दोनेक युट्यूब पहाण्यात आल्या त्यांची नोंद घेण्याच्या निमीत्ताने आंतरराष्ट्रीय क्षितीजावरील घडामोडींचा बर्याच दिवसांनी आढावा घेण्याचा योग येतोय. या व्हिडीओत एक व्हिऑन या टिव्ही चॅनलच्या पलकी शर्मांच्या ग्रॅव्हीतास कार्यक्रमाचा आहे. त्यांचे आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषण थोडक्यात पण लक्ष वेधक असते.
आमेरीकेत डोनाल्ड ट्रंप आणि जो बिदेन अध्यक्षीय निवडणूकीत व्यस्त असल्याने आंतरराष्ट्रीय राजकारण वृत्तांकनाचे लक्ष्य तिकडे स्वाभाविकपणे अधिक आहे. कोणीही निवडून आले तरी आमेरीका भारत सामरीक संबंधांची प्रगती साधली जातानाच आर्थीक आघाडीवर भारताचा फार मोठा सरळ फायदा अध्यक्ष बदलल्याने होईल अशी चिन्हे दिसत नाहीत. अफगाणीस्तानातून बाहेर पडण्याची आमेरीकेची प्रक्रीया आस्ते कदम चालू राहील. त्याने पाकीस्तानचा अतीरेकी कारवायांपद्धतीवरील विश्वास अधिक वाढेल आणि अफगाणीस्तानातून मोकळे झालेले अतीरेकी भारतीय सीमेवर जुंपले जातील .
युरोपाच्या काठावर अर्मेनीया विरुद्ध आझरबैजान असे नागोर्नो काराबाख या विषयावरून युद्ध चालू आहे. इराक आणि सिरीयातून मोकळे झालेले अतीरेकी तुर्कस्थान पडद्या मागुनच्या युद्धात वापरत असल्याच्या अर्मेनियाच्या दाव्यात अगदीच तथ्य नाही असे नसावे. याझीदींचे जे जेनोसाईड मागल्या सहा वर्षांपुर्वी झाले त्या पेक्षा अधिक भयंकर आर्मेनीयाने तुर्कस्थान कडून शंभर वर्षांपुर्विच भोगून झाले आहे, त्यामुळे नोगोर्नो काराबाख हा ख्रिश्चन बहुल भाग अझरबैजानला देण्यास आर्मेनीया तयार नाही यावरून हे युद्ध चालू आहे. रशियन हुकुमशहा स्टालीनने कोणत्या भरवश्यावर नोगोर्नो काराबाख अझरबैजानला कागदोपत्री जोडला हे माहित नाही पण सोव्हीएत संघाचे विसर्जन झाल्यापासून अझरबैजान अर्मेनीयाचे वितुष्ट मागच्या तीसेक वर्षात कायम चिघळत राहीला आहे. धार्मीक आधारावर भारताच्या विभाजनाचे समर्थन करणार्या पाकीस्तानला ख्रिश्चन बहुल नोगोर्नो काराबाख मात्र मुस्लिम बहुल अझरबैजानच्या मालकीत रहावा असे वाटते. दुटप्पी बोलण्यासाठी कोलांट उड्या किती सहज मारू शकतात याचे कुतूहल वाटते असा दुटप्पीपणा उघडा पाडण्यात भारतीय बर्यापैकी कमी पडतात.
असाच निर्लज्जपणा पाकीस्तानच्या फवाद चौधरी नावाच्या मंत्र्याने पुलवामा अतीरेकीकांडात पाकीस्तानचा हात होता हे पाकीस्तानी संसदेत उघडपणे मान्य केले. भारतीय माध्यमांनी वृत्त देताच पुन्हा नरोवा कुंजरोवा केले हे पाकीस्तानचे जुनेच लक्षण आहे.
फ्रान्स दोन कारणांनी बातम्यात आहे, कोविडने पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केल्याने फ्रान्स कालपासून पुन्हा एकदा फुल लॉकडाऊनमध्ये गेले आहे. दुसर्या बातम्या फ्रान्समध्ये गेल्या पंधरा दिवसात अतीरेक्यांनी काही जणांच्या हत्या केल्या. फ्रान्समध्ये गेल्या काही वर्षात महिना दोन महिन्यात एखादी अतीरेकी कारवाई नित्याचीच झाली आहे. या वेळी एका शिक्षकाची हत्या झाल्याने फ्रान्सच्या जनता ते अध्यक्ष सर्वांनी सात्विक संताप व्यक्त करून जहाल गटांचे फ्रान्समधून समुळ उच्चाटनाचा पण घेतला तर नवल नसावे, कायदा हातात घेऊन हत्या करणार्या अतीरेक्यांचा निषेध करण्याचे सोडून तुर्कस्थानच्या एर्दोगन नावाच्या अध्यक्षाच्या नेतृत्वात अल्पसंख्यांक बहुल देशांनी निषेध फ्रान्सच्या अध्यक्षांचा केला कारण त्याने फ्रान्सच्या राज्यघटनेनुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्याची बाजू घेतली. मोर्चेकाढून फ्रान्सच्या अध्यक्षाच्या फोटोला बुटाने मारणेवगैरे फ्रेंच वस्तुंचा बहीष्कार त्यापलीकडेचे मलेशियाच्या अध्यक्षांनी सर्वात एक पाऊल पुढे टाकत फ्रान्सचे अध्यक्ष ते फ्रान्सची सर्वसामान्य जनता या विरुद्ध अतीरेकी कारवाया करण्याची उघडपणे आवाहन केले असेच आवाहन मागे इराणच्या सर्वेसर्वाने सलमान रशदी विरोधात केले होते. यातील फ्रान्सच्या राजकीय भूमिकांची माहिती बातम्यातून येतेच पण मी आधी दुसरा जो युट्यूब पहाण्यात आल्याचा उल्लेख केला तो Caroline Fourest यां फेंच पत्रकाराच्या युट्यूब मुलाखतीचा यात फ्रान्समधील सेक्युलॅझमचे स्वरुप कसे वेग्ळे आहे, ते फ्रेंच लोक अभिव्यक्तीस्वातंत्र्य का आणि कसे जपू इछितात ते आमेरीकन सेक्युलॅरीझम आणि फ्रेंच सेक्युलॅरीझम मधील फरकाचे बारकावे इत्यादी रोचक आहे युटूब जरासा दीर्घ म्हणजे तासाभराचा आहे तरीपण जिज्ञासूंनी आवर्जून बघावा. युट्यूब दुवा France’s Fight Against Extremism
*घडामोडींशी अनुषंगिक सोडून इतर अवांतरे, व्यक्तिगत टिका, शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी अनेक आभार.
प्रतिक्रिया
30 Oct 2020 - 4:46 pm | कंजूस
करून प्रदेश हळूहळू ताब्यात घेण्याचा नवीन वसाहतवाद आहे.
30 Oct 2020 - 5:09 pm | महासंग्राम
फ्रांस प्रकरणात शार्ली हेब्दो ने एर्दोगन चं भारी कार्टून काढलंय, याच प्रकरणाचा निषेध म्हणून लोकनियुक्त पंतप्रधान सर्वश्री इम्रान खान यांनी संसदेत फ्रान्स मधून राजदूत परत बोलवण्याची घोषणा केली होती, पण फ्रांस मध्ये आपला राजदूतच तर बोलवणार कोणाला नाही असे त्यांच्या सहकार्यांनी सांगितल्यावर ते गप्प बसले.
अवांतर : आता पाकिस्तान फ्रेंच फ्राईज वर पण बंदी घालणार आहे म्हणे.
30 Oct 2020 - 5:25 pm | तुषार काळभोर
दुसरा कोणीतरी धागा काढेल म्हणून?
31 Oct 2020 - 3:04 pm | सतिश गावडे
निसटत्या बाजूंवर त्यांचं बरोबर लक्ष असतं. म्हणून नोव्हेंंबर उजाडायच्या आधीच नोव्हेंबरच्या घडामोडींचा धागा काढला त्यांनी. :)
31 Oct 2020 - 6:49 pm | माहितगार
:)
30 Oct 2020 - 5:50 pm | Gk
https://www.loksatta.com/manoranjan-news/ramayan-star-dipika-chikhlia-pl...
रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या पौराणिक मालिकेत सीतेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी त्यांच्या आगामी ‘गालिब’ या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला. या चित्रपटात त्या २००१ मध्ये भारतीय संसदेवर करण्यात आलेल्या दहशवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी अफजल गुरूच्या पत्नीची भूमिका साकारत आहेत. अफजल गुरुचा मुलगा गालिबच्या संघर्षावर हा चित्रपट आधारित आहे. येत्या ११ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
https://www.loksatta.com/manoranjan-news/ramayan-star-dipika-chikhlia-pl...
30 Oct 2020 - 7:14 pm | मदनबाण
आमेरीकेत डोनाल्ड ट्रंप आणि जो बिदेन अध्यक्षीय निवडणूकीत व्यस्त असल्याने आंतरराष्ट्रीय राजकारण वृत्तांकनाचे लक्ष्य तिकडे स्वाभाविकपणे अधिक आहे.
हंटर बिदेन यांचा लॅपटॉप रिपेअरसाठी दिला गेला होता, तो ट्रम्प तात्यांच्या माणसांनी गुपचुप उचलुन त्याच्या हार्डडिस्क मधली माहिती मिळवली आणि उघड केली. ही माहिती अर्थातच चीन आणि बिदेन यांच्या आर्थिक व्यवहारांची होती. ट्विटरवर ही माहिती शेअर करणार्यांची अकांउट्स ट्विटर लॉक करत होता आणि ते ठराविक ट्विट डिलीट केल्यावरच युजर अकांउट परत सक्रिय होत होते. का कोणास ठावूक सिलिकॉन व्हॅली ट्रम्प तात्यांच्या विरोधात आणि प्रो चायना स्टँड घेउन आहे असे वाटते.
याझीदींचे जे जेनोसाईड मागल्या सहा वर्षांपुर्वी झाले त्या पेक्षा अधिक भयंकर आर्मेनीयाने तुर्कस्थान कडून शंभर वर्षांपुर्विच भोगून झाले आहे
ह्म्म... जगाने हिंदूंच्या जेनोसाइडचा अभ्यास केला पाहिजे जे अजुनही चालू आहे ! संपूर्ण जगाच्या इतिहास सगळ्यात मोठे जेनोसाइड हे हिंदुंचेच आहे हे मी मानतो. हिंदूच्या मोठ्या कत्तली करण्यात आल्या, त्यांची मुंडकी तोडुन भाल्यांवर नाचवण्यात आली, हिंदुंच्या स्त्रियांना फाकवुन काढण्यात आलं [ आजही तेच होत आहे ]आणि विकण्यात देखील आलं आणि तरी देखील हा समुदाय या भुतलावर अजुनही त्यांची संस्कृती टिकवुन आहे हे मोठे नवलच आहे. आता शांतता प्रिय धर्मियांची संख्या २५% आसपास आहे तेव्हा हिंदूच्या मुलींना भर रस्त्यात ठार करण्यात प्रकार घडत आहेत, काही वर्षांनी जेव्हा ते ५०% पोहचतील तेव्हा ?
असो...
फ्रान्स दोन कारणांनी बातम्यात आहे, कोविडने पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केल्याने फ्रान्स कालपासून पुन्हा एकदा फुल लॉकडाऊनमध्ये गेले आहे. दुसर्या बातम्या फ्रान्समध्ये गेल्या पंधरा दिवसात अतीरेक्यांनी काही जणांच्या हत्या केल्या. फ्रान्समध्ये गेल्या काही वर्षात महिना दोन महिन्यात एखादी अतीरेकी कारवाई नित्याचीच झाली आहे.
फ्रान्स / युरोप आणि हिंदूस्थान यांना एकाच समस्येचा सामना करावा लागणार आहे. तेव्हा स्वत:ची ओळख, स्त्रिया आणि संपती वाचवण्यासाठी यांनी एकत्र येणे अत्यंत गरजेचे आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Pak should be blacklisted by FATF, India stands vindicated after Islamabad’s admission on Pulwama: VK Singh
30 Oct 2020 - 7:25 pm | शा वि कु
हि माहिती युक्रेन मधल्या कंपनीबद्दल बद्दल होती असे वाचले होते, जिथे जोपुत्राला काम मिळाले होते.दुवा.
30 Oct 2020 - 7:51 pm | मदनबाण
Emails reveal how Hunter Biden tried to cash in big on behalf of family with Chinese firm
EXCLUSIVE: Hunter Biden Audio Confesses Partnership With China ‘Spy Chief’… Joe Biden Named as Criminal Case Witness
INTELLIGENCEREPORT
Report on Biden Activities with China
LAPTOP LEAK Alleged ‘Hunter Biden sex and drug tapes’ posted on Chinese website linked to ex-top Trump adviser Steve Bannon
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Pak should be blacklisted by FATF, India stands vindicated after Islamabad’s admission on Pulwama: VK Singh
30 Oct 2020 - 8:07 pm | मदनबाण
==========================================================================================================
जो बिदेन यांचे चीन शी असणारे संबध पाहता, ट्रम्प तात्या परत येणार असे दिसते.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Pak should be blacklisted by FATF, India stands vindicated after Islamabad’s admission on Pulwama: VK Singh
30 Oct 2020 - 8:05 pm | Rajesh188
असा धाग्यांचा विषय आहे.
इथे एवढ्या समस्या आहेत त्या मधून मार्ग निघणे अवघड होत चाललं आहे.
आणि धागा कर्त्याला जगाची काळजी पडली आहे
31 Oct 2020 - 12:23 am | बाप्पू
जगाच्या समस्या कधी तुमच्या दारात येतील सांगता येत नाही राजेश भाऊ.. उघडा डोळे बघा नीट..
नाहीतर काही वर्षयांनी आफ्रिकेत कुठेतरी कोणीतरी कोणाला कानाखाली मारली त्याचा बदला म्हणून इथे इथलाच कोणीतरी तुमचा गळा कापेल तेव्हा तुम्हाला समस्येची गांभीर्यता समजेल..
30 Oct 2020 - 10:30 pm | Gk
बचत खातेदारांना देखील या शुल्काचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. बचत खात्यातून पैसे काढणे किंवा जमा करण्यासाठी शुल्क वसूल केले जाणार आहे. एका महिन्यात तीन बँक व्यवहार निशुल्क असतील. त्यानंतर पैसे जमा करण्यासाठी एका वेळी ४० रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. तर पैसे काढण्यासाठी १०० रुपये द्यावे लागणार आहेत.
maharashtra times: नोव्हेंबरपासून खिसा खाली होणार; बँकेत पैसे जमा करणे आणि काढणे महागात पडणार
जनधनवाल्यानाही चार्जेस लागू होणार
https://maharashtratimes.com/business/business-news/bank-of-baroda-set-t...
31 Oct 2020 - 4:14 pm | चौथा कोनाडा
व्वा, आनंदाची बात मी ! या मुळे उद्योगपती, भांडवलदार यांच्या कर्ज थकबाकींमुळे झालेले नुकसान भरून येण्यास मदत होईल व परिणामी सर्वसामान्य नागरिक आत्मनिर्भर होईल !
31 Oct 2020 - 4:35 pm | बाप्पू
सर्वसामान्य नागरिक नव्हे.. बँक्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी चाललेले प्रयत्न आहेत..
जेणेकरून पुन्हा कोणीतरी मल्ल्या किंवा निरव मोदी कर्ज मागायला आल्यावर पैसा कमी पडू नये.
3 Nov 2020 - 5:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भारी होता.
-दिलीप बिरुटे
6 Nov 2020 - 8:40 pm | चौथा कोनाडा
अहो, मल्ल्या किंवा निरव मोदी हे सर्व (राजकारणी/संबंधित यांनी पुरस्कृत केलेले ) सामान्य नागरिकच आहेत की !
ते आत्मनिर्भर झाले की बास ना !
7 Nov 2020 - 10:52 am | सुबोध खरे
एखादा प्रकल्प NPA का होतो याचा विचार न करता केवळ आपण फक्त उद्योगपतींना दोष देतो.
याचे मूळ इतक्या वर्षाच्या समाजमनाच्या समाजवादी जडणघडणीत आहे त्यात श्रीमंतांबद्दल असलेल्या असूयेचाही भाग आहे.
केवळ वस्तुस्थिती नजरेस आणून द्यावे यासाठी हे लिहीत आहे.
कोणत्याही उद्योगपतींची बाजू घेणे म्हणून नाही.
झारखंड मध्ये तिलैया किंवा उत्तर प्रदेशातील दादरी हे अति प्रचंड ऊर्जा प्रकल्प (UMPP) मार्गी का लागले नाही? कंत्राट दिल्यावर सहा वर्षे झाली तरी त्यांना जमीन दिली गेली नाही. यासाठी घेतलेल्या भांडवलाचे व्याज कोण भरणार? जमीन त्यांना देणे हे राज्य सरकारचे काम असते. दंडेली करून जमीन घेतली तर ते न्यायालयात टिकत नाही. आणि त्याचा फटका उद्योगपती च्या गळ्यात येतो. मग ते पण आपले कर्ज न भरता उद्योग आजारी म्हणून मोकळे होतात.
https://www.deccanchronicle.com/150429/business-latest/article/reliance-...
https://indianexpress.com/article/business/companies/supreme-court-allow...
https://economictimes.indiatimes.com/industry/energy/power/reliance-powe...
माझ्याकडे रिलायन्स पेट्रोलियमचे समभाग होते ती कम्पनी रिलायन्स ऊर्जा कंपनीत विलीन केल्याने रिलायन्स ऊर्जा या बुडत्या कंपनीचे समभाग माझ्या गळ्यात आले आणि माझे बरेच पैसे बुडाले. यामुळे या प्रकरणाची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी मी काही अभ्यास केला तेंव्हा नजरेस आलेली वस्तुस्थिती मंडळी आहे.
अर्थात श्री अनिल अंबानी हे धुतल्या तांदळासारखे आहेत असे माझे म्हणणे मुळीच नाही.
परंतु प्रत्येक उद्योगपती हा चोरच असतो आणि प्रत्येक श्रीमंत माणसाची संपत्ती हि गैरमार्गानेच मिळवलेली असते या दळभद्री मनस्थितीतून आपण बाहेर येणे आवश्यक आहे यासाठी हा प्रपंच.
31 Oct 2020 - 4:20 pm | मराठी_माणूस
हे सर्व प्रकारच्या व्यवहारासाठी का फक्त कॅश व्यवहारासाठी ?
31 Oct 2020 - 12:19 am | बाप्पू
फ्रान्स मधल्या घटनेचा निषेध भारतात सुद्धा.. तो देखील हिंसक पद्धतीने..
मागे एका धाग्यावर म्हणल्याप्रमाणे काही जमाती माय पेक्षा शेजारीणीची काळजी खूप करतात. DNA मध्येच फॉल्ट असावा..
जेव्हा त्या शिक्षकाला आणि संपादकाला निर्दयीपणे मारले गेले तेव्हा निषेधाचा एखादा मोर्चा काढला नाही यांनी.. किंवा झालेल्या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त करून दोषींना सख्त शिक्षा दया असे म्हणून ही जमात कधी पुढे आली नाही.. तेव्हा मूगगिळून गप्प बसले आणि आता जग पेटवतायत.. बहिष्कार घालतायेत.
फ्रांस ने चौका चौकात ते पोस्टर छापावे आणि असल्या बर्बर जमाती लोकांना पुन्हा आश्रय देऊ नये.
अजूनही तेथील दहशतवाद्यांचा टक्का (%) कंट्रोल मध्ये आहे भारताइतपत वाढल्यास रोजरोस असे प्रकार बघायला मिळतील हे वेगळे सांगणे न लागे..
जास्त सहानुभूती दाखवून आश्रय दिला ( ते ही अश्या वेळी जेव्हा 57 देशांपैकी कोणी यांना विचारत नव्हते.. त्यावेळी त्यांचा उमाः कुठे गेला होता काय माहिती.. ) त्याचे पांग हे असे फेडतायेत.
आणि इथे भारतात.. - बेगाने शादी मे "अब्दुल्ला" दिवाना.
31 Oct 2020 - 12:20 pm | Gk
कुठे घडले ?
31 Oct 2020 - 2:56 pm | बाप्पू
आलात?? तरी म्हणलं तुम्ही अजुन मागे कसे. अजुन कसे वकीलपत्र घेतले नाही दहशतवाद्यांचे.. !!
आल्या आल्या निदान त्या शिक्षकाला माणुसकीच्या नात्याने श्रद्धांजली वाहिली असती तर ते जास्त योग्य वाटले असते..
असो तसेही "माणुसकी " नावाची गोष्ट तुमच्यासारख्यांना काय माहिती.
हे घ्या..
https://youtu.be/gj_-KQNfiYw
आणि हे ही बघा.. माय मारो आणि शेजारीण जगो.. !!
https://youtu.be/iJaZS_aNAX8
31 Oct 2020 - 3:16 pm | बाप्पू
याव्यतिरिक्त माझ्याकडे व्हाट्सअँप वर काही व्हिडीओ आहेत जिथे काही तरुण फ्रांस च्या नावाने गळा काढून गाडयांची तोडफोड करत आहेत. ते इथे देणे योग्य होणार नाहीत.
कोरोना काळात हजारो लोकं जमवून रस्त्यावर जाळपोळ करणे आणि ते ही कुणासाठी?? कुठल्या प्रश्नासाठी???
आणि अश्या लोकांचा निषेध करण्याऐवजी तुम्ही साळसूदपणाचा आव आणून इथे आपल्या नसलेल्या अकलेचे तारे तोडणार.. !!
31 Oct 2020 - 3:28 pm | Gk
तुम्ही 2 व्हिडीओ दिलेत
त्यातला 1 ओपन होत नाही
दुसरा भोपाळ मधला आहे , तिथे मा साध्वीजी आहेत , त्या दंगलखोरांना पकडतील किमान शाप तरी देतील
31 Oct 2020 - 3:31 pm | Gk
मिसळपावावर 2 - 4 हजार आयडी असतील.
कोणत्या प्रकरणात कुणी श्रद्धांजली वाहिली अन कुणी नाही , हे तुम्ही इथे बसून कसे ठरवणार ?
31 Oct 2020 - 3:07 am | अर्धवटराव
२१व्या शतकात धर्माधारीत संघर्ष लयाला जाऊन मनुष्यप्राणी जगण्या-मरण्याच्या इतर समस्यांना हात घालेल असं भाकीत ७०-८० च्या दशकात केलं जायचं.. ते चक्रं उलटच फिरायला लागलय कि काय :(
31 Oct 2020 - 9:53 am | शाम भागवत
ॲा!
धर्माधारीत संघर्ष लयाला जायला आतातर कुठे सुरवात होतीय.
;)
31 Oct 2020 - 10:41 am | Rajesh188
धर्म आधारित संघर्ष पेटता रहवा म्हणून इंथन टाकणाऱ्या अनेक यंत्रणा ,संस्था कार्यरत असतात.
अगदी देशांची सरकार सुद्धा त्या मध्ये सामील असतात.
आपल्याला फक्त आग पेटलेली दिसते पण काडी लावणारे आणि वर पेट्रोल टाकणारे व्हाइट कॉलर गुन्हेगार कधीच दिसत नाहीत.
31 Oct 2020 - 11:29 am | बाप्पू
तुमचं म्हणजे कस आहे ना राजेशभाऊ.. सगळं काय वाईट ते राजकारणी किंवा समाजविघातक लोकच करतात.. तेच सगळा संघर्ष पेटवतात.. सामान्य लोकं म्हणजे कित्ती कित्ती भोळीभाबडी..!!! He राजकारणी असतात जे भोळ्या भाबड्या, दीनदुबळ्या लोकांची माथी भरकटवतात..
सगळ्या पापाची बिले त्यांच्या आणि सरकारच्या नावावर फाडून तुम्ही सेक्युलॅरिज्म ची चादर ओढून निवांत झोपी जाता..!
कधीतरी समस्या आणि त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करा..!! वैश्विक नाही पण आपल्या गल्ली बोळातील लोकांशी चर्चा करा. त्यांची खाजगी मते जाणून घ्यायचा प्रयत्न करा..
31 Oct 2020 - 12:22 pm | Gk
2020
फक्त 20 वर्षे झालीत
31.12.2099 ला झाले तरी ते एकविसावे शतकच
31 Oct 2020 - 9:49 am | महासंग्राम
प्रसिद्ध वकील हरीश साळवे यांनी दुसरं तर अभिनेत्री स्कार्लेट जोहान्सन ने तिसरं लग्न केलं
31 Oct 2020 - 10:38 am | Rajesh188
की बिझिनेस डील.
31 Oct 2020 - 11:38 am | महासंग्राम
साळवेंचा विवाह असावा स्कार्लेटची बिझनेस डील. कारण साळवेंचा पहिला घटस्फोट खूप आधी झालाय.
अर्थात हे दोन्ही विवाह वेगवेगळ्या व्यक्तींसोबत झालेत साळवे आणि स्कार्लेटचा एकमेकांशी संबंध नाही.
31 Oct 2020 - 3:15 pm | अमरेंद्र बाहुबली
अल्पसंख्यांक बहुल :) हह पु वा
31 Oct 2020 - 3:18 pm | बाप्पू
काही लोकं भारतात शंभर टक्के झाली तरी ते अल्पसंख्यांक च राहतील...
31 Oct 2020 - 6:51 pm | माहितगार
:)
31 Oct 2020 - 6:46 pm | मदनबाण
फ्रान्स मधील मंत्र्याचे वक्तव्य :-
“We Are At War” – French Official Warns Country Must Brace For More Islamist Terror Attacks
२०१५ मध्ये युरोपियन संसदेत या विषया खाली ३ प्रश्न विचारले गेले होते :- Wave of Muslim rape cases across Europe
काही काळात युकेचा देखील बाजा वाजणार आहे, दोन वर्षा पुर्वीची तिथली स्थिती :-
युकेत शिख समुदायाच्या महिलांवर अनेक वर्ष अत्याच्यार झाले आणि साधरण २०१७ /२०१८ च्या सुमारास ही गोष्ट उघडकीस आली.
Sexual exploitation of British Sikh girls by grooming gangs has been 'recklessly ignored' by police due to 'political correctness', claims report
Sikh girls 'abused by grooming gangs for decades' says shock new report
Pakistani Grooming Gangs Have Been Targeting Sikh Girls In UK For Over 50 Years, Says Report
एक छोटे का होइना पण चांगले पाउल :- UP CM Yogi Adityanath Vows To Bring Law Against 'Love-Jihad'; Touts 'Mission Shakti'
जाता जाता :-
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- #JusticeForSadhviPragya :- SIGN THE PETITION
31 Oct 2020 - 9:01 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
भारतिय अर्थव्यवस्था, त्यावर भाष्य करणारे अर्थतज्ञ, अग्रेलेखातून सरकारला 'ईशारे' देणारे संपादक , जी डी पी वगैरे कितीही वाचन केले तरी 'अर्थ' कसा लावायचा हे कळत नाही.
आता करोनामुळे भारतिय अर्थव्यवस्थेचे तीन तेरा वाजणार नव्हे वाजलेच, असे आपण वाचत होतो, मिडियातून बघत होतो. जी डी पी कसा खाली घसरला वगैरे.
मग नवरात्री,दसर्या निमित्ताने मर्सेडिझ बेंझ कंपनीने तब्बल ५५० गाड्या विकल्या ह्याचा अर्थ कसा काढायचा? एका गाडीची किंमत किमान ४० लाखापर्यंत असते मग असे कोण हे व्यावसायिक आहेत जे अशा माहागड्या गाड्या घेउ शकतात? कारण पुढची १/२ वर्षे काही खरे नाही,बाजराला उठाव नाही असे सगळेच म्हणत आहेत..
https://auto.hindustantimes.com/auto/news/mercedes-benz-india-delivers-5...
महागाईने मध्यम वर्गाचे कंबरडे मोडले आहे असे म्हणावे तर मारूती सुझुकीने ऑक्टोबर मध्ये तब्बल ९५,००० गाड्या विकल्या! ह्याचा अर्थ कसा काढायचा?
https://www.rushlane.com/navratri-car-sales-2020-12380963.html
किया, टाटा,ह्युन्डाई ह्यांचाही खप वाढला.
सरकारला नेहमी ईशारे देणारे अर्थतज्ञ, गिरीश कुबेरांसारखे सम्पादक ह्यावर काही बोलत का नाहीत?
1 Nov 2020 - 8:56 am | Gk
हेच कनसिडर केले तर भारतात 1947 पासून कार विक्री होतेच आहे की
म्हणजे भारतात गरिबी आहे , हा भाजपयांनी पसरवलेला भ्रम आहे की काय,
तुमचे 'हे' कधी गाडी घेणारेत ?
1 Nov 2020 - 10:15 am | माईसाहेब कुरसूंदीकर
नेहमी व्यक्तिगत पातळीवर घसरतोस जिक्या तू.
तुला मुद्द्दा समजला का ? ह्यात भाजपा/राजकारण कुठे आले? जी डी पी घसरत आहे, सगळे व्यवसाय मंदीत आहेत हे आपण सारखे वाचत होतो. अगदी अच्युत गोडबोले/गिरीश कुबेर ह्यांच्यासरखे तज्ञही हेच सांगत होते. मग असे असतना गाड्यांचा विक्रमी ख्प कसा? गाड्यांचा/बाईकच्या खपाचा अर्थ्व्यवस्थेशी थेट संबंध असतो असे अर्थतज्ञच सांगतात ना ?
मग आता ह्याचा अर्थ कसा लावायचा? धंदे तोट्यात आहेत असे सगळेच जण म्हणत होते मग ४०/५० लाखाच्या गाड्या घेणारे लोक कोणता धंदा करतात? बिल्डर? पण बंधकाम व्यवसाय तेजीत नाही असे हेच अर्थतज्ञ म्हण्त होते.
1 Nov 2020 - 2:50 am | Rajesh188
दहशतवाद हा देशासमोरील महत्वाचा प्रश्न नाही .
जी काही दहशतवादी कृत देशात झाली आहेत ती एकतर पाकिस्तान नी घडवून आणली आहेत किंवा येथील राजकीय कुरघोडी चा परिणाम आहे
मुस्लिम हे हिंदू चे शत्रू आहेत हिंदू ना मारून टाकतील,हे सर्व राजकीय विधान आहेत.
आणि मुस्लिम ना पासून हिंदू चे रक्षण भारतीय जनता पार्टी करेल हे सर्व बकवास आहे.
20 कोटी मुस्लिम देशात राहतात ते येथील नागरिक आहेत.
त्यांना भारतीय जनता पार्टी देशा बाहेर काढू शकत नाही त्यांना राज्य घटनेने दिलेले अधिकार नाकारू शकत नाही.
मग भारतीय जनता पार्टी मुस्लिम चे काय करणार.
देशातील सर्वात महत्वाचे प्रश्न हे बेरोजगारी,गरिबी,भ्रष्टाचार,अकार्यक्षम प्रशासन.
न्याय मिळण्यास होणारा उशीर.
प्रशासन गुंड ह्यांची मैत्री.
राजकीय पक्षांना असणारी गुंड लोकांची साथ.
हे प्रश्न सर्वात मोठे आहेत
हे सर्व प्रश्न सुटले तर एक पण दहशतवादी हल्ला भारतात होवू शकत नाही.
कोणाला तू देशप्रेमी आहेस का असे विचारताच येणार नाही
उगाचच धार्मिक संघर्ष निर्माण करणाऱ्या लोकांपासून भारतीय जनतेनी सावध राहण्याची गरज आहे
1 Nov 2020 - 8:50 am | बाप्पू
@ राजेश
इयत्ता 5 वी मराठी मेडीयम.
निबंध स्पर्धा - विषय - दशतवाद
त्या लायकीचा प्रतिसाद.. _^_
आता डोकंच 5 वीच्या पोराइतपत आहे म्हणल्यावर आम्ही बिचारे काय काथ्याकूट करणार.. रामराम.. !!!
1 Nov 2020 - 11:02 am | Rajesh188
Bjp ही तारणहार आहे.
किती ही लोक बेरोजगार झाली,बँका उद्योगपती नी बुडवल्या,काही मोजकेच उद्योगपती प्रगती करत गेले,रेल्वे पासून बँका पर्यंत सर्व क्षेत्र लाडक्या उद्योगपती ना अंदन दिली तरी ,प्रशासकीय व्यवस्थेत काडीचा बदल करू शकले नाहीत तरी,सामान्य लोकांचे जीवन अजुन खडतर झाले तरी.
Bjp सरकार चे गुणगान गायले की उत्तम दर्जा चा प्रतिसाद.
आणि bjp चा एकमेव कार्यक्रम हिंदू मुस्लिम,
मुस्लिम आणि हिंदू ना बरोबर घेवून जाण्यात त्यांना बिलकुल इंटरेस्ट नाही .
हिंदू मुस्लिम हे एक मेकाचे कसे कट्टर दुश्मन होतील.
आणि त्या मधून घडणाऱ्या दंगलीत सामान्य लोकांचे कसे बळी जातील अशी ह्यांची ध्येय धोरण ...आणि ह्या द्वेषाच्या राजकारणात स्वतःची पोळी भाजून घेणे हाच ह्यांचा हेतू.
मुस्लिम सोडा हिंदू चे तरी आर्थिक बाबतीत मजबुती करणं bjp ni केले आहे का
1 Nov 2020 - 12:20 pm | बाप्पू
अहो राजेश.. तुम्ही माझे प्रतिसाद वाचा.. BJP च्या प्रत्येक चुकीच्या धोरणावर मी टीका केली आहे. मग ते नोटबंदी असो किंवा अर्थव्यवस्था..
पण माझ्या बहुतांश प्रतिसादाच्या उत्तरात तुम्ही BJP ला का धारेवर धरातायेत ते समजेना.
1 Nov 2020 - 10:12 am | मराठी_माणूस
हे अगदी खरे आहे. पण सामान्य माणूस सुध्दा आपले भले कशात आहे ते न समजुन घेता नाही नाही त्या गोष्टीत रस घेतो.
1 Nov 2020 - 11:47 am | आनन्दा
ब्रेनवॉश केलेल्या लोकांशी संबंध आला की जाग येईल.
तोपर्यंत शुभेच्छा!!
1 Nov 2020 - 7:35 am | दिगोचि
---सरकारला नेहमी ईशारे देणारे अर्थतज्ञ, गिरीश कुबेरांसारखे सम्पादक ह्यावर काही बोलत का नाहीत?>> यांच्या सारखे जे कोणी जर्नालिस्ट आहेत त्यांना फक्त भाजपा सरकारवर टीका करणे एव्हढेच माहीत आहे. देश सामान्य माणसे मुसलमानांनी केलेले बलात्कार वगैरे विषयी यांना काही देणे घेणे नाही.
1 Nov 2020 - 12:25 pm | बाप्पू
अखलाक बद्दल रकाने च्या रकाने आणि headlines टाकणारे निकिता तोमर बद्दल मूग गिळून गप्प बसतात.
माझा प्रॉब्लेम अश्या हिपोक्रेटीक लोकांबद्दल आहे. असेच चालू राहिले तर एक दिवस हे नॉटी ( याचा अर्थ संजय राऊत जी यांना विचारा ) लोकं भारतात मूळ 10, 000 वर्ष्याहूनही जुन्या सांस्कृतिचा बट्ट्याबोळ वाजवून लोकांना रानटी आणि वाळवंटी संस्कृती स्वीकारायला लावणार. किंबहुना तशी परिस्थिती आणणार कि लोकांपुढे पर्यायच राहणार नाही.
1 Nov 2020 - 12:37 pm | Gk
निकिता तोमरच्या नातेवाईकनि सरकारी तपासाबद्दल समाधान व्यक्त केले आहे
Nikita Tomar murder case: Both accused sent to 14-day judicial custody
Both the men accused in the Nikita Tomar murder case have been sent to judicial custody after they were produced in court on Thursday.
https://www.indiatoday.in/india/story/nikita-tomar-murder-case-both-accu...
योगीजींच्या हाथरस केस मध्ये ही तत्परता नव्हती म्हणून आमचे बंटी बबली नाचून आले, मग कुंभकर्ण जागा झाला, योगीजी आता लव्ह जिहादवर मोठा कायदा करणारेत , त्यांचे व तुमचे अभिनंदन
1 Nov 2020 - 1:03 pm | बाप्पू
तपास होत आहे.. ही चांगली गोष्ट आहे. त्यासाठी सरकार चे आभार.
पण एक अखलाख मेला तर जणू भारतात मुस्लिमांचे जगणे च मान्य नाही असा डोलारा उभा केला होता बुद्धिजीवीयांनी.. पार UNA मध्ये निघाले होते काही महाभाग.. टीव्ही वर चर्चा आणि महाचर्चा चे फड रंगले होते.. ज्यांना कोण विचारत नव्हते तेसुद्धा आपले आपले अवॉर्ड अडगळीतून शोधून परत करत होते..
असा काही गोंधळ निकिता तोमर च्या बाबतीत झाला नाही.. अश्यावेळी ही जमात खोल खड्डा खणून आतमध्ये लपून बसते.. आणि त्या बाजूला जरा काही झाले तरी छाती पिटत वारुळातून मुंग्या बाहेर पाडाव्या तसे येतात.
माझा आक्षेप या हिप्पोक्रसी ला आणि त्यांच्या प्रोपेगेंडा ला आहे. तुमचे बंटी आणि बबली सुद्धा आता रस्त्यावर उतरले नाहीत कदाचीत जात यावेळी हवी ती नव्हती..
आणि आरोपी त्यांच्याच "कम्युनिटी" मधला होता.
जाता जाता...
मनुष्याच्या जीवाची किंमत होऊ शकत नाही. मारणारा कोणीही असो, कोणत्याही जाती.धर्माचा असो.. त्याला न्याय मिळालाच पाहिजे.
1 Nov 2020 - 1:14 pm | Gk
तिकडे गोव्यात भाजपाचे मंत्री बोलले , पोटभर गोमांस खा
त्यांचा कुणी निषेध केला नाही की त्यांच्यावर कुणी हल्ला केला नाही.
1 Nov 2020 - 2:13 pm | रात्रीचे चांदणे
जर गोव्यातील कायद्यानुसार तिथे खाणं allowed असेल तर निषेध का म्हणून करायचा.
1 Nov 2020 - 12:36 pm | मदनबाण
@माई
भारतिय अर्थव्यवस्था, त्यावर भाष्य करणारे अर्थतज्ञ, अग्रेलेखातून सरकारला 'ईशारे' देणारे संपादक , जी डी पी वगैरे कितीही वाचन केले तरी 'अर्थ' कसा लावायचा हे कळत नाही.
हे मला देखील कळंत नाही ! मार्केट कोसळण्याच्या आधी त्यात अनेक नविन खेळाडु देखील मोठ्या संख्येने भाग घेतात असे का ? याचा देखील 'अर्थ' कसा लावायचा हे मला अजुनही समजलेले नाही.
असो... तुमच्या ह्यांच ग्रह तार्यां विषयी काय मत आहे ? ते कळंव हो ! महाराष्ट्रात अनेकांचे ग्रह फिरणार आहेत असं दिसतयं...
ग्रह तारे यांच्या विषयी काही काळा पासुन मला विशेष रुची निर्माण झाली असुन त्यातलं मला काहीही कळंत नसले तरी जाणुन घेण्याची प्रबळ इच्छा होत आहे.
माझ्या वाचण्यात आलेली माहिती :-
विश्व आर्थिक मंदी- 2020 5 नवम्बर 2019 से लेकर 24 जनवरी 2020 तक, जब तक शनि और गुरु फिर एक बार धनु राशि में रहेंगे, तब तक की समयावधि प्राकृतिक विनाश की बड़ी वजह बन सकती है. इसके अतिरिक्त मार्च 30, 2020 से लेकर 29 जून 2020 और 19 नवम्बर 2020 से लेकर 05 अप्रैल 2021 तक के मध्य गुरु-शनि की युति मकर राशि में रहेंगी, गुरु क्योंकि धन, आर्थिक स्थिति के कारक ग्रह है और शनि कष्ट, आपदाओं और काल के कारक ग्रह है, इस स्थिति में मकर राशि में दोनों का एक साथ होना प्राकृतिक आपदाओं के अतिरिक्त आर्थिक बाजार में रिकार्ड गिरावट का कारण बनेगा, यह स्थिति विश्व आर्थिक मंदी की वजह बन सकती है. इस ग्रह युति की अवधि में इस प्रकार की आर्थिक आपदायें भयंकर रुप में आने के संकेत मिल रहे है. इस समय में विश्व भर में बड़े पैमाने पर वित्तीय संकट, आर्थिक गिरावट और सेंसेक्स के रिकार्ड स्तर से गिरने के प्रबल योग बना रहा है. ऐसे में धन निवेश से बचना लाभकारी रहेगा. इससे पूर्व भी जब गुरु-शनि मकर राशि में 1842, 1901, 1961 में एक साथ आए थे तो कुछ इसी तरह की स्थिति देखने में आई थी.
==========================================================================================
युद्ध के बादल यहां ध्यान देने योग्य बात यह है कि 1961-1962 में जब गुरु-शनि एक साथ मकर राशि में एक साथ थे, तो पडौसी देश चीन से युद्ध हुआ था. मकर राशि भारत देश की कुंडली में नवम भाव की राशि है, और नवम भाव से गुरु-शनि तीसरे भाव को पीडित कर युद्ध की स्थिति एक बार फिर से बना सकते है. 2020 से 2022 के मध्य एक बार फिर से चीन और पाकिस्तान से सावधान रहना होगा. अन्यथा युद्ध के बादल सिर पर एक बार फिर मंडरा सकते हैं...
59 साल बाद मकर राशि में फिर जुटेंगे 6 ग्रह, देश दुनिया में होंगे बड़े बदलाव
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Watch: Anti-ship missile fired by INS Kora hits target with precise accuracy
1 Nov 2020 - 6:54 pm | Gk
पाकिस्तानी खुफिया एजेंसी आईएसआई के लिए कथित तौर पर जासूसी करने वाले राम निवास गौड़ा को जयपुर से गिरफ्तार किया गया है।
https://www.amarujala.com/rajasthan/ram-niwas-gaura-who-was-allegedly-wo...
1 Nov 2020 - 7:12 pm | बाप्पू
अश्या गद्दार व्यक्तीला फासावर लटकावले पाहिजे. तो नावावरून हिंदू वाटतोय म्हणून त्याला सपोर्ट करायला किंवा आंतरजालावर त्याला (उमाः प्रमाणे ) सपोर्ट करणारा समाज नाही आमचा. तुमच्यासारखं नाव बघून वकीलपत्र घेत नाही आम्ही.. . आम्ही माय ला मानतो.. शेजारणीला नाही..
बाकी ही घटना इथे " नावासकट " हायलाईट करण्याचा तुमचा उद्देश समजला..
अश्या संधी फार कमी मिळत असतील नाही?? .. त्याचा बेनिफिट घ्या.
बाकी अश्या गोष्टी इतरधर्मीयांनी तुमच्या बिरदारीबाबत सुरु केल्या तर आंतरजाल ठप्प होईल एका दिवसात..
1 Nov 2020 - 7:50 pm | Gk
देशद्रोही का कोई धर्म नही होता.
तुम्ही उगाचच धर्मावर घसरले
मी तर एक शब्दही फेरफार न करता बातमी कॉपी पेस्ट केली
1 Nov 2020 - 8:38 pm | माहितगार
@ बाप्पू
कडव्या राष्ट्रनिष्ठा पुरेश्या प्रमाणात निर्माण करण्यात गेली १४०० वर्षे आपण भारतीय नेमके का कमी पडत आलो आहोत हे समजणे कठीण जाते. भारतीय अजिबात राष्ट्रनिष्ठा दाखवत नाहीत असे नाही पण तुटून पडणार्यांची पुरेशी संख्या निर्माण करण्यात भारतीय तवज्ञान कुठे कच्चे पडते हे भारतीय तत्वज्ञानातील अधिकतम सकारात्मकता कायम ठेवत पुन्हा तपासण्याची गरज असावी.
गेली काही शतके ज्या राष्ट्रनिष्ठेचा परिचय पश्तुन अफगाणांनी अफगाणीस्तानच्या बाबतीत दिला तशा निष्ठा ईतिहास कालीन भारतीयांनी दाखवल्या असत्या तर परकीय आक्रमणे झाली तरी टिकाव धरण्याचा कालावधी कमी राहून पाकीस्तान बांग्लादेश तयार होण्याची, आणि सकारात्मकतेला अधिक मर्यादा घालणार्या परकीय संस्कृतींच्या वैचारीक गुलामीची वेळ आली नसती.
2 Nov 2020 - 9:11 am | Gk
फ्रान्स मधली त्या घटनेची एक बाजू दिलासादायक आहे
शिक्षकाचा खून करणार्याला पोलिसांनी पाठलाग करून ताबडतोब ठार केले.
चार्वाक , तुकाराम , गांधी , दाभोलकर , लनकेश .... इथे अनेकांचे धर्मान्ध खुनी मोकाट फिरतात
ह्यांच्या खुन्यानाही मोदी सरकारने ठो ठो गोळी हाणावी
4 Nov 2020 - 2:47 pm | आंबट चिंच
ते जावु दे जि. क्या. मला सांग इतक्या मशिदी असताना मथुरेत श्री कृष्ण मंदिरात नमाज पढायला ४ मुस्लिम लोक गेले त्या विषयी तुमचे काय मत आहे?
असे जर आम्ही मशिदीत जावुन आरती केली तर चालेल काय?
असे झाले तर मग मिसळपाव कशाला अख्खा भारत बंद होईल नाही?
5 Nov 2020 - 11:12 am | mayu4u
कागलकर शेपूट घालून गायब होईल.
2 Nov 2020 - 11:39 am | मराठी_माणूस
बरोबर. ज्या गोर्यांनी आपला देश लुटुन फस्त केला त्यांच्याच देशात शिक्षण घेणार्यांना, नोकरी करणार्यांना स्वर्ग २ बोटे उरला आहे असे का वाटते ?
2 Nov 2020 - 7:56 am | माईसाहेब कुरसूंदीकर
भारतिय अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे असे अर्थतज्ञ म्हणत होते. ह्या सगळ्याचे कारण करोना आहेच पण मूळ कारण नोव्हेंबर २०१६ मधिल नोटाबंदी आहे असेही अनेक पत्रकार सारखे म्हणत होते. ट्रॅक्टर व बाईक्सच्या विक्रीचा अर्थ्व्यवस्थेशी थेट संबंध असतो असे हे तज्ञ नेहमी सांगत असतात.
मग आता हिरो कंपनीने एका महिन्यात आठ लाख बाईक्स विकल्या ह्याचा अर्थ काय ?
ह्युन्डाई कंपनीने तर तब्बल ५६००० गाड्या विकल्या. त्यांच्या म्हणण्यानुसार हा मोठा रेकॉर्ड आहे.
मर्सेडिझने नवरात्रि/दसर्याच्या काळात ५५० गाड्या विकल्या. एका गाडीची किंमत ३५ ते ४० लाख तरी असावी. ४० लाखाची गाडी घेणारे मोठे व्यावसायिक असतात मग ह्याचा अर्थ "भारतिय अर्थ्व्यवस्थेचे बारा वाजले आहेत.. निर्मला सीतारामन ह्याना काहीच कळत नाही" वगैरे जो प्रचार चालु होता ती सगळी अजेंडा पत्रकारीता म्हणायची.
आम्ही कोणत्याही पक्षाचे समर्थक नाही पण निदान अर्थव्यवस्था व तिच्यावर भाष्य करताना पत्रकारानी आपला राजकीय अजेंडा बाजूला ठेवणे गरजेचे आहे.
2 Nov 2020 - 9:00 am | आनन्दा
ऑक्टोबर चे GST कलेक्शन 1लाख कोटी झाले असे म्हणतात..
अवांतर -
तुमची प्रतिक्रिया वाचून आश्चर्य वाटले.. माई तुमच्या ह्या नी पक्ष बदलला की तुम्ही काडीमोड घेतलात?
ह घ्या
2 Nov 2020 - 10:00 am | माईसाहेब कुरसूंदीकर
हा हा हा. आर्थिक समस्यांचा उहापोह राजकीय विचार बाजूला ठेवुन करावा असे आमचे मत.अनेक अर्थतज्ञ तसे करताना दिसत नाहीत."अर्थ्व्यवस्थेने मान टाकलेली/केंद्राच्या तिजोरीत खडखडाट.." अशी वाक्ये लोक्सत्तेच्च्या अग्रलेखात गेल्या आठवड्यापर्यंत येत होती.
हे अंशुमान तिवारी(https://en.wikipedia.org/wiki/Anshuman_Tiwari) , अतिशय उत्तम उहापोह करतात, आकडेवारी सांगून. देशाची अर्थव्यवस्था कशी डबघाईला आली आहे हे ते सांगत होते. "आता पुढची २/३ वर्षे काही खरे नाही" असेही म्हणत होते.
मग हे असे अचानक काय झाले? यु पी आय मधुन व्यवहार वाढले हे समजू शकतो पण हिरो कंपनीच्या बाईक्सची ८ लाख विक्रमी विक्री झाली.. जर अर्थव्यवस्थेने मान टाकलेली होती, लोकांच्या खिशात पैसा नव्हता तर मग ह्युण्डाई/मारूतीच्या गाड्या एवढ्या जोरात कशा खपत आहेत?
https://auto.hindustantimes.com/auto/two-wheelers/hero-motocorp-shatters...
ह्याचे उत्तर मिळेल का?
2 Nov 2020 - 11:55 am | विजुभाऊ
दुचाकी चार चाकी चा खाप वाढण्याचे दुसरे एक पण महत्वाचे कारण करोना आणि सोशल डिस्टन्सिंग हे असू शकते.
बस ट्रेन ने प्रवास करायला लागू नये म्हणून लोक गाड्या किंवा दुचाकी घेत असावेत. हे देखील एक शक्यता आहे
2 Nov 2020 - 12:20 pm | मदनबाण
देशाची अर्थव्यवस्था कशी डबघाईला आली आहे हे ते सांगत होते. "आता पुढची २/३ वर्षे काही खरे नाही" असेही म्हणत होते.
माई हे असत्य नाही. करोनाने त्यात अधिकची भर घातली आहे. या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम दिसायला पुढचे वर्ष उजाडावे लागणार आहे.
करोनाच्या प्रादुर्भावाच्या भितीने ज्यांना कामासाठी इतर वाहनांचा वापर टाळावा वाटला असावा आणि ज्यांची आर्थिक स्थिती योग्य असावी यांनी मध्यम छोट्या श्रेणीतील कार आणि दुचाकींना पसंती दिली असण्याची शक्यता अधिक वाटते.
काही चिंतादायक बातम्या :-
Data | An estimated 12.2 crore Indians lost their jobs during the coronavirus lockdown in April: CMIE
Lockdown 2.0: Unemployment rate hits 26% in India, 14 crore lose jobs, says CMIE
1.89 crore salaried Indians lost jobs since April, around 50 lakh only in July, says CMIE
1.89 crore salaried jobs lost in 3 months
Every third professional has lost his job since corona
Coronavirus: India will take 'years' to recover from unemployment crisis
Five million salaried people lost jobs in July; their ballooning numbers a source of worry: CMIE
India's fragile formal sector: 18.9 million white collar job loss 'difficult' to retrieve
Loss is not only of jobs but also of incomes
माझ्या ओळखीतल्या अनेक जणांचे वांदे लागले आहेत, कोणाचा बिझनेस आहे,कोण हॉटेल लाईन मध्ये आहे तर कोणी नोकरदार. जितक मला ठावूक आहे आणि समजलं आहे त्यानुसार डिप्रेशन अटळ आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Indian Army Doctors Successfully Perform Surgery At 16,000 Feet In Eastern Ladakh Amid Conflict With China
2 Nov 2020 - 4:21 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
काही कळत नाही रे मदनबाणा . लोकांकडे पैसा नाही म्हणावे तर यात्रा डोट कॉमवर ४०% अधिक बुकिंग झाली. ती कशी?
https://www.livemint.com/news/india/travel-firms-witness-spike-in-bookin...
हे सहलीला जाणारे कुणी धनाढ्य नाहीत. मध्यम-उच्च मध्यमवर्गीय आहेत.
एका वर्गाकडे ४०/५० लाखाच्या गाड्या घेण्यासाठी पैसा आहे.
उच्च-मध्यम्/नवश्रिमंतांकडे मारूती एर्टिगा, किया, हेक्टर, आय-२० गाड्या घेण्यासाठी पैसा आहे.
गुजरात्मध्ये समुद्र-विमानाने पटेलांचा पुतळा पाहण्यासाठि पहिल्याच दिवशी ३००० बुकिंग्स झाली.
https://indianexpress.com/article/business/aviation/spicejet-gets-3000-b...
वरील बातम्यांची व 'ढासळणार्या' अर्थ्व्यवस्थेची सांगड कशी घालायची ?
2 Nov 2020 - 4:24 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
सहलीला जाणे, ७/८ लाखाच्या गाड्या घेणे,४०/५० लाखाच्या गाड्या घेणारे आर्थिक नियोजन करत असतीलच ना? भविष्याचा विचार करत असतीलच ना? हे कोण व्यावसायिक आहेत , ज्यांचे एकदम मस्त चालले आहे?
2 Nov 2020 - 9:22 am | Rajesh188
तर bjp विरूद्ध मत व्यक्त करणाऱ्या लोकांना पण भारतीय संस्कृतीचा अभिमान आहे.
भारतीय संस्कृती टिकून राहावी म्हणून सर्व काही रिती रीवज ते अतिशय भक्ती भावाने निभावत असतात.
धर्माचा,जातीचा वापर जेव्हा निवडणूक जिंकण्यासाठी केला जातो तेव्हा मतभेद होतात.
राजकारणात धर्म आला की राजकीय पक्ष धर्म जाती वाटून घेतात त्या संबंधित पक्षाच्या सरकारला ला विरोध केला की त्या धर्माला विरोध करतोय असा सोयीचा अर्थ काढला जातो.
मुळात धर्माला राजकारणात प्रवेश निषिद्ध च असला पाहिजे.
बाहुधर्मिय ,अनेक जातीत विभागलेला भारतीय समजा साठी ते धोकादायक आहे.
टीव्ही वर सरळ धार्मिक चर्चा आयोजित करून ,न्यूज वर धर्म आधारित बातम्या चा रतीब लावून आपण देशप्रेम दाखवत आहोत की देशद्रोही काम करत आहोत ह्या विषयी विचार करण्याची गरज आहे.
ह्या बाबत gulf मधील देशांचे उदाहरण घेण्याची गरज आहे.
बहुसंख्य मुस्लिम असलेल्या ह्या देशात बिगर मुस्लिम लोकांना काहीच त्रास नाही.
इथल्या सारखे तिथे मुस्लिम रस्त्यावर नमाज अदा करत नाहीत.
कोणत्या देशात मुस्लिम वर अन्याय झाला म्हणून तिथे लोक रस्त्यावर उतरत नाहीत.
त्यांनी धर्माला धर्माच्या ठिकाणी च ठेवलं आहे.
2 Nov 2020 - 10:02 am | आनन्दा
एक प्रश्न मनात आला.
गल्फ मध्ये ईशनिंदा कायदा आहे की नाहीये हे जरा सांगाल का मला शोधून? धर्म आणि राजकारण एकत्र अनु नये म्हणताय म्हणून विचारतोय आपला.
अवांतर -
तुम्ही म्हणताय ते कितीही खरे असले तरी अनादी काळापासून धर्म आणि राजकारण हातात हात घालूनच चालत आलेले आहेत, त्यामुळे त्यात बदल होणे मला तरी इतक्यात अपेक्षित नाही.
You have to live with it.
2 Nov 2020 - 2:28 pm | Rajesh188
UAE मध्ये सर्व मुस्लिम राष्ट्र असल्या मुळे इशनिंदा कायदा तिथे नक्कीच असेल.
आणि त्या साठी फाशी ची शिक्षा सुधा असू शकते.
Indonesia मध्ये पण इशानिंदा कायदा आहे पण तो फक्त मुस्लिम साठी नाही.
सरकारी धर्म असलेल्या
हिंदू,बौद्ध,मुस्लिम ह्या सर्व धर्मांना तो लागू आहे.
तिथे हिंदू धर्मातील देवता वर टीका केली तरी इशा निंदा खाली केस चालेल.
अभिव्यक्ती स्वतंत्र च्या नावाखाली कोणत्याही धर्माच्या श्रद्धा स्थानावर गल्लीच्छ भाषेत टीका टीपणी करणाऱ्या लोकांना फाशी हीच साजा योग्य आहे असेच माझे मत आहे
2 Nov 2020 - 2:35 pm | रात्रीचे चांदणे
माझ्या मते ईश्वर निंदे साठी फाशी देने म्हणजे अतिरेक आहे,
2 Nov 2020 - 4:06 pm | बाप्पू
@ राजेश..
तुम्ही काय बोलताय ते तुमचं तुम्हाला तरी कळतेय का??
हा कायदा आला तर भारतातले सर्व लेफ्ट, अतिशहाणे मुस्लिम मुल्ला मौलवी, ख्रिश्चन पाद्री आणि सो कॉल्ड बुद्धिजीवी सर्वांना फाशी द्यावी लागेल.. कारण बहुतांश वेळा यांचा निम्मा वेळ हिंदू देवी देवतांवर टीका आणि हिंदू धर्माची निंदा नालस्ती करण्यातच जातो..
फक्त हिंदू लोकं सहिष्णू आहेत म्हणून आजवर हे जिवंत आहेत.. नाहीतर लोकं इथे कार्टून काढले तरी गळा कचाकच कापून टाकायला मागे पुढे बघत नाहीत.
हिंदुत्वाबद्दल काही लिहिण्याआधी तुम्ही तुमचे बौद्धिक वय तपासून घ्या हा एक आगंतुक सल्ल्ला.. अगदीच नाही जमले तर 1 वर्ष इतर धर्मीय लोकांचा आतून बाहेरून पूर्ण अभ्यास करा, त्यांचे साहित्य वाचा, सर्वसामान्य लोकांशी गप्पा करा.. आणि मग इथे येऊन आपले ज्ञान पाजळा.. !!
2 Nov 2020 - 4:15 pm | Rajesh188
अभिव्यक्ती स्वतंत्र च्या नावाखाली
हिंदू देवता ,हिंदू धर्म ह्या वर गल्लिछ भाषेत टीका करणारे डावे,कम्युनिस्ट,नास्तिक ह्यांच्या वर कडक कारवाई झालीच पाहिजे हे माझे मत आहे.
पहिला माझा msg पुर्ण वाचत जा.
2 Nov 2020 - 4:56 pm | बाप्पू
तुमच्या भाषेत कडक कारवाई म्हणजे डायरेक्ट फाशी का???
2 Nov 2020 - 10:47 am | गोंधळी
https://www.loksatta.com/desh-videsh-news/modi-govt-spent-rs-713-crore-2...
वरील बातमी जर का खरी असेल तर ते योग्य आहे असे तुम्हाला वाटते का?
आणि जर का खोटी असेल तर लोकसत्ता वर भक्त केस करुन माफी मागायला लावनार का?
2 Nov 2020 - 12:19 pm | बाप्पू
मोदी सरकार खरेच अतिरेकी खर्च करतेय..
BTW - आपले मौनीबाबा पण काही कमी नव्हते. शेवटच्या तीन वर्षात 2048 कोटी..
https://m.timesofindia.com/india/UPA-govt-spent-about-Rs-2048-crore-on-p...
आणि आता तुमच्याच भाषेत..-
वरील बातमी जर का खरी असेल तर ते योग्य आहे असे तुम्हाला वाटते का?
आणि जर का खोटी असेल तर टाइम्स ऑफ इंडिया वर चमचे लोकं केस करुन माफी मागायला लावनार का?
2 Nov 2020 - 12:36 pm | रात्रीचे चांदणे
कदाचित जाहिरातीतल्या खर्चा मध्ये विविध योजनांची केलेली जाहिरात असेल. उदाहरण म्हणजे समजा जन धन मध्ये बँकेत खाती खोला, गॅस सबसिडी give-up करा ह्यांचा खर्च ह्या मध्ये असेल. आणि कोणत्याही सरकार आणि जन ते साठी हे गरजेचं आहे, कारण सरकार ने एखादी योजना आणली आणि त्याची माहिती जनते पर्यंत त्याची माहिती पोहचलीच नाही तर त्याचा काही फायदा होणार नाही.
पण एक गोष्ट नक्की आहे ती म्हणजे ह्या सरकार ने फक्त एका परिवाराच्या नवे योजना नाही आणल्या.
2 Nov 2020 - 1:25 pm | आनन्दा
हेच म्हणणार होतो.
योजना लोकांपर्यंत पोचवण्यासाठी जाहिराती आवश्यक असतात..
रोज 2 कोटी म्हणजे तशी काही फार रक्कम नव्हे, काही महत्वाच्या योजनांच्या नुसत्या पेपर ऍड द्यायकय्या झाल्या तरी काही हजारात खर्च येतो आज..
त्यामानाने 2 कोटी म्हणजे कमीच आहेत.
3 Nov 2020 - 11:54 am | गोंधळी
बाप्पूजी खलिल बातमी टाइम्स ऑफ इंडिया मधलीच आहे. त्यात म्हटले आहे की,
The average daily advertising spend of the NDA government in print and electronic media over the last three years is a little over double that of the previous UPA government's two terms.
https://timesofindia.indiatimes.com/india/during-3-year-tenure-nda-spend...
कदाचित जाहिरातीतल्या खर्चा मध्ये विविध योजनांची केलेली जाहिरात असेल.
योजना लोकांपर्यंत पोचवण्यासाठी जाहिराती आवश्यक असतात..
वरील मुद्द्यांवर आक्षेप नाही आहे. तर याचा उपयोग योजनांची माहीती कमी व स्व-प्रतीमा बनवण्यासाठी जास्त होतो आहे असे दिसत आहे.
3 Nov 2020 - 12:38 pm | बाप्पू
हम्म.. गोंधळी जी. तुम्ही म्हणताय तो मुद्दा अगदीच चुकीचा आहे असं नाही.
काही जाहिराती या खरंच डोक्यात जाणाऱ्या आहेत.. पेट्रोल पंपावर एकाच व्यक्तीचा फोटो पाहून पाहून वीट आलाय. हा खर्च नक्कीच अनावश्यक होता आणि आहे...
पण कोणे एके काळी श्रीमती सोनिया जी, राहुल जी आणि मनमोहन सिंग या त्रिकुटाने पण असाच धुमाकूळ घातला होता हे ही तितकेच सत्य आहे.
3 Nov 2020 - 9:26 pm | आग्या१९९०
गॅस सबसीडी स्वेच्छेने सोडण्यासाठी आता जाहीरातीवर खर्च करायची गरज पडणार नाही . गॅस सबसीडी सरकारने बंद केली आहे.
3 Nov 2020 - 9:27 pm | आग्या१९९०
गॅस सबसीडी स्वेच्छेने सोडण्यासाठी आता जाहीरातीवर खर्च करायची गरज पडणार नाही . गॅस सबसीडी सरकारने बंद केली आहे.
3 Nov 2020 - 10:26 pm | रात्रीचे चांदणे
एकदा तुमच्या डीलर ला भेटून या, सबसिडी चालू आहे.
3 Nov 2020 - 11:17 pm | आग्या१९९०
त्यापेक्षा गॅसची पावती चेक करा , सबसीडीचा तपशील आढळतो का बघा . तसेच बँकेत सबसीडी जमा झाली का ह्याचीही खात्री करून घ्या .
3 Nov 2020 - 11:28 pm | आनन्दा
बातमी खरी आहे.
https://www.google.com/amp/s/energy.economictimes.indiatimes.com/amp/new...
4 Nov 2020 - 12:24 am | आग्या१९९०
अरेरे ! आनंदी आनंद आहे सगळा. गॅस सबसिडी बघायला बातम्या बघायला लागतात. गॅस पावती , बँक पासबुक बघत नाही का ? किती हा सरकारवर विश्वास ? एखाददिवशी जनतेला झोला घ्यायला लावेल हे सरकार.
4 Nov 2020 - 11:33 am | संजय क्षीरसागर
Order Date Order Ref No Order No No. of Cylinder Status Date Cash Memo No Cash Memo Amount Cash Memo Date Subsidized Cylinder Subsidy Amount Transfer Status Payment Type Bank Name Bank A/c No Bank IFSC
01-11-2020 11:41:20 1200828800094221 385213 1 Delivered 02-11-2020 1299665 597.00 01-11-2020 Yes To be processed REFILL SUB
04-09-2020 01:42:26 1200828800076339 379642 1 Delivered 14-09-2020 1281239 597.00 04-09-2020 Yes To be processed REFILL SUB
19-05-2020 01:00:00 1200828800045528 371170 1 Delivered 22-05-2020 1249175 582.00 21-05-2020 Yes
तरी सबसिडी अजून खात्यात जमा झालेली नाही. अर्थात, सरकार इतकं भंपक आहे की कोणत्या वेळी काय निर्णय घेईल सांगता येत नाही. आणि जरा काही विचारलं की विचारणारे डायरेक्ट देशद्रोही !
2 Nov 2020 - 3:24 pm | Rajesh188
सरकारी योजना काय आहेत ह्याची माहिती देणे हे सरकार चे कर्तव्य च आहे.
त्या साठी सरकारी तिजोरी मधून पैसे खर्च होणे हयात काहीच गैर नाही.
लोकांना माहीत कसे पडणार काय योजना आहेत आणि काय नियमाची तरतुदी करायच्या आहेत.
पण राम मदिर आम्हीच कसे बांधणार आहोत.
पाकिस्तान ची आम्ही कशी वाट लावली.
अंतर राष्ट्रीय स्तरावर आम्ही कसे भारताची बाजू भक्कम करत आहोत.
बाकी पक्ष कसे देश विरोधी कारवाया करत आहेत.
अशा प्रकारच्या प्रचारावर सरकार खर्च करत असेल तर ते आक्षेप घेण्याच्या लायकीचे आहे.
2 Nov 2020 - 3:31 pm | मदनबाण
Chinese state-run channel shows the portrait of Prophet Muhammad, netizens ask if Muslim nations will boycott China
आता पाकिस्तान, मलेशिया च्या तोंडातुन किंवा इतर कुठल्या इस्लामी देशाचा कंठ फुटतो का ते पहा !
आपल्या देशातील दाढीदार जिहादी बोकडं काय बोलणार यावर ? :)))
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Indian Army Doctors Successfully Perform Surgery At 16,000 Feet In Eastern Ladakh Amid Conflict With China
2 Nov 2020 - 3:42 pm | Rajesh188
भारत हा हिंदू चा देश झाला पाहिजे असेल तर पाहिजे हिंदू ना सशक्त करा .
त्यांना च हिंदुत्व वादी पक्ष आणि हिंदू च कमजोर करत आहेत.
ते तर सांगत आहे मी प्रतेक पोस्ट मधून.
जमिनी कोणाच्या सरकारी पातळीवर हडपल्या जात आहेत
हिंदू च्या.
उद्योग पती कोणाचे शोषण करत आहेत
हिंदू चे
कंत्राटी पद्धतीवर कमी पगारात कोण राबत आहे कोण राबवत आहे
हिंदू च.
हिंदू सरकारी अधिकारी कोणाची पिळवणूक करत आहेत हिंदू सामान्य जनतेची.
हिंदू ना देशोधडीला लावून हिंदू हिताच्या गप्पा मारूच नका.
2 Nov 2020 - 4:03 pm | Gk
अर्धपोटी लोकच धर्माच्या नावाने लवकर गोळा करता येतात
शिकून अमेरिकेत नोकरी करत बसले किंवा भारतात कलेकटर , सिव्हिल सर्जन , प्रोफेसर होऊन बसले आणि त्यांना संध्याकाळी मोर्चाला या बोलले तर थोडेच येतील
2 Nov 2020 - 4:18 pm | रात्रीचे चांदणे
आस काही नाही, शिकलेले लोक सुद्धा धर्माच्या नावाखाली बॉम्बस्फोट करायला माघे पुढे पाहत नाहीत. भटकळ बंधू वगैरे अशी किती तरी उदाहरणे देता येतील.
5 Nov 2020 - 11:20 am | mayu4u
लोक सुद्धा बायकोने लाथ मारल्याचा दोष हिन्दू धर्माला देउन इस्लाम चे गोडवे गातात. सुन्ता करुन घ्यायचं मात्र धैर्य करत नाहीत.
2 Nov 2020 - 4:59 pm | बाप्पू
म्हणजे संपुर्ण इस्लाम जग जे आज रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. जाळपोळ करत आहेत.. मोर्चात सहभागी आहेत ते सर्व अर्धपोटी किंवा बेकार आहेत असच ना.. ??
2 Nov 2020 - 5:09 pm | Rajesh188
दुबई मध्ये आंदोलन जाळपोळ चालू आहे का?
असेल तर तशी लिंक ध्या.
2 Nov 2020 - 7:04 pm | बाप्पू
जाळपोळ चा अर्थ पुतळे जाळणे असा घ्या.
आणि हे सर्वत्र चालू आहे.
2 Nov 2020 - 6:36 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
९-११-२००१ च्या हल्ल्याचा मुख्य हाय्जॅकर महंमद अट्टा स्थापत्यशात्र शिकलेला होता रे जिक्या.
https://en.wikipedia.org/wiki/Mohamed_Atta
https://en.wikipedia.org/wiki/Ziad_Jarrah
बहुतांशी अपहरणकर्ते सुखवस्तु कुटुंबातले, अमेरिकेत शिक्षण घेतलेले होते असे वाचल्याचे आठवते.
2 Nov 2020 - 6:42 pm | Gk
माई अगं ते लोक उच्च मॅनेजमेन्ट करतात
प्रत्यक्ष मोर्चात , दंगलीत सहभागी होत नाही
मोर्चातले लोक म्हणजे गोडसे , किंवा मोहरा मधले सुनील शेट्टी.
त्यांचे मास्टर माईंड , नसरुद्दीन शहा वेगळेच असतात , ते उच विद्या विभूषित वगैरे असतात
5 Nov 2020 - 10:48 am | सुबोध खरे
माई साहेब
GK म्हणजे गिरीश कुबेर भम्पकच बरळणार
त्याच्या कडे काय लक्ष द्यायचे?
3 Nov 2020 - 4:12 am | गामा पैलवान
माईसाहेब,
तुम्हांस एक गंमत सांगतो. त्याचं काये की अमेरिकेची अर्थव्यवस्था गाड्यांच्या खपाच्या निकषावर तोलली जाते. तोच निकष भारतात निर्बुद्धासारखा लागू करणे इतकंच तथाकथित अर्थतत्ज्ञ जाणतात. मेकॉलेछाप शिक्षणांतनं आजून काय पैदा होणार म्हणा!
भारतात पाऊस व्यवस्थित पडला की अर्थव्यवस्था बाळसं धरते, हे सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ आहे. पण मेकॉलेछाप अर्थतत्ज्ञांना सूर्य कोणी दाखवायचा?
आ.न.,
-गा.पै.
3 Nov 2020 - 4:57 am | अर्धवटराव
वाहन खरेदी हा प्रकार गरज आणि चैन या दोन्ही प्रकारात मोडतो. तेंव्हा गरज भागवणे आणि/किंवा चैन करण्या इतपत पैसा जनतेच्या हातात आहे, असा इंडिकेटर नाहि का दाखवता दिसत? पर्यायाने तो अर्थव्यवस्थेचा एक प्रमुख मापदंड म्हणुन गृहीत धरावा लागेलच ना ?
3 Nov 2020 - 7:45 am | माईसाहेब कुरसूंदीकर
ट्रॅक्टर्स व बाईक्स मापदंड म्हणून गृहीत धरत होतेच. असो. लोकसत्ताचा अग्रलेख अपेक्षेप्रमाणे-
" तीच बाब खासगी कंपन्यांची. इलेक्ट्रॉनिक्स, गृहोपयोगी वस्तूंवर सध्या वारेमाप सवलती दिल्या जात आहेत. पण त्या काही उत्पादन जास्त झाल्याने वा स्पर्धेमुळे नव्हे. तर आहे तो माल न खपल्यामुळे. तथापि याचा अर्थ ‘मागणीत वाढ’ असा कोणी काढल्यास ते अत्यंत अप्रामाणिकपणाचे ठरेल."
https://www.loksatta.com/agralekh-news/editorial-on-gst-collections-up-r...
ह्याचा अर्थ काय? वारेमाप सवलती कोण देतय? ४०,००० रू.चे वॉशिंग मशिन फारतर ३५,००० ला देतील. पण तरी ज्याच्याकडे तेवढे पैसे आहेत व गरज आहे तेच ग्राहक ते घेणार ना? गाड्यांचेही तेच म्हणता येइल. सवलत फार तर ५०००० रुपयांची मिळेल.
लेख बरा लिहिलाय पण गाड्या व दुचाकी जोरात् का खपल्या हे सांगायचे हुशारीने टाळले आहे. म्हणजे गामा म्हणतो ते बरोबर आहे. भारतात गाड्यांचा/दुचाकींची विक्री मापदंड धरणे योग्य नाही.
3 Nov 2020 - 6:00 pm | Rajesh188
भारताची अर्थव्यवस्था ही राज्यांच्या कामगिरीवर अवलंबून असते.
राज्यांनी चांगली कामगिरी केली की देशाची प्रगतीच होणार .
त्या मुळे फक्त केंद्र सरकार ल भारताच्या अधोगतीला दोषी धरता येणार नाही.
जमीन,कामगार,शिक्षण,कायदा सुव्यवस्था हे आणि बाकी बरेच विषय राज्याच्या अधिकारात येतात.
पाणी पुरवठा शेतीसाठी,वीज निर्मिती आणि वितरण हे पण राज्याच्या अधिकारात च आहे.
3 Nov 2020 - 5:53 pm | Rajesh188
मेट्रो चे कांजूर मार्गामध्ये बांधल्या जाणाऱ्या राज्याच्या जागेवर केंद्र सरकार नी अचानक दावा केला आहे.आणि तातडीने काम धांबण्यास सांगितले आहे.
हा राज्याच्या अधिकार वर उघड बलात्कार आहे
जमीन हा विषय च मुळात राज्याच्या अधिकारात येतो तिथे केंद्राचा काय संबंध.
3 Nov 2020 - 6:31 pm | आनन्दा
हे काही कळले नाही.
जमीन हा विषय राज्याच्या अखत्यारीत येतो म्हणजे काय?
सगळ्या सरकारी जमिनीवर राज्य सरकारची मालकी असते असे म्हणायचे आहे का तुम्हाला?
3 Nov 2020 - 7:26 pm | आग्या१९९०
लॉकडाऊनमुळे लोकांचा पर्यटन , हॉटेलमध्ये खाणे , थिएटर मध्ये जावून सिनेमा बघणे , मॉलमध्ये खरेदी , लग्न समारंभ , इत्यादी खर्च न झाल्याने पैशाची बरीच बचत झाली . लॉक डाऊन शिथील झाले तरी सार्वजनिक वाहतूक सेवा सर्वांनाच उपलब्ध नसल्याने रिक्षा अथवा टॅक्सीवर खर्च वाढू लागल्याने स्वतःचे वाहन सोयीचे वाटू लागल्याने कार व बाईक्सची खरेदी मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे अर्थव्यवस्था रुळावर आली असे म्हणणे घाईचे होईल. सार्वजनीक वाहतूक सेवा सर्वांना खूली झाल्यावर कार व बाईक्सची खरेदी नक्कीच कमी होईल .
3 Nov 2020 - 10:54 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
हम्म पण मग लाखो नोकर्यावर गदा आली, अनेक धंदे बुडाले, बेरोजगारांचे तांडे वगैरे ह्या बातम्या अतिरंजित होत्या असे म्हणायचे का? कारण करोना आल्यापासुन ह्याच बातम्या सतत येत होत्या. साधे उदाहरण घेऊया परत- ५५० मर्सेडिझ गाड्या विकल्या गेल्या महिन्याभरात. ही गाडी घेणारे श्रीमंत व्यावसायिक असणार ? ह्यांचे काही ना काही व्यवसाय असणार? व्यव्साय तेजीत असला तरच हे लोक ४०/५० लाखाच्या गाड्या घेतील ना? पुढच्या २/३ वर्षाचा तरी विचार हे व्यावसायिक करत असतील ना ?
3 Nov 2020 - 11:37 pm | आग्या१९९०
कोविडपूरक व्यवसायात बक्कळ पैसा कमावला असेल . मर्सिडीसच काय बोइंगही घेतील हे लोक. सॅनिटायझरपासून मास्कपर्यंत कशातही कितीही नफा कमवला असेल . आमच्या येथील लेडीज टेलरने हजारो मास्क तयार करून ४० ते ७० रुपयांना विकून एरवीच्या मासिक कमाईपेक्षा तिप्पट कमावले
4 Nov 2020 - 10:42 am | माईसाहेब कुरसूंदीकर
खाजगी हॉस्पिटल्स व तेथे काम करणार्या डॉक्टरानी करोना काळात नोटा छापल्या असे अनेकांकडुन कळले.पण तरीही ६ महिन्यात ४० लाख कमाई कितीजण करतील? तुमच्या त्या लेडिज टेलरने कोणती गाडी घेतली? की फ्लॅट घेतला?
पार्ले कंपनीने बक्कळ पैसा मिळवला. २०१९ मध्ये, जी एस टी कमी केला नाही तर १०००० माणसे काढावी लागतील असा ईशारा त्यानी सरकारला दिला होता. करोना धावून आला मदतीला ! आणी आता नफा किती झाला हे सांगायला कंपनीने नकार दिला होता. जूनमध्ये
https://www.thehindu.com/business/Industry/parle-g-logs-record-sales-dur...
अर्थात खाजगी कम्पनी आहे ती.
सांगायचा मुद्दा- हे कथित अर्थतज्ञ जे काही आकडे फेकत असतात व सरकारला 'ईशारे' देत असतात, लाखो नोकर्या गेल्या वगैरे म्हणत असतात त्यावर किती विश्वास ठेवायचा हा प्रश्न आहे.
4 Nov 2020 - 10:59 am | Gk
सरकार सुद्धा 15 लाख , 5 ट्रीलीयन , 300 पार , 70 साल, 35 साल भीक
आकडे कमी फेकलेत का ?
4 Nov 2020 - 2:39 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
जिक्या, अरे राजकारणी लोकाना फार मनावर घ्यायचे नसते. पण शास्त्रज्ञ, अर्थतज्ञ, संपादक, ते अॅनालिस्ट्स का कोण असतात..त्यानी तर अभ्यास करायचा असतो ना? जर तुमची थियरी चुकली असेल तर सरळ सांगावे. पण ते होत नाही. आताही ह्या अशा खरेदीला "स्पाईक" वगैरे म्हणणे चालु आहे. असो.
साधारण २/३ महिन्यापुर्वी युरोपियन देश करोनाच्या विळख्यातून कसे बाहेर आले आहेत ह्यावर लोक्सत्तेत अग्रलेख येत होते. उदा "जर्मनीने कशी वेळीच मात केली, त्यानी केले उपाय, भारताने त्यातून काय शिकण्यासारखे आहे.. ह्यावर लेख पडले, चॅनेलीय चर्चा झाल्या.
आता जर्मनीत पुन्हा लॉक्डाउन आला. आता काय म्हणणार?
https://www.abc.net.au/news/2020-11-04/germany-coronavirus-lockdown-avoi...
4 Nov 2020 - 2:46 pm | Gk
कायच्या काय माई
आमदार खासदार जनतेकडून पगार घेतात , त्यामुळे त्यांनीही आकडे अभ्यास करूनच सांगायचे असतात
4 Nov 2020 - 11:08 am | आग्या१९९०
पण तरीही ६ महिन्यात ४० लाख कमाई कितीजण करतील?
इतका काथ्याकुट करण्यापेक्षा मर्सिडीस खरेदी करणारे कोण लोक आहेत हे शोधून काढा , त्यांनी गेल्या सहा महिन्यात काय उद्योग केले आणि किती कमावले हेही विचारा.
त्या बाईकडे अगोदरच स्कूटर असल्याने नवीन गाडी घेतली नाही कदाचित पीएम फंडमध्ये झालेला फायदा टाकला असेल .
3 Nov 2020 - 7:50 pm | Rajesh188
प्रतेक व्यक्तीची रोजची कमाई किती आहे ह्या वर अर्थव्यवस्था भक्कम आहे की कमजोर हे स्पष्ट होवू शकते.
पण ते उत्पादन राज्याचे उत्पादन भगिले राज्याची लोकसंख्या अशा पद्धतींनी काढलेले नसावे तर घराघरात जावून त्याची तपासणी केली असावी.
नाहीतर फसवी माहीत मिळते सरकार श्रीमंत आणि जनता गरीब.
जगात 3 नंबरची अर्थव्यवस्था आणि प्रतेक तिसरा माणूस हा भुकेला असतो त्याला दोन वेळचे जेवण पण मिळत नाही अशी अवस्था असते.
4 Nov 2020 - 12:09 pm | Gk
मनोरंजन क्षेत्राची पैदास अर्णव गोस्वामीला अटक
'अर्णव मनोरंजन गोस्वामी' ह्याला अटक
रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केलं आहे. रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील घरातून ताब्यात घेत अटकेची कारवाई केली. पोलिसांकडे कोणतीही कागदपत्रं, कोर्टाचा आदेश किंवा समन्स नसतानाही ही कारवाई केला जात असल्याचा आरोप रिपब्लिककडून करण्यात आला आहे. याशिवाय अर्णब गोस्वामी यांच्यावर पोलिसांकडून जबरदस्ती करत धक्काबुक्की करण्यात आल्याचाही दावा करण्यात आला आहे. पोलीस अर्णब गोस्वामी यांना घेऊन अलिबागला रवाना झाले आहेत.
List of Journalists arrestd under Modi Govt till now
KC Wangkhem
Om Sharma
MA Ganai
Ashwani Saini
Vishal Anand
Neha Dixit
Sidhart Varadrajan
Prashant Kanojia
Pawan Chaudhary
ASR Pandian
Manish Pandey
Subhas Rai
Vijay Vineet
Zubair Ahmed
But Fascism is only when Arnab is arrestd
4 Nov 2020 - 11:33 pm | नीलस्वप्निल
तुमचा अभ्यास दान्ड्गा दिसतोय... दिलेल्या लिस्ट मधल्या पत्रकारान्वर कारवाई का झाली ते पण सान्गा....
वाट पाहतोय...
6 Nov 2020 - 4:20 pm | सॅगी
Gk हा आयडी पैगंबरवासी झालेला आहे. त्यामुळे तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कदाचित कधीच मिळणार नाही.
6 Nov 2020 - 7:53 pm | बाप्पू
खरं कि काय???
6 Nov 2020 - 9:35 pm | सॅगी
प्लीज नोट....आयडी पैगंबरवासी झाला आहे...
6 Nov 2020 - 10:04 pm | बाप्पू
अरेरे. बातमी खरी असेल तर हे खूपच वाईट झाले..
पण काळजी नसावी.. पुनर्जन्म घेऊन GK पुन्हा मिपावर धुमाकूळ घालतील याबाबत मला किंचीतही शंका नाही.. !!
4 Nov 2020 - 1:06 pm | Rajesh188
Arnav ला पत्रकार आणि त्याच्या रिपब्लिक चनेल ला न्यूज चॅनेल म्हणतच येणार नाही.
फक्त माकडचाळे चालू होते त्याचे आणि त्याच्या सहकार्याचे त्या मुळे अर्णव ला अटक म्हणजे मीडिया च आवाज दाबण्याचा प्रयत्न असे म्हणतच येणार नाही.
4 Nov 2020 - 1:52 pm | गोंधळी
Suspect says paid Rs 15 lakh/month to boost Republic TV TRP
https://timesofindia.indiatimes.com/india/suspect-says-paid-rs-15-lakh/m...
खुप मोठा scam असण्याची शक्यता आहे असे वाटते. गंमत म्हणजे ऊ.प्र. सरकार ने फेक कंम्पलेंट करुन cbi चौकशी लावली आहे आपल्या अंध भक्ताला वाचवन्यासाठी.
6 Nov 2020 - 10:14 pm | बाप्पू
पूर्णतः नाही पण बऱ्याच अंशी सहमत.
पूर्णतः सहमत नाही कारण - अर्णब गोस्वामी ने काही मुद्दे असे हायलाईट केले ज्यांना इतर चॅनेलस नी सेक्युलॅरिज्म किंवा पॉलिटिकली करेक्ट होण्याच्या नादात कधीच भाव दिला नाही.
पण तरीही त्याचा एकंदरीत आरडाओरडा, अकांडतांडव पाहून तो कधीही न्यूज रिपोर्टर म्हणून आवडला नाही. तसेच तो नेहमीच BJP ला सॉफ्ट कॉर्नर देत आलाय त्यामुळे त्याचे नक्कीच राजकीय संबंध असणार,. तो पूर्णपणे निष्पक्ष कधीच वाटला नाही. आसो..
तर त्याच्यावर जी केस चालू आहे ती पूर्णपणे वेगळी आहे, आणि जे काही पोलिस करतायेत ते कायद्याप्रमाणे आहे असे वाटते. या सर्वाचा उपयोग BJP वाले आपल्या राजकीय फायद्यासाठी करत आहेत हे वेगळे सांगणे न लागे. मीडिया चा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय वगैरे वगैरे सगळे भंपक आहे..
4 Nov 2020 - 10:54 pm | मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- DRDO testfires advanced version of Pinaka rockets | pinaka missile | pinaka missile test
5 Nov 2020 - 3:35 pm | कपिलमुनी
रिया चक्रवर्ति चे वडील सुद्धा आर्मी मध्ये होते
5 Nov 2020 - 4:15 pm | तुषार काळभोर
Does having an army officer as father entitles someone any special rights ?
मग बाकीच्यांनी सैन्याधिकार्यांच्या पोटी जन्म घेतला नाही, ही त्यांची चूक का ?
आणि हे काय घरात पण सजावटीच्या टोप्या घालून बसतात का? उगाच खोटी टोपी घालून मुलाखत देण्याचे प्रयोजन काय असू शकते? - स्वतःच्या माजी सैन्याधिकारीपणाचा भावनिक फायदा?
6 Nov 2020 - 10:17 pm | बाप्पू
या महाशयांना बघितल्यावर एच वाक्य आठवते.. " ये कोई रंxखाना है??? "
5 Nov 2020 - 7:34 am | माईसाहेब कुरसूंदीकर
पोलिस कस्ट्डीची मागणी कोर्टाने फेटाळली व न्यायालयीन कोठडी दिली. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात ही अट़क झाली आहे. आत्महत्येआधि लिहिलेल्या नोटमध्ये अर्नब ह्यांचे नाव आहे. शिवाय ईतर दोघांचीही नावे आहेत.
1. Arnab Goswami: Rs 83 lakh for studio work inside the Bombay Dyeing compound
2. Firoz Shaikh: Rs 4 crore (https://www.linkedin.com/in/ferozshaikh1/?originalSubdomain=in)
3. Neetish Sarda: Rs 55 lakh (https://www.linkedin.com/in/neetish-sarda-99183a10b/?originalSubdomain=in)
शेख व सरडा ह्याना अटक झाली का ? श्रीमती नाईक व त्यांची कन्या ह्यांची पत्रकार परिषद पाहिली. ह्या दोघीनी जे काही झाले ते सविस्तर सांगितले पण शेख्/सरडा ह्याना अटक झाली पाहिजे असे त्या म्हणताना दिसत नव्हत्या. राग मुख्यतः अर्नब ह्याच्यावरच दिसतोय.
https://www.indiatoday.in/india/story/what-the-arnab-goswami-case-is-all...
5 Nov 2020 - 7:54 am | सुनील
तिघांनाही अटक झाले आहे हो!
https://ind.news/arnab-goswami-2-others-sent-to-14-day-judicial-custody/
असो, व्हॉटअबाऊटरीची संधी नाकारल्याबद्दल महाराष्ट्र पोलिसांचा निषेध!
5 Nov 2020 - 8:28 am | शा वि कु
कॉम्रेड गोस्वामींचा घरात चे गव्हेराचे पोस्टर दिसते आहे.त्याच्या मुलाला पण "चे" म्हणतात, त्याच त्या दुत्त दुत्त कॉमी गव्हेरा वरून.
अरेच्चा. म्हणजे कॉमीनिर्दालक गोस्वामी ...?
(हिपोक्रसीकी भी सीमा होती है
- अमृता फडणवीस, चुकून अर्बन नक्सल.
असो, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, लोकशाहीचा चौथा स्थंभ,यांची आठवण झाली ह्याचा आनंद आहेच. गोस्वामीवरचा लोकल सत्तेचा वरदहस्त उडाला त्यामुळे अटक झाली आहे असेच सकृतदर्शनी दिसते. काडीमोड आत्ताच, वर्षामागे झाला आहे पण, त्यामुळे दोषारोप जरा सांभाळून. :)
5 Nov 2020 - 6:17 pm | गामा पैलवान
अवांतर :
लोकहो,
चे गव्हाऱ्याची मस्तपैकी पिसून काढलीये गिरीश खरे यांनी : https://www.aksharnama.com/client/article_detail/4629
त्यावरून प्रेरणा घेऊन मीदेखील घवाऱ्याची घंटा बडवून घेतली.
आ.न.,
-गा.पै.
5 Nov 2020 - 8:38 am | Rajesh188
आता पर्यंत दिल्ली समोर झुकणारे बघितले.
आता महाराष्ट्र ला कणखर मुख्यमंत्री मिळाला
5 Nov 2020 - 8:42 am | बाप्पू
कणखर?? कणभर असेल..
5 Nov 2020 - 9:00 am | सॅगी
काय बोलताय?? खरं की काय???
सध्याच्या मुख्यमंत्र्याला सत्तेत येण्यासाठीही दिल्ली (आणि बारामती) समोर झुकावे लागल्याचे पाहीले आहे महाराष्ट्राने..
5 Nov 2020 - 10:04 am | बाप्पू
फक्त दिल्ली नाही.. तर बाईसमोर ते ही इटलीच्या आणि गाढवासमोर ( म्हणजे कोण ते समजले असेलच ) देखील झुकावे लागले.. आणि म्हणे कणखर मुख्यमंत्री.. कणभर तरी कर्तृत्व आहे का यांचं.. बापाच्या जीवावर मजा हाणतायेत. पुढच्या वेळी 50 सीट्स पण निवडून येणार नाहीत.
5 Nov 2020 - 10:24 am | माईसाहेब कुरसूंदीकर
सामनाचा अग्रलेख https://www.saamana.com/saamana-editorial-on-arnab-goswami-arrest/
लिहिता लिहिता जरा फसलेच राउत साहेब-
"आधीच्या सरकारने गोस्वामी ह्याना वाचवण्यासाठी हे प्रकरण दडपले."
आणी ह्या आधिच्या सरकारात शिवसेना होती ना ?
5 Nov 2020 - 10:39 am | आग्या१९९०
शिवसेनेचे काहीही होवो परंतू सध्या अर्णव प्रकरणामुळे बिजेपीची तडफड बघायला मजा येत आहे. उशीरा का होईना अच्छे दिन बघायला मिळाले.
5 Nov 2020 - 2:31 pm | गोंधळी
अजुन पर्यंत राष्ट्रपती राजवट लागु करण्याची मागणी न केल्याबद्दल भक्तांचा निषेध का करु नये??
नवीन विषेश नाम- मराठी भय्ये.
5 Nov 2020 - 1:47 pm | Rajesh188
केंद्रात राक्षसी बहुमत जनतेनी दिल्या मुळे भारतीय जनता पार्टी वेडी झाली आहे.
त्यांच्या चुका दाखवणाऱ्या समजदार लोकांना सुद्धा देशद्रोही ठरवत तसा प्रचार त्यांचे बटिक न्यूज चॅनेल आक्रमक पने करत आहेत.
हिंदू आणि बाकी धर्मात वितुष्ट वाढत जावे असा प्रकार सरकारी पातळीवर वर होत आहे.
त्यांचे बटिक न्यूज चॅनेल तोच द्वेषाचा अजेंडा आक्रमक पने रोज चर्चा घडवल्या जात आहेत.
लोक आता BJP la वैतागली आहे.
अर्णव सारख्या फालतू व्यक्ती वर त्यांच्या वैयक्तिक गुन्हा साठी झालेल्या कारवाई ला पत्रकारितेवर हल्ला आहे असे ठरवून bjp ni देशात उच्छाद मांडला आहे.
त्यांचे batik चॅनेल दाखवत आहेत तशी स्थिती देशात नाही .
Bjp विरूद्ध लोक आता बोलू लागली आहेत ज्यांनी च त्यांना बहुमत मध्ये निवडून दिले होते.
पुढच्या निवडणुकीत bjp चा पूर्ण बीमोड झालेला देशाला बघायला मिळेल हे मात्र नक्की.
5 Nov 2020 - 2:16 pm | Rajesh188
एक भगवे कपडे घातलेला साधू.
एक निर्वूत सैनिक.
त्यानं शोधलेले अर्धवट विचारवंत.
एक bjp च तेवढंच हुशार नेता.
असे सर्व हजर असतात.
हे म्हणजेच देश असा एक ह्यांचा बालिश विचार आहे.
अलिबाग बाग मध्ये अटक झाल्यावर bjp कार्यकर्ते वंदे मातरम् च्या घोषणा देत होते
जसा कोणी देशाचा योद्धा च तुरुंगात आहे.
देशाच्या स्वतंत्र लढ्यात काडीचे पण योगदान नसणाऱ्या पक्षाचे कार्यकर्ते वंदे मातरम् च्या घोषणा देतात.
लय म्हणजे लय हसायला येत होते.
5 Nov 2020 - 2:16 pm | Rajesh188
एक भगवे कपडे घातलेला साधू.
एक निर्वूत सैनिक.
त्यानं शोधलेले अर्धवट विचारवंत.
एक bjp च तेवढंच हुशार नेता.
असे सर्व हजर असतात.
हे म्हणजेच देश असा एक ह्यांचा बालिश विचार आहे.
अलिबाग बाग मध्ये अटक झाल्यावर bjp कार्यकर्ते वंदे मातरम् च्या घोषणा देत होते
जसा कोणी देशाचा योद्धा च तुरुंगात आहे.
देशाच्या स्वतंत्र लढ्यात काडीचे पण योगदान नसणाऱ्या पक्षाचे कार्यकर्ते वंदे मातरम् च्या घोषणा देतात.
लय म्हणजे लय हसायला येत होते.
5 Nov 2020 - 4:59 pm | mayu4u
सध्याच्या कोणत्या पक्षाचे देशाच्या स्वतंत्र स्वातन्त्र्य लढ्यात योगदान होते?
वंदे मातरम् ही घोषणा देण्यासाठी देशाच्या स्वतंत्र स्वातन्त्र्य लढ्यात योगदान देण्याची आवश्यकता असते का?
5 Nov 2020 - 5:05 pm | सॅगी
तुमचा हा प्रतिसाद वाचून आणि त्यातले लॉजीक (असलेच तर) पाहुन लय म्हणजे लय हसायला येत आहे...
5 Nov 2020 - 2:31 pm | गणेशा
अर्णब ला अटक हि रायगड पोलिसांनी केली आहे.
महाराष्ट्राचे आत्ताचे गृहमंत्री हे राष्ट्रवादीचे आहेत..
आणि केस reopen अन्वय नाईक यांच्या पत्नीने केली आहे..
मला प्रश्न पडतात
1. केस कुठलीही न्यायालयीन चौकशी न होता दोन अडीच वर्षांपूर्वी बंद केली जाते, यात तेंव्हाच्या गृहमंत्री असलेल्या नेत्याला प्रश्न विचारले पाहिजेतच ना?
2. आरोपाखाली अटक झाली, कारण आत्महत्या केलेल्या चिठ्ठीत अर्णब चे नाव होते..
यावर केस चालू होउदे, आरोप प्रत्यारोप आणि नंतर न्याय न्यायालय देईल.. यात अर्णब दोषी नसेल तर सुटेल.
पण हि पत्रकारीतेवरचा हल्ला आहे वगैरे देशाचे माननीय गृहमंत्री, महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते करतात, हि आणीबाणी परिस्थिती वगैरे बोलतात काय आहे हे..
मग ह्याच धर्ती वर अलीकडे माजी अर्थमंत्री पी. चिंदंबरम यांना न्यायालयाने क्लीन चिट दिली तेंव्हा तुम्ही सत्तेचा गैरवापर करताय असे कोणी म्हणाले का?
वद्रा ला जेल मध्ये टाकणार असे बोलणारे इतके वर्ष कुठले पुरावे घेऊन बोलत होते..
जो आरोपी त्यावर केस चालवा ना, त्यात पत्रकार, नेते फलाना मध्ये येतेच का?
आणि सुशांत सिंग च्या आत्महत्येला कोण जबाबदार तसेच अन्वय च्या आत्महत्येला कोण जबाबदार हे तरी कळूद्या..
मग अभिनेत्याला वेगळा न्याय आणि व्यावसायिकाला वेगळा न्याय असे का?
जर तो आरोपी नसेल, त्याने सर्व पैसे रिटर्न केले असतील तर तो सुटेल..
तसेही 2 लाखाच्या वर cash व्यवहार होत नाहीत ना 2016 पासून, मग तर पाऊण कोटी पेक्षा जास्त रक्कम आहे ती, त्याने बँक अकाऊंट, चेक फलाना ने दिलीच असेल तर सुटेल...
यात पत्रकारीता मध्ये का आणली जातेय?
उद्या पत्रकार काहीही करतील आणि अटक केल्यावर पत्रकाराला अटक म्हणताल की संशयित आरोपी ला अटक?
5 Nov 2020 - 2:43 pm | तुषार काळभोर
सहमत..
5 Nov 2020 - 2:50 pm | शा वि कु
बाडीस.
5 Nov 2020 - 2:56 pm | गोंधळी
नेमक व योग्य प्रतिसाद.
5 Nov 2020 - 5:12 pm | अमरेंद्र बाहुबली
सहमत
5 Nov 2020 - 2:51 pm | इरसाल
एखाद सोपा प्रश्न मी पण विचारावा म्हणतो.
पहिलं नाव ज्याने जास्त पैसे बुडवले त्याच्यापासुन सुरुवात करतात जनरली. (असो आत्महत्येची मानसिकता झालेला माणुस कदाचित ते ताळतंत्र विसरला असावा म्हणुन सोडुन देवु)
ज्यांच्या मुळे संबंधितांनी आत्महत्या केली त्या तिघांची नाव सगळ्याच ठिकाणी एकत्रच नी सतत घेतली जातात.
अस असुनही,
मग या सगळ्यांच एवढ वाढीव प्रेम त्या ठो ठो बोंबलणार्या एकट्या अर्णबवरच कां उतु जातय?????
त्या "नॉटी"च काय म्हणण आहे यावर त्यांनी काही प्रगल्भ भाष्यवगैरे केलेय काय?