तंत्रज्ञान म्हणजे काय ? एखादी अपेक्षा कशी पूर्ण करायची ह्यांचे ज्ञान. बहुतेक जनावरांना भूक लागली कि ती खातात. हे ज्ञान बहुतेक वेळा त्यांना खूप विचार करून येत नाही तो त्यांच्या जैविक अस्तित्वाचा भाग असतो. मानव प्राणी वेगळा आहे. एखादी अपॆक्षा निर्माण झाली कि ती कशी पूर्ण करायची ह्यावर मानव विचार करतो आणि काळाच्या ओघांत नवीन ज्ञान निर्माण करून ती अपॆक्षा पूर्ण करतो. मानवाची हि क्षमता थक्क करणारी. भांडी निर्माण करण्यासाठी मानवाने चक्राची निर्मिती केली. मग हातगाडीची. आणि काहीच हजार वर्षांत मानवाने चंद्रावर पाय ठेवला. आज काल मानवजात दशकांचे प्रयत्न आणि लक्षावधी लोकांचे मेंदू कामाला लावून विविध अपेक्षा पूर्ण करतो.
हे सर्व साधे सोपे वाटले तरी काही गोष्टी लक्षपूर्वक पाहिल्याशिवाय समजणार नाहीत. पहिली गोष्ट म्हणजे कसला शोध कुणी कधी लावला ह्याला विशेष महत्व नाही (सामान्यज्ञान सोडून). न्यूटन ने हा शोध लावला किंवा चितळ्यांची भाकरवडी बेस्ट ह्याच्या मागे एक सत्य दडलेले असते ज्याची चर्चा विशेष होत नाही. प्रत्येक यशामागे हजारो लोकांचे अपयश दडलेले असते. तुम्ही बाजारांत जाऊन काही दुकाने नोट करा. दहा वर्षांनी त्यातील अनेक दुकाने बंद होऊन नवीन उघडली असतील. २० वर्षांनी आणखीन. एखादेच चितळे बंधू किंवा वैशाली व्हेज दशकों दशके त्याच जागी त्याच यशाने चालू असते. पण हजारो लोकांनी प्रयत्न केले म्हणून त्यातून १-२ यशस्वी होतात. हजारो प्रयत्नरत माणसातून नक्की कोण यशस्वी होणार हे आपण आधी सांगू शकत नाही. पण एकदा माणूस यशस्वी झाला आणि न्यूटन ने गुरुत्वाकर्षणाचे नियम सिद्ध केले कि ते ज्ञान सर्वांचे होते. मग त्या ज्ञानावर इतर लोक दुसरे शोध लावण्याचे प्रयत्न करतात त्यातील बहुतेक लोक अपयशी होतात पण एखादा दुसरा यशस्वी होतो. यशाचा मनोरा अपयशाच्या पायावर खंबीर पणे वाढत जातो.
जितके प्रयोग जास्त, तितके यशस्वी लोक जास्त. प्रयोग जास्त करायचे असतील तर मग जास्त मानव आवश्यक आहेत. म्हणजे लोकसंख्या जास्त असेल तर आम्ही खूप प्रयोग करू शकतो आणि त्यामुळे विविध शोध सुद्धा लागू शकतात.
तर मग भारताची लोकसंख्या इतकी प्रचंड असून सुद्धा आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ११ फ़ुटबाँल पटू का बरे भारतांत नाहीत ? (पण टीचभर असलेल्या पोर्तुगाल देशांत बक्कळ आहेत).
ह्याचे कारण असे आहे कि निव्वळ मेंदू असला म्हणून तुम्ही जास्त प्रयोग करू शकता असे नाही. त्या मेंदूला स्वातंत्र्य असले पाहिजे. विविध प्रयोग करण्याचे स्वातंत्र्य असले तरच लोक विविध प्रयोग करून पाहू शकतात. जर तुम्हाला कंपनी निर्माण करायलाच १ वर्ष लागत असेल तर प्रचंड वेळ त्यांतच जातो. प्रत्येक गोष्टी साठी कुणाची तर परवानगी घ्यावी लागत असेल तर मग प्रयोग करण्याची समाजाची प्रवृत्ती मंदावते.
पण स्वातंत्र्य हा एकच फॅक्टर आहे असे नाही. भूगोल आणि हवामान सुद्धा मानवी प्रयोगक्षमतेला चालना देतात. उदाहरण घ्या. बहुतेक गोऱ्या राष्ट्रांनी जसे फ्रांस, पोर्तुगाल, इंग्लंड इत्यादींनी १५०० ते १८०० बऱ्यापकी प्रगती केली. जहाज बांधणी, व्यापार इत्यादी करून शेवटी दुसऱ्या देशांत त्यांनी आपल्या वसाहती निर्माण केल्या. पण रशिया हा एक असा देश आहे जो मोठा होता आणि गोरा सुद्धा होता पण त्याने ह्या क्षेत्रांत प्रगती केली नाही. कारण रशियातील जवळ जवळ सर्व नद्या ह्या आर्टिक समुद्रांत जातात. तिथून प्रवास दुष्कर आहे. ह्याच्या उलट इंग्लंड ची थेम्स, कलकत्ता ची हुगळी आणि पॅरिस ची सॅन नदी आहे. आफ्रिकेचे उदाहरण घ्या. इथे भरपूर नद्या आहेत पण कुठलीही नदी प्रवास कारण्यासाखी नाही कारण ह्यांच्या पाण्याला वेग आहे आणि धबधबे आहेत. त्यामुळे प्रवास आणि व्यापार मुश्किल होतो.
हवामानाचा मानवी प्रयोगक्षमतेवर परिणाम होतो. औद्योगिक क्रांती युरोप मध्ये का झाली ? चीन, भारतीय आणि अरब लोकांनी भूतकाळांत बऱ्यापैकी शोध लावले होते. युरोप हा थंड प्रदेश आहे. इथे तुम्हाला उन्हाळ्यांत भरपूर काम करून हिवाळासाठी अन्न साठवून ठेवावे लागते कारण एकदा बर्फ पडायला लागले कि मग कुठलेही झाड उगवत नाही. त्यामुळे आपल्या परिवारासाठी अन्न आणि आपल्या जनावरांसाठी चारा ह्या दोन्ही गोष्टी साठवल्या पाहिजेत. नाहीतर किमान एकाधे जनावर मारून त्याचे मांस व्यवस्थित साठवून ठेवायला पाहिजे. नंतर हिवाळ्यात काहीही न करता कुडकुडत पडून राहायचे. गरज हि शोधाची जननी असते. हिवाळ्यातील त्या थंडीनं मग बहुतेक लोक उष्णतेविषयी विचार करतात. ह्यातूनच पुढे कोळसा, कोळसा वापरून बाष्पयंत्रे इत्यादींचे शोध थंड प्रदेशांत लागले आणि लोकप्रिय सुद्धा झाले.
पण इतकेच नाही तर हिवाळ्यात फॅक्टरीचे तापमान बाहेरील तापमाना पेक्षा १०-१५ डिग्री जास्त असायचे कारण कोळश्यांतील उष्णता हवेत जायची. त्यामुळे लोक खूप आनंदाने हिवाळ्यात फॅक्टरी मध्ये जाऊन काम करायचे आणि कधी कधी फुकट सुद्धा. जितके जास्त लोक ह्या क्षेत्रांत आहेत तितके मग जास्त प्रयोग आणि त्यामुळे त्या दिशेने वेगाने प्रगती. ह्याची परिणीती औद्योगिक क्रांती आणि पहिली शेती क्रांतीत झाले. भारतीय सुद्धा पाहिजे तर बॉयलर वगैरे इशांत सहज अनु शकले असते आणि आणला सुद्धा होता. पण इकडचे तापमान आधीच जास्त मग त्यांत आखीन गरमी कोण सहन करणार ? त्यामुळे डोके असले, लोक असले तरी औद्योगिक क्रांतीसाठी जे हवामान असायला पाहिजे होते ते भारतांत नव्हते. त्याचवेळी शास्त्रीय संगीत, नृत्य इत्यादी क्षेत्रांत भारतीयांची पीछेहाट कधीच झाली नाही. चित्रपट सृष्टीचा पाया सुद्धा एका भारतीयाने वेड घेऊन रचला आणि त्याचा पुढे वटवृक्ष झाला.
स्वातंत्र्यानंतर अनेक क्षेत्रांत भरारी घेणे भारतीयांना शक्य होते. त्या काळांत देश सोडून गेलेल्या अनेक लोकांनी केनिया ते कॅनडा पर्यंत प्रचंड प्रगती केली. पण स्वतंत्र भारतांत भारतीयांना आर्थिक स्वातंत्र्य नव्हते त्यामुळे प्लॅनिंग कमिशनच्या परवानगी शिवाय काहीही करणे अशक्य होते. त्यामुळे देशाची पीछेहाट प्रत्येक क्षेत्रांत होत गेली.
फिनलंड किंवा नॉर्वे सारख्या देशांत विशेष लोकसंख्या नाही त्यामुळे ह्या देशांत काय काय निर्माण होऊ शकते ह्यावर प्रचंड मर्यादा आहेत. त्याशिवाय सिंगापुर किंवा हॉंकॉंग प्रमाणे इथे बहुसंख्य प्रमाणात लोकांची ये जा नाही त्यामुळे नवीन विचार येणे आणि बाहेर जाणे हे सुद्धा नाही त्यामुळे त्यांच्या साठी प्रत्येक क्षेत्रांत ठसा उमटवणे मुश्किल आहे. त्यामुळे ह्या देशांत त्यांनी काही ठराविक क्षेत्रांतच त्यांचे कौशल्य निर्माण झाले आहे (मुद्दाम हुन "झाले" हा शब्द वापरला आहे, कारण कुणी सरकारने प्लॅनिंग करून ते "केले" नाही ) आणि बहुतेक वेळा हे कौशल्य त्यांच्या इतिहासाशी निगडित आहे. नोकिया फोन हा फिनलॅंड मधील होता. नोकियाच्या बाबतीत आम्ही विनोद करायचो कि हा वरून पडला तर फोन पेक्षा फारशीला धोका जास्त. आयफोन वगैरे मंडळी आपला फोन जलप्रूफ आहे इत्यादी बाता मारत असताना ११०० चुकून वॉशिंग मशीन मध्ये गेला तरी बाहेर येऊन वजयाचा. फिनलंड ह्या देशाच्या संस्कृतीत ruggedness ह्याला प्रचंड महत्व आहे. ते लोक स्वतःला सिसू असे म्हणतात. ह्याचा अर्थ नतुटणारे असा होतो. छोटे दिवस आणि प्रचंड -४०फ वाली थंडी. बर्फाचे डोंगर अश्या वातावरणात हि मंडळी वाढली आहेत. फिनलॅंड मधील विजेचा खांब पासून कुत्र्याला बांधण्याचा खुंटा हा १००-२०० वर्षे टिकेल अश्या पद्धतीने बांधलेला असतो. हि मानसिकता आज उद्या निर्माण झालेली नसून शेकडो वर्षांच्या काळाच्या ओघांत उत्क्रांत झाली आहे.
नोकिया च्या कथा हव्या असतील तर इथे वाचा : https://www.quora.com/Why-are-Nokia-phones-stereotyped-as-being-indestru...
भारतासारखा देश अवाढ्यव असल्याने भारत सर्वच क्षेत्रांत ठसा उमटवू शकतो. अवकाश प्रवास पासून फ़ुटबाँल पर्यंत आणि अत्याधीनुक शिक्षण व्यवस्था पासून नवीन ऊर्जास्त्रोत पर्यंत. काही क्षेत्रांत भारताला खूप जुनी परंपरा आहे उदाहरणार्थ शस्त्रास्त्रे, युद्धकला, संगीत, नृत्य आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे शिक्षण व्यवस्था. व्यापार, धातुकाम इत्यादींत सुद्धा ऐतिहासिक काळापासून भारतीयांनी खूप काही कमावले होते. भारतीयांची बहुतेक प्रगती हि त्यांनी निर्माण केलेल्या सामाजिक, धार्मिक आणि राजकीय संकल्पनावर आधारित होत्या.
आधुनिक काळांत ह्या बहुतेक क्षेत्रांत पूर्ण पणे बदल घडवून आणले. काही क्षेत्रांत इस्लामिक संकल्पना तर काही क्षेत्रांत साम्यवादी किंवा समाजवादी संकल्पना रुजवल्या गेल्या. ह्याचा परिणाम भारताची प्रयोगशीलता, उद्यमक्षमता मंदावण्यात झाला. शिक्षण सारख्या काही व्यवस्था इतक्या जोराने सरकारी कचाट्यांत आहेत कि मुलाला नर्सरी ऍडमिशन घेण्यासाठी काय काय खस्ता खाव्या लागल्या ह्यावर लोक मिपावर लेख लिहून चर्चा करतात. प्लॅनिंग कमिशन ने मागील ६० वर्षांत जे काही रिपोर्ट्स प्रकाशित केलेले आहेत ते वाचून पाहावे. जिथे जिथे ह्यांचे प्लॅनिंग आहे तिथे तिथे भारताने शेण खाल्ले आहे. ह्याउलट देशांत संगणक आधारित काही धंधे आहेत हे ह्यांना ठाऊक सुद्धा नव्हते तेंव्हा वेगाने देशांत ह्या क्षेत्राची प्रगती झाली. यशस्वी होण्यासाठी, अपयशाचा अनुभव सुद्धा सामाजिक स्तरावर अत्यंत गरजेचा आहे. कुणीही अपयशी होणार नाही अश्या प्रकारचा समाज आपण निर्माण करायला गेलो तर प्रयोग क्षमता नष्ट करावी लागते. हि एकदा नष्ट झाली कि मग प्रगती खुंटते.
अर्थांत वर जे काही लिहिले आहे ते माझे मत आहे असे नाही. ऍडम स्मिथ पासून मॅट रिडले पर्यंत विविध लोकांनी ह्यावर विपुल प्रमाणात लिहिले आहे.
पण ह्याचा एक वेगळा परिणाम आहे ज्याबद्दल मला लिहायचे होते.
मानवी शरीरांत रोगप्रतिकारक क्षमता असते. शरीरांत काही जंतू आले तर मग विविध प्रकारची अँटीबॉडी वगैरे निर्माण करून रोगप्रतिकारक क्षमता त्याच्यावर हल्ला करते. त्यानंतर कफ, शरीराचे तापमान वाढवणे ह्या गोष्टी होतात. मग शरीरांत थकावट निर्माण करून त्याला थोडा आराम करण्यास भाग पडण्याची क्षमता सुद्धा आपल्या शरीरांत असते. हे सर्व करूनही काही नाही झाले तर प्रसंगी शरीर किडनी, लिव्हर इत्यादी अवयव बंद पडून संपूर्ण शरीराचे ध्यान जंतूंना नष्ट करण्यासाठी वळवले जाते.
हि सर्व प्रक्रिया कोणी डिसाईन नाही केली तर काळाच्या ओघांत उत्क्रांत झाली आहे. म्हणजे ज्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता असे काम करत नाही ते शरीर मरते आणि म्हणून प्रजनन करू शकत नाही. त्यामुळे ती जनुके पुढील पिढीला मिळत नाही. ह्याउलट जे शरीर टिकते ते प्रजनन करून जनुके पुढील पिढीला देते. त्यामुळे शरीराचे हे गुण वृद्धिंगत होत जातात.
मानव शोध प्रक्रिया ह्यासारखीच आहे. जे लोक यशस्वी होतात त्यांचे ज्ञान इतर लोक जास्त शिकतात, त्यांची जास्त कॉपी करतात तर वारंवार जे लोक फेल होतात त्यांना लोक जास्त किंमत देत नाहीत. त्यामुळे यशाचा मार्ग आणखीन आणखीन विस्तृत होत जातो. पण यश हे नेहमी यशच राहील असे नाही. एखादी कंपनी जितकी यशस्वी तितकी ती मोठी होत जाते. मोठी झालास त्यांचे जास्त दुश्मन बनतात. भ्रष्टाचाराला आळा घालणे कठीण जाते, भाऊबंदकी निर्माण होते इत्यादी आणि कधी ना कधी यश अपयशांत बदलते. पण त्या अपयशातून काय करू नये हे इतर लोक शिकतात आणि एकूण समाजाला फायदा होतो.
हे सुद्धा काही प्रमाणात जनुकां सारखेच आहे. मानवी शरीराने गरजे पेक्षा जास्त अन्न खाल्ले तर ते चरबी म्हणून शरीरांत साठवले जाते. कारण पूर्वी माणसाला दररोज अन्न मिळेल ह्याची शाश्वती नव्हती. त्यामुळे अंगांत चरबी साठविण्याच्या जनुकांना जास्त वाव मिळाला. पण मग चरबी प्रमाणाबाहेर का वाढत नाही ? चरबी प्रमाणाबाहेर वाढली तर त्याचा अर्थ असा होतो कि हा माणूस शारीरिक काम करत नाही. मग शारीरिक काम न करणाऱ्या माणसांना (हजारो वर्षांपूर्वी) जोडीदार मिळणे कठीण होते कारण शिकार केली नाही तर अन्न कसे येणार ? त्यामुळे जास्त लठ्ठ माणूस सुद्धा प्रजाजन करायला अक्षम होता. त्यामुळे मानवी शरीराची उत्क्रांती अशी झाली कि शरीरावर थोडीफार चरबी असणे चांगले पण खूपच नाही. पण ज्या प्रमाणे वैयक्तिक स्तरावर जनुकीय बदल अनेक गोष्टी घडवून आणतात त्याच प्रमाणे सामाजिक स्तरावर सुद्धा जनुके बदल घडवून आणतात.
एखादा समाज जर खतरे में असला तर ? समाज म्हणून आपल्या लोकांत काही सामाजिक स्तरावरची रोगप्रतिकारक क्षमता विकसित झाली आहे का ? ह्याचे उत्तर सुद्धा हो आहे. समाजाची अधोगती होत असली तर अश्या समाजांत मुले निर्माण करण्याची प्रवृत्ती वाढते. वैयक्तिक स्तरावर ती का वाढते ह्याची कारणे वेग वेगळी असली तरी, सामाजिक स्तरावर ती वाढणे मानवी समाजाची एक उत्क्रान्तिक वाटचाल आहे असे वाटते. आफ्रिकेतून मानवाला चीन किंवा ऑस्ट्रेलिया मध्ये पोचायला साधारण १०,००० वर्षे लागली. ह्यादरम्यान कित्येक पिढ्या होऊन गेल्या असतील आणि कित्येक संकटे ह्या लोकांनी झेलली असतील आणि वेगाने प्रजनन करणे कदाचित ह्या लोकांसाठी महत्वाचा फॅक्टर असेल.
समाज गरिबींत असला किंवा धोक्यांत असला तर वेगाने प्रजनन करून माणसांना वाढविणे हा कदाचित आपल्या मानवी समाजाचा एक सामाजिक स्तरावरील immune रिस्पॉन्स असू शकतो. म्हणजे इतके लोक निर्माण करायचे कि त्यातून काही व्यक्ती अश्या निपजतील ज्या समाजापुढील काही मोठ्या समस्यांचे निराकरण करू शकतील. ह्याला आपण कदाचित throwing babies at problems असे म्हणू शकतो. अमेरिकेत द्वितीय महायुद्धानंतर प्रचंड प्रमाणात मुले निर्माण झाली. इतकी कि ह्या संपूर्ण पिढीला बेबी बूमर्स असे म्हणतात. अर्थांत वैयक्तिक स्तरावर ह्याची कारणे अनेक लोक देतात. पत्नीपासून खूप काळ दुर राहिल्याने त्यांनी त्याची भरपाई केली, खूप पुरुष युद्धांत असल्याने स्त्रिया पुरुषांसाठी आसुसलेला होत्या इत्यादी इत्यादी आणि त्यांत तथ्य सुद्धा असेल पण सामाजिक स्तरावर तो एक प्रकारचा immune रिस्पॉन्स म्हणून सुद्धा पहिला जाऊ शकतो. भारतीय स्त्रियांनी ओव्हरटाईम करून मुले निर्माण नसती केली तर समाजाचे रक्षण इस्लाम पासून करणे शक्य होते का ?
भारताचे स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्यानंतर ज्या काही एक दोन गोष्टी चांगल्या झाल्या ह्यांत भारताची प्रचंड लोकसंख्या ह्याचा भाग मोठा होता. लोकसंख्या प्रचंड असल्याने भारताला वसाहत म्हणून ठेवणे इंग्लंड ला शक्य नव्हते. लोकसंख्या थोडीच असल्यास सहज लोकांची गळचेपी करून त्यांनी भारताला स्वतंत्र नाही तर किमान कॅनडा, ऑस्ट्रेलिया प्रमाणे मंडलिक राष्ट्र म्हणून ठेवले असते. हिंदू लोकांना कदाचित त्यांच्या रिसर्वेशन वर राहावे लागले असते.
स्वातंत्र्यानंतर सुद्धा साम्यवादी आणि समाजवादी लोकांना लहान लोकसंख्येची गळचेपी करणे सोपे गेले असते. भारताची विविधता आणि लोकसंख्या इतकी मोठी होती कि प्लॅनिंग कमिशन ला ती पुरून उरली. तरी सुद्धा साम्यवादी आणि समाजवादी लोकांनी भारताचे प्रचंड नुकसान केले. गरीब राष्ट्रांना काही भिकेचे तुकडे देऊन त्यांना आपल्या अंगठ्याखाली ठेवायची पाश्चात्य राष्ट्रांची जी पद्धत होती ती भारतांत चालली नाही कारण भीक द्यायची असली तर लोकसंख्या प्रचंड असल्याने अमेरिकेला सुद्धा परवडणारी नव्हती. त्यामानाने पाकिस्तानची लोकसंख्या कमी असल्याने त्यांना गळ्यांत पट्टा बांधून व्यवस्थित ठेवले. अमेरिकेची हि कोंबडी अंडे मात्र चीनच्या अंगणात जाऊन घालते.
१९९२ मधील विविध आर्थिक सुधार सुद्धा भारत सरकारने चांगली अक्कल येऊन केले नाहीत. दुर्दैवाने इंग्लंड अमेरिकेकडून भीक घेऊन सुद्धा देशाची आर्थिक परिस्थिती सुधारली नसती, लोकसंख्या प्रचंड असल्याने सुधार करण्याशिवाय रावा कडे पर्याय नव्हता. त्यामुळे आज थोडे सुगीचे दिवस दिसत आहेत.
आता सुद्धा मोदी सरकार नाईलाजाने का होईना पण काही सुधार करत आहेत ते प्रचंड मोठ्या लोकसंख्येने बहुतेक राष्ट्रीय समस्या (APMC, रेल्वे, PSU इत्यादी) ह्यांनी कॅन्सर चे रूप धारण केले आहे.
इस्लामिक समाजांत प्रचंड प्रमाणात मुले निर्माण करण्याची जी मानसिकता आहे कदाचित ती सुद्धा ह्यामुळेच असावी. एक तर इस्लाम खतरेमें नेहमीच असतो. किंवा अगदी सौदी बारबेरिया मध्ये सुद्धा कदाचित समाज प्रचंड धार्मिक दडपणा खाली असावा आणि त्यातून सुटण्यासाठी हि त्यांची धडपड असावी. इस्लाम विरोधांत आवाज उठवणाऱ्या माणसाला तात्काळ ठार मारले जाते त्यामुळे इस्लाम विरुद्ध बंड करायचे आहे तर तसाच प्रतापी पुरुष (किंवा महिला) त्यातून जन्मली पाहिजे. त्यामुळे त्यांच्या ह्या रोगप्रतिकारक क्षमतेला ओव्हरटाईम केल्याशिवाय गत्यंतर नाही.
लेखाचा दुसरा भाग माझे स्वतःचे असल्याने मी पूर्णतः चुकले असण्याची सुद्धा शक्यता आहे, पण एक वेगळ्या प्रकारचा विचार म्हणून चर्चा करण्यात काय हरकत आहे.
प्रतिक्रिया
10 Feb 2021 - 7:33 am | सोत्रि
😄
धन्यवाद!
- (तंत्रज्ञ) सोकाजी
10 Feb 2021 - 7:42 am | मुक्त विहारि
मग, त्याच्या भोवती वर्तुळे आखा ...
10 Feb 2021 - 10:09 am | Bhakti
कल्पना आवडली.
10 Feb 2021 - 8:03 am | मुक्त विहारि
1. तुमचे पुणे शहरा बरोबर ऋणानुबंध आहेत ...
2. तुम्ही उच्च शिक्षित असून, बहुदा परदेशी रहात असाल, (बहुतेक अमेरिकेत)
10 Feb 2021 - 9:34 am | उपयोजक
१९५९ पासूनची अंतराळविश्वातील प्रगती पहावी.
10 Feb 2021 - 9:44 am | सौंदाळा
छान लेख
लोकसंख्या जास्त असेल तर आम्ही खूप प्रयोग करू शकतो आणि त्यामुळे विविध शोध सुद्धा लागू शकतात.
भारतासारख्या देशात लोकसंख्या जास्त असूनही शोध लागत नाहीत त्यामुळे हे विधान पटले नाही. शोध लावण्यासाठी लोकसंख्या नाही तर सामाजिक बंधने कमी असावी असे मला वाटते. आपल्याकडे शिक्षण झाले की आर्थिक स्थैर्यासाठी नोकरी मग लग्नासाठी घर, गाडी नंतर आई वडिलांची जबाबदारी, मुलांच्या भविष्याची तरतूद ह्याच चाकोरीतुन बहुसंख्य जनता जाते. यामुळे कितीतरी प्रयोगशील मने मारली जातात. पाश्चात्य देशांत ही बंधने नसतात म्हणून तिकडे कितीतरी शोध लागतात.
आपल्याकडे MIDC मध्ये मी काही मित्रांनी केलेली जुगाड पहिली आहेत, एखादा शोध किंवा गेला बाजार एखादे चांगले प्रोडक्ट तर नक्कीच बनेल. त्यांच्याकडे पाठपुरावा केला तर 'जाऊ दे कोण कटकटी करणार? आपले काम झाले ना, मग बास' अशी त्यांची उत्तरे.
10 Feb 2021 - 10:20 am | मुक्त विहारि
परकीय आक्रमणे झाली नसती तर, भारताची वेगळी प्रतिमा निर्माण झाली असती ...
सुश्रूताची हत्यारे, हे एक उदाहरण ..ह्याचे फोटो उपलब्ध आहेत...
अजींठा येथील, भित्तीचित्रे, हे दुसरे उदाहरण ...
वेरूळ आणि घारापुरी, येथील शिल्पकला... मी ही दोनच बघीतली आहेत..
एखाद्या देशांत जर शांतता असेल तर, त्या देशांत शोध लागण्याची शक्यता वाढते...
चीनमध्ये ज्या वेळी एकछत्री अंमल होता, तेंव्हा चीन मध्ये जास्त शोध लागले... येत्या काही वर्षांत, चीन मध्ये अजून काही शोध लागण्याची शक्यता आहे...
10 Feb 2021 - 10:31 am | चंद्रसूर्यकुमार
पण युरोपात शोध लागत होते तेव्हाही शांतता होती असे नाही. वेगवेगळे युरोपियन देश एकमेकांच्या उरावर बसणे हा प्रकार कित्येक वर्षे चालू होता. इंग्लंड-फ्रान्स सारख्या देशांमध्ये युध्दे व्हायची, इटली-जर्मनी हे देश अनेक तुकड्यांमध्ये विखुरले गेलेले होते. ते १८७० च्या सुमारास म्हणजे त्यामानाने बरेच उशीरा एकत्र आले. तसेच प्लेग, कॉलरा वगैरे साथींमध्ये हजारो लोक मरून तेवढ्या भागात अस्थिरता निर्माण होणे हा प्रकारही अनेकदा झाला आहे. तरीही युरोपात प्रगती का झाली हे कोडे नेहमी पडते.
10 Feb 2021 - 11:02 am | आनन्दा
कदाचित अस्थिरता हेच सन्शोधनाचे मुख्य प्रेरक ठरत असावे. दोन स्थिर कालखंडांच्या मध्ये जेव्हा थोडासा स्थिर कालखंड येईल तेव्हा जोमाने शोध लागत असतील.
भारतात हूणांनन्तर जी स्थिरता आणि सुबत्ता आली त्यात समाज ढवळत रहायच्या ऐवजी स्थिर झाला, आणि त्याचा परिणाम म्हणून नवीन नवीन संशोधन थांबले असाही एक मतप्रवाह आहे.
ज्याच्या बापाकडे संपत्ती नसते, तो कष्ट करतो.. ज्याच्याकडे असते तो उधळत बसतो.
10 Feb 2021 - 11:21 am | मुक्त विहारि
जाणून घ्याव्या लागतात...
जपानने, मध्यंतरी इलेक्ट्रॉनिक क्षेत्रांत दादागिरी स्थापन केली होती, वाहन उद्योग पण भरभराटीस आणला होता.(मला वाटते, वाहन उद्योग, अजूनही चांगला चालला आहे.)
पण गेल्या काही दशकांत, दक्षिण कोरियाने, इलेक्ट्रॉनिक क्षेत्रांत, आखाती प्रदेशातील गुंतवणूकीत, चांगली प्रगती केली आहे ...
दक्षिण कोरियाने दोन गोष्टींमुळे ही प्रगती केली .....
1. 2 वर्षे कंपल्सरी, सरंक्षण खात्यात नौकरी.... कोरियन माणूस मानसिक दृष्टीने आणि शारीरिक दृष्टीने, जबरदस्त कणखर असतो... सर्वसामान्य माणूस देखील, सहसा हार मानत नाही....
2. कमी लोकसंख्या असल्याने, आणि अमेरिकेने सरंक्षण दिल्याने, शैक्षणिक योग्यतेला न्याय मिळतो.....
मी कोरियन कंपनीत काम केले आहे आणि कोरियन माणसे माझ्या हाताखाली होती ...
1950 ते 2020, भारतीय कंपन्या, आजही आखातात 100% रिफायनरी उभारू शकलेले नाहीत ...100% Turnkey प्रोजेक्ट कोरियन कंपनी घेते...
शांतता आणि कमी लोकसंख्या, असेल तर, दक्षिण कोरिया सारखी प्रगती होते ....
10 Feb 2021 - 4:55 pm | उपयोजक
असं बघा आधुनिक काळात अमेरिका,युरोप किंवा जपान,कोरिया इथले ९५% वैज्ञानिक शोध हे आर्थिक फायद्यासाठीच लावले जातात.आता शोध लावला म्हणजे पैसा लगेच आला का? त्यावर आधारीत काही वस्तूनिर्मिती किंवा सेवानिर्मिती करुन त्याची विक्री जगभर केल्यावर मगच पैसा मिळणार ना या अमेरिकन किंवा युरोपीय,जपानी कंपन्यांना? मग यासाठी भारतीय उद्योजकांची मदत लागते.भारत ही मोठी बाजारपेठ आहे.माल विकणे, विदेशी कंपन्यांना आयटी सपोर्ट देणे ही शोध लावण्याच्या तुलनेत कमी ग्लॅमर आणि कमी बुद्धिमत्ता वापरली जाणारी क्षेत्रे असली तरी पैसा मिळवण्यासाठी ही कामे महत्वाची आहेत.भारत जगाला यात मदत करतो.
सारांश इतकाच की अमेरिकन, युरोपीय , जपानी लोक हे शोध लावून पैसे कमावतात तर भारतीय उद्योजक त्यावर आधारीत वस्तूंची विक्री करुन त्याचे मानधन घेतात किंवा आयटी सपोर्ट देऊन पैसे कमावतात.सर्वांचा उद्देश पैसे कमावणे हाच आहे.सध्या भारतीयांनी संशोधनाकरिता आपले डोके तापविले नाही तर काय विशेष फरक पडणारेय? इथे रोजचा संघर्ष खूप जास्त आहे ना?
10 Feb 2021 - 5:52 pm | मुक्त विहारि
हो....
इथून तिथून, आपण ह्याच मुद्द्यावर येणार ...
इथे रोजचा संघर्ष खूप जास्त आहे ना?
आणि मग,
लोकसंख्या वाढीवर
10 Feb 2021 - 4:20 pm | उपयोजक
ज्याच्या बापाकडे संपत्ती नसते, तो कष्ट करतो.. ज्याच्याकडे असते तो उधळत बसतो.
तसं असेल तर झोपडपट्टीत राहणारी मुले सर्रास कष्टाळू , दारुच्या आहारी न जाणारी हवीत.बरेचजण बिकट परिस्थितीला बदलवणारे हवेत.तसे आहे का?
मुकेश अंबानींनी धीरुभाईंचे साम्राज्य वाढवले की.
10 Feb 2021 - 4:32 pm | काळे मांजर
असे असेल तर आपण बा ची इस्टेट घेऊ नये
आणि आपलीही आपल्या मुलांना देऊ नका
( की हे फक्त नेहरू राहुलने पाळायचे ?)
10 Feb 2021 - 4:44 pm | मुक्त विहारि
तुमचा धड एक आय.डी. नाही ... मग तुमच्या प्रश्र्नांना, उत्तरे कशाला द्यायची?
चंपाबाई कशा आहेत?
सचिन उद्दाम पोटे, कसे आहेत?
जागो मोहन प्यारे
10 Feb 2021 - 11:04 am | गवि
मुळात अनेक तंत्रांची प्रगती जास्त वेगाने होण्यात युद्धे, शीतयुद्धे आणि एकूण युद्धजन्य परिस्थितीचा रेटा कारणीभूत होता हेही सत्य आहे. विशेषत: दळणवळण, विमानांचे क्षेत्र, जलद वाहतूक, अधिक क्षमतेने वाहतूक, शस्त्रे (यातील तंत्राच्या अनुषंगाने सुरु झालेल्या संशोधनाचे इतर अनेक युद्धाखेरीज क्षेत्रांतही उपयुक्त वापर देखील झाले), इन्स्टंट किंवा टिकाऊ अन्न, औषधे यातील बहुतांश शोधांना युद्धांनी वेग दिला.
शोध आणि शांतता स्वातंत्र्य वगैरे या बाबत एक रुल ऑफ थम्ब लावणे कठीण आहे.
10 Feb 2021 - 10:56 am | काळे मांजर
शून्याचा शोध लाव , राहू केतूचा शोध लाव
हे असले बिन कामाचे शोध लावत बसले आणि शिवण मशीन , झेरॉक्स मशीन , ट्रेन , फोन असले कामाचे शोध मात्र फॉरीनच्या लोकांनी लावले.
दगड धोंड्यातली शिल्पकला हा राजा महाराजांचा लबाडपणा होता, स्वतःचे महाल विटा दगडाचे बांधून मजा केली आणि जनता शिल्प बघत उंडगत फिरेल ह्याची व्यवस्था केली.
मोघल 1857 ला मेले , इंग्रज 1947 ला , मग आता हेमाडपंती पद्धतीने 2 BHK का बांधत नाही ?
10 Feb 2021 - 11:07 am | मुक्त विहारि
तुम्ही आत्ता जे टाईप करत आहात, आणि परत परत जे अवतार घेऊ शकता, त्यामागे, शुन्याचा शोध आहे ...
बाकी मोगा कसे आहेत?
सचिन उद्दाम पोटे, यांना नमस्कार सांगा....
चंपाबाई सध्या काय करतात?
जागो मोहन प्यारे
10 Feb 2021 - 4:42 pm | उपयोजक
बाकीचे थोडावेळ बाजूला राहू द्यात फक्त
आर्यभट्ट
सुश्रुत
श्रीनिवास रामानुजन
जगदीशचंद्र बोस
सत्येंद्रनाथ बोस
या पाचजणांचे कर्तुत्व आंजावर वाचून पहा.किंवा नग तुम्हीच एखादा महान शोध लावता का पहा.
10 Feb 2021 - 4:47 pm | मुक्त विहारि
हे नविन नविन अवतारात येणे, सामान्य माणसाचे काम नाही ...
नविन नावे शोधणे, हेच यांचे शोध ...
मिपाकर सहनशील आहेत ....
10 Feb 2021 - 12:17 pm | सोत्रि
खुपच महत्वाचा मुद्दा! 👍
- (चाकोरीबद्ध) सोकाजी
10 Feb 2021 - 12:22 pm | मुक्त विहारि
मी पण
10 Feb 2021 - 10:07 am | Bhakti
"प्लॅनिंग कमिशन ने मागील ६० वर्षांत जे काही रिपोर्ट्स प्रकाशित केलेले आहेत ते वाचून पाहावे. जिथे जिथे ह्यांचे प्लॅनिंग आहे तिथे तिथे भारताने...."
थोडेफार हे पटले.
पण कोरोनामध्ये ' सिरम ' चे यशस्वी प्लानिंग पाहता भारत सुधारण्याचा चान्स आहे.शेवटी जीवावर बेतल तरच कोणीही सुधारतं.
10 Feb 2021 - 10:16 am | Rajesh188
ज्या चर्चेतून काहीच निष्पन्न होत नाही ती करण्यात मानवी वेळ वाया जात आहे कारण मानवी वेळ मर्यादित आहे.
मुळात जे विचार व्यक्त होत आहेत ते रिअल लाईफ आणि खरी परिस्थिती ह्याच्या शी बिलकुल जुळत नाहीत .
10 Feb 2021 - 10:30 am | मुक्त विहारि
त्यांचे विचार वेगळे आहेत, कारण, आपण घेतलेले अनुभव वेगळे आहेत...
वाचनाची आणि व्यावहारिक जीवनाची, सांगड घातली की, बर्याच गोष्टी समजतात ....
लिखित असलेली प्रत्येक गोष्ट सत्य असतेच असेही नाही आणि 100% असत्य असते असेही नाही ...
टुंड्रा प्रदेशातील पेहराव, सहारात चालत नाही आणि सहारातील पेहराव, टूंड्रा प्रदेशात चालणार नाही ...
10 Feb 2021 - 11:23 am | साहना
धन्यवाद. त्यामुळे अश्या चर्चेत सहभागी न होता पुढे चालावे. इथे पाहण्यासारखे काहीच नाही.
10 Feb 2021 - 12:25 pm | मुक्त विहारि
पण इतर कुणाला पटले असतील तर?
एकाच नाण्याला असंख्य बाजू असतात, हे तुम्ही अनुभवले आहे का?
10 Feb 2021 - 10:25 am | चंद्रसूर्यकुमार
सगळ्या गोष्टी पटल्या नाहीत तरी विचार करायला लावणारा लेख. धन्यवाद.
काही मुद्दे-
१. भारतात एकेकाळी सोन्याचा धूर वगैरे निघत होता म्हणजेच पूर्वीच्या काळी भारताने भरपूर प्रगती केली होती. नंतर सततच्या परकीय आक्रमणांमुळे ती खुंटली हे मान्य. हवामान वगैरे मुद्दे जे नंतरच्या काळासाठी प्रगती न होण्यासाठी लागू होते ते त्यापूर्वीच्या काळातही होते. मग पूर्वी त्याच वातावरणात प्रगती झाली पण नंतर प्रगती होऊ शकली नव्हती. त्याचे कारण काय असू शकेल?
२. भारतात इन जनरल युरोपपेक्षा तपमान जास्त असते हे मान्य. तरीही युरोपात (किंवा अमेरिकेतही) समर बर्यापैकी कडक असतो आणि सगळीकडे कॅनडासारखी वर्षातील सहा-सात महिने थंडी असते असे नाही तर तीन-चार महिनेच थंडी असते. भारतातली परिस्थिती म्हणाल तर हाडं गोठवणारी थंडी भारतातही असते. बर्फ पडत नसेल समजा पण पंजाब, राजस्थान आणि उत्तर भारतातील इतर राज्यात थंडीच्या काळात हाडं गोठवणारी थंडी असतेच. तपमान शून्याखाली १०-१२ अंश वगैरे जात नसेल पण १-२ पर्यंत तरी जातेच. मग भारतात बॉयलर वगैरे का तयार झाले नाहीत?
३. अमेरिकेत गोरे जायला लागले सोळाव्या शतकाच्या सुरवातीपासून. म्हणजे युरोपात प्रगती होण्याचा काळ आणि गोरे लोक अमेरिकेत जायला लागले हा काळ साधारण सारखाच आहे. त्यापूर्वी अमेरिकेत नेटिव्ह अमेरिकन्सचे राज्य होते. पण नंतरच्या काळात अमेरिकेत किंवा त्याच काळात युरोपात चालू असलेली प्रगती नेटिव्ह अमेरिकन्स करू शकले का? अमेरिकेत गोर्यांनी नेटिव्ह अमेरिकन्सचे शिरकाण केले पण गोरे तिथे आले आणि लगेच सगळे नेटिव्ह अमेरिकन्स नाहीसे झाले असे झाले नव्हते. गोरे आणि नेटिव्ह अमेरिकन्स यांच्यातील युद्ध अगदी १९व्या शतकातही चालू होती.
10 Feb 2021 - 11:00 am | मुक्त विहारि
शिवाय, वाचनालये उद्धवस्त झाली... मौखिक परंपरेने काही गोष्टी शिल्लक राहिल्या...
2. अशांतते मुळे, माणूस चौकस पण हरवून बसतो, चौकसपणा असला तरी, गुरू मिळत नाही,
रोजची भ्रांत असलेला मनुष्य, मुलभूत कलागुणांना किंवा मुलभूत ज्ञान लासलेला, न्याय देऊ शकत नाही...
इथे काही मिपाकर जरूर असतील की, आर्थिक बळ नसल्याने, त्यांना हवे ते शिक्षण घेऊ शकत नसतील ...
3. मी अमेरिकेत राहिलेलो नाही आणि पुस्तकी ज्ञानावर मी 100% कधीच अवलंबून राहत नाही ....
10 Feb 2021 - 12:03 pm | साहना
> हवामान वगैरे मुद्दे जे नंतरच्या काळासाठी प्रगती न होण्यासाठी लागू होते ते त्यापूर्वीच्या काळातही होते. मग पूर्वी त्याच वातावरणात प्रगती झाली पण नंतर प्रगती होऊ शकली नव्हती
स्टीम इंजिन. स्टीम इंजिन हे औद्योगिक क्रांतीचा पाया ठरले. स्टीम इंजिन च्या शोधासाठी हवामान हा मुख्य फॅक्टर होता. स्टीम इंजिन जाते आहे त्या भागांतील तापमान १०-१२ डिग्री वर जाते. भारतांत त्यामुळे कोळसा जळणाऱ्या फॅक्टरींत काम करणे लोकांना पसंद नव्हते. उलट परिस्थिती इंग्लंड मधील होती. शेती सोडून फॅक्टरींत जायला लोक उत्सुक होते. ह्यामुळे औद्योगिक क्रांती आणि त्यावर निर्माण झालेली शेती क्रांती ह्या दोन्ही गोष्टींना भारत मुकला. (हे एकच कारण आहे असे नाही. पण माझ्या मते हे एक कारण असू शकते).
स्वातंत्र्यानंतर खुंटलेली प्रगती ह्याला बहुतांशी प्लॅनिंग कमिशन आणि सरकारी प्लॅनिंग करणीभूत आहे.
> पंजाब, राजस्थान आणि उत्तर भारतातील इतर राज्यात थंडीच्या काळात हाडं गोठवणारी थंडी असतेच. तपमान शून्याखाली १०-१२ अंश वगैरे जात नसेल पण १-२ पर्यंत तरी जातेच. मग भारतात बॉयलर वगैरे का तयार झाले नाहीत?
ठाऊक नाही. कदाचित सततची युद्धे, समुद्राला जाऊन मिळणारी नदी नसल्याने आणि विविध देशांतून व्यापारासाठी लोक येत नसल्याने असेल.
> . पण नंतरच्या काळात अमेरिकेत किंवा त्याच काळात युरोपात चालू असलेली प्रगती नेटिव्ह अमेरिकन्स करू शकले का?
हे उत्तर सोपे आहे. नेटिव्ह अमेरिकन्स हजारो वर्षें वेगळे राहत होते आणि बाहेरील दुनियेशी त्यांचा अजिबात संबंध नव्हता. एका अर्थाने युरोपिअन आणि नेटिव्ह अमेरिकन एकमेकांसाठी पूर्णतः एलियन्स होते. प्रगतीसाठी विचारांची देवाण घेवाण अत्यंत आवश्यक असते जी युरोप, चीन, भारत आणि अरब ह्यांच्यांत बऱ्यापैकी झाली होती पण नेटिव्ह अमेरिकन्स, ऑस्ट्रेलिया मधील नेटिव्स ह्यांच्यात आणि आंत राहणाऱ्या आफ्रिकन जमातीत झाली नव्हती. अनेक आफ्रिकन जमातींनी चक्राचा सुद्धा शोध लावला नव्हता. कुठलाही वाहतूक प्राणी त्यांनी माणसाळला नव्हता आणि अनेक जमातींच्या भाषेंत आकडे किंवा ऍब्स्ट्रॅकट कन्सेप्ट सांगण्यासाठी बेसिक व्याकरण आणि शब्धभांडार सुद्धा नव्हते. ह्यांच्यासाठी युरोपिअन लोकांकडून शिकणे खूप म्हणजे खूपच कठीण होते पण त्या पैकी अनेकांनी त्यामानाने चांगली प्रगती केली आहे.
गन्स,जर्म्स आणि स्टील हे पुस्तक विख्यात आहे. त्यातील काही मुद्दे मला पटत नसले तरी खूप माहिती पटण्यासारखी आहे. दुसरे महत्वाचे पुस्तक म्हणजे 1491. युरपिअन्स येण्याच्या आधी अमेरिकेत समाज व्यवस्था कशी होती ह्याची कथा हे पुस्तक सांगते. मागील २००-३०० वर्षाच्या त्यांच्या इतिहासाविषयी मला माहिती नाही पण मागील १०० वर्षांचा इतिहास बऱ्यापैकी ठाऊक आहे.
रिसर्वेशन नावाचा प्रकार जो अमेरिकन सरकारने त्यांच्यावर लादला त्यामुळे नेटिव्ह अमेरिकन लोकांची भयंकर अधोगती झाली आहे. शिक्षण, आरोग्य, व्यसने, सर्वच ठिकाणी हि मंडळी हलाकीची परिस्थितीत जगतात. बहुतेक लोक सरकारी कृपेवर दिवस कंठत आहेत. काही जमातींना सरकारने रिसर्वेशन देण्यास नकार दिला. ज्या जमाती आज सर्वाधिक श्रीमंत आहेत आणि आपल्या पायावर उभ्या आहेत.
जॉन स्टसेल ह्यांचे कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडतील. नेटिव्ह अमेरिकन्स वरील हा रिपोर्ट पहा : https://www.youtube.com/watch?v=pQ4lnDy2xnQ
10 Feb 2021 - 12:35 pm | मुक्त विहारि
Roots, the saga of an American family
सुरूवातीला कंटाळवाणे आहे, पण, अमेरिकेतील इतिहास समजायचा हा 5% मार्ग आहे .... हे पुस्तक, अमेरिकेच्या इतिहासावर, गुलाम आणि मालक, यांच्या संबंधात, थोडाफार प्रकाश टाकते ..
कुठलेच पुस्तक 100% योग्य नाही आणि 100% अयोग्य पण नाही.
10 Feb 2021 - 11:40 am | Rajesh188
पण गेल्या 50 ते 60 वर्षापासून भारतीय लोक पण अमेरिका ब्रिटन मध्ये खूप प्रमाणात स्थायिक झालेले आहेत.आणि त्या देशातील उन्नत infrastructure आणी अत्यंत सुधारित प्रशासन ह्याचा लाभ घेत आहेत.
तर प्रश्न असा आहे ह्या काळात एका तरी भारतीय व्यक्ती च्या नावावर नवीन शोध आहे का(ग्रुप मध्ये नाही वैयक्तिक)
10 Feb 2021 - 11:56 am | माईसाहेब कुरसूंदीकर
प्रगती म्हणजे आर्थिक प्रगती रे राजेशा. आफ्रिकेत्/दुबईला जे कोणी भारतिय जातात ते जास्त पैसा मिळवतात.
10 Feb 2021 - 11:58 am | मुक्त विहारि
1. अणू बाॅम्ब
2. संरक्षण खात्यात , स्वयंपुर्णता,(ह्यातील प्रगती सांगू नये.)
3. संगणक
..............
11 Feb 2021 - 3:28 am | साहना
तोंड आहे म्हणून बोलावे असे करू नका. गुगल वर काही थोडेफार सर्च केले तरी पुरेसे आहे. अक्कल नसली तरी किमान आपण थोडा शोध घ्यावा.
२००० पासून २०२० पर्यंत अमेरिकन पेटंट ऑफिस मध्ये भारतीयांचा नंबर फार वरचा आहे. अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येच्या १% सुद्धा नसलेले भारतीय साधारण १३% पेटंट्स मिळवतात. चिनी लोकांचा नंबर थोडा वर आहे.
11 Feb 2021 - 8:02 am | Rajesh188
दावा केला नव्हता की भारतीय जे अमेरिकेत राहतात त्यांनी कोणते शोध लावले आहे ते पण वैयातिक पातळीवर ग्रुप मध्ये राहून नाही असा मी प्रश्न विचारला होता.
सर्वच माहिती गूगल वर नसते म्हणून.
आता तुम्ही 12 पेटंट भारतीय लोकांनी मिळवली आहेत असे गूगल वर सर्च करून सांगितले त्या बद्द्ल धन्यवाद .
पण ही पण अपुरी माहिती दिली आहे.
ते 13 पेटंट पारंपरिक ज्ञानवर दावा करणारी आहेत की नवीन शोधाची आहेत आणि कोणत्या हे पण सांगा.
11 Feb 2021 - 11:19 am | साहना
ज्याला खाज आहे त्याने स्वतःच खाजवावे. आपण जास्त रिसर्च करू शकता.
10 Feb 2021 - 11:51 am | माईसाहेब कुरसूंदीकर
मग त्यावेळेस काय करायला हवे होते ? १९५१ साली ३५ कोटी लोकसंख्या व फक्त १८ ते २०% साक्षरता अशी अवस्था होती. गरीबी तर पाचवीला पुजलेली. प्रत्येक घरात शौचालय हवे हा आग्रह आताच्या सरकारने ताणून धरलाय म्हणून नशीब.
भाक्रा नांगल धरण कोणता खाजगी उद्योजक बांधणार होता तेव्हा ? आय आय टी/आय आय एम्स/ इस्रो/टी आय एफ आर कोण बांधणार होते? हे तत्कालिन सोवियेट युनियन्/साम्यवादी देशांच्या मदतीने(भारताने विनवणी करून )/भीकेनेच म्हण हवे तर, उभी राहिली . अमेरिकेला कोक्/बर्गर्/सौंदर्य प्रसाधने विकण्यापलिकडे भारतात स्वारस्य नव्हते.
आता खाजगीकरणाचा काळ आहे म्हणतेस तर मग रस्ते अजूनही खराब कसे ?खाजगी कण्त्राटदारच बांधतात ना ते?
बाकी संगणकाबद्दल- १९५६ साली कोलकात्याच्या आय एस आय(भारतिय संख्याशास्त्र संस्था) येथे पहिला संगणक आणला होता. आणी हो, नेहरू सरकारने अनेक् वेळा ह्यात रस दाखवला होता.
बाकी उद्यमशीलता/प्रयोगशीलता ह्यांचा सरकारशी वा राजकीय विचारांशी संबंध फार असतो असे नाही. विप्रो/इन्फोसिस्/एम आर एफ्/एच सी एल/थर्मॅक्स ह्या कंपन्या ७०/८०च्या दशकातच स्थापन झाल्या आहेत.
10 Feb 2021 - 1:50 pm | साहना
> मग त्यावेळेस काय करायला हवे होते ?
सिरीयस उत्तर हवे असेल तर जयतीर्थ राव ह्यांचे इंडियन कंसर्व्हेटिव्ह हे पुस्तक वाचा. त्यांत ह्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे आहेत.
मी जे काही लिहिते त्यावर आपण सहमत असायलाच पाहिजे असा माझा हट्ट नाही किंवा मीच बरोबर आहे असेही नाही. कुठल्याही गोष्टीला दोन बाजू असतात. मग नेहरू ह्यांनी घेतलेला मार्ग एकच होता, आणखीन दुसरा मार्ग वगैरे नव्हता अशी ओरड का बरे लोक करता ? नेहरूंनी आणि त्यांच्या नंतर इतर लोकांनी ज्या विविध पॉलिसी काढल्या त्यातील प्रत्येक पॉलिसीची टीका मी देऊ शकते. पण नेहरू ह्यांच्या कडे दुसरा काहीच मार्ग नव्हता असे अजिबात नाही. विविध विदेशी अर्थतांड्य जसे मिल्टन फ्रीडमन किंवा आपले भारतीय अर्थतज्ञ् श्री शेणॉय ह्यांनी नेहरू ह्यांच्या विविध धोरणाची टीका करून इतर मार्ग सुचवले होते.
राजकीय क्षेत्रांत नेहरू ह्यांना collective farming हवे होते पण सुदैवाने स्वतंत्र पार्टी, मोरारजी देसाई, चरण सिंग आणि अनेक मंडळींनी तो डाव हाणून पडला.
सरकारी नियंत्रणाऐवजी काय करायला पाहिजे होते हे प्रश्न विचारणे म्हणजे कॅन्सर काढला तर त्याजागी काय ठेवायचे असे विचारण्यासारखे आहे. १९४७ मधील कुठलेही धोरण तुम्ही मला सांगा आणि त्या ऐवजी काय करायला पाहिजे होते हे मी सांगते.
> भाक्रा नांगल
कुणीच हा मुद्दा अजून काढला नाही ह्याचे मला आश्चर्य वाटत होतेच.
हे धरण चांगले आहे किंवा आवश्यक होते आणि त्याचा देशाला फायदा वगैरे झाला ह्याची तुम्हाला खात्री का बरे आहे ? काँग्रेसी प्रोपागंडा सोडून आणखीन काही आधार ? त्याकाळी भाक्रा प्रोजेक्ट वर त्या काळाच्या लोकांची ह्यांची टीका ऐकून तरी ठाऊक आहे का ?
भाक्रा नांगल वर पूर्ण रिपोर्ट आहे http://www.manthan-india.org/wp-content/uploads/2015/04/Unravelling-Bhak...
काही मुद्दे :
भाक्रा नांगल ने पंजांबी आणि हरियाणा च्या शेतीवर विशेष काही फरक पडला नाही. इतर भारताच्या तुलनेत दोन्ही राज्यांची productivity विशेष वाढली नाही. धरण चालू होऊन १२ वर्षे गेली तरी विशेष फरक पडला नाही. आधी बराच गाजावाजा करून सुरू केलेल्या धरणाचे फायद्याच्या अभ्यासाचा रिपोर्ट फेल झालेल्या मुलाच्या प्रगतिपुस्तका प्रमाणे भारत सरकाने जाहीर केला नाही. इतर लोकांनी अभ्यास करून टीका केली तर त्यांना भारत सरकारने विदेशी हस्तक म्हटले. त्याशिवाय त्याचा पर्यावरण इत्यादींवर झालेला वाईट परिणाम ह्याची बात न केलेली बरी. भाक्रा सारखे महाप्रचंड धरणे भारतातील एकूण शेतजमीनीपैकी १०%च शेतजमिनीला पाणी पुरवतात.
---
मीच बरोबर आहे असे नाही, पण मग नेहरू ह्यांच्या कडे हाच के मार्ग होता असा अट्टाहास का बरे ? त्याकाळी नेहरू ह्यांचे टीकाकार काय म्हणत होते ? त्यापैकी कुणाच्या भविष्यवाण्या खऱ्या झाल्या ? किमान पर्याय काय होते ह्याचा तरी आपण अभ्यास केला आहे का ?
10 Feb 2021 - 3:30 pm | चंद्रसूर्यकुमार
बापरे. भयानक. हे माहित नव्हते आणि कधी वाचलेही नव्हते. याविषयी कशात वाचायला मिळेल? तसे झाले असते तर चीन/रशियाप्रमाणे लाखो लोक दुष्काळात मारले गेले तसे कदाचित भारतातही झाले असते.
बाकी स्वतंत्र पक्षाला एका मर्यादेपुढे यश न मिळणे, बी.आर.शेनॉय यांना महत्व न मिळता प्रशांतचंद्र महालोबोनिस यांना महत्व मिळणे आणि परदेशी तज्ञांपैकी मिल्टन फ्रीडमन यांनी १९५५ मध्ये भारत सरकारला दिलेले मेमोरॅन्डम न स्विकारता जॉन केनेथ गालब्रेथना महत्व मिळणे या स्वातंत्र्यानंतर पहिल्या काही वर्षात झालेल्या दुर्दैवी गोष्टी होत्या.
10 Feb 2021 - 3:49 pm | साहना
https://www.amazon.com/dp/B081SYDYDC/ref=dp-kindle-redirect?_encoding=UT...
https://www.bloombergquint.com/opinion/free-markets-versus-socialism-in-...
10 Feb 2021 - 4:04 pm | चंद्रसूर्यकुमार
धन्यवाद. सामुहिक शेती या प्रकारापासून भारताची सुटका झाली असेल तर आपले नशीब थोर असेच म्हणायचे.
जेरी रावांचे पुस्तक वाचायलाच हवे.
10 Feb 2021 - 4:40 pm | मुक्त विहारि
सामुदायिक शेतीची वाटचाल झाली असती...
जवाहरलाल नेहरू हे आदरणीय व्यक्तीमत्व होते, ह्यावर माझा विश्र्वास कधीच न्हवता आणि आता तर अजिबातच नाही ..
10 Feb 2021 - 4:55 pm | Rajesh188
ग्रामीण अर्थ व्यवस्था सुधारली सांगली ,सातारा कोल्हापूर ह्या जिल्ह्यात त्या मुळेच आर्थिक प्रगती झाली हे नाकारता येणार नाही .
जो पर्यंत नेते कर्तृत्व वान होते आणि कार्याला वाहून घेणारे होते तो पर्यंत सहकारी चळवळ ही आर्थिक प्रगती ची शिल्पकार होती.
सहकारी चळवळ आता नालायक लोकांच्या हातात आहे त्या मुळे ती चळवळ कमजोर पडली.
आणि सरकारी नेहमी बदलणारी सरकारी धोरण पण त्याला जबाबदार आहेत.
10 Feb 2021 - 5:09 pm | मुक्त विहारि
सामना चित्रपट बघा
11 Feb 2021 - 5:10 pm | चौकस२१२
ग्रामीण अर्थ व्यवस्था सुधारली सांगली ,सातारा कोल्हापूर ह्या जिल्ह्यात त्या मुळेच आर्थिक प्रगती झाली हे नाकारता येणार नाही .
जो पर्यंत नेते कर्तृत्व वान होते आणि कार्याला वाहून घेणारे होते तो पर्यंत सहकारी चळवळ ही आर्थिक प्रगती ची शिल्पकार होती.
मानल
सहकारी चळवळ आता नालायक लोकांच्या हातात आहे त्या मुळे ती चळवळ कमजोर पडली.
आता म्हणजे कधीपासून? जरा विस्कटून सांगता काय
10 Feb 2021 - 5:06 pm | उपयोजक
जवा(संधी मिळंल तवा तवा देशाची संपत्ती)हर(ण) करणे ही असावी.
PJ ;)
10 Feb 2021 - 5:09 pm | मुक्त विहारि
सहमत आहे
11 Feb 2021 - 2:38 pm | अनुप ढेरे
नेहरुकालीन सगळ्यात वाईट निर्णय म्हणजे विमान बांधणी, विमान वाहतुक इन्शुरन्स इत्यादी उद्योगान्चे राष्टृयिकरण, नफा कमावणारा हा व्हिलन आहे अशी सन्कल्पना रुजवणे इत्यादी. याचा आणि देश गरिब, अशिक्षित असण्याचा, आय आय टी स्थापण्याचा सम्बन्ध नाही. जर इन्शुरन्स कम्पन्या गंडवत असतील तर त्यावर रेग्युलेटर बसवता येतो. (आय आर डि ए जे काम आत्ता करते आहे.)सरकारने उद्योग चालवणे गरजेचे नसते. तेच पुढे इन्दिरा गान्धीनी चालू ठेउन बॅन्का, खाण कंपन्या राष्ट्रीयीकृत केल्या. ९० टक्के पर्यन्त आयकर वाढवला. बुडीत सरकारी उद्योग (एअर इन्डिया, बी एस एन एल, एम टी एन एल, सरकारी जनरल इन्शुरन्स कम्पन्या आणि बॅन्का ) तगवण्याकरता गेल्या दहा वर्षात ७-८ लाख कोटी रुपये सरकारने वाया घालवले आहेत. (आपले पेट्रोल कराचे पैसे कुठे जातात हा प्रश्न पडल्यास उत्तर इथे शोधवे. )
11 Feb 2021 - 2:43 pm | साहना
+१
इंदिरा गांधी नेहरू ह्यांच्या पेक्षा मठ्ठ होत्या असे म्हणू शकतो. जे थोडेफार तारतम्य नेहरू ह्यांनी दाखविले होते ते इंदिरा दाखवू शकल्या नाहीत.
सर्वांत चुकीचा निर्णय म्हणजे रुपया चलनदर हे सरकारी फतव्याने ठरवणे. हा निर्णय बदलण्यास १९९३ उजाडावे लागले. कदाचित त्यानन्तर कधीही भारतांत विदेशी चलनाची चणचण भासली नाही.
11 Feb 2021 - 2:49 pm | अनुप ढेरे
अजुन एक डेडली धोरण होते, ज्याबद्दल मला अलिअकडेच समजले. १९५२ सालची फ्रेट नोर्मलाय्झेशन पोलिसी. खनिजांनी सम्पन्न असा पूर्व भारत मागास राहण्यात, तिथे गुन्तवणूक न होण्यात या धोरणाचा मोठा हात आहे असे मानतात.
https://en.wikipedia.org/wiki/Freight_equalisation_policy
नरसिन्ह राव सरकारने १९९३ साली हे धोरण मोडीत काढले.
11 Feb 2021 - 3:11 pm | चंद्रसूर्यकुमार
इंदिरा गांधींचा बँकांच्या राष्ट्रीयीकरणाच्या निर्णयाचा सामान्य लोकांना सरकारी बँकांमध्ये नोकर्या कशा मिळाल्या असे हास्यास्पद समर्थन मागे मिपावरच कोणीतरी केले होते. म्हणजे सरकारने कवडीमोल रक्कम घेऊन खाजगी उद्योग ताब्यात घेतल्याने आपण कष्ट करून आपले नाव करावे, आपण मोठे व्हावे या माणसाच्या सहजप्रवृत्तीलाच पायबंद घालायला हातभार लागला. यातून किती बडींग उद्योजकांची स्वप्ने भंगली असतील, किती उद्योजन जे अन्यथा मोठे होऊ शकले असते ते झाले नाहीत याची कोण मोजदाद करणार? आणि त्यातून किती नोकर्या ज्या अन्यथा निर्माण झाल्या असत्या त्या झाल्या नाहीत याचा आकडा कसा ठरवायचा? पण समाजवाद्यांना असले प्रश्न कधी पडत नसतात.
इंदिरा गांधींच्या बँक राष्ट्रीयीकरणाचा निर्णय म्हणजे शुध्द सरकारी दरोडेखोरी होती असे मला वाटते.
11 Feb 2021 - 3:59 pm | काळे मांजर
नेहरू लिहून पुढे कायच्या काय लिहिले की झाले
11 Feb 2021 - 4:31 pm | सॅगी
नेहरू/गांधींवर टिका करणारे प्रतिसाद दिसले की नख्या काढून कायच्या काय लिहायचे.
11 Feb 2021 - 4:38 pm | Rajesh188
कामगारांची पिळवणूक,कमी पगार देवून त्यांच्या कडून काम करून घेणे.
हे सर्व खासगी उद्योगपती च करतात.
ह्यांना सर्व यंत्रणेचे फायदे पाहिजेत पण जबाबदारी नको.
उद्योगातून होणाऱ्या फायदा हा फक्त एकच व्यक्ती la झाला पाहिजे त्याच उद्योगात काम करणाऱ्या लोकांना पण तो दिला नाही पाहिजे हीच ह्यांची वृत्ती आहे.
एकाच व्यक्तीच्या हातात संपत्ती एकवटणार असेल तर काही नकोत खासगी उद्योग जग अजुन 100 वर्ष पाठी गेले तरी चालेल.
सरकार शिपाई जेवढं पगार घेतो तेवढं पगार खासगी उद्योगपती उच्च शिक्षित कर्मचाऱ्यास पण देत नाहीत ही पिळवणूक नाही का.
MD आणि सर्वात खालच्या स्तरावरील कर्मचारी ह्यांच्या मिळणाऱ्या पगाराचे योग्य गुणोत्तर असले पाहिजे .
पण तसे असते का .
MD 10 लाख पगार घेत असेल तर कर्मचारी काही हजार च पगार घेतात.
कंपनी काय फक्त एकटा MD चालवतो.
उद्योगपती हे आजच्या काळातील दरोडेखोर च आहेत असे माझे स्पष्ट मत आहे.
उद्योग हे सरकार नीच चालावावेत फक्त ते professional रिती नी चालवावेत.
त्या मध्ये सरकार च पण फायदा आहे आणि कामगार च पण.
11 Feb 2021 - 4:57 pm | अनुप ढेरे
असल्या प्रकारे कम्पन्या चालवल्यानेच दर काही वर्षानी लाखो कोटी रुपये बन्का तगवायला द्यावे लागतात. तो पैसा सामान्य लोकानी विविध करातुन भरलेला असतो. सरकारी बॅन्का, विमान कम्पन्या, इन्शुरन्स कम्पन्या, फोन कम्पन्या या वाइट आणि महाग सेवा देतात. वर करदात्यान्चे लाखो रुपये घशात घालतात.
11 Feb 2021 - 5:07 pm | चौकस२१२
MD 10 लाख पगार घेत असेल तर कर्मचारी काही हजार च पगार घेतात.
कंपनी काय फक्त एकटा MD चालवतो.
उद्योगपती हे आजच्या काळातील दरोडेखोर च आहेत असे माझे स्पष्ट मत आहे.
धन्यवाद कॉम्रेड .. हसू का आता
जवाहरला नेहरू युनिव्हर्सिटी ते मॉस्को किंवा बेजींग फ्लाइगत चालू केली आहे तिकीट काढू का ? (एरर चुकलो दोन्ही कडे आता भांडवली गिधाडे घुसली आहेत मग कुठे जाता? उत्तर कोरिया.. ?
अरे हो आणि गेला बाजार अदानी अंबानी बरोबर पुनावाला यांचे पण नाव घेत जा ..
11 Feb 2021 - 5:10 pm | साहना
अगदी क्युबा सुद्धा आता ओपन होतोय म्हणे .ह्या लाल दिवट्याना कदाचित शेवटी फक्त जवाहरलाल नेहरू विद्यापीठांतील एखाद्या हॉस्टेल मध्ये जागा मिळेल, फार तर.
12 Feb 2021 - 10:35 am | चंद्रसूर्यकुमार
अनेकांना वाटते की उद्योजक कोट्यावधी रूपये कमावतात ते असेच उगीच कमावतात आणि त्यामुळे समाजाचा काहीच फायदा होत नाही. पण सत्य परिस्थिती अशी आहे की अशा उद्योजकांनी विकलेल्या प्रॉडक्ट्स/सर्व्हिसेसमुळे त्यांचा होता त्यापेक्षा कितीतरी जास्त समाजाचा फायदा होत असतो. बिल गेट्स बिलिएनर झाला पण जगातल्या बिलिएन कॉम्प्युटर्सवर मायक्रोसॉफ्टची ऑपरेटींग सिस्टीम आणि वर्ड,एक्सेल वगैरे गोष्टी असतात त्यामुळे तितक्या ठिकाणी काहीतरी फायदा झालाच. मागे वाचले होते की अशा इनोव्हेशन्सचा समाजाला एकूण फायदा होतो त्यापैकी अडीच-तीन टक्क्यांपेक्षा जास्त हे उद्योजक आपल्या खिशात टाकत नाहीत. बाकी उद्योजक नसलेल्या पण कंपनी चालविणार्या मॅनेजर्सची गोष्ट कराल तर त्यांना पगार मिळतो तितकी जबाबदारी पण असते. समजा त्या मॅनेजर्सना कंपनीची प्रॉडक्ट्स विकण्यात अपयश आले तर त्यांना नोकरीवरून लाथही बसू शकते. तेव्हा घी देखा पण बडगा नही देखा असे करून चालायचे नाही.
12 Feb 2021 - 10:50 am | उपयोजक
सहमत आहे.
12 Feb 2021 - 11:02 am | साहना
इतर लोक काय काम करतात ह्यांची ह्यांना अजिबात कल्पना नसते. एके काळी मराठी माणसाने "लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे" असे म्हटले होते पण तेंव्हापासून साम्यवादी आणि समाजवादी कीड भारतीय मनाला लागली आहे.
हिरो अनेक आहेत पण ४-५ सुपर स्टार आहेत. हँडसम अजिंक्य देव होता आणि सलमान पण, पण सलमान ने १००० पटीने जास्त पैसे केले. बॅट्समन सचिन होता आणि वासिम जाफर सुद्धा पण सचिन ने १०,०० पटीने जास्त पैसे केले. सचिन जाफर पेक्षा १०,००० पटीने जास्त चांगला बॅट्समन होता असे नाही पण पैसे जोडण्याची क्षमता हि स्किल बरोबर लिनिअर पद्धतीने वाढत नाही पण वर्गाकार पद्धतीने वाढते. ह्याची कारणे सुद्धा आहेत. पण गाढवापुढे गीता वाचून काय फायदा ?
12 Feb 2021 - 12:41 pm | उपयोजक
पैसे जोडण्याची क्षमता हि स्किल बरोबर लिनिअर पद्धतीने वाढत नाही पण वर्गाकार पद्धतीने वाढते. ह्याची कारणे सुद्धा आहेत.
याबद्दल एखादा स्वतंत्र लेख लिहावा अशी विनंती करतो.चांगला आणि कामाचा विषय आहे.
12 Feb 2021 - 10:23 am | चौकटराजा
मी ६ वर्षे सरकारी ( केंद्र सरकार ) नोकरीत होतो . पाणी प्यायचे फुलपात्र व माठ हा देखील युनियन ने भांडल्या मुळे मिळत असे अनुभवलेले आहेच .२२ वर्षे मी खाजगी कंपनीत कामाला होतो . ८ तासाच्या कामानंतर ३ तास अधिक काम करायला लावायचे तेंव्हा एक मसाला डोसा खायला देत ! नो ओव्हर टाईम ! आज मी जिथे सरकारी मध्ये कामाला होतो ती कंपनी झाली व नष्ट होण्याच्या मार्गावरती आहे ! ज्या खाजगी कंपनीत कामाला होतो ती ज्या उत्पादनात जगात दुसरी होती आज भारतात चौथ्या क्रमांकाला फेकली गेली आहे मात्र तिचा मालक (मालकच मानू सध्या तरी ) आज भारतातील पहिल्या वीस श्रीमंतात आहे ! मसाला डोसा नीतीचा असा फायदा त्याने करून घेतला आहे ! खाजगी असो वा सरकारी जिथे बाट के इस दुनियामे बाट के बोझ उठाओ ही नीती नाही तिथे असेच होणार ! व्यवहार चतुर हिशेबी मालकी व ताकदवर युनियन यांचा जिथे समनवय होतो तो सर्वात उत्तम व्यवसाय आहे से मी मानतो .
12 Feb 2021 - 10:56 am | उपयोजक
हा वेगळा अँगल आहे.इंटरेस्टींग आणि चिंताजनकसुद्धा.याबद्दल अजून सविस्तर लिहाल का?
11 Feb 2021 - 4:26 pm | Rajesh188
आताच्या सरकार la ना प्रश्नांची जान आहे ना त्या वर करायच्या उपाय योजनेची माहिती आहे.
सर्व आडणी कारभार चालू आहे.
ह्यांना काहीच जमत नाही म्हणून कधीच मरून गेलेल्या नेहरू ना दोष द्यायचा.
11 Feb 2021 - 4:29 pm | काळे मांजर
आमचा नेहरू 15 वर्षे पंतप्रधान होता
ह्यांनाही 7 वर्षे झाली
50 % उजेड पडला का ?
11 Feb 2021 - 4:45 pm | काळे मांजर
नेहरुनी सगळे सरकारी केले म्हणून कित्येक उद्योजक तेंव्हा निराश झाले म्हणे
मग आता मोदी येऊन 7 वर्षे झाली , मिसळपाववर किती नवीन उद्योजक निर्माण झाले ?
13 Feb 2021 - 5:33 pm | सॅगी
तुमच्या चच्चांनी १५ वर्षे देशाला अंधारात लोटले हे मान्य करताय तर...
प्रगती आहे म्हणायची
13 Feb 2021 - 6:14 pm | काळे मांजर
म्हणे
11 Feb 2021 - 4:49 pm | Rajesh188
जे उद्योजग त्यांच्या आवडीचे नाहीत त्यांच्या पाठी कर्ज वसुली संचानालय लावले आणि जे आवडीचे उद्योगपती आहेत त्यांना डोळे झाकून करोडो रुपये कर्ज दिले.
उद्योगपती पण मोदी सरकार वर नाराज आहेत.
एकदा सरकार जावू ध्या परत इलेक्शन फंड पण ह्यांना मिळणे मुश्किल होईल.
जे दीन तीन उद्योगपती आहेत आवडीचे तेच काय चार आणे आठ आणे देतील त्या वर पक्ष चालवावा लागेल.
11 Feb 2021 - 5:25 pm | Rajesh188
च पंगत बसते 7 वर्ष झाली तरी मोदी ना संडास बांधता आली नाहीत.
फक्त स्वप्नांचे इमले रोज बांधत आहेत.
11 Feb 2021 - 5:31 pm | सॅगी
४० वर्षे विरुद्ध ७ वर्षे, तरीही शिव्या फक्त मोदींनाच...
चांगले आहे.
11 Feb 2021 - 5:46 pm | काळे मांजर
जनता दल 2
व्हीपिसिंग 1
वाजपेयी 5
मोदी 7
भाजपाची 15 वर्षे झाली
सोळाव वरीस धोक्याचं
11 Feb 2021 - 6:00 pm | सॅगी
उरलेली वर्षे कोणाची रे मांजरु? जरा त्यांच्याकडेही आपली नखे कर की...
13 Feb 2021 - 6:15 pm | काळे मांजर
तुमच्या नखाना शाईस्तेखान चावला का ?
14 Feb 2021 - 11:10 am | सॅगी
खानग्रेस कडे बोटे दाखवताना तुमची नखे गळुन पडतात का?
14 Feb 2021 - 11:14 am | सॅगी
खांग्रेस बद्दल विचार करताना तुमच्या खुब्याला अफझलखान मिठी मारत असावा असे वाटते.
11 Feb 2021 - 5:28 pm | अनुप ढेरे
खासगी उद्योगांना सरकारने घशात घालून बाबु लोकांना चालवायला दिले की काय होते याचे उत्तम उदाहरण व्हेनेझुएला आहे. जुने नाही, गेल्या दहा वर्षातले उदाहरण आहे. जगातला सगळ्यात मोठा तेलसाठा असलेला देश पूर्ण कंगाल झालेला आहे. लोकांना अन्न मिळत नाही खायला, औशधे नाही, विज नाही. लक्षावधी लोक त्या देशातून पळून गेले. ( हे सगळे करणार्या हुगो शावेझला आपले लाल भाई आदर्श मानत होते. )
11 Feb 2021 - 5:33 pm | Rajesh188
देश च फस्त केल्याचे उदाहरण म्हणजे भारतावर ब्रिटिश राज त्याचा अनुभव घेतलाच आहे.
करोडो लोकांच्या हिस्स्याची संपत्ती मोजक्याच उद्योगपती नी गिळंकृत केली आहे ह्याची अनंत उदाहरणे आहेत.
11 Feb 2021 - 5:38 pm | अनुप ढेरे
ब्रिटिश राजनेच भारतीय उद्योगाना सम्पवले. दादाभाई नौरोजी वगैरे लोकांनी पहिल्यान्दा ते जाणले. लाल भाई तेच करतात. सो इन्ग्रजाचा वारसा लाल भाईच चालवू इच्छितात.
11 Feb 2021 - 5:38 pm | अनुप ढेरे
ब्रिटिश राजनेच भारतीय उद्योगाना सम्पवाय्ला सुरुवात केली. लाल भाईंनी तेच सुरू ठेवले.
11 Feb 2021 - 5:55 pm | Rajesh188
उत्तम चालत आहे,bpcl सरकार च चालवत
उत्तम चालली आहे.
आयआयटी सरकार च चालवत उत्तम गुणवत्ता आहे.
मेडिकल कॉलेज सरकार चालवत आहेत तीच कॉलेज उत्तम चालत आहे .कमी fees मध्ये हुशार मुल डॉक्टर होत आहेत.
पोस्ट सरकार च चालवत होते उत्तम चालत होते.
अजुन सुद्धा खासगी न्यूज चॅनल पेक्षा उत्तम दर्जा च्या न्यूज सरकारी वाहिन्या देतात.
अजुन किती उदाहरणे हवे.
Telecom खासगी कंपन्या mtnl aani BSNL चेच infrastructure फुकट म्हणावे अशा किमतीत वापरत आहेत ..
एलआयसी सरकार च चालवत आहे उत्तम चालली आहे.
11 Feb 2021 - 8:40 pm | काळे मांजर
सरकारी लोकप्रिय सेवा
पाणीपुरवठा
प्राथमिक , माध्यमिक व उच्च शिक्षण
टेलिफोन
वैद्यकीय शिक्षण , सरकारी दवाखाने
आय आय टी
वैद्यकीय संशोधन , साथ , लस , टीबी , एच आय व्ही , लोकसंख्या
लसीकरण
सार्वजनिक दिवाबत्ती
खनिज तेल , पेट्रोल , डिझेल
वाहतूक बस मेट्रो ट्रेन
सरकारी ब्यांक
एल आय सी
जनरल इन्शुरन्स
विद्युत निर्मिती
शेती संशोधन
सार्वजनिक बांधकाम
सरकारी अनुदानित गृहोद्योग
गाव स्तरावरच्या भाजी मंडया
ह्यांचा दोन पिढ्या यथेछ उपभोग घेतलेले लोक आता समाजवाद वाईट म्हणून राग आळवत आहेत
11 Feb 2021 - 8:41 pm | काळे मांजर
पोस्ट लिवायचे राहिले
पुलं देशपांडे माफ करा
12 Feb 2021 - 12:42 am | साहना
उपभोग ?
ह्या सर्व सेवांना "सेवा" संबोधित करणे म्हणजे कॅन्सर ला "वजन कमी करण्याचा उपाय" म्हणण्यासारखे आहे.
13 Feb 2021 - 6:39 pm | मुक्त विहारि
हे नक्की का?
11 Feb 2021 - 6:13 pm | Rajesh188
लोकांना लग्नासाठी मुली देत नाहीत लोक मुलींना सरकारी च नोकरदार हवा असतो भले शिपाई असेल तरी चालेल.
खासगी कंपनीत काम करणाऱ्या लोकांचे जीवन आयुष्याच्या कोणत्याच वळणावर स्थिर नसते .
आयुष्भर अस्थिर .
12 Feb 2021 - 1:09 am | Rajesh188
कॅन्सर काही लोकांच्या मेंदू ल झाला आहे.
त्या मुळे त्यांची बुद्धी हँग झाली आहे.
लुटेरे मोठे उद्योगपती जगाला लागलेला कॅन्सर आहे हा विचार जगात जास्त स्वीकारला जात आहे
भांडवल शाही देश सुद्धा अनुभवाने ह्या वाक्याला दुजोरा देत आहेत.
13 Feb 2021 - 3:25 pm | मराठी_माणूस
संपादक मंडळः वर एक अतिशय गलिच्छ भाषेत प्रतिसाद लिहला आहे , त्यावर काही कारवाई होणार का ?