दिल्ली सामुहिक बलात्कार प्रकरण आणि स्त्री सुरक्षितता उपाय
दिल्लीच्या सामुहिक बलात्कार प्रकरणातील ...........(शिव्या समजून घ्याव्यात)ना फाशी पण कमीच शिक्षा आहे. एखाद्या मुस्लिम देशा मधील सर्वात भयंकर शिक्षा द्यायला हवी. सरकारने तर लाज सोडलीच आहे . फक्त भाषणा मधून दुख व्यक्त करण्या पेक्षा कृती करावी .
अर्थात ती कृती करायला आणखी किती वर्ष घेतील देवास ठाऊक. तो पर्यंत त्या मुलीला आणि कुटुंबियांना किती त्रास होईल त्याची कल्पना न केलेली बरी.
मुंबईत बायका इतक्या तरी असुरक्षित नाही हे मात्र खर पण एकदम सुरक्षित आहेत अस पण नाही. तर समस्त स्त्रीवर्गाला विनंती कि ह्या परिस्थितीला तोंड द्यायला हत्यार पर्स मध्ये ठेवण्याची वेळ आली आहे. तेव्हाच आपण सुरक्षित राहण्याची आणि नराधमाना वाचक बसण्याची शक्यता जास्त...
स्व सुरक्षितता आणि स्व रक्षणा साठी वेगवेगळ्या वयो गटातील स्त्री वर्ग काय करू शकतो ? किंवा केल आहे? त्याचे अनुभव ,हे जरूर इथे कळवा .
वाचन
38809
प्रतिक्रिया
0