठवण्याचा प्रयत्न करूनही सरकारने शष्प लक्ष न देता त्यांना फाट्यावर मारल्याने हा विषय पाताळात गाडला गेलेला आहे.
तरी, सद्ध्या हाफिसात वेळ असल्याने आणि बोलायची खाज असल्याने तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतो.
1.हा आक्षेप योग्य आहे का ?
अजिबात नाही.
2.कादंबरीकार नाटककाराला इतिहासतज्ञ ठरवल्याने ,त्याने त्याच्या कलाकृतीत केलेले कल्पनाविलास 'इतिहास' म्हणुन पुढच्या पीढीने स्विकारण्याचा धोका आहे का?
बाबासाहेबांनी कोणताही कल्पनाविलास, मनाच्या घटना शिवचरीत्रात घुसडलेल्या नाहीत. बाबासाहेब शिवचरीत्राचे गाढे अभ्यासक आहेत ह्यात चुकीचे काहीच नाही. अभ्यास आहेच त्यांचा ह्या बाबत वाद नाही. मांडणी बखर सदॄष नसून ललीत असल्याने अनेक मठ्ठ लोकांना तो कल्पनाविलास वाटतो. स्वतः बाबासाहेबांनी त्यांनी लिहिलेला चरित्रात चुका आढळल्यास त्या सुधारण्याची कायमच तयारी दाखवलेली आहे.
3.जेम्स लेनच्या पुस्तकात पुरंदरेंचा उल्लेख असताना त्यांनी त्यावर योग्य स्पष्टीकरण दिले नाही हा विरोधकांचा आरोप योग्य वाटतो का?
मुळात हे विरोधक राजकीय हेतूने प्रेरीत असल्याने त्यांच्याकडे लक्ष द्यायची अजिबात गरज नाही. ब्राह्मण विरोधाची कावीळ झालेल्यांच्या विरोधाचा हेतू बाबासाहेब ब्राह्मण आहेत हा असल्याने विरोधकांना फाट्यावर मारण्यात यावे.
24 Jun 2015 - 4:10 pm | बाळ सप्रे
नाटककार अथवा शाहीर यांना महाराष्ट्रभूषण देणे अयोग्य आहे का ??
24 Jun 2015 - 4:21 pm | ग्रेटथिंकर
नाटककार अथवा शाहीर यांना महाराष्ट्रभूषण देणे अयोग्य
आहे का ??>>>>>>>>>>नाटककार किंवा शाहीर यांना पुरस्कार देण्यात काहिच अडचन नाही,पन त्यांना इतिहासकार म्हनुन पुरस्कार देण्यावर आक्षेप आहे.
24 Jun 2015 - 4:30 pm | कपिलमुनी
त्यांना इतिहासकार म्हणून पुरस्कार दिला आहे असे कुठे नमूद केले आहे ?
कृपया लिंक द्या.
24 Jun 2015 - 5:05 pm | संदीप डांगे
काही लोकांना वेगळाच महाराष्ट्र काढून द्यावा का लोकसंख्येच्या प्रमाणात?
म्हणजे त्यांचा इतिहास, इतिहासकार, शाहिर, नाटककार, भूषणं वेगळी राहून वाद होणार नाहीत.
(जाउ दे.. खूप तुकडे पडतील आणि कुठल्याही तुकड्यात कायम रहिवासी कधीच मिळणार नाहीत)
24 Jun 2015 - 10:18 pm | मितभाषी
पुरस्काराने काल्पनिक/ बायस्ड ईतिहास अधिक्रूत होइल. तस्मात्त पुरस्कार न देणे योग्य रहील.
तसेही रयतेने या विरोधात रान उथवल्यामुले सरकार सध्यातरी शान्त आहे.
24 Jun 2015 - 10:31 pm | सुबोध खरे
त्यांना इतिहासकार म्हणून पुरस्कार दिला तर कुठे बिघडले. अर्ध्या महाराष्ट्राला शिवरायाच्या इतिहासाची गोडी लावली हे त्यांचे ऋण काय कमी आहेत का?
आइन्स्ताइन ला सुद्धा सापेक्षतावादाच्या सिद्धांतासाठी नोबेल मिळाले नाही तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट साठी मिळाला होता त्यामुळे आईन्स्टाइंनची थोरवी कमी होत नाही.
हि ब्रिगेडी मनोवृत्ती सोडून द्या. एखाद्याला त्याच्या जातीमुळे श्रेय मिळू न देणे हि वृत्ती कोती आहे.
24 Jun 2015 - 10:32 pm | सुबोध खरे
चिमणराव
कुठे इंद्राचा ऐरावत
आणि
कुठे शामभटाची तट्टाणी
25 Jun 2015 - 7:02 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
=))
24 Jun 2015 - 10:41 pm | मितभाषी
Vaicharik mat matantare ahet mhanun vaiyaktik halle chadvinyachi hi sanatani pratha samajik pragatis badhak aahet.
Vicharanchi ladhai vicharanech ladhali pahije n ki ekhadyachi hatya karun.
24 Jun 2015 - 10:50 pm | फारएन्ड
पुरंदरे इतिहासतज्ञ आहेत. इतिहासकार शब्दाची काही सर्कारी व्याख्य असेल तर माहीत नाही. पण सर्वसाधारण अर्थाने ते इतिहासकारही आहेत. 'राजा शिवछत्रपती' हे पुस्तक अगदी कादंबरी आहे असे धरले (आणि ती बरीचशी आहे, हे नक्की) तरी त्याने पुरंदरे इतिहासतज्ञ नाहीत असा अर्थ कसा निघू शकतो? त्यांनी इतिहासाचा अभ्यास करतात तसाच तो केला, पण त्यावरून लिहीले ते लोकांना सहज आवडेल असे.
ते पुस्तक म्हणजे ऐतिहासिकरीत्या सिद्ध झालेल्याच गोष्टींचे आहे की नाही हा वाद वेगळा आहे. तो काळ लोकांपुढे आणण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केलेले आहे.
केवळ ते ब्राह्मण आहेत म्हणून द्यायचा नसेल तर गोष्ट वेगळी.
बहुसंख्य लोक त्यांच्या मताला पुष्टी देणारी पुस्तके वाचतात. त्यात जे लिहीले आहे तोच इतिहास समजतात, त्याकरता सर्कारी अॅप्रूवल कोणी बघत नाही, ते मिळाले म्हणून हे बदलत नाही.
24 Jun 2015 - 10:52 pm | टवाळ कार्टा
साहेब ते परिक्षणांचे बघा की जरा...खूप वाट बघायला लावता
24 Jun 2015 - 11:59 pm | फारएन्ड
प्रयत्न चालू आहेत.
24 Jun 2015 - 11:34 pm | मितभाषी
पुरंदरे इतिहासतज्ञ आहेत. इतिहासकार शब्दाची काही सर्कारी व्याख्य असेल तर माहीत नाही. पण सर्वसाधारण अर्थाने ते इतिहासकारही आहेत. '^^^^^^^^^^^^
hich dharna pakki asel tar pudhil charches kahich arth urat nahi.
mobile varun typt asalyane problem yet aahe
24 Jun 2015 - 11:58 pm | फारएन्ड
ते इतिहासाचे अभ्यासक नक्कीच आहेत, इतिहासतज्ञही नक्कीच आहेत. 'इतिहासकार' आहेत की नाही माहीत नाही कारण त्याला काही ठराविक व्याख्या असेल तर कल्पना नाही - इतर काही इतिहासकार जसे फक्त ऐतिहासिक कागदपत्रांवरून सिद्ध होऊ शकणारीच माहिती लिहीतात व त्यात इतर काही लिहीत नाही तसे एखादे पुस्तक त्यांनी लिहीले आहे की नाही कल्पना नाही. आता ब्रिगेड चा विरोध नक्की कशाला आहे?
25 Jun 2015 - 12:06 am | काळा पहाड
ते ब्राम्हण आहेत त्याला.
25 Jun 2015 - 8:10 am | अत्रुप्त आत्मा
+१
25 Jun 2015 - 1:11 pm | विशाल कुलकर्णी
+१
25 Jun 2015 - 3:09 pm | बॅटमॅन
इतिहाससंशोधन करणारा तो इतिहासकार असे म्हणायचे असेल तर पुरंदरे नक्कीच इतिहासकार आहेत. काही पुस्तकांसाठी प्रख्यात इतिहासकार ग.ह.खरे यांच्या असिस्टंटचे काम पुरंदर्यांनी केलेले आहे. नक्की पुस्तकांची नावं जरा पाहून सांगतो. पण पहिल्या धारेचे संशोधन पुरंदर्यांनी थोडे का होईना, केलेय हे महत्त्वाचे आहे. भलेही त्यांचं मुख्य काम ते नसलं तरीही...
25 Jun 2015 - 3:15 pm | होबासराव
:)
25 Jun 2015 - 5:38 pm | माहितगार
मराठी शाब्दबंधात "इतिहासाचा अभ्यास करणारी किंवा त्याच्याशी संबंधित गोष्टी करणारी इतिहासाची जाणकार व्यक्ती" अशी इतिहासकार शब्दाची व्याख्या दिली आहे (संदर्भ). मराठी पारिभाषिक शब्दकोशात Historian या शब्दास इतिहासकार हा शब्द वापरला आहे.(संदर्भ). ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीची Historian शब्दाची व्याख्या "An expert in or student of history, especially that of a particular period, geographical region, or social phenomenon:" अशी आहे.
इंग्रजी विकिपीडियात historian ची ओळख "A historian is a person who researches, studies and writes about the past, and is regarded as an authority on it. Historians are concerned with the continuous, methodical narrative and research of past events as relating to the human race; as well as the study of all history in time." अशी दिली आहे. (संदर्भ)
24 Jun 2015 - 11:29 pm | अत्रुप्त आत्मा
या मंबाजि ब्रिगेडचि लायकी तरी आहे का कुणावर आरोप करायची?
25 Jun 2015 - 5:11 am | रमेश आठवले
"3.जेम्स लेनच्या पुस्तकात पुरंदरेंचा उल्लेख असताना त्यांनी त्यावर योग्य स्पष्टीकरण दिले नाही हा विरोधकांचा आरोप योग्य वाटतो का?"
जेम्स लेन याने त्याच्या शिवाजी वरच्या पुस्तकात पुरंदरे यांचा नेमका कसा उल्लेख केला आहे आणि त्या वरून आक्षेप घेण्या सारखे काय आहे हे कोणी सांगू शकेल का ?
25 Jun 2015 - 9:59 am | मुक्त विहारि
कुठे आहेत?
25 Jun 2015 - 10:03 am | नाखु
खेडेकर आणि साळुंखे+कोकाटे यांना सलग ५ वर्षे हा पुरस्कार द्यावा म्हणून उपोषण करणार आहेत असे आम्चा ओसाडवाडीचा वार्ताहर कळवितो.
दै तुणतुणे
खुस्पटवाडी
ता:आग्लाव
जि: नसती भान्गड
25 Jun 2015 - 10:18 am | अत्रुप्त आत्मा
@ दै तुणतुणे
खुस्पटवाडी
ता:आग्लाव
जि: नसती भान्गड>> :-D
25 Jun 2015 - 11:36 am | मृत्युन्जय
त्यांनी सध्या मितभाषी राहण्याचा निर्णय घेतला असावा.
25 Jun 2015 - 11:57 am | वटवट
बाबासाहेब पुरंदरेंवर प्रश्न उपस्थित करणार्यांनी आधी स्वतःला आरश्यात बघावं… स्वच्छ….
25 Jun 2015 - 3:17 pm | टवाळ कार्टा
लेखक हेवनवासी झालाय...हा धागा हवाच का फुटबॉल खेळायला???
25 Jun 2015 - 4:53 pm | काळा पहाड
'जन्नत' वासी कशावरून झाला नसावा?
25 Jun 2015 - 5:42 pm | मृत्युन्जय
कमाल आहे, आयडी पुण्यात्मा होता अशी तुमच्या दोघांची खात्री होती असे दिसते ;)
25 Jun 2015 - 6:07 pm | टवाळ कार्टा
खिक्क...कारण आपल्यात व त्याच्यात फरक आहे :)
29 Jun 2015 - 3:44 pm | तुडतुडी
संभाजी ब्रिगेडने "तुकाराम महाराजांना मारण्यात आलं होतं. पण ब्राह्मणांनी हि गोष्ट लपवून ठेवली " असा शोध लावलाय
29 Jun 2015 - 3:51 pm | बॅटमॅन
ते काय, काहीही शोध लावतील.
एकीकडे ब्राह्मण सर्वशक्तिमान होते असे म्हणायचे (खूनबीन करणारे इ.) तर दुसरीकडे त्यांच्या पौरुषावर प्रश्नचिन्ह उपस्थित करायचे, नक्की केहना क्या चाहते हो तेच कळत नै त्यांचं.
29 Jun 2015 - 5:53 pm | dadadarekar
मग तुकोबा विमानातून गेले की काय ?
29 Jun 2015 - 5:56 pm | पैसा
तुम्ही बघितलंय का? आमच्या माईसाहेबांनी बघितलंय आणि मला तसं सांगितलं आहे.
29 Jun 2015 - 6:11 pm | बॅटमॅन
जर विमानातून गेले नसतील तर खूनच झाला हे तरी कशावरून? ब्रिगेडी म्हणतात म्हणून?
29 Jun 2015 - 6:35 pm | आनन्दा
असू द्या हो. त्यांना सुन्दर उत्तर यापूर्वीच दिले गेले आहे. समजा तुकोबांचा खून ब्राह्मणांनी केला, हे एका क्षणासाठी खरे मानले, तर मग पुढचा प्रश्न, शिवाजी महाराज तुकोबांना गुरू मानत होते, त्यांच्या गुरुंचा खून झाला आणि महाराजांना कळले पण नाही? तस्मात तुम्हाला नेमके काय सिद्ध करायचे आहे ते ठरवा, ब्राह्मण खूनी होते आणि शिवाजी महाराज त्यांना सामील होते, की ब्राम्हण एव्हढे हुशार होते की त्यांनी तुकोबांचा खून केला आणि शिवाजी महाराजांना "बनवले"?
29 Jun 2015 - 6:49 pm | बॅटमॅन
हा हा हा, मग तर ब्राह्मण भलतेच चतुर दिसतात. साक्षात् शिवाजी महाराजांना बनवले म्हणजे हाईटच झाली, नै?
29 Jun 2015 - 7:43 pm | यसवायजी
फक्त तुकाराम महाराज नाही कै. मोठ्ठी लिष्ट आहे. अगदी आंबेडकर, खुद्द शिवाजी महाराजसुद्धा आहेत त्या संशोधकांच्या लिष्टीत.
29 Jun 2015 - 7:56 pm | बॅटमॅन
हम्म..म्हणजे मग ब्राह्मणांपासून ब्रिगेडवाल्यांनी दबकूनच असले पाहिजे, नै?
29 Jun 2015 - 8:10 pm | काळा पहाड
आणि आरोप करणारा कोण? तर 'दिल्लं दान घेतलं दान, पुढ्ल्या जन्मी मुस्सल्मान' वाला.
29 Jun 2015 - 11:04 pm | dadadarekar
विमानातून गेले हे तरी कशावरून ? तिकिटाची क्षेरॉक्स आहे की काय तुमच्याकडे ?
30 Jun 2015 - 10:31 am | चिनार
संत तुकारामांचा खून केलेल्या लोकांच्या हाताचे ठसे सुऱ्यावर किंवा तलवारीवर किंवा तुकारामांच्या गळ्यावर सापडले असतीलच नाही का बिग्रेडला ? तुमच्याजवळ संत शिरोमणी, राष्ट्रपुरुष, श्री श्री खेडेकर यांनी फोरेन्सिक रिपोर्ट ची झेरोक्स पाठवली असेलच !
कृपया शेयर करा..
30 Jun 2015 - 10:46 am | मुक्त विहारि
"कृपया शेयर करा." ह्या वाक्याला सहमती.
दादा दरेकर, हे अतिशय ज्ञानी आणि उदार मनाचे असल्याने, आपले ज्ञान वाटायला ते नहमीच तयार असावेत, असे वाटते.
29 Jun 2015 - 6:50 pm | अनुप ढेरे
तुकोबा सन्यास घेउन एकांतवासात गेले असं अभ्यासक म्हणतात. त्यांच्या शेवटल्या काही अभंगांवरून.
29 Jun 2015 - 6:55 pm | बॅटमॅन
येस, हे ऐकले आहे.
29 Jun 2015 - 7:13 pm | मृत्युन्जय
विमानातुन न जाणार्या प्रत्येक माणसाचा खून होतो काय? आणी तो ब्राह्मण करतात काय? हेच कर लॉजिक असेल तर मग ठिकाय बी ग्रेड ची अक्कल याहुन जास्त चालेल असे वाटतही नाही म्हणा.
29 Jun 2015 - 7:48 pm | उगा काहितरीच
ब्राम्हणांना सगळे कामधंदे सोडून लोकाचे खुन करत बसावे लागतील कि मग ! कैच्याकै लॉजीक ! लोल .
29 Jun 2015 - 8:34 pm | dadadarekar
बिचार्या शिवाजी महाराजांना ते विमान मिळालं असतं तर वायुदलाची स्थापना करण्याचं श्रेयही शिवाजी महाराजाना मिळालं असतं.
तुकारामाना इतकी समज नक्कीच होती.
त्यामुळे त्याना मिळालेलं विमान त्यानी महाराजा ना दिलं असतं
29 Jun 2015 - 8:00 pm | मुक्त विहारि
आणि नेमके ग्रेट-थिंकर गायब झालेत.
29 Jun 2015 - 8:12 pm | उगा काहितरीच
त्यांनी असं कोणता मिपाचा नियम मोडला कि त्यांचा आयडी उडाला ? (फक्त उत्सुकता आहे म्हणून विचारलं , काळजी नसावी.)
29 Jun 2015 - 8:23 pm | होबासराव
उगा काहितरीच समजा पाकिस्तानि क्रिकेट टिम मध्ये ११ च्या ११ खेळाडुंच्या जागि एकटा इझंमाम खेळ्तोय, फलंदाजि, क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजि सुद्धा तोच कर्तोय बघणार्याला कसे वाटेल.. धागा सुद्धा हाच काढणार आणि आपल्या अनेक आयड्या वापरुन प्रतिसाद देताना उच्छाद सुद्धा हाच मांड्णार्..चला तुम्हि म्हणाल हा काहि गुन्हा नाहि.
पण सदैव एकांगि लेखन, एकाच समाजाला टार्गेट करणे म्ह्णुन कदाचित त्यांचा मि.ईंडिया झाला असेल. पण ते दादा बनुन पुन्हा फुलथ्रोट्ल मध्ये आलेयत.
29 Jun 2015 - 8:28 pm | उगा काहितरीच
मग ठिकाय ! आयडी उडन्याच्या यादीत आमचा नंबर यायची शक्यताच नाही मग.(चेक करायचे होते हो , चुकून एखादा नियम तर नाही ना मोडत ) ;-)
30 Jun 2015 - 11:39 am | मृत्युन्जय
ग्रेट थुंकर आहेत इथेच. फक्त त्यांनी जुने शरीर त्यागुन नविन शरीर धारण केलेले आहे. रावणाची कशी १० तोंडे होती तशी यांची अगणित तोंडे आहेत. आपण असे समजुयात की ते आधुनिक रावणच नाहित तर ते आधुनिक काळातले सहस्त्रकवच आहेत, नर नारायाणांना त्यांचे ९९९ अवतार खर्ची घालायला लागतील तेव्हा एका सहस्त्रकवचाचे निवारण होइल. इतकी साधी गोष्ट नाही ती १०००*१००० वर्षांची तपस्या असेल तर जमेल ग्रेट्थुंकरांना घालवणे.
29 Jun 2015 - 8:08 pm | होबासराव
मुवि ग्रेट-थिंकर ह्यांनि पुन्हा नविन अवतार घेतलाय.. सध्या ते दादा बनुन फुल्ल थ्रोट्ल मध्ये आहेत.
29 Jun 2015 - 8:21 pm | मुक्त विहारि
आयला,
हे बहूदा विष्णूचा रेकॉर्ड ब्रेक करणार.
मज्जाय बुवा ह्या अवतारी लोकांची.
म्हणजे इतका काँन्फिडन्स की, एक अवतार समाप्त होण्यापुर्वीच, दुसरा अवतार घेवून ठेवतात.इतका काँन्फिडन्स तर विष्णू कडे पण न्हवता.
अगदी त्या टॉम रीडल सारखे.म्हणजे लॉर्ड वॉल्डेमार्ट होण्यापुर्वीच, कुठे पुस्तकातच दड तर कुठे अंगठीतच लप.
30 Jun 2015 - 11:49 am | इरसाल
दादादरेकर म्हणजे हितेस-काउ-जामोप्या
ते ग्रेथि वेगळे
30 Jun 2015 - 12:03 pm | विनोद१८
(नाना नेफळाप्रेमी)
29 Jun 2015 - 8:24 pm | होबासराव
"हे बहूदा विष्णूचा रेकॉर्ड ब्रेक करणार"
हा मास्टर स्ट्रोक होता :)
29 Jun 2015 - 9:15 pm | होबासराव
"दादाचा नाद करायचा न्हाय"
"याचा अर्थ प्रत्येक प्रचारकी कमेंट खपवुन घेणार असा नाही, त्यामुळे या धाग्यावर मी गप्प आहे."
दोन वेगळ्या आयडि ने सेम धमकि !!!! मध्यंतरि सिरिया विजिट झालेलि दिसतेय.. एकदम फिदायीन झालायत.
29 Jun 2015 - 8:53 pm | फुलथ्रॉटल जिनियस
मी इथे तार्कीक युक्तीवाद करु शकतो, पण मग त्यात जाती येतील ,शिवरायांच्या बदनामीचे कटकारस्थान कसे घडले याचे दाखले येतील, वाद वाढेल!
चार घटका गंमत करायला जे लोक मिपावर येतात त्यांच्यासाठी हा एक ताप असतो, उगाच दुसर्याच्या आनंदात आपण का विरजण घालायचे ???म्हणुन गप्प बसतो. याचा अर्थ प्रत्येक प्रचारकी कमेंट खपवुन घेणार असा नाही, त्यामुळे या धाग्यावर मी गप्प आहे. सध्या मिपावर आयडी उडण्याचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे अवतारकार्य पुर्ण करण्यासाठी संयम राखुन आहे.
29 Jun 2015 - 9:08 pm | यसवायजी
समंचे अभिनन्दन.
29 Jun 2015 - 9:12 pm | टवाळ कार्टा
घंटा
29 Jun 2015 - 9:31 pm | यसवायजी
तुला ना कशाच्च् कौतुक म्हणून नाही.
29 Jun 2015 - 9:39 pm | मुक्त विहारि
उलट आहे....
त्यांनी "घंटा" हा अतिशय चपखल शब्द वापरला आहे....
१ घंटा = १च्या पुढे १०० शून्य.....
जसे १० = दस्म
१००= शतम
...
...
...
...
त्याच्यामुळे ज्याला अवतारकार्य समजले त्याला घंटा मिळते, असे वाटते.
पहा ना, मंदिरात पण घंटा असतेच की.कारण प्रत्येक देवाला त्याचे अवतार-कार्य समजत असते.
तर्क चुकीचा असला तर दुरुस्त करावा.
29 Jun 2015 - 9:54 pm | टवाळ कार्टा
मला अहो वगैरे नक्को हो :)
29 Jun 2015 - 9:40 pm | बॅटमॅन
सहमत टका.
29 Jun 2015 - 9:55 pm | टवाळ कार्टा
तुलाच समज्ला माझा प्रतिसाद कम टोमणा ;)
30 Jun 2015 - 11:42 am | नाखु
हाताला हात लावून मम..
नेमस्त भीडस्त नाखु
29 Jun 2015 - 9:11 pm | टवाळ कार्टा
थोडक्यात मिळालेले आयडी संपत आलेत
29 Jun 2015 - 9:24 pm | मुक्त विहारि
वाद वाढेल!"
होवू द्या हो वाद-विवाद, पण "शिवरायांच्या बदनामीचे कटकारस्थान कसे घडले?" हे वाचायला नक्की आवडेल.
"त्यामुळे अवतारकार्य पुर्ण करण्यासाठी संयम राखुन आहे."
आयला, "अवतारकार्य"......
तुमचे नक्की कुठले अवतारकार्य आहे?
हे नक्की सांगा.फार कमी लोकांना जीवनाचे ध्येय समजते आणि अवतारकार्य समजणारे फारच विरळा.
29 Jun 2015 - 9:42 pm | मुक्त विहारि
मग परत-परत कशाला आय.डी. बनवायचा?
ते जावू दे,
पण तुमचे नक्की अवतार-कार्य तरी कुठले?
29 Jun 2015 - 10:19 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
ऑं!!!!! अच्चं आये का? अलेले...घाबाल्लो बल्का फुलकॉटर जिन्यस सायेब!! नै नक्की संयम सोडणार मंजे काय कलनाल मने तुमी? डुआय्डी वापलुन कंपुबाजी कल्नाल का? ए गालवांनो...घाब्ला बल्का सग्ल्यांनी. नैतल ह्यांना वैत वातेल!!
29 Jun 2015 - 9:11 pm | होबासराव
अहो तुमच वय (मिपावर) किति तुम्हि बोल्ताय किति.. ठँकु बर का आम्चि अशीच करमणुक करत रहा..
29 Jun 2015 - 9:21 pm | होबासराव
"शिवरायांच्या बदनामीचे कटकारस्थान कसे घडले याचे दाखले येतील, वाद वाढेल!"
अहो दत्तु सगळे लोक तुमच्यासारखे नाहि आहेत हो मिपावर, इथे सुशिक्षित आणि सुसंस्कारी लोक आहेत तर वैचारिक मतभेद असणारच पण त्या मतभेदांमध्ये जातिय द्वेषाला अजिबात थारा नाहिय.
29 Jun 2015 - 9:26 pm | मुक्त विहारि
येस्स.....
यही है मिपा.
"मिपावर जातिय द्वेषाला अजिबात थारा नाहिये."
म्हणूनच तर "मिपा" वर आम्ही मनापासून प्रेम करतो.
29 Jun 2015 - 10:00 pm | शब्दबम्बाळ
दुर्दैवाने हल्लीच्या काही चर्चा वगैरे पाहून माझी हि भाबडी समजूत मोडीत निघत आली आहे.
भलेही ते तसले प्रतिसाद काही ठराविक आयडीसाठी असतात.
पण दुसर्याच्या श्रद्धास्थानांना डिवचणाऱ्या, पातळी सोडून टीका करणाऱ्या "काही" आयडी वर कारवाही झालेली दिसत नाही.
लावायचाच आहे तर सर्वाना समान न्याय लावला पाहिजे.
असो, पण शेवटी एकट्या व्यक्तीच्या वाटण्याने काही फरक पडणार नाहीये…
29 Jun 2015 - 9:37 pm | बॅटमॅन
या अवतारी लोकांना विणंती आहे- यांनी जे कै दावे असतील त्यांपैकी प्रत्येक दाव्याला पुरावा दिला पाहिजे अन तोदेखील नॉनब्रिगेडी. नाहीतर तुमचे इथे कोणीच ऐकून घेणार नाही, बसा मग ब्रिगेडी मांदियाळीत निरर्थक अत्मरंजन करत.
29 Jun 2015 - 9:46 pm | मुक्त विहारि
"जे कै दावे असतील त्यांपैकी प्रत्येक दाव्याला पुरावा दिला पाहिजे अन तोदेखील नॉनब्रिगेडी."
आम्हाला कुठलेही पुरावे चालतील.आधी पुरावे तर येवू द्या.
बादवे,
तुला तुझे अवतार-कार्य समजले का? का अजून तू गोथम शहरांत अडकून बसला आहेस?
29 Jun 2015 - 9:50 pm | होबासराव
मुवि मला मिपाचि ओळ्ख होउन सुद्धा आता ३ वर्षे झालेयत. त्यापुर्वि मला फक्त मनोगत हे एकच मराठि संस्थळ माहित होत, तिथे मि इनमिन ६ महिने हि सदस्य नसेन मिपाचि ओळख झालि आणि आता ह्याच व्यसनच लागलय.
मिपावर कुठल्याहि सदस्याला जेव्ह्ढ स्वातंत्र्य मिळत आय डाउट कि आणखि कुठे कुठ्ल्याहि सदस्याला मिळत असेल.
इथे चर्चा सुद्धा फार खुल्या मनाने घडतात, फार कमि वेळा सदस्याच्या प्रतिक्रिया उडवल्या जातात :)
आगळिक कधि कधि आमच्याकडुन सुद्धा होते पण त्याला पर्याय नसतो ह्या उछाद मांडणार्या आयड्या काहि बाहि बरळायला लागल्या कि कधि कधि आपल्याला सुध्द्दा त्याला त्याच्याच पातळिवर येउन उत्तर द्याव लागत.
आप, भाजपा, काँग्रेस ह्यावर तर किति धुरळा उडाला असेल, कधि कधि आप्ल्याला समोरच्याच मत नाहि पटत पण जर तो अभ्यासपूर्ण प्रतिसाद देत असेल तर मनात आपोआप कुठेतरि आपण त्याच्या भुमिकेच अॅप्रिसिएशन सुद्धा करतो.
29 Jun 2015 - 9:55 pm | मुक्त विहारि
आमची थोडी पुढची पायरी आहे.
मिपा ही माझ्या बायकोची सवत आहे.
सुदैवाने ही सवत तिची लाडकी असल्याने, गृहकलह नाही.
30 Jun 2015 - 10:11 am | प्रभाकर पेठकर
>>>>मिपावर कुठल्याहि सदस्याला जेव्ह्ढ स्वातंत्र्य मिळत आय डाउट कि आणखि कुठे कुठ्ल्याहि सदस्याला मिळत असेल.
स्वातंत्र्याबरोबर, जबाबदारीची जाणीव असेल तर स्वातंत्र्य हा मिपाचा सुवर्णकळस ठरावा. पण दुर्दैवाने तसे दिसत नाही. स्वातंत्र्याचा गैरवापर करून 'स्वैराचार' फोफावण्याकडेच वारे वाहताना दिसतात.
>>>> उछाद मांडणार्या आयड्या काहि बाहि बरळायला लागल्या कि कधि कधि आपल्याला सुध्द्दा त्याला त्याच्याच पातळिवर येउन उत्तर द्याव लागत.
कुत्रा आपल्याला चावला म्हणून आपण कुत्र्याला चावत नाही. उच्छाद मांडणार्या सदस्यांची इच्छाच तशी असते की कोणीतरी त्यांच्या पातळीवर उतरून सवाल जवाब करावेत आणि आग भडकत ठेवावी. त्यांच्या इच्छेला आपण बळी का पडावे? दुर्लक्ष करणे हेच उत्तम. जेव्हढा वाद कमी होईल तेव्हढा, अशा सदस्यांच्या 'उच्छाद मांडण्याच्या, उद्देशाचा पराभव होईल.
>>>>आप, भाजपा, काँग्रेस ह्यावर तर किति धुरळा उडाला असेल, कधि कधि आप्ल्याला समोरच्याच मत नाहि पटत पण जर तो अभ्यासपूर्ण प्रतिसाद देत असेल तर मनात आपोआप कुठेतरि आपण त्याच्या भुमिकेच अॅप्रिसिएशन सुद्धा करतो.
ह्यालाच निकोप चर्चा म्हणतात.
30 Jun 2015 - 11:21 am | शब्दबम्बाळ
भलत्याच उच्च अपेक्षा आहेत राव तुमच्या!
इथे असल्या चर्चांमध्ये माझा कंपू कसा मोठ्ठा, मी दुसर्याला कसे तुच्छ लेखले, कमीत कमी शब्दात कसा अपमान केला या गोष्टींची जणू स्पर्धा असते!
"कुठला आयडी कोणाचा" हा आवडता खेळ झाला आहे! या गोष्टीची आवश्यकता काय आहे ते खेळणार्यांनाच ठाऊक!
दुसर्यांची पातळी काढणाऱ्या लोकांनी प्रथम किमान स्वतःची (वैचारिक) पातळी तरी ठरवावी.
बाकी तुम्ही म्हणता तसे होण्यासाठी माझ्या शुभेच्छा !
29 Jun 2015 - 9:59 pm | होबासराव
खरच ह्यावेळेस फिदायिन झालाय... ह्यानंतर आपला पास
29 Jun 2015 - 10:03 pm | यसवायजी
जो पर्यंत संपादक मंडळात न्याय्य लोकांचा भरणा होत नाही
यासाठी संमंत आरक्षण मिळालेच पाहिजे.
-कावा गृप.
30 Jun 2015 - 11:44 am | नाखु
आमच्या साठी फाईजेत म्हंजे फाहिज्य्त.
"बार"कावा गृप
30 Jun 2015 - 1:14 pm | कपिलमुनी
गृप मध्येच बार असल्याने जॉइन करण्यात आला आहे :)
29 Jun 2015 - 10:04 pm | मुक्त विहारि
कट्टर उजव्या विचारसरणीला आणि त्यांच्या प्रचारकी कुचाळक्यांना विरोध करणे हे माझे अवतारकार्य आहे.
=====> ही कट्टर उजवी विचारसरणी कोणती? मग डावी कोणती? हे उजवे-डावे कोण ठरवते? असा काही लिखित नियम आहे का? असल्यास दुवा दिलात तर उत्तम.
आता उजवे-डावे समजले की मग, प्रचारकी कुचाकळ्यांकडे वळू या.
परंतु मिपाचे संपादक मंडळच उजव्याविचारसरणीकडे झुकताना दिसत असल्याने अवतारकार्य तडीस जाण्याची शक्यता कमी आहे, जो पर्यंत संपादक मंडळात न्याय्य लोकांचा भरणा होत नाही तोपर्यंत मिपाचे हिंदुत्वकरण होत राहणार.
====> मिपाचे संपादक मंडळ अतिशय उदार आणि न्यायप्रिय आहेत.माझे पण २-३ लेख आणि बरेचसे प्रतिसाद उडाले तरी, माझे म्हणणे हेच राहील.
आणि मिपाचे "हिंदुत्वकरण" म्हणजे नक्की काय?
(आपल्या उत्तराच्या अपेक्षेत, अज्ञानी) मुवि
29 Jun 2015 - 10:13 pm | काळा पहाड
अवतारी बाबांना काळा पहाडचा प्रणाम. बाबा, तुम्ही संपादक मंडळात तुमच्या सारख्यांना पण आरक्षण द्यावं यासाठी उपोषण का सुरू करत नाही? माझं मत आहे की तुम्ही खालील सूचनाही कराव्यात.
१/ मिसळपाव हे हिंदूंचं खाणं आहे. तुम्ही हे नाव निदान काही दिवस तरी कलेजाफ्राय असं ठेवण्याचा आग्रह करावा.
२/ मिपाची थीम भगवी आहे. हे म्हणजे हिंदुत्व करणाचं ढळढळीत उदाहरण आहे. थोडे दिवस तरी थीम हिरवी किंवा निळी करायला काय हरकत आहे?
29 Jun 2015 - 9:57 pm | होबासराव
ईथले होणारे कट्टे :) आजपर्यंत तरि जमल नाहि कट्टेकरि व्हायला..लेकिन गम नहि कट्ट्याचा वृतांत वाचुन आणि फोटो बघुन फिल होत कि आपण तिथेच होतो.. आपण सगळे वेगवेगळ्या आणि कधि कधि विचित्र आयड्या नि एकमेकाला ओळखणारे पण कट्ट्याचे फोटो बघितला कि वाटत जिवलग मित्र कितितरि वर्षानि भेटतायत.
29 Jun 2015 - 10:06 pm | मुक्त विहारि
बस्स इतकेच.....
तुम्ही कुठल्या गावांत राहता ते सांगा, आपण तिथे कट्टा आयोजीत करू.
(एक नंबरचा चकाट्या पिटू) मुवि
29 Jun 2015 - 10:42 pm | उगा काहितरीच
आम्हाला पण यायचं आहे कट्ट्याला .
30 Jun 2015 - 11:23 am | मुक्त विहारि
जुलै मध्ये, ठाण्याला एक कत्ता आहे.
तारीक आणि ठिकाण आणि इतर गोष्टी नक्की झाल्या की, लगेच धागा काढतो.
29 Jun 2015 - 10:08 pm | फुलथ्रॉटल जिनियस
मला संपादक मंडळात घ्यावे!!! मी मिपाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवेन व हे संकेतस्थळ अधिक लोकप्रिय बनवेण.
29 Jun 2015 - 10:16 pm | काळा पहाड
अवतारी अवलिया बाबांना माझं अनुमोदन. थोड्याच दिवसात मिपाला सौदी, सिरीया, इराक, येमेन, पाकिस्तान, अफगाणिस्तान इथले शांतताप्रेमी नागरिक भेट द्यायला गर्दी करतील आणि त्यातून मिपाचा रेव्हेन्यू पण वाढेल. संपादक मंडळानं विचार करावा ही विनंती.
29 Jun 2015 - 11:03 pm | श्रीगुरुजी
+१
ग्रेटथिन्कर उपाख्य टोपगिअर्ड फिलोसोफर उपाख्य नानासाहेब नेफळे उपाख्य माईसाहेब कुरसुंदीकर उपाख्य ग्रेटथिंकर उपाख्य मंदार कुमठेकर उपाख्य फुलबॉटल जिनियस यांना संपादक मंडळात घ्यावे अशी माझी हक्काची मागणी आहे.
पण यांना संपादक मंडळात घेतलं तर हे स्वतःचेच लेख/प्रतिक्रिया कसे डिलीट करणार आणि स्वतःच स्वतःचा आयडी कसा डिलीट करणार?
29 Jun 2015 - 11:06 pm | dadadarekar
तुम्हीही जा मंडळात
29 Jun 2015 - 11:10 pm | फुलथ्रॉटल जिनियस
श्रीगुरुजी उपाख्य मास्तुरे उपाख्य सतीश माढेकर यांना देखिल मिपा संपादक मंडळात घ्यावे.
29 Jun 2015 - 11:16 pm | वॉल्टर व्हाईट
तुमच्या या गंमतीशीर प्रतिसादाने, श्री रामदास आठवले यांची आठवण झाली.
30 Jun 2015 - 10:24 am | सुबोध खरे
आपली यत्ता कोणती आणि आपली मागणी काय?
आपला मिपा वरील कार्यकाल किती? आपले लेखन किती आणि आपले अंशदान किती? याचा कुठे तरी ताळमेळ असावा कि नाही?( हेच प्रश्न दादा दरेकर यानाही)
हे म्हणजे तिसरी "क" मधील मुलाने मला शाळेचा मुख्याध्यापक करा मी शालेय शिक्षणात अमुलाग्र बदल करून दाखवतो म्हणण्यासारखे आहे.
आपण जिनियस आहात हे मान्य. पण आमच्या क्षेत्रात ( वैद्यकीय) कितीही जिनियस असेल तरी पहिल्या दिवशी ओपन हार्ट सर्जरी करून देत नाहीत. त्याला एम बी बी एस ची साडे पाच( नंतर दोन वर्षे ग्रामीण भागात काम नंतर सहा वर्षे शिक्षण घ्यावेच लागते).
असो
सुज्ञांस सांगणे न लगे
30 Jun 2015 - 10:27 am | सुबोध खरे
वरील प्रतिसाद
फुलथ्रॉटल जिनियस
यांच्या या वाक्याला होता30 Jun 2015 - 10:39 am | dadadarekar
मग माझे नाव का घुसडलेत ? मी कोणतीच मागणी केलेली नव्हती.
30 Jun 2015 - 10:46 am | सुबोध खरे
त्याचं काय आहे ना दादासाहेब सुक्या बरोबर ओलं पण जळतं.
संगतीचा परिणाम. असंगाशी संग सोडून द्या.
30 Jun 2015 - 11:19 am | dadadarekar
..
30 Jun 2015 - 7:00 pm | सुबोध खरे
स्वातंत्र्य वीर सावरकरांचे नातेवाईक काय ?
30 Jun 2015 - 7:06 pm | होबासराव
त्याना स्व्तंत्रवीर (स्वतंत्र्-विर ) म्हणायचय बहुधा.. मल्टिपल-पर्सनॅलिटि-डिस्-ऑर्डर (बाप रे किति आयडि झाले :))
30 Jun 2015 - 10:41 am | चिनार
जबराट !!
30 Jun 2015 - 10:28 am | अजया
__________/\___________
29 Jun 2015 - 10:17 pm | रमेश आठवले
नुकतेच भालचंद्र नेमाडे यांनी मराठा या नावाने कोणतीही जात १९११ पूर्वी नव्हती असे विधान केले आहे. म्हणजे त्यांच्या मते संभाजी महाराज हे 'मराठा' नव्हते का ? या वर नेमाडे याना दिलेला ज्ञानपीठ पुरस्कार भारत सरकारने परत घ्यावा असे ब्रिगेडचे म्हणणे असेल काय ?
http://www.dnaindia.com/blogs/post-in-conversation-with-bhalchandra-nema...
29 Jun 2015 - 10:28 pm | काळा पहाड
ब्रिगेड असलं काही वाचत असेल असं ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडं बघून वाटतं का?
29 Jun 2015 - 10:42 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
बिग्रेडवाल्यांना वाचता येतं का असा प्रश्ण आधी घ्यावा.
29 Jun 2015 - 10:42 pm | पैसा
ब्लॉग वाचतात अन लिहितात सुद्धा. मात्र त्यांना इतिहास, लिखित पुरावे असल्या गोष्टींची अॅलर्जी असते.
29 Jun 2015 - 10:59 pm | dadadarekar
आणि विमानाचा दावा करणारेदेखील बिना पुराव्याचेच बोलतात ना ? का विमानाचे तिकिट वगैरे आहे त्यांच्याकडे ?
29 Jun 2015 - 11:13 pm | पैसा
माईसाहेब कुरसुंदीकरांनी प्रतेक्ष बघितलाय ना!
29 Jun 2015 - 11:23 pm | श्रीगुरुजी
LOL
माई मोड ऑन -
हा तुका लहानपणापासून देवदेव करायचा. सारखा म्हणायचा मला विठ्ठलाला बघायचंय. आणि एक दिवस आलं की विमान आकाशातून त्याला न्यायला. आम्ही तर विमान बघूनच थक्क झालो. तुका विमानात बसून आकाशात गेला सुद्धा. मी ह्यांना म्हटलं 'बघा, तुकाला न्यायला विमान आलंय. तुम्हाला न्यायला साधी बैलगाडी पण नाही येणार'. माझं बोलणं ह्यांना इतकं झोंबलं की काहीही उत्तर न देता हे लगेच संध्यानंदमध्ये तोंड खुपसून बसले.
माई मोड ऑफ -
30 Jun 2015 - 9:34 am | टवाळ कार्टा
अग्गागा =))
29 Jun 2015 - 11:17 pm | अर्धवटराव
ज्या मोबाइलवरुन शिवाजी महाराज आणि तुकोबा गुरुशिष्य संवाद साधत त्यावरच तुकोबांकरता इ-तिकीटी आलं होतं. त्यांनी ते पब्लीश पण केलं होतं. ब्रिगेडने ते सवीस्तर छापलं देखील आहे त्यांच्या पुस्तकात (तुकाराम: -२१ व्या शतकातील प्रथम अवकाश प्रवासी)
ब्राहमणी कावे करणार्यांनी (त्यात साडेतीन टक्के, ९६-९२ कुळं, आणि इतर अनेक) कितीही कोल्हेकुई केली तरिही ओबीसी समाजातील महात्म्यांचं थोरपण यत्किंचीतही कमि होणार नाहि.
30 Jun 2015 - 12:12 am | शब्दबम्बाळ
कृपया ज्या व्यक्तींनी आपल्या समाजासाठी आपले आयुष्य वेचले आहे आणि बलिदान केले आहे त्यांना कोणीही जात पात या बंधनामध्ये अडकवू नये!
प्रामाणिकपणे सांगायचं झाल तर ब्रिगेड या शब्दाबद्दल मला फारशी माहिती नव्हती पण इथे येणाऱ्या सतत नामोल्लेखामुळे नक्की काय प्रकरण आहे हे आता वाचायला हवे असे वाटू लागले आहे. म्हणजे आपणच त्यांना अनपेक्षितपणे प्रसिद्धी देत आहात!
आणि मिपा ह्या ब्रिगेड विरोधी संकेतस्थळ आहे का? तसे असेल तर धोरणामध्ये टाकून द्या एकदाचे! म्हणजे मी विरोधपण करणार नाही.
इथे दुसरे कोणी ब्रिगेड बद्दल बोलताना दिसत नाही पण काही लोक मात्र ब्रिगेडच्या नावाखाली सगळ्यांनाच मापात काढत आहेत.
जातीवाचक उल्लेख करायला नको वाटत पण खाली बर्याच लोकांनी उतावीळपणे दिलेले प्रतिसाद पाहून लिहितो. नेमाडेंनी असेच विधान ब्राह्मण समाजाबद्दल केले असते तर लगेच त्यांनाहि ब्रिगेडी ठरवले असते का?
शेकडो वर्षांपूर्वी समाजातील भेद, फुटीरता यामुळे मराठी साम्राज्य खिळखिळे झाले, आजही आपला समाज विभागालेलाच दिसतो मग नक्की कसली प्रगती साध्य करतोय आपण? मी ब्राह्मण, मी ९६कुळी, मी ओबीसी या असल्या गोष्टींवरून किती भांडल्यावर समाधान होईल आपले?
माफ करा बरेच लिहिलंय पण या अशा चर्चा पाहून मी आजवर कदाचित समानतेच्या आभासी जगात होतो असे वाटायला लागले आहे.
30 Jun 2015 - 12:40 am | अर्धवटराव
समानता भ्रम वाटायला लागणे यापेक्षा आणखी काय दैन्य असावं २१व्या शतकात :( पण दुर्दैवाने ते खरं आहे असं वाटायला लागलय.
30 Jun 2015 - 1:06 am | संदीप डांगे
भारतीय समाज एक अजब रसायन आहे हो. इथं कचकचून दांभिक भरले आहेत. समजा कुणी म्हणतो मी जात-पात मानत नाही तर त्याच्या जातीवर चिखलफेक केल्यावर राग यायलाच नको ना? पण असे होत नाही. जोपर्यंत त्याच्या जातीवर हल्ला होत नाही तोवर तो जातनिरपेक्ष असतो. असे का? माहीत नाही. आज खरंच जातीवर किती आणि काय अवलंबून आहे. तरी जातीचा उल्लेख आला की सुशिक्षित आणि उच्च्भ्रूही गावंढळांसारखे बरळत असतात.
क्षुल्लक लोक रिकामटेकडेगिरी करत ह्या स्वभ्रमित पुरोगाम्यांना उकसवतात आणि हे पण काठी घेऊन त्यांच्या मागे लागतात. एखाद्या गाडीत बसले तर धक्के लागतातच. पण हे ढोंगी असा आव आणतात की त्यांचा आणि त्या गाडीचा काही संबधच नाही. पण मग धक्के बसल्यावर आरडाओरडा का? हे ३०० वर्षापुर्वीचा इतिहास घेऊन आज एकमेकांविरूद्ध ज्या त्वेषाने भांडतात ते पाहून माझे तर फारच मनोरंजन होते बुवा.
तत्कालिन महापुरुषांच्या कल्पित मान-अपमानाला हे स्वतःचा मान-अपमान समजतात. म्हणजे त्या महापुरूषांना प्रतिक/निमित्त करून आपलीच अहंकाराची/वर्चस्वाची अर्थहिन लढाई चालली आहे. यापेक्षा आयफोन विरूद्ध अँड्रोईड किंवा अॅपल विरूद्ध सॅमसंग ही लढाई जास्त प्रॉडक्टीव आहे. आपल्या ज्ञातीबांधवांना एकत्र करून मतपेटीत बदलण्याचेच सगळ्या जातींच्या धुरिणांचे प्रयत्न आहेत. कारण जातीच्या धर्माच्या नावावर कुणालाही येडा बनवता येते. यत्किंश्चित नेत्यांच्या मागे सुशिक्षित आणि सुसंस्कृत म्हणवणारे मेंढरासारखे चालत असतात. प्रत्येक जातीने आपआपले संत शोधून काढले. हाच किती विरोधाभास आहे. हा असा विरोधाभास जात-धर्म-कूळ यांच्यात ठायीठायी भरलेला आहे.
एक संत एका जातीचे पूज्य आहेत. पण ते मूळचे उत्तरभारतातले. इथे महाराष्ट्रात त्यांच्या जातीचा कुणी संत मिळाला नाही म्हणून त्यांनी तो तिकडून शोधून आणला आणि त्याच्या नावे जयंत्या-मयंत्या, बल-प्रदर्शन सुरू केले. एकदा असंच त्यातल्या एका जातवाल्याने अभिमाने मला सांगितले की त्यांच्या संतांचे परदेशातही मंदीर आहे वैगेरे. तेव्हा मी माहिती काढून त्याला सांगितले की बाबारे ज्या प्रांतातून तुमचे संत आणले आहेत तिथे त्यांना कुणी जात चिकटवत नाही. ते तिथे सर्वमान्य आहेत. त्यामुळे त्यांची मंदिरं परदेशात आहेत यात तुझ्या महाराष्ट्रात असलेल्या जातीचा काही मोठेपणा नाही. अजून चौकशीअंती त्याला असे समजले की ते संतप्रभृती त्याच्यापेक्षा खालच्या उपजातीतली आहे. तेव्हा त्याचा चेहरा असा खर्र्कन उतरला. ते भाव दांभिकतेचा मूर्तिमंत चेहरा म्हणून अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहेत.
कितीही पुढारले तरी लोक जात-धर्म सोडू शकत नाहीत हेच इथल्या सर्व प्रतिसादांवरून लक्षात येते. तेव्हा दांभिकतेची प्रचिती याचिदेहि याचिडोळा इथेच येत आहे.
इथे घडलेल्या इतिहासावर अजून एकमत नाही. एकमताने नवा इतिहास घडवणे याचीतर कल्पनासुद्धा शक्य नाही.
30 Jun 2015 - 11:40 am | शब्दबम्बाळ
डांगे साहेब यावेळी तुमच्याशी सहमत बर का!
बाकी कोणी इथल्या फटकेबाजीला अनुमोदन देईल असे अजून तरी दिसत नाहीये!
30 Jun 2015 - 4:58 pm | सतीश कुडतरकर
जोपर्यंत त्याच्या जातीवर हल्ला होत नाही तोवर तो जातनिरपेक्ष असतो. >>>>>>> +१
30 Jun 2015 - 5:03 pm | चिनार
मस्त प्रतिसाद !
29 Jun 2015 - 11:23 pm | पैसा
१०० झाल्याबद्दल ग्रेट थिंकरांचा तसेच फुल थ्रॉटल जिनियस, दादा दरेकर यांचा सत्कार बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती पुस्तके आणि "जाणता राजा" चे तिकीट देऊन करण्यात येत आहे.
(जेपी नोकरी करायला काय गेला पण जल्लां आमाला असली कामे हल्ली करावी लागतात.)
29 Jun 2015 - 11:28 pm | श्रीगुरुजी
शतक मारल्याबद्दल फुलबॉटल डबियस यांचे अभिनंदन!
29 Jun 2015 - 11:29 pm | मुक्त विहारि
धागा काढणाराच हेवनवासी झाला...
मिपा हे अद्भूत रसायन आहे.
29 Jun 2015 - 11:37 pm | फुलथ्रॉटल जिनियस
त्यापेक्षा चंपक ,चांदोबा पाठवा.छोटा भीमची सीडी पाठवल्यास ज्ञानात भर पडेल.
29 Jun 2015 - 11:42 pm | श्रीगुरुजी
'चांदोबा' हे मनुवादी मासिक आहे. त्यात बर्याचश्या गोष्टींची सुरूवात 'एका गावात एक गरीब ब्राह्मण रहात होता' अशी असते. असल्या मनुवादी गोष्टींमुळे तुमच्या कोवळ्या मनावर जातीय संस्कार होतील.
30 Jun 2015 - 8:29 am | मुक्त विहारि
ते तुम्ही काही तरी "छ. शिवरायांबद्दल" सांगणार होतात ना? त्याचे काय झाले?
आणि
त्या उजवी विचारसरणी आणि डावी विचारसरणी, ह्याअ बद्दल पण मौलिक माहिती देणार होतात ना?
त्याचे काय झाले?
30 Jun 2015 - 9:19 am | फुलथ्रॉटल जिनियस
बात निकलेगी तो दूर तक जायेगी!!!
तर ते असो!
30 Jun 2015 - 9:22 am | मुक्त विहारि
हे असे नका ना करू....
एक तर आपणच स्वतः सुरुवात केलीत, मग आता माघार कशाला घेता?
आपण नक्कीच असे पळपुटे नसणार.
30 Jun 2015 - 9:37 am | फुलथ्रॉटल जिनियस
काय आहे डोंबवलीकर तुम्ही गोड बोलुन माझा आयडी घालवण्याच्या खटपटीत आहात याचा अंदाज मला आलेला आहे, त्यामुळे पळपुटा म्हण्टले तरी चालेल. आय मस्ट हॅव किप दिस आयडी इन्टॅक्ट ईन ऑर्डर टु सबड्यु राईट विंग एक्स्ट्रीमीस्ट ,सो डोन्ट आस्क मी फॉर रिबटल, आय विल नॉट आन्सर युअर एनि क्वेरी.
30 Jun 2015 - 9:41 am | टवाळ कार्टा
खिक्क
30 Jun 2015 - 10:13 am | मुक्त विहारि
"आय मस्ट हॅव किप दिस आयडी इन्टॅक्ट ईन ऑर्डर टु सबड्यु राईट विंग एक्स्ट्रीमीस्ट ,सो डोन्ट आस्क मी फॉर रिबटल, आय विल नॉट आन्सर युअर एनि क्वेरी."
हे काही कळले नाही.आमचे इंग्रजीचे ज्ञान फारच तोकडे आहे.जे आम्हाला कळत नाही तिथे आम्ही शंका विचारतो.अर्थात, तुमच्या सारखा ज्ञानी मनुष्य, अशा शंकांचे निरसन नक्कीच करतो.
ते जावु दे....
पण निदान विचारसरणी बद्दल पण तुम्ही काही लिहीले नाहीत.
असो,
थोडक्यात काय? तर तुमच्याकडे कुठलेच ठोस मुद्दे नाहीत किंवा तुम्हाला वाद-विवाद सुयोग्य भाषेत करता येत नाही.तुम्ही ज्ञानी आहातच, ह्याबद्दल काहीच शंका नाही आणि आपण आपले ज्ञान इतरांना वाटायला पण तयार असावात, असे वाटते.तुम्ही नक्कीच संकुचित वृत्तीचे नाहीत.
30 Jun 2015 - 11:34 am | मृत्युन्जय
काय आहे डोंबवलीकर तुम्ही गोड बोलुन माझा आयडी घालवण्याच्या खटपटीत आहात याचा अंदाज मला आलेला आहे,
डोंबिवलीकरांचा मुखवटा फाटलाच म्हणायचा शेवटी. तुम्ही असे कसे करु शकता डोंबिवलीकर. नेशन वाँट्स टु नो.
30 Jun 2015 - 10:32 am | सुबोध खरे
त्यापेक्षा चंपक ,चांदोबा पाठवा.छोटा भीमची सीडी पाठवल्यास ज्ञानात भर पडेल.
हे बरोबर
इयत्ता तिसरी "क"
30 Jun 2015 - 10:50 am | चिनार
अहो पण त्या छोट्या भीमाचे काय होईल याचा जरा विचार करा !
'छान छान गोष्टी' पाठवू का ? चंपक ,चांदोबा थोडे समजायला अवघड जातील तुम्हाला..
राजा शिवछत्रपती आणि रणजीत देसाईंचे श्रीमान योगी हे दोन पुस्तक दुरूनही पाहू नका. महाराजांना स्वर्गात आत्मक्लेश होईल
30 Jun 2015 - 11:19 am | माहितगार
प्रतिसादातून संदर्भाची मागणी करण्यासाठी https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/c/c6/Sandarbha_hava_mr_2.png हे छायाचित्र उपलब्ध आहे. ते खालील प्रमाणे दिसते.
इतिहास विषयक चर्चा चालू असेल तर खालील वाक्ये कॉपीपेस्टवता येऊ शकतात.
इतिहासविषयक पाळावयाचे लेखनसंकेत
*कथाकथन अथवा ललित साहित्य लेखनशैली टाळावी, ऐतिहासिक कथा कादंबर्यातील संदर्भ टाळावेत अथवा विशीष्ट पणे नमुद करून ललित साहित्यातील उल्लेखांबद्दल वेगळा परिच्छेद बनवावा.
*इतिहास विषयक संदर्भ देताना इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधनांचा उपयोग करून केलेल्या समसमिक्षीत संशोधनाचेच संदर्भांना प्राधान्य देण्यबद्दल सजग रहावे.
* फिशर यांच्या मते.... सदोष तर्कांमुळे ज्याचे स्वत:चे संशोधन आणि निष्कर्ष दूषित अथवा प्रभावित होतील, असा इतिहासकार त्याच्या वाचकांना्च केवळ भ्रमात टाकेल याची खरी भिती नाही, तर तो स्वत:लाच भ्रमात टाकेल याची आहे.
* तर्कसुसंगत चर्चांसाठी विकिपीडिया:तर्कशास्त्र प्रकल्पाशी सहयोग करा.
जाहीरात पुन्हा कॉपीपेस्टवताना वापरावयाचा दुवा https://mr.wikipedia.org/wiki/विकिपीडिया:तर्कशास्त्र
हि जाहीरातीचा प्रसार होण्यासाठी, येत्या काळात विवीध लेखधाग्यांच्या प्रतिसादात अधून मधून दाखविली जाईल.
धन्यवाद
जाहीरात समाप्त !!
30 Jun 2015 - 5:00 pm | मृत्युन्जय
चर्चगेट साइडला चांगली मस्तानी कुठे मिळते? कुणाला माहिती असेल तर प्प्लीज सांगा. (मुळात मुंबैला मस्तानी मिळते का?)
30 Jun 2015 - 5:37 pm | dadadarekar
बाजीरावावर नाही.
30 Jun 2015 - 5:52 pm | संदीप डांगे
धागा बाबा'जी वर आहे हो दादा 'द' रेकर...
30 Jun 2015 - 6:08 pm | बॅटमॅन
रेकर एकच नंबर =))
ते रेडी 'रेक' नर आहेत. =))
30 Jun 2015 - 6:32 pm | अजया
=))=))
30 Jun 2015 - 6:30 pm | होबासराव
मात्र नर ह्या विषयि जरा सांशक