Skip to main content

घुमजाव की --

लेखक शकु गोवेकर यांनी शुक्रवार, 03/08/2012 03:19 या दिवशी प्रकाशित केले.
दिल्लिमध्ये उपोषण करित असलेले माननीय श्री किसन बाबुराव हजारे उर्फ अण्णा यांनी राजकारणात उडी घ्यायचे ठरविले आहे,हे त्यांचे पाउल बरोबर वाट्ते काय? कारण अगदी काल परवा पर्यंत ते व त्यांचा चमु आम्ही राजकारणी लो़कांच्या बरोबर नाही परंतु आमचा लढा फक्त ठरावीक व भ्रष्टाचार विरोधी आहे असे म्हणत होते,अचानक राजकारण बदलले कसे? हे घुम जाव की-- अण्णांबद्दल जनतेला आदर आहे व तोच त्यांनी राहु द्यावा कारण राजकारणी लोकांचे रंग काही काळानंतर बदलु शकतात--

संत तुकाराम व गौतम बुध्द ह्यांवरील पुस्तक खरेदीबद्दल सल्ला.

लेखक pramanik यांनी गुरुवार, 02/08/2012 16:15 या दिवशी प्रकाशित केले.
साष्टांग नम्स्कार,,,,,,,,,,,, मला तुकाराम महाराज लीखीत अभंग जसेच्या तसे,मुळ रुपात वाचायचे आहेत.कींवा एखाद्या लेखकाने अर्थ समजवुन सांगितलेले पण तरीही मुळ अभंग लिहलेले असलेले पुस्तक हवे आहे. येथील पुस्तकप्रेमी जनता एखादे नाव सुचवेल का? मला नेहमीच सुचवलेल्या/प्रख्यात वस्तु आवड्तात कारण त्यामागे अनुभव असतो आणि पुस्तकांच्या खासकरुन धार्मिक पुस्तकांच्या बाबतीत ते खुप खरे आहे. त्याचप्रमाणे मी गौतम बुध्द ह्यांच्या शिकवणी सांगणारे पुस्तक शोधत आहे. Teachings of the Buddha by Jack Kornfield ह्यावर शिक्कामोर्तब करणार आहे.मराठीत एखादे गौतम बुध्दांवरचे चांगले पुस्तक आहे का? आगाउ धन्यवाद.

मानवी हक्कांची पायमल्ली ?

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 02/08/2012 14:45 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येक देशाची एक संस्कृती असते. ती अर्थातच तेथील लोकानी निर्मान केलेले असते भारतात फारफार पूर्वी म्हणे मुक्त संस्कृती होती. त्यामुळेच खजुराहो सारखी अप्रतीम शिल्पे निर्माण होऊ शकली. मात्र परकीय आक्रमणे आल्यापासून ही संस्कृती लोप पावली. इतराना मुक्त वाग म्हणणारी अमेरीका त्यांच्या नागरीकाना मात्र मुक्तपणा देत नाही हीच बातमी पहा ना http://timesofindia.indiatimes.com/world/us/US-couple-arrested-for-stea… बिचार्‍या लोकाना घरी जागा मिळत नसेल .

अघळपघळ, इकडचं तिकडचं - १

लेखक कॉमन मॅन यांनी गुरुवार, 02/08/2012 13:51 या दिवशी प्रकाशित केले.
पाकचे प्रधानमंत्री झरदारींनी आपल्या आदरणीय सरदारजींना, देश के बडे वीरजी - मनमोहन सिंगांना आता पाकिस्तानात यायचे आग्रहाचे निमंत्रण दिले आहे.. हम्म.. म्हणजे मनमोहनपंतांनी तेथे जाऊन त्यांच्या मस्तपैकी गोष्त-बिर्यानीचा खाना कुबुल केल्यानंतर आणि पाकड्यांशी नव्याने दोस्ताना केल्यानंतर थोड्याच अवधीत पुन्हा भारताने पाक-पुरस्कृत काही अतिरेकी कारवायांना सज्ज राहण्यास हरकत नाही..! --------------------------------------------------------------------------------- याला म्हणतात इमान - याला म्हणतात भक्ती..

(जिलब्या खायकू)

लेखक sagarpdy यांनी गुरुवार, 02/08/2012 11:02 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणास्थान १. पाऊस धारा पडती हाती गारा हाती घ्या झारा धारा धारा, शुद्ध धारा २. कुटील कावा मनांत रंगवावा पाडून जिलब्या पोटभर खाव्या ३. नाच मोराचा हैदोस पोराचा जेवण झाल्यावर टाईम झोपेचा (चारोळ्या जुळवण्यात अखेर यशस्वी!)
काव्यरस

<पिवून हय क्यु?>

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 02/08/2012 10:19 या दिवशी प्रकाशित केले.
दारोळ्या १. प्यासा बार मंडई समोर बाटल्या रित्या २. उठला नाना लावे समाधी तुळशी बागेत ३. नाच पराचा हैदोस वाचताना मोडते समाधी प्रेरना स्त्रोतः http://misalpav.com/node/22407#comment-416944

चंद्र-कळा

लेखक पेशवा यांनी गुरुवार, 02/08/2012 01:06 या दिवशी प्रकाशित केले.
चंद्र फुलांचे हार गळा रात्र सजविशी अंग-कळा || धृ. || धुंद धुंद मन, बहर-बंध तन स्पर्श रेशमी, घुसमटतो घन छेड काढता, लटक्या रागे म्हणसी मजला 'कृष्ण-काळा'! || १ || देह उमलले, मिठीत रमले श्वास केतकी, गुंफून पडले रात्री मधुनी, कळीकाळाच्या रंगला हा रास खुळा || २ || एकतनूता, एकतानता, द्वैत मिटले, दोघांकरता आसक्तीच्या मैफिलीत ह्या जीव भोगे ब्रह्म-कळा || ३ || -पूर्वप्रकाशित

रक्षाबंधन.. रक्षाबंधन ..

लेखक विदेश यांनी गुरुवार, 02/08/2012 00:33 या दिवशी प्रकाशित केले.
. रक्षाबंधन... रक्षाबंधन दोन मनांची अतूट गुंफण ! हिरा भाऊ अन् बहीण अंगठी अंगठीस हो सुरेख कोंदण ! मदतीस्तव वा संकटातही धावे बंधू करण्या रक्षण ! भावाचा बहिणीस आधार द्रौपदीसखा तो नारायण ! दुजाभाव ना मनांत कोठे दोघांचे ते एकच रिंगण ! रक्षाबंधन ... रक्षाबंधन दोन जिवांचे अतूट बंधन ! .
काव्यरस