गाभा:
राहुल गांधींंना कोरोना झालाय.
After experiencing mild symptoms, I’ve just tested positive for COVID. All those who’ve been in contact with me recently, please follow all safety protocols and stay safe.— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 20, 2021
प्रतिक्रिया
20 Apr 2021 - 4:54 pm | अमरेंद्र बाहुबली
४५ वर्षांवरील लोकांनाच लस देण्याची अट मोदी सरकारने घातलीये. असं असताना फडणवीसांच्या ४५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुतण्याला लस मिळतेच कशी?
भाजप नेत्यांच्या कुटुंबीयांचा जीव महत्त्वाचा मग इतर लोक काय किडेमुंग्या आहेत का? त्यांच्या जिवाची काहीच किंमत नाही का!-
महाराष्ट्र काॅंग्रेसचं ट्विट.
20 Apr 2021 - 5:51 pm | प्रसाद_१९८२
४५ वर्षांवरील लोकांनाच लस देण्याची अट मोदी सरकारने घातलीये. असं असताना फडणवीसांच्या ४५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुतण्याला लस मिळतेच कशी?
--
हे तुमच्या 'आदर्श' सरकारला विचारा ?
की लसीकरणाकरता नेमलेले कर्मचारी सरकारचे ऐकत नाहीत ? आणि उठसुठ कोणालाही लस देत सुटतात.
20 Apr 2021 - 5:00 pm | Rajesh188
ती लोक law maker आहेत त्यांना law break करण्याचा पूर्ण हक्क आहे.आपण कोणी आक्षेप घेवू शकतं नाही
20 Apr 2021 - 5:53 pm | अमरेंद्र बाहुबली
पट्टीचे पोहनारे विषय पाहून पाण्यात ऊतरायला तयार नाहीत. ;) ;) आघाडीची कामे सांगा अध्यक्श महोदय.....
20 Apr 2021 - 5:01 pm | नावातकायआहे
https://www.esakal.com/mumbai/tanmay-fadnavis-corona-vaccine-issue-amrut...
20 Apr 2021 - 5:07 pm | श्रीगुरुजी
फक्त दोषारोप नको. तन्मयला लस देणारे डॉक्टर, तन्मय व सर्व संबंधितांवर कारवाई करावी.
20 Apr 2021 - 6:46 pm | मुक्त विहारि
सहमत आहे....
घराणेशाही राष्ट्राला घातकच असते...
20 Apr 2021 - 5:14 pm | Rajesh188
रात्रीचे पोलिस स्टेशन मध्ये गेले तर मोर्चा घेवून ते हल्ली पोलिस नी आरोपी पकडला की हे पोलिस स्टेशन मध्ये हजर होतात..
खूपच जागृत नेतृत्व आहे.
20 Apr 2021 - 5:16 pm | पिनाक
तरी पण भारत हिंदुराष्ट्र च होणार. पैज?
20 Apr 2021 - 5:44 pm | नावातकायआहे
https://www.lokmat.com/politics/remdesivir-crisis-pravin-darekar-target-...
20 Apr 2021 - 5:58 pm | वामन देशमुख
ते लवकर बरे व्हावेत ही सदिच्छा.
20 Apr 2021 - 6:24 pm | मदनबाण
मदनबाण.....
21 Apr 2021 - 1:06 am | साहना
ऐकून वाईट वाटले. छान अभिनेते होते. व्हिडीओ पहिला नाही, मृत व्यक्तीच्या खाजगी जीवनाला खाजगीच राहू दयावे म्हणून.
20 Apr 2021 - 6:59 pm | चंद्रसूर्यकुमार
महाराष्ट्रातील दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनातून मार्क दिले जाणार आहेत असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले आहे. एकूणच विद्यार्थी म्हणून हा खूप वाईट आणि कठीण काळ आहे.
https://maharashtratimes.com/career/career-news/ssc-exams-2021-maharasht...
20 Apr 2021 - 6:59 pm | मदनबाण
सध्या इंजेक्शनचा साठा [ तथाकथित ] फारच चर्चेत आहे !
त्यावर वृत्त विशेष :-
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Suno Na Sangemarmar... :- Youngistaan [ Arijit Singh ]
20 Apr 2021 - 7:02 pm | मुक्त विहारि
जनतेच्या भल्यासाठी विचार करत नाहीत...
20 Apr 2021 - 7:12 pm | प्रसाद_१९८२
मुळात ते जनतेच्या भल्यासाठी सत्तेत आले आहेत, हाच सर्वात मोठा भ्रम आहे.
नोटाबंदीतून जे नुकसान पवार फॅमिलीचे झाले आहे ते भरुन काढण्याकरता ते सत्तेत आहेत. याचा नमुना म्हणजे १०० कोटी दरमहा वसुली.
20 Apr 2021 - 11:27 pm | अमरेंद्र बाहुबली
व्वा. हे प्रधानसेवकांच्या कानावर घालावे.
20 Apr 2021 - 7:43 pm | Rajesh188
पण असल्या बातम्या द्यायच्या नाहीत असे सक्त आदेश दिले गेलेले आहेत.
21 Apr 2021 - 10:23 am | अनिरुद्ध.वैद्य
मिडल्मेन सापडला, त्याने २००६ ते २०१३ मध्ये पैसे घेतल्याचे कबुल केले. त्यामुळे सगळच थंडावलं.
20 Apr 2021 - 7:58 pm | Rajesh188
म्हणजे कार्यकर्ते लागणार.मोर्चे, रास्ता रोको,ह्या साठी कार्यकर्ते लागतात ते फुकट येत नाहीत .फुकट भाकऱ्या भाजायला कोणाला वेळ नसतो.त्या मोर्चे करी,रस्ता रोकोकरी लोकांना मानसी हजार रुपये तरी कमीत कमी खर्च येत असेल . मोजा किती होईल तो.
मीडिया la आपल्या फेवर मध्ये ठेवण्यासाठी पैसे लागणार.
मोजा किती लागतील.
कायम स्वरुपी जी लोक पाळायला लागतात त्या मध्ये गुंड,विचारवंत,विविध क्षेत्रातील मान्यवर ही लोक हाताशी लागतात च त्यांचा कायम स्वरुपी खर्च.
मोजा किती होतात ते.
सभा त्या साठी लागणारी वाहन,माणसं,जेवण,दारू ह्यांचा खर्च.
मोजा किती होतात ते.
हा खर्च आमदार,खासदार,नगरसेवक ह्यांच्या अंगावर पडतो..
ते खिशातून खर्च करायला कुबेराची aulad नाहीत.
वसूल तर ते करणारच.
मग कोणते मार्ग असतात ह्याची माहिती पोलिस,सरकार,मीडिया ह्यांना नसते पण जनतेला असते.
तेव्हा कोणत्याच राजकीय पक्षांनी सभ्य पणाचा
आव आणू नये.सर्व एकच माळेचे मणी आहेतं
20 Apr 2021 - 11:33 pm | अमरेंद्र बाहुबली
नाही. हा खर्च भाजपला लागत नाही. तिथे स्वखुशीने लोक येतात. घरून चटणी भाकर बांधून आणतात, स्वताच पेट्रोल जाळतात, (वरून २०० झालं तरी जाळू बोलतात), झेंडे स्वता शिवतात, बांबू ही स्वतच्या शेतातला आणतात. ईतका प्रामाणीक पक्श असूनही लोक नावे ठेवतात. आय लव भाजपा ऊऊऊम्मा. :)
मै मरजाऊॅ तो मुझे भाजपा के कफन मे लपेटना अन काय काय ते... :)
20 Apr 2021 - 8:47 pm | लिओ
कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष जनतेच्या भल्यासाठी विचार करत नाहीत...
म्हणुन नियमात न बसणार्या दुरच्या नातेवाईकाने लस घेतल्यावर (एक नाही दोन ) फडणवीसांनी तपास करुन त्या दुरच्या नातेवाईकावर कारवाई करा असे म्हणु नये.
म. वि. आघाडी सरकार खरोखरच नालायक आहे. त्यांच्यात कारवाई करण्याची धमक नाही.
केंद्रातील सरकारला सांगुन दुरच्या नातेवाईकाने घेतलेल्या दोन्हि लसीकरण प्रकरणाची चौकशी करावी, प्रसंगी रातोरात सर्वोच्च न्यायालयात जाऊन C.B.I. किंवा N.I.A. ला या प्रकरणाची चौकशी करण्यास भाग पाडावे. व महाराष्ट्राच्या ( स्वता:ला ) न्याय द्यावा
20 Apr 2021 - 10:20 pm | मुक्त विहारि
ह्या निमित्ताने, CBI परत महाराष्ट्र राज्यात यायला हवी...
21 Apr 2021 - 1:11 am | Rajesh188
CBI चे मालक बदलायचे पक्क ठरवले आहे लोकांनी.अजुन तीन वर्षांनी cbi चे मालक बदलणार आहेत.
20 Apr 2021 - 11:36 pm | अमरेंद्र बाहुबली
हीहीहीही :) फूटलो.
21 Apr 2021 - 1:07 am | साहना
राहुल घांदी ह्यांना कोरोना झाला म्हणजे कोरोनाचे हे शेवटचे दिवस आहेत असे मानायला हरकत नाही.
विनोद बाजूला : राहुल घांदी लवकर बरे होवोत.
21 Apr 2021 - 10:03 am | आनन्दा
राहुल गांधी लवकर बरे होवोत. देशाला त्यांची गरज आहे.
21 Apr 2021 - 10:04 am | आनन्दा
राहुल गांधी लवकर बरे होवोत. देशाला त्यांची गरज आहे.
21 Apr 2021 - 1:27 am | Rajesh188
सुशिक्षित व्यक्ती सुसंस्कृत असतोच असे बिलकुल नाही. कमेंट ची भाषा बघून आम्ही शोध लावला आहे.
Bjp chya चालू,फेकू,जन विरोधी, दगलबज नेत्या पेक्षा .
.राहुलजी साधे,सरळ,सुसंस्कृत,शिक्षित,, आणि नीतिमान नक्कीच आहेत.
भले त्यांना यश मिळत नाही तरी त्यांनी संयम सोडला नाही.
तीच बाब उद्धव ठाकरे ची संयमी , शांत, विचारी,हुशार व्यक्ती ह्या राज्याला मुख्य मंत्री मिळाला हे राज्याचे भाग्य आहे.
ह्या संकट काळात स्वार्थी, थापडा,कुटील फडणवीस हे राज्याचे मुख्य मंत्री नाहीत .हे राज्याचे भाग्य च आहे.
21 Apr 2021 - 7:24 am | सुखीमाणूस
जर भविष्यात शिवसेना आणि कौन्ग्रेस् एकमेकाविरुद्ध झाले तर तुम्ही कोणाची बाजु घेणार?
कारण आत्ताची शिव्सेनेची सगळी भाजपा विरोधी वक्तव्ये पुर्वी तन्तोतन्त कौन्ग्रेस विदोधी होती.
फक्त भाजपा गुजराती धार्जीणी आणि कौन्ग्रेस् उत्तर भारतीय धार्जिणी... मराठी माणुस कायम बिचारा...
21 Apr 2021 - 11:43 am | श्रीगुरुजी
शिवसेना कधीच कॉंग्रेसविरोधी नव्हती. बाळ ठाकरे इंदिरा गांधींचे प्रशंसक होते. आणिबाणीला बाळ ठाकरेंनी पाठिंबा दिला होता. १९७९ च्या लोकसभा निवडणुकीत व १९८० च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी कॉंग्रेसशी युती केली होती. कॉंग्रेसच्या बहुतेक सर्व राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारांना शिवसेनेने पाठिंबा दिला होता.
खरं तर शिवसेनेचा कोणत्याही पक्षाला विरोध नाही. मुस्लीम लीग, प्रजा समाजवादी पक्ष, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप, शेकाप, स्वतंत्र भारत पक्ष, रिपब्लिकन पक्ष अशा सर्व पक्षांशी शिवसेनेने वेळोवेळी युती केली आहे. मुळात शिवसेना हा पक्षच नाही. गणेशोत्सव, होळी, दहीहंडी अशा उत्सवांच्या वेळी हातात पावतीपुस्तक घेऊन हिंडून, दिसेल त्याला अडवून, वेळप्रसंगी दमदाटी करून वर्गणीच्या नावाखाली खंडणी उकळणारी ही टोळी आहे. यांना कोणतीही विचारसरणी, तत्व वगैरे नाही. यांच्याकडे आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय असे कोणतेही धोरण नाही. कोणत्याही क्षेत्रातील तज्ज्ञ यांंच्याकडे नाही. ना हे कधी हिंदुत्ववादी होते ना कधी मराठीवादी होते ना कधी यांना जनतेशी कधी देणेघेणे होते. अर्वाच्य शिवीगाळ, दमदाटी, खंडणी वसुली, उत्सवाच्या नावाने धुडगूस एवढेच फक्त यांना जमते.
21 Apr 2021 - 12:13 pm | अमरेंद्र बाहुबली
असहमत. लोकांचे प्रश्न रस्त्यावर ऊतरून सोडवणे. हिंदूत्वासाठी थएठ पंगे घेणे. गरज असेल तिथे मदतीला हजर असणे. मराठी माणूस भाषा ह्यांच्यावर अन्याय झाला की पाठीमागे ऊभे राहणे. रिक्शाचालक ते रसवंतीचालक अश्या कार्यकर्त्याना थेट मंत्रीपदावर बसवणे हे फक्त सेनेत घडते. कार्यकर्ते वापरून फेकून देणे, जुन्या नेत्यांचे तिकीटे कापणे, असे भाजपी कृत्य सेना करत नाही.
21 Apr 2021 - 12:28 pm | श्रीगुरुजी
हिंदुत्व आणि शिवसेना यांचा कधी संबंध होता तरी का? मराठी बाणा आणि शिवसेना यांचा कधी संबंध तरी होता का?
21 Apr 2021 - 1:22 pm | Rajesh188
स्थानिक लोक अधिकार समित्या च्या माध्यमातून सेने नी मराठी लोकांसाठी काम केले आहे. railway, बँका,मध्ये मराठी तरुण जे दिसत आहेत ते सेने मुळेच.
मराठी भाषा च वापर केंद्रीय आस्थापना मध्ये करण्याचा हट्ट नेहमीच सेना करत आली आहे.
मराठी रिक्षावाले,टॅक्सी वाले,फेरीवाले,ह्यांना सेने नी नेहमीच पाठिंबा दिला आहे त्यांचे रक्षण केले आहे.
अगदी ट्रेन मध्ये सुद्धा गर्दीत मराठी लोक असंख्य परप्रांतीय लोकांच्या गर्दीत असतात तेव्हा सेने चे नाव च त्यांना आधार देते.
किती तरी काम सेने नी मराठी लोकांसाठी केली आहेत.
आणि ही काम अशी होती की ती गुंडगिरी केल्या शिवाय होणे शक्यच नव्हते म्हणून त्यांनी गुंडागर्दी पण केली दबदबा निर्माण केला.
हिंदुत्व वाच विचार केला तर.
१९९३ दंगलीत सेने च्या नेत्यानं पासून सैनिक पर्यंत सर्व रस्त्यावर होते.दंगेखोर ना सडेतोड प्रती उत्तर रस्त्यावर देत होते.
फक्त शिवसेना च तेव्हा हिंदू चे रक्षण करण्यासाठी रस्त्यावर लढत होती
Bjp चे कार्यकर्तेे तेव्हा घरात दरवाजा लावून बसले होते.
21 Apr 2021 - 1:31 pm | Rajesh188
Bjp नी हिंदुत्व वा ची झूल घेतली आहे तर फक्त मला हे सांगा bjp नी हिंदू च्या प्रगती साठी,त्यांच्या हितासाठी काय विशेष योगदान दिले आहे.
बघा एक पण उदाहरण सापडणार नाही हे नक्की.
21 Apr 2021 - 1:38 pm | अमरेंद्र बाहुबली
+१
भाजपचे हिंदूत्वासाठी काहीच कर्तृत्व नाही. काही भक्तगण तर राममंदीराचे श्रेय ही भाजपला देतात. वास्तविकता ही आहे की राममंदीराचा निकाल कोर्टाने ऊत्खननात मशीदी खाली सापडलेल्या पुराव्यांवरून दिला. अश्या भक्तांना देव सुबूध्दी देवो.
21 Apr 2021 - 1:42 pm | सॅगी
"ज्वलंत हिदुत्वाचा पुरस्कार करणारे एकमेव मराठी दैनिक" काढून सर्वसामान्यांना मुर्ख तरी बनवत नाही भाजपा.
बाकी चालू द्या तुमचे पुराण..
21 Apr 2021 - 12:19 pm | मुक्त विहारि
हे राहिलेच की ....
21 Apr 2021 - 12:28 pm | Rajesh188
तो सैनिक खूप चावट होता.कसले तरी विकृत कार्टून त्यांनी fb वर शेअर केले होते आणि एका सज्जन व्यक्ती ची बदनामी केली होती.
" भले तर देवू कासे ची लांगोटी नाठाळ च्या माथी हाणू काठी"
ही महाराष्ट्र ची परंपरा च आहे .त्याच परंपरे नुसार घडलेले आहे.
सज्जन लोकांच्या अभ्रू चे रक्षण करणे हेच सैनिक (बाळासाहेब चे सैनिक)चे काम आहे तशीच शिकवण आहे
21 Apr 2021 - 1:38 pm | अमरेंद्र बाहुबली
+१
21 Apr 2021 - 10:30 am | सॅगी
सुशिक्षित व्यक्ती समतोल विचार करेलच असे बिलकुल नाही, "किंबहुना" काही अति सुशिक्षित व्यक्ती आंधळेपणाने गुलामगिरी करतात असा शोध आम्हालाही लागला आहे.
21 Apr 2021 - 10:33 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काल मुंबई आणि दिल्लीच्या क्रिकेट सामना पाहात होतो, आपण दिल्लीच्या विरोधात आहोतच... मुंबई जिंकावी म्हणून सामना पाहात होतो की देश के नाम पर संबोधन ८ वाजून ४५ मिनिटांनी असे ऐकले. आणि पोटात गोळाच आला. शेठ इतक्या उशीरा कसे काय ऑनलाइन आले, म्हणून काळजी लागली. आज मध्यरात्री पासून सगळं बंद होणार की काय अशी शंका आली.
महाराष्ट्रात पूर्ण लॉकडाऊनचा विचार चालू असताना देशाला उद्देशून भाषण करण्यासाठी आदरणीय पंतप्रधान आले आणि माइक्रो कंटेमेंट झोन करुन करोनाशी लढूया, १८ वर्षावरील सर्वांना मोफत लस आणि अंतिम पर्याय म्हणून राज्यांनी लॉकडाऊनचा विचार करावा असे सांगितले. खरं, तर मला पुन्हा एकदा 'टास्क' देतील असेही वाटले होते.
माननीय पंतप्रधान यांनी केवळ राज्यांनी लॉकडाऊन करु नये हे सांगण्यासाठी आले, हे पाहुन आणि ऐकून नंतर स्वत:शीच हसून हसून पुरेवाट झाली. जनतेला माझा विसर तर नसेल ना, म्हणून टीव्हीदर्शनाचा तो एक भाग असावा असे वाटले. देशात करोनाचा भयंकर संसर्ग वाढत असतांना काही तरी विशेष असा संदेश असेल, त्या शिवाय का असे अचानक 'आकाशवाणी' साठी आले असतील. पण काहीही विशेष नव्हतं. सध्या जितका करता येईल तितका भ्रम निरास करायचा असेच मा. पंतप्रधान आणि त्यांच्या केंद्रीय मंत्रीमंडळाने ठरवले असेल तर, आपण जनता म्हणून, सहन करण्याशिवाय दुसरं तरी काय करु शकतो...!
-दिलीप बिरुटे
21 Apr 2021 - 10:40 am | श्रीगुरुजी
मटा वाचलात का? मटाने मोदींच्या नावावर काही तरी भलतंच खपवलं असेल.
21 Apr 2021 - 11:24 am | Rajesh188
पंतप्रधान साहेबांच्या मन की बात वर खूप जोक मारायची.किती सहन करायचे त्यांनी.
शेवटी त्यांनी निर्णय घेवून च टाकला मन की बात ,मना मध्येच ठेवायची.
21 Apr 2021 - 11:01 am | उपयोजक
हा देशाचा राष्ट्रीय टाईमपास आहे. ते लवकर बरे झालेच पाहिजेत.
21 Apr 2021 - 12:15 pm | मुक्त विहारि
बटाट्या पासून सोने बनवणारे मशीन, नक्की दिसते तरी कसे? हे निदान बघता तरी येईल...
21 Apr 2021 - 1:03 pm | अभिजीत अवलिया
आपण 'ते' भाषण 'नीट' ऐकले आहे का?
21 Apr 2021 - 1:34 pm | नावातकायआहे
https://www.youtube.com/watch?v=4fXarBOzWPc
"आलु सोना" सोडुन देउ एक वेळ....
21 Apr 2021 - 5:55 pm | अभिजीत अवलिया
प्रश्न राहुल गांधीनी किती विनोदी वा उत्तम भाषणे केलीत ती ऐकणे हा नाही. मुवीनी उल्लेख केलेले राहुल गांधींचे 'आलू डालके सोना निकालो वाली मशीन' हे भाषण मुवीनी नीट व संपूर्णपणे ऐकले आहे का व्हाटस्अप विद्यापीठातून आलेला एक मिनीटाचा व्हिडीओ पाहून वरील स्टेटमेंट केले आहे हे जाणून घ्यायचे होते.
21 Apr 2021 - 6:18 pm | मुक्त विहारि
शीतावरून भाताची परिक्षा ...
नंतर ते मोदींवर किंवा भाजपच्या एखाद्या व्यक्तीच्या नावावर खपवणार...
21 Apr 2021 - 6:56 pm | अभिजीत अवलिया
दरवेळी ह्या म्हणीप्रमाणे वागणे योग्य ठरेलच असे नाही. आता तंत्रज्ञान फारच प्रगत झाले असल्याने, एखाद्या व्यक्तीच्या भाषणाची मोडतोड करणे, आपल्याला हवी असतील ती वाक्ये घुसवणे, नको असलेली वाक्ये काढून टाकणे ह्या गोष्टी सहज शक्य होतात. त्यामुळे अबक ने अमुकतमुक भाषण केले हे लिहून त्यांची टर उडवण्यापेक्षा, नक्की अबक ने काय म्हटलेय ते पूर्ण ऐकले की आपले गैरसमज दूर होतात.
21 Apr 2021 - 7:10 pm | मुक्त विहारि
ह्यावर मोदी यांचे उत्तर
https://youtu.be/VtHhDExl8rE
21 Apr 2021 - 8:54 pm | अभिजीत अवलिया
हो. राहुल गांधींनी त्यांच्या भाषणात म्हटले होते की
आता मोदी असे म्हणाले कि नाहीत हा मुद्दा आहे. जर मोदीनी हे वाक्य म्हटले नसेल आणि तरीही राहुल गांधींनी मोदींच्या नावावर खपवले असेल तर त्याबद्दल त्यांना निश्चित शाब्दिक मार दिला जाऊ शकतो. पण विडिओ मधील फक्त पहिले वाक्य व्हायरल केल्यामुळे पूर्ण अर्थ बदलतो आहे हा माझा मुद्दा आहे.
21 Apr 2021 - 9:00 pm | चंद्रसूर्यकुमार
अगदी असाच अर्थाचा अनर्थ खाली दिलेल्या सुप्रसिध्द व्हिडिओतील वाजपेयींचे शेवटचे वाक्य विचारात घेतले नाही तर होतो.
21 Apr 2021 - 9:02 pm | अमरेंद्र बाहुबली
अभिजीत सरांशी सहमत.
21 Apr 2021 - 9:39 pm | मुक्त विहारि
मशीन खपवायचा प्रयत्न केला....आणि मग उघडे पडले ....
साहजिकच, मग ह्या वाक्याचे उत्तर दायित्व, परमपूज्य राहुल गांधी, यांच्यावरच येते...
21 Apr 2021 - 6:28 pm | श्रीगुरुजी
प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा करणार असे मोदींनी आश्वासन दिले होते, हे धडधडीत असत्य राहुल व इतर अनेक विरोधी पक्षनेते अजूनही पसरवित आहेत. मग त्यांच्याही बाबतीत असे होणारच.
21 Apr 2021 - 1:40 pm | अमरेंद्र बाहुबली
मुविकाकांकडे दुर्लक्श करावे. थेटरात सिनेमा पहाताना एखादे लहान मूल रडत असते पण लोक सिनेमा कडेच लक्श केंद्रीत करतात तसेच ईथेही करावे. :)
21 Apr 2021 - 12:30 pm | श्रीगुरुजी
कॉंग्रेसचे मंत्री आशिष देशमुख यांनी मोदींना लिहिलेल्या पत्रात महाराष्ट्रात आर्थिक व आरोग्य आणिबाणी जाहीर करण्याची विनंती केली आहे. यांनी थेट उधोजींच्याच नाडीला हात घातला की.
21 Apr 2021 - 12:39 pm | सॅगी
यांनादेखील "महाराष्ट्रद्रोही" ठरवणार का शेणेचे गुलाम??
21 Apr 2021 - 9:20 pm | Rajesh188
एक तर हा व्यक्ती bjp मध्ये होता पहिला.
त्या नंतर त्यांनी राजीनामा दिला आणि काँग्रेस मध्ये गेला आणि फडणवीस विरूद्ध लढला आणि पडला.
ह्या व्यक्ती ला राज्य द्रोही च म्हणता येईल ह्याचा इतिहास बघितला तर हा नेहमीच महाराष्ट्र विरूद्ध चळवळी करण्यात आघाडीवर होता..
राज्य द्रोही तर आहेच
राज्याचे तुकडे होण्यासाठी हा माणूस तडफडत होता.
आता ह्याला ना काँग्रेस विचारात ना bjp . अशी अवस्था आहे..
असे काही तरी भारी बोलून BJP खुश झाली तर झाली हाच हेतू..
स्व स्वार्थ..
बाकी ह्याला राज्य विषयी ना कधी प्रेम होते ना आत्मीयता.
21 Apr 2021 - 10:35 pm | Ujjwal
बाबौ. महाराष्ट्राची १० छोट्या राज्यात विभागणी करणारे तुम्हीच ना ? कसकाय जमतं बुवा !!
21 Apr 2021 - 12:31 pm | प्रसाद_१९८२
21 Apr 2021 - 12:40 pm | चंद्रसूर्यकुमार
अगदी किळसवाणा प्रकार आहे हा. म्हणजे या सरकारचे उद्दिष्ट स्पष्ट दिसत आहे. स्वतः कोरोनाची परिस्थिती गंभीर झालेली असताना त्याविषयी काहीही न करता कोमट पाणी प्यायचे सल्ले द्यायचे आणि प्रत्येक गोष्टीसाठी मोदींना नावे ठेवायची. राज्य सरकार काही करत नाही म्हणून दुसरे स्वतःच्या प्रयत्नांनी सरकारलाच औषधे आणून देत असतील तर त्यांना पोलिस ठाण्यात आणून किंवा बदल्या करून त्रास द्यायचा.
हे सरकार म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. जितक्या लवकर हे सरकार जाईल तितके चांगले. नाहीतर केंद्र सरकारने ३५६ वे कलम वापरून हे सरकार बरखास्त करावे. महाराष्ट्रात सावळागोंधळ चालू असताना केंद्र सरकार नुसते हातावर हात ठेऊन बसू शकत नाही. त्यांचीही काहीतरी जबाबदारी आहे हे नक्की.
बादवे, मामुंचे भाषण किती वाजता आहे? भाषण सुरू व्हायच्या दहा मिनिटे आधी गॅसवर पाणी गरम करायला ठेवणार आहे. मामुंचे भाषण असले तर ते कोमट पाण्याशिवाय ऐकवतच नाही.
21 Apr 2021 - 12:44 pm | श्रीगुरुजी
हे सरकार म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे.
+ ९९९९९९९९९९९ . . .
हे तीनही पक्ष म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे.
21 Apr 2021 - 12:45 pm | सॅगी
..पण भाषण संपणार नाही. टि.व्ही. समोर गॅस किंवा स्टोव्ह घेऊन बसा असे सुचवतो.
21 Apr 2021 - 1:57 pm | मुक्त विहारि
करोना समोरून हल्ला करतो.
करोना आपल्या कडे यायच्या आत, आपण करोनापाशी पोहोचायला पाहिजे.
ही दोन वाक्ये ऐकल्या पासून, मी ह्यांची भाषणे लाइव्ह ऐकणे सोडून दिले आहे ...
21 Apr 2021 - 2:11 pm | सॅगी
ते महाराष्ट्राला स्वर्ग बनवण्याचीही तयारी करत आहेत, फक्त राज्यातील जनतेने स्वर्गवासी झाले पाहीजे.
21 Apr 2021 - 1:15 pm | प्रसाद_१९८२
सहमत !
21 Apr 2021 - 1:43 pm | अमरेंद्र बाहुबली
+१
माननीय पंतप्रधान बंगालात कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जिवाचे रान करताहेत. आणी तिन पक्शांचे सरकार महाराष्ट्रात निवडणूकीचे भाषणं देण्यात नी लाखो लोक जमवून रॅली काढण्यात व्यस्त आहेत. लवकरात लवकर बरखास्त करावे.
21 Apr 2021 - 2:27 pm | आनन्दा
आलात का गोलपोस्ट बदलायला?
21 Apr 2021 - 2:50 pm | मुक्त विहारि
https://www.loksatta.com/pune-news/ex-bjp-mp-sanjay-kakade-arrested-in-g...
गुन्हा केला असेल तर, शिक्षा व्हायलाच हवी...
21 Apr 2021 - 2:55 pm | श्रीगुरुजी
याची घोषित मालमत्ता ४७५ कोटींची आहे. केवळ पैशासाठी याला भाजपने राज्यसभेत खासदार केले होते. पहिली ६ वर्षे संपल्यानंतर याला उमेदवारी नाकारली होती.
21 Apr 2021 - 3:35 pm | मुक्त विहारि
आता बातम्या लपून रहात नाहीत...
चारित्र्यवान उमेदवार देणे, हेच योग्य धोरण राहील
21 Apr 2021 - 3:41 pm | Rajesh188
राष्ट्रवादी,काँग्रेस,मधून जी आवक केली आहे ती सर्व च चुकीची आहे. आवक केल्या मुळे कोकणात bjp कडे चारित्रयसंपन्न उमेदवार च नाही.
ना कोकणात विकासाची दृष्टी असलेला नेता bjp कडे आहे.
राणे,पिता पुत्र च्य भरवश्यावर कोकणाला सोडून दिले आहे.
21 Apr 2021 - 4:11 pm | मुक्त विहारि
आपले काय मत आहे?
21 Apr 2021 - 4:10 pm | मुक्त विहारि
https://maharashtratimes.com/international/international-news/philippine...
जवाहरलाल नेहरू यांनी केलेल्या चुकीची फळे, इतर राष्ट्रांना पण भोगावी लागतात... तिबेट, तैवान, नेपाळ,श्रीलंका झाले... आता फिलीपीन्स... पाकिस्तान, कंबोडिया ही अंकित राष्ट्रे होण्याची शक्यता आहेच....
21 Apr 2021 - 4:38 pm | अमरेंद्र बाहुबली
नेहरूंच्या नावाने किती दिवस गळे काढायचे?? स्वता काही करायची कुवत नाही का?? की फक्त भाषणबाजीच?
21 Apr 2021 - 5:56 pm | Rajesh188
मुळात आत जी bjp आहे त्यांची पितृ संघटना सुद्धा स्वतंत्र च्या संघर्षात सहभागी नव्हती.ह्यांना देशाचा स्वतंत्र लढा ,त्या वेळी असलेली स्थिती .ह्या विषयी काहीच माहिती नाही.
स्वतंत्र कसे मिळाले ,
स्वतंत्र नंतर देशा अवस्था काय होती.
कोण कोणत्या गंभीर समस्या देशा समोर होत्या.
देशाचे विभाजन झाल्याने हिंदू चा फायदा झाला की नुकसान.
ह्या विषयी काहीच माहिती नाही.
नेहरू मुळे प्रश्न निर्माण झाले हे वाक्य lihle की ह्यांचे काम संपले.
एक एक प्रश्न सोडवताना काय अडचणी येत होत्या ह्या विषयी ह्यांना काही देणेघेणे नसते.
नेहरू आणि काँगेस होती म्हणून त्या वेळेस .
हे सत्तेवर असते तर प्रश्न बघून वेडे झाले असते.
काय करावे आणि काय करू नये हे पण ह्यांना सुचले नसते.
21 Apr 2021 - 10:06 pm | लिओ
जवाहरलाल नेहरू यांनी केलेल्या चुकीची फळे, इतर राष्ट्रांना पण भोगावी लागतात... तिबेट, तैवान, नेपाळ,श्रीलंका झाले... आता फिलीपीन्स... पाकिस्तान, कंबोडिया ही अंकित राष्ट्रे होण्याची शक्यता आहेच....
तिबेट, तैवान, नेपाळ,श्रीलंका चीनचे अंकित राष्ट्रे झालीत ?
खरोखरच तैवान चीनचे अंकित राष्ट्र झाले आहे ?
तिबेट, तैवान, नेपाळ,श्रीलंका... आता फिलीपीन्स... पाकिस्तान , कंबोडिया ही अंकित राष्ट्रे होण्याची शक्यता आहेच
पकिस्तान अंकित राष्ट्र कधीच झाले आहे, जर पाकिस्तान अंकित राष्ट्र झाले नसेल तर काळजी नसावी, माननीय पंतप्रधान साहेब एकदा इंटरनॅशनल फ्लाईटमध्ये बसले कि विमानाला लाहोर येथे थांबण्याचे आदेश देऊन यावेळी थेट पाकिस्तानी लष्करप्रमुखां बरोबर याविषयी चर्चा करुन पाकिस्तानी लष्करप्रमुखांना रात्री ८ वाजता मार्गदर्शन करतील.
कसे आहे कि मैत्रीसाठी पाकिस्तानी पंतप्रधानाबरोबर चर्चा करणे गरजेचे होते (म्हणुन प्रोटोकॉल तोडुन लाहोरला॑ मागील वेळेस थांबले ). आता पाकीस्तानी स्वातंत्र्याचा प्रश्न आहे तर पाकिस्तानी लष्करप्रमुखां बरोबर चर्चा गरजेची आहे ना.
जाता जाता
https://youtu.be/IkYlK1q0ehs
हि लिंक माननीय पंतप्रधानांची मिमिक्रि करणार्या मुर्खाची आहे, व्हिडिओ कोरोना, बंगाल निवडणुक या संदर्भात आहे. या व्हिडिओच्या लाईक आणि डिसलाईकच्या मतामधील फरक पहा
22 Apr 2021 - 9:50 am | आनन्दा
>>>
हि लिंक माननीय पंतप्रधानांची मिमिक्रि करणार्या मुर्खाची आहे, व्हिडिओ कोरोना, बंगाल निवडणुक या संदर्भात आहे. या व्हिडिओच्या लाईक आणि डिसलाईकच्या मतामधील फरक पहा
>>>
खरे आहे..
केवळ विडंबन केले म्हणून मार द्यायला मोदी म्हणजे महातीघाडी सरकार आहेत काय?
खरे तर हे आणि इतकेच भाजप आणि विरोधक यांच्यातील फरक दाखवून द्यायला पुरेसे आहे.
22 Apr 2021 - 10:02 am | श्रीगुरुजी
+ १
22 Apr 2021 - 11:03 am | बापूसाहेब
इतके विडंबन केले तरी त्या व्यक्तीचे घर आणि हातपाय शाबूत आहेत
.
फ शिवा
22 Apr 2021 - 11:06 am | बापूसाहेब
इतके विडंबन केले तरी त्या व्यक्तीचे घर आणि हातपाय शाबूत आहेत
.
फ शिव शेणें ची किंवा भ्रष्टवादी लोक असती तर त्या व्यक्तीचे काय झाले असते त्याची कल्पना करवत नाही..!!!!
22 Apr 2021 - 11:17 am | कॉमी
कॉमेडियन लोकांना मारहाण हा सन्माननीय अपवाद म्हणायचा काय ?
22 Apr 2021 - 12:38 pm | प्रसाद_१९८२
कॉमेडियन लोकांना मारहाण झाली ती, त्यांनी कोणा भाजपाच्या किंव्हा इतर हिंदुत्ववादी नेत्यांवर टिका केली म्हणून नव्हे. तर त्यांनी हिंदू देव देवतांची खिल्ली उडवली म्हणून.
आणि हिंदू देव देवतांची खिल्ली उडवल्याबद्दल त्यांना फक्त मारहाणच झाली. कोणीही त्यांचा 'कमलेश तिवारी' केला नाही.
22 Apr 2021 - 1:21 pm | कॉमी
मारहाण मान्यच कि हो. फक्त काय वाईट काय चांगले निकष वेगळे.
22 Apr 2021 - 1:22 pm | कॉमी
आणि हिंदू देव देवतांची खिल्ली उडवली म्हणून मारहाण नाही, खिल्ली "उडवणार होता" ह्या कारणाने मारहाण झाली.
22 Apr 2021 - 4:05 pm | वामन देशमुख
मारहाण झाली हे खरे आहे
हे खोटे आहे
22 Apr 2021 - 4:18 pm | कॉमी
https://scroll.in/latest/984043/munawar-faruqui-did-not-joke-on-hindu-de...
22 Apr 2021 - 4:22 pm | वामन देशमुख
स्क्रॉलची लिंक! ठीक आहे मग.
22 Apr 2021 - 5:47 pm | कॉमी
का बरे ? वाटल्यास त्यातले ओपिनियन बाजूला सोडून तथ्य वाचा.
बरं हि वाचा म्हणे.
https://www.newslaundry.com/2021/02/10/arrested-before-he-could-perform-...
21 Apr 2021 - 6:23 pm | अमर विश्वास
नाशिक च्या रुग्णालयात ऑक्सिजन टाकीत गळती झाली .. त्यामुळे बावीस जणांना आपले प्राण गमवावे लागले ...
अत्यंत दुर्दैवी घटना ... कोण जबाबदारी घेणार ?
21 Apr 2021 - 6:35 pm | धनावडे
केंद्र सरकार, आणखीन कोण?
21 Apr 2021 - 7:39 pm | Rajesh188
नाशिक मध्ये जी दुर्घटना घडली त्याला ना राज्य सरकार जबाबदार आहे ना केंद्र सरकार .हॉस्पिटल मध्ये ज्या यंत्रणेकडे ती जबाबदारी होती ते जबाबदार आहेत.
कधी कधी काही गोष्टी अचानक घडून येवून अपघात होतो .
त्याला कोणीच जबाबदार नसते.
21 Apr 2021 - 7:39 pm | Rajesh188
नाशिक मध्ये जी दुर्घटना घडली त्याला ना राज्य सरकार जबाबदार आहे ना केंद्र सरकार .हॉस्पिटल मध्ये ज्या यंत्रणेकडे ती जबाबदारी होती ते जबाबदार आहेत.
कधी कधी काही गोष्टी अचानक घडून येवून अपघात होतो .
त्याला कोणीच जबाबदार नसते.
21 Apr 2021 - 7:39 pm | Rajesh188
नाशिक मध्ये जी दुर्घटना घडली त्याला ना राज्य सरकार जबाबदार आहे ना केंद्र सरकार .हॉस्पिटल मध्ये ज्या यंत्रणेकडे ती जबाबदारी होती ते जबाबदार आहेत.
कधी कधी काही गोष्टी अचानक घडून येवून अपघात होतो .
त्याला कोणीच जबाबदार नसते.
21 Apr 2021 - 7:48 pm | अमर विश्वास
अपेक्षित प्रतिसाद ...
बाकी साधारणतः तुमच्या ज्ञानाची कल्पना आली ..
मुळात व्हॉल्व्ह तुटून अपघात झाला. अशा क्रिटिकल गोष्टी कधीच "Single Point of Failure" नसतात. याचाच अर्थ SOP पाळल्या गेल्या नाहीत.
जबाबदारी कुणाची ? (अर्थात ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या डोक्यावरून जातील. )
तरीही सांगतो : कोरोना परिस्थितीमुळे महाराष्ट्रात गेली वर्षभर Epidemic Diseases Act लागू आहे.महाराष्ट्रातील संपूर्ण आरोग्य यंत्रणा ही राज्य सरकाराच्या अंतर्गत आणण्यात आली आहे.सर्व अधिकार आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे असतात. आणि त्यांना राज्य सरकार जबाबदार असते
21 Apr 2021 - 7:59 pm | अमरेंद्र बाहुबली
आले का पून्हा राज्य सरकार वर. जे झाले ते दुर्दैवीच. मृतम्यांना शांती मिळो. लवकर २ तारीख उगवावी. आली पंतप्रधान साहेबाना देशाकडे लक्ष द्यायला वेळ मिळावा ही प्रार्थना करूयात. कारण परिस्थिती पूर्ण देशात खराब आहे. इतर राज्यांचे खापर ही ठाकरे सरकारच्या नावाने1 फोडता येत नाहीत ही आम्हा भाजप समर्थकांची मोठी अडचन आहे.
21 Apr 2021 - 8:02 pm | नावातकायआहे
गिरे तो भी "वो" उपर...
21 Apr 2021 - 8:16 pm | धनावडे
मग तुम्ही ऑक्सिजन, बेड च्या कमतरतेला केंद्र सरकारला कसे काय जबाबदार ठरवताय.
21 Apr 2021 - 8:28 pm | Rajesh188
ऑक्सिजन बेड ची उपलब्धता कमी आहे ह्या गोष्टी ल केंद्र सरकार जबाबदार आहे असे मी तरी बोललो नाही.
लसी चे असमान वाटप,,आवश्यकता असलेल्या औषधांचा राज्यांना होणार पुरवठा ह्याला केंद्र जबाबदार आहे असे मत मांडले असेल.
ज्या ज्या गोष्टी वर केंद्र सरकार चे नियंत्रण आहे आणि आवश्यक एवढं साठा असताना सुद्धा राज्याला तो मिळत नाही ह्या वर टीका केली आहे सर्व लोकांनी.
सुविधा उपलब्ध karal पण dr कोठून आणायचे त्यांची संख्या मर्यादित आहे .
त्या मुळे गैर सोय तर होणारच ह्याची जाणीव आहे आम्हाला.
21 Apr 2021 - 8:44 pm | अमर विश्वास
अगदी अपेक्षित प्रतिसाद ...
जाऊदे तुमच्या झेपण्याच्या पलीकडचे आहे हे
21 Apr 2021 - 8:45 pm | अमरेंद्र बाहुबली
हाहाहा. त्यांच्या की तुमच्या?
21 Apr 2021 - 8:15 pm | Rajesh188
अमर विश्वास.
काही गोष्टी अचानक घडतात सर्व काळजी घेतली तरी काही तरी तांत्रिक अडचण ही येतेच.
कल्पना चावला ज्या अवकाश यांना मधून पृथ्वी येत होती त्याच्या सर्व टेस्ट झाल्या होत्या ,सर्व आवश्यक ती काळजी घेतली होती .
तरी ते पृथ्वी पर्यंत पोचू शकले नाही.
का?
तुम्ही म्हणता तसे नेहमीच तंतोतंत घडत नाही.
लगेच अभियांत्रिकी ज्ञान वाटायला सुरुवात करू नका.
21 Apr 2021 - 8:15 pm | Rajesh188
अमर विश्वास.
काही गोष्टी अचानक घडतात सर्व काळजी घेतली तरी काही तरी तांत्रिक अडचण ही येतेच.
कल्पना चावला ज्या अवकाश यांना मधून पृथ्वी येत होती त्याच्या सर्व टेस्ट झाल्या होत्या ,सर्व आवश्यक ती काळजी घेतली होती .
तरी ते पृथ्वी पर्यंत पोचू शकले नाही.
का?
तुम्ही म्हणता तसे नेहमीच तंतोतंत घडत नाही.
लगेच अभियांत्रिकी ज्ञान वाटायला सुरुवात करू नका.
22 Apr 2021 - 9:56 am | आनन्दा
कल्पना चावला ज्या अवकाश यांना मधून पृथ्वी येत होती त्याच्या सर्व टेस्ट झाल्या होत्या ,सर्व आवश्यक ती काळजी घेतली होती .
तरी ते पृथ्वी पर्यंत पोचू शकले नाही.
का?
>>>
नक्की? त्या अपघाताबद्दल तुम्हाला नेमके काय माहित आहे? आणि दुसरी गोष्ट म्हणजे oxygen टॅंक आणि अवकाश यां सारखेच आहेत असे म्हणयाव्हे आहे की तुम्हाला?
माझ्या माहितीनुसार
कल्पना चावला यांना यानाच्या भवितव्याची कल्पना होती.. आणि त्या जे operation करत होत्या ते निःसंशय धोकादायक होते. आणि त्यांनी घेतलेली रिस्क हा ट्रेड off होता। माझ्या माहितीनुसार.
असो, तुम्हाला जे दिव्य ज्ञान आहे ते सांगून जरा आमच्यावर कृपा करा.
21 Apr 2021 - 8:24 pm | श्रीगुरुजी
दुर्घटना घडली असली तरी राज्य सरकार उत्तम काम करीत आहे यावर दुमत नसावे.
21 Apr 2021 - 8:28 pm | बापूसाहेब
हो.. तरीही राज्य सरकार चांगलें कामं करीत आहे.
सगळी जबाबदारी मोदी आणि केंद्राची आहे.!!
21 Apr 2021 - 8:39 pm | अमरेंद्र बाहुबली
नाशीक नहापालिकेत भाजपची सत्ता आहे पण घरचं कार्य असल्याप्रमाणे आम्ही राज्य सरकारला दोष देऊ.
21 Apr 2021 - 9:15 pm | अमर विश्वास
थोडीतरी माहिती घेत चला .. उगाच फालतू प्रतिसाद देऊन आपलं अज्ञान उघड पडू नका
Epidemic Diseases Act बद्दल स्पष्ट लिहिले आहे ..
अर्थात तुम्ही सोईस्कर दुर्लक्ष करत असाल तर जाऊदे
21 Apr 2021 - 8:26 pm | बापूसाहेब
टाळ्या.. !! चाटु पणाची पण हद्द असते.. !!
हाच न्याय तुम्ही योगी आदित्यनाथ यांना लावला होता काय?? अशीच घटना उत्तर प्रदेशात पण झाली होती तेव्हा तुम्ही आणि तुमच्याविचारसरणीची लोकं योगींच्या नावाने खडे फोडत होतात.
21 Apr 2021 - 8:40 pm | अमरेंद्र बाहुबली
नाशिक पालिकेत भाजपची सत्ता, ३ आमदार भाजपचे, १ खासदार ही. पण दोषी राज्य सरकार बरका.
21 Apr 2021 - 8:55 pm | नावातकायआहे
ह्याच न्यायानी मुंबईच्या मॉल मधील "सनराईज" बद्द्ल आपले अमुल्य मत कळाले तर आवडेल!!
https://www.hindustantimes.com/cities/mumbai-news/9-covid-patients-kille...
21 Apr 2021 - 9:13 pm | अमर विश्वास
जरा प्रतिसाद नीट वाचत जा ...
Epidemic Diseases Act बद्दल स्पष्ट लिहिले आहे ..
अर्थात तुम्ही सोईस्कर दुर्लक्ष करत असाल तर जाऊदे
21 Apr 2021 - 9:23 pm | अमरेंद्र बाहुबली
हे खरे मानले तरी अपघाताला राज्य सरकार जबाबदार?? अपघात हा अपघात असतो. पण आम्हाला १०५ घरी बसवल्यामुळे गळे काढायचेत तर कोणतंही कारण चालतं.
21 Apr 2021 - 9:27 pm | अमर विश्वास
आपल्या अधिकाराखाली असलेली हॉस्पिटल्स SOP पाळतात का ?
तांत्रिक बाबींची पूर्तता होते की नाही ? हे बघायची जबाबदारी कोणाची ?
अधिकार हवा आहे ना ? तर जबाबदारी घ्यायला नको ?
अर्थात हे खूप लॉजिकल झालं .. तुमचं चालुद्या ... गोलगोल राणी .....
21 Apr 2021 - 9:33 pm | Rajesh188
आताच काही निष्कर्ष काढणे योग्य नाही अपघात सुद्धा असू शकतो तो.
थोडी कळ काढा.
21 Apr 2021 - 9:38 pm | अमर विश्वास
हा अपघाताच आहे.
पण हा का घडला ? अर्थात नैसर्गिक अप्पत्तीमुळे नाही ...
फक्त हा अपघात का घडला ? Systematic failure मुळेच ..
अर्थात २० हजारात स्कुटर बनविणाऱ्यांना हे झेपणं अवघड आहे
22 Apr 2021 - 9:58 am | आनन्दा
अर्थात २० हजारात स्कुटर बनविणाऱ्यांना हे झेपणं अवघड आहे
>>
वारलो!!
21 Apr 2021 - 9:36 pm | नावातकायआहे
साहेब, "गीता" वाचू नका काहिही फरक पडणार नाही.
21 Apr 2021 - 9:45 pm | अमरेंद्र बाहुबली
हेच राजेशसाहेबाना सांगतोय. १०५ घरी बसवल्यामुळे गळे काढनार्याना काहीही कारन पुरतं. अर्थात ज्याना दोन जिल्ह्यातीव पुरपरिस्थीतीत मदत करता आली नाही त्याना राज्य काय सांभाळलं गेलं असतं??? देशपातळीवर आपण पाहतच आहोत. लोक मरताहेत आणी पंतप्रधान बंगालात व्यस्त.
21 Apr 2021 - 9:11 pm | अमरेंद्र बाहुबली
कोरोना संकट असतानाही वर्षभर केंद्र सरकारकडून ऑक्सिजनची निर्यात, 'ही' माहिती आली समोर
https://www.mumbaitak.in/news/central-govt-sold-oxygen-to-the-world-duri...
21 Apr 2021 - 9:13 pm | चंद्रसूर्यकुमार
21 Apr 2021 - 9:51 pm | मुक्त विहारि
माहिती बद्दल धन्यवाद
21 Apr 2021 - 10:02 pm | बापूसाहेब
चंद्र सूर्य कुमार..
यांच्याशी वाद घालण्यात अर्थ नाही..
21 Apr 2021 - 10:06 pm | मुक्त विहारि
ते लगेच तारेच दाखवतात ...
चंद्रसुर्य दाखवायची गरजच भासत नाही ...
21 Apr 2021 - 10:10 pm | चंद्रसूर्यकुमार
नक्कीच.
वर दिलेला फोटो या आर्मस्ट्राँगसाठी नव्हताच. तो समजला तरी समजून घ्यायचे नाही असे ठरविले असेल तर त्याला काही इलाज नाही. पण वर चालवलेला अपप्रचार खोडसाळ आहे आणि त्यामुळे इतर सदस्यांची दिशाभूल व्हायची शक्यता आहे अशाप्रकारे ती बातमी दिली आहे. त्यामुळे तो प्रतिसाद इतरांसाठी होता/आहे.
अन्यथा आर्मस्ट्राँगशी वाद घालण्यात काहीच अर्थ नाही/उपयोग नाही.
21 Apr 2021 - 10:22 pm | अमरेंद्र बाहुबली
ईतर ठिकानाच्या बातम्या वाचतोय. वरील बातमी तुम्ही वाचलेली दिसत नाही. आणी ही बातमी जरी वृत्तपत्रानी चूकीची दिली असेल तरी ईतर ठिकाणआ लोक मरताहेत आण प्रधानसेवक भाषणए देत फिरताहेत हा मुद्दा गैरलाग ठरत नाही.
21 Apr 2021 - 9:34 pm | उपयोजक
केरळ आणि मध्य प्रदेश सरकार कोविडबचावाची लस मोफत देणार.
करोनाची लाट अजून महिनाभर टिकणार - तज्ञांचा अंदाज
21 Apr 2021 - 9:47 pm | मुक्त विहारि
तरी पण त्यांना कसे काय शक्य होणार आहे ?
21 Apr 2021 - 9:42 pm | अमरेंद्र बाहुबली
प्रधानमंत्री मोदी के बनारस में भी हालात भयावह, इलाज के बिना दम तोड़ रहे लोग.
बंगाल निवडणूका ह्या नागरीकांच्या जिवापेक्शा महत्वाच्या आहेत प्यारे देशवासीयो.....
बनारस मधील मृत्युंना जबाबदार धरून केंद्राने तात्काळ महाराष्ट्र सरकार बरखास्त करावे.
https://www.bbc.com/hindi/india-56815824?fbclid=IwAR00t5KHUmZVqpjutSpqm2...
21 Apr 2021 - 10:00 pm | Rajesh188
यूपी मधील गंभीर स्थिती ल उद्धव ठाकरे सरकार च जबाबदार आहे तत्काळ उद्धव ठाकरे सरकार बरखास्त करावे.
..अश्या मागण्या पण bjp वाले करू शकतात .
21 Apr 2021 - 9:53 pm | उपयोजक
https://www.eastcoastdaily.in/2021/04/18/new-vision-2030-saudi-arabia-in...
21 Apr 2021 - 9:53 pm | अमरेंद्र बाहुबली
जेथे पाहावे तेथे प्रेतांचा खच, उत्तर प्रदेशात भीषण परिस्थिती.
ऊत्तर प्रदेश भाजपशासीत राज्य असल्याने आपण शांत बसूयात.
पंतप्रधान बंगालात प्रचारात व्यस्त असल्याने प्यार्या देशवासीयांनी आपलं आपण पाहून घ्यावे.
http://dhunt.in/egCaK?s=a&uu=0xc87377c8c7485594&ss=wsp
Source : "सामना"
21 Apr 2021 - 10:00 pm | बापूसाहेब
बाहुबली.. आपण महाराष्ट्रात राहतो.
इथला विचार करणे सोडून बाकीच्या राज्यातील परिस्थिती सांगण्याची वेळ तुमच्यावर का आलीय हे समजते आहे.
21 Apr 2021 - 10:04 pm | अमरेंद्र बाहुबली
खरं?? आपण राष्ट्रप्रथम बोलतो. कोरोना निधी केंद्राला पाठवतो. (ज्याचा हिशेब मिळत नाही) आणी आता देशातील ईतर भागातील लोक मरताहेत तर महाराष्ट्रात राहतो?? ईतर राज्यातील देशबांधवांचं काय?? चांगलंय सोयीने राष्ट्रप्रथम म्हणयाचं आणी आपण महाराष्ट्रात राहतो म्हणायचं. :)
21 Apr 2021 - 10:54 pm | बापूसाहेब
बाहुबली.. आपल्या राष्ट्र भक्तिबाबत थोडासाही सभ्रम मज पामाराच्या मनात नाहीये. वेळोवेळी आपल्या प्रतिसादातून "ते" स्पष्टपणे दिसतं च असते..
परंतु आपल्या अंगाशी आले की लगेच ईतर राज्यांबद्दल असलेले ( विशेषतः भाजपशासित) जे काही प्रेम आणि काळजी उफाळून येते ना तीचे विशेष अप्रूप वाटते.
21 Apr 2021 - 11:06 pm | अमरेंद्र बाहुबली
लगेच ईतर राज्यांबद्दल असलेले ( विशेषतः भाजपशासित) जे काही प्रेम आणि काळजी उफाळून येते ना तीचे विशेष अप्रूप वाटते. >>>>
मला त्या राज्यातील देशबांधवांद्दल प्रेम वाटते. भाजप सरकार असल्याचे परिणाम त्याना भोगावे लागताहेत. दिल्ली, महाराष्ट्र सारखए राजेय केंद्राचेया विरूध्द बोलून हक्क पदरात पाडून घेताहेत पण त्या राज्यातील राज्यकर्त्याना तोंड दाबून बूक्क्यांचा मार. आणी फळे जनता भोगतीय. महाराष्ट्रात ही हीच परिस्थीती असती. धन्यवाद पवार साहेबांचे.
22 Apr 2021 - 11:09 am | बापूसाहेब
वाह.. तुमचा प्रतिसाद वाचून अमीर खान चा all is well हा dialogue आठवला.
स्वतः च ठीवयाच झाकून आणि दुसऱ्याच पहायचं वाकून... !!!
21 Apr 2021 - 10:38 pm | अमरेंद्र बाहुबली
ज्वलंत हिंदूत्वाचा पुरस्कार करनारे एकमेव दैनिक आहे सामना. त्याचा द्वेष का?
21 Apr 2021 - 10:44 pm | नावातकायआहे
ह्या दशकातला सर्वोत्तम विनोदः
ज्वलंत हिंदूत्वाचा पुरस्कार करनारे एकमेव दैनिक आहे सामना!
बाहुबली, किती हसवाल? लॉक डाउनसाठी "स्टॉक " ठेवा कि!
21 Apr 2021 - 10:54 pm | अमरेंद्र बाहुबली
विनोद वाटणे हा तुमचा दोष. देशपातळीवर सेना हिंदूत्ववादी म्हणूनच ओळखली जाते ती तिच्या कर्तृत्वामुळे.
21 Apr 2021 - 11:11 pm | श्रीगुरुजी
>>> देशपातळीवर सेना हिंदूत्ववादी म्हणूनच ओळखली जाते ती तिच्या कर्तृत्वामुळे.
हसून हसून पोट दुखायला लागलं. देशपातळीवर सेना खंडणीवादी म्हणूनच ओळखली जाते ती तिच्या हप्तेबाजीमुळे.
21 Apr 2021 - 11:22 pm | अमरेंद्र बाहुबली
छॅ. असं असतं तर जगातील सर्वात स्वच्छ, अभ्रष्ट, चारित्र्यसंपन्न लोकांचा पक्शाचे नेते सतत मातोश्रीच्या पायरीवर का डोकं टेकवायला का आले असते? :)
21 Apr 2021 - 10:57 pm | Rajesh188
रस्त्यावर हिंदू साठी जीवाची बाजी लावली होती.१९९३ ला .फक्त भाषण देत नाही तर कृतीत पण आणते सेना.
हिंदुत्व वादी पक्ष आणि हिंदू साठी काहीच काम नाही..अशा पक्षा पेक्षा सेना जास्त हिंदू हितासाठी लढली आहे.
21 Apr 2021 - 11:07 pm | अमरेंद्र बाहुबली
+१
21 Apr 2021 - 11:22 pm | Ujjwal
21 Apr 2021 - 10:46 pm | मुक्त विहारि
साप्ताहिक विवेक बद्दल, आपले काय मत आहे?